राजकारण

ताज्या घडामोडी - ऑक्टोबर २०२२

Primary tabs

ऑक्टोबर २०२२ च्य ताज्या घडामोडींची चर्चा करण्यासाठी हा धागा.

दुर्योधन. ( आपल्या मनात येत असलेलं एक नाव घेईल असे वाटले की काय ) युद्धापूर्वी अर्जून आणि दुर्योधन श्रीकृष्णाकडे आले होते. श्रीकृष्णाने मी पाहिजे की माझे सैन्य, असा प्रश्न दुर्योधनाला विचारला. दुर्योधनाने सैन्य मागितले. ऐहिक सुखाचा विचार करुन त्याने सैन्य मागितले. कदाचित कृष्ण मागितला असता तर, महाभारत वेगळे ठरले असते. पण, हेकट दुर्योधनाला चांगला विचार सुचणे शक्यच नव्हते. गांधारीने दुर्योधनाला शिशु अवस्थेत पाहण्याचा मनोदय व्यक्त केला. दुर्योधनाने लज्जा रक्षणासाठी पाला-पाचोळा गुंडाळुन आला. खरं तर, संपूर्ण शरिराचं रक्षण गांधारीच्या दिव्यदृष्टीने होणार होते. आपल्या जन्मदात्या आईसमोर कोणताही आडपडदा न ठेवता यायला पाहिजे होते, पण तसा तो येत नाही. अतिशहाणपणा केला. आणि अजून एक युद्धात सर्वात शेवटी दुर्योधन मैदानावर आला. सर्व सेनापती सैन्य धारातीर्थ पडत असतांना मागावून येणे यात शुरत्व नव्हते. शुर माणसाने सदैव पुढे राहीले पाहिजे. दुर्योधनाने भर सभेत मांडीवर बसवण्याबाबत द्रौपदीला खजील केलं होतं, त्याच मांडीवर भिमाने वार केला आणि दुर्योधनाला आपली इहलोकाची यात्रा संपवावी लागली. दुर्योधनासारख्या शुर व्यक्तीचाही. हेकटपणा, अतिशहानपणा, हट्टी, आग्रही, या अवगुणामुळे नाश होतो. हा या उदाहरणाचा सारांश. (समज रहे हो ना सर आप) ( ता.क. महाभारत काळातील युद्धभूमीच्या कथापात्राच्या गोष्टी सांगोवांगी आहेत.)

-दिलीप बिरुटे

प्रचेतस

अजून एक युद्धात सर्वात शेवटी दुर्योधन मैदानावर आला. सर्व सेनापती सैन्य धारातीर्थ पडत असतांना मागावून येणे यात शुरत्व नव्हते.

हे तुम्हाला कोणी सांगितलं? दुर्योधन अतिशय मानी आणि गर्विष्ठ होता, तो पहिल्यापासूनच युद्धभूमीवर युद्ध करत होता.

च्यायला, असंय का. आपला अभ्यास असल्यामुळे मान्य करण्याशिवाय पर्याय नाही. भिष्म सर्वात पुढे मग अश्वत्थमा, भिष्माभोवती शल्य, आणि इतर वीर आणि मग दुर्योधन, अशी काही मांडणी वाचली होती. पण, प्रचंड मानी आणि गर्वीष्ठ माणसाचं फार काळ चालत नाही, हा इतिहास आहेच. इतिहासातून माणसांनी शहाणे व्हायला पाहिजे बाकी आपली तरी काय अपेक्षा. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

mayu4u

या विषयावर तुम्ही व्यक्त केलेली मतं चुकीची आहेत.

तर्कवादी

शिवराज पाटील यांचे नेमके शब्द

टीप : शिवराज पाटील यांचे नेमके वक्तव्य उद्धृत करणे इतकाच माझा उद्देश्य होता/ आहे. त्यांच्या वक्तव्याचे समर्थन वा त्यावर टीका यापैकी कोणतीही भूमिका घेण्यात मला रस नाही.

उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेत नमाज पठण, भाजपाच्या माजी आमदाराने केला व्हिडीओ शेअर; कारवाईची मागणी

https://www.loksatta.com/desh-videsh/four-muslim-offering-namaz-in-trai…

इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ २० ऑक्टोबरचा आहे. या व्हिडीओमध्ये काही मुस्लीम बांधव रेल्वेमध्ये नमाज पठण करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशचे माजी आमदार दीपलाल भारती यांनी रेकॉर्ड केला आहे. याबाबत बोलताना “मी सत्याग्रह एक्स्प्रेसने प्रवास करत होते. यावेळी मला चार मुस्लीम रेल्वेमध्ये नमाज पठण करताना दिसले. याचा इतर प्रवाशांना त्रास होत होता,” असे भारती म्हणाले आहेत.

सायबर दहशतवाद प्रकरणात पहिल्यांदाच आरोपी सॉफ्टवेअर इंजिनिअरला जन्मठेप; मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल

https://marathi.abplive.com/news/mumbai/cyber-terrorism-case-accused-so…

काय बोलावं ते सुचेना .....

Congress President : काँग्रेसचा अध्यक्ष तर बदलला, हायकमांड बदलणार का? आता गांधी कुटुंबाचा रोल नेमका काय असणार?

https://marathi.abplive.com/news/politics/congress-president-has-change…

कॉंग्रेसवर, सत्ता गांधी घराण्याचीच राहणार.....

पाकिस्तान में 2 और हिंदू लड़कियों का अपहरण, FIR भी नहीं लिख रही पुलिस

https://www.aajtak.in/amp/world/story/two-hindu-girls-abducted-in-pakis…

पाकिस्तान में हिंदू लड़कियों के अपहरण के मामले लगातार बढ़ते जा रहे हैं. ऐसा ही एक नया मामला सिंध प्रांत से सामने आया है, जहां दो हिंदू लड़कियों के अपहरण की खबर है. अपहरण के बाद शिकायत लेकर थाने पहुंची इन लड़कियों की मां ने पुलिस पर गंभीर आरोप लगाए हैं. उनका कहना है कि पुलिस ने मामले में एफआईआर दर्ज करने से इनकार कर दिया था. इसके बाद महिला ने बुधवार को विरोधस्वरूप प्रदर्शन भी किया

--------

दिल्लीत फटाके फोडल्यास 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 200 रुपयांचा दंड होऊ शकतो

https://www.google.com/amp/s/lokmat.news18.com/amp/maharashtra/diwali-2…

यंदा दिवाळीत फटाके फोडणं दिल्लीतील लोकांना चांगलंच महागात पडणार आहे. दिल्लीत फटाके फोडल्यास 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 200 रुपयांचा दंड होऊ शकतो, असं पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी बुधवारी सांगितलं. यासोबतच स्फोटक कायद्याच्या कलम 9B अंतर्गत राजधानीत फटाक्यांचं उत्पादन, साठवणूक आणि विक्री केल्यास 5,000 रुपयांपर्यंतचा दंड आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

विवेकपटाईत

दिल्लीचे प्रदूषण आणि पटाके यांच्या दूर दूर संबंध नाही हिवाळा सोबत प्रदूषण वाढते. डिसेंबर अखेर सर्वात जास्त. संक्रांतीचे वारे सुरू झाल्यावर कमी होते. मुख्य कारण लाखो डिझेल कार /गाड्या. रस्त्यावर उडणारी धूळ. ८० टक्के दिल्ली अनधिकृत भागात राहते तिथे १०० गज च्या प्लॉट वर फर्स्ट फ्लोअर पासून १२० गज निर्माण होतात. गुगल मॅप वर दूर दूर एक ही झाड दिसणार नाही. फक्त हिंदूंचा सण म्हणून बंदी.

विवेकपटाईत

दिल्लीचे प्रदूषण आणि पटाके यांच्या दूर दूर संबंध नाही हिवाळा सोबत प्रदूषण वाढते. डिसेंबर अखेर सर्वात जास्त. संक्रांतीचे वारे सुरू झाल्यावर कमी होते. मुख्य कारण लाखो डिझेल कार /गाड्या. रस्त्यावर उडणारी धूळ. ८० टक्के दिल्ली अनधिकृत भागात राहते तिथे १०० गज च्या प्लॉट वर फर्स्ट फ्लोअर पासून १२० गज निर्माण होतात. गुगल मॅप वर दूर दूर एक ही झाड दिसणार नाही. फक्त हिंदूंचा सण म्हणून बंदी.

श्रीगुरुजी

फटाक्यांमधून निघणाऱ्या प्रचंड धुरामुळे व ध्वनीमुळे अतिशय हवा प्रदूषण व ध्वनी प्रदूषण होते हे एखाद्या तान्ह्या बाळाला सुद्धा समजते.

गाड्यांच्या धुरामुळे सुद्धा प्रदूषण होतेच, परंतु ते कमी करण्यासाठी सातत्याने संशोधन सुरू आहे. नैसर्गिक वायू, वीज यावर चालणाऱ्या गाड्यांची संख्या वाढत असून यातून खूपच कमी किंवा जवळपास शून्य प्रदूषण होते. फटाक्यांमधून निघणारा धूर व सूक्ष्म कण कमी व्हावेत यासाठी कधी संशोधन करून ते कमी करण्याचा प्रयत्न झाल्याचे ऐकिवात नाही.

दुसरं म्हणजे आर्थिक विकास, जलद वाहतूक, कमी श्रमात व कमी वेळात जास्तीत जास्त अंतर पार करणे, यंत्रे वापरून जास्तीत जास्त माल कमीत कमी वेळात दुसऱ्या ठिकाणी नेणे यासाठी गाड्या आवश्यक आहेत. फटाक्यांचा आर्थिक विकासात कितपत वाटा आहे? फटाके आवश्यक आहेत का? फटाक्यांमुळे मानवी जीवन कितपत सुसह्य होते, किती श्रम वाचतात, किती वेळ वाचतो?

तस्मात् फटाके व गाड्या यांची तुलना अप्रस्तुत आहे.

अजून एक मुद्दा म्हणजे फटाके व हिंदू सण व हिंदू धर्म यांचा कणभरही संबंध नाही. केवळ हिंदूंचा सण म्हणून फटाक्यांवर बंदी हा समज हास्यास्पद आहे.

अत्यंत उपद्रवी, प्रदूषणकारी व अनेक मुलांचे प्राण घेणाऱ्या फटाक्यांवर कायमस्वरूपी बंदी असणे अत्यंत योग्य आहे.

Nashik PFI : पीएफआय प्रकरणाची व्याप्ती वाढली, नाशिकमधून आणखी एक कार्यकर्ता ताब्यात.

पीएफआयची पाळेमुळे नाशिकमध्ये खोलवर रुजल्याचे या प्रकरणावरून दिसून येत आहे.

सोमवारी जिल्हा व सत्र ऑनलाईन पद्धतीने सुनावणी घेण्यात आली होती. यावेळी तपासी पथकाकडून विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद केला होता. यावेळी संशयितांचा सदस्यांचा व्हॉट्स अँप ग्रुप असून या ग्रुपचा ॲडमिन पाकिस्तानात असल्याचे चौकशीत समोर आले होते. या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तानसह, अमिराती, अफगाणिस्तान देशांमधील सदस्य सहभागी आहेत. दहशतवाद विरोधी पथक या ग्रुपमधील संदेशांची छाननी करत आहे. मालेगाव, बीड, नांदेड येथून पाच संशयितांना नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती.

----

पॉल पॉट

दिवाळीत फटाके फोडू नका म्हणून शिंदे फडणवीसांनी लहान मूलांना शपथ घ्यायला लावली.
ह्या दोघांनी कधी ईद आल्यावर जनावरे कापू नका म्हणून कूनाला शपथ घ्यायल लावली नाही तसेच नवीन वर्षारंभावोळी ही फटाके फोडू नका म्हणून कुणाला शपथ घ्यायला लावली नाही. हिंदू सण आले की लगेच विरोध केला जातो.
मी तरी पुढील निवडणूकीत हिंदू विरोधी शिंदे-फडणवीस सरकारला मत न देण्याचा निर्णय घेतलाय.

https://youtu.be/mLAPAIi6xQU

आग्या१९९०

कानशिलात नाही मारली , बीजेपीवासू ज्योतिरादित्य यांच्यासारखा 'हिलींग टच' केला त्यांनी.

पॉल पॉट

RSS नेता दिवाली से पहले पहुंचे हजरत निजामुद्दीन की दरगाह, चादर चढ़ाया...मत्था टेका via @aajtak https://www.aajtak.in/india/news/story/rss-leader-indresh-kumar-reached…

Download the Aaj Tak app now to read our latest stories
https://aajtak.link/X9zu
दिवाळी मध्ये अली दिसले का ह्यांना?

निनाद

चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांना कम्युनिस्ट पक्षाच्या काँग्रेसच्या समारोप समारंभातून खेचून दूर काढले! या घटनेवरून पक्ष आणि सरकारमधील शी-जिनपिंग यांचे सतत वाढत चाललेले वर्चस्व स्पष्ट होते. ८० वर्षीय हू जिंताओ हे त्यांचे उत्तराधिकारी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या डावीकडे बसले होते. बीजिंगच्या सर्वात मोठ्या सभागृहातील ग्रेट हॉल ऑफ द पीपलच्या मंचावरून दोन लोकांनी त्याला धरून नेले.

निनाद

उन्नावमध्ये एका ५ वर्षीय हिंदू मुलाची धर्मांतर करण्याच्या उद्देशाने सुंता, खतना केल्याची घटना समोर आली आहे. दुखापत लक्षात घेऊन कुटुंबीयांनी मुलावर उपचार करण्यासाठी हॉस्पिटल गाठले असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची माहिती मिळताच हिंदू संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली. विहिंपचे जिल्हा मंत्री शनिवारी सायंकाळी उशिरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

निनाद

Bombay archbishop among 3 pastors booked in POCSO case.

सेंट पॅट्रिक हायस्कूलचे मुख्याध्यापक लैंगिक गुन्ह्यात पकडले गेले आहेत.

पुणे, महाराष्ट्रातील एका १५ वर्षीय मुलाच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात शुक्रवारी तीन पाद्रींवर लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (POCSO ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. कृत्य केले गेले तेव्हा ५६ वर्षीय परेरा लैंगिक गैरवर्तनाच्या आणखी एका प्रकरणात जामिनावर बाहेर होता. दुसर्‍या POCSO प्रकरणात त्याने पुण्याच्या येरवडा कारागृहात दीड वर्ष काढले होते.

सेंट पॅट्रिक हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर हा प्रकार केला होता. त्याने मुलाचे अश्लील व्हिडिओ दाखवून त्याच्यावर अत्याचार केला.

सोलापूर येथील दुसर्‍या शाळेत मुख्याध्यापक असताना परेरा यांनी किशोरवयीन कर्मचार्‍यांचे लैंगिक शोषण केले होते, असा दावा केला गेला आहे.

पुणे बिशपचे बिशप थॉमस डाबरे, आणि बॉम्बेचे मुख्य बिशप, कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस यांनी कथितरित्या परेराविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही! पोक्सो कायद्यानुसार, बाल शोषणाची माहिती असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पोलिसात तक्रार करण्यासाठी कायद्याचे पालन करावे लागते. जर त्यांनी तसे केले नाही तर ते कायद्यानुसार शिक्षेस पात्र आहेत. पोलिसांनी तक्रार न केल्यास ते शिक्षेस पात्र आहेत.

ब्रिटनमधे म्हणे, वाढती महागाई व कर कपात करण्यात अपयशी ठरल्यामुळे ब्रिटनच्या
पंतप्रधान लिझ ट्रस यांनी अवघ्या 45 दिवसांतच पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.

'कुठं त्या लिझ ट्रस आणि कुठे.........'

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी

खरंय. तुरूंगात टाकल्यानंतरही आपले मंत्री राजीनामा देत नाहीत.

'कुठं त्या लिझ ट्रस आणि कुठे.........'.

पॉल पॉट

ते प्रधानमंत्रींबद्दल बोलत आहेत.

वामन देशमुख

ते प्रधानमंत्रींबद्दल बोलत आहेत.

महागाईमुळे २०१४ मध्ये ज्यांची सत्ता गेली त्यांच्याबद्धल बोलत आहेत का?

पॉल पॉट

नाही. २०१४ ला महागाई बद्दल खडखड करून ज्यानी सत्ती बळकावली त्यांच्याबद्दल.

वामन देशमुख

काय तरी बाई हे नुसतं beating around the bush चाललंय!

लिझ ट्रस् हे नाव सरळ घेतलं मग दुसरं नाव किमान उखाण्यात तरी घ्यायचं!

घ्या बरं, पाडव्याच्या दिवशी तरी अश्या लाजू नका पाहू.

कंजूस

त्यावरच बसून राहायला पाहिजे असं काही नसतं.

पॉल पॉट

केजरीवालांच्या ह्या हिंदूकार्डमूळे हिंदूत्वाचं ढोंग घेतलेल्यांच्या पायाखालची जमीन सरकलीय : ) गूजरात हरण्याची भीती वाटतेय ढोंगींना.
https://indianexpress.com/article/cities/delhi/kejriwal-ganesh-laxmi-ph…

सुक्या

खिक्क ! ! !
नोटेवर गणपती व लक्ष्मी फोटो छापल्यावर अर्थव्यवस्था सुधारते हे एका महान व हुच्च विद्या विभुषीत मानवाच्या तोंडुन ऐकल्यावर मजा वाटली. बाकी रेवडी चा प्रसाद दाखवतात म्हणे तिकडे.
"कुठे ते नामवंत अर्थशास्त्री कुठे हे . . . . ."

पॉल पॉट

अर्थव्यवस्था सुधारावी असं ते मूळीच बोललेले नाहीत. ऊगा काहीतरी…. बाकी ढोंगी हिंदूत्वावादी ट्रॅप मध्ये अडकले केजरीवालांच्या. :) कुठे आयआयटी झालेले केजरीवाल नी कुठे नकली डिग्रीवाले :)

सुक्या

खिक्क !! खिक्क !!
पॉल पॉट आजोबा. आपण दिलेल्या लिंकातला व्हिडो बघा जरा परत. हुच्च विद्या विभुशित महामानव काय बोलले ते बघा जरा ...

वामन देशमुख

केजरीवालांच्या ह्या हिंदूकार्डमूळे

म्हणजे तुमचे केजरीवाल हे केवळ कार्डे नाचवतात, विकास वगैरे काही प्रत्यक्ष करत नाहीत, असे म्हणायचे आहे तर!

पॉल पॉट

कार्डे नाचवतात म्हणजे विकास वगैरे करत नाहीत. हे लोजीक प्रातशाखेत शिकवले जाते की सायंशाखेत? :)

वामन देशमुख

बरं ठीक आहे,

म्हणजे तुमचे केजरीवाल हे केवळ कार्डे नाचवतात असे म्हणायचे आहे तर!

पॉल पॉट

“आमचे केजरीवाल” मग तुमचे कोण मग? कृपाशंकर की सावरकर विरोधी नितेश राणे? :)

पॉल पॉट

भाजपशासीत राज्यात हिंदूंवर होनारे अत्याचार चिंताजनक आहेत. केंद्राने तात्काळ हे हिंदूविरोधी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावावी.

रद्दी विकून मोदी सरकारने कमावले करोडो रुपये; २५४ कोटींची रक्कम सरकारी तिजोरीत

https://maharashtratimes.com/india-news/central-government-earned-254-c…

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही मोहिम अन्य कार्यालयातही चालवली जाणार आहे.

श्रीगुरुजी

हा अत्यंत जातीयवादी, कट्टर धर्मांध आत जातोय आणि आमदारकी सुद्धा जातेय ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.

आता उठा, निखिल वागळे, असीम सरोदे, अनेक कॉंग्रेसी, समाजवादी, मिपावरील काही चोंबडे यांची प्रतिक्रिया खालीलप्रमाणे असेल . . .

"हा पक्षपाती निर्णय आहे. जर द्वेषपूर्ण भाषणावरून आझमखानला शिक्षा मिळते तर भाजपच्या किमान निम्म्या नेत्यांना अशी शिक्षा का नाही?".

https://www.loksatta.com/desh-videsh/another-mega-project-in-gujarat-ai…

सध्या भारतीय वायू दलात असलेल्या, जुन्या तंत्रज्ञानाच्या एचएस ७४८ Avro या मालवाहू विमानांची जागा सी-२९५ ही मालवाहू विमाने घेतील. पॅराट्रुपर्स आणि सैन्य दलासाठी आवश्यक सामानाची वाहतूक करण्याकरता या मालवाहू विमानांचा उपयोग होणार आहे.

--------

देशाच्या संरक्षणा बाबतीत, हे केंद्र सरकार योग्य तो निर्णय नक्कीच घेत आहे ....हे माझे वैयक्तिक मत आहे .....मग तो प्रकल्प कुठल्याही राज्यात किंवा केंद्र साशित प्रदेशांत का होईना ....