राजकारण

२०२४ लोकसभा निवडणूक.

Primary tabs

लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील.
पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल.
दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल.
तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल.
चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल.
पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल.
सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल.
सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल.

महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.

पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.

पुण्यात गिरीश बापट ह्यांच निधन झाल्यावर वर्ष झाल्यावरही इलेक्शन डिक्लेर केलं गेलं नाही. पण साताऱ्यात उदयराजेंनी भाजप जॉइन करून खासदारकीचा राजीनामा दिला तर तीनच महिन्यात निवडणूक जाहीर केली होती. पुण्यात भाजप हरेल ह्या भीतीमुळे निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली नाही का अशी शंका येते कारण काही दिवस आधीच धंगेकरांनी कसबा जिंकले होते. ह्यामुळे निवडणूक आयोग भाजपसाठी काम करते का अशीही शंका येते. दरम्यान पंजाबात १० मे २०२३ रोजी इलेक्शन घेण्यात आले होते.
पुण्यातील कोणीतरी देशप्रेमी नागरिक निवडणूक आयोग विरुद्ध कोर्टात गेल्यावर निवडणूक आयोगाला पुण्यात लोकसभेची निवडणूक घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते पण निवडणूक घेण्याऐवजी निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात गेले.
त्याची बातमी.
https://sarkarnama.esakal.com/amp/story/pune/pune-loksabha-by-election-…

निवडणूक आयोगाची नीतीमत्ता खालावली असल्याचे हे संकेत आहेत.

एवढं सगळं कशाला?

आत्ता पासुनच ई.व्ही.एम च्या नावाने रडायला सुरुवात करा , म्हणजे प्रक्टिस होइल =))))

बाकी ह्या निवडणुकींचा निकाल कसाही येवो, निकाल आल्यावर मला बिरुटे सरांना आवर्जुन भेटायला जायची इच्छा आहे !
म्हणजे मोदी पडले तर सरांच्या आर्म चेअर अ‍ॅक्टिव्हिझम चे कौतुक अन अभिनंदन करायला , अन मोदी परत निवडुन आले तर पुढी पाच वर्षे काय काय खुस्पटे काढायची ह्यावर सविस्तर चर्चा करायला =)))))

तुमचा प्लॅन काय ?

=))))

कांदा लिंबू

सांभाळून हो नाहीतर ते तुम्हाला पंधरा लाख रुपये मागतील.

निवडणूक आयोगाची नीतीमत्ता खालावली असल्याचे हे संकेत आहेत. हे मी लोकसभेवेळीच सांगितले होते.
पुण्यात भाजप हरेल म्हणून लोकसभेची निवडणूकच इलेक्शन कमिशनने होऊ दिली नाही. इतका उघड भाजपसाठी काम करणारा कमिशन प्रामाणिकपणे निवडणुका घेत असेल का?

कंजूस

धागा काढल्याबद्दल धन्यवाद बाहुबली.
हिरिरीने स्पष्ट मतं मांडणारे आमचे धीट तरुण मिपाकर म्हणून बाहुबलींना पाहतो.
राजकीय धुमाळी आहे आणि मंचावर थोडी चर्चा हवीच. आरोप वगैरे सोडून समीक्षा आणि आकडेवारी दिल्यास कायमच नोंद राहील. विविध नेत्यांचे बलाबल किंवा गुणांचीही नोंद घ्यावी. त्यांचे राजकीय भवितव्य काय ? तुलनात्मक चढाओढ. विविध वर्तमानपत्रातील छापील माध्यमांतील राजकीय टिप्पणी लेखांचा ही परामर्श घ्यावा. ट्विटर म्हणजे एक्स या किंवा सोशल मिडिया वरची नेत्यांची टिप्पणी ते बदलतात त्यामुळे त्यांना मिळणारी सवंग लोकप्रियता आणि चर्चेत राहण्यापलिकडे त्यांचे महत्त्व वाटत नाही.

सर्वच पक्षांनी विविध दावे केले आहेत.

इतक्या जागा जिंकू वगैरे. तसे झाले नाही तर ४ जूनला काय वक्तव्य करतील? काय आदळ आपट करतील ?
पक्षांचा जाहिरनामा ओनलाईन कुठे मिळेल? तसेच मागच्या निवडणुकीचेही अजून मिळतील का?

मिसळपाव संस्थळाचे धोरण आणि नियम लक्षात ठेऊन धागा वाढवल्यास आनंदच आहे.

धागा काढल्याबद्दल धन्यवाद बाहुबली.
हिरिरीने स्पष्ट मतं मांडणारे आमचे धीट तरुण मिपाकर म्हणून बाहुबलींना पाहतो.
धन्यवाद कंजूस काका.

रामचंद्र

आम्ही कोणी साधुसंत नाही, असं भाजपच्या अनेक नेत्यांनी वारंवार सांगितलं आहे. एक शेषन सोडले तर इतर जवळपास सर्वच निवडणूक आयुक्तांच्या कार्यकाळात आयोग सरकारधार्जिणाच राहिला आहे. अर्थात सध्याच्या काळात त्याने अगदी खालची पातळी गाठली आहे हे उघड आहेच. जर विरोधी पक्षाचे सरकार आले तर या बाबींची चौकशी होईल, अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग मोकळा आहे. सर्वच चोरांवर मोर कोण ठरतं आणि सत्तेत येऊन काय रंग उधळतं, एवढंच बघायचं बाकी आहे. या दरम्यान आपल्याच उक्ती-कृतीने आपला घात कोण करून घेतं हे पाहण्याची उत्सुकता आहे.

अर्थात सध्याच्या काळात त्याने अगदी खालची पातळी गाठली आहे हे उघड आहेच. निवडणूक आयोग आणी मोदी देशात निवडणुका होऊ देताहेत ह्याचेच देशवासियानी उपकार मानावे अशी वेळ आली आहे.

चौकस२१२

देशात निवडणुका होऊ देताहेत ह्याचेच देशवासियानी उपकार मानावे अशी वेळ आली आहे.
तुम्हाला पटत नसेल पण भारतात अजून लोकशाही जिवंत आहे आणि तुम्ही मोदींना किंवा भाजप ला हुकूमशाह म्हणालेत तरी हे लपून राहत नाहीत कि सर्व पातळीवर निवडणूक होत आहेत आणि बानी जाहीर झालेली नाही , बरखा, राजदीप वागले, थापर सारखे पत्रकार ! तुरुंगात नाहीत . विरोधी नेते तुरुंगात नाही , काँग्रेस वॉर बंदी नाही
आता १९७५ नंतर विद्यचारां शुक्ल वैगरे मंडळी आठवा , जयप्रकाश तुरुंगात , जनसंघावर बंदी इत्यादी
तेव्हा मोदी हुमशाही हि चापलुसी बास झाली
३ ऱ्या वेळेला व्यस्थित निवडणूक चालू आहेत मत द्या आणि हाकल भाजप ला.. कोणी अडवलाय
( हा आता नेहमीचं "ऑस्ट्रेल्यात काय इलेक्शन कमिशन कसे काम करते हे विचारात बसू नका ...)

ऑस्ट्रेल्यात काय इलेक्शन कमिशन कसे काम करते हे विचारात बसू नका

आपल्या देशात नळाला रेग्युलर पाणी येतं का ?

-दिलीप बिरुटे

नमस्कार सर ,

कसें आहांत !

ते बाकीचांचे सोडुन सोडा , तुम्हाला काय वाटतंय, मोदी षेठजी किती जागा काढतील ई.व्ही.एम च्या पकडुन ?
मला वाटतंय की ३०० च्या वर जाणार नाहीत. बाकी शाहु फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र फसवणीस भडजीच्या उर्फ अणाजी पंताच्या नेतृत्वातील भाजपला २० च्यावर जागा देईल असे काही वाटतं नाही.

तुम्हाला काय वाटतं ?

नमस्कार सर ,
कसें आहांत !

छान.

तुम्हाला काय वाटतं ?

सध्या निवडणूकीच्या कामात आहे. नो कमेंट्स. :)

-दिलीप बिरुटे

निवडणुकीच्या नावाखाली सवंग चर्चा,धुळवड खेळली जाऊ नये.

नीरक्षीरविवेक बुद्धीने चर्वितचर्वण व्हावे.

अर्थात सध्याच्या काळात त्याने अगदी खालची पातळी गाठली आहे हे उघड आहेच.

पन्नास साठ वर्षे अनिर्बंधित एकाच पक्षाने, एकाच परिवाराने राज्य केले तेव्हां लोकशाही होती आणी आता लोक शाहीला धोखा कसा...

1975 बद्दल वर उल्लेख आलाच आहे.

सिम्पथी वर जेव्हां राजीव जी चारशे पार गेले त्याचे काय....

किस्सा कुर्सी का या सिनेमावर फक्त एकच शो नंतर बंदी आणली. मी बघीतला आहे. तेव्हां संवैधानिक हक्कांची पायमल्ली झाली नव्हती का.....

असे बरेच काही आठवते.

हमाम मे सब नंगे....

एक लक्षात घ्या सत्तेशिवाय शहाणपण नाही.

तुम करे तो रासलिला हम करे तो कॅरॅक्टर ढिला ,या तत्त्वावर विश्लेषण नसावे.

बाकी कुंपणावर बसलोच आहे.

चौकस२१२

पन्नास साठ वर्षे अनिर्बंधित एकाच पक्षाने, एकाच परिवाराने राज्य केले तेव्हां लोकशाही होती आणी आता लोक शाहीला धोखा कसा...
अगदी बरोबर , सुरवातीला काँग्रेस सत्तेत होती ते साहजिक होते तोच स्वान्त्र्यतील मुख्य पक्ष होता ,, पण नन्तर तो पक्ष ना राहता कुटुंबाचे चराऊ कुराण झाले हे आज काळ जी लोक "लोकशाही बुडाली" असा टाहो फोडत आहेत त्यांना दिसत नाही वर मखलाशी अशी कि " डॉक्टर चा मुलगा डॉक्टर होत तर राजकारणात काय बिघडले ?"
काँग्रेस मध्ये खरंच अंतर्गत लोकशाही असती तरी फारशी चिंता नसती

आणि लोकशाही टिकेल कि नाही ह्याची ज्यानना येवधी चिंता आहे त्यांना हे सुद्धा दिसत नाही कि निदान आज दीवपक्षीय लोकशाही तरी होईल ( काँग्रेस वर आली तर )

सिम्पथी वर जेव्हां राजीव जी चारशे पार गेले त्याचे काय....

हि सहानुभूती सुद्धा कशी मिळवली तर "सॉफ्ट हिंदुत्व " वापरून केशरी फुलात गुंडाळलेले अस्थी कलश देशभर फिरवून

विवेकपटाईत

या धाग्यात कोणत्या ही पक्षाच्या नेत्या आणि पक्ष विरुद्ध अनुचित टिप्पणी केली नाही तर धागा जिवंत राहील.
फक्त मतदान आणि कोण जिंकणार इत्यादी बाबत चर्चा करा. उदा. उत्तर भारतात ६० टक्के पेक्षा कमी मतदान भाजप साठी नुकसानदेह.

बारामती, माढ्यात निवडणूक आयोगाकडून तुतारी नावाचे आणखी एक चिन्ह दुसऱ्या उमेदवारास देण्यात आले आहे. तुतारीस मत देणाऱ्या चिन्हात गोंधळ उडावा ह्यासाठीच निवडणूक आयोगाने हे केलंय अस दिसतंय.

कॉमी

जयंत पाटील ह्यावर बोलले. साताऱ्यात शशिकांत शिंदेंचा पराभव ह्या चिन्हामुळे झाला असे त्यांचे म्हणणे आहे. एकूण महाराष्ट्रात ह्या चिन्हाला चार लाख मते पडली !

जर साताऱ्याचा दावा खरा असेल तर ९/१० स्ट्राईक रेट असेल.

कॉमी. शरद पवारांचा स्ट्राईक रेट शंभर टक्के आहे. साताऱ्यातील उमेदवार त्या एका चिन्हामुळे पडला तर रावेर मधील उमेदवार हा मुद्दाम दुबळा दिला होता पवारानी, खडसेंसाठी.
१०/१० जागा जिंकलेत पवार.

बाबुराव

पहिला निकाल भ्रष्टाचाराचा सूरत स्टोरी
अर्थात सूरतची लूट.

सुरत लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने नीलेश कुंभानी यांना उमेदवारी दिली होती. मात्र अर्ज तपासणीत त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. नीलेश कुंभानी यांच्या नामांकनावर तीन प्रस्तावकांनी स्वाक्षरी केली होती, *परंतु नंतर त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे शपथपत्र सादर केले की नामनिर्देशनपत्रावरील स्वाक्षऱ्या त्यांच्या नाहीत.*

दुस-या उमेदवारास काँग्रेसने पाठिंबा दिला तर, तर त्याचाही अर्ज छाननीत उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला.

आणि इतर नऊ उमेदवारांनी आत्ता मुख्य लढत देणाराच उमेदवार राहिला नाही मग आम्ही लढुन काय करायचं असं 'कारण' देत उमेदवारी परत घेतली.

वाह रे लोकशाही. वाह रे निवडणुका.

उत्तर कोरियात जश्या निवडणुका होतात तश्या होताहेत भारतात. सर्व सरकारी यंत्रणा भारत सरकारचा पगार घेऊन मोदींसाठी काम करताना दिसताहेत. ईडी, नी निवडणूक आयोग ह्यात आघाडीवर आहेत.

कांदा लिंबू

चला, या प्रतिसादासाठी घ्या तुमचा मेहनताना तुमच्या IT सेल कडून

2 rupees coin

सुबोध खरे

कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?

खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.

भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन केला तर तो देशद्रोह. पण भाजप मध्ये राहून केला तर राष्ट्रहित.
कुटुंबातील सदस्याना इतर पक्षानी उमेदवारी दिली तर ती घराणेशाही पण भाजपात तस असेल तर ती घराणेशाही नाही. (उदा. फडणवीसांबद्दल डॉ. साहेबांच मत)
काँग्रेस सोबत शिवसेना गेली तर हिंदुत्व सोडलं, पण मेहबूबा नी अजितदादा सोबत भाजप गेली तर हिंदुत्व सोडल नाही.
त्याच प्रमाणे भाजप समर्थक असेल तर तो खांद्याच्या वर बळकट पण भाजप विरोधक असेल तर तो खांद्याच्या खाली बळकट.
- भाजप प्रेमी, खोटयांचे समर्थक डॉ. श्री. खरे.

कांदा लिंबू

भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन केला तर तो देशद्रोह. पण भाजप मध्ये राहून केला तर राष्ट्रहित.

भाजपमध्ये राहून कोणी, कुठे, केव्हा भ्रष्टाचार केलाय?

काही पुरावे की नेहमीसारखी आपल्या डूआइडीपणाला जागून खोटी विधाने?

कांदा लिंबू

काही पुरावे?

---

चला बटाट्यापासून सोनं बनवण्याची मशीन शोधूया.

ह्याचक अर्थ टॉक व्हिडीओ तुम्ही पूर्ण पाहिला नाही. तुम्ही आता अंधभक्त डिक्लेर झालात. अभिनंदन.

भक्त

तुमच्या अजुनही लक्षातच येत नाहीये . =))))

सर्वसामान्य हिंदु हा सेक्युलर , शांतताप्रिय , मध्यममार्गीच आहे. आणि त्या सर्वांच्यासाठी भक्त हा एक अत्यंत पवित्र शब्द आहे , संकल्पना आहे . भक्तीयोग हा तीन
प्रधान वैदिक योगांमध्ये ज्ञानयोग, राजयोग, कर्मयोग ह्यांमध्ये नसुनही त्याला ह्या तिन्ही पेक्षा उच्च स्थान आहे हिंदु धर्मात.

तुमच्या अन सर्वच विरोधी पार्टीतील सो कॉल्ड लिबरल लोकांच्या ह्या अशा भक्त शब्दाच्या विद्रुपीकरणाने सर्वसामान्य हिंदु देखील दुखावला जाऊन भाजपाकडे झुकत आहे. अर्थात आम्हाला आनंदच आहे :)

a

बाबुराव

अमृतकाळात तो दिवस दूर नाही जेव्हा कंगनाचे आत्मचरित्र, तडीपारचे किस्से आणि गटर गॅसचे विज्ञान शालेय अभ्यासक्रमात शिकवले जाईल.

बचू कडू ह्या परवानगी घेऊन ठरलेल्या सभेच्या जागी त्याचवेळी नवनीत राणा नी अमित शहांची सभा होणार आहे. ह्या विरुद्ध बच्चू कडुनी आंदोलन उभारलंय पाण पोलीसबळाचा वापर करून भाजप हे आंदोलन उधळून लावायचा प्रयत्न करतंय. पोलीसही कायद्याविरूध वागताना दिसताहेत. महाराष्ट्राची कायदव्यवस्था रसातळाला जात आहे.

२५००० कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार, सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट.
https://marathi.hindustantimes.com/amp/maharashtra/shikhar-bank-ghotala…

सुबोध खरे विचारत होते ना? भाजप सोडून कुणी जातक का नाही?? :)

या पूर्वी महावीकास आघाडी सरकारच्या काळात पहिला क्लोजर रीपोर्ट सादर झाला होता.

आर्थिक गुन्हे शाखेनं आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांनादेखील क्लीन चिट दिली आहे. 'रोहित पवारांच्या बारामती ऍग्रोनं कन्नड साखर कारखाना खरेदी केला, तेव्हा बारामती ऍग्रोची आर्थिक स्थिती चांगली असल्याने पैशांची हेराफेरी करण्यात आली नाही,' असं आर्थिक गुन्हे शाखेनं क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
------

नवाब मालिकांवर भाजपचा वेगळाच राग होता. शाहरुखच्या मुलाला त्यानी बाहेर काढले.

कंजूस

कॉन्ग्रेस नवीन साम्यवाद आणू पाहतंय. ( त्यांच्या निवडणूक जाहिरनाम्यातून जाहीर)

पण
१)कोण श्रीमंत आहे आणि त्याच्याकडे किती अतिरिक्त संपत्ती आहे हे कसं ठरवणार?
२)कोण गरीब योग्य लाभार्थी आहे हे कसं ठरवणार? देशात ८० - ९० टक्के गरीब असतील तर?
३) प्रथम संपत्ती मोजायचे काम करावं लागेल.

--------------
गरीब युवक आणि महिलांना वार्षिक एक लाख रुपये वाटणार.........
१) हे लाभार्थी कसे वेचणार / निवडणार अगणित गरीबांतून?
२) हे पैसे कुठून आणणार?
३) हा ओघ किती वर्षे ठराविक लाभार्थींना मिळणार?
४) पैसे मिळू लागल्यावर ते लाभार्थी गरीबच राहण्यासाठी काय करतील? युवकांसाठी हा नवा आशावाद आहे काय?

-------------------
त्या पक्षाचे वैचारिक कुंभ कोण?
असे विविध प्रश्न डोक्यात घुमत आहेत.

अमर विश्वास

निवडणुकीचा धागा असल्यामुळे धमाल प्रतिसाद येणार याबद्दल खात्री होती ... पण म्हणावे तसा निवडणूक ज्वर वाढलेला दिसत नाही ...

जरा जास्त हिरीरीने भाग घ्यावा ही नम्र विनंती ...

बाकी तीर्थरूपांकडून वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीपैकी अर्धीच वारसांना मिळणार आणि अर्धी सरकारजमा होणार हे भारी आहे ...
पण आत्ता तरी आम्हाला भीती नाही ...

कारण .......
आएगा तो मोदीही

तीर्थरूपांकडून वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीपैकी अर्धीच वारसांना मिळणार आणि अर्धी सरकारजमा होणार हे भारी आहे ...

बाय द वे...

पण जमीन किलो मध्ये मोजणार की फॅरेनहीट मध्ये?

अमर विश्वास

मुवि ...

<<पण जमीन किलो मध्ये मोजणार की फॅरेनहीट मध्ये?>>>

ते तुम्ही पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजता का उत्तरेकडून दक्षिणेकडे यावर अवलंबून आहे

अहिरावण

नाही हो.. जमीन वरुन खाली मोजतात ना? की माझं काही चुकतंय?

सध्या तरी , हा प्रश्न गुलदस्त्यात आहे..

पण,

आमच्या, ३-१३-१७६०, ह्या ग्रहावर, दर तीन दिवसांनी सरकार बदलते, तशी एकके बदलतात....

जमल्यास , https://www.misalpav.com/node/39968, ह्या प्रवास प्रवास वर्णनावर , चक्कर टाकलीत तरी चालेल..

अमर विश्वास

तुमचं बरोबर आहे ... वरून खालीच मोजतात ..

प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी गीतेत सांगितले आहे .. ऊर्ध्वमूलम अधःशाखम..

जमीन मोजतानाच मुळं वर आले असणार

बाय द वे...

जमीन किलो मध्ये मोजायला, आग्नेय ते नैऋत्य आणि ईशान्य ते वायव्य, अशी सुरुवात केली तर , आणि नैऋत्य ते आग्नेय किंवा वायव्य ते ईशान्य अशी उलट सुरुवात केली तर, किती किलो फरक पडतो? ह्यावर पण काही परमपूज्य लोकांची टिप्पणी असेलच....

फर्स्ट क्लासचा विमान प्रवास, फाईव्ह स्टार हॉटलमध्ये होणारे वास्तव्य, सुरक्षा रक्षक इत्यादी...

काही गोष्टी ह्या पुरस्कार आधारीत असतात... उदा. पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न इत्यादी....

त्यामुळे उद्या एखाद्या योग्य व्यक्तीला जर एखाद्या कंपनीने, अथवा एखाद्या देशाच्या घटनेने, सर्वोच्च पद बहाल केले तर त्या पदाच्या अनुषंगाने त्या त्या सवलती किंवा फॅसिलिटी मिळतात...

मी एका कंपनीत, मॅनेजर म्हणुन काम करत असताना मला व्यक्तिगत suit मध्ये फुकट राहायची व्यवस्था करण्यात आली होती. पण मी जेंव्हा चतुर्थ श्रेणी कामगार म्हणुन काम करायची सुरुवात केली तेंव्हा Servent Quartet मध्ये चार कामगार लोकांबरोबर रहात होतो.

बाय द वे,

तूम्ही पण लवकरात लवकर सर्वोच्च पदावर पोहोचा.

अहिरावण

सर्वोच्च म्हणजे सर्वात उंच ना?

आमच्या मते कैलास शिखर सर्वात उंच ! म्हणजे ते कैलासवासी व्हावे अशी इच्छा आहे का तुमची? असल्यास निषेध. ते रौरव नरकात जाणार असल्याचे चित्रगुप्त (मिपा सदस्य नाहि) यांनी नुकतेच शिव पार्वतीशी संवाद साधतांना सांगितल्याचे नंदीने सांगितले असे आमच्या सुत्रांकडून कळते