काथ्याकूट

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ६)

Primary tabs

ऑस्ट्रेलियाने व्हिक्टोरिया प्रांतात चीनच्या सहकार्याने उभारले जाणारे Belt and Road Initiative प्रकल्प रद्द केल्याने चीन संतापला आहे.

https://www.bloomberg.com/news/articles/2021-04-21/australia-cancels-st…

इस्लाम संस्थापक महंमदाचे व्यंगचित्र फ्रान्समधील चार्ली हेब्दो या साप्ताहिकाने प्रसिद्ध केले होते व फ्रान्स सरकारने त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने धर्मांधांसमोर लोटांगण घालून फ्रान्सच्या पाकिस्तानातील राजदूताची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव संसदेत आणला आहे. याच्या निषेधार्थ फ्रान्सने पाकिस्तानातील आपले १५ राजनैतिक अधिकारी परत बोलाविले आहेत.

https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/world-news/france-r…

श्रीगुरुजी

मार्क्सवादी साम्यवादी पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे चिरंजीव आशिष यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते ३४ वर्षांचे होते.

चीनच्या तालावर नाचणाऱ्या साम्यवादी नेत्याच्या मुलाच्या मृत्युसाठी चीननेच तयार करून जगभर पसरविलेला कोरोना विषाणू कारणीभूत ठरावा हा दुर्दैवी योगायोग आहे.

https://news.rediff.com/commentary/2021/apr/22/cpim-leader-sitaram-yech…

Rajesh188

अ़. Corona व्हायरस मानवनिर्मित आहे आणि तो चीन नी बनवला आहे?
तरच जगभर पसरला आहे.
WHO नी ही माहिती घेवून चीन वर कारवाई करण्यास युनो la सांगावे.
भारतात खरोखर खूप कठीण प्रश्नांची पण उत्तर लोक शोधून काढतात ग्रेट.
जग गेली दोन वर्ष हा व्हायरस नैसर्गिक आहे हेच समजत होतं

अमर विश्वास

अहो WHO तर तुमच्या साहेबांचा सल्ला घेते ना ?

ते तुमच्या (ज्वाज्वल्य वगैरे वगैरे ) हिंदुत्ववादी वृत्तपत्राचे (कार्यकारी) संपादक असं म्हणाले होते ..

हो तेच ते .. घराच्या घरी मुलाखती देतात - घेतात ते

तेव्हड तुमच्या साहेबांना सांगा ... WHO कडून हे किरकोळ काम करून घ्यायला

अमर विश्वास

अहो WHO तर तुमच्या साहेबांचा सल्ला घेते ना ?

ते तुमच्या (ज्वाज्वल्य वगैरे वगैरे ) हिंदुत्ववादी वृत्तपत्राचे (कार्यकारी) संपादक असं म्हणाले होते ..

हो तेच ते .. घराच्या घरी मुलाखती देतात - घेतात ते

तेव्हड तुमच्या साहेबांना सांगा ... WHO कडून हे किरकोळ काम करून घ्यायला

कॉमी

श्रद्धांजली
३४ हे काय वय झाल

साहना

आशिष ह्यांच्या बद्दल मला माहिती नाही पण पुत्रशोक कुणालाही होऊ नये आणि कृपया ह्या मृत्यूवर धुळवड करू नये. ज्या व्यक्ती राजकारणासाठी माणुसकी विसरतात त्यांना दोन्ही पैकी कुणाचाच लाभ मिळत नाही.

सुक्या

बातमी १:

गेल्या वर्षी जेव्हा करोनाचा कहर सुरु झाला तेव्हा भारतात आता काय होइल या विचारानेच पोटात गोळा आला होता. परंतु भारतात मोदींनी लावलेल्या कडक लॉकडाउन मुळे तो अनियंत्रित होण्याचे बरेच मार्ग बंद झाले. पर्यायाने परीस्थीती बर्‍यापैकी नियंत्रणात होती. हे दु:स्वप्न आता संपले असे म्हणायाच्या आतच पुन्हा हा डोंब उसळ्ला. याला बर्‍यापैकी लोकांचा निष्काळजी पणा कारणीभुत आहे. "गेला करोना", "कधीतरी मरायचेच आहे तेव्हा मला काहीही फरक पडत नाही" असे बोलणारे लोक, बार, बाजार, लग्न , कुंभमेळा, निवडनुका , पब यासारख्या ठिकाणी झालेली गर्दी, मास्क लावायच्या ऐवजी उपरणे, कुठलेही कापड, साडीचा पदर किवा नाकाखाली आलेला मास्क यावरुन तरी आम्ही भारतीय लोक कधीच सुधारणार नाही याची खात्री पटते. आता तर पुढे काय हा विचार सुद्धा करवत नाही. देर आये म्हणुन आता लोकडाउन केले त्याने फरक पडावा हिच आशा आहे.

बातमी २:

"मै ऐसे १० डॉक्टर खडी कर सकती हु"
करोना च्या आताच्या काळात शब्द्शः जीव धोक्यात घालुन अहोरात्र काम करनार्‍या डॉक्टर लोकांशी भांडणारी ही बाई. रात्रंदिवस जिवाचे रान करुन रुग्ण् सेवा करणारर्‍या लोकांना खरेच आशा वेदनादाई अनुभवातुन जायलाच हवे का? कुठुन येतो हा मग्रुरपणा? डॉक्टर, पोलीस व इतर फ्रंट्लाईनवर काम करणार्‍या लोकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी जगभरात टाळ्या / थाळ्या / घंटा वाजवल्या गेल्या. अगदी मंदीराच्या बाहेर "मंदीर बंद आहे कारण परमेश्वर आत नाही. तो जवळच्या रुग्णालयात कोविड चा ईलाज करतो आहे" अशी पाटी लाउन त्या लोकांविषयी कृतज्ञता / आदर व्यक्त केला गेला. ती भावना ह्या लोकांमधे कधी येणार? कधी शिकणार आपण हे सारे?

जाता जाता : या बाईंचा हरकाम्या नोकर होस्पिटल मधे जिथे कोरोना चे रुग्ण आहेत तिथे बिना मास्क फिरतोय. आशा लोकांचे पार्श्वभाग दर दोन दिवसाला सुजवावेत या मताचा मी आहे. आपल्या आजुबाजुला असलेल्या ५० जणांचे जीव धोक्यात घालणार्या असल्या लोकांमुळेच चांगल्या गोष्टीचे मातेरे होते.

Rajesh188

नडग्या फोडून काढव्यात ह्या मताचा आहे.हाडाचा चुरा झाला पाहिजे आयुष्भर कुबड्या घेतल्या शिवाय चालता आले नाही पाहिजे.पोलिस ना मोकळे रान ध्या ह्या मग्रूर लोकांना दोन मिनिटात जागेवर आणतील.

प्रसाद_१९८२

.पोलिस ना मोकळे रान ध्या ह्या मग्रूर लोकांना दोन मिनिटात जागेवर आणतील.
--

या सरकारने पोलीसांना मोकळे रान दिले आहे मात्र ते फक्त 'खंडणी' वसुल करण्याकरता.

बापूसाहेब

साहेब.. गल्ली चुकली.
त्या बाई तुमच्याच शिवसेनेच्या आहेत. तुम्हाला तयांच्या बाजूने बोलायचे आहे.. त्याचसाठी तुम्ही मिपावर जन्म घेतलयेत ना??

प्रसाद_१९८२

व्हिडीओत ती बाई म्हणतेय 'तू डॉक्टर होगा तेरे घर का',
असे शब्द वापरायला तेही या महामारीच्या दिवसात शरम कशी वाटत नाही या गुंडसेनेला. रूग्णांसाठी अहोरात्र झटणाऱ्या १३ निवासी डॉक्टरांनी राजीनामा दिला. काम खोळंबळे अन्य रुग्णांना त्रास झाला. याला जबाबदार कोण?

सुक्या

खरयं ...
असल्या झोपडपट्टी छाप लोकांकडुन काय अपेक्षा !! . शरम वगेरे दुर ची गोष्ट. .

सुक्या

चालतयं की. तुम्ही आम्ही एकच कॅटेगरी ... फक्कड कट्टा करु या . . . .

श्रीगुरुजी

ही लोकं म्हणजे गळ्यात रूमाल बांधून, हातात पावतीपुस्तक घेऊन, तोंडातला गुटख्याचा तोबरा पचकन थुंकून, होळी/गणेशोत्सव/दहीहंडी वगैरे कारण सांगून, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडून वर्गणी नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या रिकामटेकड्या उपद्रव्यांची टोळी.

चौकस२१२

ऑस्ट्रेलियाने व्हिक्टोरिया प्रांतात चीनच्या सहकार्याने उभारले जाणारे Belt and Road Initiative प्रकल्प रद्द केल्याने चीन संतापला आहे.
"नवीन शीतयुद्ध "
हे चालुच आहे ... ऑस्ट्रेलिया अमेरिकेचा स्थानिक दोस्त/ चुलत भाऊ असल्यामुळे चीन ला ह्या खेळ्या खेळाव्याचं लागतात
बार्ली निर्यात वर बंदी , वाईन निर्यात वर बंदी .. पण नसर्गिक वायू आणि खनिजे यात दोघांचे अनेक वर्षाचे "पुरवठा कंत्राट" पक्के आहेत

“१८ ते ४४ वयोगटासाठी सधन वर्गाने लस विकतच घ्यावी”

https://www.loksatta.com/mumbai-news/rajesh-tope-on-oxygen-supply-in-ma…

ज्यांनी घोटाळे केले आहेत, त्यांच्या कडून दंड आकारला तरी, महाराष्ट्र राज्यात सगळ्यांना लस फुकट मिळू शकते...

सगळ्या आमदारांनी, ठरवले तर, 10,000 कोटी एका रात्रीत उभे करणे, महाराष्ट्राला सहज सहज शक्य आहे..

'राज्य सरकार सर्व प्रकारे अक्षरशः नम्र विनंती करायलाही तयार आहे, पाया पडायलाही तयार आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार कोणतीही गोष्ट करायला तयार आहे. ऑक्सिजन उपलब्धतेचा कोटा वाटप केंद्र सरकारकडे आहे. तो त्यांनी अधिकाधिक द्यावा आणि ग्रीन कॉरिडॉरकरुन महाराष्ट्रात ऑक्सिजन उपलब्ध करुन द्यावा, अशी विनंती आम्ही केंद्र सरकारला केली आहे,' असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/rajesh-tope-appeal…

दोन गोष्टी:

१. ऑक्सिजनचे संकट निर्माण झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने तातडीने दहा प्लॅन्ट उभारायचा निर्णय घेतला. चार दिवसांपूर्वीची बातमी आहे की आठवड्यात दहा प्लॅन्ट उभे करावेत हा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला होता. बहुदा पुढील तीन-चार दिवसात ते प्लॅन्ट्स सुरू व्हावेत. https://www.indiatvnews.com/news/india/uttar-pradesh-to-set-up-10-oxyge…

अशाप्रकारे ऑक्सिजन प्लॅन्ट राज्यात उभे करावेत म्हणून राज्य सरकार प्रयत्न करत आहे का? करत असल्यास कोणते? बरं विशाखापट्टणमहून मालगाडीने ऑक्सिजन येणार तेव्हा त्या टँकरसाठी आपल्याकडे चालक कमी पडतील असे कोणीतरी म्हणाले होते ना? ती अडचण दूर झाली का?

२. राजेश टोपे या महाभकास आघाडी सरकारमधील एकमेव त्यातल्या त्यात बरा माणूस आहे असे आतापर्यंत मत होते. सतत मोदी आणि केंद्र सरकारच्या नावाने शंख करायच्या बाबतीत ते पण इतर मंत्र्यांप्रमाणेच आहेत असे दिसते.

आनन्दा

राजेश टोपे चांगला माणूस आहे असे माझे देखील आजोंर्यंत मत होते. त्याचे बोलणे मी लक्षपूर्वक ऐकायचो आणि काही प्रमाणात मनावर देखील घ्यायचो.

पण परवाची गॅस गळती त्यांनी खूपच निष्काळजीपणे हाताळली असे माझे मत झाले आहे, त्यामुळे आणि या दुसऱ्या lockdown मुळे तो कायमचा मनातून उतरला.

कॉमी

केंद्राने अचानकच महाराष्ट्राचा ऑक्सिजन पुरवठा कमी केला होता, तो पुनःस्थापित करण्याचा आदेश हाय कोर्टाने दिला.

राज्य सरकारने विदर्भात रेमीडिसीव्हीर पुरवायचा कोर्टाचा आदेश न पाळल्याने त्यांनाही सुनावले.

https://www.livelaw.in/top-stories/bombay-high-court-restores-oxygen-su…

दुसर्‍या लाटेच्या सुरवातीला महाराष्ट्रात एकूण दररोजच्या नव्या रूग्णांच्या ६०-६५% रूग्ण होते पण आता इतर राज्यांमध्येही रूग्णांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्राचा टक्केवारीत आकडा त्यामानाने आता कमी झाला आहे. अशावेळी इतर राज्येही आम्हाला ऑक्सिजन द्या ही मागणी करत असतीलच नाही का? आता उद्या छत्तिसगड सरकार तिकडच्या हायकोर्टात गेले आणि म्हटले की आम्हाला पण ऑक्सिजन हवा तर काय करायचे? भिलाईच्या कारखान्यात बनलेला ऑक्सिजन आम्ही राज्याबाहेर जाऊ देणार नाही असे छत्तिसगड सरकारने म्हटले तर?

आताची परिस्थिती अशी आहे की आपण गेल्या ७५ वर्षात आरोग्यव्यवस्थेकडे केलेल्या अक्षम्य हेळसांडीची फळे भोगत आहोत हीच सत्य परिस्थिती आहे. या परिस्थितीत योगींसारखे नेते आपल्या राज्यात नवे प्लॅन्ट लावत आहेत, गडकरी-फडणवीसांसारखे राज्याला मिळेल तिथून औषधे मिळवून देत आहेत तर महाभकास आघाडीतले लोक यापैकी काहीही न करता नुसते केंद्राकडे बोट दाखवत आहेत आणि त्याहूनही वाईट- राज्यात औषधे दमणहून विरोधी पक्षांनी आणली याचे श्रेय त्यांना मिळेल म्हणून त्या औषध कंपनीच्या मालकालाच एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे उचलून पोलिस स्टेशनमध्ये आणत आहेत.

चालायचेच.

Rajesh188

त्याचे कारण अयोग्य क्षमता नसलेला व्यक्ती पंतप्रधान पदी आहे.
महाराष्ट्र मध्ये तुमच्या दृष्टी नी नालायक सरकार आहे .पण देशातील सर्व च राज्यात गोंधळाची स्थिती आहे.
एका पण राज्यात आवश्यक गोष्टी चा योग्य पुरवठा नाही.
सक्षम केंद्र सरकार हवं असेल तर तत्काळ पंतप्रधान असलेल्या व्यक्ती ल पदावरून बरखास्त करावे राष्ट्र पती नी.
आणि योग्य व्यक्ती तिथे बसवावा.

गॉडजिला

त्याचे कारण अयोग्य क्षमता नसलेला व्यक्ती पंतप्रधान पदी आहे

माsssय. सेल्फ गोल...

प्रसाद_१९८२

सक्षम केंद्र सरकार हवं असेल तर तत्काळ पंतप्रधान असलेल्या व्यक्ती ल पदावरून बरखास्त करावे राष्ट्र पती नी.
आणि योग्य व्यक्ती तिथे बसवावा.
--

योग्य व्यक्ति कोण, राहुल गांधी ?

बापूसाहेब

त्यांच्या मनात तेच आहे.. पण उघडपणे सांगु शकत नाहीत.. !!!

:)

परमपूज्य राहुल गांधी, यांना काय वाटेल? याचे विचार पण करावा लागेल ...

कॉमी

अजूनसुद्धा संपूर्ण देशाच्या १/३ ऍक्टिव्ह केसेस महाराष्ट्रातच आहेत. हे आजिबात कमी नाही आहे.

१० प्लांट उघडले हे चांगले आहेच, पण शॉर्ट टर्म रिलीफ साठी त्याचा काय उपयोग आहे ? "इन प्लेस इन विक" म्हणतायत, पण नक्की प्रोडक्शन कधी सुरु होणार आहे ? आता या घडीला महाराष्ट्रात आठवडाभर थांबणे शक्य नाही असे हजारो पेशंट आहेत. यूपी मध्ये महाराष्ट्राच्या निम्म्या सुद्धा ऍक्टिव्ह केस नाहीत. त्यांना कदाचित तितका लिवे असेल. महाराष्ट्रात तसं नाहीये.

यूपी मध्ये महाराष्ट्राच्या निम्म्या सुद्धा ऍक्टिव्ह केस नाहीत. त्यांना कदाचित तितका लिवे असेल. महाराष्ट्रात तसं नाहीये.

इथेच काही महानुभाव म्हणत आहेत की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात सरकार नक्की आकडे लपवत आहे. त्यांच्या मते तिथे खरी परिस्थिती अशी आहे की स्मशानात मृतदेहांची रांग लागली आहे.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसर्‍या लाटेचे संकट सगळ्यात आधी महाराष्ट्रात सुरू झाले. तसे असेल तर महाराष्ट्र सरकारने सगळ्यात लवकर तयारी सुरू करायला पाहिजे होती. युपी सरकारने चार दिवसांपूर्वी ऑक्सिजन प्लॅन्टचे बांधकाम (किंवा जे काही असते ते) सुरू करायचा आदेश दिला असेल तर महाराष्ट्र सरकारने तो मागच्या महिन्यातच द्यायला हवा होता. कारण मार्चच्या २८-२९ तारखेला महाराष्ट्रात दिवसाला ४० हजार रूग्ण यायला लागले होते. युपीत जो आकडा दाखवला जात आहे त्याप्रमाणे अजूनही ४० हजार रूग्ण दिवसाला यायला लागलेले नाहीत. तरीही युपी सरकार चार दिवसांपूर्वीच ऑक्सिजन प्लॅन्टचा निर्णय घेत असेल तर इथल्या मुख्यमंत्र्यांना तसा निर्णय मागच्या महिन्यातच घेण्यापासून कोणी अडवले होते?

स्वतः काही करायचे नाही आणि सतत इतरांना नावे ठेवत राहायची.

काही पण बातम्या इथे चिकटवून तुमचे कोणी खरे समजणार नाही.
माननीय सभासदांचे असे मत आहे हो!

इथेच काही महानुभाव म्हणत आहेत की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात सरकार नक्की आकडे लपवत आहे. >>>>
ईथले काही महानुभाव अधिक दैनिक भास्कर आणी ईतर देशद्रोही वृत्तपत्रे ( भाजप शासीत राज्य आकडेवारी लपवतेय ह्याची पुराव्या सकट बातमी छापल्याने देशद्रोहीच म्हणावे लागतील) असं हवे. दुरूस्ती करून घ्या.

प्रसाद_१९८२

मग तुम्ही काय म्हणताय,
इतर राज्यातील रुग्ण ऑक्सिजन शिवाय मरु द्यायचे ? योंगीनी उ.प्र. मधे ज्याप्रकारे केंद्राकडून मदत मिळेल ना मिळेल स्वत:च ऑक्सिजन युनिट उभारायचे प्रयत्न केले/करत आहेत तसेच प्रयत्न महा वसुली आघाडी इथे का करु शकत नाही. की फक्त केंद्राकडे बोट दाखवत राहायचे?

कॉमी

केंद्र सरकारने जर ऑक्सिजन चे ऑलॉकेशन करण्याची जबाबदारी घेतली आहे तर जास्त रुग्णसंख्या असलेल्या राज्याला जास्त ऑक्सिजन मिळावा हे माझे म्हणणे आहे.

उप्र मधला प्रोजेक्ट अति शॉर्ट टर्म साठी उपयोगाचा नाही. आता चालू क्रायसिस मध्ये उठा यांनी प्लांट उघडतो म्हणलं तरी काही उपयोग नाही. चंसूकू म्हणतात त्याप्रमाणे ते आधीच व्हायला पाहिजे.

सध्या एका गोष्टीचा फार गवगवा आहे. लेखक कोण आहे, माहिती नाही. गोष्टींचं श्रेय त्यांचंच.

(महाराष्ट्रातील एका गावातील घटना)
रात्री एका गावात चोर आले होते. या चोरांनी एका दुकानातून गव्हाचे पाच गव्हाचे पोते उचलले. पाराजवळ आल्यावर जाग्यावरच ते सापडले.
गावातल्या लोकांनी रेटून हानले. आणि इचारलं, चांगल्या सुटाबुटातले दिसताय पाव्हनं. "चो-या का करता'' ?

ते म्हणतात कसे ? '' आम्हाला हानु-मारु नका, आम्ही हे गहु सकाळी गावातच वाटणार होतो''

डिस्क्लेमर : सदरील गोष्ट काल्पनिक आहे, त्याचा विरोधी पक्ष आणि फार्मा कंपनीच्या साट्यालोट्याचा काहीही संबंध नाही. तसे वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

बाकी, चालू द्या. :)

-दिलीप बिरुटे

आनन्दा

चक्क फुल टॉस टाकलाय तुम्ही?
राजेश आणि आर्मस्ट्राँग सोबत राहून गुण लागला की काय?

उपयोजक

अशा भाजपद्वेषींसाठीै एकच वाक्य पुरेसे आहे. ते वाचल्याने त्यांना मनातून वेदना होतात.
कितीही भाजपद्वेष केलात तरी २०२४ ला परत नरेंद्र मोदीच पंतप्रधान असणार आहेत. :)

टाकली नाही भाजपवर. वर त्या काळा बाजार करणार्या माणसला सोडुन दिले.

कोन तो तन्मय फडणवीस येउन २ २ लसि घेऊन जातो, त्याला अटक सोडा सधी पोलिस तक्रारही नाही.

खुशाल इन्क्वायरी करा अश्या धमक्या देत आहेत विरोधि प्क्स नेते, अन आपले ग्रुहमंत्री काय करत नाहित.

kaay chaalalay kaLena.

सॅगी

बारामतीत बिझी आहेत हो ढापलेले रेमडेसिविर वाटण्यात...

Rajesh188

तिथे मोदी चाचं चेला आहे फक्त फेकाफेक करणार पण प्रत्यक्षात काहीच करणार नाही.
सर्व बाबीत failar राज्य आहे त्याचे नका कही सांगू.
केंद्र सरकार ल कसला माज आलाय .कोर्टनी थोबाड फोडले तरी ह्यांना लाज नाही.
सर्व राज्यांना ऑक्सिजन ,औषध पुरवणे हे केंद्र सरकार काम नाही तर काय चीन सरकार चे काम आहे का.
लायक नसलेला व्यक्ती पंतप्रधान झाला की असेच होणार.
राज्य सरकार वर टीका करणारे एक वेडे आहेत किंवा '''''''.
केंद्र सरकार च्या नियंत्रणात ,अधिकारात असलेल्या वस्तू चा तुटवडा झाला तरी राज्य च जबाबदार.

कॉमी

>>सर्व राज्यांना ऑक्सिजन ,औषध पुरवणे हे केंद्र सरकार काम नाही तर काय चीन सरकार चे काम आहे का.

एकदम बरोबर. भारतातलं ७५०० मेट्रिक टन प्रतिदिन हे ऑक्सिजनचे उत्पादन आहे, ते सगळे केंद्र सरकार नियंत्रित करते (as it should be.) त्यातले ६६०० एमटी राज्यांमध्ये वाटण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. जर केंद्र सरकार ऍलोकेशन करते आहे तर ते न्याय्यच पाहिजे. तिथे रुग्णांची टक्केवारी हा एकच निकष असणार. आणि, टक्केवारी नुसार महाराष्ट्राला ऑक्सिजन सप्लाय झाला नाही, हे कोर्टाने केंद्राला सांगितले, तर इथले आयडी व्हॉट अबाऊट यूपी, व्हॉट अबाउट फलना धिकणा करतात ("चालायचंच" म्हणे.) केंद्राने महाराष्ट्राला अडचणीत टाकण्याची कामे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात आणि फक्त राज्य सरकारच्या (मान्य, खऱ्या) इनइफिशियांशी कडे बोट दाखवतात.

केंद्र सरकारचे निकृष्ट प्लॅनिंग दाखवले कि पुन्हा तेच. व्हॉट अबाऊट राज्य सरकार. अरे केंद्राबद्दल एक शब्द बोलला तर मालक येऊन कोडे मारतो का काय ?

खाल्ल्या थाळीला छेद, बसल्या फांदीला कापणे वैगेरे म्हणतात त्यातला प्रकार.

Rajesh188

दोन तास खूप झाले लग्नासाठी फक्त ब्राह्मण बोलवून नको ते विधी करत बसू नका.
त्यांना फक्त दक्षिण किती मिळेल ह्याच्या शी च देणेघेणे असतें

हे नक्की का?

बाय द वे,

इतर धर्मांत, लग्न लावायला, हिंदू ब्राह्मण चालत नाही....हे आपणांस ठाऊक असेलच ....

हा फतवा, सर्वच धर्मियांना लागू आहे, हे पण आपणांस ठाऊक असेलच...

बहुतेक आपले लग्न झाले नसावे, कारण फोटोच्या पोझेस देता देताच, एक तास सहज निघून जातो...

सुबोध खरे

पाच मिनिटात लग्न लागते

बेताल बडबड बंद करा

हिंदू विवाह कायद्याप्रमाणे कमीत कमी तीन विधी करायला लागतात त्याला बराच वेळ लागतो. अन्यथा हे विधी कायदेशीर समजले जात नाहीत.

आपल्या माहितीतील पुरोहितांना विचारून पहा.

माहिती नसताना फालतू थापा मारणे बंद करा

आता काही ते परत ह्या मुद्यावर प्रतिसाद करायला येणार नाहीत....

कॉमी

लोकडाऊन मध्ये शून्य सेकंदातच लग्न करायला परवानगी होती. तेव्हा लग्न करायला बाहेर का नाही सोडत असा प्रश्न नाही सुचला. हे नवे नियम लोकडाऊन साठीच आहेत शब्द नसला वापरला तरी.
आत्ता इतका स्प्रेड वाढतोय, लोकं ऑक्सिजन साठी रडतायत आणि ह्यांना दोन तासात लग्न कशी होतील चिंता पडलीय. नकाच लावू आत्ता लग्ने, किमान समारंभाशिवाय करा.

+ १
महाविकास आघाडी विरूध्द गळे काढायचेच असं ठरवले असल्याने काहीही मुद्दा चालतो.

Rajesh188

Noida मध्ये फिल्म city चे काम पूर्ण झाले का?
झाल्या का सिनेमाच्या शूटिंग तिथे चालू.
की अजुन जमीनच लेवलिंग च चालू आहे.
तेव्हा काय फेकत होता योगी .आम्ही यावं करू आणि tyav करू काहीच करू शकला नाही.

सॅगी

याव केलं का नी ट्याव केलं का म्हणून का विचारता? एवढीच उत्सुकता असेल तर जाऊन बघा उत्तर प्रदेशात...

...घाबरु नका... तुमची गाडी नाही पलटणार तिथे...

Rajesh188

नको त्या बातम्या,नको ते व्हिडिओ इथे पाठवत असता ना स्व राज्याला बदनाम करण्यासाठी.
तुम्हाला नोएडा फिल्मसिटी ची आताची स्थिती काय आहे ह्याची बातमी किंवा व्हिडिओ मिळत नाही का

सॅगी

स्व-राष्ट्रातील इतर राज्यांना बदनाम करत असता ना? मग स्वतःच्या राज्यात काय चाललंय हे न पाहता इतर राज्यांत वाकुन कशाला पाहायचे?

आपले स्वराज्य म्हणजे काय स्वर्ग आहे का? आणि एवढेच असेल कुतुहल तर बघा ना स्वतः काही मिळतंय का...मिपावर खडे फोडण्यात काय हशील?

धनावडे

ते राहूद्या मराठी मालिकांच्या शूटिंग गुजरात आणि गोवा ला होतायत त्याच बोला.

बापूसाहेब

ते राहूद्या मराठी मालिकांच्या शूटिंग गुजरात आणि गोवा ला होतायत त्याच बोला

अर्थातच ते सर्व महाराष्ट्र द्रोही आहेत..

अमर विश्वास

अहो ते त्यांची वीस हजाराची स्कुटर घेऊन जाणार पालटायचा मुद्दाच नाही

Rajesh188

तिथे जमिनी चे लेवलींग तरी झाले आहे का?
काम च चालू झाले नसेल.
काही पण बातम्या इथे चिकटवून तुमचे कोणी खरे समजणार नाही

मग बोला ...

साधं समुद्रातून Enron बाहेर काढायला पण 2-3 वर्षे लागलीच की...

अमर विश्वास

मुवि जी ...

ती रिबेका बाई थोरल्या साहेबांना भेटली (हल्ली त्यांना हिंदू हृदयसम्राट म्हणायचं नाही हां ... काकासाहेबांना राग येतो)

भेट झाल्याझाल्या Enron टुन्नदीशी उडी मारून बाहेर आले कि हो ...

श्रीगुरुजी

काहीतरी 'अर्थ'पूर्ण चर्चा झाल्यानंतरच तुकाराम महाराजांच्या गाथेप्रमाणे सागरतळाशी विराजमान झालेलं एनरॉन उसळी मारून बाहेर आलं.

कपिलमुनी

भाजप लोणी खाण्यात भागीदार होतेच !
नाणार प्रकल्पासाठी फ'वीस झुकलेच की.

जसे जैतापूर

आता, नाणार आणि जैतापूर बाबत पण कुणीच बोलत नाही ..

प्रसाद_१९८२

उभी करायला किती वर्षे लागली हो ? तुम्ही सर्वज्ञानी आहात म्हणून विचारतोय !
बाकि योगींनी गेल्यावर्षीच फिल्मसिटीची घोषणा केली होती. आणि एका वर्षात फिल्मसिटी उभारणे हे काय 'खंडणी' वसुली इतके सोपे काम वाटले की काय तुम्हाला ?

Rajesh188

रामोजी फिल्म सिटी च्या दर्जा ची फिल्मसिटी उभारता येईल का .
काही ही अपेक्षा ठेवताय.
चार पत्रे मारून दोन चार studio बांधले तरी खूप झाले

सॅगी

उधोजी फिल्म सिटी बद्दल बोलताय का?

बापूसाहेब

अरे वा.. इतके confidently सांगताय..

याआधी जितक्या फिल्म सिटी बनवल्या त्यात कीती खाल्ले मग??

श्रीगुरुजी

कोरोऊ विषाणू निर्मिती, लग्नसमारंभ, नॉएडा चित्रनगरी, ऑक्सिजन पुरवठा, जागतिक आरोग्य संस्था . . . विषय कोणताही असला तरी अधिकारवाणीने सर्व विषयात आपली पाजळणे व हसू करून घेणे, हे काही जणांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अशा ज्ञानवंतांच्या पिचकाऱ्यांना, डावा हात कानावर ठेवून आणि उजवा तळवा पुढे पसरून जी जी रं जी जी रं जी जी जी म्हणत अनुमोदन देत राहणे, हे सुध्दा काही जणांचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

महापालिकेच्या मूषकसंहार विभागात असे ज्ञानवंत आढळतात अशी पुलंनी नोंद केली आहे.

Rajesh188

स्व राज्याला बदनाम करणाऱ्या लोकांची मानसिकता काय आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.
मालकास खुश ठेवण्यासाठी किती ही खालच्या पातळीवर येणारी वृत्ती आहे ही.
१) व्हायरस चीन नी बनवला.
हे गुरुजी ना कोणी सांगितले कुठे वाचलं ह्यांनी.
विवेक मध्येच वाचले असेल.

अमर विश्वास

अहो १८८ .. ते तुम्ही तुमच्या साहेबांकरवी WHO ला सांगणार होता ना ऍक्शन घ्यायला ?

Rajesh188

पण गुरूजी कन्फर्म उत्तर च देत नाहीत.
त्याच्या उत्तराची च वाट बघतोय.

श्रीगुरुजी

बुधाग्रे न गुणान् ब्रुयात् साधु वेत्ति यत: ।
स्वयम् मूर्खाग्रेपि च न ब्रुयाद्धुधप्रोक्तं न वेत्ति स: ।।

अर्थ - बुद्धिमानांना ज्ञान देऊ नका कारण ते त्यांना आधी पासूनच माहिती असते. मुर्खांना सुद्धा ज्ञान देऊ नका कारण ते त्यांना समजणार नाही.

....नितीन गडकरींच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्राला दररोज ९७ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन मिळणार! .....

https://www.loksatta.com/maharashtra-news/due-to-the-efforts-of-nitin-g…

आता काही बोलण्यासारखे उरलेले नाही...

प्रसाद_१९८२

९७ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचा साठा केल्याबद्दल श्री नितीन गडकरींची चौकशी महावसुली आघाडी कधी करणार ते आता पाहायचे. बाकी रेमेडेसीवीर इंजेक्शन महाराष्ट्राला पुरवल्याबद्दल फडणवीसांची चौकशी करणार होते सरकार, त्याचे काय झाले.

वामन देशमुख

हे सगळे प्रतिसाद वाचून वाटतं, मिपाची खरंच अधोगती झालीय.

कारण, एके काळी, एक मिपाकर वीस लाखांचा ट्रक घेऊन काही काळ फिरत होता, आता एक मिपाकर (तोच की वेगळा, माहित नाही) सध्या वीस हजारांची स्कूटर घेऊन फिरत आहे.

;)

अमर विश्वास

वामनराव ...

मिपा ची अधोगती .. लाखाचे बारा .. आपलं वीस हजार ..

हसून हसून फुटलो ...

श्रीगुरुजी

बापरे, हसून हसून पोट दुखायला लागलं.

राफेल विमान सुद्धा ३०-४० हजारात बनतं, पण फ्रान्स सरकार ते १५०० कोटींना विकतंय.

इरसाल

राफेल विमान सुद्धा ३०-४० हजारात बनतं,
इतकं महाग ...............

Rajesh188

स्कूटर विक्री पद्धती मधील सर्व supply चैन मध्ये असणाऱ्या लोकांचे कमिशन बाजूला काढले तर स्कूटर ची किंमत जवळपास अर्धी होईल इतके सामान्य ज्ञान समस्त विद्वान मंडळी ना नसावे ह्याचा खेद वाटत आहे.

अमर विश्वास

स्कुटर ही मॅन्युफॅक्चरर कडून डायरेक्ट डीलर कडे येते ...

बाकी कोणीही मिडिल मॅन नसतो ...

ज्या विषयातलं आपल्याला कळत नाही (खरतर सगळ्याच) त्यावर बोलू नये

सुक्या

तुम्हाला काय माहीती आहे हो? १८८ बोलतात तेच (फक्त तेच) खरे असते .. हवं तर विचारा आर्मस्ट्रोंग साहेबांना.
तुम्हालाच काही कळत नाही. महर्षी व्यासांनंतर १८८ च सर्वज्ञानी आहेत ...

Rajesh188

Dealers चे एका स्कूटर मागे किती कमिशन असते ह्याची पण माहिती घ्या.
आणि उत्पादन करणारी कंपनी एका स्कूटर मागे किती निव्वळ नफा कमावते ही पण माहिती घ्या.
नंतर निष्कर्ष काढा.
Dealer लोक एवढे भांडवल गुंतवता ते किरकोळ फायदा होण्यासाठी नाही प्रचंड फायदा होण्यासाठी च असतो.
२५ हजाराच्या वर स्कूटर चा निर्मिती खर्च कधीच निघणार नाही.

सुबोध खरे

एक मिपाकर वीस लाखांचा ट्रक घेऊन काही काळ फिरत होता, आता एक मिपाकर (तोच की वेगळा, माहित नाही) सध्या वीस हजारांची स्कूटर घेऊन फिरत आहे.

अरेरे

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ? ....

आपलं ते मिपा. ~~~~

कोरोना : या महाभयंकर कोरोनाकाळातही पश्चिम बंगालची निवडणूक प्रतिष्ठेची बनवून मागील शनिवारी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकीय सभा घेतली. त्यात ते म्हणाले की, "मी आजपर्यंत इतकी अफाट गर्दी कधी पाहिली नव्हती." मोदींचं वाक्य हे नेहमीचं असलं तरी, महत्वाची बाब ही की, व्यासपीठवरून भाषण देताना त्यांच्या तोंडावर 'मास्क' नव्हता. याच दिवशी देशभरात २ लाख ३४ हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली आणि...

https://www.pudhari.news/news/National/The-system-just-collapsed-India-…

कॉमी

निर्लज्जपणा आहे.
५०० लोकांची तरी रॅली घेणारंच म्हणतायत.

काही पण बातम्या इथे चिकटवून तुमचे कोणी खरे समजणार नाही.
माननीय सभासदांचे असे मत आहे हो! सत्य असले तरी!!

Rajesh188

त्याला फक्त bjp हा पक्ष जबाबदार आहे.
१) योग्य वेळी अंतर राष्ट्रीय प्रवासी वाहतूक बंद केली नाही.
त्या मुळे जग भरातून हाजारो लोक व्हायरस घेवून भारतात आली .
जिथे जास्त उतरले दिल्ली,मुंबई त्याच ठिकाणी जास्त प्रसार झालं
२) स्वा स्वार्थ साधण्यासाठी आणि मित्रांच्या कल्याणासाठी विवादित कायदे गुपचूप पारित केले त्या मुळे lockdown मध्ये सुद्धा जीवावर उदार होवून लोकांना रस्त्यावर उतरावे लागले.
त्या मुळे रोगप्रसार वाढला.
३) साथीच्या रोगाच्या काळात निवडूनिकी ची पद्धत बदलण्याची गरज होती.टीव्हीवरून प्रचार आणि खूप काळजी घेवून मतदान घेणे गरजेचे होते.
ह्यांनी लाखो च्या सभा आणि प्रचार यात्रा काढल्या .
देशात त्या मुळेच corona च प्रसार मोठ्या प्रमाणात झालं
.
४) कुंभमेळा ह्या वर्षी झालाच नव्हता पाहिजे होता.
पण अंध श्रद्धाळू लोकांची लाखो ची गर्दी जमवली आणि त्या मुळेच कोरोणा चा मोठा उद्रेक देशात झाला
फक्त ह्या राजकीय पक्ष मुळे देश संकट मध्ये आला.किती तरी लोक जीवाला मुकली.

“भीक मागा, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, उच्च न्यायालयाचा मोदी सरकारला उद्विग्न सल्ला!

https://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-high-court-takes-dig-at…

सामना ला शिव्या घालून झाल्या असतील तर ईथे या आता लोकसत्ता ला शिव्या घालूयात.

काही पण बातम्या इथे चिकटवून तुमचे कोणी खरे समजणार नाही.

Rajesh188

कोर्टनी किती ही फटकारले तरी निर्लज्ज लोक सुधारणार नाहीत.
आणि त्यांचे पाठीराखे म्हणजे वेगळेच रसायन आहे.
त्यांना फक्त मालकाच्या चरणाशी बसायची सवय आहे.
मेंदूच्या जागेवर मोदी चा फोटो असणार ह्यांच्या खोपडी च्या आत.

प्रसाद_१९८२

“भीक मागा, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, उच्च न्यायालयाचा मोदी सरकारला उद्विग्न सल्ला!
--

सध्या देशात ऑक्सिजनचा जो साठा उपलब्ध आहे, सरकार तो द्यायचा प्रयत्न करत आहे राज्यांच्या कोट्यानुसार. सरकार काही गप्प बसले नाही. शिवाय दिल्लीतील दलाल व अडत्यांच्या आंदोलना पाठून, लिब्रांडूनी ज्या अदानी-अंबानीला शिव्या घातल्या त्यांचे मोबाईल टॉवर तोडले ते देखील त्यांच्या क्षमतेनुसार देशात ऑक्सिजन पुरवठा करत आहेत.

सॅगी

आता अंबानींचे ऑक्सिजन सिलिंडरही तोडणार का?

Rajesh188

लोकांची सर्व संपत्ती लुटून मित्रांना द्यायची आहे हे माहीत आहे सर्वांस.त्या मुळे सिलिंडर तोडून तुमच्या मित्रांचे नुकसान नाही करणार.

सॅगी

टॉवर तोडताना ही अक्कल कुठे गेली होती म्हणायची??

Rajesh188

त्यांनीच देशाला संकट काळी मदत केली आहे.अदानी ,अंबानी नी ऑक्सिजन दिला असला तर देशाची संपत्ती लिहून घेतली असेल तारण म्हणून.
आता विक्री बाजार चालू च आहे पहिल्या सरकार नी कष्टांनी उभ्या केलेल्या कंपन्या ,बँका,संस्था किरकोळ किमतीत त्यांनाच मिळणार आहेत.शेठ नी शब्द च दिला आहे.
फक्त रतन टाटा ह्या महान व्यक्ती नी देशाला खूप मदत केली आहे.देव नसेल बघितला तर टाटा ना बघा देव त्यांच्यात दिसेल.

“भीक मागा, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, उच्च न्यायालयाचा मोदी सरकारला उद्विग्न सल्ला!

हे मराठी माध्यमांमध्ये वाचल्यावर खरोखरच हसावे की रडावे हे कळेना. इंग्लिशमध्ये काहीही करून एखादी गोष्ट उपलब्ध करून द्या याला 'बेग, बॉरो ऑर स्टिल' हा वाक्प्रचार आहे. तो वाक्प्रचार शब्दशः घ्यायचा नसतो. न्यायालय सरकारला (किंवा कोणालाही) चोरी करा हा आदेश देईल का? समजा एखाद्या आंदोलनात वगैरे सरकार आणि आंदोलक यांच्यात बोलणी होत नसतील तेव्हा 'द गव्हर्न्मेंट शुड ब्रेक द आईस' असे म्हटले तर हे दिव्य पत्रकार/ वार्ताहर/ संपादक किंवा जे कोणी असतील ते 'न्यायालयाने मोदी सरकारला बर्फ फोडायचा आदेश' अशी बातमी देणार का?

नक्की कोण लोक अशा ठिकाणी कामाला असतात?

Rajesh188

चोरी करा,दरोडे टाका पण ऑक्सिजन उपलब्ध करा ह्याचा अर्थ चोरी करा असा कोणी घेत नाही
शक्य ते सर्व प्रयत्न करा असाच त्याचा अर्थ घेतला जातो.

वामन देशमुख

आजचा गृहपाठ:

any Tom, Dick or Harry याचे मराठी भाषांतर आणि वाक्यात प्रयोग करा पाहू.

अर्थात, वर इंग्लिशमध्ये लिहिलेले सर्व शब्द एकत्र वापरा, मधलाच एखादा शब्द वेगळा काढून तो वापरू नका!

;)

कॉमी

विशेषनामाचे भाषांतर होत नसते. त्यामुळे उत्तर-
कोणीही टॉम, डिक किंवा हॅरी

बबन ताम्बे

पॅपिलॉन या प्रसिद्ध कादंबरीच्या मराठी भाषांतरात एक वाक्य आहे ..." त्याने अर्ध्या नोटा फाडल्या..."
मी कॉलेजमधे असताना हे मराठी पुस्तक वाचले (अजूनही इंग्लिश पुस्तकाच्या वाटेला जात नाही :-) ), आणि माझ्या इंग्लिश मेडियमच्या मित्राला विचारले हे असे काय लिहिलेय, अर्ध्या नोटा फाडल्या वगैरे... त्याने कपळाला हात मारला आणि म्ह्टला, मुळ पुस्तकात ते वाक्य आहे , " He cut the amount into half .."

Rajesh188

हरियाणा मध्ये सुद्धा उद्धव ठाकरे चेच सरकार आहे.

बिजेपी शासीत राज्य असेल तर आम्ही मूग गिळून गप्प बसतो. फक्त महाराष्ट्रावरच बोलतो. (आणी पासे केंद्राला पाठवतो ज्याचा हिशेब मिळत नाही)

आज बंगालमध्ये सहाव्या फेरीसाठी मतदान झाले. संध्याकाळी साडेपाच पर्यंत ७९% मतदान झाले अशा बातम्या आहेत.

बंगालमध्ये ८०-८५% मतदान होणे ही काही नवलाईची गोष्ट नाही. सामान्य परिस्थितीत बहुतेक मतदारसंघात असे भरपूर मतदान होत असते. पण सध्याच्या कोरोनाच्या काळातही तितकेच मतदान होत आहे हे लक्षणीय आहे. आता २६ आणि २९ तारखेला ६९ जागांसाठी मतदान होणार आहे.

सध्याच्या कोरोनाच्या काळातही तितकेच मतदान होत आहे हे लक्षणीय आहे. >>>>
जिंथए नेतेच लाज लज्जा सोडून लाखांच्या रॅली काढताहेत तिथे लोक कोरनाला न घाबरता मतदानाला बाहेर पडले ह्यात काहीच लक्शनीय नाही.

माहिती बद्दल धन्यवाद....

थोडक्यात, ह्या राज्यातील जनता, स्पष्ट बहुमत देऊन, सरकार निवडून आणते, असे वाटते..... उगाच युती वगैरेची भानगड नाही ...किंवा ढकलंपंचीचे राजकारण करायची गरज पण नाही....

धाग्याची विक्रमाकडे वाटचाल. बारा तासाचा आत तब्बल ११० अधीक प्रतिसाद. ह्याबद्दल श्रिगुरूजींच्या नावाची मिपाच्या गिनीज बूकात नोंद व्हायला हवी. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार ही व्हायला हवा. ( मुख्यमंत्री गुजरात किंवा युपीचे :))

श्रीगुरुजी

यात एका महानुभाव सदस्याच्या अत्यंत निर्रथक व अज्ञानी प्रतिसादांचा आणि अशा प्रत्येक यझ प्रतिसादाला डावा हात कानावर ठेवून आणि उजवा तळवा पुढे पसरून जी जी रं जी जी रं जी जी जी म्हणत अनुमोदन देणाऱ्या एका दुसऱ्या महानुभावाचा सिंहाचा वाटा आहे.

Rajesh188

गुरू जी आणि टीम कडे उत्तर देण्यासारखे काही नसले की मग ते असल्या कमेंट करत असतात.
COVID व्हायरस चीन नी बनवला असे तेच लिहतात ( हा खरे तर खूप मोठा शोध आहे) आणि आम्ही कन्फर्म करण्यासाठी ( कन्फर्म ह्या साठी करत होते एवढ्या मोठ्या शोधाचे जनक आपलेच मिपाकर आहेत म्हणून त्यांचे कौतुक करायचे होते)त्यांना तोच प्रश्न परत विचारला की उत्तर च देत नाहीत.
आणि आमचीच बुध्दी मत्ता काढतात.

हे तर अतिशय चुकीचे आहे...

परमपूज्य राहूल गांधी, यांच्या चेल्यांच्या बुद्धीचे मोजमाप करत बसू नये...

Rajesh188

लग्नाला पंचवीस माणसे बोलवू की पाचशे असले प्रश्न ज्यांना पडतात त्यांचे बुध्दी चे तेज तेव्हाच दिसते.डोळे दिपून जातात.

दोन तासांत लग्न कसे करावे? आणि 25 माणसांतच, ते कसे करावे? हे प्रश्र्न सामान्य माणसाला पडावेत, इतके भरीव काम, ह्या सरकारच्या पदाधिकार्यांनी केले आहेच...

सरकारच्या पदाधिकारी वर्गाला वेगळा न्याय असेल तर, आमच्या सारख्या सामान्य माणसाची मती कुंठीत होणारच ना?

Rajesh188

लग्नाला पंचवीस माणसे बोलवू की पाचशे असले प्रश्न ज्यांना पडतात त्यांचे बुध्दी चे तेज तेव्हाच दिसते.डोळे दिपून जातात.

बापूसाहेब

लग्नाला पंचवीस माणसे बोलवू की पाचशे असले प्रश्न ज्यांना पडतात त्यांचे बुध्दी चे तेज तेव्हाच दिसते.डोळे दिपून जातात

महामारी का तेजीत आहे, सरकार काय करतेय इ प्रश्न बाजूला ठेवू..

पण आत्ताची परिस्थिती पाहता राजेश जी यांचे म्हणणे योग्य आहे.
+188

दोन तासांत लग्न कसे करावे? आणि 25 माणसांतच, ते कसे करावे? हे प्रश्र्न सामान्य माणसाला पडावेत, इतके भरीव काम, ह्या सरकारच्या पदाधिकार्यांनी केले आहेच...

सरकारच्या पदाधिकारी वर्गाला वेगळा न्याय असेल तर, आमच्या सारख्या सामान्य माणसाची मती कुंठीत होणारच ना?

श्रीगुरुजी

आम्ही कन्फर्म करण्यासाठी ( कन्फर्म ह्या साठी करत होते एवढ्या मोठ्या शोधाचे जनक आपलेच मिपाकर आहेत म्हणून त्यांचे कौतुक करायचे होते)त्यांना तोच प्रश्न परत विचारला की उत्तर च देत नाहीत. आणि आमचीच बुध्दी मत्ता काढतात.

अज्ञः सुखमाराध्यः सुखतरमाराध्यते विशेषज्ञः ।
ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्मापि तं नरं न रञ्जयति ॥