चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ३)
Primary tabs
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एकेकाळच्या ज्येष्ठ नेत्या के.आर.गौरीअम्मा यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले आहे.
![]()
गौरीअम्मांचा जन्म २१ जून १९१९ रोजी केरळमध्ये अलापुष्षा जिह्यातील पट्टनकड गावात झाला. कॉलेजमध्ये असल्यापासून त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राजकारणात सक्रीय होत्या. १९५७ मध्ये ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये स्थापन झालेल्या पहिल्या कम्युनिस्ट सरकारमध्ये त्या महसूलमंत्री होत्या. केरळमध्ये नंबुद्रीपाद यांच्या सरकारने जमिन सुधारणा केल्या याबद्दल खूप काही लिहिले गेले आहे. पण त्या जमिन सुधारणांमागचा ब्रेन गौरीअम्मा होत्या. पुढे १९६७ मध्ये ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली दुसरे सरकार स्थापन झाले त्यात गौरीअम्मा परत एकदा महसूलमंत्री झाल्या आणि त्यांनी जमिन सुधारणांचे मागच्या वेळी अपुरे राहिलेले काम पुरे रेटायचा प्रयत्न केला.
गौरीअम्मांनी १९५७ मध्ये कम्युनिस्ट नेते टी.व्ही.थॉमस यांच्याशी विवाह केला. दोघेही पतीपत्नी १९५७ आणि १९६७ या दोन्ही वर्षी स्थापन झालेल्या नंबुद्रीपाद सरकारमध्ये मंत्री होते. मात्र यात एक गुंतागुंत आली. १९६४ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. टी.व्ही.थॉमस भाकपमध्ये राहिले तर गौरीअम्मा माकपमध्ये गेल्या. त्यातून त्यांच्या वैवाहिक आयुष्यातही कटुता आली. १९६७ मध्ये दोघेही नंबुद्रीपाद सरकारमध्ये मंत्री होते म्हणून दोघांनाही सरकारी बंगला मिळाला होता. या दोघांना शेजारचे बंगले दिले होते. तोपर्यंत ते विभक्त झाले नव्हते त्यामुळे दोन बंगल्यांमधील भिंत त्यांनी पाडून घेतली आणि एकमेकांकडे जाणेयेणे सुरूच ठेवले. मात्र भाकपने याला आक्षेप घेतला. त्यातून गौरीअम्मांना हृदयविकाराचा झटकाही आला. नंतरच्या काळात भाकप आणि माकप यांच्यात मतभेद वाढले. भाकप काँग्रेसबरोबर गेला तर माकप काँग्रेसविरोधी राहिला. त्यातच गौरीअम्मा आणि टी.व्ही.थॉमस हे विभक्त झाले. टी.व्ही.थॉमस यांचे १९७७ मध्ये निधन झाले तोपर्यंत हे जोडपे परत एकत्र आलेच नाही.
१९८७ च्या केरळ विधानसभा निवडणुका माकपने गौरीअम्मांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करून लढवल्या. मल्याळम भाषेत केर म्हणजे नारळाचे झाड आणि केरळ म्हणजे नारळाच्या झाडांची भूमी. माकपने 'नारळाच्या झाडाच्या भूमीत गौरीअम्मांना नेता बनवा' या अर्थाची मल्याळम भाषेत यमक बनणारी घोषणा माकपची मुख्य घोषणा होती. माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. पण त्यानंतर मुख्यमंत्री करताना मात्र गौरीअम्मांना बाजूला सारून ई.के.नयनार यांना पक्षाने मुख्यमंत्री केले. त्यामुळे गौरीअम्मा नयनार यांच्या मंत्रीमंडळात मंत्री असल्या तरी दुखावल्या गेल्या.
१९९४ मध्ये त्यांना केंद्रीय पॉलिट ब्युरोत स्थान मिळाले नाही. खरं तर त्यांची ज्येष्ठता लक्षात घेता तसे होणे धक्कादायक होते. इतकेच नाही तर त्यांनी नंबुद्रीपाद यांच्या मंत्रीमंडळात जमिन सुधारणेचे काम केले होते. त्याचे श्रेय वर्षानुवर्षे नंबुद्रिपाद आणि पक्षाला दिले गेले पण ते खरे काम करणार्या गौरीअम्मांना मात्र तितके महत्व दिले गेले नाही. त्यामुळे गौरीअम्मांनी केंद्रीय नेतृत्वावर टीका केल्याने त्यांना पक्षातून काढण्यात आले. आपली नक्की काय चूक झाली म्हणून आपल्याला ही वागणूक मिळाली हा प्रश्न त्यांनी वारंवार विचारला. नंतर त्यांनी जनथिय संरक्षण समिती (जे.एस.एस) नावाने आपला पक्ष काढला. या पक्षाने २००१ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसप्रणित यु.डी.एफ शी आघाडी केली आणि गौरीअम्मा २००१ ते २००६ या काळात ए.के.अॅन्टनी आणि ओम्मेन चंडी यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होत्या. त्यांनी शेवटची निवडणुक वयाच्या ९२ व्या वर्षी २०११ मध्ये जे.एस.एस उमेदवार म्हणून लढवली पण त्यांचा भाकप उमेदवाराने पराभव केला. त्यानंतर त्या सक्रीय राजकारणातून निवृत्त झाल्या.
गौरीअम्मांनी ई.एम.एस.नंबुद्रीपाद यांच्यावर नंतरच्या काळात अगदी जहरी टीका केली होती. गौरीअम्मा या एळवा समुदायातील. या समुदायातील वकिलीचे शिक्षण घेतलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. तर नंबुद्रिपाद हे नंबुद्री ब्राह्मण म्हणजे अगदी उच्चवर्णीय नव्हे सर्वोच्चवर्णीय असे म्हटले तरी चालेल. नंबुद्रीपाद यांना केवळ उच्चवर्णीय पुरूषांनाच पुढे आणायचे आहे इतर जातीतील लोकांच्या आणि त्यातही महिलांच्या हिताशी त्यांचे काही घेणेदेणे नाही अशी नेहमी भाजप-संघावर जी टीका करतात नेमकी तीच टीका गौरीअम्मांनी नंबुद्रीपाद यांच्यावर केली.
नंतरच्या काळात त्या माकपमध्ये अर्थातच परत आल्या नाहीत. पण त्यांच्या १०० व्या वाढदिवसाला आणि इतर वाढदिवसांनाही केरळचे मुख्यमंत्री विजयन नेहमी त्यांना शुभेच्छा द्यायला जात असत.
११ मे २०२१ रोजी के.आर.गौरीअम्मांचे तिरूवनंतपुरममधील एका खाजगी रूग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांना श्रध्दांजली.
धन्यवाद या लेखाबद्दल.
https://indianexpress.com/article/cities/mumbai/give-idle-unit-to-firm-…
https://tfipost.com/2021/05/uddhav-government-was-trying-to-suppress-bh…
महीतीपूर्ण लेख. आंबेडकराईट लोकांकडून कम्युनिस्ट पक्षावरसुद्धा कायमच ब्राम्हण वर्चस्वी म्हणून टिका होत आली आहे. कम्युनिस्ट आणि आंबेडकराईट पहीला सामाजिक बदल का पहिला क्रांती यावर निरर्थक काथ्याकूट वर्षानुवर्षे करत आले आहेत. "एंगेल्स भी पढता हूँ, दुर्गापूजो भी करता हूँ" हा बंगाली कम्युनिस्ट लोकांवरचा कायमचा शॉट आहे. एकूणच, कुठेही बहुजन समाजातल्या माणसाला लिडरशिप पोझिशन फंडामेंटली विरुद्ध मुद्दे उचलल्याशिवाय, किंवा आपल्या खर्या मताशी तडजोड केल्याशिवाय मिळत नाही, असे आंबेडकराईट्स म्हणतात.
पण मला हे नाही समजले, संघ आणि भाजपावर होणार्या टिकेबाबत तुमचे काय म्हणणे आहे ? ती टिका व्हॅलिड आहे कि नाही ?
टीका करणारे नेहमीच टीका करतच असतात आणि पूर्वीपासूनच जनसंघ आणि नंतर भाजप हा सगळ्यांचा अगदी आवडता 'व्हिपिंग बॉय' होता. भाजपत एकेकाळी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी त्यापूर्वी दिनदयाळ उपाध्याय वगैरे ब्राह्मण शीर्षस्थानी होते. पण आता केंद्रीय मंत्रीमंडळात किंवा भाजपचे मुख्यमंत्री आहेत त्यात ब्राह्मण किती आणि ओबीसी किती हे बघितल्यास या टीकेला काही अर्थ नाही हे समजेलच.
बाकी अशी टीका भाजपवर करणार्यांचे नेते कोण? तर नंबुद्रीपाद, रणदिवे, गोपालन, चॅटर्जी, भट्टाचार्य वगैरे ब्राह्मण आणि बसूंसारखे कायस्थ. तरी भाजपवर टीका काय करणार की हे फक्त उच्चवर्णीयांचेच नेतृत्व पुढे आणतात. आणि त्या टीकेत काही अर्थ नाही हे उघड झाले तरी तीच टीका करणे मात्र थांबवणार नाहीत.
जनसंघ किंवा भाजपाला "भटांचा पक्ष" किंवा "अर्धी चड्डीवाले" असं हिणवत राहून जोपर्यंत निवडणूक जिंकता येणे शक्य आहे तोपर्यंत ब्राह्मण द्वेष या लोकांना करावाच लागणार आहे. त्यांचेकडे दुसरा पर्याय नाही आहे.
पण जेव्हां त्याचा उपयोग होणार नाही तेव्हां त्यांना ब्राह्मणद्वेष सोडून द्यायलाच लागेल.
ममता व राहूल या दोघांनाही आपण ब्राह्मण असल्याचे जाहीररित्या सांगावे लागणे यातून बरेच काही सिध्द होत आहे. असो.
जर बारकाईने पाहिले तर असे लक्षात येईल की, ब्राह्मणद्वेषाचे सहाय्याने आत्तापर्यंत खूप काही मिळवता आले असले तरी, ब्राह्मणद्वेषाचे हत्यार हळूहळू बोथट व्हायला लागले आहे. ब्राह्मणांना शिव्या घालून आपण खूप चांगले असल्याचा भास आता पूर्वीसारखा निर्माण करता येत नाही. गावाकडे अजूनही ब्राह्मणद्वेषाचा बागूलबुवा उभा करता येतो कारण परिस्थिती पडताळून पाहण्यासाठी गावाकडे ब्राह्मण शिल्लकच राहिलेला नाही. मात्र जेव्हां अशी लोकं शहरात येतात तेव्हां त्यांचा ब्राह्मण लोकांशी संबंध येतो व त्यांचे अनेक गैरसमज गळून पडतात.
मात्र त्यासाठी ब्राह्मणांनी आपले वर्तन व मुख (म्हणजे जीभ) विटाळणार नाही याची काळजे घेतली पाहिजे. तरच या ब्राह्मणद्वेषावर खूप झपाट्याने मात करता येईल. जर ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांच्यात गुणपरत्वे काही फरकच नसेल तर ब्राह्मणांना कोणी व का किंमत द्यावी?
गोंदवलेकर महाराज म्हणायचे की, ब्राह्मणांनी त्यांच्याकडे जे काही चांगले आहे त्याचा अभिमान सोडला पाहिजे. उलट जे काही चांगले आहे त्याबद्दल परमेश्वराप्रती कृतज्ञता ठेवली पाहिजे.
असो.
उत्तर प्रदेशच्या १४ हेल्थसेन्टर प्रमुखांनी सरकारी अधिकार्यांकडून हॅरॅसमेंट झाल्याचे आरोप केले आहेत.
काय बोलाव, ते कळेना
https://indianexpress.com/article/cities/lucknow/14-health-centre-chief…
https://m.lokmat.com/sindhudurga/cricketer-prithvi-shaw-stopped-mumbai-…
ई पास फक्त महत्त्वाच्या कामासाठी दिला जाईल असे निर्देश असताना पृृथ्वी शाॅ मुंबईहून विनापास गोवा फिरायला जात असता त्याला सिंधुदुर्गात आंबोली पोलिसांनी अडविल्यावर एका तासात पास दिला गेला. काही लोक कायद्याच्या वर झालेत ह्या देशात.
भाजपाने ट्विटर वर ही गंमतीशीर पोस्ट केली आहे.
काही गंमती:
१. मोदीजींनी १७ मार्चला स्टेट्स ना वॉर्निंग देऊन कोव्हिड वेव्ह फोरसी केली होती- एक तो गोडा बोलो या चतुर! तुमचे शास्त्रद्न्य सतत म्हणत असतात की आम्हाला बुवा सेकंड वेव्ह इतकी मोठ्ठी येईल कल्पनाच नव्हती. आणि मोदींनी फोरसी केलं ते कधी- तर १७ मार्चला ! १७ मार्चला सांगणे ह्याला "सी इट कमिंग" म्हणतात काय ? १७ मार्चला म्हणे "फक्त" ३०००० केसेस प्रतिदिन वाढत होत्या. सरकारी व्यवस्थेलाच काय, सामान्य नागरिकांना सुद्धा १७ मार्चला कुणकुण लागलीच होती. त्यात कसले डोंबलाचे "सी इट कमिंग."
२. भारत #१- अबसोल्युत अकड्यांबाबत म्हणणे योग्य आहे. मृत्यू आकड्यांसंबंधीत यावरही विचार व्हावा, कि किती रुग्णांचा ऑक्सिजन आणि औषधे न मिळाल्याने मृत्यू झाला ? (जॉर्डन च्या हेल्थ मिनिस्टरने ६ जणांचा ऑक्सिजन अभावे मृत्यू झाल्याने राजीनामा दिला ! https://www.bbc.com/news/world-middle-east-56381870.amp) व्हायरस मुळे मृत्यू होणे आणि ऑक्सिजन अभावी मृत्यू होणे अत्यंत वेगळ्या गोष्टी ! मूळ मुद्द्याला ऍड्रेस केलंच नाही.
३. कुंभ मेळा आणि इलेक्शन रॅली- सरळ सरळ whataboutry ! "ऑ ? कुंभ सोडा, ह्याचे काय ? त्याचे काय ?"
४.व्हाक्सिन किंमत- राज्यावर जबाबदारी ढकलली! केंद्राला का हे माहित नाही की कन्समप्शन सगळे राज्यांतच होणार आहे ? मग जर केंद्राची खरेदी तुटपुंजी पडत असेल, आणि त्यामुळे चढ्या किंमतीत राज्यांना लसी घ्यावा लागल्या तर जनतेचे नुकसान नाही काय ?! म्हणजे राज्य आणि केंद्र हे शेवटी लोकांसाठी काम करत आहेत या गोष्टीला संपुर्ण फाटा देऊन निलाजरे उत्तर दिले आहे !
५. जळत्या चिता कायमच असतात की, उगाच लोक तुम्हाला जळत्या चिता दाखवून घाबरवत आहेत.
अरेवा. चिता कायमच जळत असतात, हा अतिशय प्रॅक्टिकल सल्ला सरकार कधूनच मिळावा. नाहीतर आम्हाला हि गोष्ट समजलीच नसती.
"sigh, if people only had better iq" हे रत्न राहिलंच.
राज्यांनी सारखे सारखे लसी मागितल्यावर "कुछ कुछ होता है ।" हिंदीत सांगायचे तर "जनता के बीच संकीर्ण राजनीतिक धारणा बनती है जो महामारी से निपटने के लिए सरकार के दृष्टिकोण को नुकसान पहुंचाती है."
राज्यांना थेट लसी महागात मिळणार, आणि केंद्राला लसी मागितल्या तर असं काहीतरी होतंय...
बाकी सगळे मुद्दे बाजूला ठेवून सध्या लसीकरणाबद्दल बोलतो
मला या लसीकरणाच्या समाजवादी धोरणावर भयंकर राग आहे. सरकारने मुळातच लसी खुल्या बाजारात आणायला हव्या होत्या. हा निर्णय घ्यायला खूप उशीर केला आहे, हा निर्णय 6 महिने अगोदर व्हायला हवा होता.
जर हा निर्णय सरकारने 6 महिने अगोदर घेतला असता तर अर्धा भारत आज टोचून झाला असता.
कोणत्याही भांडवलंदाराला उत्पादन बँड पडणे परवडत नाही, अश्या परिस्थितीत महिन्याला एका कामागरामागे साधारण 20बते 25 हजाराचे नुकसान भोगावे लागते. ही परिस्थिती बघता माझ्यासारखा मालक असेल तर तो वेळ पडली तर माणशी 5000 घालून सुद्धा कामगारांचे लसीकरण करून घेईल.
हे जर का 6 महिने अगोदर oepn झाले असते तर आत्ता बऱ्याच लोकांनी मार्केटमधून लसी घेऊन अर्धा भारत करोना मुक्त झाला असता.. किमान लसीचा तुटवडा नक्की जाणवला नसता, कारण लोकांनी परदेशातून देखील लस आयात केली असती..
असो, देर आये दुरुस्त आये.
अजून एक
मी मालक असतो तर उलट welfare म्हणून कामगार आणि त्याच्या कुटुंबाचे पण लसीकरण केले असते.. एखादा मोठा कॅम्प arrange करून..
लसीची टंचाई हा फॅक्टर दुर्लक्षित होत आहे. मुबलक लसी उपलब्ध होत्या पण निव्वल सरकारी मशीनरीच्या ढीलाईमुळे उशीर होत आहे अशी परिस्थिती असती तर तुमचे म्हणणे योग्य होते. पण तसे नव्हते.
असहमत.
समाजवाद प्रत्येक ठिकाणी नुकसानकारकच असतो असे नाही. सरकारने लसी खुल्या बाजारात आणल्या असत्या तर श्रीमंत कंपन्या व बडी कॉर्पोरेट रुग्णालये ह्यांनी सांगतील त्या दराने खरेदी करून अगोदर आपल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले असते. म्हणजे सध्या जसे डॉक्टर्स, नर्स, आर्मी,पोलीस ह्यांना प्रेफेरन्स मिळाला त्याऐवजी अन्य लोकांचे उदा. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे कर्मचारी (ज्यातले बहुतेक लोक घरून काम करत आहेत व तुलनेत कमी रिस्क मध्ये आहेत) ह्यांचे लसीकरण अगोदर झाले असते. लस देताना ती ज्या लोकांना जास्त गरज आहे त्यांना अगोदर देण्याची गरज आहे न की ज्यांना ती घेणे परवडते.
लसीचे एप्रूव्हल गरजेचे असणे ह्यात समाजवादी काहीही नाही. कॅपिटालिस्ट अमेरिकेत सुद्धा FDA आहेच.
बाकी ओपन मार्केट असते तर लोकांनी लसी घेऊन जास्त लसीकरणं झाले असते ह्या मागचा तर्क काय आहे ? लस उत्पादन शक्य तितक्या वेगाने होत असेल, आणि जर तयार झालेल्या लसी सगळ्यांच्या सगळ्या इदर निर्यात किंवा सरकारला विकल्या जात असतील तर ह्यात भांडवलदारांनी किंवा मार्केट मध्ये खरेदी करणाऱ्यांनी लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रश्नच कुठून येतो ? तर्क अजिबात पटला नाही. तुमच्यासारख्या मालाकासारखेच सरकार पण आहे, शक्य तेव्हढ्या लसी खरेदी करत लसीकरण करतच आहे.
दोन प्रश्न आहेत,
जर फ्रंट लाईन लोकांचे लसीकरण करायचे असेल तर त्यासाठी सरकार आहेच, आणि सरकारने लस खरेदी करूच नये असे माझे मत मुळीच नव्हते, पण सरकारने एकाधिकारशाही केली ती अजिबात करायला नको होती.
त्याव्यतिरिक्त, दुसरी लाट काहीही प्लांनिंग ना करता आली हे म्हणणे सोपे आहे, पण सरकारने याच लशी वापरून फ्रंट लाईन लोकांचे लसीकरण करून घेतले. दुसऱ्या लाटेत फ्रंटलाईन वर्कर मेल्याचे ऐकण्यात नाहीये.
आणि सरकारने ज्या लशी एक्स्पोर्ट केल्या त्या देखील बाहेरील देशात आत्ता फ्रंटलाईन वर्कर ना तोचण्यासाठीच दिल्या आहेत जितके मला माहीत आहे त्यानुसार. त्यांनी याची पब्लिसिटी केली, ती करावी की करू नये हा भाग वेगळा, पण वैयक्तिक रित्या मला अजूनही तो निर्णय योग्यच वाटतो. आपले फ्रंटलाईन वर्कर सुरक्षित झाल्यावर जगात इतरांना लस देणे आवश्यकच आहे. करण त्यामुळे overall death खूप कमी होतात.
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत mortality बरीच कमी दिसत आहे मला तरी. पहिले 8 दिवस केओस होता, पण बहुतेक सरकारनी परिस्थिती बहुतांशी नियंत्रणात आणली आहे.
पुण्यात माझे असे निरीक्षण आहे की लॉक डाउन झाल्यानंतर पण लोक फिरत होतेच, पण जसा एकदा वाढला, आणि जवळच्या लोकांचे रिपोर्ट पोसिटीव्ह यायला लागले तसे सगळे घाबरून घरात बसले. त्यानंतर करोना आटोक्यात आला. सगळीकडे तसेच होणार आहे.
असो, आपल्याला सरकारवर टीका करायचीच असेल तर डबल ढोलकी आहेतच. पण माझ्या मते देशात मोदींनी आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादीने (मी शिवसेनेला मोजत नाही सरकारमध्ये) बऱ्यापैकी चांगले काम केले आहे.
अजून बरेच काही आहे. आता करोना उताराला लागला आहे.. थोडा भर ओसरला की एक धागा काढून एकूणच RCA करूया.
१) एकाधिकारशाहीचा प्रश्नच काय येतो ?
लस ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि तिचा ऍक्युट तुटवडा आहे. त्यात सुद्धा एकाधिकारशाही वैगेरे भावनिक अपील ने होते काय ? अश्या ठिकाणी सरकारने येऊन देशाच्या सर्व भागांमध्ये समान वाटप करणे ह्यात फक्त idealogue माणूस, कल्पनांनी पछाडलेला माणूस, विरोध करेल. ह्यात कसलीही एकाधिकारशाही किंवा वाईट गोष्ट मला दिसत नाही.
२) दुसऱ्या लाटेत फ्रंटलाईन वर्कर्स मेले नाहीत- मला कल्पना नाही. फ्रंटलाईन म्हणजे फक्त आरोग्यसेवेत कामाला असलेले म्हणत असाल तर त्यांच्या लसिकर्णावर प्रयत्न करून त्यांचे प्राण वाचवले असतील तर अभिनंदन आहेच. पण जर फ्रंटलाईन वर्कर्स ची व्याख्या वाढवली तर यूपी मध्ये इलेक्शन ड्युटीचे कित्येक (७०० लोक जे शाळांमध्ये कर्मचारी होते) लोकांचा मृत्यू झाला.
३)सरकारवर टीका करणे म्हणजे डबल ढोलकी ह्याचा अर्थ तुम्हालाच माहित. मला नाही माहित तुम्हाला काय म्हणायचे आहे ते.
४)लस एक्स्पोर्ट केल्या त्याबद्दल माझे म्हणणे नाही. लस निर्मात्यांसोबतच्या करारांमुळे सरकार बांधले गेले होते. आणि इतर देशांना लस पुरवण्यात वाईट काही नाही, ती अत्यंत उत्तम आणि मानवतावादी बाब आहे. आणि, मी कधीही लस निर्यात केल्या म्हणून सरकारवर टीका केली नाही आहे. मी अजून पण सांगतो, गरीब देशांना भारताने मदत केली तर मला अभिमानच वाटेल. मी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या वेगळ्या अँगल मधून होत्या. पुन्हा चेक केल्या तर लस एक्स्पोर्ट केल्याबद्दल मी अवाक्षर सुद्धा टीका म्हणून लिहिले नाही आहे.
५)पहिल्या लाटेपेक्षा mortality कमी दिसत आहे- हे मत कशावरून काढत आहात मला माहित नाही. पण, माझा स्टॅन्ड पुन्हा क्लिअर करतो. Mortality आणि virus spread ह्या बाबत यश आणि अपयश दोनीही सरकारवर टाकणे अयोग्य आहे. पण:
१. निवडणूक आणि मोठे जमाव
२. ऑक्सिजन तुटवडा आणि पहिल्या वेव्ह नंतर तातडीने दुसऱ्या वेव्हची तयारी न करणे
३. कम्युनल द्वेषभाव या संकटात सुद्धा सतत पसरवणे
इथे दोष आहे.
६) तुम्हाला शिवसेना आवडत नाही म्हणून त्यांचे सरकारच नाही असे म्हणाला तरी मताचा आदर आहे.
Good.
1) माझ्या मते सरकारने फक्त फ्रंटलाईन वर्कर आणि सरकारी कर्मचारी वगैरे साठी लस घेऊन उरलेली लस मार्केटमध्ये ओपन करायला हवी होती. किंवा एखाद्याला इम्पोर्ट करायची असेल तर तशी परवानगी upfront द्यायला हवी होती. सरकारने का म्हणजन ठरवावे मी कोणती लस घ्यायची ते?
मी कोणती लस घ्यायची, कधी घ्यायची वगैरे सगळे सरकारनेच ठरवले, किंवा जर सरकारने सांगितले असते की बाबा पहिल्या 15 कोटी लसी आम्हाला हव्यात, सगळे ज्येना, कोविड वर्कर वगैरे ना द्यायला, ठीक आहे समजू शकतो. बाकी लसीचा acute तुटवडा म्हणजे काय? करोना लास म्हणजे धनुर्वाताचे इंजेक्शन आहे का? पाय कापला की घ्यायला? मुळात आत्ता लाट असताना लसीकरणाच्या मागे लागणे हेच चूक आहे. लसीकरण चालू राहील, पण आधी लाट नियंत्रणात आणून जनजीवन सुरळीत करणे याला प्राधान्य असले पाहिजे. सुदैवाने महाराष्ट्रत तरी सरकारने त्यालाच प्राधान्य दिले आहे, त्यामुळे पहिला oxygen चा तुटवडा सोडल्यास बाकी काहीही प्रॉब्लेम आलेला नाही.
बाकी oxygen सप्लाय म्हणालात तर मला वाटते आपल्याकडे पुरेसा सप्लाय होता, पण पॅनिक मुळे साठेबाजी झाली, ज्याचा परिणाम पुरवठ्यावर झाला.. नाहीतर सगळे ठीक झाले असते.
2) सरकारने हजार वेळेस सांगून देखील अनेक दिडशहाण्यांनी लास घेतली नाही. एक किस्सा सांगतो, एक डेप्युटी कलेक्टर, frontline वर्कर असून सुद्धा स्वतः लास घेण्याऐवजी आधी माझ्या हाताखालच्या लोकांना लस द्या म्हणून आपली लास इतरांना दिली.. 10 दिवसांनी करोना होऊन स्वतः घरात बसला. जर इतक्या वरच्या लोकांना प्रायोरिटी कळत नसेल तर आपण कोणाकडून अपेक्षा करायची?
3) डबल ढोलकी म्हणजे काय ते सांगतो - तुम्ही असाल असे नाही.. सरकार ने लसी बाहेर वाटल्या म्हणून बोंब मारायची, आणि त्याच वेळेस, सरकारला लाट कळली नाही म्हणून ओरड मारायची, आणि त्याच वेळेस lockdown लावला तर आमच्या नोकऱ्या जातात म्हणून पण बोंब मारायची.. इतर सुद्धा असे बऱ्याच गोष्टी सांगता येतील. लोक दोन्ही तोंडाने बोलतात, आपण जनरली सरकारकडे आपल्यापेक्षा जास्त माहिती असते, इतके लक्ष्यात ठेवले की झाले.
4) सोडून देऊ, तुमचे आणि माझे मत सेम आहे
5) निवडणूक ही सरकारची पण मजबुरी होती. समजा ममता रॅली काढत असेल तर भाजप ने गप्प बसावे का? काही गोष्टी या unavoidable असतात. ज्या संख्येने लोक मोदींना शिव्या घालतात, त्या संख्येने ममताला बोलताना मला कोणीही दिसलेला नाही.. आपला तो बाब्या, दुसरे काय
बाकी कम्युनल बघायचे असेल तर पुण्यात मुंढव्यात जाऊन या.. करोनाचा कहर चालू असताना मला आंबे पोचवण्यासाठी फिरावे लगत होते. मुस्लिम वस्तीमध्ये बाजारात तुफान गर्दी, सोशल डिस्टन्स सोडाच, तोंडावर मास्क पण नव्हते. हेच लोक नंतर इतरत्र पण फळे विकायला जाणार आणि फिरणार. का मला राग येऊ नये?
6) शिवसेनेचा administrative level ला काय प्रेसेन्स आहे ते सांगा.. उठाठेवी सोडल्यास..
१. असहमत आहे. कारण विशद केले आहे असे मला वाटते. लसीचा तुटवडा- १२७ करोड सगळ्या देशवासियांना देण्यासाठी, किंवा त्याच्या जवळपास सुद्धा लसी उपलब्ध नाही आहेत. ह्यात सरकारचा संपूर्ण दोष अर्थात नाही. लस इम्पोर्ट करण्याच्या परवानगी बाबत मात्र सहमत आहे. पण, भारतात देण्यासाठी लसींचा प्रायोरीटीने सरकारने लस स्वतः घ्यायलाच पाहिजे, असे मत आहे.त्याच लशी मार्केट मध्ये ओपन करण्याने काय वेगळा परिणाम साधला गेला असता अजून समजले नाही. त्याऊलट सरकारने लसी घेऊन राज्यांमध्ये वाटणे हाच उपाय व्यक्तिशः उत्तम वाटतो. ऑक्सिजन तुट फक्त साठेबाजीमुळे होती हे सुद्धा पटले नाही.
५. केंद्र सरकार कडे निवडणूक पुढे ढकलण्याचे स्वतंत्र्य होते. ते केले गेले नाही. रॅली भरवणे या बाबतीत सर्वच पक्ष दोषी आहेत. कोणी कोणाला किती शिव्या द्याव्यात हे ज्याचे त्याने ठरवावे. फक्त जर टिका योग्य असेल तर समर्थकांनी धावून जाण्याचा, आणि दुसरीकडे बोट दाखवायचा प्रकार थांबवायला हवा. ममता आणि मोदी यांच्या पदामध्ये सुद्धा मोठ्ठा फरक आहे.
मुंढव्याच्या लोकांबद्दलच्या रागात धर्म मिसळून काही कंस्ट्रक्टिव्ह गोष्ट होणार असेल तर नक्की मिसळा,हरकत नाही. मला नाही वाटत तसे. हा मुद्दा उपस्थित करुन पुढे काय करावे- हा प्रष्न पडावा. काय करायचे मुंढव्याच्या मुस्लिमांसोबत ? किंवा, त्यांच्या अश्या वागण्यामध्ये त्यांच्या मुस्लिम असण्याचा काही संबंध आहे काय, नसल्यास धर्म ह्या व्हेरिएबल चा का विचार केला जातो आहे ? सोशल डिस्टंसिंग नोर्म्स बर्याच ठिकाणी तोडले जातात. त्यातले मुद्दामून मुस्लिम डेमोग्राफीचे पुढे करण्याचे कारण समजत नाही. कुंभ मेळ्यात गर्दी केल्याबद्दल हिंदू समुदायाचा राग येण्याचा विचार मला तरी शिवला नाही. मला राग आला तो स्वच्छ आणि सुरक्षित कुंभ अशी जहिरात करणार्या राज्य सरकारचा. मागच्या वर्षी तबलिघी जमात जशी व्हिलीफाय केली गेली तसे कुंभ मेळ्यासोबत कोणीही केले नाही. आणि करु सुद्धा नये. तबलिघी जमातीचे व्हिलिफिकेशन- हा कम्युनल खेळा आहे. आणि हे प्रकार इन्क्रिजिंगली भाजपाकडूनच झालेले दिसतात, कोविड काळात.
६. हम्म.
सरकारने कुंभ साजरा करू नका असे सांगितल्यावर पण जनतेने आम्ही करणारच म्हणत कुंभ केला का?
यात फरक आहे. एक बाजूला सरकारी नियम पळून केलेला कार्यक्रम आहे, तर एक बाजूला सरकारचे नियम फाट्यावर मारून केलेला कायदेभंग आहे.
दोन्ही एकाच तराजूत तोलायचे का हे तुम्हीच ठरवा.
माझ्या माहीतीप्रमाणे, तबलिघी जमात निझामुद्दीनला ३००० च्या सन्ख्येत १३ मार्च २०२० ला उपस्थित होती. आणि दिल्ली सरकारने १३ तारखेलाच, त्याच दिवशी, ५०+ जमावबन्दी केली होती, पण त्याआधीच बाहेरून लोक आले होते. कोविड मध्ये जमाव नैतिकदृष्ट्या अर्थातच चूकीचा आहे, पण तबलिघी जमातीचा मेळावा इतका सरळसरळ कायदेभन्ग करणारा नव्हताच, पुढे कोर्ट सुद्धा म्हणाले की तुम्ही फक्त एका धार्मिक स्थलावर मर्यादा घालू शकत नाही. पण हे लक्शात घ्या, तिथे जमाव फक्त ३००० लोकांचाच होता. कुंभ मेळ्याशी त्याची तुलना केली तर मी नक्की म्हणेन की तबलिघी जमातीला निव्वळ द्वेशातून दुषणे दिली गेली ! कुम्भ मेळ्यात ३०-३५ लाख लोक आलेले. प्रश्न तर हा पण येतो, की ३.००० वर इतक्या त्वेशाने क्रॅकडाऊन करणारे ३०.००.००० लोकांच्या समुदायाला कशी परवानगी देतात.
याबद्दल मला आणखी लिहावे वाटत नाही. माझ्य दृष्टीने या प्रकरणात सरळ द्वेषमूलक राजकारण उघडे दिसते आहे. धन्यवाद.
_/\_
त्यात बरेच फाटक आहेत, तबलीग मेळावा तेव्हा जेव्हा करोना म्हणजे काय हे काहीच माहीत नव्हते.
तिथे आलेले काही लोक सरकारला माहीत नव्हते.
तिथल्या लोकांना करोना झाला आहे हे कळल्यावर पण ते सरकारला आत प्रवेश करू देत नव्हते
ताबलीग मेळाव्यातून आलेले लोक खुलेआम लोकांमध्ये मिसळून करोनाचे वाटप करत होते असेही म्हणायला स्कोप आहे. रत्नागिरीत मिळालेला पहिला पेशंट ताबलीग मधून आलेला होता, आणि रत्नागिरीत पहिला आऊट ब्रेक पण मुस्लिम बहुल भागातच झाला होता.
बाकी काय बोलणार. आपली मते वेगळी राहणारच, कारण माझा अनुभव वेगळा, तुमचा वेगळा.
तबलीगिनीं मुद्दाम पसरवला नसेल परंतु त्यांनी नंतर प्रशासनाची सहकार्य केले नाही. खुद्द अजित डोवाल ला तबलिगी प्रमुखाला भेटायला जावे लागले होते. काही परदेशातील तबलिगीनि परभणी आणि जमखेड येथील मशिदी मध्ये आश्रय घेतला होता. आणि मुख्य म्हणजे मशिदिनीही अगदी खुल्या मनाने परदेशी नागरिकांना आश्रय दिला.
तबलीघी जमातीच्या लोकांनी डॉक्टर नर्सेस ला शिवीगाळ केला त्यांच्या वर थुकले आपले कपडे उतरवून अत्यंत गलिच्छ असे शब्द उच्चारणे चालून जातंय म्हणा कि.
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/tabligh-j…
https://www.indiatvnews.com/aaj-ki-baat/news-tablighi-jamaat-workers-ma…
किंवा
इन्दोर सारख्या ठिकाणी शांतीप्रिय लोकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण करून हाकलून लावलं ते हि चालतंय की?
https://www.indiatoday.in/india/story/violence-against-health-workers-n…
असे वागणारे व्यक्ती दोषी आहेत. त्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हावी.
ज्या व्यक्तीवर हल्ला झाला ती हिंदू असेल तर शिक्षा कायद्याने न होता धर्मावर हल्ला केला गेल्याप्रमाणे व्हायला हवी. धर्मावर हल्ल्याला फक्त मृत्युदंड ही एकच सजा असते.
हो का बरं.
त्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हावी.
हे वाक्य अत्यंत गुळमुळीत आहे.
हूतात्मा स्मारकाची विटंबना केल्या बद्दल समाजकंटकांना अटक होते आणि ते जामिनावर सुटतात.
https://www.ndtv.com/mumbai-news/rioters-who-desecrated-amar-jawan-jyot…
स्पष्ट पुरावा असला तरी केस चालत राहते.
या ठिकाणी श्री योगी आदित्यनाथ सारखाच माणूस पाहिजे.
सव्वा दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले ते या हलकटांकडून आणि मोर्चा काढणाऱ्यांकडून सहा महिन्यात वसूल केले पाहिजेत.
मोर्चा काढल्यावर हिंसा होणारच म्हणणाऱ्या हलकटाना मराठा मोर्चाचे उदाहरण दिले पाहिजे.
प्रचंड मोठा मोर्चा असून कुठे स्मारकाची तोडफोड नाही कि महिला पोलिसांशी गैरवर्तन नाही झाले.
शांतीप्रिय लोकांनी मोर्चा काढला कि त्यात ९९ % वेळेस हिंसा होतेच कारण आम्ही हिंदुस्थानावर राज्य करण्यासाठी आहोत आणि आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही हा दंभ भरला आहे त्यांच्यात. याना आदित्यनाथच पाहिजेत असे आताशा माझे मत होत चालले आहे.
बाकी चालू द्या.
त्यांना जगावर राज्य करायचे आहे....
आणि त्यासाठी हिंदुस्तानातून सुरवात करायची आहे!
अरे तेवढ फार्मरस प्रोटेस्टांकडेपण लक्श द्या, सगळ्यात जास्त नुकसान त्याने केलेय.
https://www.lokmat.com/politics/bjp-mla-atul-bhatkhalkar-criticize-thac…
काय बोलाव, ते कळेना
"India made incorrect assumption, opened up prematurely: Anthony Fauci on second Covid wave"
अगदी हेच मत आमचे होते व आहे. पहिला लॉक्डाउन संपल्यावर अनेक उद्योगपती/व्यापारी अस्वस्थ झाले होते. अनेक मुख्यमंत्र्यांचा धीर सुटत चालला होता. कारण कराचे उत्पन्न. मग निदान आमचा व्यवसाय लॉकडाउन वगळा अशा मागण्या पुढे येऊ लागल्या होत्या. "लॉकडाउन हे उत्तर नव्हे" असे येथील विचारवंत/बुद्धिमंतपण सांगू लागले होते. विविध राज्य सरकारे व केंद्र सरकार ह्या दबावाला बळी न पडते तर नवल.
Focus on curbing mortality, not lockdown: Mahindra tells Maharashtra
Covid-19 lockdown: Ficci urges easier norms for manufacturing to resume
https://www.business-standard.com/article/economy-policy/covid-19-lockd…
पाठीमागे पाहिलं की बऱ्याच गोष्टी चुकीच्या असतात हे लक्षात येणं यात काहीच नवल नाही. हा निर्णय ज्या वेळी घेतला जातो त्यावेळी तो बऱ्याच वेगवेगल्या गोष्टींबद्दल विचार करून मग घेतला जातो. आठवत असेल तर केंद्राने लावल्यानंतर राज्यांनी त्यांचे स्वतःचे लॉक डाउन लावले होते. आणि अनलॉक strategy राज्यानीच ठरवली होती. उद्धव ठाकरे टीव्ही वर येऊन अनलॉक बद्दल बोलत होते. आता ते अयशस्वी ठरल्यावर केंद्राकडे बोट दाखवणे हा निव्वळ पळपुटेपणा झाला.
कोव्हिड टास्कफोर्सच्या ज्या रिसर्चरनी राजिनामा देउन मोदि सरकारवर टिका केली त्यानेच सेकंड वेव्ह येणार नाही अस म्हणलय.
Jameel has been critical of the central government's handling of the pandemic, particularly the second wave. He even targeted the government for their inefficacies in his piece, which he had written for The New York Times in which he had said that scientists in India are facing a "stubborn response to evidence-based policymaking."
However, it is important to note that he’s the same person who, in early January this year, had said that India will not face the second wave. “India’s first wave was quite broad. The peak was not very sharp. As a result, I think India may not have, what we traditionally call, a second wave,” Jameel said.
https://www.newsbred.com/article/virologist-who-quit-critical-of-centre…
शिवाय ह्याच ग्रुहस्थांनी लसिकरणावर संशय घेउन लसीविषयी उदासिनता निर्माण केली
Dr. Jameel says there is no experimental evidence so far that Covaxin will neutralise newly emerging mutants any better.
https://www.thehindu.com/sci-tech/health/a-vaccine-is-a-vaccineregulato…
१७ मार्चला पंतप्रधानांची स्रव मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली.
PM Modi calls meeting of all chief ministers on March 17 over surge in Covid cases
ह्या दिवशी एकूण रूग्णाची संख्या होती- २६२९१, ५९% केसेस महाराष्ट्रातील होत्या. म्हणजे साधारण १५,०००.
शिवाय ही राज्ये तेव्हा स्रवात करोनाबाधित होती.
The Centre says Maharashtra, Punjab, Karnataka, Gujarat and Tamil Nadu continue to report a surge in daily Covid-19 cases. These five states account for 78.41 per cent of the new cases reported from across India.
वरील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मीडिया प्रश्न विचारणार की नाही ?
He expressed concern about the high test positivity rate in Maharashtra and MP. and rising cases in Punjab and Maharashtra. 70 districts of the country witnessed 150 percent rise in the last few weeks. He urged to stop this emerging “second peak” of Corona immediately and warned that if we do not stop this growing pandemic now, then a country-wide outbreak can occur.
https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/maharashtra-active…
https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/pm-modi-meeting-ch…
काहीतरी गडबड झाली आहे खास.
ह्या दिवशी एकूण रुग्णवाढ २६००० असेल. त्या दिवशी एकूण ऍक्टिव्ह लोड होता- २.३४ लाख रुग्ण.
हो रूग्णवाढ २६,०००. विविध राज्य सरकारे ,मोठ्या हॉस्पिटल्स मधील डीन्स्/सिनियर डॉक्टर्स .. कोणालाच अंदाज येऊ नये? की ऑक्सिजनची टंचाई निर्माण होऊ शकते? आम्ही भाजपा समर्थक नाही पण प्रत्येक राज्याला किती ऑक्सिजन पाहिजे ह्यावर पंतप्रधानानी लक्ष ठेवायचे ? वरील राज्यांच्या आरोग्यमण्त्र्यांची काही जबाब्दारी आहे की नाही?
हो, नक्कीच आहे.
पण पहिल्या लाटेत मीडियाने कौतुक कुणाचे केले त्यांच्यावर अपयशाचा फ्लॅक येणार कि. (२:१३ पासून बघा)
अर्थात, हे फक्त मीडिया दृष्टीकोनातून. राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची जबाबदारी आहेच.
https://www.ndtv.com/delhi-news/coronavirus-delhi-oxygen-need-has-dippe…
अशि अचानक परिस्थिती बदलते?
लय गौडबन्गाल आहे. बन्गाल निवडणुकापुर्ती लाट होती की काय? क्रुत्रिम टन्चाई आणि रुग्ण निर्माण करुन जर खर्या गरजुना प्राणाला मुकावे लागले असेल तर कठिण आहे देशाचे
ही कृत्रिम च टंचाई होती. ज्यावेळी बंगाल मध्ये निवडणुका सुरू होत्या त्यावेळेस महाराष्ट्र, दिल्ली सारख्या राज्यांकडून ऑक्सिजन साठी सारखी ओरडा ओरड चालू होती. नंतर मुद्दा हायकोर्टात गेल्यावर व ऑडिट ची मागणी झाल्यावर ही राज्ये ठिकाणावर आलीत आणि आता कोरोना च्यां केसस व ऑक्सिजन ची मागणी पण घटली.
या कृत्रिम टंचाई मुळे अनेक जीव गेले त्याबद्दल या राज्याच्या मंत्रिमंडळाला ना सोयर ना सुतक.(political vultures)
खरच काळंबर असू शकतं..
फार फेच्ड कन्स्पायरसी थिअरी.
दिल्ली चा कर्व्ह बघा. तेव्हा काय परिस्थिती होती आता काय आहे नीट बघा.
ब्राह्मणद्वेषाचे हत्यार हळूहळू बोथट व्हायला लागले आहे.>>> हे विधान मला पटले नाही. माझ्या ओळखीच्या अनेक ब्राह्मणानी भारत सोडून दिला आहे कारण त्याना त्यान्च्या मुलान्ची काळजी आहे. यान्च्या उद्योगात प्रत्येक वेळी अडथळा आलेला आहे. मराठा आरक्षण झाल्यास त्याचे परिणाम ब्राह्मणवर्गाला तापदायक होतील. अनेक मराठा नेत्यानी ब्राह्मणद्वेशाला खतपाणी घातले आहे. ब्राह्मणद्वेषाचे हत्यार नुसते बोथट न होता नश्ट झाले पाहिजे.
माझे विधान १९४७ साली असलेल्या ब्राह्मणद्वेषावर तुलनात्मक दृष्ट्या आधारित आहे.
मला येवढेच म्हणायचे आहे की, आज फक्त ब्राह्मणद्वेष करून, म्हणजे त्याचा उपयोग हत्यारासारखा करून, त्या आधारावर कोणीही सत्तासंपादन करू शकत नाही की भरघोस मते मिळवू शकत नाही.
किंवा सत्तेत असलेल्या मुमंच्या जागी बदली मुमं आणू शकत नाही....
ब्राह्मणांबद्दल प्रेम वाढले आहे असे मी म्हणालेलो नाही.
😁
माझ्या ओळखीच्या अनेक सर्वजातीय लोकांनी भारत सोडुन दिला आहे. व संधी मिळाली तर बहुतांश लोक भारत सोडतीलही, त्यासाठी तुमची जात व धर्म ही बाब फार मॅटर करणार नाही...
माझ्या समजूतीप्रमाणे भारतात संधी नसतात त्यामुळे लोकं देश सोडून जातात.
त्यांचे भारतावर प्रेम नसते किंवा जातीपातीचा त्रास होतो म्हणून ते देश सोडून जातात असे नसावे.
निदान माझे बरेचसे नातेवाईक तरी इथे त्रास होतो म्हणून तिकडे गेलेले नाहीत; तर तिथे जास्त स्कोप आहे म्हणून तिकडे गेले आहेत. मात्र तिथेही ठराविक उंची गाठल्यावर ग्लास सिलिंगला तोंड द्यायलाच लागते.
असो.
दिगोची यांच्याशी सहमत.
भारताचे माहीत नाही.. पण निदान महाराष्ट्रात तरी ब ग्रेडी संघटना आणि काही विचारमंच ( अनिता पाटील वगैरे) यांनी काही वर्षा पूर्वी अक्षरशः धुमाकूळ घातला होती. अगदी मी सुद्धा यांच्या लॉजिक समोर काही दिवस संमोहित झालो होतो.. पण त्यानंतर हळूहळू त्यांच्या बोलण्यातील फोलपणा लक्षात यायला लागला.
हिंदूंमध्ये फूट पाडणे, ब्राम्हणद्वेष यावर त्यांचा पूर्ण जोर होता. तसेच मुस्लिम लोकं ही आक्रमक नसुन ते इथलेच आहेत, आणि तेच आपले खरे सोबती आहेत अशा प्रकारचे तत्वज्ञान पाजले जात होते.
त्यासाठी लाल पिवळे गुलाबी १०० पानी ग्रंथ प्रत्येक ST स्टँड वर प्रकाशित केले जात होते. या सर्व गोष्टींना तत्कालीन राजाश्रय ( सरकारचा आशीर्वाद) होता .. आता ते राजाश्रय देणारे "जाणते राजे" कोण हे सर्वश्रुत आहे.
मी हाच मुद्दा मांडतोय. लोकांना जास्त काळ फसवता येत नाही.
सध्या देशभर जे हिंदूंच्या मतांसाठी ध्रुवीकरण करत आहेत त्यांना हे पुढे खूप जड जाणार आहे. ज्या हिंदूंना आज त्याची अजिबात झळ बसत नाही त्यांना पहिले झटका बसणार आहे.
कसे?
ते वाचायला आवडेल.
काही लोक कायद्याच्या वर झालेत ह्या देशात.>>> हे अनेक वर्शे चालु आहे. गेल्या वर्शी ऐन कोरोना काळात बागबान नावाच्या एका कुटुम्बातल्या २३ जणाना एका आएएस अधिकार्याने परवानगी दिली होती. तो अधिकारी आता पुण्याचा पोलीस अधिकारी आहे. या कुटुम्बाचे व काही नेत्यान्चे जवळचे सम्बन्ध असल्याने हा अधिकारी हे करु शकला कारण त्याला माहित होते त्याच्या विरुद्ध काही कारवाई होणार नाही आणि तसेच झाले. ई पास हा फक्त कॉमन माणसासाठी असतो. व तो त्यन्चाकडे नसल्यास त्याना हजारो रुपये लाच म्हणुन पोलीसाना द्यावे लागतात ही वस्तुस्थिति आहे.
तत्कालिन गृहमंत्री साहेबांनी देखिल " माणुसकीच्या नात्याने " एका बड्या कुटुंबास महाबळेश्वर ला फार्महाऊस वर जाण्याची संमती दिली होती..!!!
ह्या कुटुंबाच्या व्यवसायात अनेक कुटुंबांनी ठेव ठेवली होती , ती जवळ जवळ बुडल्यात जमा. त्यांच्या कडे " माणुसकीच्या नात्याने " कोण पहाणार
https://www.mahamtb.com/Encyc/2021/5/13/Govt-appoints-special-Counsel-i…
व्हॅक्सीन घेतल्यावरही त्रिसुत्री पाळावी लागेल असे ऐकले होते
https://www.loksatta.com/desh-videsh-news/if-you-are-fully-vaccinated-y…
२०५ वॉर रूम मध्ये काम करणाऱ्यांसाठी नेमणूक केलेल्या लोकांपैकी फक्त सोळा मुसलमान लोकांच्या नावांची यादी नाचवत तेजस्वी सूर्य आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तमाशा केला. म्हणे हे मुसलमान लोक बेड स्कॅम करत आहेत!
त्याच्या स्टंट नंतर त्या १६ लोकांना निलंबित करण्यात आलं. पण पुढे तपासात लक्षात आलं की २०५ पैकी या १६ जणांवर फोकस करण्यासारखे काहीच नाही आणि सूर्याचा धांगडधिंगा निराधार होता, मग त्या १६ जणांना पुन्हा कामावर पचारण्यात आले ! त्यातल्या पाच जणांनी आपल्या धर्मावरून आपल्याला लक्ष करण्यात आले म्हणून परतण्यास नकार दिला. त्यापुढे, व्हाट्सऍप वर ह्या सोळा जणांना अतिरेकी म्हणणारे मेसेज लगेच व्हायरल झाले, त्यापेक्षा भयंकर म्हणजे यांचे नंबर सुद्धा लीक केले ! ह्यांना लगेच धमक्यांचे आणि शिवराळ फोन्स आले.
म्हणजे, आधीच हेल्थ वर्कर्स ची कमी असताना हा उद्दाम माणूस दंगा करतो, आणि नंतर माफी मागताना सुद्धा कॅमेरा नको आणि रेकॉरडींग नको म्हणतो ? इतक्या संकटाच्या काळात सुद्धा, हेल्थ कर्मचार्यांसोबत कम्युनल खेळ करायचे सुचतात या सूर्याला !
अक्कलशून्य सूर्याचा तीव्र निषेध.
https://youtu.be/cC5RRPNhcg4
ह्या घटनेविषयी आत जे काही बाहेर येते आहे, ते खरे असेल (आणि तसे ते दिसतेच आहे), तर तेजस्वी सूर्याचा खरोखरीच निषेध केला पाहिजे. खाटांचा काळाबाजार होत होता हे कुणीही अमान्य केलेले दिसत नाही. पण त्याचे सर्व उत्तरदायित्व एका धर्माच्या संबंधित लोकांच्या माथ्यावर फोडणे, अतिशय चुकीचे आहे. आणि त्याच्या ह्या कृतिमुळे मूळ दु:कृत्याकडे आपोआपच दुर्लक्ष झालेले आहे.
माझ्या मते तेजस्वी सूर्य॑ अतिशया वाचाळ व मूर्ख माणूस आहे. अर्थात त्याला भाजपामध्ये नितीन गडकरींची ह्याच बाबतीत जोरदार काँपिटीशन आहे. स्वतःच्या तथाकथित 'इनोव्हेटिव्ह'पणाविषयी फुशारक्या मारणारा दुसरा कुणीही नेता माझ्यातरी पहाण्यात नाही.
"If you are with Modi you are with India, if you are against Modi you are anti India" असे ट्विटर वरच्या ट्रोल सारखे बोललेला तेव्हा पासूनच सूर्याबद्दल साशंक होतो. ही घटना म्हणजे मात्र कडीच केली त्यानं.
नितीन गडकरींबाबत माझे मत आजवर अनुकूल राहिले आहे.त्यामानाने आपले काम सोडून इतर गोष्टींवर सातत्याने बडबड करत नाहीत असे त्यांच्याबद्दल वाटत आले आहे. तुम्ही म्हणता तसं बढाई वैगेरे माझ्या पाहण्यात आलं नाही. त्याबद्दल माहिती मिळाल्यास वाचायला आवडेल.
च्या टाइपचे लोक बाळगावे लागतात किवा आयात करावे लागतात.
दुर्दैव भारतिय लोकशाहिचे..
https://www.loksatta.com/maharashtra-news/covid-crisis-in-india-coronav…
प्रधानमंत्री, केंद्र सरकार जागेवरच आहे, पण त्यांचं अस्तित्व दिसणं महत्त्वाचं आहे. अदृश्यपणे काम करुन चालणार नाही. हा देश सध्या संकटाच्या काळात फक्त रामभरोसे पद्धतीने सुरु आहे. ज्या पद्धतीने गंगा, यमुनेत प्रेतांचा खच पडलेला आहे, मृतदेह वाहून येत किनाऱ्यावर लागली आहेत. त्यांच्यावर व्यवस्थित अंत्यसंस्कार ही करता येत नाही. हे असं याआधी देशात कधीच झालं नव्हतं,” असं राऊत म्हणाले होते.गंगेत मृतदेह सोडला तर मोक्ष मिळतो अशी खूप जुनी श्रद्धा आहे. लहान मुले, सर्पदंशाने मरण पावलेले, साधु इ. चे दहन न करता नदीत मृतदेह सोडण्याची परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहे. त्यामुळे कोरोना काळात गंगेत मृतदेह सापडणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. १०-१२ मृतदेह गंगेत सापडले म्हणून लगेच गंगेत प्रेतांचा खच पडलाय वगैरे मुर्खासारखे बरळणे हे मुद्दाम वातावरण भडकावणे आहे.
https://www.google.com/amp/s/amp.scroll.in/article/700489/why-did-100-d…
कुथुन कुथुन कुठुन कुठुन भारतात त्यातही भाजपा शासीत राज्यात खुप दुरावस्था आहे असे दाखवायचा प्रयत्न करत आहेत.
त्याना क्रान्ती आणुन सत्ता पालट घडवायचा आहे.
पण आधिच्या सत्ताधार्यानी लोकान्चे खुळ्खुळे करुन ठेवले आहे... लोकाना निमुट बसायची सवय लावली आहे. आहिन्सा, सद्भवना, दुसरा गाल पुढे करणे इत्यादी मार्गे फक्त सहन करायची शक्ती वाढवुन ठेवली आहे. त्यामुळे साठ वर्ष निवान्त निवडुन येता आले. पत्रकार म्यानेज केले की झाले.
आणि भारतियाना शिस्त नाही, भ्रष्टाचार म्हणजे शिष्टाचार वाटतो. धर्माचा पगडा. निधर्मी राज्य म्हणताना जास्तच धार्मिक झाले आहेत सगळे.त्यामुळे जे चालले आहे ते बदलायला खुप वर्ष लागणार आहेत.
त्या ट्विट मध्ये २०१५ चे फोटो वापरण्यात आले आहेत .
https://www.thequint.com/news/webqoof/2015-photos-of-dead-bodies-floati…
https://www.boomlive.in/fact-check/fake-news-viral-photo-ganga-river-de…
असे मृतदेह गंगेत नेहमीच दिसतात. त्या मृतदेहांचा कोविडची संबंध जोडणे अयोग्यच आहे.
ऑक्सिजनची आवश्यकता असणारे भारतीय जमिनीवर पडले असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याशिवाय, या व्यंगचित्रामध्ये हिंदू दैवतांवर टीका करण्यात आली आहे. ३३ दशलक्ष हिंदू देवही ऑक्सिजन तयार करू शकत नाही असे या व्यंगचित्रात म्हटले आहे.
https://maharashtratimes.com/international/international-news/charlie-h…
मग ?
आहेच प्रॉब्लेम्स भारतात एवढे . ते फ्रेंच प्रॉब्लेम्स ला पण असेच कुटतात
पण भारतवाले त्यांच्या ऑफीसमधे जावुन गळे कापणार नाहीत. हे त्यांना माहित आहे.
तरी पण त्यांनी ते पैगंबर चे चित्र छापलेच .
वर उल्लेख केलेली चित्रे कुठे सापडतील? इथे द्यायची नसल्यास व्य नी करा.
हो, ह्या बद्द्ल नुसते वाचले आहे , प्रत्यक्षात ते चित्र काय होते हे माहीत नाही.
ithe bagha
विविध धर्मातील देव देवतांवर टीका केली की प्रसिद्धी मिळतेच शिवाय बुद्धिमंतांकडून कौतुकही होते. उद्या गिरीश कुबेर/कुमार केतकर्/रविश कुमार ह्यांचे कौतुक न करतील तर नवल.
आता ३३ कोटी देव मदतीला येणार नाहीत हे सांगायला ह्यांची गरज नाही. ईटली/फ्रांस्/अमेरिकेतही अनेक करोना बळी गेले , तेथे येशू वा आणी कोणी मदतीला आला नाही. पण लोकाना भडकवायचे व सेक्युलरपणाचा आव आणायचा..
चूक. काही धर्मातील देवांवर टीका केल्यावर डायरेक्ट जन्नत चे तिकीट मिळते. एखाद्याचा गळा कापायला त्याधर्मातले धर्मवीर मागे पुढे बघत नाहित..
म्हणजे कुणी हिंदू देवतांचा अपमान केला मग आपण त्यांना सोडून देतो का ? जर fire पॉवर दिली तर असं आपण नाही करणार ?
कि दुखऱ्या जागीची टीका आपल्याला सहन नाही होत ?
हे समजले नाही. कोण देणार हिंदूंना अशी 'फायर पॉवर'?
Secular कुठं आलं आता इथे . देव (कुठलाही ) आला कि का बरं सेकयुलरपणा येतो ?
इथले लोक Jebus Jesus करत नाही . Jesus चे शेकडो कार्टून्स आहेत . पैगम्बरा चे पण काढले . हिंदू चे पण ...
ते कार्टून एक व्यंग आहे , हे पण समजावणे म्हणजे मग अवघडच आहे .
नास्तिकांनी हिंदू देवांवर टीका केली म्हणून आम्हाला काहीही त्रास होत नाही.
एखादा माणूस हिंदूंच्या देवांसारखीच इतरांच्या देवांवर पण टीका करत असेल तर त्याला त्याचा नास्तिकपणा म्हणून सोडून देण्याइतके हिंदू सहिष्णू नक्कीच आहेत.. त्यात सुद्धा ही टीका तर खूप संयत भाषेत आहे.
मला एम एफ हुसेन मिळाला तर त्याचा एक पाय कापायला नक्कीच आवडेल. पण म्हणून सरसकट तोच न्याय मी सगळ्यांवर का लावू?
लक्ष्यात ठेवा, गीतेत कृष्ण सांगून गेला आहे, कृती जितकी महत्वाची आहे त्यापेक्षा जास्त त्या कृतीचे परिणाम आणि त्या मागचा हेतू असतो. एखादी गोष्ट पाप किंवा पुण्य अशी सरळ नसते, तर ज्या परिस्थितीत ती होते, ती परिस्थिती पाप पुण्य ठरवते.
तेव्हा उगीच तुमचा अजेंडा रेटत इथे बसू नका, आम्हाला या वादात पडायला कोणालाही इंटरेस्ट नाHइ.
वास्तविक, पाश्चिमात्य देशांत सर्वसाधारण जनता तसेच त्या देशांचे प्रमुख, अगदी निधर्मी आहेत, हे 'भारतीय हिंदू अतिशय धर्मकडवे आहेत' ह्याइतकेच चुकीचे विधान आहे.
काही ठळक उदाहरणे:
१. डेव्हिड कॅमेरॉन ह्यांनी ते यू. के. चे पंतप्रधान असतांना, 'आमचा देश क्रिश्चियन आहे' असे उघडपणे म्हटले होते.
२. अमेरिकेत तर धार्मिक रीतिरीवाज (उदा. गर्भपातावर) मोठा चर्चेचा विषय होतो, विशेषतः निवडणूकांच्या वेळी.
३. अमेरिकन प्रेसिडेंट धर्मगुरूंच्या 'वेक' ला जातात.
४. आयर्लंडमधे एका भारतीय स्त्रीला, तिच्या व बाळाच्या स्वास्थ्यासाठी गर्भपात जरूरीचा होता, तो त्या देशाच्या कॅथॉलिक धर्मरीतींचे उल्लांघन करत असल्या कारणाने, कायद्याने नाकारण्यात आला. शेवटी त्या आजारांत तिचा मृत्यू झाला. आयर्लंड हा देशच कॅथॉलिक आहे, तो निधर्मी नाहीच.
५. जर्मनीच्या सत्तारूढ पक्षाचे नावच मुळी 'क्रिश्चियन डेमॉक्रॅटिक पार्टी' असे आहे.
आणि ते दशकांनू दशके, आयर्लण्ड (कॅथॉलिक) व उ. आयर्लण्ड (प्रोटेस्टंट) नक्की काय चालले आहे, बरे? त्यावरून १९६९-१९९८ ह्या सुमारे तीन दशकांच्या काळांत दोन्ही बाजूंमधे धुमश्चक्री होत होती. ह्या कालखंडास तेथे 'द ट्रबल पीरीयड' असे संबोधले जाते. आता, त्या उघड दंगली संपल्या असल्या, तरी मूळ वाद चिघळतोच आहे. परवाच फायनीन्शियल टाईम्सच्या वीकएंड- पुरवणीत, बेलफास्टला रहाणार्या मॅरीयन इलियट ह्या कॅथॉलीक धर्माच्या इतिहासकाराचा, तेथे कॅथलिकांची कशी घुसमट होत रहाते, ह्याबद्दलचा अतिशय विस्तृत लेख वाचनांत आला.
तेव्हा, युरोपांत तेव्हढाच 'निधर्मी' पणा आहे, जेव्हढा भारतांतील हिंदूंत आहे. 'त्या' व्यंगचित्राची, समाजमाध्यमांतील काहीजणांनी केलेली उठाठेव सोडून, इतर कुणीही कसलीही दखल घेतलेली नाही व ती तशी घेतली नाही, हेच बरोबरही आहे. पण, उगाच युरोपीयन्स अतिशय निधर्मी आहेत व भारतीय हिंदू धर्मनिष्ठ कडवे इत्यादी म्हणणे, हे वास्तवाचे भान नसल्याचे लक्षण आहे.
हिंदू अजिबात कडवे नाहीत. त्यांची मंदिरे पाडून तेथे एखादी वास्तू उभारली तरी ते सहन करतात.
प्रदीप
बऱ्यापकी सहमत ...
लोकशाही वादी पाश्चिमात्य सरकार आणि प्रथांवर ख्रिस्ती प्रभाव आहेच हे खरे.. कारण साधे आहे येथेख्रिस्ती बहुल आहेत
पण त्याचे फार अवडंबर वाटत नाही हा फरक फक्त ( आयर्लंड मधील गर्भपात बंदी सारखी गोष्ट सोडली तर )
पण गंमत म्हणजे भारतात असताना वाटायचं कि प्रत्येक ख्रिश्चियन दार रविवारी इमाने इतबारे चर्च ला जात असेल पाश्चिमात्यदेशात... इकडे आल्यावर कळले कि तसे काही नाही
यात युनाइटेड स्टेट्स मध्ये तर गॉड अँड गन हे समीकरण आणि टोकाला जायचे हे जर जास्तच प्रखर पने दिसते त्यामानाने ते कानडा, ऑस्ट्रेलिया आणि नू झीलंड मध्ये कमी
म्हणुन एंड रिझल्ट सगळ्या जगासमोर आहे.असो.
'द वीक' या नियतकालिकाने २४ जानेवारी २०१६ च्या अंकात निरंजन टकलेने सावरकरांवर ‘Lamb Lionised’ नावाचा लेख लिहून सावरकरांविषयी बरेच खोटेनाटे लिहिले होते. त्यावर न्यायालयीन लढाई झाली आणि शेवटी 'द वीक' ला त्या लेखाबद्दल माफी मागावी लागली.
एकीकडे मदर तेरेसावर 'असंतांचे संत' हा लेख लिहिल्यावर दुसर्या बाजूकडून त्याविरूध्द काही प्रतिक्रिया उमटायच्या आधीच 'भावना दुखावल्या जातील' या गृहितकातून अख्खा अग्रलेख मागे घेतला जातो. इतकेच नव्हे तर तेच गिकुकाका पदाचा दुरूपयोग करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप असलेल्या आणि सतत जामिनासाठी अर्ज करणार्या एका महाभागाचे लेख वरचेवर प्रसिध्द करतात. आणि दुसरीकडे अशाप्रकारचे लेख वारंवार वेगवेगळ्या लेखकांकडून लिहिले जाऊनही ५ वर्षे न्यायालयीन लढाई लढावी लागते. असो.
उत्तम बातमी!
हा टकले अत्यंत नॉटी निधर्मांध आहे.
बहुतेक हे न्यायालयीन निर्णयाने नाही, तर विक ने स्वतःहून थकून/कंटाळून केले आहे.
गिरे तो भी टांग उपर.
कशाबद्दल बोलत आहात ?
याला मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक जालावर प्रसिद्धी दिली पाहिजे. असे झाले तरच असल्या हलकटाना थोडा तरी चाप बसेल.
ते आपले तोंड बंद करतील अशी माझी फारशी अपेक्षा नाहीच
हा लेख internet वर उपलब्ध आहे . तो लेख retract नाही केला आहे .
https://www.theweek.in/theweek/cover/life-and-legacy-of-veer-savarkar.h…
काय खोटे नाटे लिहिले आहे त्यावर प्रकाश टाकावा
भीषण वास्तव
दारू एम आर पी ला/ कितीही किमतीला घ्यायची लोकांची तयारी आहे
पण औषधे मात्र स्वस्तात/सवलतीत पाहिजेत
आणि
लस तर फुकटच पाहिजे.
सहमत आहे
गाफील गोवा
https://indianexpress.com/article/india/goa-hospital-covid-death-oxygen…
खूप generalize करू नका . सगळी कडे लस फुकट आहे . लवकर हवी असेल तर पैसे मोजा अस काही होऊ शकते. पूर्ण भारतात टॅक्सेस आहेत . काही लोकांनी लस नाही घेतली कि त्रास सर्वांना होण्याचा धोका आहे .
दारू चा आणि याचा काय संबध ?
खूप generalize करू नका . सगळी कडे लस फुकट आहे . लवकर हवी असेल तर पैसे मोजा अस काही होऊ शकते. पूर्ण भारतात टॅक्सेस आहेत . काही लोकांनी लस नाही घेतली कि त्रास सर्वांना होण्याचा धोका आहे .
दारू चा आणि याचा काय संबध ?
अगदी सहमत.
राज्यसरकार ने 45 वर्षा खालील लोकांचे लसीकरण बंद केले अशी घेषणा केली आहे. तरी पण मुंबई मधील काही लसीकरण केंद्रा वरती 45 पेक्षा कमी वय असणाऱ्यांच लसीकरण चालू आहे.
अभिनंदन! पंतप्रधान होण्याच्या दिशेनं तुम्ही पाऊल टाकलं; गोपीचंद पडळकरांचं उद्धव ठाकरेंना पत्र
--------
https://www.loksatta.com/maharashtra-news/gopichand-padalkar-letter-to-…
-----------
काय बोलावं, ते सुचेना ....
यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का?; फडवीसांचा सोनियांना सवाल
-----------
https://www.loksatta.com/maharashtra-news/devendra-fadnavis-letter-to-s…
------------
काही टक्के जनतेला, फडणवीस यांचे म्हणणे पटणार नाही...
मोदी ला डिफेन्ड करण्याशिवाय यांच काही काम नाही.
मोदी ला
आपलं वय किती? आपला अनुभव किती? आणि आपली लायकी किती?
जो सातवी पास आहे की नाही ह्याचाही पत्ता नाही व अनेकांचा मृत्यु या एका गोष्टीखेरीज इतर प्रत्येक बाबतीत अपयशी ठरला आहे अशा माणसाला संबोधन काय वापरायचे ह्याची काळजी करून आपली लायकी दाखवायची खाज फार! =))
नुसती चार बुकं शिकलं कि अक्कल येते असे नव्हे.
साठ कोटी भारतीय जनतेने ज्याला बहुमताने दोनदा निवडून दिले आहे अशा नेत्याबद्दल इतके अनुदार उद्गार काढून आपण आपली लायकी मात्र दाखवून देताय.
असो
मोदींना आदरार्थी बहुवचन नाही वापरले तरी प्रॉब्लेम आहे. पण इतरत्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फावड्या, पेंग्विन, खुजलीवाल म्हणले तर चालते.
कोणत्याही नेत्याबद्दल इतके अनुदार उद्गार काढून आपण आपली लायकी मात्र दाखवून देता आहात याचे भान ठेवावे .
बाकी चालू द्या
मुळात या नेत्याबद्दल आशुतोष, संजय सिंह या नालायक विकृतांनी मुद्दाम खोटंनाटं पसरवून त्यांच्या प्रतिमाभंजनाचा अयशस्वी प्रयत्न केला. बहुसंख्य जनतेने या आरोपांवर कणभरही विश्वास ठेवला नाही. जो खरंच किमान एक दोन बुकं शिकलेला आहे, त्याने असले अनुद्गार काढण्याआधी निदान हे आरोप खरे आहेत का खोटे याची स्वतः शहानिशा करायला पाहिजे होती. मिपावर सुद्धा पप्पू आहेत हे पुनःपुन्हा सिद्ध होतंय.
https://www.esakal.com/global/cairn-energy-sues-air-india-to-enforce-12…
यात एअर इंडिया चा संबंध नाही. भारत सरकारचे देणे आहे. आणि एअर इंडिया भारत सरकारच्या कंपनी असल्याने तिला यात ओढले जात आहे. माझ्या मते असं कितपत करता येते याबद्दल शंका आहे. तसं म्हणायचं तर फक्त अमेरिकन सरकारवर दबाव आणण्यासाठी अमेरिकन संस्थांची भारतातली खाती पण liquidate करता येऊ शकतातच की.
कर तेव्हाही निषेधाहार्यच होते, अन आताही, ताबडतोब मागे घ्यायला हवे! जे(बका)टली काकांचा हा निर्णय चुकिचाच. (सेकंड होमलोनव्याजावर कॅप घातली हा ही चुकिचाच)
राजीव सातव यांचे कोरोना व त्यातून उद्भवलेल्या न्यूमोनियाने निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. कॉंग्रेसमधील काही मोजक्या सभ्य, शांत, चांगल्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांना श्रध्दांजली.
https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/congress-leader-mp-r…
कुठे करोनाकाळात त्या एका साध्या गुंडनेत्यांच्या अंत्ययात्रा आणि कुठे असे हिरे _/\_
तस माझा राजकारणाचा अभ्यास कमी आहे,पण महाराष्ट्रातील क्रांग्रेसमध्ये इतका मितभाषी आणि कर्तृत्वान नेता होता हे आता कळाले.नेते अक्षरशः रडत आहेत.पाहून भरून आलं.
कुठे करोनाकाळात त्या एका साध्या गुंडनेत्यांच्या अंत्ययात्रा आणि कुठे असे हिरे _/\_
तस माझा राजकारणाचा अभ्यास कमी आहे,पण महाराष्ट्रातील क्रांग्रेसमध्ये इतका मितभाषी आणि कर्तृत्वान नेता होता हे आता कळाले.नेते अक्षरशः रडत आहेत.पाहून भरून आलं.
अनिल थत्तेंची ही मुलाखत पाहिली. बर्याचशा गोष्टी पटण्यासारख्या वाटल्या.
अनिल थत्तेंबद्दल व त्यांच्या या व्हिडिओ बद्दल एक टिप्पण्णी.
मुस्लिमबहुल मलेरकोटला पंजाबचा 23 वा जिल्हा म्हणून घोषित, मुख्यमंत्र्यांचं ईदच्या निमित्ताने गिफ्ट
----------
https://www.google.com/amp/s/www.tv9marathi.com/national/punjab-govt-ha…
------------
""नाहीतर तर तुमच्या अडचणी वाढतील"; सलमान खानचा संतप्त इशारा | salman khan warning said please do not participate in piracy serious action would be taken by cyber cell kpw 89 | Loksatta" https://www-loksatta-com.cdn.ampproject.org/v/s/www.loksatta.com/manora…
-----------
मी तरी हिंदी चित्रपट बघणे कधीच सोडून दिले आहे...
सर्सकटीकरण... दुसरं काय.
संजय दत्तला माफी दिली आणि मी हिंदी चित्रपट सृष्टी बद्दल माहिती घ्यायला सुरूवात केली.
जी काही माहिती मिळाली, ती बघून मी तरी, माझ्या घामाचा पैसा मी हिंदी चित्रपट बघण्यासाठी मोजत नाही ....
https://m.youtube.com/watch?v=d0XQj7H3Vd
https://m.youtube.com/watch?v=q4jP1LyOa_8&t=1s
https://m.youtube.com/watch?v=5HIQl16gN_c
https://m.youtube.com/watch?v=d0XQj7H3Vdk#
जब 'बॉबी' के फायनेंस के लिए हाजी मस्तान की चौखट पर पहुँच गए राज कपूर
आपल्यामुळे फार मोठ्या मोहाच्या विषापासुन माझा बचाव झाला आहे. तुम्हाला माझ्याकडून एक वोडका मार्टीनी फ्री.
मी फक्त साऊथ चे डब पिक्चर बघतो. जेंटलमन नंबर 1, पुलीसवाला गुंडा, आज का सिंघम वगैरे वगैरे
Heart operation
https://m.youtube.com/watch?v=VHxvBlHc1MU
-------
Banana fighting
https://m.youtube.com/watch?v=B4r_djM_Xeg
--------
Cigarette Accupressute Technology
https://m.youtube.com/watch?v=6xUlJuFY63c
------
ही माझी सगळ्यात आवडती फाईट
https://m.youtube.com/watch?v=TIe06TAGaZM
ही माझी सगळ्यात आवडती फाईटhttps://m.youtube.com/watch?v=TIe06TAGaZM
अफलातुन कॅम्रा वर्क. पिन ड्रॉप सयलेंन्स, कसलेही पार्श्वसंगीत नाही (एकुण प्रकरण डावखुरे वाटु शकते) अन सोनेपे सुहागा म्हणजे संपुर्ण फाइट सिक्वेंसमधे पाळलेले सोशल डिस्टेंसिंग..... अफलातुन कलाकृती.
Cigarette Accupressute Technologyhttps://m.youtube.com/watch?v=6xUlJuFY63c
काय ट्रीपी पार्श्वसंगीत आहे... सुरेख. संपुर्ण सिन मात्र चुकवु नये असाच.
Banana fightinghttps://m.youtube.com/watch?v=B4r_djM_Xeg
कट्टाकरुन घरी परतल्यावर हा सिन बघणे फार धोकादायक.
Heart operationhttps://m.youtube.com/watch?v=VHxvBlHc1MU
दिज स्टंट परफॉर्म्ड बाय प्रोफेशनल्स, डाँट ट्राय इट अॅट होम ही त्यांची पाटी फारच बोलकी आहे...
मुवीजी आपण म्हणजे खरोखर कहर आहात.... _/\_
कन्नड,तमिळ,तेलुगू,मल्याळम या चार दक्षिण भारतीय भाषा आहेत. तमिळ तेलुगूमधे अॅक्शन मुव्हीज जास्त असतात. कन्नड गरीब वर्गाला नजरेसमोर ठेवून बनवलेले जरा लो बजेट असतात. मल्याळम कथा,पटकथा,दिग्दर्शन याबाबत चारही भाषांमधे दर्जेदार असतात.
तेलुगू
प्रामुख्याने धमाल गाणी, नृत्य, अवास्तव पण तांत्रीक सफाइदार फाइट सिन्स
तमिळ
अंगावर येणारा इमोशनल अत्याचार, मारधाड अन एकदंम मातीचा फिल.. बरेचदा नको इतका. डावं सोडता ही येत नाही अशी पंचायत असलेले प्रकरण, पण अत्यंत प्रयोगशील.
कन्नड
सायफाय, डायनोसोर, सोन्याची खाण, म्युजिकल मर्डर मिस्ट्री... आता इंडस्ट्री कात टाकत आहे, चांगले प्रयोग होत आहेत.
मल्याळम
प्रामुख्याने लो बजेट पण कथा,पटकथा,दिग्दर्शन, अभिनय याकडे विषेश लक्ष .
ह्यातले ऑपरेशन, केळे फाईट, सिगरेट हे सिन हृदये कळेयम या spoof किंवा थट्टेखोर सिनेमातले आहेत. ते गंभीर प्रसंग म्हणून चित्रित नाही झाले.
ते डबडे तेलुगू सिनेमे. उत्साह वाढतो मग त्यांचा. फिजिक्स गपचुप कोपर्यात उभं राहून स्वत:ची होणारी लक्तरं पाहत असतं तेलुगू सिनेमात. :(
राजीव सातव यांच्यावर शासकीय इतमात अत्यसंस्कार; १५ ते २० हजार लोकांची गर्दी
https://react.etvbharat.com/marathi/maharashtra/state/hingoli/congress-…
राज्यातील आमदार खासदारांनी उपस्थिती लावली होती.
यामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रभारी के. एच. पाटील, महुसल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उर्जामंत्री नितीन राऊत, मंत्री असलम शेख, राज्यमंत्री विश्वजीत कदम, पूनर्वसन व मदत कार्यमंत्री विजय वडेट्टीवार, मंत्री सतेज पाटील, काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार अमर राजूरकर, गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते परेश धनानी, खासदार हेमंत पाटील, माजी खासदार तुकाराम रेंगे, आमदार माधवराव जवळगावकर,आमदार राजू नवघरे, आमदार आमदार संतोष बांगर, आमदार तानाजी मुटकुळे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी खासदार अॅड. शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, भाऊ पाटील, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. श्रीनिवास, सत्यजित तांबे, अमर खानापुरे, गुजरात युवक काँग्रेसचे मानसिंग डोड्या, श्री संपत कुमार, नीरज कुंडल, यांच्यासह पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.
साध्वी प्रज्ञा म्हणतात, मी रोज गोमूत्र पिते त्यामुळे मला कोव्हिड झाला नाही.
ह्याला म्हणतात जबाबदारीने बोलणे.
'करोनामध्ये मंदिरे बंद आहेत. देव पण लॉक करण्यात आले आहेत. तुम्हाला वाचवायला कुणीच येणार नाही. स्वतःलाच स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणून हे उपास-तापास बंद करा. रोज ४ अंडी खा. एक दिवसाआड चिकन खा आणि प्रोटिनयुक्त पदार्थ भरपूर खा’, असा सल्ला बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी हिंदू समाजबांधवांना दिला असून या सल्ल्यामुळे गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानावर विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी फोनवरून आक्षेप नोंदवला. या चर्चेतही गायकवाड आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. मुस्लिम समाजामध्ये मांसाहाराचे प्रमाण जास्त आहे आणि म्हणून मुस्लिम समाजात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी आहे आणि हिंदू धर्मीयांमध्ये मांसाहाराचे प्रमाण कमी आहे म्हणून हिंदूंमध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या जास्त आहे, या वक्तव्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करायला हवी, असे सांगितले असता त्यांनी त्यास नकार दिला, असे शेटे यांनी सांगितले.
https://maharashtratimes.com/maharashtra/buldana/dont-fast-in-corona-ea…
कोरोनासंसर्ग न होण्यासाठी कोणी गोमूत्र पितात तर कोणी कोंबड्या-अंडी चेपतात.
Uttarakhand Congress leader says ‘corona sent by Lord Krishna’.
“Both Corona and Krishna starts with the sound of ‘K’. Hence it’s obvious that the coronavirus has been sent by him in this world,” Uttarakhand Congress vice-president Suryakant Dhasmana reportedly said.
ह्याला म्हणतात जबाबदारीने बोलणे.
https://www.hindustantimes.com/india-news/uttarakhand-congress-leader-s…
हि मंडळी पण धन्य आहेत.
यादीत डॉ. हर्षवर्धन यांना सुद्धा जागा मिळेल- कोरोनील, ह्या थापाड्या औषधाचे प्रमोशन करायला डॉ. हर्षवर्धन आणि नितीन गडकरी जातीने उपस्थित होते. हे सुद्धा अत्यंत बेजबाबदार वागणे आहे.
https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/industry/healthcare/bi…
भारतात वाचाळ नेत्यांची संख्या अतोनात आहे व असे नेते सर्व पक्षात आहेत. यांचं कधी हसू येतं, कधी चीड येते तर कधी कीव येते.
सीबीआयने तृणमूलच्या दोन मंत्र्यांसह चार नेत्यांना ताब्यात घेतले; मागोमाग ममतादेखील पोहोचल्या
-------
"Narada Scam: सीबीआयने तृणमूलच्या दोन मंत्र्यांसह चार नेत्यांना ताब्यात घेतले; मागोमाग ममतादेखील पोहोचल्या - Marathi News | CBI detains four leaders, including two ministers of Trinamool in Narada scam; Mamata banerjee also reached | Latest crime News at Lokmat.com" https://m-lokmat-com.cdn.ampproject.org/v/s/m.lokmat.com/crime/cbi-deta…
--------------
https://www.google.com/amp/s/www.deshdoot.com/amp/story/political-news/…
गोमूत्र पिते त्यामुळेच मला करोना झालेला नाही -खासदार प्रज्ञा ठाकूर
https://misalpav.com/comment/reply/48782/1107967
विरोधी पक्षाने लोकांमध्ये करोनाबद्दल भीती निर्माण केलीय; योगी आदित्यनाथांचा आरोप
आपण त्यांचं घर उन्हात बांधू.
त्याच उन्हात बांध तुझा उन्हात बांध !
सुखी रहा
त्यांचं म्हणजे विरोधी पक्षांचं हो!
“…तर रक्तरंजित लढाईला तयार राहा,” शिवसेना आमदाराचा ठाकरे सरकारला इशारा....
https://www.loksatta.com/maharashtra-news/shivsena-mla-shahaji-patil-ov…
धूसपूस चालू झाली...
https://maharashtratimes.com/international/international-news/usa-block…
----------
जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीची फळे, इस्त्रायलला पण भोगावी लागणार होती...
मी पण जवाहरलाल नेहरूंचा पंखा वगैरे अजिबात नाही. मात्र या गोष्टीमध्ये नेहरूंना आणणे अनाठायी वाटते.
शीतयुध्दाच्या काळात रशियाला काटशह द्यायला म्हणून अमेरिकेने चीनला मोठे केले किंवा चीनच्या महत्वाकांक्षेकडे/कारवायांकडे दुर्लक्ष केले. पण शीतयुध्द संपल्यावर मात्र चीनला वापरून झाल्यावर अमेरिकेने फेकून का दिले नसावे हे समजायला मार्ग नाही. जर रशियाला अफगाणिस्तानातून हाकलून दिल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातील मुजाहिदींना वापरून झाल्यावर फेकून दिले असेल तर हेच १९९१ नंतर चीनबाबत करायला काय हरकत होती हे कळायला मार्ग नाही. अगदी १९९० मध्येही चीनी अर्थव्यवस्था भारतापेक्षा ३०-३५% नेच जास्त मोठी होती म्हणजे चीनला फेकून न देण्यामागे आर्थिक कारण तितके महत्वाचे असेल असे वाटत नाही. शीतयुध्द संपल्यावर वर्षसव्वावर्षात सत्तेत आलेल्या आणि पुढे आठ वर्षे सत्तेत असलेल्या बिल क्लिंटन यांची या प्रकारात जबाबदारी होती असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये. क्लिंटन प्रशासनाने चीनला फेकून देणे दूरच राहिले तर त्यापूर्वीच्याच प्रशासनांची चीनचे लाड करायचे धोरण सुरू ठेवले. २००१ मध्ये बुशबाबा सत्तेत आले तेव्हा मात्र चीन बर्यापैकी मोठा झाला होता आणि तेव्हा चीनला फेकून देणे कितीतरी जास्त कठीण झाले होते.
तेव्हा जवाहरलाल नेहरू बिल क्लिंटन यांच्या चुकीची फळे, इस्त्रायलला पण भोगावी लागणार होती... अशी सुधारणा करायला हवी असे वाटते.
मध्ये भारताला सहभागी करून घेणार होते ....
नेहरूंनी, भारताची जागा, चीनला दिली....वाचनांत तरी असेच आले होते...
https://www.thehindu.com/opinion/op-ed/nehru-china-and-the-security-cou…
अमेरिका भारताला सुरक्षापरिषदेवर स्थायी सदस्यत्व देणार होती पण नेहरूंने ती ऑफर नाकारली हे नेहमी म्हटले जाते. या दाव्याच्या बाजूने आणि विरोधात अशा दोन्ही बाजूंनी लेख वाचले आहेत.
एक गोष्ट कळत नाही. सुरक्षापरिषदेवर स्थायी सदस्यत्व म्हणजे काय खिरापत होती का अशी कोणालाही वाटायला? हे पाच स्थायी सदस्य कोण होते? तर दुसर्या महायुध्दात दोस्त राष्ट्रांच्या बाजूने लढणारे देश. चिअँग कै शैक चीनमध्ये सत्तेत असताना चीनही दोस्त राष्ट्रांच्या बाजूने जपानविरूध्द लढत होता. चीनमध्ये यादवी युध्द झाले आणि माओने सत्ता काबीज केल्यावर चिअँग कै शैकला फॉर्मोसा (आताचे तैवान) मध्ये आश्रय घ्यावा लागला पण माओच्या चीनला अमेरिकेची मान्यता नव्हती तर तैवानमधील चीनचे सरकार हेच खरे चीनचे सरकार आहे (परागंदा सरकार) असे अमेरिकेचे म्हणणे होते. म्हणून सुरक्षापरिषदेवरील स्थायी सदस्यत्व त्या चीनला दिले गेले होते. नंतरच्या काळात रिचर्ड निक्सन चीनच्या भेटीला गेले आणि माओच्या चीनला अमेरिकेने मान्यता दिली. त्यानंतर तैवानमधल्या चीनची स्थायी सदस्यत्वाची जागा माओच्या चीनला देण्यात आली. या सगळ्यात भारत कुठे आला? त्यावेळी आपल्याला नक्की कोणत्या आधारावर व्हेटो पॉवरसह सुरक्षासमितीवर स्थायी सदस्यत्व दिले जाणार होते? आपण ना आर्थिक ताकद, ना लष्करी ताकद. १९६० च्या दशकाच्या मध्यापर्यंत आपल्याच लोकांचे पोट भरायला जगापुढे वाडगा पुढे करायला लागायचा. अशा देशाला जगाने व्हेटो पॉवरसह स्थायी सदस्यत्व कोणी असेच देईल हे जरा अतिशयोक्तीपूर्ण वाटत नाही?
काश्मीरचा प्रश्र्न, युनो कडे नेण्याचा, निर्णय बघता, "जर, UNSCचे स्थाई सदस्यत्व भारताला देण्याची इच्छा, इतर देशांनी तयारी दाखवली असेल तरीही ती संधी जवाहर लाल नेहरू यांनी नाकारायची शक्यताच जास्त...
दुसरे एक कारण असे की, जवाहरलाल नेहरू, संरक्षण दलातच कपात करू इच्छित होते...
ह्या दोन्ही उदाहरणांवरून, जवाहरलाल नेहरूंनी, UNSCचे स्थाई सदस्यत्व नाकारायचीच शक्यता जास्त आहे....
पुरावे अहेत का ?
या नुसत्या थापा आहेत .
कैपण अपेक्षा तुमच्या. नेहरू म्हणलं कि व्हाट्सऍप बास, पुरावे वैगेरे लागत नाहीत.