चालू घडामोडी : ऑक्टोबर २०१८
Companies pay up Rs 1.1 lakh crore for fear of insolvency action
कर्ज देणे व वसूल करणे यांच्या प्रशासनासंबंधीचे (इन्सॉल्व्हन्सी व बँकरप्सी) नवीन कायदे (उदा : Insolvency and Bankruptcy Code किंवा IBC) आणल्यामुळे पूर्वी चालढकल करत बुडित कर्जांच्या दिशेने वाटचाल करणार्या कर्जदारांवर वचक निर्माण झाल्याचे दिसत आहे. याचा परिणाम म्हणून, याअगोदर कर्ज फेडण्याबाबत चालढकल करणार्या कर्जदारांनी, आतापर्यंत सुमारे रु१.१ लाख कोटीचा भरणा बँकात केला आहे.
गेल्या आठवड्यात सरकारने, या वित्तवर्षांत, नाठाळ कर्जदारांकडून रु१.८ लाख कोटी वसूल करण्याचे लक्ष ठेवल्याचे जाहीर केले आहे.
कायद्याचे बळ व प्रशासकिय पाठींब्याचे (Insolvency and Bankruptcy Board of India किंवा IBBI; National Company Law Tribunal किंवा NCLT; इत्यादी) बळ व बारीक देखरेख आस्तित्वात आल्यामुळे, भविष्यात बँका आपले कर्ज वसूल करण्यात कसूर करण्याची आणि/किंवा कर्जदारांनी चलाखी करून कर्ज बुडवण्याची शक्यता फार कमी झाली आहे.
आजच्या घडीला एक कोटी रूपये रक्कम एकदम किरकोळ बाब आहे.*१. भारतात दरवर्षी, दरकरदात्यामागे, एक कोटी रूपये रक्कम एकदम किरकोळ बाब बनली आहे, असे तुम्ही म्हणताय. वाह, वाह, वाह, हे अच्छे दिन आल्याचे ठळक लक्षण होत नाही का? मोदी मिपा वाचत असते आणि त्यांनी तुमचा प्रतिसाद वाचला असता, तर त्यांनी तुम्हाला जरूर मनापासून धन्यवाद दिले असते ! २. मग ती किरकोळ* असलेली रक्कम 'ते ६०% लोक' आधी का जाहीर करत नसावेत ? आणि आत्ताच जाहीर करावी अशी उपरती त्यांना का बरं झाली असावी??? जर ते उगाचच, एकाएकी सज्जन झाले व कर भरू लागले तर, ते अच्छे दिन आल्याचे ठळक लक्षण नाही का? ३. केवळ, 'पाच-दहा हजार रुपयांच्या कर्जासाठी देशात आत्महत्या होत आहेत' असा मोठा गदारोळ असताना, दरवर्षीचे कोटी किंवा जास्त रुपये उत्पन्न "एकदम किरकोळ बाब" कशी काय ठरते बुवा? "की, किरकोळ रकमेचा आकडा, आपल्या सोईच्या मुद्द्याप्रमाणे हवा तसा वर-खाली होतो? ४. बाकीचं जाऊ द्या, त्या प्रतिसादात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे सुद्धा खूsssप गैरसोईचे आहे... त्यापेक्षा, ते खोडणारा कोणताही पुरावा न देता "हँ, हँ, हे सगळं पटत नाही / अविश्वासू आहे / खोटं आहे" असे म्हणणे कित्ती कित्ती सोप्पं, नाही का?! ========================= अवांतर : * : "वीस वीस लाख रुपये घेऊन भारतभर फिरणार्यांना एक कोटी काही फार मोठी रक्कम नाही" अशी कुजबूज ऐकू आली... पण, "हँ, हँ, हे सगळं पटत नाही / अविश्वासू आहे / खोटं आहे," असे म्हणत, मी नाही दिले लक्ष तिकडे! :)या समुद्राची आमच्याएवढी कुणाला माहिती असू शकत नाही
असं सांगताना तांडेल यांनी या स्मारकाच्या संकल्पनेवरच आक्षेप घेतला आहे याना पश्चिम नौदल कमांडचा ध्वजाधिकारी (FLAG OFFICER COMMANDER-IN-CHIEF) करून टाकावे असा PIL मुंबई उच्च न्यायालयात दाखल करता येईल.आमच्या इतके ज्ञान कुणालाच नाही म्हणणाऱ्या आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या माणसांच्या अहंकाराबद्दल
मला आणखी काहीच म्हणायचे नाही.