Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग २०

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/25/2018 - 18:08
🗣 217 प्रतिसाद
आजतक व एबीपी न्यूज या दोन वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या नवीन मतदार सर्वेक्षणाचे अंदाज आज जाहीर केले. १) आजतक - कार्वी सर्वेक्षण हे सर्वेक्षण ३० डिसेंबर २०१७ ते १० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ४०% मतांसहीत एकूण ३०९ जागा मिळतील तर संपुआला २७% मतांसहीत एकूण १०२ जागा मिळतील. या सर्वेक्षणात शिवसेना रालोआत आहे असे गृहित धरलेले आहे व संजदचा देखील रालोआत समावेश करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे. जर संपुआत तॄणमूल काँग्रेस, सप व बसप सामील झाले तर संपुआच्या मतांची टक्केवारी ३८% पर्यंत जाऊन एकूण जागा २०२ मिळू शकतील, तर या परिस्थितीत रालोआला २५८ जागा मिळू शकतील. म्हणजे रालोआ वजा शिवसेना आणि संपुआ अधिक तृणमूल अधिक सप अधिक बसप अशी निवडणुक झाली तर संपुआ रालोआपेक्षा जास्त जागा मिळवू शकेल. https://www.indiatoday.in/india/story/india-today-mood-of-the-nation-poll-is-narendra-modi-still-india-s-first-choice-as-pm-1154288-2018-01-25 २) एबीपी न्यूज - सीएसडीएस सर्वेक्षण हे सर्वेक्षण ७ जानेवारी २०१८ ते २० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ३४% मतांसहीत एकूण ३०१ जागा मिळतील तर संपुआला २५% मतांसहीत एकूण १२७ जागा मिळतील. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे. http://www.abplive.in/india-news/nda-to-win-293-309-seats-if-general-elections-were-held-today-abp-news-csds-survey-639813-639813?rs_type=internal&rs_origin=section&rs_medium=article&rs_index=4

प्रतिक्रिया द्या
43001 वाचन

💬 प्रतिसाद (217)
M
manguu@mail.com Sun, 01/28/2018 - 10:15 नवीन
काँग्रेसचे सरकार असते तर आतापर्यंत भयानक गदारोळ झाला असता नै ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
आ
आनन्दा Sun, 01/28/2018 - 16:46 नवीन
मोदी आणि तोगडिया यांचे पूर्वापार कशावरून फाटले आहे आपल्याला माहीत आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Sun, 01/28/2018 - 17:32 नवीन
नाही माहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Sun, 01/28/2018 - 19:22 नवीन
मोदींनी बऱ्याच ठिकाणी विकासकामांसाठी मंदिरे हलवली, जे विश्व हिंदू परिषदेला मान्य नव्हते.. बादवे, मोदी हा माणूस म्हणून संघपरिवारापलिकडे जाऊन समजून घ्या, मग तुम्हाला कळेल की त्यांचे इतके फॅन का आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Sun, 01/28/2018 - 19:41 नवीन
कुठे कधी झाले ? आणि विकासकामातील अडथळे हलवणे हे लोकल लेवलला होइल ना ? की डायरेक्ट मोदीना फोन ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Sun, 01/28/2018 - 20:48 नवीन
अश्या गोष्टी जेव्हा राज्य पातळीवर होतात तेव्हा त्यामागे तेव्हढाच दणकट पाठिंबा असावा लागतो.. मला असे म्हणायचे नाही की केवळ मंदिरेच हलवली, अन्य धर्मांची प्रार्थनास्थळे देखील हलवली, पण हिंदूंच्या स्थळांना हिंदू म्हणून काहीही सवलत दिलेली नाही.. सरदार सरोवरात हिंदूंचे कोणतेतरी महत्वाचे मंदिर रेलोकेट करवे लागले होते, पण अश्या गोष्टींनी मोदींवर काही फरक पडत नाही. या गोष्टींना विहिंपचा विरोध होता, ते कदाचित त्यांच्या जागी बरोबर असतील, पण विकासाच्या आड अश्या श्रद्धा येणे तसेही वाईटच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ग
गॅरी ट्रुमन Mon, 01/29/2018 - 04:17 नवीन
आणि विकासकामातील अडथळे हलवणे हे लोकल लेवलला होइल ना ? की डायरेक्ट मोदीना फोन ?
का? कुठल्यातरी रॅन्डम ठिकाणी कोणीतरी रॅन्डम वक्तव्य केले तरी त्याचे स्पष्टीकरण डायरेक्ट मोदींकडून मागायची पध्दत तुमच्यासारख्यांनीच सुरू केली ना? मग लोकल लेव्हलला केलेल्या विकासकामाचे श्रेय मोदींना का देऊ नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
स
सुबोध खरे Mon, 01/29/2018 - 05:40 नवीन
ते मोगा खान डू आय डीच्या-- डू आयडी चा -- डू आयडी घेऊन आले आहेत त्यांच्या नादाला कुठे लागताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
श
श्रीगुरुजी Mon, 01/29/2018 - 10:38 नवीन
हा नवीन सदस्य मोगा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
M
manguu@mail.com Mon, 01/29/2018 - 14:50 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गामा पैलवान Sun, 01/28/2018 - 13:40 नवीन
manguu@mail.com,
सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष असताना मोदी सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात त्यांना तिन्ही वर्षे पहिल्या रांगेत स्थान दिले होते. मात्र त्यांच्याकडून गेल्या महिन्यात काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेणाऱ्या राहुल यांना डिवचण्यासाठी मुद्दाम चौथ्या रांगेत बसवले जाणार आहे.
यावर हा लेख पहा म्हणून सुचवेन : http://jagatapahara.blogspot.co.uk/2018/01/blog-post_27.html आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
S
shashu गुरुवार, 02/01/2018 - 07:17 नवीन
धो डाला.............. लेखकाने खूपच आक्रमकतेने लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सर टोबी Sun, 01/28/2018 - 14:42 नवीन
शिवसेनेला काही उपरती झाली तर davyanchya गटात सामील होण्यात फारशी अडचण येऊ नये. तसेही त्यांचे हिंदुत्व फारसे जहाल म्हणून काही नावाजले जात नाही. दुसरे म्हणजे आत्ता तर घसरगुंडीची सुरुवात आहे.भाजपाला मिळणारया जागा भविष्यात कमीच होतील. चांगला पाऊस आणि जागतिक मंदीचा फायदा जनतेपर्यंत न फोहोचविण्याची त्यांची प्रवृत्ती लोकांना चांगलीच समजली असेल. म्हणजे पुढील दोन अर्थसंकल्पात अगदी खैरात केली तरी पुढे हलाल व्हावे लागणार हे जनतेला समजू शकते. बरं, खैरात करून करून किती करणार. GST आणि नोटबंदीने अर्थव्यवस्था धुपलेली आहेच. त्यात पुढील काळात मोदींचा एखादा विरोधकांना फायदेशीर ठरणारा मास्टर स्ट्रोक आला कि विचारायलाच नको.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 01/29/2018 - 04:27 नवीन
आज पुढील जागांसाठी पोटनिवडणुकांचे मतदान होत आहे: १. राजस्थानः अल्वर आणि अजमेर या लोकसभा जागांसाठी तर मंडलगड या विधानसभा जागेसाठी. २. पश्चिम बंगालः उलुबेरिया या लोकसभा जागेसाठी तर नोआपारा या विधानसभा जागेसाठी राजस्थानातील निकाल महत्वाचे असणार आहेत. एक तर वसुंधरा राजेंच्या सरकारविरूध्द अ‍ॅन्टी इन्कबन्सी असणार आहे. त्यातच सचिन पायलटच्या नेतृत्वाखाली काँग्रेस बरीच सुस्थितीत आली आहे. जर या तीन जागांवर चांगली कामगिरी काँग्रेसने केल्यास या वर्षाच्या शेवटी होणार्‍या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसला मोठे बळ मिळेल. मतमोजणी १ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्याव्यतिरिक्त मध्य प्रदेशात दोन तर ओरिसात एका विधानसभा जागेसाठी फेब्रुवारीत पोटनिवडणुक होणार आहे.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 01/29/2018 - 06:57 नवीन
देशातील जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास कमी झाल्याचं 'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'च्या रँकिंग आणि गुणसंख्येवरून दिसून येतं. दावोसमध्ये जारी करण्यात आलेल्या 'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'मध्ये भारताचं यंदाचं रँकिंग आणि गुणसंख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात घसरली आहे. गेल्या वर्षी भारत रँकींगमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, यावर्षी तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. https://m.maharashtratimes.com/india-news/india-among-top-three-countries-where-trust-in-government-remains-high/articleshow/62689496.cms
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 01/29/2018 - 07:27 नवीन
अन्धश्रद्धेचे याहून ढळ्ढळीत उदाहरण दुसरे नसेल.. बातमी पूर्ण तरी वाचत जा जरा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
इ
इरसाल Mon, 01/29/2018 - 10:36 नवीन
त्यांना काय बोलायचे काम नाय. त्यांना ७ खुन नी ९ जन्म माफ आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
ब
बिटाकाका Mon, 01/29/2018 - 07:46 नवीन
बातमीचा मथळा आणि आतला कन्टेन्ट वाचला, किंव आली. द्वेषापायी बौद्धिक दिवाळखोरी ती यापेक्षा काय वेगळी असू शकेल. चालायचंच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Mon, 01/29/2018 - 08:27 नवीन
त्यांच्याच इंग्रजी बातमीचा मथळा बघा! हद्द असते विखारीपणाची! https://timesofindia.indiatimes.com/india/india-among-top-three-countries-where-trust-in-government-remains-high/articleshow/62687185.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
आ
आनन्दा Mon, 01/29/2018 - 08:48 नवीन
अरारारा, जर त्याने बातमी पूर्ण वाचली असती तर असे लिहिण्याची हिंमत केली नसती. खाली काय लिहिलय बघा -
Media was the lowest at 61, dropping five points since 2017
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
श
श्रीगुरुजी Mon, 01/29/2018 - 10:35 नवीन
देशातील जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास कमी झाल्याचं 'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'च्या रँकिंग आणि गुणसंख्येवरून दिसून येतं. दावोसमध्ये जारी करण्यात आलेल्या 'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'मध्ये भारताचं यंदाचं रँकिंग आणि गुणसंख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात घसरली आहे. गेल्या वर्षी भारत रँकींगमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, यावर्षी तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. 'मटा'चा मूर्खपणा दिवसेंदिवस वृद्धिंगत होताना दिसतोय. एडेलमॅन या विदेशी कंपनीने केलेले हे सर्वक्षण राजकीय नसून वेगवेगळ्या देशातील सरकार, माध्यमे व असरकारी संस्था यांच्यावर जनतेचा किती विश्वास आहे याचे सर्वेक्षण आहे. हे प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन केलेले सर्वेक्षण नसून ऑनलाईन सर्वेक्षण असल्याने या सर्वेक्षणाला प्रतिसाद देणारे एका ठराविक वर्गातील आहेत. 'मटा'च्या बातमीचे शीर्षक आहे 'जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास उडाला!'. मुळात सर्वसामान्य जनता या सर्वेक्षणात सहभागीच नाही, हे राजकीय सर्वेक्षण नाही आणि सरकारबरोबरच माध्यमे व असरकारी संस्था यांची विश्वासार्हता सुद्धा तपासण्यात आली आहे. तरीसुद्धा 'जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास उडाला!' असा दिशाभूल करणारा, असत्य व सनसनाटी मथळा देऊन 'मटा'ने स्वतःचे हसू करून घेतले आहे. मागील वर्षी असलेल्या ७२ व्या क्रमांकावरून ६८ वर येणे म्हणजे जनतेचा विश्वास उडाला असे म्हणणे म्हणजे मागील परीक्षेतील गुणांच्या तुलनेत या परीक्षेत एका विषयात ४ गुण कमी मिळाल्यानंतर विद्यार्थी संपूर्ण परीक्षेत अनुत्तीर्ण झाला असे म्हणण्यासारखे आहे. याच बातमीत लिहिले आहे की 'जीएसटी आणि नोटाबंदीसारख्या कठोर आर्थिक सुधारणांनंतर 'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'नं दिलेलं रँकिंग सरकारसाठी आशादायी आहे, असं मानलं जात आहे.'. एकीकडे म्हणतात की 'जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास उडाला' आणि दुसरीकडे म्हणतात कठोर आर्थिक सुधारणांनंतर सुद्धा मिळालेला क्रमांक सरकारसाठी आशादायी आहे. म्हणजे एका विषयात ४ गुण कमी मिळाल्यानंतर विद्यार्थी संपूर्ण परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याची दवंडी पिटायची आणि दुसरीकडे म्हणायचं की प्रश्नपत्रिका खूप अवघड असूनसुद्धा इतके गुण मिळणे विद्यार्थ्यासाठी आशादायी आहे. 'मटा'ला लाज वाटायला हवी. मोदीद्वेषाची परिसीमा होत आहे. केतकरांनी ९० च्या दशकाच्या उत्तरार्धात 'मटा'चे संपादक झाल्यानंतर त्याचा 'सोटा' (सोनिया टाइम्स) करून त्याचे खांग्रेसचे मुखपत्र बनविले होते व वृत्तपत्राची विश्वासार्हता पूर्ण रसातळाला नेली होती. आता नवीन आलेले विजय चोरमारे त्यांच्या एक पाऊल पुढे आहेत. सातत्याने मोदींविरोधी असत्य बातम्या छापणे, 'सामना'च्या अग्रलेखाचा कचरा छापणे असले फालतू प्रकार बंद होतील तो सुदिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Mon, 01/29/2018 - 10:47 नवीन
मागील वर्षी असलेल्या ७२ व्या क्रमांकावरून ६८ वर येणे म्हणजे जनतेचा विश्वास उडाला असे म्हणणे
हे थोडे दुरुस्त करणे - ७२व्या स्थानावरून ६८व्या स्थानावर नाही तर मागच्या वर्षीच्या ७२ गुणांसह असलेल्या पहिल्या स्थानावरून ६८ गुण असलेल्या तिसऱ्या स्थानावर घसरण झाली असे ते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 01/29/2018 - 10:52 नवीन
अरेरे! मटाची लागण मलाही झाली. ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला असे झालेले दिसतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
व
विशुमित Mon, 01/29/2018 - 11:06 नवीन
धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारची चांगलीच दमछाक होत आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Mon, 01/29/2018 - 11:13 नवीन
हेई वाईच बातमी म्हून वाचून घ्या ! https://www.outlookindia.com/newsscroll/congress-acquired-land-compensated-farmer-dharma-patil-who-committed-suicide/1240941
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 01/29/2018 - 11:39 नवीन
तशी मला शुद्ध मराठी भाषा समजते आणि आमच्या साईडला वाईच हा शब्द सहसा कोणी वापरात आणत नाही. खास माझ्यासाठी आपल्या शुद्ध मराठी भाषेचा बाज बदलू नये, असे वाटते. असो... ... मी फक्त म्हंटले महाराष्ट्र सरकारची दमछाक होत आहे. कोणते सरकार जवाबदार आहे हे नमूद केले नाही. तुम्ही या प्रकरणाकडे फक्त पक्षीय राजकारणाच्या चष्म्यातून पाहत आहात असे वाटते. सरकार कोणाचे का असेना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, या मताचा मी आहे. ...... https://www.loksatta.com/maharashtra-news/farmer-dharma-patil-suicide-case-minister-of-energy-chandrashekhar-bawankule-pc-in-nagpur-government-will-look-into-matter-1623338/ या बातमीनुसार १९९ हेक्टर चे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. हे कशाच्या आधारावर ? १० लाखाचा सानुग्रह देखील देण्याचे घोषित केले आहे, ही दमछाक नाहीतर काय आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Mon, 01/29/2018 - 12:22 नवीन
तशी मला शुद्ध मराठी भाषा समजते आणि आमच्या साईडला वाईच हा शब्द सहसा कोणी वापरात आणत नाही. खास माझ्यासाठी आपल्या शुद्ध मराठी भाषेचा बाज बदलू नये, असे वाटते. असो...
हे अतिअवांतर आहे पण ....फक्त माहितीसाठी...मला ग्रामीण भाषा जास्त आवडते कारण ती माझी मूळ भाषा आहे.
राजकारणाच्या चष्म्यातून पाहत आहात असे वाटते.
हाहाहा...चष्मा कोणाला काढायची गरज आहे वे वेगळे सांगायची गरज नाही. मी फक्त तुमच्या वाचनासाठी ती लिंक दिली. महाराष्ट्र सरकारची दमछाक होतेय कि अजून काय होतेय हे ठरवण्याआधी पूर्ण माहिती तर नक्कीच घ्यायला पाहिजे, काय म्हंता?
या बातमीनुसार १९९ हेक्टर चे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. हे कशाच्या आधारावर ? १० लाखाचा सानुग्रह देखील देण्याचे घोषित केले आहे, ही दमछाक नाहीतर काय आहे ?
कशी काय हि दमछाक जरा सांगता का? एका शेतकऱ्याने योग्य अथवा अयोग्य मागणीसाठी आत्महत्या केली तर सरकारने त्याबद्दल खेद व्यक्त करून त्याबद्दल मोबदला दिला आहे तर ती दमछाक कशी काय? हि आत्महत्या नसून सरकारी यंत्रणेमुळे झालेली हत्या आहे आणि म्हणून सरकार मदत करत आहे असे मंत्रीमहोदय म्हणाल्याचं आपली बातमीच सांगते. तुम्ही तर चष्मा लावलेला नाहीये ना मग दमछाक वगैरे कशाला? कि महाराष्ट्र सरकार भाजप-शिवसेना आहे म्हणून दमछाक आणि आपल्या आवडत्या पक्षाचं असतं तर शेतकरी-प्रेम असं काही असतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 01/29/2018 - 12:59 नवीन
<<<मला ग्रामीण भाषा जास्त आवडते कारण ती माझी मूळ भाषा आहे.>> ==>> मी जेवढे तुमचे प्रतिसाद वाचलेत त्यामध्ये तुम्ही ग्रामीण ढंग वापरलेला मला आढळला नाही (वापरला असेल ही बहुतेक). माझ्याच प्रतिसादाला तो अवांतर का वापरला असावा हा प्रश्न पडल्यामुळे माझ्याकडून अतिअवांतर झाले. रुचले नसेल तर क्षमस्व. <<< राजकारणाच्या चष्म्यातून पाहत आहात असे वाटते. हाहाहा...चष्मा कोणाला काढायची गरज आहे वे वेगळे सांगायची गरज नाही. मी फक्त तुमच्या वाचनासाठी ती लिंक दिली. महाराष्ट्र सरकारची दमछाक होतेय कि अजून काय होतेय हे ठरवण्याआधी पूर्ण माहिती तर नक्कीच घ्यायला पाहिजे, काय म्हंता?>>> ==>> मी पक्षीय राजकारणाचा चष्मा हा शब्द प्रयोग यासाठी केला कारण तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये संपूर्ण बातमी मागील सरकार संदर्भात काय काय घडामोडी झाल्या एवढीच माहिती होती. चालू सरकारच्या काळात अशे प्रकार कशापद्धतीने हाताळायला पाहिजे होते या बद्दल चकार शब्द नाही. या बातमीनुसार According to the Land Acquisition Act, the government cannot make any changes in the compensation amount if the process is completed and the compensation is received by the affected person(s). याबाबत थोडी शंका आहे. <<<एका शेतकऱ्याने योग्य अथवा अयोग्य मागणीसाठी आत्महत्या केली तर सरकारने त्याबद्दल खेद व्यक्त करून त्याबद्दल मोबदला दिला आहे तर ती दमछाक कशी काय?>>> ==>> निवेदन देऊन ही हा खेद आत्महत्या करण्यापूर्वी व्यक्त केला असता तर आता पळापळी करायची गरज उरली असती. <<<हि आत्महत्या नसून सरकारी यंत्रणेमुळे झालेली हत्या आहे आणि म्हणून सरकार मदत करत आहे असे मंत्रीमहोदय म्हणाल्याचं आपली बातमीच सांगते.>>> ==>> सरकार आणि सरकारी यंत्रणा हे वेगवेगळे कसे हे जरा सांगता का? आणि सरकारी यंत्रणेमुळे झालेली हत्या आहे म्हंटल्यावर किती जणांवर ३०२ कलम लावले हे दिसले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Mon, 01/29/2018 - 13:18 नवीन
वरील आऊटलूक च्या बातमी मध्ये फक्त घटनाक्रम दिला आहे. तो भाजपसाठी अनुकूल आहे म्हणून लगेच राजकीय? ती बातमी परत एकदा नीट वाचलीत तर लक्षात येईल कि त्या घटनाक्रमात एप्रिल २०१४ ला मोबदल्याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि समोरच्या पक्षाकडून मान्यही झाली असे लिहिले आहे. आता बातमी असेही म्हणते कि कायद्याने एकदा मोबदला मंजूर झाला आणि हस्तांतरित झाला तर त्यात बदल करता येत नाहीत. तुमचं असं म्हणणं आहे का कि त्यानंतर फक्त निवेदन आलं म्हणून पुढच्या सरकारने त्यात बदल करायला हवा होता? आणि फक्त नियमाला धरून राहिले म्हणून पुढचे सरकार चुकीचे? ते कसे काय? अशा येणाऱ्या निवेदनांवर सरकारने निर्णय घ्यावेत असे आपले म्हणणे आहे का? हि दुर्दैवी आत्महत्या झाली म्हणून आता आपल्याला असे वाटते काय कि सरकारने निवेदनावर आधारित निर्णय घ्यायला हवा होता? अहो पण नियमांचं काय मग? सरकार आणि सरकारी यंत्रणा यातला खरंच फरक सांगायला हवा का? सरकारी यंत्रणा हि नियम आणि कायद्याने चालायला नको? त्या जमिनीचे योग्य मूल्यांकन (जर ते खरेच झाले नसेल तर ) योग्य वेळी करणे कोणाच्या हातात होते? तुम्हाला वरच्या बातमीत दिलेल्या घटनाक्रमावर अथवा नियमांवरच आक्षेप असेल तर त्यावर निश्चित चर्चा व्हावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
आ
आनन्दा Wed, 01/31/2018 - 10:01 नवीन
बा द वे, अजून थोडं शोधल्यावर असं कळलं की त्यांच्या सातबारावर कलमे नसल्यामुळे त्यांना कमी मोबदला मिळाला.. आता हा काय नवीन प्रकार? मी जाणत्या आयडीना विनंती करतो की हे सगळे चर्चा एक वेगळा धागा काढून करावी, नेमकं काय झालं, काय चुकलं, काय बदलता आलं असतं वगैरे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
व
विशुमित Tue, 02/13/2018 - 08:08 नवीन
<<<आता बातमी असेही म्हणते कि कायद्याने एकदा मोबदला मंजूर झाला आणि हस्तांतरित झाला तर त्यात बदल करता येत नाहीत.>>> ==>> झाला बदल. धर्मा पाटलांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन; वारसांना मिळणार 54 लाखांचा मोबदला. इतर 12 प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनाही वाढीव मोबदला मिळणार आहे. http://www.lokmat.com/maharashtra/farmer-dharma-patil-family-gets-54-lakh-compensation-land/ ..... लोक चित्र असे उभे करतात की शेतकरी म्हणजे ऐतखाऊ, फक्त मदती लाटण्यासाठी आणि फुकट मिळावे यासाठी धडपडत असतो. ग्राउंड लॅव्हेल वर येऊन दखल घायला कोणी तयारच नाहीत. फक्त वृत्तपत्रीय बातम्यांचा आधार घायचा, सोयीनुसार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Tue, 02/13/2018 - 19:23 नवीन
कोण लोक? तुमच्या प्रतिसादातील शेवटचा पॅरा माझ्या प्रतिसादाला उप-प्रतिसाद म्हणून टाकण्यामागाचे प्रयोजन काय? नेमके काय म्हणायचे आहे तुम्हाला? स्वतःला शेतकऱ्याचे कैवारी आणि दुसर्यांना शेतकऱ्याचे वैरी ठरवण्याची फॅशन आली आहे का आजकाल? बाकी, मागच्या सरकारचे पाप या सरकारने धुतले, याबद्दल सद्य सरकारचे माझ्या वैयक्तिक कॅपॅसीटीमध्ये अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 02/14/2018 - 05:46 नवीन
धुतले नाही, धुवायला लावले. अभिनंदन कसले करताय, एक जीव जीवानिशी गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Wed, 02/14/2018 - 05:49 नवीन
हो का? कुणामुळे गेला बरे? आणि कुणी धुवायला लावले? आणि ज्यांनी ते पाप केलं त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं? आणि, इथे कुठला नियमभंग झाला होता सांगाल का जरा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ब
बिटाकाका Wed, 02/14/2018 - 05:50 नवीन
आणि शिवाय तो शेवटचा पॅरा का तेही सांगून टाका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
श
श्रीगुरुजी Wed, 02/14/2018 - 06:10 नवीन
आधी घाण कोणत्या जाणत्यानेणत्यांनी केली ते सांगता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Mon, 01/29/2018 - 12:36 नवीन
ही दमछाक नाहीतर काय आहे ? दमछाक वगैरे झाली का ते सांगता येणार नाही. परंतु वाटेल ते बेलगाम आरोप करणारा नबाब मलिक, आपल्या पप्पांची व चुलतभावाची कारकीर्द विसरणार्‍या सुळेवहिनी, बेताल धनंजय मुंडे इ. ना मात्र या आत्महत्येमुळे आनंदाच्या उकळ्या फुटल्या हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 01/29/2018 - 13:05 नवीन
क्रिमिनल जयकुमारला सोयीस्करपणे का वगळले ? <<आत्महत्येमुळे आनंदाच्या उकळ्या फुटल्या हे नक्की.>> ==>> सरकारचा नाकर्तेपणा झाकण्याचा केविलवाणा आणि असंवेदनशील प्रयत्न. बाकी मावळ गोळीबार प्रकरणी देखील अशाच उकळ्या सद्य्च्या सत्ताधारी पक्षातील लोकांना फुटल्या असणार नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 01/29/2018 - 13:16 नवीन
क्रिमिनल जयकुमार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 01/29/2018 - 13:20 नवीन
आत्महत्येमुळे आनंदाच्या उकळ्या फुटल्या??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Mon, 01/29/2018 - 13:21 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/mla-jaykumar-rawal-and-his-close-relation-with-crime-86038/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 01/29/2018 - 14:09 नवीन
या 'क्रिमिनल'विरूद्ध १९९९-२०१४ या कालखंडात कोणती कारवाई केली? तत्कालीन गृहमंत्री तेव्हा बैदूल खेळत होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Mon, 01/29/2018 - 12:21 नवीन
सरकार कोणाचे का असेना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, या मताचा मी आहे. या मुद्द्यावर पूर्ण सहमत.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 01/29/2018 - 16:35 नवीन
आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या शिवसेनेच्या प्रतिनिधींनी आजच्या एनडीएच्या बैठकीत आपला सहभाग नोंदवला. इतकेच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ पारित करण्यात आलेल्या प्रस्तावाचेही शिवसेनेने समर्थन केले आहे. या बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका सोबत घेण्यावर जोर देत या पंतप्रधानांनी याबाबतचा प्रस्ताव संसदेत मंजूर व्हावा अशी आशाही व्यक्त केली. स्त्रोतः https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/shivsena-took-part-in-nda-meeting-resolution-passed-in-praise-of-pm-modi/articleshow/62698835.cms
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Tue, 01/30/2018 - 14:21 नवीन
म.गांधीना विनम्र अभिवादन
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Tue, 01/30/2018 - 21:32 नवीन
Image removed. महात्मा गांधी यांच्या ७०व्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी वाहिली श्रद्धांजली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही उपस्थिती.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 01/30/2018 - 22:21 नवीन
गोविंद पानसऱ्यांच्या हत्येच्या खोट्या आरोपाखाली गेले दीड वर्षांहून अधिक काळ अटकेत असलेल्या डॉक्टर वीरेंद्र तावडे यांना जामीन संमत झाला आहे. अधिक माहिती : https://sanatanprabhat.org/marathi/112501.html डॉ. तावडे हिंदुसंघटनाचं कार्य प्रभावीपणे करतात म्हणून देशद्रोही डाव्यांनी त्यांना तुरुंगात डांबून वेळकाढूपणा केला होता. अशा प्रकारे न्यायव्यवस्थेचा गैरफायदा घेतल्याने तिचा वचक कमी होतो. न्यायव्यवस्थेचा दरारा पुनरपि उत्पन्न होणं अत्यावश्यक आहे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 02/14/2018 - 09:55 नवीन
गेले दीड वर्षांहून अधिक काळ कोणाचे सरकार आहे ? देशद्रोही डाव्यांनी त्यांना तुरुंगात डांबून ? डाव्यांचे सरकार आहे का ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Wed, 02/14/2018 - 14:57 नवीन
कपिलमुनी, इथे शासनाचा संबंध येत नाही. शासन एखाद्यास तुरुंगात धाडंत नाही अथवा सोडवंतही नाही. ते काम न्यायालयाचं आहे. तिस्ता सेटलवाडसारख्या देशद्रोही डाव्यांनी न्यायालयं पोखरून काढली आहेत. हा मुद्दा अधोरेखित करायचा आहे. आजंच माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांचं सोहराबुद्दीन खटल्याबद्दल वक्तव्य छापून आलं आहे. त्यांना दहशतवादी सोहराबुद्दीनच्या हत्येच्या खटल्यात अनियमितता आढळते. कारण संशयितांना जामीन मिळाला आहे. पण साध्वी वा प्रसाद पुरोहित या निरपराध्यांना ९ वर्षं विना चौकशी डांबून ठेवलं त्याबद्दल कुणालाच काही वाटंत नाही. शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये असा न्यायव्यवस्थेचा दंडक आहे. पण निरपराधी हिंदुत्ववादी असतील तर हा दंडक उघडपणे धाब्यावर बसवायला कुणाचीच हरकत नाही. खुनी देशद्रोही दहशतवादी याकूब मेमन साठी रात्री बेरात्री न्यायालयाचं कामकाज चालवलं जातं, आणि पूर्णपणे निरपराध डॉ. तावडे व समीर गायकवाड यांना विनाचौकशी विनाजामीन महिनोनमहिने तुरुंगात डांबून ठेवलं जातं. देशद्रोह्यांची ही मुजोरी मोडून काढायला नको का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ग
गॅरी ट्रुमन Wed, 01/31/2018 - 07:45 नवीन
आज भाप्रवे सकाळी साडेसातच्या सुमारास अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्डतात्या ट्रम्प यांचे पहिले स्टेट ऑफ द युनियन भाषण झाले. या भाषणाच्या वेळी प्रथेप्रमाणे ट्रम्पतात्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या सामान्य लोकांना कॅपिटॉल मध्ये बोलावून अध्यक्षांसह सगळ्यांनी त्यांना 'स्टँडिंग ओव्हेशन' दिले. ही पध्दत खरोखरच चांगली आहे. आणि अशा सामान्य लोकांचा गौरव केलेला असतो ते काही समाजसेवा म्हणजे आपले व्रत असे समजून त्यात स्वतःला झोकून देणारे नसतात तर तुमच्याआमच्यासारखे सामान्य लोक असतात. हरिकेनच्या वेळी लोकांना मदत करणार्‍यांचा असा गौरव करण्यात आला. २००२ मध्ये ९/११ नंतर एका विमानप्रवाशाने बुटात स्फोटके लपवून नेली होती आणि ते विमान हवेत उडवून द्यायचा त्याचा कट होता. पण एका एअर होस्टेसच्या प्रसंगावधानाने त्याला वेळीच पकडण्यात यश आले आणि अनर्थ टळला. त्या एअर होस्टेसला जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या स्टेट ऑफ द युनियनसाठी कॅपिटॉलमध्ये बोलावून घेण्यात आले होते. अशाप्रकारे सामान्य लोकांना मुद्दामून बोलावून घेऊन त्यांचा उल्लेख करून अध्यक्षांसह सगळ्यांनी अशांना स्टँडिंग ओव्हेशन देणे ही नक्कीच चांगली पध्दत आहे. आपल्याकडे अशी सुरवात व्हायला हवी. काही प्रमाणात मोदींच्या मनकी बातमध्ये अशा सामान्य लोकांचा उल्लेख असतो पण हा प्रकार अधिक मोठ्या प्रमाणात व्हायला हवा असे वाटते. ट्रम्पतात्यांकडे रॉनाल्ड रेगन किंवा बिल क्लिंटन यांच्यासारखे कोणावरही छाप पाडणारे वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व या दोन्ही गोष्टी नाहीत. तरीही त्यांचे आजचे भाषण त्या मानाने बरेच चांगले झाले असे मला वाटले. जॉर्ज डब्ल्यू बुशकडेही या दोन्ही गोष्टी नव्हत्या पण रोमारोमात भिनलेला अ‍ॅरोगन्स होता. तो त्यांच्या भाषणात अनेकदा दिसायचा. तसाच अ‍ॅरोगन्स ट्रम्पतात्यांकडे असूनही निदान मला तरी आज तो जाणवला नाही.तसेच ओबामांसारखा उच्च मूल्यांचा जपही नव्हता. एकूणच ट्रम्पतात्यांचे भाषण अपेक्षा होती त्या मानाने बरेच जास्त चांगले झाले असे मला तरी वाटले. कदाचित मुळातच अपेक्षा फार नव्हतीच हे पण कारण असेल. अपेक्षेप्रमाणे ट्रम्पतात्यांनी करकपातीवर भाष्य केले.पण त्याचबरोबर सरकारचे खर्च कमी करण्यासाठी काय हा प्रश्न होताच. १९८० च्या दशकात रेगन आणि २००० च्या दशकात धाकले बुश यांनीही करसवलती दिल्या होत्या. पण सरकारी खर्च त्यांनी कमी केले नाहीत. सरकारचा आकार कमी ठेवायचा या तत्वावर रेगनचा विश्वास होता पण प्रत्यक्षात तसे करायला गेले तर मग जनतेसाठीच्या वेलफेअरवरील खर्च कमी करावा लागला असता आणि तसे करणे कोणाही अध्यक्षाला परवडणार्‍यातले नव्हते त्यामुळे प्रत्यक्षात रेगन सरकारी खर्च कमी करण्याविषयी जे बोलत होते त्यापैकी त्यांनी काही केले नाही. धाकल्या बुशबाबांचा तर सगळाच आनंदी आनंद होता. त्यामुळे एकीकडे करकपात करत असतानाच दुसरीकडे खर्च कमी करायचे नाहीत (किंबहुना वाढवायचेच). या कारणामुळे सरकारी वित्तीय तूट अजून वाढली. प्रचंड लोकप्रिय असूनही रेगन जर मतदारांना दुखावणारा निर्णय घ्यायचे धाडस दाखवू शकले नसतील तर ती अपेक्षा ट्रम्पतात्यांकडून करताच येणार नाही. ट्रम्पतात्या इतरही अनेक गोष्टींवर बोलले. त्यात मेरीट बेस्ड इमिग्रेशन सुरू करणे हा एक मुद्दा होता. ग्रीनकार्डसाठी लॉटरी काढण्याऐवजी ज्या इमिग्रन्टकडून अमेरिकेला फायदा होईल अशांना ग्रीनकार्ड देण्यात यावे हा मुद्दा मला तरी योग्यच वाटला. उत्तर कोरिआवरही भाष्य होतेच. स्टेट ऑफ द युनियन भाषणादरम्यान एक गोष्ट अगदी ठळकपणे जाणवली. अमेरिकेतील पध्दतीनुसार वक्त्याचा एखादा मुद्दा आवडला तर नुसत्या टाळ्याच वाजवायच्या नाहीत तर जागेवर उठून उभे राहायचे आणि 'स्टँडिंग ओव्हेशन' द्यायचे. वर उल्लेख केल्याप्रमाणे सामान्य लोकांचा गौरव केला जात होता तेव्हा सगळ्यांनी उठून स्टँडिंग ओव्हेशन दिले. पण ट्रम्प जेव्हा सरकारी धोरणांवर (उदाहरणार्थ नव्या नोकर्‍या निर्माण करणे, करसवलती, इमिग्रेशन रिफॉर्म इत्यादी) बोलत होते तेव्हा विरोधी पक्षांपैकी कोणीही जागेवर उभे राहणे सोडूनच द्या टाळ्या वाजवायलाही तयार नव्हते. सी.एन.एन वर नेमक्या अशाच वेळी अनेकदा बर्नी सँडर्स आणि नॅन्सी पेलोसी यांच्यावर कॅमेरा फोकस करत होते. त्यामुळे ही गोष्ट अजून प्रकर्षाने लक्षात आली.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा