राजकारण

चालु घडामोडी- आॅक्टोबर. २०२१ भाग १

Primary tabs

मागचा धागा सुपर हिट आणी हाऊसफूल झाल्याने हा नवा धागा.

बापूसाहेब

स्वप्न पहायला पैसै पडत नाहीत... त्यामूळे चालुद्यात..

hrkorde

रावणाचा प्राण त्याच्या बेंबीत होता, बेंबीत बाण लागला अन मग तो मेला.

तसे राममंदिर , 3 तलाक , 370 इ इ म्हणजे भाजपाची बेंबी आहे , ह्याचे निकाल लागले की ह्यांची डोकी गळून पडतील

हे भविष्य मी 2,3 वर्षांपूर्वी वर्तवले आहे

बापूसाहेब

मग ईतर पक्षांची बेंबी कुठे आहे/ होती ज्यामुळे त्यांचा सुपडा साफ झाला.. ते ही एकदा स्पष्ट करा.

अथांग आकाश

1
सर्व मिपाकरांना नवरात्रोत्स्वाच्या मंगलमय शुभेच्छा.

गॉडजिला

आपणास देखील नवरात्रोत्स्वाच्या मंगलमय शुभेच्छा.

Rajesh188

काँग्रेस काळातील हरित क्रांती, श्वेत क्रांती,पाकिस्तान बरोबर जिंकलेली युद्ध,सिंचन व्यवस्थेचे जाळ,अनेक संस्था निर्मिती,अनेक सरकारी उद्योग प्रगती पथावर नेले,बांगलादेशी विस्थापित हिंदू लोकांचे पद्धतशीर पुनर्वसन,सिंधी लोकांचे पुनर्वसन असे अनेक गोष्टी सांगता येतील.
Bjp काळाचे काय सांगायचे.
राम मंदिर,370 रद्द,तीन तलाक .
बस इतकेच सांगण्यासारखे आहे.

बापूसाहेब

काश्मीर, दंगली, जातीपाती, आरक्षण, गरीबी, चीन ने आणि पाकने लुबडलेली जमीन, जागोजागी तयार होणारे मिनी पाकिस्तान , १९८४,
शेकडो घोटाळे, आणीबाणी आणि असच बरच काही लिहायला विसरले वाटतं...

hrkorde

काश्मीर, दंगली - आता भाजप सरकार आहे, करतील ते शांत

जातीपाती, आरक्षण - जाती काँग्रेसच्या पूर्वीपासून आहेत व आरक्षण भाजपनंतरही रहाणार आहे

चीन , पाक - अफगाण , लन्का हेही आणा

1984 - पंजाबात भाजपला हाकलून काँग्रेस आले आहे , आता पंजाबवालेही 1984 वरून भाजपाला भीक घालत नाही

गरिबी - 5 ट्रेलियन होणार आहे मोदीजी करणार आहेत

रावसाहेब चिंगभूतकर

मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाकडून कारवाई केली जात आहे. फक्त जरंडेश्वरच नाही तर दौंड शुगर, आंबलिक शुगर , जरंडेश्वर साखर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याचं कळत आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं कळत आहे.

रामदास२९

आता ओरडतील.. सुडबुद्धीने कारवाई.. पण आधी याच उत्तर द्या.. कि एवधे कारखाने लाटले कसे????

जरंडेश्वरच, दौंड शुगर, आंबलिक शुगर , जरंडेश्वर साखर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार

..
..
..
..
..
मूळ मुद्द्यापासून भरकटवणे हा एकच उद्द्योग आहे या लोकान्ना....

Rajesh188

सत्य असेल तर त्याला सत्य म्हणून पाठिंबा देतो.
Lakhimpur, ममता बॅनर्जी ह्यांना शपथविधी मध्ये राज्यपाल नी आडकाठी ह्या वर येथील काही आयडी नी चाक्कर शब्द काढला नाही.
साखर कारखान्यावर कारवाई,cbi ची कारवाई,इन्कम टॅक्स वाल्यांची कारवाई .
एकंदरीत सर्व च केंद्रीय यंत्रणांची कारवाई ही फक्त विरोधी पक्षातील नेत्यांवर,समर्थक लोकांवर च होत आहे .
हे तीव्र आक्षेप घेण्यासारखे आहे.
किती bjp नेत्यांवर,त्यांच्या मित्रांवर केंद्रीय यंत्रणेने कारवाई केली.
कोणावर च नाही.
ते काय मर्यादा पुरुषोत्तम श्री राम ह्यांचे अवतार आहेत काय.
सर्वांना समान न्याय ध्या राजकीय सुड बुध्दी नी केंद्र सरकार नी अधिकाराचा वापर करणे थांबवा .
फक्त गुन्हेगार मग कोणत्याही राजकीय पक्षांचे असोत कठोर कारवाई करा.
आमचा काही आक्षेप नाही.
शेतकऱ्यांना चिरडून मारलेल्या लोकांस अजुन अटक नाही.
Crpf च्या गाड्या विस्फोटक नी उडवून दिल्या मुळे शेकडो जवान मृत्यू मुखी पडले त्याचा सूत्र धार कोण ह्याचा अजुन पर्यंत तपास नाही.
इतकी मोठी स्फोटक देशात कशी आली ह्याचा काहीच तपास नाही.

रामदास२९

नाराजी प्रकरण बाहेर येत आहेत याची आहे.. .. भाजपा चे लोक कसे आहेत, त्यान्च्यावर किती कारवाई झाली याचा आणि बाकिच्या पक्षाच्या लोकान्च्या घोटाळ्यान्चा काय सम्बन्ध??? जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणारच.. आघाडीच्या लोकान्ना तोन्ड दाखवायला जागा नाही.. भवितव्य काय आहे हे आधारवड जाणतात म्हणून पिम्परी चिन्चवड च्या निवडणूकित लक्ष घालत आहेत

hrkorde

मोदी सरकारात दोषींवर कारवाई होत नाही , पक्षात यायचे आमंत्रण मिळते

आणि मूळचा भाजप्या, संघी सतरंज्या उचलत बसतो

सुबोध खरे

मूळचा भाजप्या, संघी सतरंज्या उचलत बसतो

Of 53 BJP ministers in Modi govt, 38 have a Sangh background. In Modi’s first term, 41 of 66 BJP ministers who had taken oath in 2014 were from RSS.

बेलाशक तोंडाला येईल तसे वक्तव्य करण्यात तुमच्यात आणि राजेश १८८ यात स्पर्धा चालू आहे वाटतं.

सध्या तुम्ही मागे पडताय असा वाटल्याने अशी पुडी सोडली आहे वाटतं.

लगे रहो

Rajesh188

मुंबई मध्ये बेस्ट नी मोठ्या प्रमाणात उत्तम दर्जा च्या बस चालवून लोकांचा प्रवास सुखकर आणि थंडगार केला आहे.
स्वतःच्या खासगी गाडीत प्रवास करत आहोत असा फील येतो.
आणि अगदी स्वस्त दरात .
Thanks Mumbai mahanagarpalika आणि बेस्ट.

hrkorde

फ्रिक्वेन्सीपण चांगली आहे , तिकीतदर पण अगदी महाग नाही

सध्या कधीकधी घाटकोपर ट्रॉमबे बस मिळते

Rajesh188

सर्व राज्यांना ,देशातील सर्व नागरिकांना एकच नजरेने बघणे अपेक्षित आहे.
विरोधी पक्षातील लोकांना ,त्यांच्या समर्थकांना राज्य घटनेने दिलेल्या अधिकार चा गैर वापर करून त्रास देणे अपेक्षित नाही.
पण bjp चे केंद्रीय सरकार त्यांच्या जबाबदाऱ्या,त्यांची नैतिकता विसरत आहे.
पूर्वीचे bjp समर्थक पण त्या मुळे पक्षा पासून दूर जात आहेत हे अजुन सर्वोच्च नेत्याच्या लक्षात येत नाही.
दीर्घ कालीन फायदा हवा असेल तर सत्ता राबवताना नैतिकता विसरू नका.
हे किरकोळ शहाणपण bjp कडे नाही.
दुर्दैव. आहे..
हिंदुवादी पक्षाची ही अधोगती चिंता वाढवणारी आहे.

hrkorde

हृतिकने आर्यनसाठी लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, ' तू जेव्हा लहान होतास तेव्हापासून मी तुला ओळखतो आहे. आज जेव्हा तू मोठा झाला आहेस तेव्हा देखील तुला मी पाहतो आहे. परिस्थिती आणि त्यातून आलेल्या अनुभवांचा तू स्वीकार कर. हे तुझ्यासाठी गिफ्ट आहेत. माझ्यावर विश्वास ठेव... या सर्व गोष्टींचा काही काळानंतर जेव्हा तू विचार करशील तेव्हा तु्झ्या लक्षात येईल, की या सगळ्या मागे सुद्धा काही तरी कारण होते. तू नेहमी शांत राहा. परिस्थितीचे निरीक्षण कर. कारण हे क्षण तुझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, या क्षणांमधून तू घडणार आहेस.. आणि स्वतःवर विश्वास ठेव, आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत..’

सुझैन खाननेही दिलाय शाहरुख-गौरीला पाठिंबा

दरम्यान, याआधी हृतिक रोशनची एक्स वाईफ सुझान खानने देखील आर्यनला पाठिंबा देत एक पोस्ट लिहिली होती. सुझानने तिच्या पोस्टमधून शाहरुख आणि गौरीला पाठिंबा दिला होता. तिने लिहिले होते, 'माझ्या मते आर्यन हा दुर्दैवाने चुकीच्यावेळी चुकीच्या ठिकाणी गेला होता. ही परिस्थिती मी एक उदाहण म्हणून बघते की कशाप्रकारे बॉलिवूडमधील लोकांना त्रास दिला जातो. हे खूप वाईट आहे. आर्यन हा खूप चांगला मुलगा आहे. मी कायमच शाहरुख आणि गौरीसोबत आहे.'

यश राज

भारताने UK la हिसके दाखवणे खूप जरुरी होते.

Rajesh188

भारताने लसीकरण प्रमाणपत्रावर विश्व पुरुषाचा फोटो छापला आहे त्याला विरोध होता.
Covidshield लसी ला त्यांचा विरोध नाही तंत्र आणि कच्चा माल त्यांचाच आहे.

सुक्या

असेल असेल ... तुम्ही म्हणता आहात म्हणजे तसेच असेल ..

सुरिया

कुणालातरी ओल्या फोकानं मारल्याचा इतका आनंद?
.
लै हसवणार तुम्हाला आपण फुचरमध्ये. ;)

वामन देशमुख

लै हसवणार तुम्हाला आपण फुचरमध्ये. ;)

हसवा, हसवा, आम्ही नक्की हसू.

नाहीतरी आम्ही मूलतः हसण्यासाठीच मिपावर जॉइन झालो होतो.

बाकी, रडण्यासाठी ऐसी अनेक संस्थळे आहेतच!

Rajesh188

म्हणून युनिव्हर्सल लसी चे सर्टिफिकेट दिले जाते त्या वर विश्व पुरुषाचा फुटू नाही
आणि विश्र्वगुरू certificate वरून गायब झाल्या मुळे ब्रिटन नी नियम बदलला ..तुम्हाला उगाचच वाटत विश्व गुरूंच्या भीती नी ब्रिटन
सारखे नरमले म्हणून.

Rajesh188

महाराष्ट्र सरकार च्या युनिव्हर्सल पास वर विश्व गुरू नाहीत
त्या मुळे थोडा गैर समज झाला
चूक मान्य.
सर्वांची क्षमा मागतो.

hrkorde

सर्व जगातील कोविड लस कार्ड आहेत

फोटूवाली योग्यता असलेले पात्र फक्त आपल्याकडेच आहे , आपण किती थोर

https://en.m.wikipedia.org/wiki/COVID-19_vaccine_card

आग्या१९९०

मी कोविडचे दोन्ही डोस सरकारी दवाखान्यात घेतल्या,मुलाने मोठ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये विकत घेतल्या. तो गमतीने म्हणतो " आई मी विकत घेतला चॅप ". चॅप चा भक्त आहे तो.

सॅगी

विश्र्वगुरू certificate वरून गायब झाल्या मुळे ब्रिटन नी नियम बदलला

नकली सर्टिफिकेट प्रिंट केलेत की काय?? ;)

सुबोध खरे

बेलाशक थापा मारणे हा १८८ चा स्थायीभाव आहे.

कुठे त्यांच्याकडे लक्ष देताय?

कॉमी

तुम्हीच स्कोअर किपिंग करत बसलाय कि खरं

गॉडजिला

.

सुबोध खरे

भारताने लसीकरण प्रमाणपत्रावर विश्व पुरुषाचा फोटो छापला आहे त्याला विरोध होता.

राजेश १२
मोगा ११

चालू द्या

वामन देशमुख

BTW,

हे विश्व पुरुष असे संबोधन असलेले पुरुष कोण आहेत?

मध्यंतरी विश्वगुरू असेही एक संबोधन वाचण्यात आलेले होते.

नाही म्हणजे, एकदा विचारून खात्री करून घेतलेली बरी, नंतर गैरसमज व्हायला नको. ;)

Rajesh188

अजुन अनेक नाव आहेत गोंधळून जावू नका.
प्रत्यक्ष विश्व निर्मत्याने भारतात जन्म घेतला आहे.
.

सुक्या

https://twitter.com/RNTata2000/status/1446431109122650118

आताच श्री रतन टाटा यांची ही पोस्ट वाचली. एयर ईंडीया चा महाराजा ६८ वर्षांनी स्वग्रुही परतला.
(एकदा आलेल्या वाईट अनुभवामुळे मी एयर ईंडीयाच्या प्रवासावर काट मारली होती. बघु निदान आता तरी सेवा सुधारते का ते?)

सुबोध खरे

तरी बरं

एअर इंडिया टाटांकडेच परत गेली

( मुळात हि दुभती गाय सरकारने स्वस्तात ढापली होती. ती भाकड व्हायला लागल्यावर चाऱ्याच्या खर्चाच्या कर्जासकट टाटांना परत दिली)

हेच जर एअर इंडिया अडानी अंबानीनि घेतली असती तर मिपावरील त्याच पचपच करणाऱ्या लोकांनी आणि इतरत्र बुद्धिवादी, वाममार्गी, मोदीद्वेष्ट्या लोकांनी सरकारने देश विकायला काढला आहे म्हणून हाकाटी आणि रडारड केली असती.

सुक्या

खरं आहे. ज्यांना रडारड करायची आहे ते काहीतरी कारणे शोधतातच. यातही काही महाभाग तशी कारणे शोधतीलच ...

Rajesh188

मोदी अदानी ह्यांची टाटा बरोबर तुलना होवू शकत नाही.
टाटा च्यां हेतू विषयी कोणालाच शंका येत नाही.
इतकी त्यांची पत आहे देशात.

सुक्या

असेल असेल ... तुम्ही म्हणता आहात म्हणजे तसेच असेल

रावसाहेब चिंगभूतकर

या वाक्याचे पेटंट घेऊन टाका असे सुचवतो. तसेही इथे हे बऱ्याचदा वापरावे लागणार आहेच.

आग्या१९९०

सरकारने टाटांकडून विमान कंपनी घेण्यापूर्वी कंपनीत टाटांची २५%,सरकारची ४९% आणि उरलेली पब्लिकची हिस्सेदारी होती. राष्ट्रीयीकरण करताना सरकारने टाटांना रू.२.८ कोटी दिले होते. १९८९ पर्यंत एअर इंडियात टाटा बोर्ड ऑफ डायरेक्टर ते चेअरमन पदावर होते. तोट्यातील कंपनी घेण्याचे धाडस टाटांनी केले .

रावसाहेब चिंगभूतकर

सरकारने टाटांकडून विमान कंपनी घेण्यापूर्वी कंपनीत टाटांची २५%,सरकारची ४९% आणि उरलेली पब्लिकची हिस्सेदारी होती.

याचा कुठे रेफरन्स आहे का? माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीयीकरण झाल्यावर सरकारचा स्टेक मेजर शेअर होल्डर म्हणून वाढला. त्याच्या आधी नाही. म्हणूनच त्याला राष्ट्रीयीकरण म्हणतात. सरकार मेजर शेअर होल्डर असते तर त्याची गरजच नव्हती.
जे आर डी राष्ट्रीयीकरणाच्या विरोधात होते. थोडक्यात सांगायचे तर त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे assets सरकारने विकत घेतले. ही सरळ सरळ दरोडेखोरी होती.
https://www.indiatimes.com/trending/social-relevance/how-tata-airlines-…