राजकारण

ताज्या घडामोडी- फेब्रुवारी २०२२

Primary tabs

किशन भारवाडचा खून - आरोपी सब्बीर आणि जमालपूर येथील मौलाना.
अहमदाबाद जिल्हा रहिवासी असलेल्या किशन भारवाड यांची २५ जानेवारी रोजी धंधुका तालुक्यात दोन दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. किशनजी घरी जात असताना दोन दुचाकीस्वारांनी येऊन त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी सब्बीर, इम्तियाज आणि जमालपूर येथील मौलाना अयुब जावरवाला यांनी यापूर्वी मे २०२१ मध्ये पोरबंदर येथील रहिवासी साजन ओडेदरा याच्या हत्येचा कट रचला होता. मात्र पोरबंदरमध्ये तो सापडला नाही.
एटीएसचे एसपी आयजी शेख यांनी सांगितले की, किशन भारवाडच्या हत्येप्रकरणी मौलाना कमरगानी उस्मानी याला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले आहे.
धार्मिक भावना दुखावणाऱ्या एका फेसबुक पोस्टमुळे किशन भारवाडची हत्या करण्यात आली आहे. एका बैठकीत कमर गनी यांनी आरोपींना सांगितले होते की, जर कोणी त्यांच्या धर्माविरुद्ध बोलत असेल तर त्या व्यक्तीला संपवले पाहिजे. त्यामुळेच कमर गनीच्या सांगण्यावरून या दोन्ही आरोपींनी किशन भारवाड यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

प्रदीप

"“The scan found a total of 1019 IP addresses mapped to 1014 domain names. The scan also found many IP networks within India identified by Autonomous System Numbers (ASN), from which the infected devices were talking to these C&C servers,” Venkatanarayanan said in his deposition."

ह्यावरून, ह्याचे कर्ते भारतांतच आहेत हे कसे सिद्ध होते, हे मलातरी समजत नाही. म्हणजे (हे सर्व बरोबर आहे असे समजले तरीही) टार्गेट्स भारतांत आहेत, म्हणजे त्यांना टार्गेट करणारेही भारत सरकार आहे, हे सिद्ध होत नाही.

'A blow to Modi?' अशाप्रकारची बातमी परत एकदा वाचायला मिळणार तर. गेल्या १०-११ वर्षात ती बातमी एकदाही वाचायला मिळालेली नव्हती ती कसर आता भरली जाणार असे दिसते :)

कॉमी

Venkatanarayanan told the SC panel that of the several ASN found in India, ASN 24560 is, particularly, interesting because it’s typically reserved by networks for “very selective corporate clients including the Government of India.”

प्रदीप

पण मग, भारत सरकारही परकीय सायबर- इंटरूजनाचा बळी असू शकते, ही शक्यताही आहेच.

आनन्दा

बाकी पेगासीस ने भारतात intrusion केले, आणि पेगासीस च्या क्लायंट लिस्ट मध्ये भारत सरकार आहे

या दोन गोष्टीवरून भारत सरकारने intrusion केले हे कसे सिद्ध होईल याबाबत उत्सुकता आहे.
जास्तीत जास्त याचा बोफोर्स होईल, अजून काही होऊ शकत नाही. पण बोफोर्स इतकी हवा यांच्यात नाही, करण हा काही नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित प्रश्न नाही, किमान आत्ता तरी.

कॉमी

थिंक टॅंक ही ओळख अपुरी आहे.
इथे पहा.(गुगल करता सापडले.)

रावसाहेब चिंगभूतकर

प्रश्न असा आहे, की जरी पेगासस भारत सरकारने खरेदी केले असले तरी ते चुकीचे कसे? भारताच्या शत्रूंना अगदी अनधिकृत रित्या एक यादी करून ठार करायचं ठरवलं तरी त्या यादी वर सही करण्याचे स्वातंत्र्य भारताच्या सर्वोच्च नेत्याला किंवा तिन्ही दलांच्या सरसेनापतीला देता यायला हवे. पेगासस सॉफ्टवेअर अतिरेक्यांच्या मोबाईल वर टाकल्याबद्दल जर कुणी प्रश्न विचारत असेल तर त्यालाच गायब केले जायला हवे. आणि हे बॉम्बलणारे बरेच पत्रकार बाहेरील देशांच्या पे रोल वर आहेत हे फार पूर्वीपासून च तर सिद्ध होत आले आहे. तेव्हा त्या यडपट मंदबुद्धी राहुल ला फारसं महत्व द्यायचं कारण नाही.

कॉमी

:)

(हलके घ्या. ही सुप्रसिद्ध मिम देण्याचा मोह आवरला नाही.)

रावसाहेब चिंगभूतकर

Intelligent meme चालतात. बाकी काही गोष्टींची वाट बघून बघून कंटाळा आलाय.
- इतके खलिस्तानवादी युके युएस मध्ये रहातात. अमेरिकेचे अध्यक्ष जसे दर वर्षी सीआयए ने तयार केलेल्या हिटलिस्टवर दर वर्षी सही करतात, तशी यादी तयार करून याना परदेशातच विषप्रयोग इत्यादी करून संपवणे.
- बलुचिस्तान मध्ये अतिरेकी कारवाया सुरू करणे
- आजूबाजूच्या देशांना दमात घेणे
- POK ताब्यात घेण्याबद्दल हालचाली सुरू करणे
- अतिरेकी बोलणाऱ्या मुसलमान नेत्यांना चीन देते तशी 'दीक्षा' देणे
इत्यादी.
कुठलं पेगासस घेऊन बसलाय, अजून सुरवात आहे. अजून 'आत' पण जायचं आहेच की गांधी फॅमिली ला.

चायवाला काय !!

निनाद

काय बरोबर काम नाही केले...

करून करून काय केले तर फक्त;

  1. बेटी बचाओ, बेटी पढाओ
  2. जन धन, आधार आणि मोबाईल
  3. संसद आदर्श ग्राम योजना
  4. अंधारात असलेल्या गावांना वीज
  5. नमामि गंगे
  6. वस्तू आणि सेवा कर
  7. लष्कराला नवीन बंदुका आणि तोफा रणगाडे
  8. भारतात तयार झालेले सुरक्षा जॅकेट्स आणि त्याची निर्यात
  9. संरक्षण क्षेत्रात भारतीय रणगाडे आणि तोफा निर्मिती आणि त्याची निर्यात
  10. नौदलात नव नवीन पाणबुड्या - कुणालाही पत्ता लागू न देता उतरवत आहेत
  11. तेजस विमान सैन्यात दाखल निर्यातीची आणि तयारी
  12. स्वच्छ भारत अभियान
  13. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था बनली
  14. पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा देशाला मोठा लाभ
  15. प्रधान मंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रमाद्वारे सर्व शैक्षणिक कर्जे आणि शिष्यवृत्तींचे व्यवस्थापन आणि देखरेख करण्यासाठी पूर्णपणे IT आधारित आर्थिक सहाय्य प्राधिकरण.
  16. रेल्वे स्थानकांवर वाय-फाय, प्रवासी हेल्पलाइन (१३८), सुरक्षा हेल्पलाइन (१८२), पेपरलेस अनारक्षित तिकीट, ई-कॅटरिंग, मोबाइल सुरक्षा अ‍ॅप आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे
  17. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रति वर्ष ६००० रुपयांचा आर्थिक लाभ
  18. लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर, काही निकषांच्या अधीन राहून किमान निश्चित रु. ३००० पेन्शन दिली जाते . १८ ते ४० वर्षे वयोगटातील लहान आणि अल्पभूधारक शेतकरी या योजनेत सामील होण्यास पात्र आहेत.

इतकेच तर केले आणि अंधभक्त मात्र फार पुढे असतात बोलायला...
अजून काही केले असेल तर सांगा!!

sunil kachure

फक्तं नेपाल वर जरी दबाव टाकला तरी खूप झाले
हे सरकार आल्या पासून नेपाल पण भारताला दम देवू लागला आहे.
चीन तर कधी मनात येते तेव्हा भारताची सीमा ओलांडत असतो.
खूप दयनीय अवस्था करून ठेवली आहे.

कॉमी

स्वप्नातल्या कळ्यांनो...

निनाद

- बलुचिस्तान मध्ये अतिरेकी कारवाया सुरू करणे
तुम्हाला काही आतली माहिती वगैरे असते की काय?
--
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवर प्राणघातक हल्ले !
https://www.aljazeera.com/news/2022/2/2/attacks-on-army-posts-kill-4-gu…

सर टोबी

ठार मारण्याचे स्वातंत्र्य? जनावरांमध्ये नविन राजाने जुन्या राजाची सगळी वंशावळ मारून टाकावी तसं वाटतंय. म्हणजे तुमच्या आवडत्या माणसाबद्दल असा न्याय केला तर तुम्हाला वाईट वाटणार नाही. बरोबर ना?

रावसाहेब चिंगभूतकर

तुम्ही खऱ्या जगात जगता? बरेच देश उदाहरणार्थ अमेरिका, इस्त्रायल इथे अध्यक्षांना हा अधिकार असतो आणि सीआयए आणि मोसाद यांनी हे वापरून देशविरोधी लोकांच्या हत्या केलेल्या आहेत. भारताबद्दल माहीत नाही. माझे आवडते, तुमचे आवडते राहू द्या, ज्या स्तरावर हे अधिकार वापरले जातात तिथे निदान माझे आवडते कोणी नाही. तुमचा आहे एखादा नागरिक टेररिस्ट लिस्ट मध्ये?

sunil kachure

स्वतंत्र मिळायच्या अगोदर आणि नंतर पण देशावर प्रेम करणारे राज्य करतेच होवून गेलेत.
तुम्ही काही तरी आताच पाच सात वर्षात काही तरी वेगळे घडत आहे .
आणि त्याच्या अगोदर सरकार सर्व देशावर प्रेम करणारी नव्हती हा खुळचट विचार करत आहात.
भारताने शत्रू राष्ट्र शी युद्ध केली पण आहेत आणि जिंकली पण आहेत.
लोकांनी युद्धात सरकार ल पूर्ण पाठिंबा दिला पण आहे.
त्या मुळे देशप्रेम म्हणजे काय ह्याचे धडे देण्याची गरज नाही
त्या सरकार ना शत्रू कोण हे माहीत होते.
आताचे सरकार आणि पाठीराखे.

ह्यांना सर्व पंजाबी हे देशद्रोही आहेत(देशासाठी सर्वात जीवाचे बलिदान देणारे आहेत ते )
सर्व शेतकरी देश द्रोही.
सर्व मुस्लिम देशद्रोही.
ह्यांच्या विचार सरणी विरुद्ध जो बोलेल तो देश द्रोही अशी ह्यांची देशद्रोहा ची व्याख्या आहे.

आणि कोणत्याच त्यागात कधीच भाग न घेणारे हे फक्त देश प्रेमी.

Trump

बाकीचे लोक काय करतात?

ह्यांना सर्व पंजाबी हे देशद्रोही आहेत(देशासाठी सर्वात जीवाचे बलिदान देणारे आहेत ते )

sunil kachure

युद्ध प्रसंगी किंवा ,देश जेव्हा धोक्यात असतो तेव्हा दार ,खिडक्या लावून .देश प्रेम कशाला म्हणतात त्याच्या पोस्ट करत असतात.

Trump

ह्याचा काय प्रतिवाद करायचा? कोणत्या जगात राहाता तुम्ही?

युद्ध प्रसंगी किंवा ,देश जेव्हा धोक्यात असतो तेव्हा दार ,खिडक्या लावून .देश प्रेम कशाला म्हणतात त्याच्या पोस्ट करत असतात.

sunil kachure

देश प्रेमी कोण?
१) जो देशाच्या सर्व कायद्याचे पालन करतो.
२) जो चोरी न करता ,फसवणूक न करतां सर्व सरकारी कर भरतो.
३) ज्याचा आपण पगार घेतो ते काम जो प्रामाणिक पने करतो.
४) जो भेसळ करून देश देशातील जनतेच्या आरोग्य शी खेळत नाही.
५) जो लाच घेवून सरकार चे नुकसान करत नाही.
६) जो देशाच्या नैसर्गिक साधन संपती चा विनाश करत नाही
७) जो देशातील नद्या,नाले , विहारी रासायनिक द्रव सोडून प्रदूषित करत नाहीत.
८) जे देशाच्या सार्वजनिक संपत्ती चे नुकसान करत नाहीत.
रेल्वे,रस्ते,नद्या,जंगल ,मोकळ्या जागा.
९) जे भ्रष्ट नाहीत
१०) जे देशाची गुप्त माहिती पैसे मिळतात म्हणून शत्रू लं देत नाहीत
अशी लिस्ट १०० पर्यंत तरी जाईल.
ह्या चाळणी मधून गेले तर १३० करोड मध्ये ३० लाख पण देशप्रेमी निघणार नाहीत.
कशाला देश प्रेम ची कॅसेट वाजवतात काही लोक.

Trump

तुम्ही ह्या दिलेल्या आणि राहिलेल्या ९० सर्व अटींमध्ये स्वतः बसता का?

sunil kachure

पण हे मान्य करण्याची हिम्मत लागते.स्वतः ला सर्व गुणी समजून बाकी सर्व दुर्गुण दुसऱ्यात आहेत.
अशी समजणारी लोक महा चालू

sunil kachure

महारष्ट्र राज्य निर्माण झाले त्या साठी ज्यांनी जीवाची बाजी लावली त्यांची संख्या ही फक्त हजारात असेल.
भारत ब्रिटिश सत्ते पासून स्वतंत्र झाला.
त्या साठी सर्वस्व त्याग करणाऱ्या लोकांची संख्या पण काही लाखात च असेल.
करोडो लोकांची लोकसंख्या असून पण काही
लाख च लोकांनीच सर्वस्व अर्पण केलेले असते.
बाकी सर्व श्रेय घेण्यात फक्त आघाडीवर
असतात.

Trump

कचुरेसाहेब, तुमच्यासाठी.

सर टोबी

पेगासस स्पायवेअर आज तरी भारतात, भारतातील लोकांवर पाळत ठेवण्यासाठी वापरले गेले आहे असे दिसते. तुमच्या भारताच्या शत्रूंच्या यादीत जर विरोधी पक्षाचे लोक असतील तर बंदुकीच्या नळी समोर उद्या तुमचीही आवडती माणसं असतील असा तो प्रतिसाद होता. कधी कधी प्रतिसाद चुकीच्या ठिकाणी पडतो.

उत्तर सभ्य भाषेत अपेक्षित आहे.

निनाद

मोदी सरकारच्या काळात देशाचा परकीय चलनाचा साठा सुमारे ६३४ अब्ज डॉलर आहे तर परकीय कर्ज सुमारे ६०० अब्ज डॉलर्स आहे! भारताने गेल्या काही वर्षांमध्ये विक्रमी परकीय चलन जमा केले आहे. चालू आर्थिक वर्षात, भारताचा परकीय चलन साठा त्या वर्षभरात देशावर असलेल्या परकीय कर्जापेक्षा जास्त राहिला आहे.

sunil kachure

श्रीमंत सरकार आणि करोडो ची संख्या असलेले भुकेने व्याकूळ जनता जनार्दन .
छान नियोजन आहे

sunil kachure

माझ्या सामान्य पोस्ट लगेच हरकत घेवून माझ्या पोस्ट कशा धोकादायक आहेत अशी तक्रार wm ला करतात.
पण विष दिले पाहिजे, ठार केले पाहिजे असली मत व्यक्त करणाऱ्या पोस्ट वर जागृत मंडळी बिलकुल आक्षेप घेत नाहीत.

रावसाहेब चिंगभूतकर

188 साहेब, एखाद्याला न्यायालय फाशी देते तेव्हा ते त्या समाजाच्या आणि सरकारच्या स्टेट पॉलिसी ला फक्त implement करत असते आणि ही पॉलिसी ज्याला फाशी दिली जाते त्याला गुन्हेगारी किंवा अतिरेकी कृत्यांबद्दल संपवण्याचीच असते. भारतात फाशी दिली जाते. थोडक्यात सांगायचे तर अशा लोकांना संपवण्यासाठी बाकीचे सुजाण भारतीय agreeable असतात. तेव्हा विष देणे आणि ठार करणे इत्यादी गोष्टी या समाजाच्या कायदेशीर अंगाचा भाग आहेत. समाजाच्या कायदेशीर मार्गांचा सनदशीर रीतीने (त्या लिस्ट वर पंतप्रधान/अध्यक्षांची सही हवी) वापर या बद्दलची चर्चा सामाजिक स्तरावर गर्हाणीय कशी ठरते?

ता.क. सुजाण उत्तर अपेक्षित नाही. प्रयत्नही करू नये ही नम्र विनंती.

बलोच रिपब्लिकन आर्मीने पाकिस्तानच्या १०० सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला आहे. नक्की काय झाले आहे हे समजत नाही पण पाकिस्तान सरकारने त्या बातम्या प्रसिध्द करायला बंदी घातली आहे म्हणजे काहीतरी गंभीर घडले आहे हे नक्कीच. https://www.indiatoday.in/world/story/killed-more-100-soldiers-military…

या हल्ल्यासाठी बलोच रिपब्लिकन आर्मीला आपण मदत केली असेल तर त्याचा मला तरी अभिमान वाटेल.

Trump

+१. उघडपणे करायला इंदिरा गांधीच हव्यात..

वाटत नाही. त्या साठी ईंदिरा गांधीं सारखा “ताकदवान” पंतप्रधान असावं लागतो.

सुबोध खरे

ईंदिरा गांधीं सारखा “ताकदवान” पंतप्रधान असावं लागतो.

उघडपणे करायची गरजच काय?

उगाच "अपनी मां का दूध पिया है तो सामने आ" सारखी भंपक सवंग वाक्ये "सिनेमा साठी आणि गल्लीतील पक्यां" साठी ठीक आहेत.

मोसाद पासून अगदी आय एस आय पर्यंत एकतरी गुप्तचर संघटना हे आम्ही केलं म्हणून सांगत फिरतात का?

श्री मोरारजी देसाई या दीड शहाण्या पंतप्रधानांनी जनरल झिया कडे दर्पोक्ती केली होती कि काहूता मे आप का क्या चल राहा है ये हमे मालूम है.

त्या वाक्याचा संदर्भ घेऊन चाणाक्ष झियांनी आपले raw चे हेर शोधुन काढले आणि त्यांना हुतात्मा केले आणि गुप्तचर संघटनेने कित्येक वर्षे केलेल्या मेहनतीवर पाणी फिरवले गेले आणि या हलकट पंतप्रधानांचे काहीही बिघडले नाही.

उगाच कुठल्याही गोष्टीला ताकद आणि शक्ती म्हणणे मूर्ख पणाचे लक्षण आहे

पण ईंदिरा गांधी त्या ईंदीरा गांधी त्यानी खुलेआम ईतकं सगळऱ केलं तर गुप्तपणे काय काय केलं असेल?? ईंदिरा गांधी वाचाळवीर नव्हत्या तर प्रत्यक्ष करानार्या होत्या. देशाला असा पंतप्रधान त्या नंतर कधीच लाभला नाही.

प्रसाद_१९८२

१९७१ साली 'गरीबी हटाव' अशी घोषणा दिली होती त्यांनी म्हणे. हटली काय गरीबी?
त्यांचे वंशज आजही गरिबांच्या नावावर मते मागतात म्हणून विचारले !

प्रसाद_१९८२

देशाला असा पंतप्रधान त्या नंतर कधीच लाभला नाही.

सत्तेच्या हव्यासापायी देशावर 'आणिबाणी' लादणारा पंतप्रधान देशाला नाही लाभला, हे या देशाचे सुदैव म्हणावे.

आणीबाना म्हणजे अनुशासन पर्व होते असं साक्षात विनोबा भावेंनी म्हटलंय. दे शआला असाच डॅशींग पीएम हवा शिस्त लावनारा. नाहीतर आजकाल भर कोरोनात लाखओंचा सभा घेणारे पाहीले तर…. असो.

सुबोध खरे

असाच डॅशींग पीएम हवा शिस्त लावनारा.

आपले चरण कुठे आहेत.

तीर्थ घ्यावे म्हणतो मी

धनावडे

चक्क तुम्ही आणीबाणीला समर्थन देताय का?

वामन देशमुख

आणीबाना म्हणजे अनुशासन पर्व होते असं साक्षात विनोबा भावेंनी म्हटलंय.

अहो रूपम् अहो ध्वनी...

BTW, "साक्षात" म्हणजे नेमकं काय? आणि काँग्रेसी विचारधारेतील नेत्यांना "साक्षात" असं संबोधण्यातून काय साध्य होतं?

प्रसाद_१९८२

एकिकडे म्हणायचे मोदींनी देशात आणिबाणी लावलेय, दुसरीकडे साक्षात आणिबाणी लावणार्‍यांचे समर्थन करायचे.
एकुण अजबच कारभार आहे तुम्हा कॉंगी गुलामांचा !

त्यावेळी उत्तर भारतात संजय गांधींच्या आदेशावरून अगदी कोणाचीही सक्तीने नसबंदी केली गेली होती. त्यात थिएटरमधून चित्रपट बघून बाहेर येणारे लोक पकडून रॅन्डमली कोणालाही नसबंदी केंद्रात घेऊन गेले गेल्याच्या कित्येक घटना घडल्या होत्या. दिल्लीहून चंडिगडला बसने काही प्रोफेशनल्स एका परीषदेसाठी गेले होते. त्या सगळ्यांनाही असेच नसबंदीकेंद्रात नेले गेले होते. असे करताना माणसाचे वय, लग्न झाले आहे की नाही, मुलेबाळे आहेत की नाही वगैरे काहीही न बघता संजय गांधींच्या आदेशावरून टारगेट्स पूर्ण करायला हे सगळे प्रकार केले गेले होते. हे सगळे उल्लेख कित्येक पुस्तकांमध्ये आहेत. आणीबाणीदरम्यान चुका झाल्या होत्या याची कबुली स्वतः इंदिरा गांधींनी दिली होती. https://indianexpress.com/article/opinion/editorials/january-24-1978-fo… मध्यंतरी राहुल गांधींनीही आणीबाणी ही एक चूक होती असे म्हटले होते.

आणि कशाविषयीही घंटा काहीही माहित नसलेले आणि नुसते हवेतले गोळीबार करणारे इथले सदस्य मात्र आणीबाणी चांगली होती असे म्हणतात. आहे की नाही मज्जा? कधीकधी एक प्रश्न पडतो. समजा हे लोक त्यावेळी असते आणि लग्न व्हायच्या आधी त्यांची सक्तीची नसबंदी केली असती तरी त्यांनी त्याचे समर्थनच केले असते का?

ती तुकी टार्गेट पुर्ण करनार्यांची होती. त्यासाठी संजय गांधींना जबाबदार धरणे म्हणजे अति झालं.

ती चुकी टार्गेट पुर्ण करनार्यांची होती. त्यासाठी संजय गांधींना जबाबदार धरने म्हणजे अति झालं. आपण ज्या मारुतीत फिरतो ना ती संजय गांधींनीच स्थापलेली बरका!

कॉमी

टार्गेट पूर्ण करणारे स्वतःहून इतके जोरजबरदस्तीचे मार्ग का वापरतील म्हणे, त्यांना कुठं काय कमिशन मिळत होतं ?

अनूशासन पर्वा ला बदनाम करन्यासाठी भाजपेयी काहीही खोटंनाटं पसरवत असतात. दूर्दैवाने आयटी सेल चे ढकलपात्र खरं माननारे भाजपेयी खोटं खरं मानू लागतात.

कॉमी

काय खरं नाहीये वर लिहिलेल्यातलं ? अनुशासनपर्व हे नाव गोंडस असलं तरी स्वतःच्या पदाला सोडायचं नाही म्हणून लावलेली आणीबाणी होती ती. भारतीय लोकशाही संपली असती पण जुडीशीअरीने कणखर भूमिका घेऊन वाचवली. गेल्यावर्षी ट्रम्प तात्यांनी जो गोंधळ घालून अमेरिकन लोकशाही धोक्यात आणलेली त्या लाईनमधली घटना होती ती.

भाषेची पातळी घसरतेय चंसुकू. तुम्ही सांगाल तेच खरं मानायचं का? विनोबा भावे खोटे नी तुम्ही खरे का?