काथ्याकूट

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग २)

Primary tabs

आधीच्या भागात १५० प्रतिसाद झाल्यामुळे पुढचा भाग काढत आहे.

अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. देशातील चार महत्वाच्या शहरांपैकी कंदाहार आणि हेरात तालिबान्यांच्या ताब्यात गेली आहेत. मझार-ए-शरीफही जवळपास गेल्यातच जमा आहे असे दिसते. पुढील तीन महिन्यांमध्ये काबूलही पडेल अशी भिती पाश्चिमात्य माध्यमांनी वर्तवली आहे. अशा परिस्थितीत काबूलमधील आपल्या दूतावासावर हल्ले करू नयेत अशी विनंती अमेरिकेकडून तालिबानला केली गेली आहे. http://www.uniindia.com/washington-calls-on-taliban-to-spare-us-embassy… एका दहशतवादी संघटनेला असा बाबापुता करून केलेली विनंती अमेरिकेसारख्या महासत्तेला शोभते का? असो.

मला वाटते की पूर्ण जगात शापित देश असा कोणता देश असेल तर तो अफगाणिस्तान आहे. एकेकाळी बौध्द संस्कृती त्या भूमीत बहरली होती. पण तिथेच जवळपास गेल्या हजारेक वर्षांपासून काही वर्षे वगळली तर सतत अस्थिरता, सतत हिंसाचार यांचेच साम्राज्य राहिले. गझनीचा महंमद, महंमद घोरी पासून अहमदशाह अब्दालीसारखे क्रूरकर्मे तिथे सत्तेत होते. अलीकडच्या काळात रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तांच्या साठमारीत अफगाणिस्तान या सुंदर देशाची मात्र पूर्ण वाताहत झाली. हे सगळे बघून खरोखरच वाईट वाटते.

अफगाणिस्तानात पूर्ण लोकसंख्येत लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. तालिबान राज्यात शाळांमध्ये आधुनिक शिक्षण मिळायची तर शक्यताच नाही. मग या मुलांच्या मनात तेच दहशतवादाचे प्रशिक्षण भरवले जाऊन भविष्यात परिस्थिती अधिकाधिक चिघळत जाणार का ही भिती वाटते. आणि अफगाण स्त्रियांविषयी काही बोलायलाच नको. घराबाहेर पडायचे नाही, पडायचेच असले तर नवरा, भाऊ, बाप किंवा मुलगा यांच्याबरोबरच पडायचे, शिक्षण मिळायचा संबंधच नाही, घरकाम करत बसायचे आणि मुले काढत आणि सांभाळत बसायची, जरा चेहर्‍यावरचा बुरखा बाजूला झाला तर भर चौकात चाबकाचे फटके पडणार का या भितीच्या सावटाखाली वावरायचे.. खरोखरच भयानक. आणि या परिस्थितीतून मार्ग निघायची शक्यता अजिबात नाही.

असले प्रकार बघितले की भारतातल्या अनेक गोष्टी आपल्याला आवडत नसल्या तरी आपण किती सुदैवी आहोत हे जाणवते.

Rajesh188

पहिल्या कर्माची फळ तर आहेत च आणि आता अफगाणिस्तान अनेक देशांच्या हातचे खेळणे झालेला आहे.
रशिया नी खेळणी पुरवली आणि त्याचा वापर अमेरिका विरूद्ध झाला.
आता कोणता त देश खेळणी पुरवणार आणि त्याचा वापर कोणाविरुद्ध होणार हेच बघायचे आहे ..
ह्या खेळात अफगाणिस्तान चा फायदा कधीच होणार नाही हे मात्र सत्य आहे

गॉडजिला

प्रत्यक्ष त्या देशातुन काहीच उत्पन्न नसल्याने कोणालाच त्याचे काहीच देणे घेणे नाही ? जिंकुन सोडुन देणे यापलिकडे त्यातुन काहीच साध्य नाही. बरे आता जगातील दोन महासत्ताना प्रोक्सिवॉर करुन जेरीस आणले असल्याने अगदी पाकिस्तानच्या सपोर्टवर देखिल त्याभागात युध्द केले जाउ शकते त्यासाठी तालीबानच्या बाजुने लश्कर उतरवायची गरजच नाही त्यामुळे प्रश्न अजुन कठीण बनला आहे कारण तालीबानचा वापर प्रोक्सीवॉरसाठी आता नेहमीच केला जाणार.

अर्थात ते देखिल आता शहाणे झाले आहेत अणु हल्याचा धोका वगळता त्यांचे कडुन पाश्चात्यांवर मोठा हल्ला व्हायची शक्यता नजिकच्या काळात जवळपास नसल्यात जमा आहे म्हणजे धोका फक्त भारताला व थोडाफार चिनला संभवतो. भवितव्य काय याचा काहीच अंदाज नाही.

सुबोध खरे

प्रत्यक्ष त्या देशातुन काहीच उत्पन्न नसल्याने कोणालाच त्याचे काहीच देणे घेणे नाही

त्या देशात जगातील सर्वात जास्त अफूची निर्मिती होते याची किंमत १० हजार कोटी इतकी आहे. तालिबानला यातील १० % कररूपाने मिळतात म्हणजेच १००० कोटी.

हा सर्व व्यापार थांबवण्यासाठी अमेरिकेने २००१ पासून ७० हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नाही.

https://www.bbc.com/news/world-us-canada-47861444

याशिवाय त्या देशात खनिज संपत्ती आहे ज्यात मौल्यवान रत्ने येतात. यातील केवळ लॅपिस या रत्नांचा साठा अमेरिकी भूवैज्ञानिकी संस्थेच्या अंदाजाप्रमाणे किंमत १ लाख कोटी रुपये इतका आहे.
या सर्व खाणी टोळीवाल्यांच्या ताब्यात आहेत आणि ते लोक या बेकायदेशीर खनिज उत्पादन करणाऱ्या भुरट्या लोकांना भाड्याने देतात आणि यातील ५०% उत्पन्न तालिबानला देतात.
https://www.bbc.com/news/world-asia-36424018

याशिवाय इतर इस्लमिक देशातून( आखाती) येथे ४ हजार कोटी रुपये अवैध मार्गाने येतात (आयसिस किंवा अल कायदाशी तालिबानचा संधान आहे त्यातून) .

गॉडजिला

हे सर्व अफू वरील कर तालिबान गोळा करु शकते सरकार नाही म्हणजेच सरकार कामाचे नाही

अन खनिजाचे एक लाख कोटी रुपये तर आमचेच लोकं दोन तिन वर्षात स्विसमधे जमा करतात ;)

असो, आपल्याला ग्राउंड रिपोर्ट जास्त व्यवस्थित माहित आहे... तेंव्हा अफगाणिस्तानात स्थिरता का येत नाही आली नाही अथवा येणार नाही यावर अजूनच भाश्य अवश्य करावे

ह्यावर्षी सर्वात जास्त काळेधन जमा झाले म्हणे स्विस बॅंकेत. आता ते देखील राष्ट्रहीतासाठीच असावे. :)

रावसाहेब चिंगभूतकर

भुजबळ साहेब, स्पॅम प्रतिसाद टाकून मजा बघणाऱ्याची फारशी पत समाजात उरत नाही हे अजूनपर्यंत तुम्हाला कळायला हवं होतं.

श्रीगुरुजी

असे लोक अत्यंत चिवट असतात. Spam प्रतिसाद १८८ कोटी वेळा टाकल्यानंतर एकाला तरी कोणीतरी उत्तर देईल या आशेवर ते spam ओतत राहतात.

सर टोबी

मोदी आणि भाजपाची तळी उचलून धरणे हेच एकमेव पवित्र कर्तव्य आहे असे एकदा जाहीर करून टाका म्हणजे मिपावर सतत पडीक राहून सदस्यांचा उपमर्द करण्याचा खटाटोप वाचेल. कसं?

बाकी भारतात स्वर्ग अवतरणार आहे या बाबत माझ्या मनात काहीच शंका नाही. गर्वाने छाती तट्ट फुगावी असा नवा कोरा नाव बदलेला खेल पुरस्कार, फाळणीच्या जखमांवर फुंकर घालणारा नवा स्मृती दिन, जान हैं तो जहान हैं याची आठवण करून देणारा उडान योजनेचा विमान प्रवास महाग करणारा निर्णय. काय सांगावे महाराजा, मला तर वाटते आत्तापर्यंत महासत्ता होण्याच्या शर्यतीची सीमारेषा पार देखील केली असेल. आज काल ती सीमारेषा दिसत देखील नाही म्हणून एक शंका.

श्रीगुरुजी

आपल्याला सुद्धा ईनो, जेलुसिल, बरनॉल वगैरेची नितांत गरज आहे.

भाजपला अडचणीत आणणारे प्रतिसाद स्पॅम असतात. :-
संत रावसाहेब चिंगभूतकर अच्छेदिनवाले.

mayu4u

एका वेळेस अधिकतम ३० सदस्य हजर असलेल्या संस्थळावर एका टिनपाट सदस्याने प्रतिसाद दिल्याने भाजप अडचणीत येतो.
- ढोर थोर विचार्वन्त भुजबळ साहेब.

सुबोध खरे

सर्वात जास्त काळेधन जमा झाले म्हणे स्विस बॅंकेत.

काळा चष्मा काढा अन्यथा सर्वच जग काळं दिसतं.

According to the SNB, its data for 'total liabilities' of Swiss banks towards Indian clients takes into account all types of funds of Indian customers at Swiss banks, including deposits from individuals, banks and enterprises. This includes data for branches of Swiss banks in India, as also non-deposit liabilities.

An automatic exchange of information in tax matters between Switzerland and India has been in force since 2018.

Under this framework, detailed financial information on all Indian residents having accounts with Swiss financial institutions since 2018 was provided for the first time to Indian tax authorities in September 2019 and this is to be followed every year.

In addition to this, Switzerland has been actively sharing details about accounts of Indians suspected to have indulged in financial wrongdoings after submission of prima facie evidence. Such exchange of information has taken place in hundreds of cases so far.

https://www.indiatoday.in/business/story/indian-black-money-swiss-bank-…

गॉडजिला

की आपल्यासारखी समजूतदार वेल balanced लेख व माहितीव्यक्त करणारी व्यक्ती हळू हळू हिरीहिरीने स्पॅमरना उत्तरे कशी काय देत असते... व्हाय दे कांट इग्नोर स्पॅम

आत्ता मात्र निर्माण कार्यास झोकून देऊन अधिकृत व समर्पित भावनेने आपला वाटा उचलणाऱ्या खारीची आठवण येते आहे.

असो, केजरीवाल यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आयबीएम मधील जॉब सोडुन दिल्लीला आंदोलनास गेलेली व्यक्ती पाहिली आहे... देश बदलावा म्हणुन... आला परत...

रावसाहेब चिंगभूतकर

आधीच इथे फारसे लोक balansd प्रतिसाद लिहीत नाहीत आणि त्यातून तुम्ही असं लिहा

गॉडजिला

आमच्या भंपक भिकरड्या प्रतिसादांकडे डॉक शश्प लक्ष देत नाहीत तसेही कोणी काय करावे हे सांगायचा मला अधिकार नाही मी फक्त आपलं एक निरीक्षण नोंदवले

Rajesh188

स्थिर सरकार आणि शांतता असल्या शिवाय कोणताच देश प्रगती करू शकत नाही.
मग ते कोणतेही क्षेत्र असू ध्या.
अफगाणी जनतेच्या नशिबात सुख,शांती,वैभव,सुरक्षित पना कधी येईल असे वाटत नाही .
त्या देशावर इतर देश लक्ष ठेवून असणार च .त्यांच्या सीमेच्या आता काही ही गोंधळ घातला तरी बाकी देशांना काही फरक पडत नाही.पण कोणाचे हितसंबंध संकटात आले तर मात्र देश लष्करी हस्तक्षेप नक्कीच करणार.
अशांत क्षेत्र म्हणून जगातून त्यांना खूप आर्थिक मदत मिळत असते.हे पण कारण असेल नेहमीच अशांत देश ठेवण्याचे.

श्रीगुरुजी

अफगाणिस्तानात अमेरिका पुन्हा एकदा सैन्य पाठविणार आहे. कोणीही आले तरी तालिबानचा संपूर्ण पराभव होणे खूप अवघड आहे कारण तालिबान्यांना शस्त्रपुरवठा पाकिस्तानकडून होतो. जोपर्यंत पाकिस्तानचे नाक दाबले जात नाही तोपर्यंत तालिबान्यांना संपविणे अशक्य आहे.

समजा आता अफगाणिस्तान पुन्हा एकदा तालिबान्यांच्या ताब्यात गेला तरी भारताच्या आंतरराष्ट्रीय हितसंबंधांना फार त्रास होईल असे वाटत नाही. मुळात भारताला अफगाणिस्तानातून फार काही मिळत नाही. भारतच अफगाणिस्तानला भरपूर मदत करीत असतो. तालिबान्यांचे इराणशी व रशियाशी पटत नाही. तालिबानी सत्तेत परतणे पाकिस्तानला सुद्धा त्रासदायक ठरणार आहे. भारताने अफगाणिस्तानातील सध्याच्या घडामोडींकडे फार लक्ष देऊन स्वत:स त्रास करून घेऊ नये.

Rajesh188

अमेरिका सैन्य पाठवणार आहे पण त्यांच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तान मधून सुखरूप बाहेर काढण्यासाठी.
तालिबान चे अनेक दहशतवादी संघटने बरोबर संबंध आहेत ही चिंतेची बाब आहे.
काश्मीर मधील अतिरेक्यांना त्यांची मदत होईल असे पाकिस्तान ला आशा आहे.म्हणून तालिबान ला पाकिस्तान पाठिंबा देत आहे.
असा पण पाकिस्तान हा नालायक देश आहे.
कीड आहे जगाची.
बाकी तालिबानी आणि पाकिस्तानी जनता ह्या मध्ये मोठे प्रेम असण्याची शक्यता कमी च आहे.

पण आपल्या लष्करे तैय्यब्बा ची सर तालीबानला नाही. ट्विन टावर पाडणे हे मजारे शरीफ, नी कंधार घेण्याईतके सोप्पे आहे व्हय?? लादेन गेल्या पासून कुणी वाली ऊकला नाही ओ लष्करे तैय्यब्बा ला

श्रीगुरुजी

आपले अज्ञान वारंवार उघड करू नये. अन्यथा सर्वत्र हसे होते.

साॅरी गुरूजी. अस कायदा. लष्करे तैयब्बा त्या जागी अल कायदा वाचावे. अल कायदा ची सर तालीबान ला नाही.

मौजमजेसाठी अविवाहित मुलींनी शरीरसंबंध ठेवण्यापर्यंत भारतीय समाज पोहोचला नाहीय : उच्च न्यायालय

India still conservative, girls don’t indulge in carnal activities just for fun: MP HC judge

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुबोध अभ्यंकर यांनी एका खटल्याचा निर्णय देताना मुलींनी केवळ मौजमजा म्हणून लग्नाआधी शरीर संबंध ठेवावेत, इतका भारतीय समाजमन अद्याप आधुनिक झालेलं नाही, असं मत व्यक्त केलं.

The accused had claimed that the complainant had consensual sex with him and that it was not a forced relationship.

Justice Abhyankar rejected this argument and observed that in a majority of rape cases involving adults, the defence usually takes the plea that the complainant was a “consenting party” and, therefore, the accused get the benefit of doubt.

However, in the court’s opinion, barring some exceptions, this does not hold true. Therefore, the judge said, the accused cannot “plead consent on the part of the prosecutrix and laugh all the way to your home”.

अशा प्रकरणांमध्ये कोणा कडची बाजू खरी आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आणि तितकंच अवघड असतं.

आज काबूलही पडलेच. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ गनी यांनी राजीनामा देऊन ते ताजिकिस्तानला पळून गेले आहेत. आता अफगाणिस्तानात परत तालिबान राजवट येणार हे नक्की झाले आहे. २५ वर्षांपूर्वी अनंत चतुर्दशीच्या दिवशी तालिबान काबूलमध्ये घुसल्याची आणि महमूद नजीबुल्लांना ठार मारल्याची बातमी आली होती. आज १५ ऑगस्टच्या दिवशी ही बातमी आली आहे. मागच्या वेळेस तालिबान्यांना कंदाहार ते काबूल यायला दीड वर्ष लागले होते. यावेळेस चार दिवस लागले आहेत. मागच्या वेळेस अहमदशाह मसूद पंजशीर व्हॅलीमधील निदान ५% भाग नियंत्रणात ठेऊन तालिबानविरोधात एकाकी का होईना किल्ला लढवत होता. यावेळेस तसा कोणीही दिसत नाही. तालिबान हे बहुसंख्य पश्तू वंशाचे आहेत. हे लोक पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात या दोन्ही देशांमध्ये पसरले आहेत. पाकिस्तान-अफगाणिस्तानातील सीमारेषा ड्युरंड लाईन हे लोक मानत नाहीत. तसेच तिकडचा डोंगराळ प्रदेश लक्षात घेता दोन देशांमधील सीमारेषा ठेवणे तितके सोपे नाही. त्यामुळे त्या लोकांचे नियमितपणे इकडून तिकडे चालू असते. भिती आहे की आज अफगाणिस्तान- उद्या पाकिस्तान असे करत तालिबान्यांनी पाकिस्तानवरही कबजा मिळवला तर मग भारतावर ते टोळधाडीसारखे चालून यायचा प्रयत्न करतील.

गॉडजिला

ज्या सहजतेने अफगाण तालिबानने ताब्यात घेतले ते पाहता मी पुर्णपणे गोंधळलेल्या स्थितीत आहे असे वाटते जणू सर्वच अमेरिका निघुन जायची वाट पहात होते. फार सहजतेने व कसलाही विशेष रक्तपात न होता हे घडले अर्थात याचा इंटेल आधीच मिळाला असला पहिजे ज्यामुळे वकिलात लगेच सोडल्या गेल्या...

जनतेला अमेरिका नको होती विकास नको होता... असेच म्हणावे लागेल. पूर्वी भारतात जसे शासक बदलले तरी सामान्य जनता त्याच परिस्थीतीमधे रहात असे त्यामूळे त्यांना फार फरक पडत नसे व ही बाब भारताच्या हजार वर्षांच्या गुलामगिरीस अनुकुल ठरली तसेच काहीसे अफगाण बाबत वाटत आहे अमेरिका असली काय अथवा नसली काय लोकांचें दैनंदिन जीवन अमुलाग्र बदलले नाही त्यामूळेच अफगाण काही शतके स्वकीय अथवा परकियांच्या गुलामगिरीसाठी दीर्घकाळ कटिबध्द आहे असेच सकृतदर्शनी खेदाने म्हणावेसे वाटते.

गॉडजिला

माझा भारत व विशेषः भारतीय सैन्यदळ याविषयी विश्वास व अभिमान कमालीचा वाढला आहे...

धन्यवाद, भारतीय संरक्षण दलांना १५ ऑगस्टच्या औचीत्यावर माझा मानाचा सलाम.

रावसाहेब चिंगभूतकर

भिती आहे की आज अफगाणिस्तान- उद्या पाकिस्तान असे करत तालिबान्यांनी पाकिस्तानवरही कबजा मिळवला तर मग भारतावर ते टोळधाडीसारखे चालून यायचा प्रयत्न करतील.

https://youtu.be/ZA82PnTs_OA

श्रीगुरुजी

अहमदशहा मसूद ताजिक वंशाचा होता व २००१ पर्यंत तालिबानच्या विरोधात लढणाऱ्या नॉर्दर्न अलायन्समध्ये बहुसंख्य ताजिक होते. सद्यपरिस्थितीत ताजिकांचा कोठे पुसटसा सुद्धा उल्लेख होताना दिसत नाही.

एकंदरीत अफगाणिस्तान पुन्हा एकदा अत्यंत क्रूर धर्मांधांच्या दडपशाहीखाली भरडला जाणार.

मुळात तालिबान हे पाकिस्तानचे अपत्य असून त्यांना सर्व प्रकारची शस्त्रे, आर्थिक मदत पाकिस्तानकडूनच होते. जोपर्यंत पाकिस्तान आहे तोपर्यंत अमेरिका, रशिया, इंग्लंड असे कोणीही आणि कितीही वर्षे अफगाणिस्तानात राहिले तरी तालिबान संपणार नाही. तालिबानला संपवायचे असेल तर आधी पाकिस्तानला संपविणे आवश्यक आहे.

तालिबानी पाकिस्तानशी वाकड्यात गेले तर भारताला फायदाच होईल. सध्या तरी भारताला कोणताच धोका संभवत नाही.

Rajesh188

तेच फक्त पाकिस्तान ला संपवू शकतील .अशा थापा मारतील की पाकिस्तान स्वतःच शरण येईल.

चौकस२१२

तालिबानी पाकिस्तानशी वाकड्यात गेले तर भारताला फायदाच होईल.
हो तर्क बरोबर पण तसे होईल असे फारसे वाटत नाही

भारताला धोका आहेच ... गझवा ए हिंद या साठी जी लोक कार्यरत आहेत त्याला पाठबळ वाढेल

भारताला धोका आहेच ... गझवा ए हिंद या साठी जी लोक कार्यरत आहेत त्याला पाठबळ वाढेल

आणि मोदींच्या अडचणी तालिबानमुळे वाढणार असतील तर भारतातले विचारवंत तालिबान पण कित्ती कित्ती चांगले आहेत याच्या पंचारत्या ओवाळायला पण कमी करायचे नाहीत.

चौकस२१२

तालिबान हे बहुसंख्य पश्तू वंशाचे आहेत. हे लोक पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात या दोन्ही देशांमध्ये पसरले आहेत

बरोबर पण दुर्दैवाने काही अति उदारमतवादी आता .. बघा अमेरिकेची कशी जिरवली या उन्मादात "बामियान च्या बुद्धांना" सुरुंग लावणाऱ्या तालिबानचे स्वागत करतील
आपण हि आता पंजाबी पाकिस्तानाण्यांना साथ दिली पाहिजे असे वाटत्तय ..बघ तुम्ही शिकलेले उच् मुस्लिम कशाला या येडण्याच्या नादी लागतताय .. पण ते कशाला घेतील ... त्यांना बरेच आहे परत अममेरिकेल सांगायला .. "आमचं मार्फत " म्यानेज " करा ,, वर्षाला एवढे डॉलर द्या...
https://www.youtube.com/watch?v=-c_ctZ4lUCk

म्हणे झियांनी म्हणले होते कि कि इस्राएल ची अस्त्रे अमेरिका अफगाणिस्तान मुजाहिदीन ना देणार.. हे चालेल म्हणाले .. पण
१) सर्व माझ्या मार्गे आणि
२) एक सुद्धा "फकिंग ..... स्टार ऑफ डेव्हिड एकही वेपण वर दिसला नाही पाहिजे
https://www.youtube.com/watch?v=sykCqx4IS6c

Rajesh188

तालिबान त्यांच्या देशाच्या सीमे बाहेर येवून महासत्ता ना भावी महासत्ता (भारत) धोका
निर्माण करणार नाही.
भारताला जास्त च भीती वाटत असेल तर भारतीय लष्कर अफगाणिस्तान मध्ये पाठवून तालिबान ची सत्ता नष्ट करावी.
भारत भावी महासत्ता आहे.

चौकस२१२

काबुल तालिबान च्या हातात, तालिबानी काळ्या फेट्यात, ए के ४७ शकत अफगाणी राष्ट्राध्यक्षाच्या खुर्चीत बसलेले व्हिडिओ दिसत आहेत फरक एवढाच कि फार मोठा कळलं करताना दिसत नाहोयेत
आजी सोनियाचा दिनू किंवा आज उन्मादाचाच दिवस असे जगातील अनेकांना वाटत असणार किंवा बघा अमेरिकेची कशी जिरवली .. अमेरिकेचाच दुसरे व्हिएतनाम खरंच आहे जिरवलीच म्हणलं पाहिजे पण हे चांगला आहे का?
आता काय होईल
- कडक इस्लामी कायदा येईल कि जो सौदी आणि इतर अरब देशात पण आहे पण तिथे बदल, मुलींचे शिक्षण यात प्रगतीच होत आहे , पण अफगाणिस्तानात मुली आणि स्त्रियांवर काय बंधन आणली जातील
- जागतिक इस्लामी दहशतवादी जोपसण्यासाठी एक मोठी पाठशाला परत वाढेल ..
- पाकिस्तान वाहत्या गंगेत हात धून घेणार

अमेरिका का गहाण करून ठेवलीत ,,, कम्युनिसम चा एवढा तिटकारा करताना ( असे मूळ कारण दिले होते ) तुम्ही तालिबान ला जन्म दिलात .. तुम्ही हि भोगणार आणि दुसऱ्यांना हि भोगावे लागणार
जगातील लोकशाही टिकवू म्हणून हस्तक्षेप जिथे करता ते करताना एकतर हुकूमशहांना पाठ देता नाहीतर असले ...
गॉड आणि गन वृत्ती झिंदाबाबाद !

चला प्रत "चार्ली विलसनस वॉर " हा चित्रपट पाहावा म्हणतो

निनाद

१४ ऑगस्ट येथून पुढे विभाजन विभीषिका स्मृति दिवस (Partition Horrors Remembrance Day) म्हणून पाळला जाणार आहे असे पंतप्रधान मोदी यांनी जाहिर केले आहे. भारताचे विभाजन झाल्यावर उसळलेली दंगल अणि त्यात मरण पावलेले लाखो हिंदु हा आधुनिक भारतातील सर्वात वाईट भाग आहे. आजवर त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष्य झाले आहे.

अखंड भारतातील मुस्लिम नेत्यांनी Direction Action Day म्हणजे प्रत्यक्ष कृती दिवसाची हाक त्यांच्या बांधवांना दिली होती. त्यानुसार त्यांनी भारतीय हिंदुंचे त्यांच्याच भूमीवर शिरकाण केले होते. अनेक लढवय्या हिंदुंनी याचा प्रतिकार केला होता आणि दंगलखोरांना पिटाळून लावले होते हे ही विसरता कामा नये! तथापि प्रत्यक्ष कृती हा काळा दिवस आणि फाळणीच्या दंगलींवर कधीच चर्चा होऊ दिली गेली नाही. सय्यद अहमद खान १८७६ ​​मध्ये म्हणाले, की हिंदू आणि मुस्लिम कधीही एक राष्ट्र बनू शकत नाहीत कारण त्यांचा धर्म आणि जीवनपद्धती एकमेकांपासून अगदी वेगळी आहे. तेव्हापासून द्विराष्ट्रवादाची चर्चा सुरू झाली होती. १९४७ मध्ये द्विराष्ट्रवादाची अंमल बजावणी नेहरू आणि गांधींनी केली आणि अखंड भारतातून भारत आणि पाकिस्तान हे दोन देश तयार झाले.

ज्या दिवशी पाकिस्तानने आपला स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला त्या विभाजन स्मृति दिवसाची ही शोकांतिका आहे. पाकिस्तानात त्याकाळी सुमारे ३८ टक्के असलेले हिंदु बांधव आता पाकिस्तानात फक्त २ टक्के उरले आहेत.
या आधीही हिंदुंवर त्यांच्याच भूमीवर अनेक अनाचार झाले आहेत. जसे १९२१ मध्ये मोपला हत्याकांडाने केरळमध्ये शेकडो आणि हजारो हिंदूंची हत्या केली. अ‍ॅनी बेझंटने तिच्या 'द फ्यूचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स' या पुस्तकात या नरसंहाराबद्दल सांगितले आहे. त्या म्हणतात की, 'खून केले गेले आणि मोठ्या प्रमाणात लूट केली आणि धर्मत्याग न करणाऱ्या सर्व हिंदूंना ठार मारले.'

या सर्व कारणांनी १४ ऑगस्ट हा 'विभाजन भयपट स्मरण दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. अर्थात भारतीय माध्यमांनी या दिवसाला काहीही महत्त्व दिलेले नाही.

Rajesh188

अखंड भारतात सुद्धा हिंदू च बहुसंख्य होते . मग हिंदुच्याच कत्तली का झाल्या.
मुस्लिम बहुल भागात ते समजण्यासारखे आहे.
पण फाळणी झाली हे योग्यच झाले नाही तर आता अवस्था खराब झाली असती.
३५ कोटी मुस्लिम लोकसंख्या प्लस पुरोगामी,वंचित ह्यांनी मिळून हिंदू चे जगणे मुश्किल केले असते.
सत्ता त्यांचीच असती.
हिंदू बहुसंख्य असतील तर च सर्व धर्म समभाव,लोकशाही टिकू शकते .हिंदू अल्पसंख्यांक झाले तर देश कट्टरवादी लोकांच्या हातात जावून अजुन धार्मिक कत्तली झाल्या असत्या हे मात्र १००% सत्य आहे.
फाळणी अजुन काटेकोर पने झाली असती तर एक प्रश्न कायमचा सुटला असता.
चांगली संधी आपण गमावली.

प्रदीप

मोदींनी ही अत्यंत चांगली प्रथा सुरू केली. हे भारताने फार पूर्वी करावयास पाहिजे होते.

अर्थात, ह्याविषयी नेहमीच्या संशयितांकडून निषेध, व विरोध सुरू झालाच. त्यांतून, ह्यामुळे आपण पाकिस्तानला दुखावतो आहोत, असले फालतू युक्तिवाद, अर्थातच कॉन्ग्रेसकडून केले जात आहेत.

जगांत इतरस्त्र पाहिले तर अशाच बाबतीत काय दिसते?

* जपानमधे दरवर्षी ह्याच महिन्यातील एका दिवशी, तेथील एका युद्ध- समाधि (war memorial), यासुकुनीला तेथील सरकारचे अधिकारी, मंत्री व काहीवेळा स्वतः तेथील पंतप्रधान भेट देतात. युद्धांत बळी पडलेल्या त्यांच्या बांधवाची आठवण म्हणून हे मेमोरियल बांधले गेलेले आहे. पण ह्यांत काही युद्ध- अपराधीही आहेत, व त्यांचे अपराध जागतिक स्तरावर मान्य झालेले आहेत. हे अपराध बहुतांश, चिनी व कोरीयन जनतेवरील अत्याचराचे होते. तेव्हा त्यांचा सन्मान जपानी सरकारने करणे, म्हणजे तो चीनी व कोरीयन जनतेचा अपमान आहे, असे म्हणून, ह्या दोन्ही देशांच्या सरकारांकडून, त्या भेटीचा प्रखर निषेध केला जातो. तरीही जपान त्यांना भीक न घालता जे करायचे ते दरवर्षी करतेच.

* जपानी सेनेने चीनवर आक्रमण केल्यावर, नान्जिन्ग्चा पाडाव झाला. तेव्हा आक्रमकांनी तेथील जनतेवर, विषेशतः स्त्रीयांवर अन्वनित अत्याचार केले. त्या जखमा चीनने जाणीवपूर्वक जतन केल्या आहेत, त्या शहरांत ह्याविषयीचे संग्रहालय बांधून.

* ब्रिटीशांनी चीनमध्ये जाऊन अफूच्या वापरांतून काही प्रांतांचा ताबा मिळवायचा प्रयत्न केला, त्यांतून तीन युद्धे झाली. त्यांना अफू- युद्धे असे म्हटले जाते. चीन ह्या जखमा अजिबात विसरला नाही. त्यांचा उल्लेख अधूनमधून केला जातो, व गाफिल राहिल्याने आपली कशी हार झाली, ह्याची आठवण जनतेत जागी ठेवली जाते.

* जर्मनीमधे होलोकास्ट झालेल्या प्रमुख स्थळावर मेमोरियल उभारले आहे.

आपल्या जनतेत स्वत्वाची धग जागी करण्याचा मोदींचा प्रयत्न अतिशय स्त्युत्य आहे.

याविषयी भारतात स्थायिक झालेले फ्रेंच पत्रकार फ्रॅन्कॉईस गॉटिअर यांनी २००३ मध्ये लिहिलेला Where's India's holocaust museum? हा लेख आठवला. नंतरच्या काळात फ्रॅन्कॉईस गॉटिअर बर्‍यापैकी वहावत जाऊन कैच्याकै क्लेम करायला लागले पण १८-२० वर्षांपूर्वी बरेच चांगले लिहायचे.

पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या परिसरात असलेल्या हिंदूकुश पर्वतांना ते नाव कसे पडले याचा एक अतिशय रक्तरंजित इतिहास आहे. अफगाणिस्तानातून टोळधाडीसारखी पुरूषपूर (सध्याचे पेशावर) आणि पंजाबवर आक्रमणे होत होती तिथून कित्येक हिंदूंना पकडून गुलाम म्हणून अफगाणिस्तानात नेले जायचे. त्या दुर्गम भागातून जाताना खाण्यापिण्याचे हाल, दिवसेंदिवस चालत राहायचे यामुळे अनेक हिंदू तिथेच मरण पावले. आत्महत्येला 'खुदकुशी' म्हणतात त्यातील कुश म्हणजे ठार मारणे (खुदकुशी म्हणजे स्वतःलाच ठार मारणे). त्या पर्वतरांगांमध्ये अशाप्रकारे हिंदूंना ठार मारण्यात आले म्हणून त्या पर्वतरांगांचे नाव हिंदूकुश पर्वत असे पडले. या प्रकारात किती हिंदू मारले गेले असतील याची गणतीच नाही. पण त्यावेळच्या लोकसंख्येचा विचार करता बर्‍यापैकी प्रमाणावर तो आकडा होता हे नक्की. त्यानंतर अनेक शतके भारतात तेच चालू होते. म्हणजे हिटलरच नाही तर माओ, स्टालिन, पॉल पॉट, चे गव्हेरा वगैरे क्रूरकर्म्यांनी केलेल्या कत्तलींच्या पेक्षाही तो आकडा कदाचित टक्क्यात जास्त असेल. त्यांच्या स्मृतीसाठी सुध्दा भारतात होलोकॉस्ट म्युजिअम असावे.

निनाद

या प्रकारात किती हिंदू मारले गेले असतील याची गणतीच नाही. हीच गणती व्हावी आणि या त्याचारांना कधीतरी वाचा फुटलीच पाहिजे. भारतात होलोकॉस्ट म्युझियम म्हणजे हिंदु हौतात्म्य स्मारक असलेच पाहिजे यात शंका नाही. असो, फ्रान्स्वा गोतिए (Francois Gautier), अजूनही चांगले लिहितात असे मला वाटते.

निनाद

चांगला प्रतिसाद आहे हा. तरीही जपान त्यांना भीक न घालता जे करायचे ते दरवर्षी करतेच. हेच भारतात व्हावे हीच सदिच्छा!

चौकस२१२

तरीही जपान त्यांना भीक न घालता जे करायचे ते दरवर्षी करतेच.
नाही भारत असे काह्ही करणार नाही ,, कारण आपण षंढ आहोत..
चुकून भाजप सत्तेवर आले आहे ..चुकून पडलेले स्वप्न आहे ते
लवकर ममता दीदी किंवा राऊळ जी सत्तेवर यवो हि ईश्वर चरणी प्रार्थना ( अरे चुकलो ईश्वर हा हिंदू शब्द वाटतो.. उगा कोणाच्या भावना दुखावयायला नकोत ... प्रभू ( हा आता कसे बरे वाटले) चरणी प्रार्थना... अर्रे प्रभू तरी कशाला लाल बावट्याला वाईट वाटेल त्याला धर्मच मान्य नाही . आता काय करावे !

निनाद

विभाजन विभीषिका स्मृति दिवसाला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी विभाजन विभीषिका स्मृति दिवस पाळण्यावर टीका केली आहे. विभीषिका स्मृति दिवसामुळे पाकिस्तानच्या भावना दुखावल्या जातील असा काँग्रेसचा भाव आहे असे दिसून येते. म्हणजे हिंदु मेले तरी चालतील पण पाकिस्तान दुखावले नाही पाहिजे. भारतीयांपेक्षा पाकिस्तानच्या भावना काँग्रेससाठी जास्त महत्त्वाच्या आहेत असे त्यांनी यातून सूचित केले आहे.

चौकस२१२

दुर्दवी असले तरी विभाजन झाले हे योग्यच झाले...

नाहीतर "ओसामा भारतात सापडला" अशी बातमी आली असती...

गॉडजिला

दुर्दवी असले तरी विभाजन झाले हे योग्यच झाले...
होय परंतु ज्या भयप्रद पद्धतीने त्यात हिंदू मारले गेले ते अनावश्यक होते.

निनाद

पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा केली आहे. यामुळे ग्रीन हायड्रोजनद्वारे स्वच्छ ऊर्जा निर्मिती केली जाऊ शकेल. अर्थात यामुळे भारतात नव्या तंत्रज्ञानाला चालना मिळेल असे दिसते. भारतात सीएनजी नळ जोडणीची सुरुवात २०१४ नंतर केली गेली आहे. मोदींनी पुढाकार घेऊन या योजने अंतर्गत अनेक भाग सीएनजी नळ प्रकल्पाला जोडले जात आहेत हे पाहिले आहे. आधीच वेगात असलेल्या प्रकल्पाचा जोडणीचा देशातील वेग वाढवला जाणार आहे. यामुळे भारत उर्जा क्षेत्रात आयात कमी करू शकेल.

निनाद

सध्या भारतातील विभागवार वायू वितरण व्यवस्था अशी आहे.

 

विभाग
% खप टक्केवारी
वायू वितरण नळ जोडणी व्यवस्था असलेली राज्ये
वायू वितरण नळ जोडणी व्यवस्था नसलेली राज्ये

पश्चिम
५३%
गुजरात, महाराष्ट्र
गोवा

उत्तर
२६%
दिल्ली, उ.प्रदेश, हरियाणा, राजस्थान
पंजाब, जम्मु काश्मिर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड

मध्य
३%
मध्य प्रदेश
छत्तीसगड

दक्षिण
१४%
तमिळनाडू आन्ध्र प्रदेश
केरळा, कर्नाटका

पूर्व
शून्य!
एकही राज्य नाही!
बिहार, प. बंगाल, झारखंड, उडिसा

उत्तर पूर्व
४%
आसाम, त्रिपुरा
मेघालय, सिक्कीम अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मणिपुर, नागप्रदेश

 
 
 
 


संदर्भः https://www.pngrb.gov.in/Hindi-Website/pdf/vision-NGPV-2030-06092013.pdf

यात पुढे जाऊन सुधरणा होईल यात शंका नाही.

Rajesh188

निर्मिती खर्च जास्त असल्या मुळे अव्यवहारी. मोदी नी फक्त घोषणा केली आहे . कार्य पूर्णत्वास गेल्यावर च त्या वर विश्वास ठेवला जाईल.
घोषणा करणे आणि सोडून देणे ,विकास फक्त कागदावर च प्रत्यक्षात काम झीरो.
अशीच मोदी सरकार ची प्रतिमा आहे.
Cng पाइप द्वारे वितरण करणार आहेत.
त्याच्या अगोदर पासून lpg पाइप द्वारे घरोघरी काँग्रेस सरकार नी पोचवलं आहे.
त्याची आकडेवारी आणि मोदी काळातील cng ची आकडेवारी ध्या .
म्हणजे चित्र स्पष्ट होईल..
लोक आता हुशार झालेत अनुभवातून सहज विश्वास ठेवणार नाहीत ह्या सरकार वर

Rajesh188

निर्मिती खर्च जास्त असल्या मुळे अव्यवहारी. मोदी नी फक्त घोषणा केली आहे . कार्य पूर्णत्वास गेल्यावर च त्या वर विश्वास ठेवला जाईल.
घोषणा करणे आणि सोडून देणे ,विकास फक्त कागदावर च प्रत्यक्षात काम झीरो.
अशीच मोदी सरकार ची प्रतिमा आहे.
Cng पाइप द्वारे वितरण करणार आहेत.
त्याच्या अगोदर पासून lpg पाइप द्वारे घरोघरी काँग्रेस सरकार नी पोचवलं आहे.
त्याची आकडेवारी आणि मोदी काळातील cng ची आकडेवारी ध्या .
म्हणजे चित्र स्पष्ट होईल..
लोक आता हुशार झालेत अनुभवातून सहज विश्वास ठेवणार नाहीत ह्या सरकार वर

Rajesh188

निर्मिती खर्च जास्त असल्या मुळे अव्यवहारी. मोदी नी फक्त घोषणा केली आहे . कार्य पूर्णत्वास गेल्यावर च त्या वर विश्वास ठेवला जाईल.
घोषणा करणे आणि सोडून देणे ,विकास फक्त कागदावर च प्रत्यक्षात काम झीरो.
अशीच मोदी सरकार ची प्रतिमा आहे.
Cng पाइप द्वारे वितरण करणार आहेत.
त्याच्या अगोदर पासून lpg पाइप द्वारे घरोघरी काँग्रेस सरकार नी पोचवलं आहे.
त्याची आकडेवारी आणि मोदी काळातील cng ची आकडेवारी ध्या .
म्हणजे चित्र स्पष्ट होईल..
लोक आता हुशार झालेत अनुभवातून सहज विश्वास ठेवणार नाहीत ह्या सरकार वर

Rajesh188

निर्मिती खर्च जास्त असल्या मुळे अव्यवहारी. मोदी नी फक्त घोषणा केली आहे . कार्य पूर्णत्वास गेल्यावर च त्या वर विश्वास ठेवला जाईल.
घोषणा करणे आणि सोडून देणे ,विकास फक्त कागदावर च प्रत्यक्षात काम झीरो.
अशीच मोदी सरकार ची प्रतिमा आहे.
Cng पाइप द्वारे वितरण करणार आहेत.
त्याच्या अगोदर पासून lpg पाइप द्वारे घरोघरी काँग्रेस सरकार नी पोचवलं आहे.
त्याची आकडेवारी आणि मोदी काळातील cng ची आकडेवारी ध्या .
म्हणजे चित्र स्पष्ट होईल..
लोक आता हुशार झालेत अनुभवातून सहज विश्वास ठेवणार नाहीत ह्या सरकार वर

सर टोबी

हे स्पष्ट कराल का? महानगर गॅस लिमिटेडची स्थापना १९९५ ला झाली तर महाराष्ट्र गॅस लिमिटेड २००६ ला स्थापन झाली आहे. पुण्यात मला पाइप्ड गॅस जोड फेब्रुवारी २०१६ ला मिळाला. मोदींनी असे काय वैशिष्ठ्यपूर्ण गोष्ट केली कि मे २०१४ पासून मुंबई ते पुणे गॅस पाईप लाईन पूर्ण होऊन ग्राहकांना कनेक्शन मिळाले?

भारत फार अगोदर पासून जागतिक पर्यावरण संस्थेचा सदस्य आहे आणि जैविक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठीचे प्रयत्न हे पूर्वीच्या सरकारांनीदेखील केले आहेत. मी नमूद केलेली संस्था फार ध्येयनिष्ठेने काम करते असे नाही. अमेरिकेची तिथे मुजोरी चालते. विकसनशील देशांमधील गरीबी हा सर्व मानवतेला असलेला मोठा धोका आहे अशा प्रकारचा कांगावा जवळपास ८०% इंधन जेमतेम जागतिक लोकसंख्येच्या १०% लोकांमध्ये वापरणारी देश असा कांगावा करीत असतात. भारताचे प्रतिनिधी कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी असणारा दबाव झुगारून विकसनशील देशांची बाजू तेथे खंबीरपणे मांडतात आणि इंधनाचे विविध पर्यायांना विकसित करण्याचा प्रयत्न करतात. तेंव्हा काहीतरी माहिती डकवताना अभिनिवेश टाळता आला तर बरे.

निनाद

काहीतरी माहितीडकवताना अभिनिवेश टाळता आला तर बरे. - काहीतरी माहिती?? बरं!!
अभिनिवेश टाळता आला तर बरे. जर घडामोड असेल तर त्याच्या परिणांचा विचार केला तरी अभिनिवेश असणारच. अभिनिवेश नसेल तर घडामोडी नमूद तरी कशाला करायच्या? असो.

महानगर गॅस लिमिटेड नावातच असल्याप्रमाणे फक्त महानगरात आहे.
मोदींनी असे काय वैशिष्ठ्यपूर्ण गोष्ट केली
२०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा केवळ वरील नावा प्रमाणे २५ लाख जोडण्यांद्वारे फक्त महानगरात गॅस वितरण होत होते.
त्यानंतर त्यांनी सुमारे ४०० शहरात नैसर्गिक वायू वितरणाचे कार्य हाती घेतले आहे. यासाठी भारतभर वायू वितरण पाईपलाईन टाकणे सुरू आहे. सुमारे ७०% लोकसंख्येला वायू वितरणाच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न आहे. या शिवाय आधी फक्त देशात फक्त ६६ नैसर्गिक वायू स्टेशन्स होती ती संख्या शेकड्यांनी वाढते आहे. या वर्षी अधिक १२९ जिल्ह्यात नैसर्गिक वायू स्टेशन्स वितरण पंप सुरू केले आहेत. इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीचा संदर्भ येथे पहा याशिवाय नैसर्गिक वायू पाईपलाईन ३२००० किमी पर्यंत वाढवले जात आहे. वाहनात नैसर्गिक वायूचा वाटा १५% पर्यंत वाढवण्याचा आऊटलूक ने दिलेल्या बातमी प्रमाणे मोदींचा प्रयत्न आहे.

वरील बातम्या पहता मोदी सरकार आल्या त्यांनी पासून भारतात मिळणार्‍या वायूच्या वितरणावर मोठा भर देऊन पायाभूत सुवीधांचे प्रचंड कार्य आरंभले आहे असे दिसून येते आहे. याचा जागतिक पर्यावरणावर मोठा परिणाम होणार आहे आणि इंधनाचे प्रदुषण कमी होणार आहे. २०१५ मध्ये पॅरिस कराच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून कराराच्या२०३० पर्यंत कार्बन फुटप्रिंट त्याच्या २००५ च्या पातळीपेक्षा सुमारे ३०% कमी करण्याची योजना आखली आहे.
इतक्या मोठ्या स्तरावचे कार्य आधीच्या सरकारने केल्याचे माझ्या पाहण्यात नाही. त्यामुळे त्यांची कार्य पद्धती आणि व्हिजन यासाठी त्यांचे कौतुक केलेच पाहिजे.

सुबोध खरे

असं कसं, असं कसं?

रोज सकाळी श्री मोदींच्या नावाने शंख केल्या शिवाय काही लोकांचे पोट साफच होत नाही.

सर टोबी

नसली कि तिला भाटगिरी म्हणतात. तुमच्या प्रतिसादातील बेदरकारपणा बघता भाटगिरीला तुमची हरकत नसावी. असो.

योजना परिणामकारक आहेत कि नाही हे त्यांच्या आरंभशूरतेवर नाही तर चिकाटीने राबवनिव्यावर आणि यशस्वी होण्याच्या शक्यतेवर अवलूंबन असते. उदाहरणादाखल उज्वला योजनेची आत्ता काय परिस्थिती आहे ते बघा. ग्रामीण भागात २२ रु. रोज आणि शहरी भागात ३७ रु. रोज अशी प्राप्ती असणाऱ्यांना दारिद्र्यरेषेखालील वर्ग समजले जाते. अशा वर्गात घरटी दोन माणसं जरी मिळवती आहेत असे समजले तरी अनुदानप्राप्त सिलिंडर देखील त्यांना खरेदी करता येणार नाही हे समजायला फार मोठी अक्कल असण्याची गरज नाही.

आरंभशूरतेचं अजून एक उदाहरण म्हणजे स्वच्छ भारत योजना. अजून एक माथी बसलेला कर या व्यतिरिक्त या योजनेला काही अस्तित्व आहे का अशी शंका येते.

तेंव्हा निव्वळ घोषणा केली म्हणजे फार मोठठं काम झाले असे असेल तर ठीकच आहे.

उज्वला योजना फार चांगल्या रीतीने राबवलेली आहे. माझ्या स्वतः च्या गावात बऱ्याच गरीब लोकांना फुकट गॅस जोडणी आणि गॅस सिलिंडर मिळालेला आहे. आणि महत्वाचे म्हणजे लोकांना वापरायची सवई पण लागलेली आहे. पण ग्रामीण भागात दिवसाला 22 पेक्षा कमी कमावणारे घर शोधूनही सापडणार नाही, कारण शेतकमजुराची एका दिवसाची हजेरी 300 ते 400 आहे.
स्वच्छ भारत योजनेचा सर्वात मोठा फायदा हा महिलांना झाला. बऱ्याच ठिकाणी महिला स्वछताग्रह उभी राहिलेली आहेत. रेल्वे स्टेशन्स पहिल्या पेक्षा स्वछ झालीत. पण मनावी अशी स्वछता झाली आस म्हणता येणार नाही. पण यात केवळ सरकार चा दोष नाही तर आपल्या सवयी पण कारणीभूत आहेत.

सुबोध खरे

जाऊ द्या हो.

श्री मोदी यांनी स्वतः झाडू घेऊन स्वच्छता केली तरी चमच्यांचं आणि गुलामांचं समाधान होणारच नाही.

कारण ७० वर्षातील घाण ७ वर्षात साफ होणारच नाही.

बाकी चालू द्या

निनाद

तुमच्या प्रतिसादातील बेदरकारपणा बघता भाटगिरीला तुमची हरकत नसावी. असो. सहमत आहे.

Rajesh188

तालिबान नी सहज अफगाणिस्तान च सत्ता काबीज केली.सरकारी फौजांकडून विरोध झालाच नाही.
असे वाटत जसे काही ठरवून केल्यासारखे च झाले .
पैसे,वेळ खर्च करून नाटो आणि अमेरिकेने अफगाण लष्कर ला प्रशिक्षण दिले ,अत्याधुनिक शस्त्र दिली त्याचा वापर झालाच नाही.
आता प्रशिक्षित ,अत्याधुनिक हत्यार नी सज्ज अफगाण फौज तालिबान च्या बाजून नेच लढेल.
दुसऱ्याच्या पैस्यानी सेना उभी करून घेण्याचे चातुर्य पूर्ण जगात फक्त अफगाणिस्तान कडेच आहे.
अंतस्थ हेतू खूप वेगळा आहे.अमेरिका तिथे हरली नक्कीच नाही उलट त्यांनी त्यांचा हेतू साध्य केला असावा.
पण अमेरिका नक्की काय राजकारण खेळत आहे ते समजण्यास मार्ग नाही.
ज्या पाकिस्तान वर अफगाण सत्ताधारी तालिबान ला मदत करण्याचा आरोप करत होते .
तिथेच हे आश्रयाला गेले.
म्हणजे काहीतरी शिजतंय हे नक्की.

काबूल: महिला, अल्पसंख्यकांना शरियतनुसार अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणार; तालिबान प्रवक्ते मोहम्मद नईमचे वक्तव्य

एक गोष्ट लक्षात आली आहे का? बघा तालिबान शरीया कायद्याप्रमाणे अभिव्यक्तीस्वातंत्र्य द्यायला तयार झाले आहेत पण मोदी मात्र भारतीय राज्यघटनेत नागरिकांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य दिलेले असूनही पार्लामेंट हल्ल्यामधील 'शहिदाला' श्रध्दांजली वाहायच्या सभेत भारताचे तुकडे तुकडे व्हावेत अशा घोषणा देणार्‍यांविरोधात देशद्रोहाचे खटले दाखल करतात. म्हणजे कायद्याची, राज्यघटनेची, अभिव्यक्तीस्वातंत्र्याची जास्त पर्वा कोणाला आहे? तालिबान्यांना की मोदींना? दोघांमध्ये अधिक श्रेष्ठ कोण? तालिबानी की मोदी?

Rajesh188

भारताचे पंतप्रधान पद हे भारतीय नागरिकांसाठी आदरणीय आहे.मग त्या पदावर कोणी ही असेल तरी .
तालिबानी अतिरेक्यांची तुलना भारताच्या पंतप्रधान शी करताना थोडा तरी विचार करणे अपेक्षित होते.
जे काही मतभेद असतील पंतप्रधान ह्यांच्या कार्याविषयी .पण ते देशांतर्गत आहेत.
पण तालिबान शी तुलना .खूप त्रासदायक

मग त्या पदावर कोणी ही असेल तरी .
तालिबानी अतिरेक्यांची तुलना भारताच्या पंतप्रधान शी करताना थोडा तरी विचार करणे अपेक्षित होते.
जे काही मतभेद असतील पंतप्रधान ह्यांच्या कार्याविषयी .पण ते देशांतर्गत आहेत.
पण तालिबान शी तुलना .खूप त्रासदायक

खो खो खो.

मग गंदी नालीका किडा, नीच, हिटलर वगैरे विशेषणे विचारवंतांनी मोदींना बहाल केली होती तेव्हा ही अक्कल कुठे पेंड खायला गेली होती?

Rajesh188

तालिबान शी तुलना करताना जशी तुमची अक्कल पेंड खायला गेली तशीच भारताच्या पंतप्रधान पदावरील व्यक्ती विषयी अभद्र भाषा बोलणाऱ्या लोकांची पण गेली असेल.
मतभेद आहेत,आरोप आहेत पण ती बाब वेगळी आहे

चूक. पंतप्रधानपदी जर नेहरू, ईंदीरा गांधी असतील तर ते पद काही लोकांसाठी आदरणीय असत नाही. पण वाजपेयी , मोदी असतील तरच आदरणीय होईल. मग भलेही ईंदीरा गांधींनी बांगलादेशात सैन्य पाठवले असले तरी आणी ईतरानी हाफीज सईद ला सोडणे किंवा कारगील वेळी सैन्याला सिमापार करू दिली नसली तरी.
राष्ट्रापेक्शा विशीष्ट पक्शाला निष्टा वाहीलेले लोक आहेत.

Rajesh188

आज खूप महिन्यातून रेल्वे चा पास काढण्याची वेळ असली..
फक्त गोंधळ
राज्य सरकार च्या निर्देश नुसार फक्त दोन लसी चे डोस घेतलेल्या लोकांना प्रवास करण्यास मान्यता.
Bmc कर्मचारी असलेल्या व्यक्ती कडून तसे कन्फर्म करून घेतल्या नंतर महिन्याचा पास.
पण काहीच कन्फर्म न करता फक्त आयडी बघून सर्रास प्रवासी तिकीट दिले जात होती.
राज्य आहेत म्हणून केंद्र आहे राज्यच नसतील तर केंद्र पण नसेल..
दोन्ही सरकार मध्ये समन्वय हवा.
पण तो नाही.
भारतातील राजवट म्हणजे मूर्ख लोकांची राजवट असेच मत झाले.

Rajesh188

आज खूप महिन्यातून रेल्वे चा पास काढण्याची वेळ असली..
फक्त गोंधळ
राज्य सरकार च्या निर्देश नुसार फक्त दोन लसी चे डोस घेतलेल्या लोकांना प्रवास करण्यास मान्यता.
Bmc कर्मचारी असलेल्या व्यक्ती कडून तसे कन्फर्म करून घेतल्या नंतर महिन्याचा पास.
पण काहीच कन्फर्म न करता फक्त आयडी बघून सर्रास प्रवासी तिकीट दिले जात होती.
राज्य आहेत म्हणून केंद्र आहे राज्यच नसतील तर केंद्र पण नसेल..
दोन्ही सरकार मध्ये समन्वय हवा.
पण तो नाही.
भारतातील राजवट म्हणजे मूर्ख लोकांची राजवट असेच मत झाले.

सुक्या

पुढच्या निवडणुकीत तुम्ही उभे रहा ... बदला सारे हे ..
बाकी या अनागोंदी विषयी तक्रार केलीच असेल ... काय झाले त्याचे ते पण सांगा ..
कोर्टात एखादी जनहित याचिका पण दाखल करा ...

या पैकी काहीही केले नसेल ... तर ... पलायन करा ... (नेहेमीप्रमाणे) . . .

Rajesh188

खूप मोठे शुर विर आहेत अमेरिकेसारखं अती प्रचंड राक्षसी लष्करी शक्ती असलेला देश अत्यंत मागास , शस्त्र आस्त्र साठी दुसऱ्या वर अवलंबून असलेल्या अत्यंत निकृष्ट तालिबान सारख्या संघटना समोर. हरला हे पटणार च नाही.
काही मिनिटात जग नाहीसे करण्याची शक्ती अमेरिका बाळगून आहे.
त्या समोर तालिबान काय आहे.
बदनाम करून सर्वनाश करण्याचा परवाना सर्व देशांनी दिला की बघा .काही तासात अफगाणिस्तान गुलाम असेल

Rajesh188

पाकिस्तान कडून धोका,चीन कडून धोका,बांगलादेश कडून धोका,नेपाल कडून धोका,तालिबान कडून धोका .
मग भारतीय सैन्य सुसज्ज करा,जगातील सर्वोत्तम शस्त्र अस्त्र त्यांना ध्या
देशातील सर्वोच्च गुणवत्ता असणारी लोक सैन्यात भरती करा.
AI वर आधारित पर्यायी लष्कर रोबोटिक
तयार करा .
की फक्त भीती दाखवणार आणि करणार काहीच नाही.
हे राजकारण बंद करा ..
एकी कडे मुस्लिम कसे हिंदू चे दुश्मन आहेत हे सांगायचे आणि दुसरीकडे सर्व सामान्य हिंदू लाचार कसा होईल अशी सरकारी धोरण rabvaychi ही धोरण बंद करा..
जनता आता झोपेतून जागी होत आहे

रावसाहेब चिंगभूतकर

एक जेन्यूईन प्रश्न. तुम्हाला हे सगळं टाइप करण्याइतका वेळ कसा मिळतो?

एक जेन्यूईन प्रश्न. तुम्हाला हे सगळं टाइप करण्याइतका वेळ कसा मिळतो>>>>
हे चांगलंय. मुळावर घाव घातला कुणी की विषय डायवर्ट करायचा.

रावसाहेब चिंगभूतकर

अजिबात नाही. विषय डायव्हर्ट करण्यासाठी तो आधी वाचावा लागतो. मी त्यांचे प्रतिसादच वाचत नाही. तेवढा वेळच नसतो. एकदा त्यांचे लिहिणे सुरू झाले की फक्त अंगठा खालून वर करत राहायचं असं निदान मी तरी करतो. डायव्हर्ट वगैरे करत बसण्यापेक्षा मला इतर बरीच कामे असतात.

अजून एक जेन्युईन प्रश्न--

बाकी सगळे मराठीत लिहिलेले असताना राबवायची हा एकच शब्द rabvaychi असा लिहायचे काय कारण असू शकेल?

mayu4u

अफगाणिस्तानातून पलायन केलेल्या मुस्लिम शरणार्थींना जगातल्या अन्य मुस्लिम देशांपैकी कोणत्या देशाने रेस्क्यू केले म्हणे?

गॉडजिला

Save Gaza साठी गळे काढनारे अफगाण बाबत गप्प कसे ?

तालिबान फायटर्सना(?) करायचंय लग्न, मागवली 15 वर्षांखालील तरुणींची यादी– News18 Lokmat -

इकडून तिकडे भरतीचा ओघ लागणार काय ?

Rajesh188

अफगाणिस्तान काही भारताचा शेजारी नाही .आणि अती उच्च लष्करी takat असलेला देश पण नाही.
लोकसंख्या अतिशय किरकोळ.
भारताला तो विषय गंभीर पण घेण्याची काही गरज नाही
चीन जसे तालिबान चे समर्थन केले तसे समर्थन न करता भारता नी तटस्थ राहिले तरी चालेल
उगाच त्या मध्ये उडी घेण्याचे कारण नाही.
आणि तालिबान,मुस्लिम,अतिरेकी ह्यांचा बागुलबुवा उभा करून हिंदू ना भीती दाखवून २०२४ ची निवडणूक जिंकू असे कोणी मनात पण आणू नये.
लोक सजक आहेत.

इरसाल

अच्छा म्हणजे कॉग्रेसच्या पराजयाचे कारण आधीच ठरवुन ठेवलेत. गुड .....कॉन्फीडन्स चांगलाच आहे.
भाजप जिकला तर "अफगाणिस्तान" चे कारण दाखवुन जिंकला.
बादवे....भाजपा काय फंडा वापरेल अफगाणिस्तान चे नाव वापरुन जिंकायला???? काय भिती, स्ट्रॅटेजी वगैरे (ही कारणं पण तयार असतीलच म्हणा)

भाजपाच्या विजयाविषयीच्या शुभेच्छांबद्द्ल धन्यवाद.

आय टी सेल चे ढकलपात्र येत आहेत की. पण आता २०१४ राहीला नसल्याने लोक पडताळणी करताहेत. त्यामुळे खोटं पण रेटून बोला हा फोर्म्युला आता यशस्वी होणार नाही.

mayu4u

"सजग" म्हणायचं आहे का?

सजग लोकांनी ३०३ खासदार निवडून दिलेत, तरी (किंवा म्हणूनच) तुमची मूळव्याध ठसठसतेय, त्यावर जरा उपचार करायचं बघा.

चौकस२१२

भारताला तो विषय गंभीर पण घेण्याची काही गरज नाही
हो ना आणि इम्रान खान मियांनी म्हणल्याप्रमाणे भारताने पण अफगाणिस्तान गुलामगिरीतुन मुक्त असे काही तरी जाहीर करावे .. काय म्हणता ?
मुस्लिम अतिरेक्यांची ही धर्मशाळा होईल आणि त्याचे परिणाम भारतावर होणार नाहीत असे असे तुमचे म्हणणे असेल तर धन्य आहे १८८
तुम्ही आपले पेट्रोल भा ववाढ / पत्रकारितेची गळचेपी हा विषय धरून मोदींना कसे पाडायचे त्याकडे लक्ष द्या ..

श्रीगुरुजी

एकाच वेळी ३७६ म्हणजे एकदम दोन १८८ आलेत.

अजून यायला हवे. म्हणजे तेवढंच जास्त मनोरंजन.

mayu4u

ठणकणारी मूळ्व्याध घेउन.

Ujjwal

अगदी अगदी ३९ टक्क्यांची उदबत्ती लावायला हजर

सौन्दर्य

ह्या घडीला अफगाणिस्तान मध्ये जवळजवळ १८००० अफगाणी जे अमेरिका तसेच नाटो फौजांसाठी दुभाष्याचे काम करायचे, अमेरिकी/नाटो तळावर वेगवेगळी कॉन्ट्रॅक्टची कामे करायचे ते आता कात्रीत सापडले आहेत. अमेरिका त्यांना वेळेत अफगाणिस्तानमधून सुखरूप बाहेर काढू शकली नाही त्यामुळे ते आयतेच तालिबानच्या हाती लागणार व त्यांचे हाल आता कुत्राही खाणार नाही. ह्या सर्व मंडळींकडे एक गद्दार म्हणून पहिले जाईल व त्यांचे भवितव्य आणि भविष्य पूर्णपणे अंधारमय आहे.

+१
आजच निनाद कुलकर्णी ह्यांची जर्मन आख्यान ही लेखमाला संपवली त्यात एका दूभाष्याचा तालीबानीनी मान चिरून हत्या केल्याचा ऊल्लेख होता. गळ्या एवजी मान का चिरली तर गळाचिरल्यावर माणूस लवकर मरतो. मान चिरल्यावर तडफड.....
अमेरीका तालीबान ला संपवू शकली नाही हे खरे नाही वाटत. काहीतरी डील झाली असावी तालीबान नी अमेरीकेत. नाहीतर ईतकं सहज काबूल पडेल??

"... तेव्हा तुम्ही कुठे होतात ?" हा प्रश्न अनेक विचारवंताना विचारण्यात येतो. सध्याच्या काळात तर तो हमखास विचारला जातोच.
कवी जावेद अख्तर ह्यानी अफगाणिस्तनातातील परिस्थितीवर भाष्य केले हे बरे झाले-
"अमेरिका जर तालिबान नावाच्या या रानटी लोकांचा नायनाट करू शकत नसेल तर ते कोणत्या प्रकारची महाशक्ती आहेत? तसेच हे जग कोणत्या प्रकारचं आहे ज्यांनी अफगाण स्त्रियांना दया नसलेल्या धर्मांधांच्या भरवशावर सोडलंय. मानवाधिकारांचे रक्षणकर्ते असल्याचा दावा करणाऱ्या सर्व पाश्चात्य देशांना लाज वाटली पाहिजे.” असं जावेद अख्तर यांनी म्हटलंय
https://www.loksatta.com/desh-videsh-news/javed-akhtar-and-taslima-nasr…

प्रदीप

खुद्द एका भारतीय मुस्लिमाने हे म्हटले आहे , ते नक्कीच कौतुकास्पद आहे. आता तरी निदान तथाकथित भारतीय 'विचारवंत, पुरोगामी इत्यादी' काही धीट वक्तव्ये करतील का ते पाहूंयात. 'अशी आशा करतो' असे लिहीणार होतो, इतक्यात जाणवले, उगाच फोल आशा करू नये, आपल्यालाच त्रास होतो.

भारतीय मीडिया मात्र काही 'आशादायी' बातम्या देण्यात मग्न आहे. उदा. इंडियन एक्स्प्रेसने, अफगाणिस्तानातील सीख व हिंदूंना, तालिबानने 'शांती व सुरक्षा' देत असल्याचे जाहीर केले आहे, अशी मोठ्या मथळ्याची बातमी दिली आहे. ती वाचून हसावे की रडावे, हे कळेना. हे आश्वासन म्हणे तालिबान्यांनी, सीखांच्या भेटीत दिले. (त्यांत हिंदू नक्की कुठून आले, हे मला समजले नाही. बातमीत फक्त तेथील एका मोठ्या गुरूद्वारांत हिंदूंनीही आश्रय घेतला आहे' इतके नमूद केले होते). पुढे पाहूंयात काय होते आहे ते.

चौकस२१२

जावेद अख्तर ह्यानी अफगाणिस्तनातातील परिस्थितीवर भाष्य केले
जग कोणत्या प्रकारचं आहे ज्यांनी अफगाण स्त्रियांना दया नसलेल्या धर्मांधांच्या भरवशावर सोडलंय.

हे महाशय दोन्ही कडून बोलणार .. सोयीनुसार
मुळात "अमेरिका अफगाणिस्तनात गेली का " अशी डमरू वाजवायचा आणि आता सोडून का गेलात म्हणून आरडाओरडा करायाचा

असो त्यापेक्षा हि अफगाणिस्तानातील युवती काय म्हणते ते पहा
https://www.youtube.com/watch?v=LxsiDCigOqQ

इरसाल

हे अख्तर महाशय कोणत्या अधिकाराने पाश्च्यात्त देशांना बोल लावतात. आतापर्यंत त्यांनीच तर वाचवल नां.
त्या नवबालविवाहोत्स्युक धर्मांधानाच का नाही समजवुन सांगत.

इरसाल

अश्या विदारक परिस्थितीमधे अफगाण जनतेच्या न्याय्य मागण्या "स्वयंघोषित नवीन सरकार तालिबान " समक्ष मांडण्यासाठी मी खालील व्यक्तींचे (अति) शिष्टमंडळ काबुलला पाठवावे असा विचार करतोय. तुम्हाला वाटत असेल तर अजुन काही लोकांना अ‍ॅडवु शकता.
१. माजी उपराष्ट्रपती सुश्री. हमीद अंसारी,
२. नसिरुद्दीन शहा
३. जावेद अख्तर
४. माजी पंतप्रधान सुश्री. मनमोहन सिंग

mayu4u

मुमि (मुळव्याधग्रस्त मिपाकर) लोकांना पण पाठवून द्या, बॅण्डविड्थ वाचेल.

Rajesh188

विरोधी मत म्हणजे केंद्र सरकार चा दुश्र्वास नाही.
Bjp असेल किंवा कोणताही भारतीय राजकीय पक्ष परका थोडी आहे.
पण जन हितविरोधी निर्णय होत असतील तर १००% भारतीय लोक त्या वर हक्कानी ,अधिकार नी टीका करू शकतात .
मूळव्याध झालंय ,मोदी विरोधाची कावीळ आहे असेल नीच्य दर्जा ची मत व्यक्त करू नयेत.
सरकार विरोध म्हणजे भारत विरोध नक्कीच नाही .
राज्य सरकार वर फालतू comment करता तेव्हा तुम्ही मराठी असून महाराष्ट्र चा द्वेष करता तुम्हाला महाराष्ट्र हित झाले की मूळव्याध उठतो असे म्हणले तर चालेल का?
सत्य असले तरी तुमच्या मत व्यक्त करण्याचा अधिकार आम्ही मान्य करतो.
वरती एका सभासद नी मोदी ची तुलना तालिबानी वृत्ती शी केली .
ते मात्र आक्षेप घेण्यासारखे कोणाला वाटले नाही.
मला आक्षेप घेवा लागला

वरती एका सभासद नी मोदी ची तुलना तालिबानी वृत्ती शी केली .

मीच तो सदस्य बरं का.

ते मात्र आक्षेप घेण्यासारखे कोणाला वाटले नाही.
मला आक्षेप घेवा लागला

याचं कारण ते उपरोधिक लिहिले होते हे इतर सगळ्यांना कळले म्हणून इतर कोणीही आक्षेप घेतला नाही. नेमके तुम्हालाच ते कळले नसेल तर त्याला इतरांचा नाईलाज आहे. आणि त्या प्रतिसादातून मोदींवर टीका नाही की तालिबानींवरही टीका नाही तर त्या प्रतिसादाचा रोख भलतीकडेच आहे हे पण तुम्हाला कळले नसेलच.

बाकी तुमचे प्रतिसाद अनेकदा निखळ मनोरंजन करत असतात त्यामुळे त्याबद्दल धन्यवाद.

सुबोध खरे

क्लिंटन

हे त्या भुजबळांना सुद्धा सांगा

त्यांना सुद्धा उपरोध कळत नाही

mayu4u

>> राज्य सरकार वर फालतू comment करता तेव्हा तुम्ही मराठी असून महाराष्ट्र चा द्वेष करता तुम्हाला महाराष्ट्र हित झाले की मूळव्याध उठतो असे म्हणले तर चालेल का?

महाराष्ट्र हित होत असतं तर टीका का केली असती बरे?

असो, जास्त लोड घेऊ नका. करमुक्त करमणूक चालू ठेवा!

Rajesh188

तालिबान ला सत्तेमधून हाकलून देण्यासाठी भारत काय करू शकतो.
अफगाणिस्तान मध्ये लोकनियुक्त सरकार स्थापन करण्यासाठी भारत काय करू शकतो.
१)सैन्य कारवाई करू शकतो.
२) संयुक्त राष्ट्र समिती चा वापर करून अफगाणिस्तान सैन्य कारवाई करण्यासाठी पुढाकार घेवू शकतो
३) आर्थिक दबाव टाकू शकतो.
४) राजकीय दबाव टाकू शकतो

तेथील अन्याय ग्रस्त स्त्रिया ,मुल,!नागरिक ह्यांना भारतात शरण देवू शकतो.
माझ्या मता नुसार ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं नाही
असेच आहे

राजेश १८८ ह्याना खरंच मानावं लागेल. भाजपभक्त येणकेन प्रकारे त्याना वयक्तिक बोल सावून त्यांचं माणसीक खच्चीकरण करन्याचा प्रयत्न करातहेत पण तरी ते जराही संतूलन ढळू देत नाहीयेत आणी संयमी प्रतिक्रीया देताहेत.
मिपा व्यवस्थापनाने भक्ताना सक्त ताकीद द्यावी.

गॉडजिला

त्यांना मानावेच लागेल म्हणुन तर कोणितरी त्याना मानाचा मान मनापासुन देत आले आहे, भक्त बसलेत १८८वर फैरी झाडत अन त्यांच्या आकांच्या मांडिला मांडि लावुन महान रसग्रहणे चघळत :)

सुबोध खरे

मिपा व्यवस्थापनाने भक्ताना सक्त ताकीद द्यावी.

हा हा हा हि हि हि हू हू हू

mayu4u

व्यवस्थापन मर्जीतल्या आयडींना काहीच करत नाही (त्यांना विचारलेल्या प्रश्नांच्या कमेंट्स उडवण्या व्यतिरिक्त... माझी बॅट म्हणून मी क्याप्टन!)

अन्यथा व्यवस्थापनाने कायप्पा ग्रुप प्रमाणे काही लोकांना केव्हाच लाथ मारून हाकलून दिलं असतं!

तेच तर. हा कायप्पा गृप नाही. नाहीतर कायप्पा गृप प्रमाणे भक्तानी मिपा सुध्दा भाजप प्रचारासाठी ताब्यात घेतला असता. आणी चर्चाच झाली नसती.

mayu4u

कोडगेपणाची आणि मूर्खपणाची!

साहित्य, चित्रपट, गप्पाटप्पा अशा सगळ्या समूहांमधून हाकललं गेल्यावर पण भाजप विरोधाचा कांगावा करायचा... व्वा!

चित्रपट गप्पाटप्पा??? बरं.
मुर्खपणा ईथे तरी सोडा. नानाच्या मिमीवरून हकलल्यावर ही कोडगेपणा जात नाही आपला. बाकी कारण माहीत नसताना काहीही लिहीणे हे मुर्खपणाते लक्शन आहे. सुधारणा होईल ही अपेक्शा नाही तुमच्या कडून.

Rajesh188

Bjp समर्थक असणे वाईट नाही BJP सरकार केंद्रात बहुमताने आले वाईट नाही.
Bjp ही हिंदुत्व वादी पक्ष आहे ह्याचे आंधळे समर्थन करणे मूर्खपणाचे आहे.मोदी सरकार हे धनदांडग्या लोकांचे सरकार आहे हे कटू सत्य समर्थक समजत नाहीत
Bjp हिंदुत्व वादी असती तर कायद्याने जेवढे शक्य होईल तेवढे कायद्यांनी हिंदू हित साधले असते.
किंवा कायद्याने जिथे शक्य होत नाही तिथे मागच्या दरवाजाने हिंदू हित साधले असते.
जेणे करून हिंदू आर्थिक बाबतीत समर्थ होतील.
हिंदू ना खास वागणूक सरळ किंवा वाकड्या मार्गाने bjp ni दिली नाही
उलट गरीब हिंदू,मध्यम वर्गीय हिंदू कमजोर होत गेला.
शेतकरी हे जास्त हिंदू च आहेत काँग्रेस वीजे पासून पाण्या पर्यंत सर्व फ्री दिले होते.
खूप गोष्टी आहेत.
लालू rail मत्री hote तेव्हा सर्व यादव रेल्वे मध्ये होते.
सर्व भरती नियम बाजूला सारून.
Bjp सत्तेवर आहे ते पण बहुमतात.
सर्व नियम बाजूला सारून फक्त हिंदू चेच कल्याण bjp सहज करू शकते पण तसे काही त्यांनी केले नाही.
मग कसले हिंदुत्व वादी.
राज्य घटनेतील हिंदू हिता आड येणारे सर्व नियम कायदे सरकार सहज बदलू शकते.
पण तसे त्यांनी सत्ता असून पण केले नाही.

Rajesh188

Bjp समर्थक असणे वाईट नाही BJP सरकार केंद्रात बहुमताने आले वाईट नाही.
Bjp ही हिंदुत्व वादी पक्ष आहे ह्याचे आंधळे समर्थन करणे मूर्खपणाचे आहे.मोदी सरकार हे धनदांडग्या लोकांचे सरकार आहे हे कटू सत्य समर्थक समजत नाहीत
Bjp हिंदुत्व वादी असती तर कायद्याने जेवढे शक्य होईल तेवढे कायद्यांनी हिंदू हित साधले असते.
किंवा कायद्याने जिथे शक्य होत नाही तिथे मागच्या दरवाजाने हिंदू हित साधले असते.
जेणे करून हिंदू आर्थिक बाबतीत समर्थ होतील.
हिंदू ना खास वागणूक सरळ किंवा वाकड्या मार्गाने bjp ni दिली नाही
उलट गरीब हिंदू,मध्यम वर्गीय हिंदू कमजोर होत गेला.
शेतकरी हे जास्त हिंदू च आहेत काँग्रेस वीजे पासून पाण्या पर्यंत सर्व फ्री दिले होते.
खूप गोष्टी आहेत.
लालू rail मत्री hote तेव्हा सर्व यादव रेल्वे मध्ये होते.
सर्व भरती नियम बाजूला सारून.
Bjp सत्तेवर आहे ते पण बहुमतात.
सर्व नियम बाजूला सारून फक्त हिंदू चेच कल्याण bjp सहज करू शकते पण तसे काही त्यांनी केले नाही.
मग कसले हिंदुत्व वादी.
राज्य घटनेतील हिंदू हिता आड येणारे सर्व नियम कायदे सरकार सहज बदलू शकते.
पण तसे त्यांनी सत्ता असून पण केले नाही.
मुस्लिम किंवा दुसऱ्या कोणत्या धर्माचे बहु मत असणारे सरकार फक्त दोन वर्ष जरी आले तरी सर्व राज्य घटना बदलून फक्त त्यांच्या धर्माच्या हिताचेच नियम ते करून दाखवतील.
मुस्लिम तर शरीयत कायदा पण लागू करून दाखवतील.

निनाद

सर्व नियम बाजूला सारून फक्त हिंदू चेच कल्याण bjp सहज करू शकते पण तसे काही त्यांनी केले नाही. सहमत आहे.
त्यातही लोकसभा आणि राज्यसभेत जवळपास पुर्ण ताकद असतांना सरळ हिंदुराष्ट्र घोषित करायचे सोडून हे पाणचट भुमिका घेत बसतात.

राज्य घटनेतील हिंदू हिता आड येणारे सर्व नियम कायदे सरकार सहज बदलू शकते. असे कोणते कायदे आहेत या विषयी कुतुहल आहे... अधिक माहिती?

वामन देशमुख

१८८ साहेबांचे बाकीचे बेअरिंग जाऊ द्या, पण -

Bjp हिंदुत्व वादी असती तर कायद्याने जेवढे शक्य होईल तेवढे कायद्यांनी हिंदू हित साधले असते.
किंवा कायद्याने जिथे शक्य होत नाही तिथे मागच्या दरवाजाने हिंदू हित साधले असते.

आणि

Bjp सत्तेवर आहे ते पण बहुमतात.
सर्व नियम बाजूला सारून फक्त हिंदू चेच कल्याण bjp सहज करू शकते पण तसे काही त्यांनी केले नाही.
मग कसले हिंदुत्व वादी.
राज्य घटनेतील हिंदू हिता आड येणारे सर्व नियम कायदे सरकार सहज बदलू शकते.
पण तसे त्यांनी सत्ता असून पण केले नाही.
मुस्लिम किंवा दुसऱ्या कोणत्या धर्माचे बहु मत असणारे सरकार फक्त दोन वर्ष जरी आले तरी सर्व राज्य घटना बदलून फक्त त्यांच्या धर्माच्या हिताचेच नियम ते करून दाखवतील.
मुस्लिम तर शरीयत कायदा पण लागू करून दाखवतील.

हे त्यांचे म्हणणे शंभर टक्के सत्य आहे.

मी इतरत्र लिहिल्याप्रमाणे शांतीप्रिय लोक, त्यांचे समर्थक, सहाय्यकर्ते इ. मध्ये जशी विजिगिषु वृत्ती (killing instinct?) असते तशी हिंदू लोक, नेते, त्यांचे समर्थक इ मध्ये नसते, किमान आजपर्यंत दिसलेली नाही आणि बहुतेक पुढेही दिसणार नाही.

गॉडजिला

मी इतरत्र लिहिल्याप्रमाणे शांतीप्रिय लोक, त्यांचे समर्थक, सहाय्यकर्ते इ. मध्ये जशी विजिगिषु वृत्ती (killing instinct?) असते तशी हिंदू लोक, नेते, त्यांचे समर्थक इ मध्ये नसते, किमान आजपर्यंत दिसलेली नाही आणि बहुतेक पुढेही दिसणार नाही.

कारणं सो कॉलड हिंदूच हिंदुत्व आपल्यावर लादले गेले आहे या मनस्थितीत असतात, व्यक्तिगत पातळीवर त्यांना फक्त उपासना व उपासना स्वातंत्र्याचा उपयोग करून आत्म कल्याण साधणे यातच रस असतो आणि मी आधीही एकदा नमूद केल्याप्रमाणे जगातील याच्चवत सध्य स्थितीतील धर्म ही एक निव्वळ राजकीय बाब उरली आहे याची जो पर्यंत जागृती होत नाही हिंदू हिंदु हितासाठी एक होउ शकणार नाही. :(

वामन देशमुख

जगातील याच्चवत सध्य स्थितीतील धर्म ही एक निव्वळ राजकीय बाब उरली आहे याची जो पर्यंत जागृती होत नाही हिंदू हिंदु हितासाठी एक होउ शकणार नाही

शतशः सहमत

भाजप हिंदूत्ववादी आहे हा निव्वळ गैरसमज आहे. मोदी जिंकले ते सिवतच्या प्रतिमेमुळे नाहूतर भाजपला सर्व सामान्य हिंदू हिंदूत्ववादी पक्श माणत नाही. अहो जे बंगालात कार्यकर्त्याना वाचवू शकले नाही ते हिंदू आणी देशाचे काय रक्शन करनार??

सुक्या

तालीबान आता (म्हणजे आत्ता .. पुढे काय ते माहीत नाही) जरा कमी धर्मांध वाटते आहे. म्हणजे आता तरी ते बदला घेउ वगेरे भाषा करत नाहीत. बहुदा आंतर राष्ट्रीय समुदायकडुन मान्यता घ्यायची / नवीन सरकार ला बनवताना थोडे तरी आंतर राष्ट्रीय कायदे पाळण्याची तयारी दिसते आहे.

काल सीएनेन वर एक तालेबानी लीडर ची मुलाखत पाहीली ... ते लोक आता कुराण च्या चोकटीत बसुन महिलांना अधिकार देउ असे बोलत आहेत. बहुदा सौदी अरेबिया प्रमाणे शरिया कायदा लावण्याचा विचार असावा ..

बाकी तालीबान बोलते एक आणी करते एक असा आजवरचा अनुभव आहे .. पुढे काय होते ते रोचक असेल. अमेरीकेने यातुन अंग काढुन घेतले आहे. आता तिथे जे काय होइल ते आमची जबाब्दारी नाही असे बायदेन स्पष्ट बोलला आहे. त्यामुळे रशिया / चीन तिथला ताबा घ्यायला सरसावले आहेत. तालीबान शी जुळवुन घ्यायची रणनीती हा त्याचाच भाग आहे ...

गॉडजिला

त्यामुळे रशिया / चीन तिथला ताबा घ्यायला सरसावले आहेत. तालीबान शी जुळवुन घ्यायची रणनीती हा त्याचाच भाग आहे ...

या दोनच देशांच्या अफगाणिस्तान मधिल वकिलाती बंद झालेल्या नाहीत... माझ्या नजरेत तालिबान आता जामच सुधारलयं, राजकिय द्रुश्ट्या त्यांचे टारगेट आता उघड उघड पाकिस्तान आहे. आणि गंम्मत म्हणजे पाकिस्तानला त्यांच्या खेळात त्यांचाच भस्मासुर शह देतो आहे.

पाकिस्तानने पध्दतशीर महासत्तांचा वापर वैयक्तीक स्वार्थ साधायला केला व हे करताना दहशतवाद पुरेपुर अस्तित्वात राहिल याची काळजी घेतली. तालिबानचेही आता हेच धोरण आहे प्रथम इतरांशी गोड बोलुन जुळवुन घेउन त्यांचे कडुन पैसा उभा करायचा त्याचा वापर करुन देशावर आपली पोलादी पकड मजबुत करायची व पाकिस्तानात तालिबानी राजवट उभी करायची. त्यासाठी दहशतवाद चालुच ठेवायचा. याकडे अर्थातच जोपर्यंत मोठा हल्ला होत नाही इतर देश दुर्लक्ष करत राहणार... तालिबानचे जवळचे टारगेट एकमेव आहे पाकिस्तान.

मुळात लादेन गेल्या नंतर अमेरिका अफगाणिस्तानात का राहिली ? तर विकासासाठि न्हवे तर अमेरिकन कंपन्यांचे युध्दाच्या नावाखाली खिसे भरण्यासाठी. त्यांमुळे तेथिल जनता व लश्कर आमेरिकेबाबत कधीच आश्वासक बनले नाहीत. अमेरिकेचे वैयक्तिक मनसुबे पुर्ण झाले की आपण परत वार्‍यावर ही भावना तिथे आधिपासुनच असावी म्हणुनच जेंव्हा अमेरिका, भारत, चिन वगैरेनी तालीबानसोबत बोलणी केली करजाइ व लश्कर यांच्यात आपल्याला वार्‍यावर सोडले गेल्याची भावना निर्माण झाली व त्यांनी तालिबान विरोधात लढाच उभारला नाही

निनाद

काही मुद्दे आणि भाकिते:

  1. हे चीन प्रणित आहे असे वातते. जो बिदेन चा डेमो पक्ष हा प्रामुख्याने साम्यवादी बनला आहे आणि त्यांच्या पैश्यांवर चालतो हे आता गुपित नाही. त्यानुसारच चीन ला मोकळीक देण्यासाठी येथील सैन्य काढून घेतले आहे.
  2. चीनी अधिकारी आणि तालिबानी भेट झाली आणि काही निवडक(च) मिडियामध्ये ही भेट छापून आली होती. इतरत्र बातमी दाबली आहे
  3. अफगाणिस्तानातील रिसोर्सेस वर छुपे (किंवा उघडही) चीनी नियंत्रण आणले जाईल.
  4. न्युयॉर्क टाईम्स आणि एकुण लिबरल प्रपोगंडा पाहता आता तालिबान ची खलनायकी भुमिका पुसण्याचे प्रयत्न चालले आहेत.
  5. या नंतर तालिबान आणि एकुण शांतीदूत कसे चांगले या विषयी प्रपोगंडा केल जाईल.
  6. याच वेळी एक शांतीदूत विंगचे एजंट्स यथील लोकांना फक्त लोकशाही देशात मानवतावादी तत्त्वांवर शरण द्यावे म्हणून दबाव आणतील. (शरण देण्यामध्ये कोणतेही साम्यवादी आणि मुस्लिम देश नसतील हे भाकीत आधीच करतो.)
  7. तालिबानातील काही कडवट लोकांची टोळी वेगळी होईल आणि चीन चे न ऐकता त्यांना जे करायचे आहे तेच करतील. यातून एक चेन विरुद्ध फळी उभारण्याचे प्रयत्न केले जातील.

साम्यवादी लोक मुस्लिम कट्टरता त्यांचे हत्यार म्हणून वापरतात. म्हणून हे साटेलोटे चालते. जेव्हा कट्टरता कमी होते तेव्हा साम्यवादी त्यात येनकेन प्रकारे तेल ओततात आणि आग भडकवतात. त्यातून ते त्यांचे हेतू साध्य करून घेतात. जसे की जगाचे लक्ष इतर कुठे वळवणे वगैरे.

जेव्हा अशी एखादी घटना माध्यमात फार मोठी होते तेव्हा काय दाखवले गेले नाही याचा शोध घेतला पहिजे. खरी बातमी तेथेच असते.

तालीबान आता (म्हणजे आत्ता .. पुढे काय ते माहीत नाही) जरा कमी धर्मांध वाटते आहे.

तालीबान्यांना विचारवंतांची खरी नस बरोबर माहित आहे असे दिसते. अशा लोकांबरोबर वागायचा एकच उपाय म्हणजे त्यांना दयामाया न दाखवता ठोकून काढणे. त्यांच्याशी कायद्याच्या भाषेत बोलायला गेलात तर ते साखळदंड आपण आपल्याच पायात अडकवून घेत असतो. जगातील मानवाधिकार संघटना, मोठमोठ्या विद्यापीठातील पोलिटिकल सायन्सचे, मोठी मोठी पुस्तके लिहिणारे ढुढ्ढाचार्य प्रोफेसर हे 'अशा लोकांना पण मानवाधिकार कसे आहेत' यावर लेक्चरबाजी करायला पुढे येतात. असल्या दहशतवाद्यांचे पडद्याआड समर्थन करणार्‍या थर्डरेट लोकांचे ऐकणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणे असते. २००१ मध्ये जॉर्ज डब्ल्यू बुशनी पकडलेल्या तालिबान्यांचे गितमोमध्ये वॉटरबोर्डिंग करायचा आदेश दिला होता तेव्हा असल्याच लोकांनी त्याविरूध्द आकाशपाताळ एक केले होते. आणि मग मानवाधिकाराचा पान्हा फुटलेल्या ओबामाने गितमोच बंद करून टाकला.

तेव्हा आता असले काहीतरी वरकरणी पोलिटिकली करेक्ट बोलून असल्या वर्गामध्ये आपल्याविषयी सहानुभूती निर्माण करायचा तालिबान्यांचा डाव आहे. ते कधीनाकधी आपले खरे रंग दाखवायला सुरवात करतीलच. त्यावेळी हेच सगळे ढुढ्ढाचार्य विचारवंत लोक 'आता हे तालिबान २.० कसे आहे, जुन्या तालिबानशी त्याचा कसा संबंध नाही' याची लेक्चरबाजी करायला लागून कोणत्याही कडक कारवाई जगातील कोणत्याही सरकारने करू नये यासाठी दबाव वाढवतील.

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल, ह्युमन राईट्स वॉच वगैरे संघटना, मोठेमोठे प्रोफेसर लोक हे तालिबान्यांचे छुपे समर्थक आहेत. वेळ पडल्यास ही मंडळी जास्तीतजास्त आवाज त्यांच्याबाजूने करतील यासाठी ही सगळी मोर्चेबांधणी चालू आहे असे मला तरी वाटते. त्याला अजिबात भुलायची गरज नाही.

निनाद

पुर्णतः सहमत आहे. हे दुटप्पी दोन स्तर असलेले व्यवस्थापन आहे. आणि ताबा आणि त्यांचे व्हाईट कॉलर समर्थक असे चालवले जाते.

निनाद

तालीबान्यांना विचारवंतांची खरी नस बरोबर माहित आहे असे दिसते. त्यांना नस वगैरे माहित नसावी पण त्यांच्या मागच्या सुत्रधारांना कोणती मोहरी प्यादी कधी हलवायची याचा फार चांगला अभ्यास आहे. तालीबान्यांना यात तलवारीची किंमत आहे. तलवार वार करते पण तिला तीची अक्कल नसते. कुठे आणि कसा वार करायचा हे डोके चालवणारे लोक निराळेच आहेत. आणि वार करण्या आधी तयारी करण्यासाठी मानवाधिकार संघटना, मोठमोठ्या विद्यापीठातील पोलिटिकल सायन्सचे, मोठी मोठी पुस्तके लिहिणारे ढुढ्ढाचार्य प्रोफेसर यांचा वापर केला जातो.

प्रदीप

मला आठवते, पूर्वी मी न्यू यॉर्क टाईम्स अगदी कौतुकाने दररोज वाचत असे, कारण माझ्या हपिसाजवळील कॉफीशॉपमधे तो ठेवलेला असे, तेव्हा जेवण आटोपल्यावर कॉफी + न्यू यॉर्क टाईम्स असा माझा रोजचा कार्यक्रम असे. तेव्हा २०१२ च्या सुमारास त्यांच्या ऑप-एड पानावर, कुण्या एका अमेरिकेतील प्राध्यापकाने लिहीलेला एक प्रदीर्घ लेख तेव्हा माझ्या वाचनांत आला. (दुर्दैवाने माझ्याकडे आता दुवा नाही, व एरव्हीही न्यू यॉर्क टाईम्स 'पेवॉल' च्या मागे आहे). त्यावेळी ह्या, सर्वसाधारणपणे दहशतवादी, मूलतत्ववादी संस्थेविषयी काहीबाही ऐकू येत होते, वाचनात येत होते. तर सदर प्राध्यापकाने ती संस्था कशी निरूपद्रवी आहे, व त्यांचे उद्देश कसे त्यांच्या मुस्लिम समाजाच्या हिताचे आहेत, अशा अर्थाचे त्या निरूपण लेखात केलेले होते. नंतर, २०१४ च्या मध्यावर बोको हरामने शाळकरी मुलींना पळवून नेऊन पुढे त्यांचे जे काही केले, त्यावेळी मला ह्या लेखाची तीव्रतेने आठवण आली.

आय.बी.एन चॅनेलवरील पल्लवी घोषने अफगाणिस्तानात तालिबान राजवटीत स्त्रियांना अधिकार असतील पण शरीया कायद्याखाली अशा अर्थाचे पुढील ट्विट केले आहे.

Taliban - all rights to women but under sharia law— pallavi ghosh (@_pallavighosh) August 17, 2021

आता शरीया कायद्याखाली नक्की कोणते अधिकार स्त्रियांना असतील, पूर्वीच्या तालिबान राजवटीतही शरीया कायद्याचीच अंमलबजावणी होत असेल तर मग तेव्हा तिकडच्या स्त्रियांची स्थिती इतकी वाईट का होती वगैरे प्रश्न पल्लवीला पडले असतील अशी अपेक्षा करू. बाकी त्या टिवटिवाटावरील प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे मनोरंजक आहेत.

प्रदीप

ताबा २.० हे, आता सत्ताग्रहण केल्यावर, अतिशय काळजीपूर्वक जनसंपर्क करीत आहेत. पैसे भरपूर ओतले की पाश्चिमात्य देशांतील जनसंपर्क सेवा पुरवणार्‍या कंपन्या खूपच मिळतात, तेव्हा हे असे काही केले असावे.

तेव्हा ह्यावेळी ते व्यवस्थित माध्यमांना मुलाखती देत आहेत-- अगदी इंग्लिशमधूनही काही मुलाखती दिल्या जात आहेत. एक मुलाखत तर अगदी इस्रायलच्या माध्यामाला दिलेली नजरेत आली.

अर्थात, भारताकडे त्यांनी व्यवस्थित लक्ष पुरवले आहेच. हे काम ह्यावेळी बरेच सोपे व कमी खर्चाचे झाले आहे, कारण त्यांच्यासाठी प्रचार करणारी माध्यम- टोळी इथे अगोदरच मोदीविरोध व हिंदू- साप- धोपटणे ह्या मुद्द्यांवर कार्यरत होतीच. आता हीच टोळी त्यांचे भारतांतील जनसंपर्काचे काम करतांना दिसते. एन्डीटीव्ही हे त्याचे एक उदाहरण. शेखर गुप्ता अतिशय चलाख इसम आहे. त्याचा अजेंडा तो उघड होऊ न देता, आपण नि:पक्ष आहोत असे दाखवत, हळूच पुढे रेटण्याचे काम करत रहातो. त्याची फारशी विश्वासार्हता ठेवता येणे कठीण वाटते.

निनाद

अक्षरशः शब्दा-शब्दाशी सहमत आहे तुमच्या!

शेखर गुप्ता अतिशय चलाख इसम आहे. त्याचा अजेंडा तो उघड होऊ न देता, आपण नि:पक्ष आहोत असे दाखवत, हळूच पुढे रेटण्याचे काम करत रहातो. भामटा आहे तो.

चौकस२१२

राजकिय द्रुश्ट्या त्यांचे टारगेट आता उघड उघड पाकिस्तान आहे.

असे वाटत नाही... कारण धर्मावर आधारित तालिबान आणि पाकसितां ची विचार दाहरण एकच आहे .. फरक एवढाच कि पाकिस्तानी कोल्हयांसारखे आहेत आणि घासून पौसून चकचकीत अफगाणी अजून गुहेत राहणारे !
हा इस्लामाबाद / लाहोर च्या पंजाबी पाकिस्तानींनवर त्यांचा राग असेल पण पशतुन पाकिस्तान्यांसाच्यात आणि यांच्यात एकी आहेच कि असे म्हणतां कि त्या भागात तर आंतरराष्ट्रीय सीमारेषा पण अस्तित्वात नाही

गॉडजिला

असे वाटत नाही...

ही घोडचुक आहे. काहीही असले तरी अजुनही इस्लामी देश असुनही पाकिस्तानमधे शरीया पुर्णपणे लागु नाही. तालिबान ते करु पहात आहे. अफगाणिस्तानला जगाच्या राजकीय पटलावर आता पाकिस्तानची जागा घ्यायची महत्वाकांक्शा आहे म्हणुनच ते पाकमधे हल्ले करत आहेत. ते हल्ले म्हणजे पाकच्या नजरेत बॅड तालिबान अन ते हल्ल्ले अफगाणमधे झाले की गुड तलीबान अशी आता पर्यंत दुटप्पि भुमीका पाकने घेतली होती, आता पाकिस्तान सगळ्यात सोफ्ट टारगेट आहे व तालिबान सर्वप्रथम पाक गिळंक्रुत करेल. आणी अफगाण प्रमाणे जर पाक मधेही सैन्याने नांगी टाकली तर लवकरच मोठा हाहाकार उडु शक्तो... अथवा या यादवीच्या बिमोडासाठी पाक परत इतर देशांकडे कटोरा घेउन फिरायला सुरुवात करु शकतो व स्वताचे महत्व परत प्रस्थापीत करु शकतो पण रस कुणाला आहे ?

सुबोध खरे

पाकिस्तान सगळ्यात सोफ्ट टारगेट आहे व तालिबान सर्वप्रथम पाक गिळंक्रुत करेल

पाकिस्तानी लष्कर काही अफगाणिस्तानसारखे बाजार बुणग्यांनी भरलेले नाही. व्यवस्थित शिस्त असलेले आहे आणि तालिबानने तसा प्रयत्न केला तर ते त्यांना फार महाग पडू शकते.

याशिवाय जागतिक सत्ताना पाकिस्तान सारखा अण्वस्त्र सज्ज देश आणि अण्वस्त्रे तालिबानच्या हाती लागू देणे अजिबात परवडणार नाही. कारण अण्वस्त्रांच्या धमकीवर ते जगाला तेलासाठी प्रचंड किंमत मोजायला लावतील.

आपले मत अजिबातच वस्तुस्थितीला धरून नाही.

गॉडजिला

मी वस्तुस्थतीपेक्षा थोडी रंजकता पकडुन शक्यता पडताळत असेन, आयमीन ही १८८ नंबरची पद्धत वापरणारा मी ईथे पहिला नाहीं.

तुमचे म्हणणे मला तरी योग्य वाटते पण मुळात तालिबान उघड लढाई का करेल ? किंव्हा उद्या सत्ता ताब्यात घेउन लष्करानेच फ्रिहॅण्ड दिला तर ? अथवा तालिबानचा बाऊ करून पाकिस्तानने अण्वस्त्र सुरक्षा वगेरे वगैरे मुद्दे रेटून पुन्हा जगातून सहानुभूती व पैसा अशा दोन्हीं गोष्टी पदरात पाडून घेण्यासाठी का असेना पण तालिबान v पाकिस्तान खडाजंगी होणार असे मला वाटते...

माझे विचार चुकीचे असतीलही पण मी फक्त शक्यता पडताळणे इतकचं कल्पना करून बघत आहे. कारण तालिबान संपूर्ण अफगाण महिन्याच्या आत ताब्यात घेईल असे कोणच म्हणत न्हवते पण ते घडले

निनाद

बरेचदा पाकिस्तानी लष्कर याविषयी अनेक अफवा प्रचलित असतात /आहेत.
या पार्श्वभूमीवर सुबोध खरे यांनी

  • पाकिस्तानी लष्कराची सद्य स्थिती,
  • त्यांची ताकद,
  • त्यांची कुवत,
  • काम करण्याची पद्धती,
  • त्यांची सपोर्ट सिस्टिम आणी मजबूत दुवे
  • अधिक अजून जे योग्य असेल ते

याचे तपशील देणारा एक लेख लिहावा अशी विनंती करतो.

चौकस२१२

डॉक्टर सगळे मुद्दे पटले... सध्या तरी तालिबान, पाकिस्तान कडे एक डोकेदुखी म्हणूनच पाहिलं असे वाटते, त्यांना आधी जगातून मान्यता आपली २. अवतारासाठी मिळवय्याची आहे .. त्यामुळे पाकिस्तान हे लक्ष असू शकेल असे वाटत नाही
याशिवाय जर तालिबान २. खरंच हुशार असेल तर ते पाकिस्तान ची मदत घेईल गुपचूप तशी ती पख्तुनी वंश मुले मिळतच आहे , पाकिस्तान मात्र परत याचा फायदा कसा घेता येईल... हे बघेल ... ऐकून काय भारताची डोकेदुखी वाढली ,

गॉडजिला

ऐकून काय भारताची डोकेदुखी वाढली ,

थोडे फार तथ्य आहे. अमेरिका व रशिया यांची घोड चुक वनाईलाज म्हणजे अफगाण भूमीवर प्रत्यक्ष उतरवलेले सैन्य होय. चीनने यातून धडा घेउन तालिबानला पैसा पुरवला आणि त्यांचे वितरण अफगाणिस्तानात होइल हे पाहिले त्यातून पुढील बाबी साध्य केल्या

१) तालिबान सोबत संबंध बळकट केले
२) तालिबानच्या विरोधकांना पैसे वाटून विरोध सपशेल निकामी केला
३) मोठा रक्तपात टाळला
४) चीनचे हीतसंबंध पक्के केले उद्या तालिबानचा पूर्ण शक्तीने चीन विरोध करणार नाही, त्यांचे बेल्ट अन रोड इनिशियटिव सारखे प्रोजेक्ट अफगाणिस्तानात व्यवस्थित पसरतील व चीनचा फार मोठा व्यापारी नफा सुरु होइल
५) यातील मोठा भाग तालिबानला अप्रत्यक्ष मिळत राहील तालिबान मजबूत व सशस्त्र होत जाईल व एक मोठी शक्ती व पाकिस्तानला पर्याय म्हणुन नावारूपाला यायचा प्रयत्न करत राहील
६) चीन मर्यादित प्रमाणात तालिबानचा उपयोग भारताची डोकेदुखी वाढवायला हमखास करेल
७) चीन व तालिबानकधीच मित्र होणार नाहीत पण आपापली सत्तास्थाने मजबुत करायला एकमेकांचा मुक्त वापर करतील
६)

गॉडजिला

आता युद्ध तलवारीने न्हवे पैशाने लढले जाते.

जय पराजय, यशापयश लोक कीती मेले मारले यापेक्षा आपला देश किती सुरक्षीत व आर्थिकदृष्ट्या श्रीमंत केला यावर ठरते.

चक्क तालिबानने रक्तपात टाळला यातच सर्वकाही आले यावेळेस तालिबानच शहाणे बनून नेटवर मुंडकी छाटायच्या व्हिडिओचा भडिमार न करता बिबिसी सारख्या वृत्तवाहिन्या मार्फत आपली इमेज सुधारायचा खरा खोटा प्रयत्न करत आहे यातच सर्व परिमाणे सिध्द होतात

निनाद

पश्चिम बंगालमधील मध्ये कोलकाता येथील बनियातोला हे प्राचीन भूतनाथ शिवमंदिर आहे.
या मंदिरात जाण्यासाठी हिंदु भक्तगण आले असता त्यांना मारहाण करण्यात आली आहे. या मध्ये एक साधू ही दिसून येतो आहे.
बंगाल मध्ये हिंदुंवर अधिकाधिक अत्याचार होत आहेत असे दिसून येते आहे. निवडणूकी नंतर झालेल्या हिंसाचारात बंगाल येथील हिंदूंना येथून निर्वासित करण्यात आल्याच्या घटना ताज्या आहेत.
अशा पार्श्वभूमीवर स्टेट मशिनरी म्हणजे पोलिसांकडूनही असे अत्याचार होत आहेत असे दिसून येते आहे.

निनाद

वेस्ट पॉईंट येथील यूएस मिलिटरी अकॅडमीच्या कॉम्बेटिंग टेररिझम सेंटरने एक अहवाल प्रकाशित केला होता.
देवबंदी इस्लाम हा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला विभक्त करणाऱ्या ड्यूरँड लाईनच्या दोन्ही बाजूंच्या पश्तून पट्ट्यातील लोकांना सर्वात लोकप्रिय आहे. शिवाय, प्रमुख अफगाण आणि पाकिस्तानी तालिबान नेत्यांनी देवबंदी मध्येच कट्टरतेचे शिक्षण घेतले आहे. तालिबान चळवळीसाठी देवबंदी हा धार्मिक आधार बनला आहे. अनेक तालिबान नेते आणि सेनानी देवबंदी पद्धतीमध्ये शिकलेले आहेत तालिबानचा प्रमुख मुल्ला उमर हा देवबंदी पद्धतीने शिकलेला होता. हे पाहता तालिबान ची पाळेमुळे भारतीय कट्टर धार्मिक शिक्षणात आहेत असे दिसते.

चौकस२१२

शेखर गुप्तांनी याचे चांगले विश्लेषण केले आहे अणि माहिती दिली आहे
येथे पहा
https://www.youtube.com/watch?v=ZWoVrSuIf0s

निनाद

शेखर गुप्ता म्हणजे काँग्रेस चा छुपा समर्थक. त्याला सोनियाने २००७ मध्ये पद्मश्री दिली होती हे विसरू नका!
फार घातक रितीने नरो व कुंजरोवा करणारा इसम. लिबरल्स प्रपोगंडाचा मास्टर प्लेयर आहे हा.
याच्या व्हिडियो पासून दूर राहणे चांगले.
शेखर गुप्ता प्रचंड प्रमाणार यु ट्युबवर प्रमोट केला जातो. म्हणजे याने किंवा याच्या बोलवित्या धन्याने खूप मोठे पॅकेज खरेदी केले आहे यात शंका नाही!
दहा वेळा नॉट इंटरेस्टेड असे नोटिफाय करूनही युट्युब हे मला दाखवायचा प्रयत्न करत राहते म्हणजे किती पैसा ओतला असेल याने याचा विचार करा...

चौकस२१२

शेखर गुप्ता बद्दल आपल्याशी एकमत आहे, फक्त या व्हिडिओत तालिबान चा चेहरा कोण या संबंधी माहिती उलगडून देताना दिसले म्हणून उल्लेख केलं ,, यात तरी तसा त्यांचा "छुपा अजेंडा" दिसला नाही , तालिबान २.व चे मुख्य हे पाकिस्तानी मद्रसेतून पुढे आले असे ते स्पष्ट म्हणतात

निनाद

कोव्हिड नंतर अर्थ व्यवस्थेला वेग देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन सुरू केला आहे. भारताला उत्पादन आणि निर्यात दोन्ही वाढवण्याची गरज आहे. यानुसार गती शक्ती योजना भारतीय उत्पादकांचे जागतिक प्रोफाइल वाढविण्यासाठी स्थायी सेवाभूत सुवीधा देणार आहे. ही योजना १०० लाख कोटी रुपयांच्या पायाभूत योजनांची असेल ज्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी कोर्टाने शशी थरूर यांना निर्दोष मुक्त केले आहे.

फक्त किती विचारवंत शशी थरूर किती हुषार ते आपल्याविरूध्द पुरावा कसा सोडतील असे म्हणतात हेच बघायचे. कोर्टाने आज शशी थरूरना निर्दोष सोडले आहे. पण सुनंदा पुष्करचा मृत्यू संशयास्पद स्थितीत झालेला असूनही यापूर्वी सात वर्षात किती विचारवंत त्या कारणावरून त्याच्याविरोधात बोलायचे? शशी थरूर या विचारवंतांच्या कळपातले आणि काँग्रेसमधले असल्याने बहुदा सुनंदा पुष्करचा मृत्यू हा धर्मनिरपेक्ष मृत्यू आहे असे या मंडळींना वाटत असावे.

असो.

निनाद

रोचक घडामोड आहे ही. सुनंदा पुष्करचा मृत्यू संशयास्पद स्थितीत झालेला असूनही त्यांना अटक झाली नव्हती.

गॉडजिला

पाकिस्तानी एंजट पत्रकारा सोबत थरुरचे लफडे चालु आहे असा गौपयस्फोट सुनंदा ने केला अन आठवढ्याभरात ती मेली... सगळेच संशयास्पद

राघव

मला वाटतं भाजप आता थरूरना पक्षात घेण्याच्या हालचाली करेल.

Bhakti

गेल्या काही वर्षांत सावरलेला,बहरलेला अफगाणिस्तानात​ तालिबानी माकड्यांच्या मर्कट चाळा टिव्हीवर पाहून फार वाईट वाटतय.पाकिस्ताननेही अनेक तालिबानी अतिरेकी कैद्यांना सोडलय.

https://www.thehindu.com/news/national/india-announces-emergency-e-visa…

अफगाणींना विसा देनार आहेत म्हणे धर्मभेद न मानता.
रोहींगे तर गनिघाले नाहीत अजून अफगाणी घ्या घालून.
आता हे ही राष्ट्रहीतासाठीच असावे म्हणा.