काथ्याकूट

ताज्या घडामोडी नोव्हेंबर २०२१- भाग २

Primary tabs

आधीच्या भागात १५० प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे.

गोव्यातील पोरी (Poriem) मतदारसंघातून २०१७ मध्ये माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणेंविरूध्द निवडणुक लढवून पराभूत झालेले भाजपचे विश्वजीत राणे यांनी भाजप सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. प्रतापसिंग राणेंच्या चिरंजीवांचे नावही विश्वजीतच आहे. ते भाजपमध्ये आहेत आणि राज्य सरकारमध्ये मंत्रीही आहेत. नामसाधर्म्यामुळे सुरवातीला वाटले होते की त्यांनीच आपमध्ये प्रवेश केला की काय. पण दुसर्‍या विश्वजीत राणेंनी पक्ष सोडला आहे.

एकंदरीत गोव्यात भाजपचे तितके सोपे दिसत नाही. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा मान्द्रेमधून काँग्रेसच्या दयानंद सोपटे यांनी दणदणीत पराभव केला होता. २०१९ मध्ये जे काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये सामील झाले त्यात हे दयानंद सोपटे होते. आता मान्द्रेमधून आपल्याला उमेदवारी मिळेल याची खात्री दयानंद सोपटेंना आहे तर लक्ष्मीकांत पार्सेकर सुध्दा आपला दावा सोडायला तयार नाहीत असे दिसते. एकेकाळी याच पार्सेकरांनी रमाकांत खलप यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा मान्द्रेमधून एकदा नाही तर दोनदा पराभव केला होता. पण त्यांचा २०१७ मध्ये दयानंद सोपटेंनी तब्बल २५% मताधिक्याने पराभव केला. त्यामुळे दोघेही आपला दावा सोडायला तयार दिसत नाहीत. इतक्या घाऊक प्रमाणात काँग्रेसमधून आमदार आयात केल्यानंतर ही डोकेदुखी भाजपला नक्कीच होणार होती.

त्याचप्रमाणे विधानसभेचे माजी अध्यक्ष अनंत शेट यांचे मागच्या वर्षी निधन झाले. त्यांचे बंधू प्रेमेन्द्र शेट यांनी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षात प्रवेश केला आहे. अनंत शेट उत्तर गोव्यातील मये मतदारसंघातून निवडून यायचे. त्याचप्रमाणे उत्तर गोव्यातील कळंगूटचे आमदार मायकेल लोबो यांनीही भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर गोव्यातीलच म्हापसा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा अगदी आरामात निवडून येत असत. ते मनोहर पर्रिकरांचे मित्र होते आणि पर्रिकरांच्या आग्रहावरूनच ते भाजपमध्ये आले होते. मनोहर पर्रिकरांचे निधन झाले त्यापूर्वी दीड-दोन महिने या फ्रान्सिस डिसूझांचेही कर्करोगानेच निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा जॉशुआ अगदी थोडक्यात जिंकला होता. त्यावेळी भाजपने पर्रिकरांची विधानसभा जागा- पणजी पण गमावली होती. पणजी हा १९९४ पासून भाजपचा बालेकिल्ला होता आणि मनोहर पर्रिकरांचे निधन झाल्यानंतर दोन महिन्यातच झालेल्या पोटनिवडणुकीत देशात प्रचंड मोदी लाट असतानाही ती जागा भाजपने गमावली होती.

तेव्हा सांगायचा मुद्दा हा की ज्या उत्तर गोव्यात भाजप बळकट होता तिथेच वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये अशाप्रकारच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. या पडझडीला पर्रिकरांच्या शेवटच्या टर्ममध्येच सुरवात झाली होती हे पणजीतील पराभवावरून समजतेच. त्यातही जर बाबूश मोन्सेराटसारख्या फालतू आणि घाणेरड्या माणसाला भाजपने घरी घेतले असेल तर they deserve to lose. पण विरोधी पक्ष तितका प्रबळ राहिलेला नाही त्या कारणानेच भाजपला विजय मिळाला तर मिळू शकेल. अन्यथा गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचे कठिण आहे.

मला स्वतःला गोवा हे राज्य प्रचंड आवडते त्यामुळे या निवडणुकांमध्ये मी खूप जास्त रस घेत आहे. जशाजशा नवीन घडामोडी होतील त्याप्रमाणे इथे लिहिनच.

कॉमी

तुमचा व्ह्यू पॉईंट समजण्यासारखा आहे, पण विरुद्धपक्षाचाही समजण्यासारखाच आहे.

नवाब मालिकांचा एक आरोपच मुळी खंडणीसाठी वानखेडे विविध लोकांना खोट्या प्रकरणात अडकवतो असा आहे. त्यामुळे, त्यांची जात धर्म ह्याचा ड्रग आरोप्यांच्या दोषी निर्दोशी असण्यावर फरक पडत नसला, तरी खंडणीच्या आरोपाचे नक्कीच पडु शकतो.

सुबोध खरे

खंडणीच्या आरोपाचे नक्कीच पडु शकतो.

असले आरोप करण्यापेक्षा सरळ एफ आय आर का नाही दाखल करत?

सगळी यंत्रणा कामाला लावून केवळ वानखेडे मुसलमान आहेत का कि त्यांच्या नावावर बार आहे का असली माहिती कसली बाहेर काढत बसले आहेत?

अरे सरकार कुणाचं आहे? आणि हे मंत्री आहेत का संत्री? सगळी पोलीस यंत्रणा हातात असून पत्रकार परिषद घेऊन आरोप कसले करत आहेत?

कोणताही ठोस पुरावा नसेल यांच्याकडे त्यामुळे नुसते भुंकत आहेत.

केवळ हलकटपणा

सुबोध खरे

वानखेडे यांचे वडील, त्यांची बहीण, त्यांची बायको पोलिसात केस दाखाल करतात

आणि सरकारात मंत्री असून याना एक गुन्हा दाखल करता येत नाही का?

NCB zonal director Sameer Wankhede’s wife on Wednesday said that an FIR has been registered against Maharashtra minister Nawab Malik for allegedly making personal attacks on her husband

https://www.financialexpress.com/india-news/sameer-wankhedes-wife-says-…

Sameer Wankhede's sister files police complaint against Maharashtra Minister Nawab Malik

https://www.thehindu.com/news/national/other-states/sameer-wankhedes-si…

Sameer Wankhede’s father files police complaint against Maharashtra minister Nawab Malik

https://indianexpress.com/article/cities/mumbai/sameer-wankhede-father-…

Sameer Wankhede’s father files ₹1.25 crore defamation suit against Nawab Malik

https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/sameer-wankhede-s-fat…

सरकारात मंत्री असून यांच्या पार्श्वभागात दम नाही अन उंटाच्या शेपटीच्या बुडख्याचा मुका घेऊ पाहताहेत

उगाच फुकट फोका मारून राहिले ना

नवाब मलिक वान्खेडेला त्याच्याच भाषेत उत्तर देत आहेत. रिया चर्क्रवर्तीच्यावेळी किती आचरटपणा चालला होता? एन सी बी ने कोणत्या अभिनेत्रीला कोणते प्रश्न विचारले/कोणाला किती वाजता बोलावणार आहेत ही माहिती वानखेडेच मिडियाला देत होता.(एका पत्रकाराला विचारुन खात्री केली आहे). आणि मग "सारा अली खानला एन सी बी ने विचारले हे १३ प्रश्न" "दीपिका पडुकोन उद्या येणार ९.३० वाजता एन सी बी च्या ऑफिसात" असल्या बातम्या. ही बदनामीच होती नाहीतर काय होते ? ह्यातले किती लोक जेलमध्ये गेले?
कुणी मीडियात माहितिचा पत्रकार असेल तर खात्री करून घ्या. पैसे उकळण्यापलिकडे हा सद्ग्रुहस्थ वानखेडे काहीही करत नव्हता.गोसावी/सुनिल पाटील्/सॅम डिसुझा ह्या लोकांच्या मदतीने पैसे उकळाय्चे . त्यातले काही पैसे दिल्लीत वरिष्ठांना जायचे. वानखेडेच्या जागी दुसरा कुणी असता तर केव्हाच हकालपट्टी झाली असती. ह्या वानखेडे घराण्याला 'फर्जीवाडा' हा शब्द तंतोतंत लागु पडतो.
कथित चाणक्य अडचणीत येतील म्हणून वानखेडेला सर्व प्रकारची मदत देऊन वाचवायचा प्रयत्न चालु आहे हे उघड आहे.

कॉमी

इतरांचे चॅट मीडियाला वाटणाऱ्या, मुद्दामून ऱ्हिया चक्रवर्तीचे राक्षसीकरण करायला खतपाणी घालणाऱ्या संस्थेच्या अधिकाऱ्यांवर तश्शीच वेळ आली तर कर्माचे फळ म्हणीन.

हल्ली SSRचे न्यायदाते गप्पगप्प आहेत खरं. अधून मधून ट्विटरवर कायतरी पाद्री हॅशटॅग ट्रेंडिंग असते, पण तेव्हढच. सुप्रीम कोर्टातले वकील विभोर आनंद ह्यांचे काहीतरी बिग ब्रेकिंग यावे म्हणून अधूनमधून ट्विटर पाहतो त्यांचे. पण कुठले काय. :`(
विभोर आनंद आणि तत्सम युट्यूबर्सचे माहितीचे स्रोत:

श्रीगुरुजी

रोज सामनाची पारायणे केल्याने जळी स्थळी काष्टी पाषाणी कसे कारस्थान दिसते आणि बिनबुडाचे आरोप कसे सुरू होतात, हे समजण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रतिसाद.

चौकस२१२

त्यांची जात धर्म ह्याचा ड्रग आरोप्यांच्या दोषी निर्दोशी असण्यावर फरक पडत नसला, तरी खंडणीच्या आरोपाचे नक्कीच पडु शकतो.
खंडणीच्या आरोपात वानखेडे यांचं धर्माचा काय संबंध ! सविस्तर सांगा कृपया ?

अगदी असे धरले कि खंडणी चा आरोप खरा आहे तर त्याबद्दल सरळ अधिकृत तक्रार करता आली असती ना मलिक यांना या शिवाय ते स्वतः मंत्री असल्यामुळे त्यांना सामान्य माणसापेक्षा जास्त गोष्टींची माहिती काढत येते ! मग मिडिआत जायला कशाला पाहिजे ?

दुसरे असे कि समजा वानखेडे यांनी धर्म बदलला आणि ते मुस्लिम होते ते हिंदू बनले .. ठीक पण त्यांना ( किंवा कोणालाही ) हिंदू बनताना "पाहिजे ती " जात मिळू शकते?

असे असेल तर मुस्लिम आरक्षणाची वेगळी गरजच नाही... ज्या मुसलमानांना आरक्षण पाहिजे त्यांनी कागदो पत्री हिंदू व्हायायचे आणि होताना हिंदू मागासवर्गीय म्हणून जात निवडायची झाला काम... ओवेसी ऐकताय का? मी काय म्हणतोय ते !

कॉमी

नीट वाचा प्रतिसाद म्हणजे समजेल.

चौकस२१२

नहि समजल समजल सान्गा क्रुपया

कॉमी

जाती आणि धर्माचा आर्यन खान दोषी निर्दोशी याशी संबंध नाही असेच मी लिहिले आहे. On the other hand, खंडणी साठी अटक करणे याचा असू शकतो.

कॉमी

त्याला आरक्षण जिहाद आणि लव्ह जिहाद म्हणायला मोकळे मग.

वानखेडे भाजपवाल्यांना उपयोगी होते म्हणून बरं, नाहूतर आत्तापर्यंत ते अट्टल जिहादी म्हणून डिक्लेअर झाले असते.

कॉमी

फ्रेसिंग चुकले. भाजप्समर्थकांना नावडणाऱ्या समूहामागे लागलेले (बॉलिवूड.).

कॉमी

फ्रेजिंग, माझे शब्दांकन चुकले- असे म्हणत होतो.

रावसाहेब चिंगभूतकर

या बाबतीत न्यायालयाने याचिका तर फेटाळावीच, पण महाराष्ट्र सरकारवर दंडात्मक कारवाई सुद्धा करायला हवी. अर्थात त्यामुळे फावड्याला आणि तोतऱ्याला काही वाटण्याची शक्यता नाहीच, पण महाराष्ट्राच्या जनतेच्या पैशातून असले धंदे करायचे उद्योग बंद व्हायला हवेत. आणि त्यासाठी पैशाचा नव्हे तर या तथाकथित नेत्यांवर कोर्टाच्या कारवाईचा दंड व्हायला हवा.

सुबोध खरे

राज्याचे मुख्य सचिव आणि राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला सीबीआयकडून समन्स बजावण्यात आल्याने संपूर्ण पोलीस दलाचे मनोधैर्य खचले आहे. त्यामुळेच सरकारने त्याविरोधात उच्च न्यायालयात येणे न्याय्य असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला होता.

अल्पवयीन, अपंग आणि दाद मागण्याच्या स्थितीत नसलेल्यांचे नातेवाईक वा मित्र त्यांच्या वतीने न्यायालयात धाव घेऊन दाद मागण्याच्या कायदेशीर तरतुदीचा आधारही सरकारने त्यासाठी घेतल्याचे सांगण्यात आले होते.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे हे अल्पवयीन किंवा अपंग किंवा दाद मागण्याच्या स्थितीत नसलेले आहेत हे महाराष्ट्र शासनाने स्वतःच उच्च न्यायालयात कबुल केलेले आहे

हे वाचून

प्रथम हसू

मग रडू

मग हसता हसता रडू

आणि नंतर रडता रडता हसू आले.

अरे राज्य शासन आहे कि खेळ खंडोबा?

असे शपथपत्र सादर करणारे कायदा( विधी) खात्यातील लोक इतके निर्लज्ज, नालायक, निर्ढावलेले आणि बेदरकार असतील असे वाटले नव्हते

सुखीमाणूस

पेशवा--->हिन्दु महासभा---->भाजपा
असा एकन्दर सम्बन्ध कौन्ग्रेस् समर्थक्/भटजी,शेटजी विरोध करणारे जोडत असतात

महार रेजिमेन्ट ने इन्ग्रज फौजेला मदत करुन पेशव्याना हरवले तर ते योग्य...(भीमा कोरेगाव लढाइ)
(कारण सत्तेवर यायची झेप घेण्याची आणि कौन्ग्रेस मधील विविध स्तरावर असलेली घराणेशाही सम्पवण्याची सुतराम भीती नाही. ती तर हक्कच असलेली, भीती घालुन मिळवायची, आरक्षण देउन गुलाम केलेली एक गठ्ठा मतपेटी आहे)

मधे अजुन एक विचारधारा वाचली की स्वातन्त्र्य लढ्यात ब्राम्हण लोकान्चा जास्त सहभाग होता कारण त्यान्च्या हितसम्बन्धाना बाधा आली. त्यात त्यान्चे देशप्रेम नव्हते!! मग हिन्दु महसभा का बर सहभागी झाली नसेल भारत छोडो आन्दोलनात?

https://en.wikipedia.org/wiki/Quit_India_Movement
Vinayak Damodar Savarkar, the president of the Hindu Mahasabha at that time, even went to the extent of writing a letter titled "Stick to your Posts", in which he instructed Hindu Sabhaites who happened to be "members of municipalities, local bodies, legislatures or those serving in the army... to stick to their posts" across the country, and not to join the Quit India Movement at any cost. But later after requests and persuasions and realizing the importance of the bigger role of Indian independence he chose to join the Indian independence movement.[9]

याचा अर्थ असा होतो की कदाचित हिन्दु महासभेला सुरुवतिच्या काळात ब्रिटिशानी राज्यावर असणे हे सुरक्शिततेचे वाटले असेल. स्वातन्त्र्य व फाळणी झाल्यावर उसळलेला हिन्साचार किती वाइट होता हे आपण वाचतोच.

राजकारण करण्यात नेहरु सर्वात हुशार ठरले आणि इतिहास विजेत्याच्या लेखणीने लिहिला जातो त्यामुळे बाकी सगळे नेते निष्प्रभ ठरले.

एकप्रकारे नेहरुनी समाजवादी सरन्जामशाहीच आणली. स्वातन्त्र्य आमच्यामुळे मिळाले याच्या बाहेर कौन्ग्रेस्स ने पडायला हवे आणि भाजपा ने मान्य करायला हवे की आज ते सत्तेवर आहेत तो गाडा कौन्ग्रेस् ने चालवला आहे जो चालवणे सोपे नव्हते.
खरतर फक्त नेहरु किवा गान्धीन्मुळे स्वातन्त्र्य मिळाले म्हणुन आता त्यान्च्या पुढच्या पिढ्या कायम्स्वरुपी राज्यावर हक्क सान्गु शकतात ही गुलाम मानसिकता आहे.
आणि भारताला २०१४ ला स्वातन्त्र्य मिळाले असे म्हणणे म्हणजे ज्या स्वातन्त्र्य सैनिकानी आपले जीव घालवले त्याना दुर्लक्शित करणे आहे...

ती कंगना एक वेडसर आहे हे मान्य पण विक्रम गोखले? ह्यांनी खरा ईतिहास वाचला आहे अशी अपेक्षा होती. पण वॉट्स-अ‍ॅप आल्यापासुन कोणाचा काहीच भरवसा नाही.पत्रकार परिषद घेतली तेव्हा हे काहीतरी मुद्देसूद बोलतील ही अपेक्षा होती. पण ते नेहमीचेच प्रश्न-"लोक फाशी गेले तेव्हा तुम्ही काय करत होतात ? तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न नाही केलात" कोणाला फाशी दिले आणि कोणी प्रयत्न केला नाही ह्यावर मौन.

चौकस२१२

एकप्रकारे नेहरुनी समाजवादी सरन्जामशाहीच आणली. स्वातन्त्र्य आमच्यामुळे मिळाले याच्या बाहेर कौन्ग्रेस्स ने पडायला हवे आणि भाजपा ने मान्य करायला हवे की आज ते सत्तेवर आहेत तो गाडा कौन्ग्रेस् ने चालवला आहे जो चालवणे सोपे नव्हते.
खरतर फक्त नेहरु किवा गान्धीन्मुळे स्वातन्त्र्य मिळाले म्हणुन आता त्यान्च्या पुढच्या पिढ्या कायम्स्वरुपी राज्यावर हक्क सान्गु शकतात ही गुलाम मानसिकता आहे.

मान्य

Trump

एकप्रकारे जातियवाद.
जन्माने ब्राम्हण असलेल्याने ब्राम्हण रहावे. जन्माने चांभार असल्याने चांभारच राहावे इत्यादी.

भारत इस्लामिक देश आहे का? बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयावरून नेटिझन्स भडकले.

https://www.loksatta.com/krida/netizens-slam-bcci-making-halal-meat-com…

कुणी काय खावं आणि काय नाही? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्र्न आहे...

"Halal is considered healthier because after slaughter, blood is drained from the animal's arteries, ejecting most toxins because the heart continues to pump for a few seconds after slaughter."
https://timesofindia.indiatimes.com/science-of-meat/articleshow/1167265….
हलाल मांस अधिक चांगले असे दिसतेय. पोर्क्/बीफ खाण्यास मनाई केली आहे त्यामुळे आनंद होण्यास हरकत नसावी.

वामन देशमुख

ही बातमी खरी असेल तर मोदींसारखा हिंदूंचा म्हणवला जाणारा नेता पंतप्रधान असताना बीसीसीआयची हलाल मांस promote करण्याची हिम्मत होते यावरून मोदींची शक्ती कितपत आहे हे कळून येते. खरंतर हलालची सद्दी संपून एव्हाना झटका मांस हेच भारतात मांसाहारींसाठी प्रमाणित अन्न (standard food) व्ह्यायला हवे होते.

हिंदूंची मते मिळवून जे पूर्ण बहुमताने सत्तेत आले आहेत त्यांना, हिंदूंच्या हितरक्षणासाठी मागच्या सुमारे आठेक वर्षांत फार काही करता आले नाहीए हेच अजून एकदा सिद्ध झाले आहे.

सवांतर: झटक्याच्या मांसाच्या तुलनेत हलाल मांसाचे काही फायदे असतात असे वाटणाऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

अवांतर: एका माणसाला कुणीतरी विचारलं, "अहो चार वर्षे झाली लग्नाला, काही गोड बातमी आहे की नाही?". तर तो म्हणतो, "अहो, गोड बातमी जाऊ द्या, चार वर्षांत मी माझ्या बायकोला एकदाही हातही लावलेला नाही!"

कॉमी

एव्हढे मिनिष्टर होऊन एकही सामूहिक बुकबर्निंग टाईप सोहळा सुद्धा अजून घेतला नाहीये. मग कसला उपयोग आहे ब्रे ?

वामन देशमुख

मग कसला उपयोग आहे ब्रे ?

बाकी तुमचं बुकबर्निंग वगैरे जाऊ द्या, पण तुमच्या वरील विधानाशी मी शतशः सहमत आहे.

स्वतः पूर्ण बहुमताने सत्तेत असताना, पटापट हवी ती कामे करून घेण्याऐवजी ही मंडळी पोपटपंची करत राहतात. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्ता कशी सक्षमपणे राबवावी हे काँग्रेसकडून कधी ही मंडळी शिकतील असे वाटत नाही.

चौकस२१२

माईसाहेबांना नम्र विनंती कि हलाल इकॉनॉमी यावर जरा त्यांनी आंतरजालावर माहिती घावी आणि "हलाल विरोध म्हणजे कट्टर हिंदुत्व " हे तुणतुणे वाजवू नये
यातील मुख्य मुद्दे हे आहेत
- हलाल पद्धतीचे मास अगदी शास्त्रीय दृष्ट्या सेवनास जास्त योग्य असेल है पण हरकत हि त्याबद्दल नाहीये तर आक्षेप या गोष्टींना आहे
१) हलाल सर्टिफिकेशन मधून जो पैस जातो तो कुठं जातो? तयाचा आणि धर्मप्रसाराच संबंध असावा का?
२) हलाल हि जनावर मारण्याची फक्त पद्धत असती तर त्यावर आक्षेप घेतला नस्ता त्याचा संबंध दाहरमाशी आहे आणि फक्त मुस्लिम खाटीकच ते करू शकतो .. हे म्हणजे "योगासन फक्त हिंदू शिकउ शकतो " असे म्हणण्यासारखे आहे किंवा "योग शिक्व्ययाचा असेल तर आधी हिंदू धार्मिक सर्टिफिकेट घेतलेच पाहिजे " अशे सक्ती करण्यासारखे आहे !
दुसरया शब्दात सांगतले तर हालचाल ची प्रोसेस / एस ओ पी इतर धर्मीय खाटीक वापरू शकत असेल तर मग हलाल वलय मुसलमान बोर्डाची काय अवयश्यकता ?

३) हलाल चा "आग्रह" मुस्लिम बहुल नसलेलया देशात धरणे म्हणजे अंडर द रडार आशय चाणक्य पद्धतीने धर्मप्रसार आहे याचाच परिणाम पाश्चिमात्य देशात दिसत आह
आता बोलूयात भारतात बीफ आणि पोर्क बंदी योग्य आहे का? हा प्रश्न नाजूक आहे आणि सरळ पद्धतीने सोडवणे अवघड आहे एक विचार असा येतो कि लोकशान्क्ये प्रमाणे करता येईल का जसे गोव्यात बीफ वॉर बंदी नाहीये
पण फक्त हिंदूंनी बीफ वर बंदी ची मागणी कुठे केली तर ते फॅसिष्ट हा दुटप्पी पण सर्व "उदारमतवादी लोकांनी बंद करावा
लोकशाही आणि दःर्मनिरपेक्षत हि सगळ्या बाजूनी लागू होते फक्त हिंदूंना नाही

आणि हो मुस्लिम एवढेच काय ज सुद्धा परोक्ष चाय जवळपास हि जात नाहीत

( हे सर्व "इस्लामोफोबिया " म्हणून धुडकावून द्याल यात शंका नाहीच )

कॉमी

कुणी काय खावे हे फक्त हलाल सक्ती केल्यावरच सुचते. गुजरात मध्ये रस्त्यावर मांसयुक्त खाद्यपदार्थ विकायला बंदी घातली तर चलती, बीफ बॅन केला तर चालतो, हलाल म्हणलं कि लगेच खाण्याचे स्वातंत्र्य आठवते. किती हिपोक्रसी.

बाकी BCCI ने जर कोणत्याही आरोग्य विषयक फायद्यांशीवायच हलाल कम्पल्सरी केलं असेल तर चुकीचे आहे. आरोग्य फायदे असले तरी असे कम्पलशन कितपत बरोबर शंकास्पद आहे.

रावसाहेब चिंगभूतकर

शंकास्पद आहे? नक्की काय करावं की शंका रहाणार नाही? पुढचं गुजरात झाल्यावर मिटेल?

कॉमी

तुम्हाला माझे म्हणणे समजले नाही असे दिसते. शंकास्पद म्हणजे काही कन्स्पायरसी थियरी आहे असे सूचित करत नव्हतो. शंकास्पद म्हणजे आरोग्य कारण देऊन हलाल बंधनकारक करणे कितपत योग्य, जर हलाल खरंच मर्जीनली शारीरिक वेल बिइंग साठी चांगला आहे, याबद्दल.

पुढचं गुजरात म्हणजे काय म्हणायचे आहे ? दंगलीबद्दल बोलत आहात काय ? त्याने शंका का मिटेल बुवा ?

…तर आर्यन खान प्रकरणातील NCB चा प्रत्येक अधिकारी गजाआड व्हायलाच हवा : शिवसेना

https://www.loksatta.com/desh-videsh/shivsena-slams-ncb-and-central-gov…

-------

ST कामगार आणि शेतकरी, ह्यांच्या पेक्षा, हे प्रकरण मोठे आहे का?

चलो मुंबई! मुस्लीम आरक्षणासाठी MIM आक्रमक; शिवसेना सेक्युलर नसल्याचा ओवेसींचा आरोप....

https://www.loksatta.com/maharashtra/muslim-reservation-asaduddin-owais…

आता हा मुद्दा, केंद्रावर ढकलण्याची शक्यता जास्त आहे....

चौकस२१२

शिवसेना सेक्युलर नसल्याचा ओवेसींचा आरोप....
हा हा पूवा ... ओवेसींचे म्हणे खरे ठरो हीच प्रार्थना अल्लाह चे चरणी

रावसाहेब चिंगभूतकर

https://youtu.be/ZCRlTYm0WpI

सरकार कसं चाललं आहे: सुशील कुलकर्णी

हेच राणे राष्ट्रवादीत्/शिवसेनेत असते तर "कुठे चालले आहे हे राज्य?" म्हणत अनय जोगळेकर/भाउ तोरसेकर्/सुशील कुलकर्णीने व्हिडियोही बनवले असते.

सॅगी

हे भाजपच्या बाबतीत आहे म्हणून खच्चून शिव्या घालायच्या...

बाकी नौसैनिकाला मारहाण, बंगल्यावर नेऊन मारहाण असे प्रकार झाले की मुग गिळून गप्प राहायचे, कारण काय द्या चे राज्य आहे ना...

माजी नौसैनिकाला मारहाण झाली होती तेव्हा देशभरच्या मीडियाने खच्चुन शिव्या घातल्या होत्या. आणि ती टीका योग्यच होती.
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mumbai-retired-naval-of…
एन डी टी.व्हि- https://www.youtube.com/watch?v=bQJQJ9mV-Gw
ईन्डिया टूडे- https://www.youtube.com/watch?v=TF5XLb8vMrI
शिवसेना की गुंडसेना- https://www.youtube.com/watch?v=g__qcjlvRew
मूग गिळून कोण गप्प बसले होते?

श्रीगुरुजी

आणि कुरमेसेला घरी उचलून आणून बेदम चोपला होता तेव्हा?

सॅगी

आणि ती टीका योग्यच होती.

तेव्हाच्या मारहाणीवर टीका करत असाल तर चांगलेच आहे.

बाकी, मारहाण करणार्‍यांविरोधात काही कारवाई झाली नव्हती, तेव्हाही आणि बंगल्यावरील मारहाण प्रकरणातही..हे ही तेवढेच खरे.

आणि आताच्या वेळेस तर मारहाणीचा म देखील नाही, हाही मोठा फरक..

निलेश साबळे ला धमक्या देऊन माफी मागायला लावले असेल तर ते चूकच आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्रीच सचिन वाझे सारख्या खुन्याची पाठराखण करत होते तर नारायण राण्यांच्या ऑफिसवर ज्या गुंडांनी दगडफेक केली त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खास वेळ देऊन फोटोसेशन करत असतील तर राणे कडून काय अपेक्षा ठेवायची. राणेंचा भाजपला फायदा होण्याऐवजी नुकसानच होत आहे.

श्रीगुरुजी

माजी नौसैनिकाला मारहाण झाली होती तेव्हा देशभरच्या मीडियाने खच्चुन शिव्या घातल्या होत्या. आणि ती टीका योग्यच होती.

मी टाईम्सची लिंक बघितली आणि एनडीटीव्हीची चित्रफीतही बघितली. या दोन्ही वृत्तसंस्थांनी ही घटना अत्यंत स्थितप्रज्ञ वृत्तीने फक्त एक बातमी/ घडलेली घटना या स्वरूपात सांगितली आहे. सांगताना कोठेही कोणावरही टीका केलेली नाही. खच्चून शिव्या तर लांब राहिल्या, टीकेचा एक शब्दसुद्धा उच्चारलेला नाही. ही बातमी अशाच स्वरूपात अजून १०० वृत्तसंस्थांनी सांगितली असेल. "आपल्या" सरकारचे हे कृत्य असल्याने त्यांनी तोंडाला कुलुप लावले असणार.

निलेश साबळेची घटना अशीच स्थितप्रज्ञपणे सांगतील का सांगताना भाजपवर कडाडून टीका करतील हे कळेल लवकरच.

'नावड्त्या' राजदीप देसाईंनी ईंडिया टूडेवर चर्चा घेतली होती. शिवाय 'हिंदू'/इंडियन एक्सप्रेस वगैरे 'भाजपा विरोधी' वर्तमानपत्रांनीही ठळक बातमी दिली होती.
https://www.youtube.com/watch?v=64DTxzt1J24
बातम्या/चर्चा अर्नब गोस्वामी स्टाईलमध्ये सांगायच्या की कशा हा ज्या त्या चॅनेलचा प्रश्न आहे. कंगनाने मुंबईला 'पाकव्याप्त कश्मीर म्हंटले त्याचीही बातमी देशभरच्या चॅनेल्सनी सांगितली. किरीट सोमय्या ह्यांनी राज्य सरकारविरोधात जी आघाडी उघडली होती त्याच्या बातम्या रोज प्रत्येक चॅनेल दाखवत होता. एन डी टी व्हि,प्रिंट पासुन ते ए बी पी,झी पर्यंत! आता नवाब मलिकांना जसे फूटेज मिळत आहे तसेच सोमैय्या ह्यांना तेव्हा मिळत होते. यू-ट्युबवर पाहु शकता.

श्रीगुरुजी

याच राजदीप सरदेसाईने २६ जानेवारीला पोलिस गोळीबारात एक शेतकरी मेला अशी धडधडीत खोटी बातमी दिल्याने त्याला आज तकने २ आडवड्यांसाठी निलंबित केले होते.

बाकी नानांनी वर दिलेल्या दोन लिंकमध्ये शिवसेनेला एकही शिवी दिलेली नाही ना शिवसेनेवर टीका आहे. नुसती स्थितप्रज्ञपणे नुसती बातमी देणे आणि त्यावर टीका किंवा स्तुतीसुमने उधळणे यात खूप फरक आहे. "आपल्या" आवडीचे सरकार असल्यावर सरकारच्या चुकीच्या गोष्टी सुद्धा साखरेत घोळवून सांगितल्या जातात हे नौसैनिक मारहाण प्रकरणावरून समजतं. कुरमेसेला केलेल्या मारहाणीची तर बहुतेक माध्यमांनी बातमी सुद्धा दिली नसणार कारण ती मारहाण "आपल्या" माणसाने केली होती.

श्रीगुरुजी

मविआतील नेते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते असल्याने ते माफी वगैरे मागायला लावत नाहीत. ते अशांना थेट उचलून घरी आणतात आणि मरेस्तोवर बेदम मारहाण करतात.

सॅगी

त्याला थाळी, उत्स्फुर्त प्रतिक्रिया अशी गोंडस नावेदेखील देतात.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विजय असो..

कॉमी

संताप म्हणजे काय ? तुम्हाला संताप आलाय का ह्या हेट कॅम्पेन चा ?

गणेशा

वयक्तिक रित्या,
निलेश साबळे ला माफी मागायला लावली का काय मला माहित नाहि..
पण अलीकडे मोदी शेठ नी संपूर्ण देशवासियांची माफी मागितली ते जास्त महत्वाचे वाटते...

आणि शेतकऱ्यांना समजावण्यात ते कमी पडले असे त्यांना वाटले
समजावण्याचे प्रकार :
-रस्त्यात खिळे ठोकले..
- खलिस्तानी, देशद्रोही संबोधले..
- पाणी, लाठी मार दिला..
- कंटेनर्स लावले..

असो, समजावण्याची अजून काय काय मार्ग वापरले वा..

रावसाहेब चिंगभूतकर

म्हणून मी म्हणतो की प्रत्येकाला मोबाईल देऊन मोठे प्रॉब्लेम होणार आहेत. कुठल्याही आय ए एस अधिकाऱ्याने याच गोष्टी केल्या असत्या. कंटेनर लावणे, मध्ये लोकांना डायरेक्ट येता येऊ नये म्हणून अडथळे उभारणे वगैरे. पण आजकाल कोणीही सोम्या गोम्या उठतो आणि mob ला कसं हाताळावे ते इथे बसून सांगतो. जिओ चा जवळ जवळ फुकट डेटा वापरून मोबाईल वर कॉपी पेस्ट करायला काय जातं !

तसे असते तर, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आणि मध्य प्रदेश शेतकरी नक्कीच सहभागी झाले असते ... माझ्या ओळखीत सर्व शेतकरी वर्गाला, मोदींनी आणलेले कायदे योग्य वाटत आहेत, अर्थात ही सगळी शेतकरी मंडळी, मध्यम वर्गीय शेतकरी आहेत...

तेंव्हा मोदींनी जे केले ते योग्यच केले ....

आमच्या सारख्या अशिक्षित माणसांना, मोदींशिवाय पर्याय नाही ....

ह्या गोष्टीने एक गोष्ट परत एकदा अधोरेखीत केली की, माझ्या सारख्या अशिक्षित माणसाच्या भल्यासाठी कॉंग्रेस नाही..

गणेशा

जसा राजा तशीच प्रजा.. आणि जशी प्रजा तसाच राजा...

अशावेळी ही म्हण उपयोगी पडत नाही ....

वंशपरापरागत पेशवेपद, हे एक ऐतिहासिक उदाहरण ...

नंद घराणेशाही, हे दुसरे उदाहरण

चीन मधले राजे हे तिसरे उदाहरण

वाकाटक साम्राज्य, राष्ट्रकूट साम्राज्य, हे पण अशाच घराणेशाही मुळे लयास गेले असण्याची शक्यता आहे.

रशियाचे झार साम्राज्य पण घराणेशाही मुळेच लयाला गेले

लोकशाही असल्याने, आता आपण घराणेशाही टाळू शकतो...

चौकस२१२

वंशपरापरागत राजे ? दिल्लि पसुन कोल्हपुर पर्यन्त !

“तुम्हाला लाज वाटत नाही का?”; खराब रस्त्यांवरुन केरळ उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना झापलं

https://www.loksatta.com/desh-videsh/kerala-high-court-reprimands-autho…

डोंबिवली येथे, खड्ड्यांत पडून, एका बाईला प्राण गमवावे लागले होते....

सुनील

अल्प प्रमाणात ड्रग्ज बाळगणे आता गुन्हा ठरणार नाही; संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकार मांडणार विधेयक.

https://www.loksatta.com/desh-videsh/narcotic-drugs-and-psychotropic-su…

जबरदस्त मांडवली झालेली दिसतेय!!

कॉमी

उत्तम. मनापासून अभिनंदन. खरोखर चांगले आहे.

जेम्स वांड

ह्यात ड्रग म्हणजे काय ते केले आहे का स्पष्ट ? नॅचरल ओकरिंग का सिन्थेटिक ड्रग पण चालतील ?

एमपी मध्ये सरकारी परवाने मिळतात भांग दुकान चालवण्याचे

आपल्याकडे अबकारी खाते आणि पोलीस मिळून खसखस उत्पादन घ्यायला म्हणून अफूच्या लागवडीचे लायसन्स देतात मराठवाड्यात, अतिशय कडक कंट्रोल्ड असते ते, झाडांची संख्या, निघा घेणाऱ्या मजूरांची व्हेरिफिकेशन्स, मालकाच्या सातबारा अन पेरेपत्रकाचे ड नमुन्याचे उतारे सगळे द्यावे लागते.

उत्पादन झालेली अफू पण सरकार खरेदी करते रुद्रप्रयाग का डेहराडूनला कुठंतरी केंद्रसरकारी मोर्फीन (पेनकिलर) उत्पादक प्लांट आहे म्हणतात तिथे तो स्टॉक जातो असे काहीसे आहे.

हे विधेयक इंटरेस्टिंग असेल.

अनन्त अवधुत

ड्रग्ज घेणारा हा व्यसनी आहे, गुन्हेगार नाही. चांगल्या कायद्याबद्दल अभिनंदन!

जाता जाता: या कायद्याची मागणी आधीपासुन होती, आर्यनला अटक झाली त्याच्या आधीपासुन. लोकसत्ता काहीपण फेकते.

हा कायदा मंजुर जरी झाला तरी त्याचा आर्यनला काही फायदा नाही. त्याला अटक झाली (ड्रग्ज बाळगण्याचा गुन्हा घडला) तेव्हा त्या कायद्यानुसार त्याला शिक्षा होईल.

निर्भया केस मध्ये एक जण बाल गुन्हेगार होता, त्यामुळे त्याच्यावर बाल न्यायालयात खटला चालला. तो अटकेत असताना, बाल गुन्हेगारांवर बलात्कार, खून अशा खटल्यात प्रौढ म्हणून खटला चालवण्याचा कायदा मंजुर झाला होता, पण त्या बालगुन्हेगाराच्या खटल्यात बदल झाला नाही.

केंद्र सरकारचे अभिनंदन. नविन कायदे बनवणे व ड्रगबद्दल अस्तित्वातले कायदे बदलणे गरजेचे होते. ड्रग बाळगले नसतानाही अटक करणे व खोटी केस टाकून पैसे उकळायचा प्रयत्न सरकारी अधिकारी कसे करतात ते आपण आर्यन खान प्रकरणात पाहिले. त्याआधीही सुशांत सिंग प्रकरणात हेच घडले होते. चलाख व भ्रष्ट अधिकार्यांना मोदी सरकार समज देईल अशी आता आशा करूया.

सुबोध खरे

माई

तुमचे मत आदर्शवादी आहे.

मादक द्रव्याच्या व्यापारातील दलालांकडून NCB चे अधिकारी कायमच पैसे उकळत आलेले आहेत.

जसे आपले शार्प शुटर पोलीस गुंडांकडून एन्काउंटर करण्याची धमकी देऊन पैसे उकळत आलेले आहेत.

या दोन्ही अधिकाऱ्यांना राजकारणी आणि सत्ताधीश कायम संरक्षण देत आलेले आहेत.

हि व्यवस्था इतकी किडलेली आहे कि त्यात आमूलाग्र सुधार करण्याची आवश्यकता आहे. पण तसे होण्याची सूतराम शक्यता नाही.

पकडले गेलेले अमली पदार्थ चोर वाटेने परत बाजारात येतात.

सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढताना सांगितले कि गेल्या दशकात ६० लाख किलो अमली पदार्थ पकडले होते त्यापैकी १६ लाख किलो नष्ट केले आणि बाकीचा हिशेब लागत नाही. https://www.thehindu.com/news/national/consider-dedicated-storage-space…

Justice T.S. Thakur remarked that of the 60 lakh-kg contraband seized in the past decade, only 16 lakh kg had been found to be destroyed.

गांजाची किंमत एका किलोला ३-४ हजार रुपये आणि हेरोइनची ७ कोटी. म्हणजे हे ४४ लाख किलो गांजा असेल तर त्याची किंमत १५०० कोटीच्या वर आहे आणि हेरॉईन असेल तर अक्षरशः अब्जावधी रुपये होतात. एकंदर किंमत किमान १५ हजार कोटी ते कमल काही शे अब्ज रुपये यात कुठेतरी आहे.

दक्षिण अमेरिका खंडात अक्षरश सरकार बदलण्याची/ उलथवण्याची शक्ती असते या माफियांच्या हातात हि अशाच प्रचंड पैशामुळे.

जी घटना सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचते त्याबद्दल काहीही होत नाही याचा अर्थच हा आहे कि हि प्रणाली वरपासून खालपर्यंत किडलेली आहे.

एकटे मोदी काहीही करू शकणार नाहीत.

बॉलिवूडच्या लोकांमध्ये दहशत निर्माण हेतू हा आहे कि असंख्य तरुण तरुणी तेथील तारकांचे अनुकरण करतात. "ड्रग्स घेणे" यात तेथे वैषम्य वाटण्याच्या ऐवजी हे लोक त्याचे निर्लज्ज समर्थन करता आणि त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देतात याबद्दल आक्षेप आहे.

रस्त्यावरच्या गर्दुल्ल्यांचे कोण अनुकरण करतंय? हे कायदे अशा दुर्दैवी जीवांसाठी आहेत ज्यांचे कुणीही नाही. ज्यांना व्यसनापायी जीव धोक्यात घालावा लागतो आणि स्वतः नाश करत असताना पकडले गेले तर जामिनासाठी पैसे नसतातच तर महागडे वकील कुठून करणार. यामुळे अक्षरशः हजारो तरुण तुरुंगात खितपत पडलेले आहेत.

मुळात हा छापे लक्षिमीपुत्रांवर नाहीतच तर त्यांच्यामार्फत दलालांपर्यंत पोचण्यासाठी आणि त्यांचे जाळे नष्ट करण्यासाठी घातलेले आहेत. पण सरकारतीलच काही लोक त्यात खोडा घालत आहेत. कारण त्यांचे पुत्र जावई नातेवाईक या व्यापारात गुंतलेले आहेत.

चौकस२१२

खलिस्तानी, देशद्रोही संबोधले..
मुद्दा नक्कीच होता,, भारताबाहेर हे इतक्या उघडपणे दिसत होते .. जणू काही शिखांचे धर्म यौद्ध आहे .. जणू काही शेतकरी फक्त पंजाब मध्ये आहे
तुम्ही कोणत्याका पक्षाचे समर्थक असा पण हे कृपया लक्षात घ्या कि भारत एक देश असा विचा र केला तर हे जग भर मूठ भर असून सुद्धा विघटन वादि शीख आहेत त्यांनाच आवाज भारताला तापदायी ठरत आहे, या आंदोलनाचा फायदा खलिस्तानवादी आणि त्यांचे पाठीराखे यांनी नक्की घेतला
बर अजूनही हे कायदे नाकी १००% शेतकर्यांच्य्या विरुद्ध कसे होते? कि ते मधील दलालांना पेचात आणणारे होते या बद्दल त्याचे समर्थक काही खुलासा देत नाहीत ,, नुसतं मोदी विरुद्ध हे किती दिवस चालणार !

सहमत. कृषी कायद्यांना विरोध का ? काय धोके आहेत? हे अजूनही विरोधक सांगत नाहीत. निदान शरद पवार वगैरे नेते सांगतील अशी अपेक्षा होती.

आग्या१९९०

सरकारला ह्या कृषि कायद्याचे फायदे काय आहेत ते नीट सांगता येत नसल्याने मागे घ्यावे लागले ह्यातच सर्व काही आले. हे कायदे नसतानाही कंत्राटी शेती करत आहेत शेतकरी, थेट व्यापाऱ्याला आपला कृषीमाल विकत आहे. शेतीला फक्त उद्योगाचा दर्जा आणि सुविधा दिल्या तरी पुरेसे आहे. असले कायदे कागदावरच ठीक.

चौकस२१२

माजी कृषिमंत्री तर यावर एक्स्पर्ट असले पाहिजेत ...

रावसाहेब चिंगभूतकर

Good riddance !

अजिबात अश्रू ढाळायची गरज नाही. हाच हलकट मुनावर फारूकी राम-सीता या हिंदू देवतांची कशी टवाळी करत होता हे पुढील व्हिडिओत बघायला मिळेल.

याच व्हिडिओमध्ये सीतेच्या तोंडात एक अपशब्द पण त्याने टाकला आहे असे दिसते.

असल्या हरामखोरांविरूध्द कडक भूमिका घेतलीच पाहिजे. अन्यथा हिंदू देवतांविरोधात थोडा विनोद केला- मग काय झाले ही गाडी पुढे मग हिंदू समाजाला काहीही बोलले- मग काय झाले करत करत हिंदूंना देशोधडीला लावले, हिंदूंच्या कत्तली केल्या मग काय झाले पर्यंत जाते. त्यामुळे सुरवातीलाच अत्यंत कडक भूमिका घेऊन असल्या फालतू लोकांना गप्प बसवायलाच हवे. बास झाला तथाकथित बेगडी सहिष्णूपणा.

आपल्या श्रध्दास्थानांची टवाळी केली तर कसे फतवे काढले जातात, कसे हलाल केले जाते हे या मनुष्याला माहित नसायची अजिबात शक्यता असेल असे वाटत नाही. तसे असेल तर मग इतरांच्या श्रध्दास्थानांची टवाळी आपण करू नये इतके तरी किमानपक्षी सौजन्य दाखवावे इतकी अक्कल याला नसेल तर असेच त्याला जबरदस्तीने गप्प बसवायला हवे.

या न्यू इंडियाचा अभिमान आहे. हिंदूंनी असेच, यापेक्षा जास्त कडक वागायलाच पाहिजे.

चौकस२१२

सरकारला ह्या कृषि कायद्याचे फायदे काय आहेत ते नीट सांगता येत नसल्याने मागे घ्यावे लागले
बर मग आपण त्याचे तोटे सांगा ना? आणि हा जो आक्षेप होता कि "मध्यला दलालांना नको होता " तो आक्षेप कसा चुकीचा होता ते सदोहरान सांगा. होऊनच जाऊदे हा सूर्य हा जयंद्रथ
याशिवाय " शेतकरी आंदोलन , शीख धर्मयुद्ध असे जे दिसत होते त्या बद्दला पण असं काही म्हणे चुकीचे आहे ते सांगा.. आम्ही धन्य होऊ
या पुढे कुठे सार्वजनिकी दिवाळी वैगरे साजरा करताना आता छुपे खलिस्तानी हातात " बळीराजाचा" फलक घेऊन येणार याची तयारीच ठेऊ ..

कर्नाटक त्रिपुरा बंगाल , केरळ तामिळनाडू येथील शेतकरी पण "पंजाबी शेतकर्या एवढाच " पेटून उठला होता आणि नऊ यॉर्क पासून ऑकलंड न्यू झीलंड मधील सर्व गुजराथी, मल्याळी मराठी समाज "फार्मर सपोर्ट म्हणून " गुरुंमुखी तुन पाट्या लिहून पेटून हिंदूवादी संघोट्या फॅस्टिस्ट इतर भारतीयांचं सणाच्या उत्सवात धुडगूस घालत होता .. हे हे दाखवा ... च्।लाआ लागा कामाला एकदाची आमची तोंडे बंद करा ..मग आम्ही पण गुरुग्रामात झाले तसे मुकात जाऊन गुरुद्वारात नमाज पडायला मोकळे ..

आग्या१९९०

बर मग आपण त्याचे तोटे सांगा ना?
कायदे आणले सरकारने, मागेही घेतले सरकारने. त्यांना प्रथम विचारा ह्या कृषि कायद्याचे फायदे. एक तर ह्या सरकारचे कृषीविषयक ज्ञान तोळामासाच. त्यात फार विचार न करता घोषणा करायची हौस फार. २०२२ पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असे २०१५ ला ह्या सरकारने घोषणा केली होती. हे लक्ष गाठायला वार्षिक कृषिविकासदर १२-१४ % असायला हवा. घोषणा झाल्यापासून २०१९ पर्यंत प्रत्यक्षात तो ३% पेक्षा कमी होता. ना नीट नियोजन ना धोरण होतं सरकारकडे. कोरोनामुळे पुढे अधिकच कठीण झाले. शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट होणार नाही ह्याची खात्री झाल्याने हे अपयश लपवण्यासाठी तीन कृषि कायदे आणले. तिकडेही अभ्यास कमी पडल्याने माघार घ्यावी लागली.

कॉमी

Biden banned travel from South Africa because of the new Covid variant.Immigrants have recently been apprehended crossing our border illegally from South Africa.Biden is doing nothing to stop immigrants from South Africa entering illegally.Pure politics and hypocrisy.— Greg Abbott (@GregAbbott_TX) November 28, 2021

१. अबॉट दादांना कदाचित यूएस आणि आफ्रिकेची एक बॉर्डर आहे असे वाटत असावे.
किंवा, मधले प्रचंड समुद्री अंतर पोहत किंवा बोटींनी पार केले असे वाटत असावे. म्हणजे विक्रमच म्हणायचा.

२.Immigrants have recently been apprehended crossing our border illegally from South Africa.
Biden is doing nothing to stop immigrants from South Africa entering illegally.
बॉर्डर वर अडवलं म्हणे- पण काहीच केले जात नाहीये... एकाच वेळी दोन परस्परविरोधी गोष्टींवर विश्वास.

अमेरिकन कॉन्सर्व्हेटिव्ह मूर्खपणाचे जिवंत उदाहरण म्हणून जे ट्विट फ्रेम केले पाहिजे.

कम्युनिस्ट क्युबामधून लोक स्वतःचा जीव धोक्यात टाकून असेच बोटीने लोक अमेरिकेत यायचा शिरस्ता गेली कित्येक वर्षे चालू आहे- इतका की क्युबातून वैध-अवैधपणे अमेरिकेत आलेल्यांचे आणि त्यांच्या वंशजांचे प्रमाण क्युबाच्या लोकसंख्येच्या जवळपास १०% आहे.

त्यामुळेच बहुदा सगळीकडून लोक अमेरिकेत असेच बोटीने किंवा पोहत येतात असे अ‍ॅबटदादाला वाटले असावे. काय करणार.

मागच्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात एक वेळ अशी आली होती की पूर्ण जगात जितके कोरोना रूग्ण होते त्याच्या ८-९% रूग्ण एकट्या न्यू यॉर्क राज्यात होते. तरीही आपण कोरोनावर कसे नियंत्रण मिळवले यावर पुस्तके लिहून स्वतःचीच लाल करून घेणारा न्यू यॉर्कचा माजी गव्हर्नर अ‍ॅन्ड्र्यू कुमो किंवा उबरसारख्या पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टवरील लोकांवर आधारीत असलेल्या बिझनेस मॉडेलमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टवरील वाहनचालकांची पिळवणूक होते असा तिरपागडा अर्थ लावून ते वाहनचालक सुध्दा (खरं तर सगळेच कॉन्ट्रॅक्टवरील लोक- फ्रीलान्सर धरून) कंपनीचे कर्मचारी आहेत म्हणून त्यांना पी.एफ किंवा दरवर्षी अमुक इतक्या भरपगारी सुट्ट्या दिल्याच पाहिजेत वगैरे गुडघ्यातील कायदे (एबी-५) संमत करणारा कॅलिफॉर्नियाचा गव्हर्नर गेव्हिन न्यूसम हे लिब्बू मूर्खपणाचे जिवंत उदाहरण म्हणून फ्रेम करून ठेवले पाहिजे.

बलात्कार प्रकरणात बिहार न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; २४ तासांत निर्णय देत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

https://www.loksatta.com/desh-videsh/bihar-araria-pocso-court-verdict-r…

--------

महाराष्ट्रातील ह्या राजवटीत, तडकाफडकी निर्णय देणार, असे बोलले होते....

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून 'तलाठ्या'ची आत्महत्या, नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad/talathi-officer-com…

आता राज्य कर्मचारी देखील आत्महत्या करायला
लागले .... ह्यालाच प्रगती म्हणायचं का?

त्रिपुरात झालेल्या स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यातील जवळपास सगळ्याच्या सगळ्या जागा भाजपने जिंकल्या आहेत. बंगाल आणि त्रिपुरामध्ये बरेच साम्य आहे याचे कारण स्वातंत्र्याच्या वेळेस आणि त्यानंतरही पूर्व पाकिस्तानात झालेल्या दंगलींमुळे मोठ्या प्रमाणावर बंगाली भाषिक हिंदू पूर्व पाकिस्तानातून (आणि नंतर बांगलादेशातून) त्रिपुरामध्ये आले. बंगालमध्ये ज्याप्रमाणे कम्युनिस्टांचे दीर्घकाळ राज्य होते त्याप्रमाणे त्रिपुरातही होते. २०१८ मध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि भाजप सत्तेवर आला.

ममता बॅनर्जींनी त्रिपुरामध्ये तृणमूलचे हातपाय पसरायचे प्रयत्न केले पण त्यांना फारसे यश मिळाले नाही. विधानसभेत ६० पैकी १०-१२ जागांपेक्षा जास्त यश त्यांना मिळू शकले नाही. २०२१ मध्ये बंगालमध्ये तिसर्‍यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर ममता आपला पक्ष राष्ट्रीय पक्ष करायच्या मागे लागल्या. गोव्यात लुईझिनो फालेरो, मेघालयमध्ये मुकुल संगमा असे माजी मुख्यमंत्री त्यांच्या पक्षात सामील झालेही. या पार्श्वभूमीवर बहुसंख्य बंगाली भाषिक नागरीक असलेल्या त्रिपुरामध्ये यश मिळविण्यासाठी ममतांनी कंबर कसली. पण राज्यातील जवळपास सगळ्या जागा (३३२ पैकी ३२९) भाजपने जिंकल्या. तृणमूलला एकाच जागेवर समाधान मानावे लागले.

माझ्या अंदाजाने, तृणमुल कॉंग्रेस म्हणजेच, ममता बॅनर्जी

त्यामुळे, जोपर्यंत ममता बॅनर्जी आहेत, तोपर्य॔त तृणमुल कॉंग्रेस आहे

ह्या बातमीनुसार केरळमधील 5000 च्या आसपास शिक्षकांनी धार्मिक आणि आरोग्याच्या कारणामुळे करोना विरुद्धची लस घेण्यास नकार दिला आहे. काही लोकांना आरोग्याच्या तक्रारी असतील तर लस न घायला ठीक आहे पण लस आणि धर्म याचा संबंध कुठे येतो हे समजत नाही.

ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले नसतील, त्यांना घरीच स्थानबद्ध करा...

सार्वजनिक स्थानबद्धता नको... झूंडीचा असंतोष, दंगलीला कारण्याभूत होण्याची शक्यता जास्त असू शकते...

जेम्स वांड

"ड्रग्स घेणे" यात तेथे वैषम्य वाटण्याच्या ऐवजी हे लोक त्याचे निर्लज्ज समर्थन करता आणि त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देतात याबद्दल आक्षेप आहे.

&#129300 &#129300

अगदी सहज बॉलीवूड स्टार्स असलेले देशद्रोही पब्लिकली "चिलम ओढा रे पोराहो" म्हणत असल्याचे दिसले. मजेशीर चित्र वाटले एकदम.

&#128514 &#128514

जेम्स वांड

दम मारो दम गाणं ऐकून पोरं चिलमीला लागतात,

तर मग

ये जो देश हैं तेरा ऐकून सगळे देशभक्त होत नाहीत ?

अजबच तर्क झाले हे तर.

सुबोध खरे

दम मारो दम गाणं ऐकून पोरं चिलमीला लागतात,

तर मग

ये जो देश हैं तेरा ऐकून सगळे देशभक्त होत नाहीत ?

अजबच तर्क झाले हे तर.

मुलं सुभाषितं लवकर शिकत नाहीत पण शिव्या का लवकर शिकतात?

मास्तर "तमाशाने समाज बिघडला नाही आणि भजनाने सुधारला नाही" हे पिंजरा मध्ये असलेले वाक्य बरेचसे सत्य असले तरीही

मादक द्रव्यांचा प्रश्न त्याच्यामागचे जीवशास्त्रीय कारण लक्षात घेतले तर इतका गंभीर का आहे हे समजून येईल.

हेरोइनची ३-४ इंजेक्शन तुम्हाला आयुष्यभरासाठी व्यसनी बनवू शकतात (हि पहिली इंजेक्शन्स तुम्हाला फुकट दिली जातात) यावरून हा एक दिशा मार्ग आहे हे समजून चला

अनन्त अवधुत

अगदी सहज बॉलीवूड स्टार्स असलेले देशद्रोही पब्लिकली "चिलम ओढा रे पोराहो" म्हणत असल्याचे दिसले. मजेशीर चित्र वाटले एकदम.

ह्याला प्रतिक्रिया म्हणून मी ते गाणे टाकले. कृपया हलके घ्या.

दम मारो दम गाणं ऐकून पोरं चिलमीला लागत नाहीत, कि ये जो देश हैं तेरा ऐकून सगळे देशभक्त होत नाहीत.

चांगल्या सवयी लावण्यासाठी वेळ द्यावा लागतो, आणि वाईट सवयी लागायला वेळ लागत नाही (संगत लागते).

जेम्स वांड

आपल्या संयत प्रतिसाद आणि शब्दयोजनेबद्दल आपले कौतुक वाटते आहे मला, आवडलं ते नमूद करायलाच हवे. असे हलकेफुलके आजकाल कमीच बोलतात लोक, अन एकंदरीत बाजू लढवल्याचा अभिनिवेष नसणाऱ्या माणसांशी बोलणे सुखद वाटते.

अनन्त अवधुत

कौतुकाबद्दल धन्यवाद!

एकंदरीत बाजू लढवल्याचा अभिनिवेष नसणाऱ्या माणसांशी बोलणे सुखद वाटते.

+१

सुबोध खरे

the clip where SRK was heard saying, “I have just told him that he can run after girls. Smoke as much as he wants. He can do drugs, can have sex. He can womanize.”
https://www.opindia.com/2021/10/shah-rukh-aryan-khan-simi-garewal-inter…

शाहरुख खान असे जरी विनोदाने बोलला असला तरी तो कुठे बोलतोय आणि त्यातून (त्याच्या आणि इतरांच्या) तरुण मुलांना मुलाला काय संदेश गेला आहे ते पहा.

NCB sources have said it has been found that Aryan Khan was consuming drugs for four years. He was on drugs even during his UK and Dubai stay.
https://www.indiatoday.in/india/story/aryan-khan-cried-during-ncb-inter…

मुलगा दुबईत जर अमली पदार्थ घेताना पकडला गेला असता तर तेंव्हाच्या कायद्यानुसार किमान चार वर्षे ते आयुष्यभर तुरुंगात खितपत पडावे लागले असते.

मजेशीर चित्र वाटले नसते एकदम.

कॉमी

शाहरुख म्हणले कि वाईटात वाईट इंटरप्रिटेशन करायचं ?

त्यातून (त्याच्या आणि इतरांच्या) तरुण मुलांना मुलाला काय संदेश गेला आहे ते पहा.

अच्छा, म्हणजे "तुझा मुलगा लाडावलेला आहे का?" या प्रश्नावर "हो माझा मुलगा तीन वर्षांचा झाला की त्याला ड्रग्ज करण्याची आणि सेक्स करण्याची परवानगी देणार आहे" असे विनोदाने उत्तर शाहरुखने दिले. हा १५-१६ वर्षांपूर्वीचा इंटरव्ह्यू आर्यन खानने इतर तरुण मुलांनी पाहिला आणि ते प्रोत्साहित झाले ? ख्या ख्या ख्या.

(ओपिइंडिया कचरापट्टी हे नेहमीचे आहेच. गौरी खान बर्लिन ऐरपोर्ट वर पकडली गेल्याचा क्लेम तपासण्यायोग्यच नाहीये. मूळ घटनेचा न्यूज रिपोर्ट कुठेही सापडत नाही. तरी ओपी वाल्यानी alleged शब्द सुद्धा न वापरता त्यांना खात्री असल्यासारखे सांगितले आहे.ऑप वाल्यानी ज्या इंडिया टाईम्सचा सोर्स दिलाय- ती फेक न्यूज देणारी साईट आहे.)

आग्या१९९०

शाहरुखचा सेन्स ऑफ ह्युमर आणि सर्काझम हा उच्च कोटीचा असतो. तो समजण्यासाठी मुळात शाहरुख काय चीज आहे हे समजण्यासाठी तपस्या करावी लागते. त्याची एखादी मुलाखत किंवा त्याचे एखादे वाक्य ऐकून अजिबात मत बनवू नये. पूर्वग्रहाने तर नाहीच नाही.

कॉमी

ह्युमर/उपहास समजत नाही अशातला भाग नाही. लिटरल अर्थ आणि वे ऑफ स्पिकिंग व्यवस्थित समजतो त्यांना.
१५ लाखाचा जुमला नाही काय त्यांना व्यवस्थित समजला :) तिथे अर्थांमधले आणि काँटेक्स्ट मधले बारीक फरक व्यवस्थित समजलेले :)

गुगलवर "सुबोध खरे पंधरा लाख मिसळपाव मोदी" किवर्ड ने लगेच रिझल्ट आला
&#128514

सुबोध खरे

मी वरच म्हटलंय कि ते तो विनोदाने बोलला परंतु असे वक्तव्य पत्रकार कसे विचित्रपणे सादर करतात.

यासाठी आपण कुठे काय बोलतो आहोत यायचे तारतम्य असावे लागते.

बाकी तुम्ही प्रतिसादातील माझे इतर मुद्दे दुर्लक्षित करणार याबद्दल मला संदेह नव्हताच. ते तुमच्या विचारसरणीला धरून होतेच.

परंतु बॉलिवूड मध्ये किंवा व्यसनमुक्ती केंद्रात काम केले असते तर तुम्हाला या उदात्तीकरणाचे भयानक परिणाम समोर आले असते.

सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढताना सांगितले कि गेल्या दशकात ६० लाख किलो अमली पदार्थ पकडले होते त्यापैकी १६ लाख किलो नष्ट केले आणि बाकीचा हिशेब लागत नाही.एकंदर किंमत किमान १५ हजार कोटी ते कमल काही शे अब्ज रुपये यात कुठेतरी आहे.

"ड्रग्स घेणे" यात तेथे वैषम्य वाटण्याच्या ऐवजी हे लोक त्याचे निर्लज्ज समर्थन करता आणि त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देतात याबद्दल आक्षेप आहे.

आजही काही नट आडमार्गाने तंबाखू किंवा गुटख्याच्या जाहिराती करत आहेत. ( अजय देवगण आणि शाहरुख खान) उदा बोलो जुबां केसरी हि जाहिरात क्रिकेट मॅच मध्ये सारखी सारखी दाखवली जाते आहे. यात केवळ तंबाखू मिश्रित केल्यास गुटखा तयार होतो हि साधी गोष्ट लोकांना माहिती आहे पण कायद्यातील त्रुटींचा वापर करून केवळ त्यात तंबाखू नाही म्हणून त्यावर बंदी घालता येत नाही.

आपण पैशासाठी कित्येक तरुणांना व्यसनी बनवतो आहे याची त्यांना ना लाज ना खंत आहे.

Amitabh Bachchan had announced his withdrawal from the Kamla Pasand campaign in October after a national anti-tobacco organisation requested him to refrain from endorsing a pan masala brand to help prevent youngsters from getting addicted to tobacco.
https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/amitabh-bachc…

It is learnt that a national anti-tobacco organisation, supported by doctors from the cancer hub Tata MemoriaHospital, had reached out to the actor to ask him to stop promoting pan masala as it is carcinogenic

Read more at:
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/86949662.cms?utm_source=… ..

आग्या१९९०

पत्रकारांना फाट्यावर मारण्याइतकी उंची शाहरुखने केव्हाच गाठली आहे. सरकारने तंबाखू किंवा मद्य ह्यांच्या जाहिरातीवर बंदी घालण्यापेक्षा त्यांच्या उत्पादनांवर बंदी आणावी. कलाकारांना शिकवत बसू नये.

जेम्स वांड

शाहरुख खान असे जरी विनोदाने बोलला असला तरी तो कुठे बोलतोय आणि त्यातून (त्याच्या आणि इतरांच्या) तरुण मुलांना मुलाला काय संदेश गेला आहे ते पहा.

.

तरीही साहेब स्वारींनी शाहरुख विनोदात बोलला होता म्हणल्याबद्दल शाहरुखने आज गोडधोड करून खायला पाहिजे असे वाटते.