Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - १२

श
श्रीगुरुजी
Mon, 09/25/2017 - 09:08
🗣 197 प्रतिसाद
चालू धाग्यात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा

प्रतिक्रिया द्या
38659 वाचन

💬 प्रतिसाद (197)
अ
अभिजीत अवलिया Mon, 09/25/2017 - 09:15 नवीन
एकतर दर महिन्याचा वेगळा धागा असावा नाहीतर १५० प्रतिसाद झाल्यावर नवा काढावा. एक काहीतरी फिक्स ठरवावे. कुठल्या धाग्यावर लिहावे याबद्दल गोंंधळ होतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 09/25/2017 - 11:35 नवीन
बरोबर आहे. नवीन प्रतिसाद शोधण्यासाठी सोपे जावे व त्यासाठी सर्व प्रतिसाद फक्त एकाच पानावर असावे या उद्देशाने आधीच्या धाग्यात अंदाजे १५० प्रतिसाद पूर्ण झाले तर नवीन धागा सुरू व्हावा हा मूळ उद्देश होता. प्रत्येक महिन्यासाठी वेगळा धागा काढण्याची कल्पना सुद्धा चांगली आहे. परंतु ३०-३१ दिवसांमध्ये ३००+ प्रतिसाद होतात व त्यामुळे वेगवेगळ्या पानांवर आलेले नवीन प्रतिसाद शोधण्यास अडचण होते. म्हणून धाग्याचे शीर्षक काहीही ठेवले तरी व कोणीही धागा काढला तरी अंदाजे १५० प्रतिसादानंतर नवीन धागा सुरू व्हावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
श
शलभ Wed, 10/04/2017 - 11:22 नवीन
अंदाजे 150 प्रतिसाद एकाच पानावर राहतात असे दिसत नाही. काही 200 प्रतिसादाचे धागे पाचव्या पानावर पोहोचलेत. सबब दर महिन्याचा एकच धागा असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 09/25/2017 - 09:17 नवीन
http://m.indiatoday.in/story/sm-krishna-ccd-it-raids-vg-siddhartha/1/1055240.html कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थवेरे यांच्या घरावर व कार्यालयांवर धाड टाकून आयकर विभागाने ६५० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आणली आहे. हे Cafe Coffe Day या साखळी दुकानांंचे मालक आहेत.
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Mon, 09/25/2017 - 10:43 नवीन
अग्नेला मर्केल पुन्हा एकदा चान्सलरपद भुषवणार आहे. जर्मनीत २४ तारखेला रविवारी मतदान झाले. यामध्ये CDU / CSU पार्टीला ३३% मते मिळाली. पण यावेळी आश्चर्यकारकरित्या एका नवीन पार्टीला (फक्त ४ वर्ष जुनी) AfD याला १२.६ % मते मिळाली. हि पार्टी उजव्या विचारसरणीची आहे. हि पार्टी anti muslim पार्टी म्हणून ओळखली जाते. SPD पार्टीला २०.५ % मते मिळाली पण यावेळी हि पार्टी विरोधी पार्टी म्हणून काम करणार आहे त्यामुळे मर्केल ला २ नवीन पार्टीशी बोलून नवी आघाडी तयार करावी लागणार आहे. तिच्यासमोर यावेळी खूप आव्हाने आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 09/25/2017 - 12:06 नवीन
'अंमलबजावणी संचलनलायकडून'कडून कार्ती चिदंबरम यांची संपत्ती जप्त; बँक खातीही गोठवली. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्यावर सोमवारी अंमलबजावणी संचलनलायकडून (ईडी) कारवाईचा बडगा उभारण्यात आला. ‘ईडी’ने कार्ती चिदंबरम यांची सर्व संपत्ती जप्त केली आहे. तसेच त्यांची बँक खाती आणि ९० लाख रूपये रकमेच्या मुदत ठेवी गोठवण्यात आल्या आहेत. कार्ती चिदंबरम यांनी आपली संपत्ती विकण्याचा आणि बँक खाती बंद करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ‘ईडी’ने हे पाऊल उचलल्याचे कळते. http://www.loksatta.com/desh-videsh-news/enforcement-directorate-attaches-assets-bank-accounts-fds-worth-rs-90-lakh-of-karti-chidambaram-in-aircel-maxis-case-1557447/
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 09/25/2017 - 15:14 नवीन
बाकी काहीही असो, इडी, प्राप्तिकर विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या संस्थांना भाजपने जी मोकळीक दिली आहे आणी कुठल्याही राजकिय तडजोडीला बळी न पडता आअर्थिक गुन्ह्यांचा ज्या वेगाने छडा लावला जात आहे ते काबिल ए तारीफ आहे. भाजपचे अभिनंदन. जर हे सुडाचे राजकारण असेल तर असे सुडाचे राजकारण अवश्य व्हावे. काँगेस किंवा आणखी कोणी सत्तेवर आले तरी त्यांनी सुद्धा असेच सुडाचे राजकारण करत रहावे. साटेलोटे करून आयुष्यभर माया गोळा करत राहणार्‍या सोकॉल्ड सुसंस्कृत व्यक्तिगत मित्रांपेक्षा हाडवैर असणारे राजकारणी भारी.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 09/25/2017 - 15:30 नवीन
ईडी कारवाई करत नाही वाटतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
स
सौन्दर्य Wed, 09/27/2017 - 03:49 नवीन
एक शंका, ह्या धाडी फक्त विरोधकांच्या घरा-दारावर पडताहेत की सत्तेतील शंकास्पद नेत्यांवर देखील ? जर फक्त विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ह्या धाडी पडत असतील तर त्या योग्य नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा Wed, 09/27/2017 - 07:43 नवीन
जर फक्त विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ह्या धाडी पडत असतील तर त्या योग्य नाहीत.
असे कसे? धाडी वैध आहेत की नाही हे पहायला हवे. भ्रष्टांवर धाडी पडायलाच पाहिजेत. केवळ सध्याच्या सरकारविरूद्ध आवाज उठवताहेत या सबबीखाली विरोधक चिदंबरम अन लालू सारख्यांचे समर्थन करणार असतील तर ते बरोबर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य
N
Nitin Palkar Wed, 10/04/2017 - 17:46 नवीन
या सगळ्यांचे छगन भुजबळ करायलाच हवे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
र
राघव Tue, 09/26/2017 - 14:06 नवीन
१ सप्टेंबर २०१७ पासून, टोकियो ऑलंपिक, एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्स साठी तयारी करत असणार्‍या टॉप १५२ अ‍ॅथलीट्सना, रु. ५०,०००/- प्रति महिना पॉकेट अलाऊंस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधी हा अलाऊंस रु.३०००/- ते रु.५०००/- होता. अभिनव बिंद्रा च्या अध्यक्षतेखालील टॉप्स कमिटीनं हा सल्ला दिलेला होता. लिंक
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 09/27/2017 - 07:51 नवीन
'ऑपरेशन अर्जुन'पुढे पाकची शरणागती http://m.maharashtratimes.com/india-news/bsfs-operation-arjun-targets-border-farms-homes-of-pak-officers/articleshow/60850360.cms
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 09/27/2017 - 08:46 नवीन
देव, धर्म मानणारे मनोरुग्ण : इति राजन खान बातमी : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/faith-in-god-and-religion-is-mental-illness-rajan-khan/articleshow/60846378.cms
रोचक विधान आहे. यातून भारतातले बहुसंख्य लोकं मनोरुग्ण आहेत असा निष्कर्ष निघतो. राजन खान हे मात्र अपवाद आहेत. तर प्रश्न असा आहे की राजन खान यांच्यासारख्या मनोनिरामय लोकांनी उर्वरित जनतेचा मानसिक आजार दूर करावा का? की घटनेने दिलेल्या उपासनास्वातंत्र्याचा आधारे तसाच राहू द्यावा? -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 09/27/2017 - 09:09 नवीन
आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीचे पत्रकार गणेश बच्छाव यांचं सोमवारी रात्री प्रदीर्घ आजारानं निधन झालं. बातमी : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/journalist-ganesh-bachchav-no-more/articleshow/60851067.cms त्यांचा प्रदीर्घ आजार कोणता यावर माहिती दिलेली नाही. हा दारूबळी आहे का? -गा.पै.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 09/27/2017 - 09:12 नवीन
राज ठाकरेंच्या फेसबुक पेज ला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच बरोबर त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियासुद्धा संयत वाटल्या. पाहू त्याचा किती फायदा नवनिर्माणला होतोय ते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 09/27/2017 - 11:54 नवीन
राज ठाकरे हा एक भलामोठा शून्य आहे. २००५ मध्ये काँग्रेस/राष्ट्रवादीने फूस लावून त्याला फोडले. शिवसेनेची मते फोडणे हा त्यामागे उद्देश होता. २००९ मध्ये राजने आपले अवतारकार्य पूर्ण केले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात किमान ८ लोकसभा मतदारसंघ असे होते ज्यात भाजप, शिवसेना व मनसे यांना मिळालेली एकूण मते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा खूप जास्त होती. परंतु मनसे, भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी हे तीन पक्ष/आघाड्या वेगळे लढल्याने भाजप-शिवसेना-मनसे यात विरोधी मते विभागली जाऊन त्या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला. पुणे मतदारसंघात अनिल शिरोळेंविरूद्ध कलमाडी फक्त २५ हजार मतांनी निवडून आला. परंतु त्या मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराला ७५००० मते होती. मुंबईत राम नाईक फक्त ५००० मतांनी हरले कारण मनसेच्या उमेदवाराने १ लाखाहून अधिक मते घेतली होती. मुंबईतील सर्व सहा मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराने बरीच मते घेतल्याने भाजप-सेना युतीचे उमेदवार थोड्या मतांनी हरले. याचीच पुनरावृत्ती २००९ च्या विधानसभा निवडणुकीत झाली. या निवडणुकीत भाजप-सेना युतीला ९० व काँग्रेस-राष्ट्रवादी युतीला १४४ जागा होत्या. परंतु मनसेला १३ जागा होत्या व काँग्रेस-राष्ट्रवादीने जिंकलेल्या इतर २५ मतदारसंघात भाजप-शिवसेना व मनसे यांच्या एकत्रित मतांची बेरीज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांपेक्षा जास्त होती. म्हणजे मनसेमुळे भाजप-शिवसेना युतीला एकूण ३८ जागा गमवाव्या लागल्या. जर मनसे नसती तर भाजप-सेना युतीला १२८ व काँग्रेस-राष्ट्रवादी युतीला ११९ जागा मिळाल्या असत्या. मनसेला मिळालेली सर्व मते ही शिवसेनेची होती. त्यामुळे शिवसेनेचे मोठे नुकसान झाले. राज अत्यंत विश्वासघातकी आहे. २००७ मधील महापालिका निवडणुकीत मनसेने पुणे, मुंबई इ. महापालिकेत काँग्रेसला पाठिंबा दिला होता. नंतर कल्याण-डोंबिवलीत त्याने शिवसेनेला पाठिंबा दिला. नाशिकमध्ये २०१२ मध्ये पहिल्या अडीच वर्षात भाजपचा पाठिंबा घेतला व नंतरच्या अडीच वर्षात राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला. २०१४ मध्ये त्याने पुणे व नगरमध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. एकंदरीत पाठिंबा देण्यासाठी व घेण्यासाठी त्याला कोणत्याही पक्षाचे वावडे नाही. त्याच्या धरसोड वृत्तीमुळेच २०१४ पासून मनसेचे अस्तित्व संपले. २०१४ मध्ये लोकसभेत ०, विधानसभेत १ अशी मनसेची दारूण कामगिरी होती. २०१६ पासून महाराष्ट्रात झालेल्या वेगवेगळ्या नगरपालिका निवडणुकीत एकूण ४७०० नगरसेवकांपैकी मनसेचे ४० नगरसेवक सुद्धा निवडून आले नाहीत. २०१७ मध्ये झालेल्या १७ महापालिकांच्या १७०० नगरसेवकांमध्ये मनसेचे जेमतेम ३०-३२ नगरसेवक आहेत. मनसे हा पक्ष पूर्णपणे संपला आहे. परंतु राज ठाकरेची वाचाळता, अहंकार, पोकळ बढाया, फुशारक्या आणि उर्मटपणा अजिबात संपलेला नाही. अर्थात उद्धव ठाकरेही असाच आहे. वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून ठाकरे बंधू कायम स्वतःच्याच धुंदीत वावरत असतात. मनसेप्रमाणे शिवसेनाही संपण्याच्या मार्गावर आहे. राज ठाकरे म्हणजे नुसती पोकळ बडबड आणि काम शून्य हे जनतेने केव्हाच ओळखले आहे. मोदींना शिव्या दिल्या की तात्काळ प्रसिद्धी मिळते हे ओळखून आता उद्धवपाठोपाठ राज मोदींवर दुगाण्या झाडत आहे. परंतु त्याचा काहीही उपयोग होणार नाही. मुळात फेसबुक हे माध्यम आता फारसे प्रभावी राहिलेले नाही. कायप्पा, इन्स्टाग्राम इ. आल्यापासून फेसबुकचा वापर बर्‍यापैकी कमी झाला आहे. मुळात राजला फारसा पाठिंबा नाही. त्याच्या कट्टर समर्थकांशिवाय इतर फारसे कोणी त्याचे पान वाचणार नाही आणि कोणी वाचले तरी त्याचा परीणाम शून्य असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अभिजीत अवलिया Wed, 09/27/2017 - 12:09 नवीन
मनसेला मिळालेली सर्व मते ही शिवसेनेची होती.
हे कसे समजले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Wed, 09/27/2017 - 12:34 नवीन
<<<राज ठाकरे हा एक भलामोठा शून्य आहे.>> ==>> गणिती भाषेत राज ठाकरे १ आहेत बहुतेक. बरं जरी एक नसले तरी शून्य मात्र नाहीत. ०.१, ०.२, ....०.९९ पैकी असू शकतात. <<२००५ मध्ये काँग्रेस/राष्ट्रवादीने फूस लावून त्याला फोडले.>> ==> या विधानाला काही आधार? (मणघडत गोष्टी कृपया टाळा) <<मुंबईतील सर्व सहा मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराने बरीच मते घेतल्याने भाजप-सेना युतीचे उमेदवार थोड्या मतांनी हरले.>> ==> जनतेने ज्याला मतदान करायचे होते ते केले. त्यात मनसेचा दोष कसा? <<<राज अत्यंत विश्वासघातकी आहे.>> ==> दिलेल्या उदाहरणात विश्वासघाताची व्याख्या खूपच त्रोटक आहे तुमची. असो.. <<<त्याच्या धरसोड वृत्तीमुळेच २०१४ पासून मनसेचे अस्तित्व संपले. २०१४ मध्ये लोकसभेत ०, विधानसभेत १ अशी मनसेची दारूण कामगिरी होती.>> ==>>कोणे एके काळी एका राष्ट्रीयपक्षा जवळ फक्त २ च खासदार होते. धरसोडी मध्ये भाजप अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. असो.. <<<परंतु राज ठाकरेची वाचाळता, अहंकार, पोकळ बढाया, फुशारक्या आणि उर्मटपणा अजिबात संपलेला नाही. >>> ==>> असतो एका एकाचा स्वभाव. सर्वच पक्षा मध्ये आहेत असे नग. भाजप मध्ये जास्त आहेत, माझे निरीक्षण. बळंच जुन्या आठवणी काढत रडणारे प्रधानसेवक जास्त भावतात काही लोकांना. असो.. <<<त्याच्या कट्टर समर्थकांशिवाय इतर फारसे कोणी त्याचे पान वाचणार नाही आणि कोणी वाचले तरी त्याचा परीणाम शून्य असेल.>>> ==>> गुरुजी गाफील राहू नका. रात्र वैऱ्याची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 09/27/2017 - 17:38 नवीन
<<<राज ठाकरे हा एक भलामोठा शून्य आहे.>> ==>> गणिती भाषेत राज ठाकरे १ आहेत बहुतेक. बरं जरी एक नसले तरी शून्य मात्र नाहीत. ०.१, ०.२, ....०.९९ पैकी असू शकतात. शून्य म्हणजे असा आकडा जो कोणत्याही आकड्यात मिळविला किंवा त्यातून वजा केला तरी मूळ आकड्यात फरक पडत नाही. राजकारणात शून्य म्हणजे ज्या नेत्यामुळे किंवा पक्षामुळे राजकारणात अजिबात फरक पडत नाही असा नेता/पक्ष. यादॄष्टीने राज ठाकरे हे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परीषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा सर्व ठिकाणी शून्य आहेत. <<२००५ मध्ये काँग्रेस/राष्ट्रवादीने फूस लावून त्याला फोडले.>> ==> या विधानाला काही आधार? (मणघडत गोष्टी कृपया टाळा) २००५ मधील संदर्भ मिळाले तर टाकतो. परंतु राजने सुरवातीच्या काही वर्षात शिवसेनेचे खच्चीकरण व काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत असे धोरण ठेवले होते. २००७ च्या महापालिका निवडणुकीनंतर ठाणे व मुंबई महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मत दिले होते. <<मुंबईतील सर्व सहा मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराने बरीच मते घेतल्याने भाजप-सेना युतीचे उमेदवार थोड्या मतांनी हरले.>> ==> जनतेने ज्याला मतदान करायचे होते ते केले. त्यात मनसेचा दोष कसा? मनसेचा जनाधार शिवसेनेतून आला होता. राजने वेगळा पक्ष काढला नसता मतांची फाटाफूट टळली असती. <<<राज अत्यंत विश्वासघातकी आहे.>> ==> दिलेल्या उदाहरणात विश्वासघाताची व्याख्या खूपच त्रोटक आहे तुमची. असो.. मनसेने आजवर महाराष्ट्रातील सर्व पक्षांबरोबर साटेलोटे केले आहे. त्यामुळेच मनसेची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे. <<<त्याच्या धरसोड वृत्तीमुळेच २०१४ पासून मनसेचे अस्तित्व संपले. २०१४ मध्ये लोकसभेत ०, विधानसभेत १ अशी मनसेची दारूण कामगिरी होती.>> ==>>कोणे एके काळी एका राष्ट्रीयपक्षा जवळ फक्त २ च खासदार होते. धरसोडी मध्ये भाजप अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. असो.. भाजपचे धोरण अनेक बाबतीत स्थिर आहे. भाजपने कधीही काँग्रेस, डावे पक्ष, मुस्लिम लीग इ. पक्षांचा पाठिंबा घेतलेला नाही किंवा त्यांना पाठिंबा दिलेला नाही. १९८४ ची निवडणुक ही एका विशिष्ट परिस्थितीत झाली होती. इंदिरा गांधींची हत्या झाली नसती तर त्या निवडणुकीत काँग्रेस जरी सर्वात मोठा पक्ष ठरला असता तरी काँग्रेस बहुमतापासून लांब राहिली असती. भाजप, जनता पक्ष इ. चीही धूळधाण झाली नसती. त्यामुळे मनसेची २०१४ मधील दारूण परिस्थिती व भाजपची १९८४ मधील दारूण परिस्थिती यांची तुलना अयोग्य आहे. २०१४ मध्ये अशी कोणतीही विशिष्ट परिस्थिती नव्हती. किंबहुना राज्यातील चार प्रमुख पक्ष एकमेकांविरूद्ध लढत असल्याने पाचव्या पक्षाला चांगली संधी मिळविता आली असती. परंतु मनसे हा पक्ष तेव्हा जनतेच्या मनातून पूर्णपणे उतरल्यामुळे त्या पक्षाला पंचरंगी लढतील जेमतेम १ जागा मिळाली. अगदी एमआयएमने सुद्धा २ जागा जिंकल्या. तसेच सपने व शेकापने सुद्धा ३ जागा जिंकल्या. परंतु मनसेला फक्त १ जागा मिळाली ते सुद्धा बहुरंगी लढतीत. <<<परंतु राज ठाकरेची वाचाळता, अहंकार, पोकळ बढाया, फुशारक्या आणि उर्मटपणा अजिबात संपलेला नाही. >>> ==>> असतो एका एकाचा स्वभाव. सर्वच पक्षा मध्ये आहेत असे नग. भाजप मध्ये जास्त आहेत, माझे निरीक्षण. बळंच जुन्या आठवणी काढत रडणारे प्रधानसेवक जास्त भावतात काही लोकांना. असो.. काहीही भरीव न करता मारलेल्या फुशारक्या, बढाया आणि वर्तनात असलेला अहंकार, उर्मटपणा जनतेला आवडत नाही. खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशी वृत्ती जनता नाकारते. प्रधानसेवक कदाचित या दुर्गुणांनी भरलेले असतीलही. परंतु त्यांचे २००१ पासूनचे काम डोळ्यांसमोर आहे. तसेच त्यांना इतरांनी किती त्रास दिला हेही जनतेला माहित आहे. त्यामुळे जरी कदाचित प्रधानसेवकांमध्ये हे दुर्गुण असतील तरी त्यांची आणि राजची तुलना होऊ शकत नाही कारण राजकडे जगाला दाखविण्यासारखे काहीही नाही. <<<त्याच्या कट्टर समर्थकांशिवाय इतर फारसे कोणी त्याचे पान वाचणार नाही आणि कोणी वाचले तरी त्याचा परीणाम शून्य असेल.>>> ==>> गुरुजी गाफील राहू नका. रात्र वैऱ्याची आहे. उद्धव, राहुल आणि आता राज यांची भाषणे, लेखन वगैरे बघितले तर ते केवळ मोदीविरोध या एकाच मुद्द्याभोवती फिरताना आढळते. मोदींच्या प्रत्येक गोष्टीला, योजनेला विरोध, मोदींवर सातत्याने टीका (उद्धव तर टीका करताना अत्यंत खालची पातळी गाठतो), मोदी वाईट, मोदी नालायक . . . अशी नकारात्मक भूमिकाच फक्त दिसते. ही माणसे मोदींना विरोध करण्यासाठी इतक्या टोकाला गेली आहेत की मोदींची स्वच्छ भारत योजना हाणून पाडण्यासाठी हे मुद्दाम टमरेल घेऊन रस्त्यावर संडासला बसतील. आपण काय चांगले करणार हे सांगण्याऐवजी मोदी किती वाईट हेच यांच्या प्रचाराचे मुख्य आणि एकमेव सूत्र आहे. राजचे परवाचे भाषण किंवा त्याचे फेबु पान पाहिले तर ते संपूर्णपणे मोदी वाईट याच मुद्द्याभोवती आहे. जनतेला पूर्णपणे नकारात्मक प्रचार आवडत नाही. फक्त नकारात्मक प्रचार करण्याऐवजी समोरचा किती वाईट आहे हे सांगतासांगता मी किती चांगला आहे हे सांगणे सुद्धा आवश्यक आहे. अन्यथा नकारात्मक प्रचार बूमरँग होतो. २००९ मध्ये अडवाणींनी असाच मनमोहन सिंहांविरूद्ध बर्‍यापैकी नकारात्मक प्रचार केला होता व त्याची फळे भोगली होती. केजरीवालांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी आता मोदीपुराण थांबविले आहे. राजने फेबु पानावरून मोदी, मोदी अशी कितीही बोंब ठोकली तरी जोपर्यंत आपण त्यांच्यापेक्षा किती चांगले हे तो जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत अशा लेखनाला काहीही महत्त्व नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सुबोध खरे Wed, 09/27/2017 - 20:01 नवीन
ही माणसे मोदींना विरोध करण्यासाठी इतक्या टोकाला गेली आहेत की मोदींची स्वच्छ भारत योजना हाणून पाडण्यासाठी हे मुद्दाम टमरेल घेऊन रस्त्यावर संडासला बसतील. काय लिव्हलय!-/ हसून हसून मुरकुंडी वळली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित गुरुवार, 09/28/2017 - 08:44 नवीन
स्वच्छ भारत अभियानाचा नाटकीपणा सोडून ठोस कामे केलीत तर बरं होईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 09/28/2017 - 09:59 नवीन
स्वच्छ भारत अभियानाचा नाटकीपणा? http://www.financialexpress.com/india-news/why-narendra-modis-swachh-bharat-mission-is-a-success-and-it-must-power-on-adil-zainulbhai-qci-chief-explains/873931/ घरात साधं शौचालय असणं हि एक चैनीची बाब नाही. २०११ च्या जनगणने प्रमाणे एकंदर ५० % घरात शौचालय नव्हते किंवा ७० टक्के खेड्यातील आणि २० टक्के शहरातील घरांमध्ये शौचालय नव्हते. हीच स्थिती आता २६. ७५ % घरात शौचालय नाही अशी आहे. म्हणजेच एकंदर ५० % घरात शौचालय होते ते आता ७३.२५ % घरात आहे. सरकारी कर्मचारी लोक वेळेवर कामावर आले हि काय बातमी असू शकते का? तसेच प्रत्येक घरात शौचालय आहे हि काय बातमी आहे का? इतक्या प्राथमिक सुविधेसाठी केंद्र सरकारला मोहीम राबवावी लागते हे सरळ सरळ पणे आतापर्यंतच्या सर्व सरकारांचे अपयश आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सुबोध खरे गुरुवार, 09/28/2017 - 10:01 नवीन
आणि ते "ठोस कामं" म्हणजे काय काय ते हि सांगा कि. आपल्या नात्यागोत्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखी नकोत हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विशुमित गुरुवार, 09/28/2017 - 10:47 नवीन
Dr. खरे विषयाशी सुसंगत नसताना तुम्ही माझ्या व्यवसायाच्या निगडित व्यक्तिगत पातळी ओलांडायचे काही कारण नव्हते. तसे मला तुमच्या बरबटलेल्या डॉक्टरी पेशा बद्दल बरेच काही लिहता येऊ शकते. पण तशी पातळी सोडण्याची माझी संस्कृती किंवा संस्कार परवानगी देत नाही. असो.. -- विषयाला धरून प्रतिक्रिया देत चला. शेतकरी, नातेगोते, कर्जमाफी असले बदनारायण संबंध असलेल्या प्रतिक्रिया टाळा. लोकांचा तुमच्याबद्दलचा आदर कमी होत चालला आहे. तुम्हाला नसेल त्याचा फरक पडत पण आम्हाला पडतो. सर्वात महत्वाचे वाक्याच्या शेवटी सारखे "हो" वापरायला तुमची-आमची सोयरीक जुळली नाही अजून. त्यामुळे अदबीने. पुढे असल्या कुचाळक्या मी खपवून घेणार नाही. संपादक मंडळ कृपया त्यांना समाज द्या. --- बाकी ठोस कामाच्या बाबतीत म्हणायचे तर जेवढे माझ्या डोळ्यासमोर दिसते त्यानुसार पुण्याचा कचरा प्रश्न सोडवा. त्या हडपसर, फुरसुंगी, भेकरेनगर एवढेच काय खराडी सारख्या एरिया मध्ये सुद्धा वेळच्या वेळी कचरा उचलला जात नाही. हॅन्ड ग्लोज आणि मास्क लावून हिरवी पाने झाडण्याचे इव्हेंट्स करण्यापेक्षा कचरा उचलणे, त्याचे डम्पिंग, त्याचे रेसियलिंग अशी ठोस कामे करून घेतलीत तरी पुरेशी आहेत. यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवून पण तसा काही फायदा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/28/2017 - 11:12 नवीन
बाकी ठोस कामाच्या बाबतीत म्हणायचे तर जेवढे माझ्या डोळ्यासमोर दिसते त्यानुसार पुण्याचा कचरा प्रश्न सोडवा. त्या हडपसर, फुरसुंगी, भेकरेनगर एवढेच काय खराडी सारख्या एरिया मध्ये सुद्धा वेळच्या वेळी कचरा उचलला जात नाही. हॅन्ड ग्लोज आणि मास्क लावून हिरवी पाने झाडण्याचे इव्हेंट्स करण्यापेक्षा कचरा उचलणे, त्याचे डम्पिंग, त्याचे रेसियलिंग अशी ठोस कामे करून घेतलीत तरी पुरेशी आहेत. यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवून पण तसा काही फायदा नाही. ही महापालिका अखत्यारीतील कामे सुद्धा मोदींनीच करायची का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 09/28/2017 - 11:23 नवीन
ही महापालिका अखत्यारीतील कामे सुद्धा मोदींनीच करायची का? << हे हगायला बसल्यावर ह्यांचे टमरेल देखील श्री मोदींनीच भरुन द्यायला हवे. अशी अपेक्षा देखील करतील येत्या काही दिवसात ही लोक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित गुरुवार, 09/28/2017 - 11:49 नवीन
मोदींचे आणि स्वच्छ भारत अभियानाचे सच्चे पाईक म्हणून जवाबदारी येऊ शकते तुमच्याकडे. अभिनंदन..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
व
विशुमित गुरुवार, 09/28/2017 - 11:46 नवीन
<<<ही महापालिका अखत्यारीतील कामे सुद्धा मोदींनीच करायची का?>> ==> कामे करून (करवून) घेतलीत तरी पुरेशी आहेत. ---- मग ते गल्लोगल्ली झाडू मारायचे काम (नाटक) तरी कशासाठी करत आहेत? --- स्वच्छ भारत सेस नेमका कोणत्या गोष्टींसाठी वापरणार आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित गुरुवार, 09/28/2017 - 11:51 नवीन
पुण्यातील भाजपचे खासदार नेमकी काय पावले उचलत आहेत पुण्यातील कचऱ्याप्रश्नी? काही ठोस दिसत नाही म्हणून विचारले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/28/2017 - 12:02 नवीन
त्यांनाच विचारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/28/2017 - 12:01 नवीन
<<<ही महापालिका अखत्यारीतील कामे सुद्धा मोदींनीच करायची का?>> ==> कामे करून (करवून) घेतलीत तरी पुरेशी आहेत. सरकारमध्ये किंवा कंपनीत सुद्ध एक उतरंड असते. कंपनीचा अध्यक्ष थेट शिपायाच्या किंवा कारकुनाच्या कामात हस्तक्षेप करीत नाही. तो संचालक मंडळाकडून कामे करवून घेतो. तसेच केंद्रसरकार व महापालिका यांच्यामध्ये राज्य सरकार असते. विकेंद्री व्यवस्थेत कोणी काय करायचे याची विभागणी असते. महापालिका राज्य सरकारला जबाबदार असते, तर राज्य सरकार केंद्र सरकारला जबाबदार असते. महापालिका काम करीत नसेल तर त्यात राज्य सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. थेट मोदींनीच हडपसरमधील कचरा उचलायचे काम करून घेणे सुरू केले तर त्यांना देशपातळीवरील किंवा जागतिक पातळीवरील कामे करताच येणार नाहीत. ---- मग ते गल्लोगल्ली झाडू मारायचे काम (नाटक) तरी कशासाठी करत आहेत? --- नाटक!!!!!! स्वच्छ भारत सेस नेमका कोणत्या गोष्टींसाठी वापरणार आहेत? http://www.hindustantimes.com/india/services-to-attract-0-5-swachh-bharat-cess-from-november-15/story-oEEmzrPFb75fJstQmQmJWN.html असाच प्रश्न तुम्हाला व्यवसाय कर किंवा वीजबिलात दाखविलेले असंख्य कर व अधिभार याविषयी कधी पडला होता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 09/28/2017 - 14:02 नवीन
<<<कामे करून (करवून) घेतलीत तरी पुरेशी आहेत.>> हे स्पष्ट लिहले आहेच मी. मी कोठे म्हणालो की मोदींनी येऊन हडपसर मधील कचरा उचला पाहिजे. <<नाटक>> ==>> फक्त फोटो पुरते इव्हेंट्स कशा करिता ? गाव/ वॉर्ड पातळीवरती जर आठवड्याला लोक अभियान सक्तीने राबवा. त्यासाठी आर्मी कॅम्प मध्ये कशी स्वच्छता राखली जाते, याचा अभ्यास करून राबवली तरी चालेल. <<<असाच प्रश्न तुम्हाला व्यवसाय कर किंवा वीजबिलात दाखविलेले असंख्य कर व अधिभार याविषयी कधी पडला होता का?>> ==>>हो पडलेत ना. पेट्रोल/ डिझेल वरचे अधिभाराचे सुद्धा प्रश्न पडलेत. जर या गोष्टींवरती प्रश्न पडले नसते तर स्वच्छता सेस वरती प्रश्न पडलेच नाही पाहिजे, असा काही अध्यादेश निघाला आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/28/2017 - 14:18 नवीन
<<कामे करून (करवून) घेतलीत तरी पुरेशी आहेत.>> हे स्पष्ट लिहले आहेच मी. मी कोठे म्हणालो की मोदींनी येऊन हडपसर मधील कचरा उचला पाहिजे. परत तेच. ही महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील कामे असतात. ही कामे महापालिकेने करवून घ्यायची असतात. केंद्राचा याच्याशी संबंध नसतो. =>> फक्त फोटो पुरते इव्हेंट्स कशा करिता ? गाव/ वॉर्ड पातळीवरती जर आठवड्याला लोक अभियान सक्तीने राबवा. त्यासाठी आर्मी कॅम्प मध्ये कशी स्वच्छता राखली जाते, याचा अभ्यास करून राबवली तरी चालेल. ते सुरूच आहे. =>>हो पडलेत ना. पेट्रोल/ डिझेल वरचे अधिभाराचे सुद्धा प्रश्न पडलेत. जर या गोष्टींवरती प्रश्न पडले नसते तर स्वच्छता सेस वरती प्रश्न पडलेच नाही पाहिजे, असा काही अध्यादेश निघाला आहे का? मग ते विचारलेत का कोणाला आणि त्याची उत्तरे काय मिळाली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 09/28/2017 - 14:33 नवीन
तुम्हीच तर वर म्हंटला आहात. "कंपनीचा अध्यक्ष थेट शिपायाच्या किंवा कारकुनाच्या कामात हस्तक्षेप करीत नाही. तो संचालक मंडळाकडून कामे करवून घेतो." <<ते सुरूच आहे.>> ==>> इव्हेंट्स ?? <<<मग ते विचारलेत का कोणाला आणि त्याची उत्तरे काय मिळाली?>>> ==>> स्वच्छता सेस बद्दल प्रश्न विचारायचे नाहीत का? आणि मी विचारलेल्या प्रश्नांना तुम्हीच उत्तरे द्यावीत हा माझा आग्रह नाही. मी इन जनरल विचारले होते. तसा गैरसमज झाला असेल तर क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/28/2017 - 16:49 नवीन
तुम्हीच तर वर म्हंटला आहात. "कंपनीचा अध्यक्ष थेट शिपायाच्या किंवा कारकुनाच्या कामात हस्तक्षेप करीत नाही. तो संचालक मंडळाकडून कामे करवून घेतो." कंपनीचा अध्यक्ष संचालक मंडळाकडून नफा वृद्धी, व्यवसाय वृद्धी, नवीन क्षेत्रात पदार्पण इ. कामे करवून घेतो. आपल्या कंपनीच्या एखाद्या शाखेतील कारकुनाने काय काम करावे इतके खालचे काम तो संचालक मंडळाला करायला सांगत नाही. हडपसरमधील कचरा उचलणे हे त्या भागातील नगरसेवकाचे काम आहे व ते महापालिकेने करवून घ्यायचे असते. त्यात राज्य सरकार सुद्धा लक्ष घालत नाही. पण तुमची अपेक्षा की मोदींनी त्यात लक्ष घालावे! <<ते सुरूच आहे.>> ==>> इव्हेंट्स ?? कसले ईव्हेंट्स? <<<मग ते विचारलेत का कोणाला आणि त्याची उत्तरे काय मिळाली?>>> ==>> स्वच्छता सेस बद्दल प्रश्न विचारायचे नाहीत का? आणि मी विचारलेल्या प्रश्नांना तुम्हीच उत्तरे द्यावीत हा माझा आग्रह नाही. मी इन जनरल विचारले होते. तसा गैरसमज झाला असेल तर क्षमस्व. स्वच्छता सेसबद्दल जरूर विचारा. परंतु येथील कोणी त्याविषयी उत्तर देण्यास पात्र असतील असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/28/2017 - 14:19 नवीन
<<कामे करून (करवून) घेतलीत तरी पुरेशी आहेत.>> हे स्पष्ट लिहले आहेच मी. मी कोठे म्हणालो की मोदींनी येऊन हडपसर मधील कचरा उचला पाहिजे. परत तेच. ही महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील कामे असतात. ही कामे महापालिकेने करवून घ्यायची असतात. केंद्राचा याच्याशी संबंध नसतो. =>> फक्त फोटो पुरते इव्हेंट्स कशा करिता ? गाव/ वॉर्ड पातळीवरती जर आठवड्याला लोक अभियान सक्तीने राबवा. त्यासाठी आर्मी कॅम्प मध्ये कशी स्वच्छता राखली जाते, याचा अभ्यास करून राबवली तरी चालेल. ते सुरूच आहे. =>>हो पडलेत ना. पेट्रोल/ डिझेल वरचे अधिभाराचे सुद्धा प्रश्न पडलेत. जर या गोष्टींवरती प्रश्न पडले नसते तर स्वच्छता सेस वरती प्रश्न पडलेच नाही पाहिजे, असा काही अध्यादेश निघाला आहे का? मग ते विचारलेत का कोणाला आणि त्याची उत्तरे काय मिळाली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 09/28/2017 - 14:10 नवीन
link बद्दल धन्यवाद...!! त्या नुसार "The proceeds from this cess will be exclusively used for Swachh Bharat initiatives of the government, it added." Swachh Bharat initiatives कोठे दिसले नाहीत या बातमी मध्ये. नक्की काय काय करणार आहेत सेस गोळा करून? फक्त पब्लिक हेअल्थ बाबत मखलाशी केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित गुरुवार, 09/28/2017 - 14:14 नवीन
त्यात खाली दिलेल्या poll मध्ये ४५.८ % लोक सेस देण्यासाठी तयार नाहीत. सॅम्पल साईझ छोटी असू शकते पण इंग्लिश पेपर वाचणारे आहेत म्हंटल्यावर थोडीफार सुशिक्षित लोकांचे वोटिंग असावे. (मी तयार होतो आणि अजून सुद्धा आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सुबोध खरे गुरुवार, 09/28/2017 - 15:52 नवीन
@विशुमित "Dr. खरे विषयाशी सुसंगत नसताना तुम्ही माझ्या व्यवसायाच्या निगडित व्यक्तिगत पातळी ओलांडायचे काही कारण नव्हते." मुदलात मी तुम्हाला ओळखतच नाही किंवा तुमचे मूळ नाव काय आहे हे हि मला माहित नाही तर तुम्ही कोणता व्यवसाय करता आहेत याच्याशी मला काय करायचे आहे? आणि मी व्यक्तिगत पातळी कुठे ओलांडली आहे जरा दाखवता येईल का? "तसे मला तुमच्या बरबटलेल्या डॉक्टरी पेशा बद्दल बरेच काही लिहता येऊ शकते." तुम्हाला कुठल्या व्यवसायातील घाणीबद्दल लिहायचे आहे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मिपावर डॉक्टरी व्यवसायावर ताशेरे ओढणारे अनेक धागे आहेत तुम्ही पण एक काढा. पण तशी पातळी सोडण्याची माझी संस्कृती किंवा संस्कार परवानगी देत नाही. असो.. ?? -- विषयाला धरून प्रतिक्रिया देत चला. विषयाला धरूनच प्रतिसाद दिला होता दुव्यासकट. आता तुम्हीच स्वच्छता अभियानाला नाटकीपणा म्हणता आहात. हे अभियान हा ठोस कार्यक्रम नाही असे तुमचे मत होते म्हणून ठोस कार्यक्रम काय ते विचारले. यात अर्थातच कर्जमाफी येत नाही शेतकरी, नातेगोते, कर्जमाफी असले बदनारायण संबंध असलेल्या प्रतिक्रिया टाळा. लोकांचा तुमच्याबद्दलचा आदर कमी होत चालला आहे. तुम्हाला नसेल त्याचा फरक पडत पण आम्हाला पडतो. ?? सर्वात महत्वाचे वाक्याच्या शेवटी सारखे "हो" वापरायला तुमची-आमची सोयरीक जुळली नाही अजून. त्यामुळे अदबीने." "हो" वापरणे हा साधा वाक्प्रचार आहे त्यात सोयरीक जुळवण्याचा कुठे संबंध आला? आणि माझा सूर कुठे उर्मट पणे आला ते दाखवता काय? मी अदबीनेच लिहितो किंवा वागतो. "पुढे असल्या कुचाळक्या मी खपवून घेणार नाही." यात काय कुचाळक्या आल्या संपादक मंडळ कृपया त्यांना समाज द्या. --- 'बाकी ठोस कामाच्या बाबतीत म्हणायचे तर जेवढे माझ्या डोळ्यासमोर दिसते त्यानुसार पुण्याचा कचरा प्रश्न सोडवा. त्या हडपसर, फुरसुंगी, भेकरेनगर एवढेच काय खराडी सारख्या एरिया मध्ये सुद्धा वेळच्या वेळी कचरा उचलला जात नाही." पुण्याचा कचरा प्रश्न सोडवा खराडी सारख्या एरिया मध्ये कचरा उचलणे हा ठोस कार्यक्रम असेल आणि तो पंतप्रधानांनी घ्यावा असे आपले म्हणणे आहे? धन्य आहे. हॅन्ड ग्लोज आणि मास्क लावून हिरवी पाने झाडण्याचे इव्हेंट्स करण्यापेक्षा कचरा उचलणे, त्याचे डम्पिंग, त्याचे रेसियलिंग अशी ठोस कामे करून घेतलीत तरी पुरेशी आहेत. यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवून पण तसा काही फायदा नाही. पंतप्रधानांनी कचरा उचलून त्याचे डम्पिंग करवून घेणे हि कामे केली तर राष्ट्राचा कारभार कुणी चालवायचा बाबू लोकांनी? कोणतेही नक्की कारण नसताना तुम्ही माझ्याविषयी ग्रह करून घेतला आहे कि मी तुमच्या व्यवसायाबद्दल लिहिले आहे या गैरसमजाला मी कारणीभूत नसताना तुम्ही कुचाळक्या सारखे शब्द वापरता माझ्या व्यवसायावर घसरता मला अदबीने वागण्यास सांगता आणि वर संपादक मंडळाला मला समज देण्यास सांगता? खाली मी दिलेला प्रतिसाद (०१.३५वाजता चा) माझ्या या प्रतिसादाच्या (०१. ३१ वाजताच्या) खाली यायला पाहिजे होता तो तसा खाली का गेला ते मला माहित नाही पण त्यातीळ दुव्यात महाराष्ट्राचे मंत्री स्पष्टपणे असे म्हणत आहेत कि १० लाख बोगस कर्जाची खाती उघडकीस आली आहेत.हि खाती अर्थातंच नात्यागोत्यातील आणि सग्या सोयऱ्यातील लोकांचीच असणार आणि त्यात जमा झालेले पैसे लायकी नसणाऱ्या माणसांना मिळणार होते. अशा खात्याना कर्जमाफी देणे हे काम नक्कीच ठोस नाही म्हणून मी तो प्रतिसाद दिला त्यावर तुम्ही काय वाटेल ते माझ्यावर आरोप करताय. धन्य आहे. द्वेष इतकाही असू नये कि आपण संदर्भ हीन लिहितो याचे भान येऊ नये. बाकी मी परत एकदा सांगतो आहे मी आपल्याला कधी पाहिल्याचे आठवत नाही आपण काय करता हे मला माहित नाही आणि मला त्याच्याशी कर्तव्य पण नाही. आपण माझ्या व्यवसायावर घसरला वैयक्तिक पातळीवरही आलात ते सुद्धा मी आपल्याला अजिबात ओळखत नसताना,आपले मूळ नाव गाव पत्ता माहित नसताना. आपल्या "वर्मावर आघात झाला असावा" अशी माझी धारणा आहे जर तसे असेल तर ते पूर्ण काकतालीय न्यायाने आहे आणि त्यात माझा कोणताही हेतू किंवा रस नाही. जर तसे असेल तर क्षमस्व पातळी सोडून प्रतिसाद देऊ नका एवढीच विनंती आहे. --/\-- बघा पटलं तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ग
गामा पैलवान गुरुवार, 09/28/2017 - 17:03 नवीन
खरे डॉक्टर,
आपल्या "वर्मावर आघात झाला असावा" अशी माझी धारणा आहे
काय हसलोय यावर. बोगस कर्जे मिळवून देणे हे विशुमित यांचं वर्म आहे की काय असं सूचित होतंय. आ.न., -गा.पै. विशेष सूचना : विशूमित यांनी कृपया हलक्याने घ्यावे. जडाने घेतले तर आजून विनोद उत्पन्न होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विशुमित Fri, 09/29/2017 - 09:39 नवीन
<<<विशूमित यांनी कृपया हलक्याने घ्यावे. जडाने घेतले तर आजून विनोद उत्पन्न होतील.>>> ==>> बोगस नाही पण निकर्षांमध्ये बसणाऱ्या अडाणी शेतकऱ्यांचे काही अर्ज मी स्वतः ऑनलाईन भरून दिले आहेत. बिचाऱ्यांकडून ते सेवा केंद्रवाले रु.६० घेत होते. सुरवातीला तर काही लोकांकडून त्यांनी रु.५०० पण घेतले मग आरडाओरड झाल्यावर रु.१०० वर परत रु.६० वर आले. --- हलकेच घेतो मी इथल्या चर्चेला. जडाने घायला लष्कराच्या भाकऱ्या भाजणाऱ्यापैकी मी नाही आहे. --- विनोद एन्जॉय करा...! तुम्ही खुश तर आम्ही खुश..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
व
विशुमित Fri, 09/29/2017 - 09:29 नवीन
<<<आणि ते "ठोस कामं" म्हणजे काय काय ते हि सांगा कि. आपल्या नात्यागोत्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखी नकोत हो>>> ==>> हा तुमचा १.३१ चा प्रतिसाद स्वच्छता अभियान बद्दलचा माझ्या प्रतिसादाला दिलेल्या उप प्रतिसादाचा उप-प्रतिसाद. " आपल्या नात्यागोत्यातील शेतकऱ्यांना" यात माझ्या नात्यागोत्याचे, शेतकऱ्यांचे आणि कर्जमाफीचा काय संबंध? तुम्हाला जर माझे खरे नाव आणि माझा खरा व्यवसाय माहित नाही तर मग माझ्या नात्यागोत्यात शेतकरी आहेत आणि त्यांनी कर्जमाफीला अर्ज केला हे कोठून समजले तुम्हाला? हे व्यक्तिगत होत नाही का? ---- वर्मावर बोट म्हणत असाल तर २००८ नंतरच्या कर्जमाफी नंतर प्रत्येक पीक कर्ज वेळेवर फेडले आहे आणि ०% व्याजदराचा सरकारी फायदा सुद्धा उठवला आहे. चालूच्या कर्जमाफी मध्ये आमच्या कुटुंबात कोणीच निकर्षा मध्ये बसत नाही त्यामुळे अर्ज करण्याचा प्रश्नच नाही. निकर्षामध्ये बसत असतो तर नक्की अर्ज केला असता. का म्हणून सोडायचा फायदा? (तसे लावलेले निकर्षा बद्दल पण शेतकऱ्यांच्या मनात खदखद आहे) मागे सरकारने दिलेल्या पेट्रोल-डिझेल-गॅस वरती दिलेल्या सबसिडीचा फायदा घेतलाच की सर्व जनतेने. भुक्या जनतेसाठी वेळोवेळी शेतमालाचे भाव पाडलेच की सरकार ने. त्यावेळेस असे कोणाच्या मनात आले नसेल, नको बाबा सबसिडी, मी सगळे पैसे देणार. मिळू देत शेतकऱ्याच्या कष्टाचे चार पैसे, आता कर्जमाफीवरून स्वाभिमानाचा आव आणत आहेत काही पूर्वग्रहदूषित लोक. मला एवढे स्पष्टीकरण द्याचे तसे काहीच कारण नव्हते. पण हे जाणीवपूर्वक नीच ठरवण्याच्या विचारसरणीला वर्मावर बोट ठेवण्याचे गोंडस नाव द्याचे याला विरोध होता. तोच तुमचा हेतू होता हे " वर्मावर बोट" हा वाक्प्रचार वापरल्यामुळे लपून राहत नाही. --- कृपया तुम्ही पण भविष्यात पातळी सोडून प्रतिसाद न देण्याची काळजी घ्या. --- बघा जमलं तर..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 09/29/2017 - 11:34 नवीन
10 लाख बोगस खाती याचा आणि तुमचा काही संबंध आहे असं मी कुठे म्हटलं आहे? किंवा तुम्ही मुदलात कर्ज घेतलाय का हेच मला माहित नाही तर ते फेडलं काय आणि नाही काय याच्याशी माझा काय संबंध आहे?( मुळात तुम्ही कोण हेच मला माहित नाही तर या बाकीच्या आरोपांबद्दल मी काय बोलणार तुम्हीच ही गोष्ट गृहीत धरून बोलताय की मला तुमचा व्यवसाय माहिती आहे आणि त्यावरून मी तुम्हाला बोलतो आहे. मूळ पायाच चुकीचा आहे तर इमारत काय असणार? "पातळी सोडून"वगैरे आपल्या मनाचे खेळ आहेत. "जपून ,अदबीने" हे सर्व आपल्या प्रतिसादातील शब्द आहेत. सबसिडी शेतमालाचे भाव स्वाभिमान वगैरे सर्व असंबद्ध शब्द आपण का आणता आहेत तेच समजत नाही. आपण वाटेल त्या शब्दात आरोप करत आहात त्याला काही तरी पाय असावा लागतो. इतके असंबद्ध प्रतिसाद मी कुणीच दिलेले पाहिले नाहीत. असो इति लेखन सीमा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 09/29/2017 - 12:03 नवीन
<<<<<<आणि ते "ठोस कामं" म्हणजे काय काय ते हि सांगा कि. आपल्या नात्यागोत्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखी नकोत हो>>> हा तुमचा १.३१ चा प्रतिसाद स्वच्छता अभियान बद्दलचा माझ्या प्रतिसादाला दिलेल्या उप प्रतिसादाचा उप-प्रतिसाद. " आपल्या नात्यागोत्यातील शेतकऱ्यांना" यात माझ्या नात्यागोत्याचे, शेतकऱ्यांचे आणि कर्जमाफीचा काय संबंध?>> "आपल्या" या शब्दाबद्दल आक्षेप आहे या बद्दल तुम्ही काहीच बोलाला नाही. १० बोगस शेतकरी वगैरे वर मी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही आहे तरी माझ्या प्रतिक्रियेला कशासाठी चिटकवले कळले नाही. --- आमचा पण "राम राम" घ्या ..!! --- (या बोटाचा थुका त्या बोटावं करण्याचे कसब २०१४ नंतर कमालीचे वाढले आहे. राम राम राम!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पुंबा Wed, 09/27/2017 - 10:06 नवीन
हे कुलगुरू नक्की कोण ठरवतं? जितका भंपक, चाटू अन बिनडोक माणूस तितका त्याचे निवडला जाण्याचे चान्सेस जास्त असतात का? बिएचयू मध्ये जे चाललंय ते खरोखर हलकटपणाचे आहे. असल्या माणसाला तात्काळ हाकलून द्यायला हवे, तिथे आंदोलन करणार्‍या मुलींनाच अँटी नॅशनल म्हटलं जात आहे. योगी आंदोलकांना अँटी सोशल म्हणतो. मुलींच्या आंदोलनात नक्की अँटी सोशल/नॅशनल नक्की काय आहे कुणी सांगू शकेल काय?
indianexpress.com/article/opinion/editorials/bhu-lathicharge-violence-bhu-vc-girl-interrupted-molestation-eve-teasing-4862786/
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 09/27/2017 - 10:07 नवीन
indianexpress.com/article/opinion/editorials/bhu-lathicharge-violence-bhu-vc-girl-interrupted-molestation-eve-teasing-4862786/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
श
श्रीगुरुजी Wed, 09/27/2017 - 10:32 नवीन
हे कुलगुरू नक्की कोण ठरवतं? ३-४ प्रकारची विद्यापीठे असतात. केंद्रीय विद्यापीठांचा (उदा. जनेवि) कुलगुरू केंद्र सरकार नियुक्त करते. राज्याच्या अखत्यारीत येणार्‍या विद्यापीठांचा (उदा. पुणे विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ इ.) कुलगुरू राज्य सरकार नियुक्त करते. खाजगी/अभिमत विद्यापीठांचा कुलगुरू त्या विद्यापीठ ज्या संस्थांच्या मालकीचे आहे त्या संस्था नियुक्त करतात (उदा. टिमवि, भारती विद्यापीठ इ.). कुलगुरूंची नियुक्ती ही राजकीय नेमणूक असते. कुलगुरू जरी उच्चविद्याविभूषित असला/असली तरी सत्ताधारी राजकीय पक्षाच्या राजकीय विचारसरणीशी जुळणार्‍या व्यक्तीला कुलगुरूपदी नेमले जाते. बनारस हिंदू विद्यापीठ हे केंद्रीय विद्यापीठ आहे का राज्य सरकारच्या अखत्यारीतील आहे का पूर्णपणे स्वतंत्र आहे याची कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
ज
जेम्स वांड Wed, 09/27/2017 - 14:26 नवीन
प्रत्येक विद्यापीठाला (केंद्रीय/राज्य) 'उपकुलगुरु' उर्फ व्हाईस चांसलर असतो, केंद्रीय विद्यापीठांचा कुलगुरू राष्ट्रपती अन राज्य विद्यापीठांचा कुलगुरू राज्यपाल असतो असे ऐकून/वाचून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 09/27/2017 - 17:15 नवीन
व्हाईस चॅन्सेलर म्हणजे कुलगुरू. राज्यपाल हे विद्यापीठाचे चॅन्सेलर किंवा कुलपती असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा