काथ्याकूट

चालू घडामोडी - मे २०२१ (भाग 2)

Primary tabs

संगमनेरमध्ये गर्दी केल्याचा जाब विचारणाऱ्या पोलिसांना पाठलाग करुन मारहाण; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल...

https://www.loksatta.com/maharashtra-news/people-attack-on-police-in-sa…

--------

तडीपार गुंडाने पोलीस अधिकाऱ्याचा गळा चिरला, हत्याकांडाने पुण्यातील बुधवार पेठ हादरली

https://www.tv9marathi.com/crime/pune-police-asi-sameer-sayyad-murdered…

-------------
साधू हत्याकांड, सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण, सामान्य माणसाला जीवे मारण्याची धमकी देणारा आमदार, आणि आता वरील बातम्या .....
-----------

कायद्याचा धाक नसेल तर, अशा बातम्या येतच राहणार ...

खिळ्या परी नाल गेली, नाली पाई घोडा गेला, घोड्या पाई स्वार गेला, स्वारा पाई राष्ट्र गेले..... इतका अनर्थ खिळ्याने केला....

मराठी_माणूस

मुंबईच्या बाहेर खूप मोठा असा महाराष्ट्र पसरलेला आहे त्याबद्दल कधी विचार करणार.

खुप महत्वाचा मुद्दा.

मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी; हजारोंच्या जमावाकडून लॉकडाउनच्या नियमांची ऐशीतैशी
------------

https://www.loksatta.com/desh-videsh-news/covid-19-norms-flouted-as-tho…

------------

कायद्याचा धाक हवाच ....

गॉडजिला

रुग्णांची संमती घेऊन सुमारे पन्नास जणांवर असा उपचार केला. त्यातील दहा रुग्ण गंभीर स्वरूपाचे होते. या रुग्णांवर सरकारी नियमांप्रमाणे उपचार सुरू ठेवलेच त्यासोबत दररोज सकाळी सायंकाळी ३० मिलीलीटर देशी दारू दिली. याचे चांगले परिणाम दिसून आले असून जवळपास सर्व रुग्ण बरे झाले. यासंबंधी तज्ज्ञांना समोर योग्य त्या पुराव्यांनिशी बाजू मांडण्याची आपली तयारी आहे. सतत दारू पिणे आरोग्यासाठी घातक आहे. मात्र, औषध म्हणून ते सात ते दहा दिवस द्यायचे आहे, यातून आपल्याला दारूच्या व्यसानाचे समर्थन करायचे नाही, असेही डॉ. भिसे यांनी म्हटले आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/dr-sanjay-bhis…

चौथा कोनाडा

अतिशय दिलासादायक बातमी !
हे चाचणी यशस्वी असेल तर भारत संपुर्ण जगात देशी दारू निर्यात करू शकतो. यातुन इतका पैसा मिळेल की २०३० पर्यंत भारत जगातील महासत्ता बनू शकतो !

सुरिया

घेता रोज देशीची थर्टी
कोरोणा विषाणू मरती
जरी लशीची आवक आटली
वाचवी फक्त कोव्हीटांगो बाटली

.
#देशिलापर्यायनाही

मेट्रो कारशेडला विरोध असलेल्या आरेच्या जागेवर सरकार घरे उभारणार? अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा

---------

https://www.tv9marathi.com/politics/atul-bhatkhalkar-slams-aaditya-thac…

---------------

आता बघू या की, पर्यावरणवादी काय म्हणतात?

दिगोचि

अमेरिकेच्या तुलनेत कानडा, UK आणि ऑस्ट्रेलिया बऱ्यापैकी भिकार देश आहेत.>>> पूर्णपणे असहमत. मी येथे गेली ५३ वर्शे राहत आहे एक वर्श कानडात व एक वर्श अमेरिकेत राहिलो मला या दोन्ही देशपेक्शा ऑस्ट्रेलियाच चान्गला वाटतो.

सॅगी

प्लॅस्टर आणि व्हीलचेअर जिथे गेले तिथेच गेले असणार बघा पर्यावरण प्रेम...

गॉडजिला

देशात करोनानं हाहाकार उडवून दिला असताना आणि यंत्रणाही कमी पडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक करणारी ही वेबसाईट चर्चेत आली नसती तरच नवल... 'द डेली गार्डियन' ई पेपरच्या ओपेड पेजवर हा लेख प्रसिद्ध करण्यात आलाय.

https://www.lokmat.com/national/daily-guardian-article-claims-pm-narend…

प्रसाद_१९८२

बंगाल मधे हिंदूवर सध्या जे अत्याचार सुरू आहेत व त्यांच्या हत्या होत आहेत त्यावर मौन धारण करुन बसलेले भारतातील पुरोगामी आता इजरायलावर टिका करत आहेत. की फिलिस्तीनवर हल्ला करुन इजरायलने कशी मानवतेची हत्या केली आहे वगैरे.

बापूसाहेब

इस्राईल हि फुटोगामी आणि अर्ध सायलेन्सर लोकांची दुखरी नस आहे..!!!

इस्राईल वर आगपाखड करायला ही दोन्ही मंडळी रात्री बारा वाजता सुध्दा तावातावात भांडतील.

पिनाक

अर्ध सायलेन्सर हा शब्द आवडला. या पुढे वापरण्यात येईल.

“स्वतःच्या कौतुकाची टीमकी वाजवण्यातच मशगुल असणाऱ्या राज्य सरकारचे न्यायालयाने वाभाडे काढले”

-------

https://www.loksatta.com/maharashtra-news/covid-crisis-court-slams-stat…

----------

काही टक्के जनता काय म्हणते? हे वाचणे रोचक ठरेल ...

यश राज

महा. चे मा.मु व उप मा.मु यांची सोशल मिडीया - पी.आर. साठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी

महाराष्ट्रातील जनतेने ज्यांना अक्षरशः लाथाडले आहे ते आज सत्तेत येऊन जनतेच्या पैशाची अशी उधळपट्टी करत आहेत.
यांच्याकडे लस खरेदी करण्यासाठी पैसे नाहियेत म्हणे.

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-govern…

नंतर आहेच केंद्रापुढे भिकेचा वाडगा घेवुन तयार वर तोंड वर करुन केंद्रालाच सल्ले द्यायला.

सॅगी

की "माझे राज्य...केंद्राची जबाबदारी..." असं अघोषीत घोषवाक्य आहे सध्याच्या महाराष्ट्र सरकारचं.

त्यामुळे हे सगळं चालायचंच....

राघव

केंद्रानं जर नीट काम केलं तर सल्ले देण्याची गरजच पडणार नाही. केंद्राच्या असल्या वागण्यामुळे आमच्या माननीय कंपाउंडरना मिडियावर जावं लागतं, बाईट द्यायला पत्रकार गोळा करावे लागतात, टिव-टिव करावी लागते. याला पैसा लागणार नाही अशी अपेक्षा आहे का तुमची? केंद्राच्या चुकांची जबाबदारी किती दिवस अजून राज्यसरकारनं घ्यायची आहे?
तुम्ही फारच अन्यायकारक वागताहात ब्वॉ.. आम्ही नाही जा!

ता.क. सामना देखील सो.मिडिया अंतर्गतच येतो, हे ध्यानात घ्यायला हवे जनतेने.

बाकी,
उगाच नाही आमच्या मा.मु.ना कोविडॉलॉजिस्ट ही सोमि पदवी प्रदान झालीये. थोड्याच दिवसांत सोमिवर कसे व्यक्त व्हावे यासाठी कार्यशाळा घेणार आहोत आम्ही, होतकरू तरुणांसाठी. माननीय कंपाउंडर साहेब जातीनं उपस्थित राहून मार्गदर्शन करतील अशी आशा आहे. या सोमिमुळे रोजगारात किती भर पडू शकेल ते तुम्हाला समजायला हवे. लोकांच्या पोटापाण्याची सोय करण्याच्या प्रयत्नांसाठी ६ कोटी काहिच नाहीत.

गॉडजिला

उघड उघड भर नागरी वस्तीत हवाइ हल्ला ?