काथ्याकूट

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ६)

Primary tabs

ऑस्ट्रेलियाने व्हिक्टोरिया प्रांतात चीनच्या सहकार्याने उभारले जाणारे Belt and Road Initiative प्रकल्प रद्द केल्याने चीन संतापला आहे.

https://www.bloomberg.com/news/articles/2021-04-21/australia-cancels-st…

इस्लाम संस्थापक महंमदाचे व्यंगचित्र फ्रान्समधील चार्ली हेब्दो या साप्ताहिकाने प्रसिद्ध केले होते व फ्रान्स सरकारने त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने धर्मांधांसमोर लोटांगण घालून फ्रान्सच्या पाकिस्तानातील राजदूताची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव संसदेत आणला आहे. याच्या निषेधार्थ फ्रान्सने पाकिस्तानातील आपले १५ राजनैतिक अधिकारी परत बोलाविले आहेत.

https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/world-news/france-r…

श्रीगुरुजी

भतृहरीने लिहिलेल्या या श्लोकाचा अर्थ -

एकवेळ अज्ञानी व्यक्तीला समजावून सांगणे सोपे आहे, ज्ञानी व्यक्तीला तर समजावून सांगणे अजून सोपे आहे, परंतु ब्रह्मदेव सुद्धा अल्पज्ञानी किंवा मूढ व्यक्तीला समजावून सांगू शकणार नाही.

आनन्दा

चिनी व्हायरस जर चीन ने बनवला असेल तर चिनी माती पण चीनचा बनावट असेल, नाही का?

करोना व्हायरस चिनी नाही तर मग काय इटालियन आहे का? चीन ने बनवला असे कुठे म्हणाले गुरुजी? उगाच आपलं आहे म्हणून बोलायचं?

Rajesh188

ह्याच धाग्याचे पहिल्याच प्रतिसादात आदरणीय श्री गुरुजी दुसऱ्या para मध्ये काय लिहतात ह्याचे वाचन करावे.
अगदी स्पष्ट शब्दात आदरणीय श्री गुरुजी नी corona व्हायरस चीन नी बनवून ( बनवून ह्या शब्दाचा अर्थ काय आहे हे तुम्हास माहीत च असेल)जगात पसरवला असे स्पष्ट शब्दात lihle आहे.
कृपया त्याचे वाचन करावे .
आणि आमच्या सारख्या सामान्य लोकांवर कृपा आणि कृपा दृष्टी ठेवावी.

Rajesh188

चीन नी व्हायरस बनवला हे नक्की कन्फर्म आहे का.
तुम्ही तसे lihle आहे म्हणून कन्फर्म करतोय.

सुक्या

ते यझ प्रतिसाद आजकाल मी वाचत पण नाही. "पाया पडतो पण प्रतिसाद देउ नका" असे म्हणायची पाळी आली आहे.

श्रीगुरुजी

कोणाविरूद्ध किंवा कोणाच्याही बाजूने असले, कोणताही विषय असला तरी सर्व प्रतिसाद यझच. उदाहरणार्थ - २० हजारात स्कूटर.

Rajesh188

यझ ह्या शब्द समूहाचा विस्तारित अर्थ येथील भाषा पंडित देतील का?
आम्हा भाषा दुर्बलता असलेल्या पामरा ना त्याचा अर्थ लागत नाही.
यझ हा शब्द मीपा ची प्रतिष्ठा नक्कीच वाढवत असावा असा आमचा समज होत आहे.
कारण येथीलच विद्वान आणि mipa च्या दर्जाची काळजी असणारे सज्जन लोक हा शब्द
वापरत आहेत.
तरी कृपया त्या शब्दाचा विस्तारित अर्थ द्यावा.

“शिवसेनेच्या आमदार, महापौरांनी पात्र नसताना लस घेतली, त्याचं आधी बोला”

https://www.loksatta.com/maharashtra-news/tanmay-fadanvis-social-media-…

आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का, असेही काही टक्के जनता म्हणणारच...

कॉमी

केंद्र सरकारने १६२ ऑक्सिजन प्लँट उघडणार म्हणून ऑक्टोबर २०२० ला घोषणा केली होती, त्यातले आज केवळ ३३ चालू झाले आहेत. टेंडर प्रोसेस मध्ये तब्बल ८ महिने लावले आहेत.

आणि त्यातला १ (आकडी १) फक्त महाराष्ट्रात चालू झाला आहे.

१६२ पैकी किमान १०-१५ महाराष्ट्राला अलोकेट केले असतील असा तर्क व्हॅलीड असावा. ह्यातला केवळ एक बांधला गेला. मग यात केंद्राचे फेल्युअर नाही काय ? आणि, राज्य सरकार केंद्रावर विसंबून होती, असे का म्हणू नये ?afterall हे केंद्र सरकारने बांधले जातील असे कळवलेले प्लॅन्टस आहेत.

चंद्रसूर्यकुमार, स्टेट गव्हर्नमेंटला कळायला हवं हे ठीक. पण केंद्र सरकारला महाराष्ट्र सेकंड वेव्हचा हॉटबेड असणार हे माहित नसावे ? दिल्लीत सुद्धा केंद्र असून ८ पैकी १ च बांधून झाले आहे. आणखी एक हॉटबेड. मागच्या वेव्हला दिल्लीत काय झाले वेगळे सांगणे न लगे.

स्क्रोल ने ऑन ग्राउंड रिपोर्टींग करून लिस्ट मधल्या हॉस्पिटल्स पैकी अनेक ठिकाणी ऑक्सिजन उत्पादन नाही आहे असे वृत्तांकन केल्यावर हेल्थ डिपार्टमेंटने ह्यातले (१६२) पैकी ३३ चालू झाले आहेत, आणि ४९ एप्रिल संपेपर्यंत तर ८८ मे
संपेपर्यंत असे क्लॅरिफाय केले.

https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/delhis-oxygen-plan…

https://scroll.in/article/992537/india-is-running-out-of-oxygen-covid-1…

https://www.business-standard.com/article/current-affairs/covid-19-162-…

कॉमी

मग चंद्रसूर्यकुमार महाराष्ट्राने दोन तीन महिण्याआधी ऑक्सिजन प्लँट बांधण्याची अपेक्षा कसे करतात ?

Rajesh188

चार पाच दिवसात च बांधणार आहेत असे दावे करायला पण हे कमी करणार नाहीत.

मग चंद्रसूर्यकुमार महाराष्ट्राने दोन तीन महिण्याआधी ऑक्सिजन प्लँट बांधण्याची अपेक्षा कसे करतात ?

तुम्हाला काही गोष्टी समजत नाहीत की समजून घ्यायच्या नाहीत हे कळायला मार्ग नाही. की स्क्रोलच्या लिंका देणारे कॉमी म्हणजे दुसरी कसली अपेक्षा करायची नाही?

उत्तर प्रदेशात योगींच्या सरकारने जे ऑक्सिजन प्लॅन्ट उभारायचा आदेश दिला आहे ते प्लॅन्ट स्थानिक पातळीवरील मोठ्या रूग्णालयांमध्ये आहेत. लखनौमध्ये अशाच एका हॉस्पिटलमध्ये चार दिवसांपूर्वी ऑक्सिजन प्लॅन्ट सुरू झाला अशी बातमी वाचली. हॉस्पिटलमध्ये चार दिवसात प्लॅन्ट उभारला जात असेल तर त्याची क्षमता फार नसणार- ते हॉस्पिटल (आणि कदाचित आजूबाजूची लहान हॉस्पिटल्स) यांची मागणी पूर्ण करण्याइतकाच हा प्लॅन्ट मोठा असेल याचा अंदाज करता येत नाही? ज्या प्लॅन्टच्या कामासाठी सरकारी पातळीवर कंत्राटे काढून निविदा वगैरे मागवली जातात त्या प्लॅन्टशी या लहान प्लॅन्ट्सची कशी तुलना करता येईल?

अर्थात स्क्रोल वाचत असाल तर असे प्रश्न तुम्हाला कधी पडायचेच नाहीत. असो.

इंडिया कॉफी हाऊसमध्ये बसून फुकाच्या विचारवंती गप्पा झोडणार्‍या रिकामटेकड्यांच्या गटाचा अध्यक्ष आणि अमेरिकेचा अध्यक्ष यांची पण त्या न्यायाने तुलना व्हायला हवी. दोघांच्याही पदाच्या नावात 'अध्यक्ष' आहे ना? ज्या न्यायाने 'ऑक्सिजन प्लॅन्ट' या आधारावर तुलना केली जात आहे तद्वतच एखादा अर्धवट दाढीची खुंट वाढवलेला झब्बा-लेंगा घालणारा झोळीधारक रिकामटेकडा आणि जो बायडन यांची तुलना व्हायला हरकत नसावी.

कॉमी

तणतणाट तो पण नुसतं रूपक देऊन.
शांत व्हा, शांत पणे बोला

कॉमी

उत्तरे सुद्धा कोणता पेपर, कोणता आयडी ह्यांच्या रेफरन्स शिवाय सरळ देता येत नाहीत. स्क्रोल सोडा, आणखी लिंक पण दिल्यात. स्क्रोल ने फॅक्ट दिलेत ते वाचा, कोणता पेपर वैगेरे कशाला उचापती चौकश्या. त्यानंतर हेल्थ मिनिस्टरनेच मान्य केलय ना 33च प्लांट तयार आहेत म्हणून. किमान डिसेंसी ने उत्तरे सुद्धा देता येत नाहीत, उत्तरे सापडत नसली कि उर्मटपणा करताय.

हे सगळे अंदाज पंचे केंद्र सरकारच्या फायद्यावेळीच होते वाटते. केंद्र सरकार/ योगी असले की हे प्लांट लहान ते मोठे असा अंदाज लावला जातो. काय आधार आहे तुमच्या अंदाजाचा ? ते १६२ प्लांट सुद्धा हॉस्पिटलातच बसवणार होते.

सरकारी कामांमध्ये सगळीकडेच निविदा लागतो. मग लहान का असेना ते काम.

कॉमी

योगीच्या प्लॅन्टस ची आणि केंद्राच्या प्लांटच्या कपॅसिटी ची ठाशीव माहिती सुद्धा नाही, आणि किती तो अविर्भाव आणताय.

तुम्ही नीट माहिती समोर आणून ठेवा, जर खरेच तुम्ही म्हणता तसे असते तर मी माझे मत बदलले असते आणि इथे ते सांगितले पण असते. मी तुमच्यासारख्या सोअर लुझर नाही.

कॉमी

मी स्वतः रुग्ण कल्याण समिती आणि ग्रामीण रुग्णालयाचे काम जवळून तपासले आहे. ५००० रुपयांच्या प्रत्येक खरचाला निविदा लागते. वाटल्यास NRHM गाईडलाईन तपासून पाहा.

आणि कितीका लहान असेना, पण पूर्ण ऑक्सिजन प्लॅन्ट ला निविदा लागत नाही असे शक्यच नाही. तुमच्या गेसवर्क खेरीज आणखी काही असल्यास सांगावे.

कॉमी

धन्यवाद. ऑक्सिजन सारख्या इमर्जन्सी गोष्टीत निविदा नाही असे असू शकते. इथे मी चुकत असू शकतो.
२४ तासात १२ होत असतील आणि योगीचे आठवड्याभरात १०, म्हणजे योगी यांचे प्लँट काही पुण्यातल्या कपॅसिटी इतके लहान नसावेत , आणि मोठेच असावेत. माझा आक्षेप चंद्रसूर्यकुमार ह्यांनी इतक्या अभिनिवेशाने त्यांचे स्पेक्युलेशन मांडावे यावर होता.

सुक्या

प्लँट बांधण्याचे जाउ द्या ...
तसा प्रयत्न तरी केला आहे का? म्हणजे टेंडर प्रक्रिया सुरु करणे , किंवा टेंडर बायपास करुन दायरेक्ट काम देणे ...
केंद्राने ३३ तरी सुरु केले .... राज्य सरकार ने काय केले .. ?

कॉमी

https://www.misalpav.com/comment/1104139#comment-1104139
महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न कमी पडले आहेत हे मान्य आहे. पण त्यांनी अगदीच काही केलं नाही असं वाटत असेल तर तुमचा गैरसमज आहे. महाराष्ट्रात पण स्टील प्लॅन्ट मधून मेडिकल वापरासाठी ऑक्सिजन जनरेट केला जातोय, वर नावातकायआहे यांनी बातमी दिली आहे ती पहा

केंद्राने अश्वासीत केलेले प्लॅन्ट बांधले नाहीयेत ह्याकडे दुर्लक्ष कसं करू शकतो? जर राज्य सरकार (सगळीच.) यावर विसंबून होती म्हणलं तर ? योगींनी सुद्धा चार दिवसांपूर्वी निर्णय घेतला. का ? उत्तरप्रदेशात सुद्धा केंद्राने एकच प्लॅन्ट बांधला आहे, किमान ५+ तरी प्लॅन केले असताना.

साहना

टेंडरचे जाऊ द्या हो. किमान उद्योगजगताला आवाहन तरी केले आहे काय ?

कॉमी

ह्या प्रतिसादाकडे तर साफ दुर्लक्ष केलं म्हणायच
इकडे पण बघा

कॉमी

केंद्र सरकारने १६२ ऑक्सिजन प्लँट उघडणार म्हणून ऑक्टोबर २०२० ला घोषणा केली होती, त्यातले आज केवळ ३३ चालू झाले आहेत. टेंडर प्रोसेस मध्ये तब्बल ८ महिने लावले आहेत.

आणि त्यातला १ (आकडी १) फक्त महाराष्ट्रात चालू झाला आहे.

१६२ पैकी किमान १०-१५ महाराष्ट्राला अलोकेट केले असतील असा तर्क व्हॅलीड असावा. ह्यातला केवळ एक बांधला गेला. मग यात केंद्राचे फेल्युअर नाही काय ? आणि, राज्य सरकार केंद्रावर विसंबून होती, असे का म्हणू नये ?afterall हे केंद्र सरकारने बांधले जातील असे कळवलेले प्लॅन्टस आहेत.

चंद्रसूर्यकुमार, स्टेट गव्हर्नमेंटला कळायला हवं हे ठीक. पण केंद्र सरकारला महाराष्ट्र सेकंड वेव्हचा हॉटबेड असणार हे माहित नसावे ? दिल्लीत सुद्धा केंद्र असून ८ पैकी १ च बांधून झाले आहे. आणखी एक हॉटबेड. मागच्या वेव्हला दिल्लीत काय झाले वेगळे सांगणे न लगे.

स्क्रोल ने ऑन ग्राउंड रिपोर्टींग करून लिस्ट मधल्या हॉस्पिटल्स पैकी अनेक ठिकाणी ऑक्सिजन उत्पादन नाही आहे असे वृत्तांकन केल्यावर हेल्थ डिपार्टमेंटने ह्यातले (१६२) पैकी ३३ चालू झाले आहेत, आणि ४९ एप्रिल संपेपर्यंत तर ८८ मे
संपेपर्यंत असे क्लॅरिफाय केले.

https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/delhis-oxygen-plan…

https://scroll.in/article/992537/india-is-running-out-of-oxygen-covid-1…

https://www.business-standard.com/article/current-affairs/covid-19-162-…

प्रदीप

दुवे दिल्याबद्दल धन्यवाद. दुवे तपासल्यावर काही दिसते ते असे:

केंद्र सरकारने १६२ ऑक्सिजन प्लँट उघडणार म्हणून ऑक्टोबर २०२० ला घोषणा केली होती, त्यातले आज केवळ ३३ चालू झाले आहेत. टेंडर प्रोसेस मध्ये तब्बल ८ महिने लावले आहेत.

टेंडर उघडण्याची तारीख होती ११ नोव्हेंबर. तेव्हापासून आतापर्यंत ५ महिने होतात, ८ नव्हे. बाबूशाहीच्या अखत्यारीत हे म्हणजे काहीच नाही. तरीही सध्याची परिस्थिती पहाता, आजपर्यंत ३३ च प्लँट्स सुरू झाले असले तर ते नि:संशय वाईट आहे.

महाराष्ट्राला एकंदरीत १० प्लँट्स अ‍ॅलोकेटेड आहेत, त्यांपैकी आपल्या माहितीप्रमाणे एकच सुरू झालेला आहे

तुम्ही दिलेल्या स्क्रोलच्या दुव्यावर सेंट्रल मेडिकल एजन्सीच्या मूळ टेंडर डॉक्युमेंटचा दुवा आहे. त्यावरून असे दिसते की प्रत्येक हॉस्पिटलला, सर्वसाधारणपणे जितक्या खाटा आहेत, तितक्या कपॅसिटी (लिटर्स पर मिनीट) चा प्लँट दिला गेला आहे, अर्थात त्यांत त्यांनी नजीकच्या वरच्या शतकाकडे राउंडींग केलेले आहे. उदा. ३११ खाटा-> ४०० लिपमि. ह्या अ‍ॅलॉटमेंटमध्ये कसलाही दुजाभाव आढळून येत नाही.

ही सर्व दिरंगाई वाईट आहेच पण त्यात मला (दुरून) दिसते त्यावरून असे वाटत राहिले की सर्व देशच - त्यात सरकारे व जनता- अतिशय गाफिल राहिली, त्याचा ह्या सद्य परिस्थितीत मुख्य वाटा आहे. दुसरे, सध्या भारतांत प्रचलित असलेला व्हायरस हा म्युटेटेड स्ट्रेन आहे (ब्रिट + द. आफ्रिका). तेव्हा सर्वसाधारणपणे जिथे बाहेरून माणसे अधिक आली, तिथे त्याचा विशेष प्रादुर्भाव दिसतो. तसेच हा स्ट्रेन पहिल्यापेक्षही जास्त ट्रान्स्मिटेबल आहे. ह्या सर्व कारणांमुळे आपण आता अतिशय वाईट परिस्थितीत सापडलो आहोत.

कॉमी

१. ५ महिने- चूक दाखवल्या बद्दल धन्यवाद.

२. ऍलोटमेन्ट मध्ये दुजाभाव आहे असे म्हणणे नव्हते. ऍलोट केलेल्या पैकी एकच बांधला गेलाय हे खटकले. ह्यात पण ईल हेतूने बांधले नाहीत असे काही नाही हे १००% मान्य आहे. पण आहे ते आहे. महाराष्ट्र सरकारच्या चूक दाखवणे चांगले आहेच, पण ते करताना केंद्राचे झाकून ठेवायचे हे वाईट वाटलेले. इथे बसून त्यांनी ऑक्सिजन प्लांट २-३ माहिन्यांपूर्वीच चालू करायला हवा होता वैगेरे बोलणे सोपे असते, खास करून विरोधी पक्षाच्या सरकार सत्तेत असले की.

३.

त्यांपैकी आपल्या माहितीप्रमाणे एकच सुरू झालेला आहे

>>>"Out of 162 PSA plants sanctioned by the union government, 33 have already been installed - five in Madhya Pradesh, four in Himachal Pradesh, three each in Chandigarh, Gujarat, and Uttarakhand, two each in Bihar, Karnataka, and Telangana; and one each in Andhra Pradesh, Chhattisgarh, Delhi, Haryana, Kerala, Maharashtra, Puducherry, Punjab, and Uttar Pradesh," the Ministry added in series of tweets.

बिझनेस स्टॅण्डर्ड मधून.

३. बरोबर आहे. ह्यात जे होत आहे त्यात सरकार मंडळींचा दोष कितपत आणि एकंदरीत न थांबवण्यासारखे किती हे अनिश्चितच आहे.

तुमचे प्रतिसाद उत्तम आणि सखोल असतात. मागचे लसीवरचे सुद्धा अतिशय उत्तम विवेचन तुमच्या आणि काळभोर यांच्या चर्चेतून आयते समजले.

प्रदीप

तुमचे प्रतिसाद उत्तम आणि सखोल असतात

धन्यवाद. खरे तर माझ्यापेक्षा येथे अनेकजण अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद देत असतात. मला सध्या भरपूर वेळ मिळाला आहे, तेव्हा थोडे इथेतिथे शोधण्यात वेळ घालवता येतो आहे, एव्हढेच.

तर, सरकारी CMSS ह्या सदर कामासाठी टेंडर काढणार्‍या संस्थेच्या संस्थळावरून, टेण्डरच्या निकालाविषयी, तसेच सदर कामाच्या सद्य परिस्थितीविषयी कसलीही माहिती नाही. भारतीय बाबू व बाबीण्यांचा एकंदरीत कारभार पहाता ह्यात आश्चर्य नाहीच. पण स्क्रोलने ह्याचा पाठपुरावा करून जी माहिती दिली आहे, ती सर्वसाधारणपणे आपल्या भारतीय कार्यपद्धतीला अनुसरूनच आहे. म्हणजे, स्क्रोलने संपर्क केलेल्या काही हॉस्पिटलांनी काँट्रॅक्टर्सकडे बोट दाखवले तर काँट्रॅक्टर्सनी हॉस्पिटल्सकडे (साईट तयार नव्हत्या म्हणून).

स्क्रोलच्या माहितीनुसार तीन कंपन्यांना (बरीचशी) कॉन्ट्रॅक्ट्स देण्यात आली. त्यांपैकी एका कंपनीने उत्तर प्रदेश व गुजरात येथील दोन हॉस्पिटल्सांतील काम केलेच नाही. सदर कंपनीस स्क्रोलने संपर्क केला पण त्यांचे काहीच उत्तर आले नाही, असे त्यांनी नमूद केले आहे. दुसर्‍या एका कंपनीचे म्हणणे आहे की त्यांनी त्यांचे सामान त्यांच्या निर्धारीत साईटींवर वेलेवर व व्यवस्थित पोहोचवले, पण हॉस्पिटलांनी साईट तयार न ठेवल्याने ते तिथले काम करू शकलेले नाहीत. स्क्रोलने ह्याविषयी सविस्तर पाठपुरावा केलेला नाही. तिसर्‍या कंपनीस सी. एम. एस. एस.नेच १३ एप्रिल रोजी ब्लॅकलिस्ट केले आहे. ह्याचे कारण ह्या कंपनीने अद्याप सिक्युरीटी डिपॉझिट दिलेले नाही तसेच ऑर्डर अ‍ॅक्सेटन्सचे पत्रही अद्याप पाठवलेले नाही. हे समजण्यासाठी इतका उशीर का झाला, हे एक बाबू- बाबीणीच जाणोत. (मुळात ऑर्डरी कधी इश्यू झाल्या, ह्याविषयी काहीच माहिती समजत नाही). बातमीत कॉन्ट्रॅक्टर्सच्या नावांचा उल्लेख आहे.

मात्र मला वाटते, स्क्रोलने बातमीत थोडा खोडसाळपणाही केलेला आहे:

"In the tender document for the new oxygen plants, district hospitals were listed along with the total number of beds in the hospital and the capacity of the plant. Out of these, Uttar Pradesh was allotted the highest number of plants with varying capacities in 14 districts. It was followed by Maharashtra, which was allotted plants in 10 districts. Delhi was allotted eight plants with a total capacity of generating 7,700 litres of oxygen per minute."

ह्यावरून असा समज व्हावा की मुद्दाम उप्रला झुकते माप दिलेले आहे. पण टेंडर डॉक्युमेंट्मधे ह्याबद्दल एक सविस्तर तक्ता आहे, त्यानुसार हॉस्पिटल्सच्या खाटांच्या संख्येनुसार ऑक्सिजनची क्षमता (एक खाट = एक लिटर प्रति मिनीट, अथवा जास्त) अशी सर्वच हॉस्पिटल्सना दिली आहे, असे दिसते.

असा खोडसाळपणा अनेक भारतीय व परदेशी माध्यमे इतका करतात की त्यांची विश्वासार्हता आता फारशी राहिली नाही. ह्याचा मी स्वतः बराच अनुभव घेतलेला आहे. ते एक असो.

कॉमी

स्क्रोल खोडसाळपणा करण्याच्या केपेबल आहे हे नक्कीच. पण इथे मुद्दा कळाला नाही. झुकतं माप दिलंय असा इशारा असेल तर तो डिस्ट्रिक्ट संख्येत वाटला, ऑक्सिजन क्षमतेत नाही. आणि निवडलेल्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स मधल्या प्लॅन्टस ची क्षमता त्या तक्त्यात आहे, पण डिस्ट्रिक्ट कोणते निवडले आणि काय निकषावर राज्यनिहाय जिल्हा इस्पितळांची संख्या ठरवली हे टेंडर डॉक मध्ये येणार नाही, कारण हि माहिती सप्लायरला कशाला सांगा ? त्यामुळे जिल्ह्यांची निवड काय निकषांवर केली हे माहित नाही, त्यामुळे त्याबद्दल न बोलणे योग्य. स्क्रोल ने यावर प्रकाश पडला असता तर योग्य झाले असते.

सगळा मॅटर अगदी डिप्रेसिंग आहे.

माध्यमांच्या ओपिनियन्स पेक्षा तथ्य वाचनेच इष्ट. अर्थात तिथे सुद्धा चुकीचे चित्र रंगवता येते हे पण खरे. पण केवळ "अमुक तमुक पेपर ? हॅ !" हा अविर्भाव काय बरोबर नाही. ओपिनियन पीस बाबतीत चालेल, पण ऑन ग्राउंड रिपोर्टींग चे काय ?

तिथेही गडबड आढळली आहेच खरे !

जेम्स ओकॉफ़ी नावाचा माणसाची गोष्ट रंजक आहे. हा माणूस प्रोजेक्ट व्हेरिटास नावाची संस्था चालवतो. त्याने इतके अर्धवट माहितीचे आणि त्याच्या मताविरोधात किंवा खळबळजनक नसलेले किंवा नरेटीव्हला काँट्रॅडीक्ट करणारे फुटेज दाबून अक्षरश: संस्था आणि लोकांना संपवले आहे. त्याच्यावर Timbah on Toast नावाच्या युट्युब च्यानेल ने प्रदीर्घ डॉक्युमेंटरी बनवली आहे. जरा मोठी आहे, पण कधी कंटाळा आला तर जरूर पहा, खूप इंटरेस्टिंग आहे.

प्रदीप

जिल्ह्यांची निवड काय निकषांवर केली हे माहित नाही, त्यामुळे त्याबद्दल न बोलणे योग्य. स्क्रोल ने यावर प्रकाश पडला असता तर योग्य झाले असते.

जर कुणी मुद्दामहून, राजकीय कारणांमुळे जिल्हे निवडतांना भेदभाव केला असता, तर एव्हाना अनेक राज्यांकडून त्याविषयी नाराजी जाहीर प्रकट झाली असती. तसे काही आढळून आलेले नाही.

म्हणजे काहीही आधार नसतांना एक काडी टाकून जायची, असेच काही ठराविक माध्यमांतून अनेकदा होतांना दिसते. मग इतर त्यावर उत्तरे देत बसतील.

कॉमी

तुमचे बरोबर असू शकते.
पण प्युअर क्वांटिटेटिव्ह माहिती कशी घ्यावी मग ? तुम्ही हे आकडे पेपर मध्ये कसे द्याल ?

प्रदीप

ह्या ठिकाणी त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना विचारावे. उत्तर नाहीच आले, तर आडून आडून पण जबाबदारीने तपास करावा. (पूर्वी ज्याला 'इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नॅलिझम' म्हणत, ते करावे). जोंपर्यंत काहीही ठोस निष्कर्ष काढण्याएव्हढी माहिती आपणापाशी नाही, तोपर्यंत त्याविषयी काहीच लिहू नये. असले काहीतरी स्पेक्युलेटिव्ह लिहीणे बेजबादारीचे आहे.

अशा तर्‍हेच्या स्पेक्युलेशनमधे, ते तसे काही आहे असे ज्या व्यक्तिस वाटते आहे, ते खरोखरीच तसे आहे, हे सप्रमाण दर्शवून देण्याची जबाबदारी ('ओनस') त्या व्यक्तिवर आहे, ना?

कॉमी

स्पेक्युलेटिव्ह काय लिहिले आहे ? स्पेक्युलेटिव्ह लिहिणे म्हणजे - " यूपी भाजपाची म्हणून तिथे जास्त प्लॅन्ट लावले असतील."

किती प्लांट कोणत्या राज्यांमध्ये उभारले आहेत हे आहे तसे आकडे दिले आहेत, मला त्यात काही गैर वाटले नाही. प्रत्येक गोष्टींमधून तुम्ही म्हणता तसे स्पेक्युलेशन केले जाऊ शकते. ह्याचा अर्थ त्या गोष्टी रिपोर्ट होऊ नयेत असा नाही.

प्रदीप

इथे काही स्पेक्युलेटिव्ह नाही, हे तसे बरोबर आहे. पण "Out of these, Uttar Pradesh was allotted the highest number of plants with varying capacities in 14 districts. It was followed by Maharashtra, which was allotted plants in 10 districts. Delhi was allotted eight plants with a total capacity of generating 7,700 litres of oxygen per minute." हे फॅक्च्युअल असले तरी ज्या तर्‍हेने लिहीले आहे, त्यांतून सर्वसामान्य वाचकास काय ध्वनित होते? किंबहूना ते तसे ध्नवित करण्यासाठीच अशा तर्‍हेने लिहीले गेले आहे अशी शंका येते. म्हणजे, पहा, पहा, सर्वात जास्त प्लॅन्ट्स उत्तर प्रदेशाला, व मग महाराष्ट्रास, व त्याहून कमी दिल्लीस.

कॉमी

राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना केंद्राने रेमिडीसीव्हीर औषधाचे खरेदी आणि राज्यांमध्ये वितरणाचे हक्क स्वतः कडे न ठेवता राज्यांकडे द्यावेत.

पण मुळात, १०० युनिटची मागणी असताना, आणि फक्त ६० च युनिट उपलब्ध आहेत अशी परिस्थिती असल्यावर केंद्राकडून व्यवस्थापन काढले तर अनागोंदी माजणार नाही काय ?

कि मी काहीतरी चुकीचे समजतोय ?

Rajesh188

नियोजन केंद्र सरकार नीच करायला हवं राज्यावर वर सोपवले तर गोंधळ निर्माण होईल हे मत योग्य च आहे.
देशात अनेक राज्य आहेत आणि सर्वच राज्य ऑक्सिजन चे उत्पादन स्वतः घेण्यास सक्षम नाहीत त्यांचा सुद्धा विचार करणे देश हिताचेच आहे.
पण इथे राजकारण करून विरोधी पक्षांचे जिथे सरकार आहे त्यांची अडवणूक केंद्र करत आहे .
आणि परत ऑक्सिजन न मिळाल्या मुळे रोगी मेले की त्याचं राज्याला बदनाम केले जात आहे म्हणून राज ठाकरे नी तशी मागणी केली असेल.
खर तर देशातील जी काही साधन सामुग्री आहे त्याचे योग्य रिती नी गरजे नुसार सर्व राज्यांना वाटप केंद्र सरकार नी करायला हवं .
निःपक्ष भावनेनं आणि कर्तव्य समजून.
कमी पडत असेल तर आयात करावे.
पैसे कमी पडत असतील तर जनतेला आव्हान करावे
वेळ पडली तर कर्ज काढावे पण ऑक्सिजन आणि औषध वाचून कोणाचा जीव जाता कामा नये.
आणि मुख्यत्व राजकारण बंद करावे

एकंदरीतच कोविड समोर राज्य आणि केंद्र सरकारने हात टेकले आहेत. मोठ्या राज्यापैकी एका ही राज्यात परिस्थिती नियंत्रणात नाही. रेमेडीसीविर आणि ऑक्सिजन चा प्रचंड तुटवडा देशात आहे तर लसीकरणाचा वेग ही दिवसेंदिवस कमी होत आहे.
केंद्र सरकार निश्चितपणे नियोजन करण्यात कमी पडले आहे. दुसरी लाट येणारच नाही असे समजून सरकार गाफील राहिले.

लिओ

Hiraa

गुजरात येथील अमरेली जिल्ह्यातील राजुला येथे भाजपाचे माजी आमदार श्री श्री श्री हिरा सोलंकी यांनी जिल्हा प्रशासनाकडुन परवानगी घेउन कोव्हिड रुग्णांसाठी ऑक्सिजन सिंलेडर पुरवले....

ऑक्सिजन सिंलेडर पुरवताना त्यावर स्वतःचा फोटो छापुन तो ऑक्सिजन सिंलेडर रुग्णालयाला पुरवला.

केंद्र सरकार तीन कृषीकायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत शेतकरी दिल्लीच्या सीमेवरून हलणार नाहीत असे राकेश टिकैतने म्हटले आहे. आता किती पुरोगामी विचारवंत तिथे कोरोना पसरत नाही का हा प्रश्न विचारतात हेच बघायचे.

https://timesofindia.indiatimes.com/india/rakesh-tikait-says-farmers-wi…

Rajesh188

जे काही विवादित कायदे केंद्र सरकार नी महामारी चालू असताना केले आहेत.ते सर्व तत्काळ रद्द करावेत.
लोकांनी रस्त्यावर यावे अशी काम करताच कशाला.
अशी कोणती घाई झाली आहे.
महामारी जावू ध्या मग निवांत बसा कायदे करत.

.......रातोरात न्यूयॉर्कला जाणारे शाहरुख खानचे कुटुंब नेटकऱ्यांकडून ट्रोल!

"Video | ‘देशावर संकट येताच ते बघा पळून चालले’, रातोरात न्यूयॉर्कला जाणारे शाहरुख खानचे कुटुंब नेटकऱ्यांकडून ट्रोल! | Social Media User troll Gauri and Aaryan khan As they are traveling to new york during pandemic" https://www-tv9marathi-com.cdn.ampproject.org/v/s/www.tv9marathi.com/en…

मी ह्या खान मंडळींचे सिनेमे अजिबात बघत नाही ...

कोरोनामुळे संगीतकार श्रवण राठोड यांचे कोविडमुळे निधन झाले आहे. नदीम-श्रवण जोडीने १९९० च्या दशकात अनेक लोकप्रिय चित्रपटांमधील गाण्यांना संगीत दिले होते. नदीम गुलशनकुमार हत्याप्रकरणी हवा आहे असे वक्तव्य नदीम भारताबाहेर असताना त्यावेळच्या मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी केले. त्यानंतर नदीम भारतात परतलाच नाही आणि नदीम-श्रवण जोडीचे संगीतही थंडावले.

कोरोनामुळे आणखी एक प्रसिध्द व्यक्तीचा बळी घेतला आहे. त्यांना श्रध्दांजली.

श्रीगुरुजी

>>> नदीम गुलशनकुमार हत्याप्रकरणी हवा आहे असे वक्तव्य नदीम भारताबाहेर असताना त्यावेळच्या मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी केले.

हे वक्तव्य बहुतेक गोपीनाथ मुंडेंंनी सर्वात आधी केले होते.

Rajesh188

सत्तेवर आल्यापासून आज पर्यंत विविध bjp नेत्यांचे ट्विट बघितले तर bjp ची मानसिकता अतिशय नीच आहे .
अगदी अमित shah पासून पंतप्रधान आणि बाकी फडणवीस सारखे किरकोळ नेते .
सर्वच.
ह्यांना मुस्लिम लोक विषयी द्वेष आहेच पण हिंदू मधील विविध जाती विषयी पण ह्यांना द्वेष आहे.
सीताराम येचुरी च्या मुलाचे corona मुळे मृत्यू झाला तेव्हा पण तिवारी नामक bjp नेत्यांनी अत्यंत हिन वृत्ती चे ट्विट करून bjp ची मनोवृत्ती दाखवली आहे.

श्रीगुरुजी

सुमित्रा महाजन गेल्याचे ट्विट काल थरूरने केले होते.

Rajesh188

भोपाळ - संपूर्ण देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. आज देशभरातील रुग्णालयांत ऑक्सीजनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे, असे असतानाही लोक आप्तांचा जीव वाचविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, जेव्हा एका व्यक्तीने मध्य प्रदेशातील केंद्रीय मंत्र्यांसमोर तक्रार केली, तेव्हा त्याला चक्क उघडपणे धमकीच देण्यात आली. विशेष म्हणजे ही धमी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री प्रह्लाद पटेल यांनी दिली आहे. ऑक्सीजनसाठी हाताश झालेल्या या व्यक्तीला त्यांनी चक्क दोन थापडा मारण्याची धमकी दिली आहे. हा सर्व प्रकार माध्यमांच्या कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.

मध्य प्रदेशातील दमोहच्या एका रुग्णालयाबाहेर एका व्यक्तीने मंत्री प्रह्लाद पटेल यांच्याकडे तक्रार केली, की 'अम्ही एवढे हताश आहोत... आम्हाला ऑक्सीजन सिलेंडर मिळाले नाही...' यावर प्रह्लाद पटेल यांनी त्या व्यक्तीला दोन थापडा मारण्याची धमकीच देऊन टाकली. प्रह्लाद पटेल म्हणाले, 'जर असे बोलशील तर दोन खाशील,' हे बोलताना ते संबंधित व्यक्तीकडे पाहून हातवारेही करत होते. प्रहलाद पटेल हे दमोहचे भाजप खासदार आहेत.
ह्यांना कसली मस्ती आली आहे .
आता अंध भक्त ह्याचे पण समर्थन करतील.

कॉमी

डिमांड आउटस्ट्रीप्स सप्लाय चा अर्थ तुम्ही म्हणताय त्याच्या थेट उलट आहे. लिंक कृपया नीट वाचून पहा.

श्रीगुरुजी

आपण फक्त शीर्षक वाचले, पुढील मजकूर वाचला नाही.

या बातमीत एकूण १२ मोठ्या राज्यांना पुरविलेल्या ऑक्सिजन सिलिंडर्स आकडे दिले आहेत.

दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, हरयाणा - मागणीपेक्षा कमी सिलिंडर्स मिळाले. यात ४ पैकी ३ राज्यात भाजपचे सरकार आहे.

कर्नाटक, राजस्थान - मागणीएवढे सिलिंडर्स मिळाले. यात कर्नाटकात भाजपचे सरकार आहे.

महाराष्ट्र, केरळ, पंजाब, छत्तीसगड, तामिळनाडू, मध्य प्रदेश - मागणीपेक्षा जास्त सिलिंडर्स मिळाले. महाराष्ट्राला मागणीपेक्षा १६१ सिलिंडर्स जास्त मिळाले आहेत. यात फक्त मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आहे.

कॉमी

बरोबर आहे तुमचे. माफ करा.

श्रीगुरुजी

माफी मागतो वगैरे नको हो कृपया.

बातमीचे शीर्षक दिशाभूल करणारे आहे.

असेही काही टक्के जनता म्हणणारच...

ह्या सरकारच्या काळात ही कितवी दुर्घटना आहे?

कॉमी

किती ते राजकारण. इतक्या दुर्घटनेस पण सोडले नाही.

एसीच्या कॉम्प्रेसर मध्ये स्फोट झाला आणि वार्डात ऑक्सिजन असल्याने आग पसरली

इतके सुस्पष्ट विवेचन असताना सुद्धा...? ह्यात कोणाची चूक ?

काही टक्के लोकांची ती प्रवृत्ती आहे

आलं अंगावर तर ढकल केंद्रावर

तुम्ही नका टेंशन घेऊ

Rajesh188

Bjp आणि त्यांचे पाठीराखे ह्यांची राज्य द्रोही वृत्ती बघून बहुसंख्य लोकं bjp चे कट्टर विरोधक झालेलं आहेत..काही टक्के च bjp विरोधक आहेत ह्या भ्रमात राहू नका.
केंद्र सरकार वर ढकलायला ते केंद्र सरकार तेवढे सक्षम तर असले पाहिजे.

संपादित

सुबोध खरे

एक अर्ध शिक्षित,अहंकारी,कर्तृत्व हिन,राज्य करण्यास बिलकुल लायक नसलेला व्यक्ती केंद्र सरकार च प्रमुख आहे

जी व्यक्ती सतत १९ वर्षे बहुमताने निवडून येते ज्यात १२ वर्षे एका राज्याचे मुख्यमंत्री आणि ७ वर्षे देशाच्या जनतेने स्पष्ट बहुमताने निवडून दिलेल्या व्यक्तीबद्दल आपले असे उद्गार पाहून धन्य झालो .

मिपा संपादक मंडळ एकतर झोपलं आहे किंवा पक्षपातीपणा करतंय असा मी स्पष्ट आरोप करतो.

निवडून आले म्हणून वर ऊल्लेखलेले मुद्दे खोटे का?? देशात लोक मरताहेत आणी हे भाषणबाजी रॅली काढणय्ता व्यस्त अश्या व्यक्तिला राज्य करण्यास लायक नाही म्हटले तर ह्यात खोटं काय??

श्रीगुरुजी

मोदींविषयी मनात ओतप्रोत द्वेष भरला असल्याने अशी तिरस्करणीय गरळ ओकणे सुरू आहे. कोणत्याही गोष्टीची माहिती नाही, माहिती समजून घेण्याची इच्छा नाही, माहिती समजण्यासाठी अक्कल नाही, अत्यंत पूर्वग्रहदूषित विचार आणि काडीचीही अक्कल नसल्याने असे यझ प्रतिसाद येत राहतात.

आनन्दा

वॉर्डात oxygen असल्यामुळे आग पसरली म्हणजे काय?

हायड्रोजन एक्सप्लोसिव्ह आहे हे माहीत होते. पेट्रोलमुळे आग पसरेल हे पण माहीत होते.

Oxygen मुळे आग पसरते हे पहिल्यांदा ऐकले आहे.

कॉमी

लिंक मधून कोट केलेलं वाक्य आहे.

ऑक्सिजन स्वतः जळत नसला तरी जळण्यास मदत करतो आणि कमी तापमानातसुद्धा दुसऱ्या वस्तूस जळण्यास मदत करतो.

आगीवर वाळू आणि पाणी आणि शाल वैगेरे टाकतात ते ऑक्सिजन सप्लाय तोडायसाठीच.

(गुगल केले असते तरी चालले असते तुम्ही. असो.)

सॅगी

कालच एक ट्विट वाचले.

जिथे भाजप सरकार आहे तिथे CM दोषी आहेत...
जिथे भाजप सरकार नाही तिथे केंद्र/मोदी दोषी आहेत...
.
.
म्हणून आम्ही सर्व भक्त आणि "बाकीचे ते" नासाचे वैज्ञानिक आहेत...

:D

Rajesh188

परत २ जागा मिळवून bjp लोकसभेत असेल .
आणि हा आकडा कायम स्वरुपी तोच राहणार आहे.

Rajesh188

पंतप्रधान पासून गृहमंत्री आणि झाडून सर्व bjp नेते बंगाल मध्ये होते.
सत्ता आणि त्या मधून मिळणारा पैसा ह्यामुळे पैशाचा वापर bjp नी खूप मोठ्या प्रमाणात केला आहे.
जोडी झाडून सर्व electronic media (,, काही मोजकेच एक दोन चॅनेल सोडले तर)
Bjp चच प्रचार करत होती.
बिचाऱ्या ना चॅनेल चालवायचा आहे सरकारी शनी पाठी लागायला नको.
आयटी cell चे लाखो कर्मचारी fb, you tube,tweeter वर सक्रिय राहून कर्तव्य बजावत होते.
सरकारी यंत्रणा दिमतीला होतीच.
एकटी स्त्री किती पुरी पडणार.
त्या मुळे bjp ल यश मिळेल असे वाटत.

कॉमी

इथे तर उलट दिसतेय. भाजपशासित राज्यात आणि केंद्रात सगळं आलबेल, महाराष्ट्राच्या नावानं हायतोबा हायतोबा.

त्याला आपण तरी काय करणार?

निवृत्त नौसैनिकाला मारहाण केली, इतर कुठल्याही राजवटीत, हे झालेले नाही...

सुबोध खरे

मारहाणीला आपले समर्थन आहे असे म्हणताय?

उत्तम आहे.

आपली द्वेषमूलक वृत्ती स्पष्ट दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद

मारहाणीला आपले समर्थन आहे असे म्हणताय? >>>>
मारहाणी ला समर्थन असं कुठे म्हटलेय?? ज्यानी मारहाण केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीय. पण ज्याला मारहाण केली तो साधू संत होता का?? की त्याची काहीच चूक नव्हती??

श्रीगुरुजी

त्याची चूक होती का नव्हती हे ठरविण्यासाठी न्यायव्यवस्था आहे. खंडणीखोर कधीपासून न्यायाधीश झाले?

खंडणीखोर कधीपासून न्यायाधीश झाले?>>> काहीतरी गैरसमज होतोय गुरूजी ते भाजप कार्यकर्ते नव्हते.

सुबोध खरे

का केली??

हे वाक्य काय दर्शवते?

उगाच या बोटावरची थुंकी त्या बोटावर करू नका.

कॉमी

निवृत्त नौसेनिकाला मारहाण झाली.

स्टॅन्ड अप कॉमेडियन ला मारहाण झाली.

फरक काय ?

हा की घटनेनंतर स्टॅन्ड अप कॉमेडियन आणि त्याचा मित्र ह्यांनाच उलट अटक झाली.

नौसेनिक आणि कॉमेडियन दोघांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी.

आणि त्या नौसैनिक प्रकरणाचा इथं काय संबंध ?

कॉमी

विस्तृत करून सांगा. म्हणजे महाराष्ट्रात नौसैनिकाला मारले म्हणून ऑक्सिजन आणि इतर बाबतीत केंद्राने महाराष्ट्राच्या लोकांवर अन्याय केलेला चालतो काय ? केंद्राच्या चुकांवर बोलायचेच नाही ? महाराष्ट्रातले लोक फॉरेवर damned ?

म्हणतात ना, ज्या फांदीवर बसलाय त्यालाच कापणे.

कॉमी

इतके साधे तत्व आहे...

कशाला पजिजे केंद्र आणि राज्य सरकार, बंद करून टाका.

त्यापुढे,

आपली काळजी आपण घ्यायची

इतके साधे तत्व आहे...

नाहीतरी, तुमचे कुटुंब ही तुमचीच जबाबदारी आहे, असा फतवा काढला आहेच की...

कॉमी

चांगलेय कि, समविचारी मुख्यमंत्री.

बाय द वे,
फतवा शब्दाचा अर्थ तपासून घ्या. वरील वाक्यात फतवा, आदेश, नियम सदृश्य काहीही नाहीये.

सॅगी

नौसेनिक आणि कॉमेडियन दोघांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी.

नौसैनिकाला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई तर सोडाच, त्यांना जामीन दिला गेला, वर "स्वाभाविक प्रतिक्रिया" म्हणून निर्लज्ज समर्थनही केले गेले होते नॉटी सं"पाद"कांनी.

कॉमी

नौसेनिकालाच अटक केली नाही ना ?

सॅगी

मारहाण करणारे सुटले ते बरोबर झाले का?

कॉमी

मी पहिलाच म्हणले आहे, हे बरोबर नाही. नौसेनिकाला मारहाण, रानोटचे घर पडणे ह्या वाईट गोष्टी आहेत, त्यांना न्याय मिळावा. मारहाण करणाऱ्यांना शिक्षा व्हावी.

मुनावर फारुकी ला मारणाऱ्यांना जामिन मिळण्याचा प्रश्नच नाही, कारण अटक मारणाऱ्याला झालीच नाही मार खाणाऱ्याला झाली. कुणाला याबद्दल काही वाटलं सुद्धा नाही.

Rajesh188

नौ सैनिक तरी नक्की होता को तो की ती पण
थाप च आहे.
नौ सैनिक खरोखर असता तर समाज हिताला बाधा येईल असल्या बिनडोक पोस्ट केल्याचं नसत्या.
Bjp च भाडोत्री भक्त असण्याची शक्यता जास्त आहे.

सॅगी

इतके पुरेसे नाही काय?

आणि बिनडोक पक्षाविरोधात पोस्ट केल्याने समाजहिताला बाधा कशी काय येईल?

काहीही झाले तरी आपला पक्ष आणि आपला नेता यांचीच कशी लाल, त्यांचे कधीच काहीही चुकू शकतच नाही यावर गाढा विश्वास असलेले लोक इतरांना भक्त म्हणतात ते बघून हल्ली कीवही वाटत नाही.

सॅगी

यांना विरोध म्हणजे भगव्याला विरोध...महाराष्ट्राला विरोध...महाराष्ट्रद्रोह वगैरे वगैरे...

हे माझे वैयक्तिक मत आहे ....

ह्या सरकारने किती कामे केली आहेत? ह्याची कुणी माहिती पण देत नाही...

Rajesh188

जरा विचार करा ,बुद्धीला ताण ध्या आणि डोळे उघडे ठेवून बघा.
१) तुमच्या घरात वीज असते ना रोज २४ तास.
ह्याचे उत्तर . हो किंवा नाही
असे ध्या.
२) तुमच्या घरात रोज नळाला पाणी येते का .
उत्तर हो किंवा नाही ह्या मध्येच ध्या.
३) तुम्ही जिथे राहता त्या गावात,शहरात.
रस्ते आहेत ना की पायवाट आहे.
उत्तर हो किंवा नाही मध्ये ध्या.
४) तुम्ही कोणी घरात येवून मारहाण केली आहे का तुमची संपत्ती लुटली आहे का?
उत्तर हो किंवा नाही मध्ये ध्या.
५) महामारी काळात सुद्धा जीवन आवश्यक वस्तू बाजारात विपुल प्रमाणात आहेत की नाही.
उत्तर हो किंवा नाही मध्ये ध्या.
मग तुमच्या डोक्यात काही प्रकाश पडला तर पडेल.

Rajesh188

Bjp ह्या राजकीय पक्षाची महाराष्ट्र मध्ये आणि भारतात सुधा अल्प काळ च होती .
त्या विद्वान पक्षाला कोणी सत्तेवर येण्यासाठी मदत केली नव्हती.
ज्या सुविधा वर मी लिहल्या आहेत त्या bjp शासन काळात झालेल्या नाहीत.ह्याची दखल घ्यावी.ज्या काही सुविधा इथे आहेत त्या मध्ये bjp च कोणताच सहभाग नाही.
ह्याची पण दाखल घ्यावी.

मी काय लिहिले आहे ते नीट वाचा ....
--------

ह्या सरकारने काहीही काम केलेले नाही....

सुबोध खरे

मग तुमच्या डोक्यात काही प्रकाश पडला तर पडेल.

लॉक डाऊन मुळे उंदीर मारायचा विभाग बंद आहे काय?

आलं अंगावर तर ढकल केंद्रावर आणि आयजीच्या जीवावर बायजी उदार, ह्या दोन अतिशय फेमस म्हणी...

आता अजून काही म्हणी येतीलच ...

+१
देश मरत असताना बंगालातील रॅली भाषणे ह्यावर अवाक्शर ही न काढनारे भाजप यमर्थक पाहून हे ठळकपणे जानवते. वरून भक्त म्हटलं की रागही येतो.

माणूस होता म्हणून काहीही पोस्ट करेल का?? की भाजपचा माणूस होता म्हणून अश्रू गाळायचे त्याच्या नावाने?

सॅगी

म्हणून मारहाण करायची का?? की मारहाण करणारे शेणेचे होते म्हणून त्यांच्याविरोधात काहीही करायचे नाही?

सुबोध खरे

माणूस होता म्हणून काहीही पोस्ट करेल का

वा भुजबळ राव

किती दुतोंडीपणा करताय?

वरच आपल्या १८८ संमित्राने श्री मोदींविरुद्ध मिपा सारख्या सार्वजनिक न्यासावर काहीही पोस्ट टाकली त्याबद्दल आपण त्याचे समर्थन करताय आणि लगेच खाली त्याविरुद्ध १८० अंशात उलटी पोस्ट.

द्वेषामुळे आपली बुद्धी सुद्धा फिरल्यासारखी झाली आहे. "विनाशकाले विपरीत बुद्धिर्जायते नोत्तमनात"

काळजी घ्या. पुढच्या वर्षी महापालिका निवडणूकात आणि २०२४ मध्ये लोकसभेत भाजप आल्यावर आपली परिस्थिती बिकट होणार आहे.

श्री मोदींविरुद्ध मिपा सारख्या सार्वजनिक न्यासावर काहीही पोस्ट टाकली त्याबद्दल आपण त्याचे समर्थन करताय >>>>

त्यानी अश्लील किंवा भिभत्स असं काहीही लिहीलेलं नाही. पंतप्रधान जर जबाबदारी पाळत नसतील तर टिका होनारच. नसेल टिका सहण होत तर राजिनामा द्यावा. मनमोहन सिंहांवरही भक्तानी कमी टिका केलीय का??
आणी त्या माणसाने अतिशय खालच्या दर्जाची पोस्ट केली होती ठाकरेंवर तरी मारहाण करनार्यांचं कुणीही समर्थन करत नाहीये. त्यांचावर कायदेशीर कारवाई झालीय.

पुढच्या वर्षी महापालिका निवडणूकात आणि २०२४ मध्ये लोकसभेत भाजप >>>> लोकसभेची आशा बाळगायला हरकत नाही पण महापालितका??:) तिंथे आणी विंधानसभेत भाजपचं पानिपतच होनार.

सॅगी

त्यांचावर कायदेशीर कारवाई झालीय.

२४ तासांत जामीन मिळणे ही कारवाई का?

Rajesh188

सन्मानित sanmaniy महोदय जामीन मिळणे ही एक प्रक्रिया आहे.
पोलिस ज्यांनी गुन्हा केला आहे त्याच्या विरुद्ध कोर्टात आरोप पत्र सादर करतात.त्या आरोपात किती तथ्य आहे आणि तो गुन्हा किती गंभीर आहे ह्याचा विचार करून न्यायाधीश जामीन मंजूर करतात.
जामीन सरकार देत नाही न्यायाधीश देतात.
आपल्या देशात हीच पद्धत आहे.
त्या मुळे तुम्ही जमीन २४ तासात कसा मिळाला
ह्या प्रश्नाचे उत्तर न्यायालयात याचिका दाखल करून विचारू शकता.
आरोप पत्र दाखल झाले होते म्हणजे पोलीस नी कारवाई केली होती हे तरी तुम्ही स्वीकारले
हे आमचे भाग्य च समजायचे.

सॅगी

ही सर्व प्रक्रीया २४ तासांत अगदी "सुलभ" पणे पार पडली कारण आरोपी एका पक्षाचे कार्यकर्ते होते (कोणत्या ते तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे, नाहीका??), या गोष्टीकडे तुमचे लक्ष गेले नसेलच...

सामान्य माणूस अशा जागी असेल तर त्याचे काय हाल होतात हे ही तुम्हाला ठाऊक असेलच...

याउप्पर, अशा "कार्य"कर्त्यांचे निर्लज्ज समर्थन त्याच पक्षाच्या मुखपत्रातुन "स्वाभावीक प्रतिक्रिया" या मथळ्याखाली करायचे, यावरुन तो पक्ष किती खालच्या पातळीचा आहे हे ही आपल्या लक्षात आले असेलच...

श्रीगुरुजी

आणी त्या माणसाने अतिशय खालच्या दर्जाची पोस्ट केली होती ठाकरेंवर

खालच्या दर्जाची पोस्ट? शून्य माहिती असली आणि समज कमी असली की असे निर्बुद्ध प्रतिसाद येतात.

मदन शर्मा या ६५ वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याला एका कायप्पा समुहात कोणी तरी काढलेले ठाकरेंवरील एक व्यंगचित्र मिळाले. त्यात काहीही खालच्या दर्जाचे नव्हते. असते तर पोलिसांनी मूळ व्यंगचित्रकर्त्याला पकडले असते. ठाकरेंवर काढलेली अशी असंख्य व्यंगचित्रे गुगलल्यावर मिळतील. अनेक नेत्यांवर काढलेली असंख्य व्यंगचित्रे रोज अनेक माध्यमातून प्रसिद्ध होतात व ती सर्वत्र फिरत असतात आणि त्यात काहीही बीभत्स, अश्लील, खालच्या दर्जाचे नसते.

त्या अधिकाऱ्याने आपल्या सोसायटीच्या समुहात ते फॉरवर्ड केले. त्यानंतर त्यांना १०-११ सेना नेत्यांनी सोसायटीत येऊन बेदम मारहाण केली.

व्यंगचित्र काढणे हा गंभीर गुन्हा असेल तर आर के लक्ष्मण यांना रोज मारहाण झाली असती.

अत्यंत माज, काडीचीही अक्कल नाही, कामधंदा नाही, पोलिसांचे पाठबळ, गुंडगिरी अशा घाणेरड्या प्रवृत्तीमुळे एका वयस्कर अधिकाऱ्याला १०-११ जणांनी बेदम मारहाण केली.

दुर्दैवाने या गुन्ह्याचे काही जण तावातावाने समर्थन करीत आहेत.

श्रीगुरुजी

व्यंगचित्र आणि अश्लील, बीभत्स यातील फरक समजत असता तर?

नक्की काय कार्टून होते?? गूगल वर वेगवेगळे दोन तीन दाखवले आणी ते एखाद्या व्यंगचीत्रा पेक्शा जास्तच काहीतरी आहेत.

श्रीगुरुजी

कोणती कार्टून्स? लिंक द्या. मदन शर्मांनी पुढे ढकललेले व्यंगचित्र खरंच अश्लील, बीभत्स वगैरे असेल तर ते काढणाऱ्याविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई का केली नाही? शूर सैनिकांनी व्यंगचित्र काढणाऱ्याला शोधून त्याला का बदडले नाही?

अमर विश्वास

विरार मध्यल्या हॉस्पिटलला आग .. १३ जणांचा मृत्यू ..

आधी मुंबईत ड्रीम मॉल मधल्या हॉस्पिटलला आग ... त्यावेळी तर महापौरांनी तारे तोडले होते .. असे हॉस्पिटल आहे हे माहितीच नाही ...

त्यानंतर नाशिक मधले ऑक्सिजन दुर्घटना
आता विरार .... तत्पूर्वी चंद्रपूरला आगीत होरपळून बालके दगावली होती ...

अत्यंत दुःखद आणि लाजिरवाणं आहे ...

फायर ऑडिट , ऑक्सिजन ऑडिट वगैरे प्रकार असतात हे विसरलोय का ?

अत्यंत गलथान कारभार ....

Rajesh188

ह्यांच्या वर निवडणुकीत बॉम्ब पडणार आहे .विधानसभेत दोन चार आणि लोकसभेत दोन च असणार आहेत ही लोक.
लोकांना चूक लक्षात आली आहे.
पहिली लोक हुशार होती म्हणून ७० वर्ष ह्यांना फिरकू दिले नाही सत्ते जवळ.
राम मंदिर आंदोलन मुळे ह्यांची लॉटरी लागली.
आता राम मंदिर,हिंदुत्व,पाकिस्तान,मुसलमान
हे विषय आता चालणार च नाहीत.
मुस्लिम परवडले पण ही मंडळी सत्तेत नको असच मत झाले आहे.
Mim सत्तेत आली तरी चालेल पण bjp नको .

हे असले प्रतिसाद वाचून 2024 साली भाजपा च सत्तेत येणार याची खात्री वाटतेय, ती पण 305 पेक्षा जास्त जागा घेऊन.

श्रीगुरुजी

>>> हे असले प्रतिसाद वाचून 2024 साली भाजपा च सत्तेत येणार याची खात्री वाटतेय, ती पण 305 पेक्षा जास्त जागा घेऊन.

+ १८८

सुबोध खरे

राम मंदिर आंदोलन मुळे ह्यांची लॉटरी लागली.

लॉक डाऊन मुळे उंदीर मारायचा विभाग बंद आहे काय?

Rajesh188

महानगर पालिकेत उंदीर मारण्याचा विभाग असतो तो साफ सफाई विभागाचा भाग असतो.
जिथे कचरा असेल तिथे साफसफाई होणे गरजेचे असते.
आपल्या आदरणीय ,वंदनीय पंतप्रधान महोदयांनी सुद्धा स्वच्छतेचे महत्व ओळखले आहे फक्त त्यांना कचरा साफ केल्यावर सफाई होते ही शुल्लक बाब माहीत नसल्या मुळे ते कचरा तसाच ठेवत आहेत आणि चांगल्या गोष्टी कचऱ्यात फेकत आहेत.
पण आम्हाला कचऱ्याची चांगली ओळख आहे .
उंदीर शोधून त्यांचा बंदोबस्त करणे हा तर आमचा पोट पाण्याचा उद्योग च आहे असे समजा.
तेच काम आम्ही इथे करत आहोत.
समाज सेवा हीच ईश्वर सेवा हे आमचे ब्रीद आहे.

इरसाल

मला तो नवनिर्वाचित संपादक मंडळाचे अभिनंदन करणारा धागा कोणी प्लीज शोधुन देईल काय?
परत एकदा कार्यबाहुल्याने व्यस्त असणार्‍या सगळ्या संपादकांचे जाहीर अभिनंदन करायचे आहे.

ह्या निमित्ताने तरी हा होईना, लोकं आपला राग, खंत, निराशा, लोभ व्यक्त करत आहेत...

क्वचित वैयक्तिक टीका होत असेलही, पण सध्याच्या काळांत, हे होणे गरजेचे आहे....

प्रेशर कुकरच्या शिट्ट्या वाजायलाच हव्यात....

इरसाल

लोकांनी व्यक्त होणे चुकीचे नाही.पण व्यक्त होताना सामाजिक भान आणी समाजात वावरताना वापरायची भाषा वापरावी. (हे लोकं सरळ सरळ त्यांच्या घरात वापरतात ती भाषा मिपावर वापरताय)

Rajesh188

तुम्हाला ठराविक च वाचता येते का ?
काही लोक कोणते शब्द वापरत आहेत कोणत्या दर्जा ची टीका करत आहेत हे वाचता येत नाही का.
आम्ही फक्त क्रियेला त्याच पद्धतीची प्रतिक्रिया देत आहोत.
तरी सुद्धा एक पण चुकीचा शब्द आम्ही लिहला नाही.
जसे काही लोक मूर्ख,गाढव,असली विशेषण बिन्धास्त लावत आहेत.

कॉमी

तुमच्या नावडत्या नेत्यावर मनमानी टीका (जोकर, करमणूक, पप्पू, फावड्या, पेंग्विन) करण्याचे स्वातंत्र्य पाहिजे असेल तर मन घट्ट करून आवडत्या नेत्याला चिडवलेले पचवायची ताकद पाहिजे.

कहां राजा भोज और कहा गंगू तेली!

सुज्ञ लोकांना राजा कोण आणि तेली कोण हे सांगायची गरज नसावी.

Rajesh188

स्वतः पंतप्रधान महोदय हे तेली जातीचे आहेत आणि ते आज प्रतिष्ठित असलेल्या पदाला सन्मानित करत आहेत .

कॉमी

तेच, तुमचे भोज राजाचे आणि गंगू तेल्याचे क्लसिफिकेशन तुम्ही दुसऱ्यावर लादू शकत नाही. ते तुमच्यापुरतेच असते.

श्रीगुरुजी

कोणतीही माहिती नसलेली ही जोडगोळी अत्यंत द्वेषपूर्ण व निर्बुद्ध प्रतिसाद देत आहे. त्यामुळे नवीन धागा काढण्यात अर्थ नाही. त्यांना जेवढ्या ओकाऱ्या काढायच्यात त्या इथेच काढू दे.

Rajesh188

चीन नी व्हायरस बनवून जगात पसरवला हे वाक्य तीव्र बुध्दी चे लक्षण आहे का?
असेल तर आम्ही अडाणी ,अज्ञानी च आहोत.
तुम्ही जास्त च बुध्दी मान आहात.

१८८ साहेब हा धागा सुरवाती पासुन शांतपणे वाचा ही नम्र विनंती!

श्रीगुरुजी

प्रसह्य मणिमुद्धरेन्मकरदंष्ट्रान्तरात्
समुद्रमपि सन्तरेत् प्रचलदुर्मिमालाकुलाम् ।
भुजङ्गमपि कोपितं शिरसि पुष्पवद्धारयेत्
न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥

अर्थ - भर्तृहरी म्हणतो की एखादा मनुष्य कठोर प्रयत्नांती मगरीच्या तोंडातून स्वर्णमणी ओढून काढू शकेल, महासागर पोहून पार करू शकेल, विषारी नागाला एखाद्या पुष्पाप्रमाणे मस्तकावर धारण करू शकेल, परंतु कितीही प्रयत्न केले तरी तो पूर्वग्रहदूषित मुर्खाचे समाधान करू शकणार नाही.

Rajesh188

सरळ सरळ स्पष्ट शब्दात चुकीचे तुम्ही लिहीत आहात आणि तरी कबूल करत नाही.
चीन नी व्हायरस बनवला असे तुम्ही लिहला आहे.
अशा माणसाला महामूर्ख च म्हंटले पाहिजे.
स्वतः मुर्खासारखे काही तरी लिहायचे आणि चूक दाखवून दिली की चूक दाखवून देणाऱ्या व्यक्ती लाच शहाणपण शिकवायचे .
म्हणे ह्यांना mipa च्या दर्जा ची काळजी आहे.

Rajesh188

अशाच प्रतिक्रिया निरंतर येत राहतील जो पर्यंत काही लोक सुधारत नाहीत तो पर्यंत