राजकारण

ताज्या घडामोडी - सप्टेंबर २०२२ (भाग १)

Primary tabs

रशियाचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली!

१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात गोर्बाचेव्ह रशियाचे अध्यक्ष झाले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्या काळात कळसाला पोहोचलेले अमेरिका व रशिया यांच्यातील शीतयुद्ध संपविण्यात गोर्बाचेव्ह यांनी पुढाकार घेतला.

अमेरिकेसोबत शस्त्रकपातीचा करार व पाश्चिमात्य देशांबरोबर संबंध वाढविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या ग्लासनोस्त व पेरेत्राईका म्हणजे रशियातील पोलादी पडदा हटवून खुलेपणा आणणे या धोरणांची जगभर प्रशंसा झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व युरोपमधील रशियात सामील करून घेतलेले १८ देश त्यांच्या काळात स्वतंत्र झाले. त्यांच्याच काळात १९४६ मध्ये दोन तुकडे करण्यात आलेल्या पूर्व व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले. हे होताना दोन्ही बाजूच्या नागरिकांनी सीमेवर बांधलेली अजस्त्र भिंत पाडून टाकली.

ते अध्यक्ष असताना रशियापासून स्वतंत्र होणाऱ्या बाल्टिक व पूर्व युरोपातील अनेक देशांमध्ये आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांनी रणगाडे व बंदुकीच्या जोरावर ती आंदोलने चिरडून टाकण्याऐवजी हे दैश स्वतंत्र करण्यास पुढाकार घेतला. रशियाने १९५६ मध्ये हंगेरी व १९६८ मध्ये तत्कालीन चेकोस्लोव्हाकिया या दोन देशात सैन्य पाठवून तेथे रशियाच्या तालावर नाचणारी साम्यवादी राजवट बसविली होती. रूमेनिया, बल्गेरिया, पोलंड या देशात हेच केले होते. तेथील नागरिकांचे आंदोलन रशियाने रणगाडे पाठवून चिरडून टाकले होते. परंतु १९८९ मध्ये गोर्बाचेव्ह यांनी कोणताही विरोध न करता या देशांना स्वतंत्र होण्यास पाठिंबा दिला. त्यामुळे या देशातील साम्यवादी राजवट तेथील नागरिकांनी उलथून टाकली. रशियात बळजबरीने सामील केलेले जॉर्जिया, अझरबैजान, युक्रेन, लाटव्हिया, इस्टोनिया इ. १८ देश सुद्धा याच काळात रशियातून बाहेर पडून स्वतंत्र झाले.

अर्थात रशियातील कट्टर साम्यवाद्यांना हे अजिबात मान्य नव्हते. विद्यमान अध्यक्ष पुटिन यांनी हे देश परत रशियात आणणार असे २०१८ मध्ये सांगितले होते. याचाच एक भाग म्हणून रशियाने २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केले आहे.

त्यांच्याविरूद्ध १९९१ मध्ये लष्करी उठाव करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्यांचे सहकारी बोरिस येलत्सिन यांच्या नेतृत्वाखाली तो शमविण्यात आला. हेच येलत्सिन नंतर रशियाचे अध्यक्ष झाले.

२० व्या शतकाच्या उत्तरार्धात जगाचा नकाशा बदलून टाकणारा एक महान नेता आज काळाच्या पडद्यामागे गेला.

कंजूस

यावर एकमत होत नाहीये. ते झाले तर पुढे विरोधी पक्षांची एकजूट वगैरे.

मदनबाण

सध्या देशात आणि जालावर ज्या मुलाखतीची विशेष चर्चा होत आहे, ती मुलाखत इथे देऊन जातो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving.” :- Albert Einstein

श्रीगुरुजी

झाल्या ख्रिस्तवासी. त्यांची आई १०० वर्षे, पतीदेव ९६ वर्षे व ह्या सुद्धा ९६ वर्षे जगल्या.

क्लिंटन

ख्रिस्तवासी असा शब्द वापरतात खरा पण तो तितकासा योग्य नाही असे वाटते. हिंदूंमध्ये कैलासवासी असे म्हणतात पण कैलास पर्वत हे ठिकाण आहे त्यामुळे आत्मा त्या ठिकाणी गेला या अर्थी कैलासवासी म्हटले तर समजू शकतो. पण ख्रिस्त ही व्यक्ती होती ठिकाण नव्हते. समजा काही म्हणायचेच असेल तर बेथलेहेमवासी* वगैरे म्हटले तर समजू शकतो पण ख्रिस्तवासी हा तसा निरर्थक शब्द वाटतो. आपल्याकडे कैलासवासीऐवजी कृष्णवासी किंवा रामवासी म्हटल्याप्रमाणे ते होईल.

*: बेथलेहेम हे शहर अजूनही आहे आणि तिथे लोक राहत असल्याने बेथलेहेमवासी हा शब्दप्रयोगही तसा चुकीचाच ठरेल पण निदान बेथलेहेम हे ठिकाणाचे नाव तरी आहे व्यक्तीचे नाही.

मदनबाण

ख्रिस्तवासी हा शब्द मी माझे आवडते अभिनेता दिलीप प्रभावळकर यांच्याकडुन घेतला आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is really simple, but men insist on making it complicated." :- Confucius

ख्रिस्तवासी असा शब्द वापरतात खरा पण तो तितकासा योग्य नाही असे वाटते

सहमत. तसेही मुस्लिम आणि ख्रिश्चन कयामत के दिन तक थडग्यात पापपुण्याचा निवाडा होईपर्यंत चिरनिद्रा घेतात. सगळ्यांच्या पापपुण्याचा हिशेब त्यांच्या धर्मातील जो कोणी अकाऊंटंट असेल तो एकदाच करतो त्यानंतर ते स्वर्गात किंवा नरकात जातात .
हिंदूंचा न्यायनिवाडा मृत्युनंतर चित्रगुप्त महाराज लगोलग करतात आणि जीव त्याच्या बँक बॅलन्स प्रमाणे स्वर्ग- नरकात स्टॉप घेऊन पुढील जॉब जॉईन करतात. काहिंनी आयुष्यात खुपच चांगले काम केले असेल तर ते ते मोक्ष मिळवितात अर्थात परमानंट रिटायर होतात.

डँबिस००७

"ख्रिस्तवासी" हा शब्द जसा योग्य नाही, तसाच RPI . हल्ली कोणीही मृत पावला की लोक RPI म्हणतात, हिंदु मध्ये पार्थिव देहाचे दहन करुन पंचप्राण अनंतात विलीन करण्याची परंपरा आहे. जाळल्याने ना शरीर मागे रहाते ना आत्मा त्यामुळे RPI अस म्हणण निरर्थक आहे.

तर्कवादी

RPI नव्हे RIP - Rest in peace
मी आत्मा वगैरे मानत नाही म्हणून काहीच म्हणत नाही. नातेवाईकांचे सांत्वन करणे शक्य असल्यास तितकेच करावे असे माझे मत.

श्रीगुरुजी

चीन हा साप अजिबात विश्वासार्ह नाही. कधी डसेल याचा नेम नाही.

अनन्त अवधुत

काय आहेत सैन्य माघारीच्या? त्याबाबत कोठेही बातमी नाही.

मुस्लिम मुलीशी विवाह करणारा हिंदू तरुण अचानक बेपत्ता, तरुणाचा घातपात झाल्याचा संशय; श्रीरामपूरमधील प्रकार.

https://marathi.abplive.com/crime/crime-marathi-news-hindu-youth-who-ma…

मुस्लिम तरूणीशी महिनाभरापूर्वी विवाह करणारा तरुण बेपत्ता झाला असून त्याचा घातपात केल्याचा संशय कुटुंबियांना आहे.

हिंदू मुलीचा पाठलाग, फुलं उधळली, मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना, म्हणाला “इस्लाम स्वीकार, लग्न कर, अन्यथा…”

https://www.loksatta.com/desh-videsh/muslim-man-arrested-for-threatenin…

मोनू मन्सूरी असं या २२ वर्षीय तरुणाचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “मोनू मन्सारीला अटक करण्यात आली आहे. फसवणुक करत धर्मांतर केल्यास आणि खासकरुन लग्नासाठी असल्यास मध्य प्रदेशात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे”.

------

महाराष्ट्र राज्यात देखील, असा कायदा हवाच ...

https://www.lokmat.com/sindhudurga/devendra-fadanvis-order-to-take-acti…

अतिशय उत्तम निर्णय .... जबरदस्तीने धर्म परिवर्तन होत असेल तर, कठोर कायदे आणण्याची गरज आहे आणि तातडीने अंमलबजावणी करण्याची पण गरज आहे ...

मदनबाण

Olympic Gold Medalist Neeraj Chopra won Gold Medal at #DiamondLeague at Zurich with a huge throw of 88.44m meters. He became first Indian to win gold medal at this prestigious event.@Neeraj_chopra1 Salute We are proud of you pic.twitter.com/tI2wpjxoWn— Major Surendra Poonia (@MajorPoonia) September 9, 2022

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is really simple, but men insist on making it complicated." :- Confucius

तर्कवादी

अमरावती : येथील रुक्मिणी नगर परिसरातून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा शोध लागल्यानंतर कथित ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. ही तरुणी रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आल्याने खासदार नवनीत राणा, भाजप आणि हिंदूत्ववादी संघटनांच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

वास्तव समोर आल्यावर ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाचा बागुलबुवा उभा करण्यात आला, शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी चर्चा आता सुरू झाली.

बातमी

नॉन लोकसत्ता स्त्रोत

डँबिस००७

अशी जनता, जगभर आढळतेच....

खरतर दगडफेक करणारी जनता सरकार कोणाच आहे त्यावरुन ठरवते की दगडफेक करायची कींवा नाही. योगीजीं, शिवराज, हिमंता
शर्मांच्या राज्यात घरावर बुलडोझर चालतो त्या मुळे अश्या ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडताना दिसत नाहीत.

हिंदुंच्या मिरवणुकीवर दगडफेक सहन करुन वर पोलिसांकडुन शांतीदुत समाजाला पाठीशी घालत, हिंदु समाजालाच जवाबदार
धरल जाणार्या राज्यात हिंदुंची अवस्था वाईटच रहाणार आहे. अश्या राज्यात हिंदु जनतेने भाजपा सरकार निवडून आणुन , भाजपा
पक्ष श्रेष्ठी करवी कडक मुख्यमंत्री देण्याची मागणी जनतेने केली पाहीजे.

लखनऊ में लव जिहाद? अथर्व बनकर फैजल ने हिंदू युवती से की शादी, ऐसे खुला राज

https://hindi.news18.com/news/uttar-pradesh/lucknow-love-jihad-case-in-…

पीड़िता की शिकायत पर पुलिस ने मुकदमा दर्ज करते हुए आरोपी फैसल अहमद को गिरफ्तार किया है. फैसल ने खुद को हिंदू धर्म का बताकर युवती से शादी की.

मदनबाण

Jharkhand: गढ़वा में पेट्रोल डालकर युवक को जिंदा जलाया, लड़ाई-झगड़े में बीच-बचाव कराने गया था पीड़ित
झुलसे युवक की पहचान दीपक सोनी के रूप में हुई है। कहा जा रहा है कि पीड़ित सोनी विवाद के दौरान बीच बचाव करने गया था। इसी बीच, आरोपी कसमुद्दीन अंसारी ने उस पर पेट्रोल डालकर आग लगा दी।

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong."LeBron James

मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong."LeBron James

इकरा बनली इशिका; प्रियकरासाठी मुस्लीम तरुणीनं स्वीकारला हिंदू धर्म, लग्नानंतर केली ही मागणी

https://lokmat.news18.com/national/muslim-girl-converting-into-hinduism…

आता धर्म बदलल्यानंतर मुलीचे कुटुंब आणि काही लोक त्यांना धमक्या देत आहेत.

निनाद

चार मुस्लिम तरुण दलित समाजाच्या मुलीला शिवीगाळ करण्याव्यतिरिक्त जातीय टिप्पणीही करत होते. इतकेच नाही तर ते मुलीकडे पाहून अश्लील हावभावही करत होते. त्या संध्याकाळी मुलीने वडिलांना याबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी किशोरवयीन मुलांना दटावले. त्या मुस्लिम मुलांनी त्यांना सायकलच्या साखळीने मारहाण करण्यास सुरुवात केली.
उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील अनेक हिंदू कुटुंबांना जिहादी घटकांच्या छळाच्या भीतीने घरे सोडावी लागली आहेत. या भागातील अनेक निवासस्थानांसमोर 'घर बिकाऊ है' (हे घर विक्रीसाठी आहे) पोस्टर्स लागली आहेत.

निनाद

एक जुनी नोंद.

उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये धर्मांतराचे प्रकरण - लग्नाच्या दोन वर्षानंतर महिलेला पतीचे वास्तव कळले. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पूजा सोनी ही २३ वर्षीय तरुणी छत्तीसगडची रहिवासी आहे. तिने अशोक राजपूत नावाच्या व्यक्तीशी दिल्लीत लग्न केले होते. हा अशोक प्रत्यक्षात अफजल होता. आणि त्याने तीची फसवणूक केली. अलिगढच्या रीत गावात त्याच्या घरी घेऊन गेला तेव्हा ते तिच्या लक्षात आले. तिथे त्याचे नाव अफजलखान असल्याचे कळले.
यावेळी तिला 'नमाज' अदा करण्यास भाग पाडले गेले. तिचे नावही बदलण्याचा प्रयत्न झाला.

श्रीगुरुजी

लग्न करताना मुलगा, मुलाचे घर, आजूबाजूची वस्ती, नातेवाईक, मुलगा काय कामधंदा करतो अशा गोष्टी मुलगी किंवा मुलीकडचे अजिबात न पाहता आंधळेपणाने लग्न लावून देतात का?

डँबिस००७

लग्न करताना मुलगा, मुलाचे घर, आजूबाजूची वस्ती, नातेवाईक, मुलगा काय कामधंदा करतो अशा गोष्टी मुलगी किंवा मुलीकडचे अजिबात न पाहता आंधळेपणाने लग्न लावून देतात का?

बरेच फॅक्टर असतात अश्या प्रकरणात, मुलीचे लग्न म्हणजे पालकाच्या पुढचा यक्ष प्रश्न, लग्नाचा खर्च, हुंडा, लोकांच मानपान अश्या अनेक भानगडी. लग्न झालेल्या मुलीला पुढे लग्नानंतर काही प्रश्न निर्माण झाले तर लग्नात मानपान मागणारे नातेवाईकच काय तर खुद्द आई वडील सुद्धा सरळ पाठ फिरवतात. त्यामुळे अश्या मुलींना कोणीही वाली असत नाही. ज्यांच्या लग्नासाठी घरात आई वडील नसतील तर त्यांची परिस्थिती काय असेल ही कल्पना सुद्दा करवत नाही. त्यामुळे घरात आई वडील नसलेल्या मुली अश्या प्रकरणात सहज टारगेट ठरत आहेत असे दिसुन आलेले आहे.
हिंदु समाजाने आपली मंदिरे संस्थाने सरकारच्या कंट्रोल मधुन सोडवुन त्या मंदिराच्या उत्पनांतुन अश्या सामाजीक उपक्रमांना अर्थ सहाय्य केले पाहीजे. हिंदु मंदिराच्या उत्पनांतुन सरकार मंदिराच्या पुजार्यांना नाही तर मस्जिदच्या मौलवींना पगार देते. त्या पेक्षा हे बरे !

बळजबरीने हैदराबादेत विवाह अन् धर्मांतर; अमरावतीमधील पीडितेचा आरोप

https://www.loksatta.com/maharashtra/forced-marriage-apostasy-hyderabad…

मेळघाटातील धारणी येथील २३ वर्षीय तरुणीला अकोट येथून शेख रईस या तरुणाने पळवून हैदराबाद येथे नेले व मौलानाच्या घरी नेऊन बळजबरीने विवाह केला. त्यानंतर पीडित तरुणीला बळजबरीने मुस्लीम धर्मपरिवर्तनसाठी प्रवृत्त केले. तसेच गोमांस खाण्यासाठी बळजबरी केली जात होती, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे.

mayu4u

मुस्लीम तरुण बंदुक घेऊन शाळेत घुसले आणि हिंदू मुलींना "आमच्याशी मैत्री करा, नाहीतर उचलून नेऊ" अशी धमकी दिली.

रांची येथील घटना.

वामन देशमुख

मुस्लीम तरुण बंदुक घेऊन शाळेत घुसले आणि हिंदू मुलींना "आमच्याशी मैत्री करा, नाहीतर उचलून नेऊ" अशी धमकी दिली.

रांची येथील घटना.

या देशावर सुमारे वीस वर्षे हिंदुत्ववादी मतांवर निवडून आलेल्या भाजपने राज्य केले आहे. आत्ताही मागच्या साडेआठ वर्षांपासून प्रचंड बहुमतातील भाजपचे सरकार आहे. अनेक राज्यांत भाजपची सरकारे आहेत. झारखंडातही दहाएक वर्षे भाजपने राज्य केले आहे.

---

"देशाच्या साधनसंपत्तीवर* पहिला हक्क मुसलमानांचा आहे" असे काँग्रेसचे पंप्र म्हणाले होते. भाजपचे पंप्र ते सिद्ध करत आहेत का?

---

* इस्लाम मतानुसार काफिर स्त्रिया ह्या मुसलमानांची साधनसंपत्ती आहेत.

निनाद

आत्ताही मागच्या साडेआठ वर्षांपासून प्रचंड बहुमतातील भाजपचे सरकार आहे.

सहमत आहे हो.
पण त्यांची हिंदूंसाठी धडकपणे काही करण्याची कामगिरी निराशाजनक आहे. काही प्रसिद्ध मुद्दे निकाली निघाले हे खरे असले तरी इतर धर्मियांची दंडेली अजूनही चाललीच आहे. भारतात सर्वत्र प्रचंड प्रमाणावर अब्राहमिक धर्मांतरे चालली आहेत आणि सरकार त्याविरुद्ध काहीही करत नाहीये हे पाहणे विद्विग्नता आणते. सरकार घरवापसीसाठी कायदा आणू शकते. कायद्याने धर्मांतर रोखू शकते. कायद्याने धर्मांतरास बंदी घालू शकते. पण प्रचंड बहुमतातील भाजपचे सरकार असून त्यांनी यातले काहीही केलेले नाही.
अर्थात मी चुकीचा असेन तर जरूर माझे मत दुरुस्त करावे!

वामन देशमुख

पण प्रचंड बहुमतातील भाजपचे सरकार असून त्यांनी यातले काहीही केलेले नाही.

अगदी बरोबर.

मागच्या काही काळापासून मिपावर मी हेच लिहीतोय.

केवळ सत्ता प्राप्त करून चालत नाही, आपली व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ती, धमक असावी लागते. सध्याच्या तथाकथित हिंदूहितवादी सरकारात ती धमक कधीही दिसली नाही.

कपिलमुनी

Foxconn वेदांता चा एक लाख सहासष्ट हजार कोटींचा प्रोजेक्ट महाराष्ट्रामधून गुजरातला नेल्याबद्दल फडणवीस आणि शिंदे यांचे अभिनंदन !

श्रीगुरुजी

जैतापूर आणि एन्रॉन विसरलात का? नाणार प्रकल्पाचा सामंजस्याचा करार, करारपत्र इ. स्वाक्षरी होऊनही ५+ वर्षांनंतर तो प्रकल्प कणभरही पुढे सरकला नाही कारण तत्कालीन सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे विरोधी पक्षांनी केलेला विरोध आणि त्यांच्यापुढे फडणवीसांनी तुकवलेली मान.

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात आलेलाच नव्हता. तो प्रकल्प बोलणी स्तरावरच होता आणि गुजरातने महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगण या तीन प्रतिस्पर्धी राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त सवलती दिल्याने ते competitive bidding गुजरातने जिंकले. महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातने पळविला असला मूढ आरोप करण्याऐवजी फॉक्सकॉनशी वाटाघाटी करण्यात महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगण या राज्यांना यश मिळाले नाही असे म्हणणे योग्य ठरेल.

आग्या१९९०

जनतेला मोफत दिलं तर " रेवडी " म्हणून हिनावयाचे आणि स्वतः उद्योगपतींना फुकट जमिनी वाटायच्या.

ह्यात एक गुजराती माणुस पंतप्रधानपदी असणेही महत्वाचे आहे त्यात गुजरातची निवडणूक अगदी जवळ आली असताना पंतप्रधानांना प्रचार करायला मुद्दा मिळाला. मोदींनी पडद्याआडून प्रकल्प गुजरातला घेऊन जाण्यासाठी मदत केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Trump

ह्यात एक गुजराती माणुस पंतप्रधानपदी असणेही महत्वाचे आहे त्यात गुजरातची निवडणूक अगदी जवळ आली असताना पंतप्रधानांना प्रचार करायला मुद्दा मिळाला. मोदींनी पडद्याआडून प्रकल्प गुजरातला घेऊन जाण्यासाठी मदत केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही

.
+१

प्रदीप

भाजपचे एक समर्थक (पण बहुधा त्यांच्या आयटी सेलचे सभासद नव्हेत) वेद कुमार ह्यांनी त्यांच्या फेबु वॉलवर ही पोस्ट ह्यासंदर्भांत केली आहे. त्यांतील टाईमलाईन मला पटली, केवळ म्हणून, दुसरी बाजू ( अर्थात, 'तुमच्या विधानांची निसरडी बाजू' - ह्याचे कॉपीराईट अन्य कुणाकडे आहे) येथे दिसावी, म्हणून ती शब्दशः येथे डकवत आहे. आता ह्यांतील, महाराष्ट्र सरकारच्या निर्णयप्रक्रियेतील दिरंगाई पदोपदी नेमकी कशामुळे होत होती, ह्याविषयीच्च्या त्यांच्या मतांविषयी माझे काहीही बरेवाईट मत नाही).

जयंत पाटील खोटं बोलत आहेत. मी फॅक्ट-चेक मांडत आहे. त्यातील एकही गोष्ट खोटी असेल तर कोणीही खोडून काढावी - ओपन चॅलेंज!

जयंत पाटील म्हणत आहेत की महाविकास आघाडीने वेदांत-फॉक्सकाँन गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर 'पाठपुरावा' केला होता पण 'गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला' आहे. हे सगळं खोटं आहे, आय रिपीट : खोटं!!! हे खोटं कसं आहे, हे समजून घ्यायला या प्रकल्पाची टाइमलाईन समजून घ्यावी लागणार आहे.

★ 25.12.2021 : वेदांत ने सेमीकंडक्टर उद्योगात $15 बिलियन गुंतवणूक करायचा निर्णय घेतला. महाविकास आघाडी चे उद्धव ठाकरे सरकार महाराष्ट्रात सत्तेत होते. हरियाणा, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा स्पर्धेत असूनही महाराष्ट्राला त्यांनी पसंती दिली होती कारण महाराष्ट्र हे एकमेव राज्य होते ज्यांच्याकडे अशा प्रकल्पांसाठी लागणारी 'महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स पॉलिसी 2016' अस्तित्वात होती, ज्यात आवश्यक जमीन व इंसेंटिव्ह संबंधी धोरण तयार होते. ही पॉलिसी देवेंद्र फडणवीस सरकारने आणली होती!! पण, तीन पक्षांनी एवढी मोठी गुंतवणूक येणार म्हटल्यावर ज्या आपापसात व कंपनीसोबत 'वाटाघाटी' केल्या, त्यानंतर डील फायनल होऊ शकली नाही..

लिंक - https://www.carandbike.com/.../vedanta-plans-to-invest-up...

★ तरीही, वेदांतने फेब्रुवारी-2022 मध्ये पुण्याजवळ जमिनीचा सर्व्हे व फिजीबीलीटी साठी आपल्या टीम ला पाठवले. डिसेंम्बर-2021 पासून फेब्रुवारी-2022 पर्यंत कंपनी आणि सरकार यांच्यात 'वाटाघाटी' काही केल्या संपत नव्हत्या. जयंत पाटील म्हणतात त्याप्रमाणे तिन्ही पक्ष आपला 'पाठपुरावा' करत राहिले आणि कंपनीला काही तो त्यांचा पाठपुरावा 'परवडेबल' वाटत नव्हता.

लिंक - https://www.thehindubusinessline.com/.../article65685653.ece

★ 14.02.2022 : अजून एक बातमी आली. प्रकल्पाची किंमत अजून वाढली कारण वेदांत आणि फॉक्सकॉन यांनी हातमिळवणी केली आणि अजून मोठा प्रोजेक्ट उभा करायची घोषणा केली. अजून मोठी रक्कम, अजून मोठा 'पाठपुरवठा' सुरू झाला..

लिंक - https://asia.nikkei.com/.../Foxconn-to-build-chip-plant...

★ 19.05.2022 रोजी वेदांत-फॉक्सकॉनच्या सेमीकंडक्टर चिपची फॅक्टरीच्या स्पर्धेतून कर्नाटक बाहेर पडले. फॅक्ट ही आहे की या कंपनीला लागणारी जमीन व इतर इंसेंटीव्ह देण्यास त्यांनी नकार दिला. महाराष्ट्रात कंपनीला सगळं द्यायला तयार होते, पण मविआ चा 'पाठपुरावा' परवडत नव्हता..

लिंक - https://www.deccanherald.com/.../vedanta-foxconns...

★ 28.06.2022 पर्यंत रेसमध्ये तेलंगणा व तामिळनाडूही होते! तारीख नीट बघा. त्यानंतर दोन दिवसांनी महाराष्ट्रात सरकार पडले. अर्थात, 30.06.2022 रोजी मविआ सरकार पडले, तोपर्यंत हा प्रकल्प महाराष्ट्रात आलाच नव्हता! त्यात, इकडे सरकार पडले आणि तिकडे तेलंगणा व तामिळनाडूही लगेच स्पर्धेतून बाहेर पडले. हा प्रकल्प मविआ च्या शेवटच्या दिवसापर्यंत महाराष्ट्रात आलाच नाही, कोणताही करार झाला नाही त्याला एकच कारण होते : कंपनीला 'उद्योग' लावायचा होता, सत्ताधाऱ्यांचा वेगळाच 'धंदा' सुरू होता, ज्याला जयंतराव आज 'पाठपुरावा' असं म्हणत आहेत!!

https://www.businesstoday.in/.../exclusive-maharashtra...

★ 26.07.2022 : पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावर व सात महिने 'पाठपुरावा' करताना उपलब्ध असलेल्या सर्व संधी गमावल्यानंतर शिंदे-फडणवीस यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून हा प्रकल्प महाराष्ट्रात आणायचा प्रयत्न केला. सरकार बनताच प्रायोरिटीवर बैठका घेऊन तोडगा काढण्यात आला. कंपनीकडेही आता फक्त दोनच ऑप्शन बाकी राहिले होते, बाकी तीन राज्ये - कर्नाटक, तामिळनाडू व तेलंगणा रेसमधून बाहेर झाले होते. जवळजवळ 90% MoU वर सह्या झाल्या व पुन्हा महाराष्ट्रात हा प्रकल्प आणण्याची तयारी करण्यात आली. तशी घोषणा सरकार-कंपनी दोन्हीकडून झाली. प्रत्येककडे मीडियात महाराष्ट्राला प्रकल्प मिळाला अशी हेडलाईन लावण्यात आली, पण आतील मजकूर वेगळाच होता - की कंपनी अनुकूल आहे व चर्चा अजून सुरू आहे.. (याला म्हणतात मीडिया हिट-जॉब!)
(The company is in active discussion with the Maharashtra government for their proposed manufacturing facility for semiconductors and display fabs.) याच बातमीची हेडलाईन वेगळं सांगते..

https://www.livemint.com/.../vedanta-group-foxconn-to...

★ शेवटी, गुजरातने भांडवली गुंतवणुकीवर आर्थिक आणि इतर सबसिडी, अहमदाबादच्या जवळ 99 वर्षांसाठी 1000 एकर मोफत जमीन (405 हेकटर), 20 वर्षांसाठी स्वस्त पाणी, स्वस्त वीज व कर-सवलत देऊन केवळ 3-4 बैठकांमध्ये विषय संपवला. आठवड्याभरात करार होणार आहेत.
गेल्या अडीच वर्षातील राज्यातील पॉलिसी-पॅरलिसीस व मविआने 7 महिने केलेला 'पाठपुरावा' यामुळे कंटाळलेले गुंतवणूकदार महाराष्ट्राला पाठ दाखवून गेले. त्यात, हे गुजरातने केलेली ऑफर (पॅकेज) महाराष्ट्राला परवडणार नाही अशी वाईट अवस्था मविआने करून आर्थिक दिवाळखोरी आणली हेही इथे लक्षात घेतले पाहिजे. बरं हे एक उदाहरण नाही, ओलाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या तोंडचा घास तामिळनाडूने तर टेस्ला च्या बाबतीत महाराष्ट्राच्या युवकांचा रोजगार कर्नाटकाने नेला अशी डजनभर उदाहरणे आहेत! MIDC मधील किती उद्योग या अडीच वर्षात बंद झाले हा संशोधनाचा विषय आहे. 'मविआ काळात राज्याने गमावलेले उद्योग' यावर एक वेगळी सविस्तर पोस्ट मी येत्या काळात करत आहे. जयंतरावांना त्यांच्या अडीच वर्षांत लावलेल्या दिव्यांचे रिपोर्ट-कार्डच देतो..
गुजरातच्या नावाने खडे फोडण्याऐवजी महाविकास आघाडी ने आज महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे! तीही, बिनशर्त आणि जाहीरपणे..

- वेद कुमार.

शेवटी, एखद्या देशांत / स्थानिक प्रांतांत, उद्योजकांना, सरकारकडून व नोकरशाहीकडून तांतडीने निर्णय हवे असतात, व ते साहजिक आहे. भारतांत बाहेरून उद्योगधंदे स्थापन करावयास उद्योजक येतात, ह्याचेच मला अजून आश्चर्य वाटत आले आहे. असो.

ह्यात सर्व दोष मविआला द्यायचा आणि भाजपला मात्र निर्दोष हे काही योग्य नाही. जैतापूर प्रकल्प भाजपच्या काळातलाच होता. आंतराष्ट्रीय वित्त केंद्र हे पण भाजपच्या कळताच गुजरातला हलविले गेले.

मुस्लीम मुलीशी लग्नानंतर महिनाभराने अपहरण झालेल्या भोकरमधील तरुणाचा खून, आरोपींची कबुली.

https://marathi.abplive.com/news/ahmednagar/ahmednagar-crime-news-murde…

पोलिासांनी या प्रकरणी सात जणांना अटक केली. आता या आरोपींनी दीपक बर्डेचा खून केल्याची कबुली दिली आहे

“…तरच मुस्लिमांनी गरबा कार्यक्रमाला यावं” लव्ह जिहादचा उल्लेख करत भाजपा नेत्याचं खळबळजनक विधान

https://www.loksatta.com/desh-videsh/bjp-mp-usha-thakur-statement-ident…

सध्या देशात लव्ह जिहादचं षडयंत्र सुरू आहे. गरबा हे लव्ह जिहादचे केंद्र बनत आहेत. केवळ मनोरंजनासाठी गरबा कार्यक्रमात प्रवेश दिला जाणार नाही. ज्या मुस्लिमांना मूर्तीपूजक व्हायचे आहे, त्यांनी आपल्या कुटुंबासह गरबा कार्यक्रमाला यावं, असं उषा ठाकूर म्हणाल्या.

शाम भागवत

पालघरच्या पोलिसांपेक्षा सांगली जिल्ह्यातले पोलीस धाडसी दिसताहेत. किंवा पोलीसांचे मनोबल उंचावलेले दिसतंय. जमावाला घाबरून, त्या साधूंना जमावाच्या ताब्यात न देता त्यांना चक्क मारहाण करणा-यांपासून वाचवलंय.
पोलीसांचे अभिनंदन.
बस्स. इथेच थांबतो.