राजकारण

ताज्या घडामोडी - ऑक्टोबर २०२२

Primary tabs

ऑक्टोबर २०२२ च्य ताज्या घडामोडींची चर्चा करण्यासाठी हा धागा.

पॉल पॉट

भाजप सरकार असेपर्यंत महाराष्ट्राचं नूकसानच होत राहनार. ऊध्दव ठाकरेंना आघाडी बरोबर जाण्याचा घेतलेला निर्णय किती योग्य होता हे आज गुजरातला पळवल्या जानार्या प्रकल्पांवरून जनतेच्या लक्षात येतंय. फडणवीस पुन्हा सत्तेत नको नाहीतर महाराष्ट्राची वाटच लागत राहनार.

श्रीगुरुजी

प्रकल्प गुजरात ला जात असतील तर काय फक्त गुजरात मुख्यमंत्री आणि सरकार भारी काम करते आहे का? आणि देशातील इतर राज्ये काय भांगर सरकार आहेत काय? त्यांना अक्कल नाहीये काय?

आपण आपला व्यवसाय कोठे सुरू करायचा हे एखादे राज्य ठरवितेक्षकी ती कंपनी ठरविते? कोणत्या राज्यात व्यवसाय सुरू केल्यास ते फायद्याचे ठरेल, भांडवल उभारणे सोपे असेल, कुशल कर्मचारी मिळतील, व्यवसाय वेगाने वाढेल, कमीत कमी समस्या येतील इ. मुद्द्यांचा कंपनी विचार करीत असेल ना? या सर्व गोष्टींसाठी जर एअरबस, वेदांता इ. ना इतर राज्यांच्या तुलनेत गुजरात योग्य वाटत असेल तर प्रकल्प पळविला हा कांगावा कशासाठी? उद्या एखाद्या कंपनीने नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्रात भांडवल गुंतविले आणि शिवसेना, मनसे असल्या पक्षांनी स्थानिकांना भडकवून प्रकल्प सुरू होऊनच दिला नाही किंवा वारंवार न्यायालयीन अडथळे आणले तर भांडवल, श्रम, वेळ इ. चे किती प्रचंड नुकसान होईल?

गुजरातमध्ये असे किती प्रकल्प लोंबकळत पडले आहेत? ९० च्या दशकात व नंतरही मेधा पाटकरांनी शक्य ते सर्व मार्ग वापरून नर्मदा सरोवर प्रकल्पाला कडाडून विरोध केला. पण तेव्हा तेथील सर्व पक्ष या प्रकल्पाच्या बाजूने असल्याने तो पूर्ण झाला.सरदार पटेलांचा पुतळाही फारसा विरोध न होता पूर्ण झाला.

याउलट महाराष्ट्रातील एनरॉन, जैतापूर, नाणार, बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग इ. प्रकल्पांची काय स्थिती आहे? वेदांता किंवा एअरबस या इतिहासाकडे दुर्लक्ष करण्याएवढे मूर्ख आहेत का?

श्रीगुरुजी

महाराष्ट्राने घालवून दिलेला अजून एक प्रकल्प म्हणजे २००८ मध्ये जायला भाग पाडलेला डाऊ रासायनिक प्रकल्प.

गणेशा

या विश्लेषणाने तुमचे असे म्हणणे आहे की महाराष्ट्रात कुठलेच प्रकल्प आणायला महाराष्ट्र नालायक आहे, नव्हे कंपन्यांनी महाराष्ट्र हा नालायक आहे म्हणुन निवडला नाही..

प्रकल्प गुजरातला च का गेले हे वरती कोणाला तरी प्रतिसादात तुम्ही मोदी नाव आले तर पुरावे आहेत का मध्यस्ती केली ते असे विचारले आहे..
जर अशी मध्यस्ती केली असेल तर पुरावे कसे मिळतील?
प्रकल्प नविन आणणे आणि आधी दुसरीकडे होणारे प्रकल्प आपल्याकडे आणणे यात फरक नक्कीच आहे..
जर असेच चालले तर जो main सत्तेत आहे, त्यांनी इतर कुठल्याही राज्यापेक्षा कायम कमी दरात आपल्या राज्याला येण्यास विनवणी किंवा भाग पाडले तर जो main आहे तो देशाचा आहे कि राज्याचा हे बघितल पाहिजे. आणि तो योग्य करतो कि अयोग्य ते हि पाहिले पाहिजे..

आणि असे प्रकल्प कायम एकाच राज्याला गेले तर इतर राज्यांनी काय फक्त पुरावे गोळा करावेत काय?

एक भाजप समर्थक सोडून एक माणुस म्हणुन, हे जे चालले आहे ते योग्य वाटते आहे का तुम्हाला?
मागील काही प्रकल्प केले नाही म्हणुन तुम्ही जी ४ नावे लिहिली आहेत, त्या पेक्षा कितीतरी पट प्रकल्प महाराष्ट्रात व्यवस्थित चालू आहेत, हे कंपन्या पाहत नसतील काय?

फक्त पिंपरी चिंचवड -चाकण - रांजनगाव ह्या midc पाहिल्या तरी हे लक्षात येईल.. मग चांगले असंख्य उदाहरण असताना आपण प्रकल्प पळवला कि फक्त ४ नावं च घेणार का?

श्रीगुरुजी

या विश्लेषणाने तुमचे असे म्हणणे आहे की महाराष्ट्रात कुठलेच प्रकल्प आणायला महाराष्ट्र नालायक आहे, नव्हे कंपन्यांनी महाराष्ट्र हा नालायक आहे म्हणुन निवडला नाही..

सद्रपरिस्थितीत मोठे उद्योग महाराष्ट्रात येणे अवघड आहे. करार करून ६-७ वर्षे झाल्यानंतरही नाणार व जैतापूर प्रकल्पांचे काम सुरू करता आलेले नाही कारण विरोधात असलेल्या मनसे, कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा विरोध आणि सत्तेत असूनही स्थानिकांना भडकवून सेनेने केलेला कडाडून विरोध. आपण महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करण्याचा करार केला आणि विरोधात बसलेल्यांनी असाच विरोध केला तर प्रकल्प सुरू होणारच नाही आणि वेळ, भांडवल, श्रम वाया जातील असा विचार वेदांता, एअरबस यांनी केला असल्यास कोणाला दोष देणार?

बंगालमध्ये सुद्धा ममता व डाव्यांच्या मारामारीमुळे आता नवीन प्रकल्प येणे अवघड झाले आहे.

प्रकल्प गुजरातला च का गेले हे वरती कोणाला तरी प्रतिसादात तुम्ही मोदी नाव आले तर पुरावे आहेत का मध्यस्ती केली ते असे विचारले आहे..

जेव्हा असे आरोप केले जातात तेव्हा निदान प्रथमदर्शनी खरे वाटावेत असे तरी पुरावे हवेत ना? अन्यथा तो फक्त हवेतला गोळीबार ठरतो.

प्रकल्प नविन आणणे आणि आधी दुसरीकडे होणारे प्रकल्प आपल्याकडे आणणे यात फरक नक्कीच आहे..
जर असेच चालले तर जो main सत्तेत आहे, त्यांनी इतर कुठल्याही राज्यापेक्षा कायम कमी दरात आपल्या राज्याला येण्यास विनवणी किंवा भाग पाडले तर जो main आहे तो देशाचा आहे कि राज्याचा हे बघितल पाहिजे. आणि तो योग्य करतो कि अयोग्य ते हि पाहिले पाहिजे..

अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय करणारे देशी/विदेशी उद्योगपती केवळ सत्ताधाऱ्यांच्या विनवणीवरून/आज्ञेवरून एखादा मोठा नवीन प्रकल्प, एखाद्या राज्यात सुरू करतात/एखाद्या राज्यातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात हलवितात, का?

आणि असे प्रकल्प कायम एकाच राज्याला गेले तर इतर राज्यांनी काय फक्त पुरावे गोळा करावेत काय?

आपण कोठे कमी पडतोय याविषयी या राज्यांनी आत्मपरीक्षण करून त्रुटी दूर करणे आवश्यक आहे.

एक भाजप समर्थक सोडून एक माणुस म्हणुन, हे जे चालले आहे ते योग्य वाटते आहे का तुम्हाला?

मी भाजप समर्थक असलो तरी अंधसमर्थक नाही. माझा भाजपला सरसकट पाठिंबा नसून मुद्द्याधारीत पाठिंबा/विरोध आहे. उद्योगपती मोठे उद्योग महाराष्ट्रात आणण्यास तयार नाहीत ह दु:खदायक आहे. परंतु असे का होत आहे याचा सखोल अभ्यास करण्याऐवजी मोदींना शिव्या देणे एवढेच सुरू आहे. मी स्वतः उद्योगपती असतो तर मी सुद्धा महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करण्यापूर्वी शंभर वेळा विचार केला असता कारण ठराविक पक्षांनी विरोध करून प्रचंड अडथळे आणून प्रकल्प सुरूच करून दिला नसता. कॉंग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांचा विरोध समजू शकतो, पण सत्तेत बसूनही विरोध करणे ही शिवसेनेची विकृती आहे.

मागील काही प्रकल्प केले नाही म्हणुन तुम्ही जी ४ नावे लिहिली आहेत, त्या पेक्षा कितीतरी पट प्रकल्प महाराष्ट्रात व्यवस्थित चालू आहेत, हे कंपन्या पाहत नसतील काय?

हे पाहताना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे का हे सुद्धा पहात असणार. जर अनेक वर्षे न्यायालयीन लढाई करावी लागणार असेल, स्थानिकांचा विरोध सहन करावा लागणार असैल, राज्य सरकार कोणतेही सहकार्य देणार नसेल तर कोणताही उद्योगपती महाराष्ट्रात येण्यास फारसा उत्सुक नसणार.

फक्त पिंपरी चिंचवड -चाकण - रांजनगाव ह्या midc पाहिल्या तरी हे लक्षात येईल.. मग चांगले असंख्य उदाहरण असताना आपण प्रकल्प पळवला कि फक्त ४ नावं च घेणार का?

पुणे येथील नवीन विमानतळ, नवी मुंबई विमानतळ असेही प्रकल्प वर्षानुवर्षे लोंबकळत पडले आहेत. अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणे आणि MIDC तील वर्कशॉप्स हे समान आहेत का? या वर्कशॉप्समधील मालकांना सुद्धा स्थानिक गुंड, खंडणी, भंगार मालाची कंत्राटे, मारामाऱ्या अश्या गोष्टींवरून खूप त्रास होत असल्याच्या बातम्या वारंवार वाचनात येतात.

गणेशा

श्री गुरुजी,

मग

Abp माझा कट्या वर एक महिन्यापूर्वी उदय सामंत, उद्योग मंत्री एक महिन्या भरा पूर्वी हा प्रकल्प नागपुरात होत आहे हे कुठल्या तोंडाने म्हणत आहेत?
लिंक वर ४.४८ सेकंदावरती ऐका..

https://youtu.be/WZ3JUevRsA0

आणि अजूनही त्यावेळेस उद्योग मंत्र्यांना माहीतच नव्हते हा प्रकल्प गुजरात ला गेलाय असे तुमचे म्हणणे असेल तर मग यालाच सर्व माहित असूनही अंध पणे हयांना पाठींबा देणे का म्हणू नये?

जर एक महिन्यापूर्वी उद्योग मंत्री म्हणत असेल हा प्रकल्प नागपूर मध्ये होतोय, तर मग मागचे दाखले देतायेतच का? आपण असे पार्शल वागतो आहे कि बस्स..

चूक तर चूक.. आता कितीही सारवा सारव केली तरी एक महिन्यापूर्वी ह्यांना काही माहित नव्हते का?

गणेशा

श्री गुरुजी,

मग

Abp माझा कट्या वर एक महिन्यापूर्वी उदय सामंत, उद्योग मंत्री एक महिन्या भरा पूर्वी हा प्रकल्प नागपुरात होत आहे हे कुठल्या तोंडाने म्हणत आहेत?
लिंक वर ४.४८ सेकंदावरती ऐका..

https://youtu.be/WZ3JUevRsA0

आणि अजूनही त्यावेळेस उद्योग मंत्र्यांना माहीतच नव्हते हा प्रकल्प गुजरात ला गेलाय असे तुमचे म्हणणे असेल तर मग यालाच सर्व माहित असूनही अंध पणे हयांना पाठींबा देणे का म्हणू नये?

जर एक महिन्यापूर्वी उद्योग मंत्री म्हणत असेल हा प्रकल्प नागपूर मध्ये होतोय, तर मग मागचे दाखले देतायेतच का? आपण असे पार्शल वागतो आहे कि बस्स..

चूक तर चूक.. आता कितीही सारवा सारव केली तरी एक महिन्यापूर्वी ह्यांना काही माहित नव्हते का?

पॉल पॉट

मुंबई गुजरात ला जोडून टाका. मग शिंदे सांगतील मोदीजी मुंबईपेक्षा मोठं शहर दिल्ली महाराष्ट्राला जोडनार आहेत. :)

श्रीगुरुजी

तुम्ही पूर्ण ऐकलं नसावे.

"एअरबस प्रकल्पासाठी केंद्राबरोबर पाठपुरावा करतोय. टाटांच्या एव्हिएशनच्या लोकांशी बोलावे लागणार आहे. या प्रकल्पाबद्दल आम्ही चर्चा करतोय. हा प्रकल्प नागपुरात येतोय . . . "

या वाक्यांचा सरळ अर्थ असा आहे की या प्रकल्पासंबंधी बोलणी होणार आहेत/सुरू आहेत व (जर प्रकल्प आला तर) तो नागपुरात होईल.

प्रकल्प महाराष्ट्रात करण्याचा निर्णय टाटांनी घेतलाय, सामंजस्याचा किंवा इतर कोणताही कागदोपत्री करार झालाय असे उदय सामंत कोठेही बोललेले नाहीत.

गणेशा

प्रश्न हा आहे कि महिन्या पूर्वी चर्चा करणारा उद्योग मंत्री म्हणतोय हे आधीच्या सरकार मुळे गेलाय प्रोजेक्ट..

मग महिन्यापूर्वी हा नक्की कसला पाठपुरवठा करणार होता?

श्रीगुरुजी

आधीच्या सरकारने वेळेवर बोलणी केली नाहीत. जेव्हा उदय सामंतांची मुलाखत झाली तेव्हा प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करण्याचा टाटांचा अंतिम निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे अजूनही वाटाघाटी करून महाराष्ट्रात प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करता येईल असे सामंताना वाटले असावे.

Tata Airbus Project : महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला जाण्याची कारणं काय ? इतर शेजारील राज्याची परिस्थिती काय?

https://marathi.abplive.com/news/maharashtra/why-maharashtra-big-projec…

उहापोह चांगला केला आहे....

श्रीगुरुजी

अतिशय उत्तम माहिती दिली आहे.

आपल्याला कट मिळावा, सत्ताधारी पक्षाला श्रेय जाऊ नये यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक विरोधी पक्ष येणाऱ्या प्रत्येक नवीन प्रकल्पाविरूद्ध स्थानिकांना भडकवून, न्यायालयीन अडथळे आणून तो प्रकल्प उधळून लावतो.

२००८ मध्ये डाऊ रासायनिक प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे बंद करावा लागला होता.

याउलट इतर काही राज्यात प्रकल्प राज्यात येण्यासाठी बऱ्याच सुविधा दिल्या जातात.

साहजिकच आहे गुंतवणूकदार महाराष्ट्राऐवजी इतर राज्यांचाच आधी विचार करतात.

सत्तालोलुप भाजपा सरकारची जी काही कामे आहेत त्यात इतर पक्ष आमदार फोडाफोडी करुन राज्य मिळवायचा प्रयत्न करणे. महाराष्ट्रात पाडापाडी करुन सत्ता मिळवली. खोक्यावाल्यांचे सरकार म्हणून महाराष्ट्रातल्या आमदारांची बदनामी होत आहे, हे फार अपमानास्पद वाटते असे काल बच्चू कडूंनी महाराष्ट्रातल्या गुहाटीच्या घडामोडी उघड केल्या. सत्तेसाठी, दिल्लीच्या आमदारांच्या फोडाफोडीचे प्रयत्न करुन पाहिले, त्यांना इडिच्या माध्यमातून धमकावण्याचा प्रयत्न करणे चालूच होते. गुजरातमधे आप पक्षाध्याक्षांच्या मागे चौकशा लावल्या. दुसरीकडे तेलंगण राष्ट्र समितीच्या कथित आमदारांच्या खरेदी प्रकरणात थेट गृहमंत्र्यांच्या सहभागाबाबतची ऑडियो व्हायरल आपने काल उघड केली, भाजपाच्या दलालांची चौकशीची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी केली. एकूणच, देशभर असलेली आणि वाढती महागाई, रोजगाराचे प्रश्न, बेकारी, वीज, पाणी, रस्ते, विकासाच्या मुद्द्यांपेक्षा देशभर सत्ता आणि धार्मिक द्वेष उभा राहिला पाहिजे, एवढ्याच हेतूने भाजपायीचे राजकारण चालू आहे. पण, सामान्य माणसांना आता हे लक्षात यायला लागले आहे आणि सामान्य जनतेचं मौन येत्या काळात 'थापाशेठच्या' बाबतीत निर्णायक बदल करतील यात शंका नाही.

-दिलीप बिरुटे

विवेकपटाईत

देशात सर्वात जास्त विकास गेल्या आठ वर्षांत झाला आहे. ते पाहण्यासाठी मंत्रालयांच्या 2013 आणि 2021 च्या वार्षिक विवरणी तपासून ही पाहता येते. बाकी भाजप ने कधीच धार्मिक द्वेषाचे राजकारण केलेले नाही. धर्माच्या आधारावर भेदभाव फक्त तथाकथित धर्म निरपेक्ष पक्षांनी केला आहे. महागाई युपीए काळापेक्षा अर्ध्या गतीने वाढते आहे. सध्या तरी विकसित देशांपेक्षा ही कमी गतीने वाढते आहे.बाकी मोदीजे जे म्हणतात ते पूर्ण करून दाखवितात. थापा मारण्याचेय एक ही उदाहरण नाही.

कपिलमुनी

गुजरात इलेक्शन आहेत, आप ने त्यांची फाटली आहे.
त्यामुळे प्रकल्पाची गाजरे गुजरात ला नेत आहेत..
जिसकी लाठी उसकी भैंस.....

मोदी शाह विरुद्ध कोण माई का लाल बोलणार ? काय उपटणार?

पॉल पॉट

देशातल्या सर्व पोलिसांना समान गणवेशांचा नरेंद्र मोदींचा प्रस्ताव, राज्यांना सतर्कतेच्या दिल्या सूचना

स्वतः दिवसातून दहा कपडे बदलायचे नी म्हणे एक गणवेश. राज्यानी ही असली फालतू आवाहने धुडकावून लावावीत.

https://www.loksatta.com/desh-videsh/states-should-discuss-one-nation-o…

सुक्या

समान गणवेश म्हणाले ते समान कपडे नाही. फरक समजला नसेल तर थोडे वाचन करा ..

25 हजार 368 कोटींच्या 10 प्रकल्पांना मान्यता, कुठे आहेत हे प्रकल्प? जाणून घ्या सविस्तर माहिती

https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharshtra-10-project-appr…

प्रकल्प कुणीही का आणेना, महाराष्ट्र राज्यात रोजगार झाल्याशी मतलब.

गुजरात सरकार ‘समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत, घेतला महत्त्वाचा निर्णय

https://www.loksatta.com/desh-videsh/uniform-civil-code-will-implement-…

अतिशय उत्तम निर्णय .... धर्म घरांत आणि समान कायद्याचे राज्य घराबाहेर ....

एसआरए घोटाळा: किशोरी पेडणेकर अडचणीत? दादर पोलिसांकडून पुन्हा समन्स, चौकशीसाठी हजर होण्याचा आदेश

https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/mumbai/dadar-police-issue…

झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पेडणेकर यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. त्यानंतर दादर पोलिसांकडून त्यांची चौकशीही करण्यात आली. मात्र, दादर पोलिसांना पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे. त्यांना मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी दादर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

एसआरए घोटाळा: “…तर मी स्वत: गाळ्यांना टाळं लावते,” पेडणेकरांच्या विधानावर सोमय्या म्हणाले “त्यांना तर दादासाहेब फाळके पुरस्कार…”

https://www.loksatta.com/maharashtra/mumbai-worli-sra-scam-kirit-somaiy…

“पेडणेकर यांना कशाचीही भीती नसेल तर त्या पोलीस चौकशीला का घाबरत आहेत. या प्रकरणाबाबत मी एका वर्षापूर्वी ठाकरे सरकारच्या वेगवेगळ्या विभागाकडे तक्रार केली होती. वांद्रे पूर्व निर्मल नगर पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली होती. एसआरएकडे पुरावे दिले होते. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयातून दबाव आल्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. आता मी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केलेली आहे,” अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.....

-------

कर नाही, तर डर कशाला?

पॉल पॉट

सोमय्यांनी केलेल्या आरोपांपैकी किती आरोप सिध्द झाले?? सोमय्यांचा वापर पक्षभरती करता केला जातो की सेटलमेंट करण्यासाठी?

पॉल पॉट

गुजरात मध्ये भ्रष्टाताराचा कळस. मोरबीत पूल कोसळला कमीत कमी १० ठार. मोदींसारख्या दरीद्री नेतृत्वात पिचलेला गुजरात अजूनही ऊभारी घेण्याचं नाव घेत नाहीये. पवारांकडून थोडं शिका म्हणावं
https://zeenews.india.com/live-updates/live-updates-big-overbridge-coll…

प्रसाद_१९८२

याचा अर्थ ब्रिटीश काळात देखील गुजरातमधे भाजपाचे सरकार होते ?

पॉल पॉट

दिलात ना भक्तछाप प्रतिसाद. करोडो खर्चून त्या पुलाचे रिनोवेशन करून ३ दिवसाआधीच त्याचे ऊद्घाटन झाले होते. तुमचा सारखे भक्त हीच मोदींची पुंजी.

प्रसाद_१९८२

त्या पुलावर क्षमतेपेक्षा चार पट लोक उभी होती. शिवाय ती बेशिस्त जनता त्या पुलाला झोपाळ्या सारखे हलवत असल्याचे व्हिडीओत दिसतायत. इतके केल्यावर तो पुल कोसळणार नाहितर काय होणार ? मग यात भ्रष्टाचाराचा कळस कोठून आला, फारतर तिथे उपस्थित पोलीसप्रशासनाचा डिसाळ कारभार म्हणता येईल.

प्रसाद_१९८२
आग्या१९९०

पुलाची खात्री कोणीच देऊ शकत नाही. हुशार लोक योग्यवेळी धोका ओळखून पुलावरून माघारी फिरतात.

कॉमी

पश्चिम बंगाल मध्ये पूल कोसळलेला तेव्हा मोदीजींनी हा ऍक्ट ऑफ गॉड नसून ऍक्ट ऑफ फ्रॉड आहे असा आरोप केलेला. आता मात्र कसलाही फ्रॉड नसून लोकांनी पूल हलवला, पोलीस लक्ष देत नव्हते अशी कारणे आहेत. Got it.

विश्लेषण: मोरबीमध्ये १४३ वर्षं जुना पूल कोसळला, हा पूल कोणी बांधला? जाणून घ्या इतिहास…

https://www.loksatta.com/explained/143-years-old-morbi-hanging-bridge-c…

दिवाळीच्या सुट्ट्या आणि त्यातच रविवार असल्याने या पुलावर नेहमीपेक्षा जास्त गर्दी झाली होती. काही तरुण हा पूल मुद्दाम हलवत होते, अशी माहिती अहमदाबादेतील रहिवासी विजय गोस्वामी यांनी दिली आहे. “तरुणांकडून हा पूल मुद्दाम हलवला जात असताना नागरिकांना चालणंदेखील अवघड झालं होतं. या परिसरातून निघण्यापूर्वी मी पूल कर्मचाऱ्यांना सतर्क केले होते. हा पूल हलवण्यापासून लोकांना थांबवा, असेही कर्मचाऱ्यांना सांगितले होते. मात्र, त्यांचा रस केवळ तिकीट विक्रीमध्ये होता. गर्दी नियंत्रित करण्यासाठी त्यांच्याकडे व्यवस्थाच उपलब्ध नसल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले”, अशी धक्कादायक माहिती गोस्वामी यांनी दिली आहे...

पॉल पॉट

मोदींच्या भ्रष्ट कारभारामूळे गुजरात पोखरला जात आहे असे वाटते. देव मोदी आणी भाजप पासून गुजरातचं रक्षण करो नी भ्रष्ट भाजप सरकार जाऊन तिथे चांगले सरकार येवो.

हिंदू लड़की के साथ होटल में पकड़ा गया आसिफ, बजरंग दल के कार्यकर्ताओं ने पुलिस को सौंपा......

Read more at: https://panchjanya.com/2022/10/30/255277/bharat/madhya-pradesh/muslim-y…

बताया जा रहा है कि आरोपी मुस्लिम युवक फर्जी आईडी से होटल में रूम बुक किया था। आरोपीने अपना नाम विकास बताया था ...