ताज्या घडामोडी - सप्टेंबर २०२२ (भाग १)
Primary tabs
रशियाचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली!
१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात गोर्बाचेव्ह रशियाचे अध्यक्ष झाले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्या काळात कळसाला पोहोचलेले अमेरिका व रशिया यांच्यातील शीतयुद्ध संपविण्यात गोर्बाचेव्ह यांनी पुढाकार घेतला.
अमेरिकेसोबत शस्त्रकपातीचा करार व पाश्चिमात्य देशांबरोबर संबंध वाढविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या ग्लासनोस्त व पेरेत्राईका म्हणजे रशियातील पोलादी पडदा हटवून खुलेपणा आणणे या धोरणांची जगभर प्रशंसा झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व युरोपमधील रशियात सामील करून घेतलेले १८ देश त्यांच्या काळात स्वतंत्र झाले. त्यांच्याच काळात १९४६ मध्ये दोन तुकडे करण्यात आलेल्या पूर्व व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले. हे होताना दोन्ही बाजूच्या नागरिकांनी सीमेवर बांधलेली अजस्त्र भिंत पाडून टाकली.
ते अध्यक्ष असताना रशियापासून स्वतंत्र होणाऱ्या बाल्टिक व पूर्व युरोपातील अनेक देशांमध्ये आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांनी रणगाडे व बंदुकीच्या जोरावर ती आंदोलने चिरडून टाकण्याऐवजी हे दैश स्वतंत्र करण्यास पुढाकार घेतला. रशियाने १९५६ मध्ये हंगेरी व १९६८ मध्ये तत्कालीन चेकोस्लोव्हाकिया या दोन देशात सैन्य पाठवून तेथे रशियाच्या तालावर नाचणारी साम्यवादी राजवट बसविली होती. रूमेनिया, बल्गेरिया, पोलंड या देशात हेच केले होते. तेथील नागरिकांचे आंदोलन रशियाने रणगाडे पाठवून चिरडून टाकले होते. परंतु १९८९ मध्ये गोर्बाचेव्ह यांनी कोणताही विरोध न करता या देशांना स्वतंत्र होण्यास पाठिंबा दिला. त्यामुळे या देशातील साम्यवादी राजवट तेथील नागरिकांनी उलथून टाकली. रशियात बळजबरीने सामील केलेले जॉर्जिया, अझरबैजान, युक्रेन, लाटव्हिया, इस्टोनिया इ. १८ देश सुद्धा याच काळात रशियातून बाहेर पडून स्वतंत्र झाले.
अर्थात रशियातील कट्टर साम्यवाद्यांना हे अजिबात मान्य नव्हते. विद्यमान अध्यक्ष पुटिन यांनी हे देश परत रशियात आणणार असे २०१८ मध्ये सांगितले होते. याचाच एक भाग म्हणून रशियाने २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केले आहे.
त्यांच्याविरूद्ध १९९१ मध्ये लष्करी उठाव करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्यांचे सहकारी बोरिस येलत्सिन यांच्या नेतृत्वाखाली तो शमविण्यात आला. हेच येलत्सिन नंतर रशियाचे अध्यक्ष झाले.
२० व्या शतकाच्या उत्तरार्धात जगाचा नकाशा बदलून टाकणारा एक महान नेता आज काळाच्या पडद्यामागे गेला.
इथे पोलिस नव्हते हो, व्हिडिओ तरी बघायचा..
जमावाने मरेपर्यंत मारहाण केलि नाही.
अशा प्रकारच्या घटना अफवेतून , भीतीतून घडत असतात. भाजप्ये लोक याला हिंदूविरोधी कट वगैरे नाव देउन वातावरण खराब करतात.
प्रत्यक्षात जमान हिंसक झाल्याने घडलेल्या दुर्दैवी घटना आहेत ( ज्या घडायला नकोत पण त्यांचे राजकीय भांडवल करणे चुकीचे आहे.)
माजी नौदल अधिकार्याला मारहाण झाली म्हणून प्रत्येक धाग्यावर रडणारे आयडी राणेंनी केलेल्या अधिकार्या बद्दल गूपचूप बसतात
तेव्हा हे सगळे पोलिटिकल अजेंडा राबवायला चालले आहे हे लक्षात येते
गुजरातमध्ये केजरीवाल भाजपला घाम फोडत आहे. जय शहाला इंग्रजी बोलताना घाम फुटत आहे ( समोर टेलेप्रॉमप्टर असताना बरं का ).
इंग्लिश बोलणे हा अनिवार्य पात्रता निकष आहे का?
न्यूनगंड हीच पात्रता असलेल्यांनी स्वतःहून लादून घेतलेले दिसत आहे.
न्यूनगंड ज्यांच्यात आहे तेच असले फालतू मुद्दे काढत असतात. लालू, मुलायम, भुजबळ अश्या पुरोगाम्यांच्या लाडक्या नेत्यांना अजिबात इंग्लिश येत नव्हते. त्यांच्या बाबतीत हा मुद्दा कधी आला नव्हता. शहांविरूद्ध बोलण्यास मुद्देच नसल्याने असले निरर्थक मुद्दे आणले जातात.
धड इंग्रजी बोलता येत नाही आणि कहर म्हणजे वाचता येत नाही मग जी भाषा येते त्यात बोलायला लाज वाटते का? न्यूनगंड कुरवाळत बसवून हसे करून घ्यायची आवड असेल तर आवडते अशा लोकांच्या इच्छा पूर्ण करायला. काही प्रोब्लेम?
महाराष्ट्रात नाही का धड हिंदी बोलता येत नसताना अनेक जण हिंदी बोलण्यासाठी कासावीस असतात आणि आपलं हसू करून घेतात? बडे बडे शहरोमे ऐसे छोटे छोटे हादसे . . . आठवतंय का?
मुळात इंग्लिश येतंय का नाही हा मुद्दाच नाही. परंतु शहांविरूद्ध बोलायला मुद्देच नसल्याने असल्या फालतू गोष्टी पुढे आणल्या जातात. शहांविरूद्ध आपल्याकडे काहीही नाही या न्यूनगंडातून असं होत असतं.
.. हे बकि खर..
.. शाह यान्च्या विरुद्ध कहिहि बोलयला नसल्यामुळे हे असल सुचत.. आपल्या ईथले घराणेवादी त्यान्ना कोर्टाने सोडून देखील 'तडीपार' म्हणतात
मी व्हिडीओ नाही बघितला. तसलं काही बघवत नाही. मग मार खाणारे कुणीपण असोत.
त्यामुळे मी फक्त बातमी वाचली.
त्यात लिहिलं होतं की,
"अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करुन साधूंची सर्व माहिती तपासून त्यांची सुटका (Rescued) केली."
हुश्श केलं नी प्रतिसाद दिला व लागलीच थांबलो.
असंच वाटत आहे...
In Tamil Nadu, Waqf board claims ownership of an entire village. There’s a temple too
https://www.hindustantimes.com/india-news/in-tamil-nadu-waqf-board-clai…?
Wakf board is arguably the richest such entity in India... and it's wealth has increased a lot in the last over eight years.
काय बोलावं ते सुचेना....
दलित बहिणींची बलात्कार करून हत्या ; उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीतील घटना; सहा आरोपींना अटक
https://www.loksatta.com/desh-videsh/dalit-sisters-raped-and-murder-in-…
याप्रकरणी पोलिसांनी छोटू, जुनेद, सोहेल, हफिजुल रहेमान, करीमुद्दीन आणि आरीफ या सहा जणांना अटक केली.
------
अत्यंत कार्यक्षम व स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याचे अभिनंदन! सहकाऱ्याला संकटमुक्त केले.
‘पिकाला हमी भाव नाही, देणेकरी मागे लागले आहेत, तुमच्या नाकर्तेपणामुळे मी आत्महत्या करत आहे,’ असे शुभेच्छापत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला लिहून जुन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली
दशरथ लक्ष्मण केदारी (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
(बातमी : दुवा १ , दुवा २ )
भारतात लंपी रोगाने केवळ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.
असल्या क्षुद्र देशी जनावराकडे लक्ष देण्याची मागणी नतद्रष्ट लोक करत आहेत.
इतक्या वर्षांनी चित्ता परत आणला, त्याचे कोड कौतुक केले, चार पैसे खर्च केले तर यांच्या पोटात दुखते..
६०,००० -७०,००० हजार हा आकडा किरकोळ आहे.
चित्तागीरीचा विजय असो.
इथे लंपी वाढत आहे आणि राहुल गांधीं मात्र पक्ष वाढवण्या करता भारत जोडो यात्रेत मशगुल आहेत.
गरीब शेतकर्यांचा वाली कोणी नाही हेच खरे.
यात्रेकरुंचे स्वागत असो
पैजारबुवा,
राहुल गांधीकडे एवढी सरकारी यंत्रणा आहे , जनतेने दिलेला टॅक्सरुपी पैसा आहे.. आरोग्य खाते आहे . ज्या राज्यातील बहुतांश मृत्यू आहेत तेथील सरकारे राहुल गांधीच्या अंडर आहेत...
एवढे असून रा गां निव्वळ शो बाजी करण्यात धन्यता मानत आहेत.. एकही शब्द काढत नाहीत.
अर्थात ६०-७०,००० हजार आकडा तसा किरकोळ आहे ना
अगदी योग्य बोललात,
राहुल गांधी संसदेतल्या सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते आहेत, सरकार जर कुठे चुकत असेल तर त्यांचे कान पकडणे हे त्यांचे काम आहे आणि तरी सुध्दा ते लंपी सारख्या राष्ट्रीय महत्वाच्या विषया कडे डोळेझाक करुन शो बाजी करण्यात गुंतले आहेत.
आणि हे ही काय कमी होते म्हणून कॉन्ग्रेसचे माजी पर्यावरण मंत्री प्रोजेक्ट चित्ता कॉग्रेसचेच श्रेय आहे असा दावा करत आहेत.
कदाचित त्यांना ६० ते ७० हजार हा आकडा छोटा वाटत असल्याने असे होत असावे.
पैजारबुवा,
कॉन्ग्रेसचे माजी पर्यावरण मंत्री प्रोजेक्ट चित्ता कॉग्रेसचेच श्रेय आहे असा दावा करत आहेत.
दावा खोटा नाही.. सुरुवात तेव्हा झाली होति ,, आता पूर्ण झाला..
आपाल्या शेठ ला आयत्या पीठावर बसून फोटो काढायची सवय आहेच.
चित्ते हा देशाचा विषय होऊ शकतो ? सालं दोन दिवसापासुन गोदी मिडियाने जो हाहाकार माजवला आहे,
त्याने एक भारतीय म्हणून मान शरमेने खाली जातेय. सालं देशाचे प्रश्न कोणते आणि हे काय करीत आहे.
आता यांच्याबद्दल काही बोलावं वाटत नाही, आणि लिहावे वाटत नाही. इतका निर्लज्जपणा या देशात चालु आहे.
-दिलीप बिरुटे
काहीही,कोणीही हाहाःकार माजविलेला नाही. १७ सप्टेंबरला इतर बातम्यांबरोबर चित्त्यांची बातमी दाखवित होते इतकंच. १८ तारखेपासून ती बातमी सुद्धा बहुतांशी गायब झाली. चित्त्यांना नावे दिली ही बातमी तर मी अजूनपर्यंत कोठेही वाचली नाही. मराठी माध्यमात तर शिल्लकसेना, शिंदे, दसऱ्याची सभा हेच विषय सातत्याने चघळले जात आहेत..
माध्यमे बातमीला तेवढ्यापुरते स्थान देऊन नंतर इतर बातम्यांकडे वळली, परंतु मोदीद्वेष्ट्यांच्या मनात ती बातमी खोलवर रूजल्याने मोदीद्वेषाची मळमळ बाहेर येत आहे. मोदीद्वेष्ट्यांच्या निर्लज्जपणामुळे खऱ्या भारतीयांची मान शरमेने खाली जात आहे.
10000000000% सत्य !!
>>>मोदीद्वेष्ट्यांच्या निर्लज्जपणामुळे खऱ्या भारतीयांची मान शरमेने खाली जात आहे.
खरंय, एकीकडे हे मंदभक्त आणि दुसरीकडे ते मोदीद्वेष्टे यांच्यामुळे भारतीयांची मान शरमेने खाली जात आहे,
याच्याबद्दल काही वाद नाही. सहमती आहेच.
-दिलीप बिरुटे
(खरा भारतीय)
हेच सांगत होतो मी. लगेच प्रत्यंतर आलं.
आता तुमची मान खालीच राहणार.
संजय राऊतच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ. ३ ऑक्टोबरपर्यंत तुरूंगात मुक्काम.
नबाब मलिक समीर वानखेडेंची नोकरी घालवून त्यांना तुरूंगात धाडणार होत, पण त्यांचेच मंत्रीपद गेले आणि जवळपास ७ महिने स्वतः तुरूंगात पडलेत. संजय राऊत भाजपतील साडेतीन नेते (म्हणजे किरीट सोमय्या व त्यांचा मुलगा नील सोमय्या आणि अजून कोणीतरी दोन नेते) तुरूंगात पाठविणार होते. पण स्वतःच ३१ जुलैपासून तुरूंगात पडलेत. फडणवीस अजित पवारांना तुरूंगात पाठवून चक्की पिसायला लावणार होते. पण स्वत:च त्यांच्या मांडीला मांडी लावून युती केली आणि क्लीन चिटही दिली.
कालाय तस्मै नम: ।
सर्व भारतीयांना आज आनंदी आनंद झाला आहे कारण चित्यांचे बारसे झाले आहे.
त्यातील ‘आशा’ हे मादी चित्त्याचे नाव पंतप्रधान मोदी यांनी ठेवले आहे. ओबान, फ्रेडी, सावन्नाह, आशा, सिबली, सैसा आणि साशा असे नामकरण करण्यात आले आहे.
लाडू खाऊन तोंड गोड करा
सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशीच मोदीद्वेष्ट्यांची केविलवाणी अवस्था झाली असल्याचे दृग्गोचर होत आहे.
७० वर्षे कॉंग्रेस द्वेष्ट्यांनी सोसले आता ७-८ वर्षेच भाजप द्वेष्टांना त्रास आहे..
मग ७० वर्षाचे मूळ्व्याध किती किती मोठे असेल ना ??
तेव्हाही भाजपद्वेष्टेच सोसत होते आणि आताही! म्हणून तर त्यांना सांगता येत नाही आणि सहनही होत नाही.
शेठ विनोदच इतके केविलवाणे करताहेत की ते सांगितले तर अंधभक्त हसण्याऐवजी टाळ्या पीटतात आणि देशभक्तांना सहन होत नाहीत. आता त्यात दृग्गोचर काय होते ते बघा ब्वा.
पूर्वी जाहीर सभेत किंवा संसदेत केविलवाणे विनोद करणारे शेठ आता केरळपासून चालत चालत दिल्लीपर्यंत विनोदांचा कार्यक्रम करताहेत. त्यातून जनतेचं निखळ मनोरंजन होणार हेच दृग्गोचर होतंय ब्वा. पण मल्याळींना १८ दिवस करमणूक आणि महाराष्ट्राला फक्त २ दिवस, हा मराठी माणसांचा अपमान आहे ब्वा.
महाराष्ट्र के पास फडणवीस है !

चित्त्यांसाठी नावे सुचविण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
या बातमीत लिहिलंय की चित्त्यांना नावे सुचवा असं पंतप्रधान मोदींनी आवाहन केलंय. मग ही नावे कोठून आली? का नेहमीसारखी मोदींच्या नावाने पुडी सोडली?
The translocated cheetahs are currently named - Elton, Freddie, Oban, Siyaya, Aasha, Tbilisi, Sasha and Savannah. Aasha was a name given by Modi himself..
नुसते तरुण भारत वाचून नसेल कळले तर टाइम्स वाचा. नाव सुचवायचे आवाहन आहेच पण एक नामकरण आधी झाले आहे मोदी काका कडून आणि उरलेले रीनेम करायचे आहेत.
https://timesofindia.indiatimes.com/india/mann-ki-baat-pm-modi-seeks-su…
नामकरण आधीच झाले असेल तर आता काय नामांतर करणार का नामविस्तार करणार? तरूण भारत सोडा, काल मन की बात मध्ये मोदींनी आवाहन केलंय ती बातमी सकाळसहीत अनेक वृत्तपत्रात आलीये.
एखाद्या चीत्याचे नाव काला धन ठेवायचे ना..म्हणजे सांगता आले असते, विदेश से काला धन लाया है !
ते भारतात ५०+ वर्षांपूर्वीच आलंय.
हा हा हा !
झुलता पंजाब
पंजाबचे आपचे मुख्यमंत्री भगवंत मान झुलत झुलत विमानात बसायला आल्यामुळे लुफ्तान्सा या जर्मन हवाई वाहतूक कंपनीने त्यांना विमानातून खाली उतरवले.
Punjab CM Bhagwant Mann deplaned from Lufthansa plane for being ‘drunk’, delays flight by 4 hours: Report
https://zeenews.india.com/aviation/punjab-cm-bhagwant-mann-deplaned-fro…
श्री भगवंत मान हे निवडणुकीच्या अगोदर सुद्धा सभांमध्ये झुलत झुलत आल्याचे लोकांनी पाहिलेले आहेच.
एकंदर दारू आणि आपचे जवळचे नाते आहेच
https://indianexpress.com/article/cities/delhi/ed-summons-aap-durgesh-p…
ताज्या बातमीनुसार, आम आदमीच्या पक्षाचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना जरा जास्तच चढलेली असल्याने प्रवासासाठी अयोग्य अश्या कारणास्तव लुफ्तांसाच्या विमानातुन उतरवुन विमानाला पुढे जाऊ दिलेल आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांना व त्यांच्या सामानाला विमानातुन उतरवण्यासाठी विमानाचा ४ तासाचा खोळंबा झाला.
जर्मनीतील एका विमानतळावर अशी घटना घडलेली आहे. आम आदमी पार्टीने देशात घुडगुस घातलेला आहेच आता परदेशातही सुरु केलेला आहे.
The CM was not steady on his feet as he had imbibed excessive alcohol and had to be supported by his wife/security
बाकी चालू द्या.
जाऊ द्या
योगायोगाने ते सुद्धा जर्मनीत फ्रॅंकफुर्टलाच गेले होते आणि विमानात Chivas Regal चा आख्खा खंंबा रिचवला होता व त्यामुळे विमानात सहप्रवासी व हवाईसुंदरींबरोबर अयोग्य वर्तन केले होते. तेव्हा सुद्धा त्यांचे समर्थक होते जसे आता भगवंत मानचे आहेत. तेव्हा तर त्यांचे जावई जांबुवंतराव धोटे शश्वुरांच्या स्वागताला विमानतळावर वाद्यवृंद घेऊन गेले होते.
परंतु लुफ्तांसाने तेव्हापासून नियम केला असावा की प्यायलेल्या व्यक्तीला विमानात ठेवायचे नाही. म्हणून तर यावेळी . . . !
.
अधिकृत गोष्टींवर विश्वास न ठेवता सांगोवांगीच्या गोष्टीं लिहित राहणे हा तुमचा जुना प्रॉब्लेम आहे..