राजकारण

२०२४ लोकसभा निवडणूक.

Primary tabs

लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील.
पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल.
दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल.
तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल.
चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल.
पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल.
सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल.
सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल.

महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.

पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज ( बुधवारी) नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या सभेपूर्वी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे पुढे आलं आहे. तसेच कांदा उत्पादक शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे.
https://www.loksatta.com/maharashtra/rohit-pawar-criticized-pm-narendra…

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खलिस्तानी नाहि घोषित करता येणार हे अंधभक्तांच दुःख मी समजू शकतो.

कांदा लिंबू

केजरीवालांची भविष्यवाणी

आपल्याच पक्षाच्या महिला खासदाराला आपल्या हस्तकाकरवी मारहाण करविणारे?

कांदा लिंबू

त्याला इडी कशाला लागते? बाईसाहेबांनी तक्रार केली म्हणजे झालं.

कांदा लिंबू

मुद्याचंच बोलतोय.

पण तुमचे साहेब तर गुद्द्यांचच बोलत आहेत. बाई माणसावर हात उचलण्याची पाळी आली! अरेरे किती ते अधःपतन!

कांदा लिंबू

या फुरोगाम्यांवर देखील काय पाळी आलीये! कुणाचं समर्थन करावं लागतं आहे!

माणसावर हात उचलण्याची पाळी आली! ब्रिजभुषण, रेवण्णा ह्यांनीं केलेले बलात्कार त्याचं काय?? मोदी साहेब मेट मागत फिरतात ह्यांच्यासाठी.

कांदा लिंबू

मग जज मोदीने निर्णय सुनावला का?

ते जज कुठे होते? ते तर बिहारची माजी उपमुख्यमंत्री होते.
परवाच निवर्तले.
त्यांना श्रद्धांजली.

दरम्यान परवा न्या. अभय ओक यांनी ईडीची अक्राळविक्राळ वाढलेली आणि सतत विरोधकांना भोसकण्यासाठी वापरली जाणारी, खूपच लांब वाढलेली घाणेरडी नखं काढून फेकून दिली. ईडीला पार शेळी करून टाकली.

Prevention of Money Laundering Act अर्थात पीएमएलए मध्ये मोदी शहांनी दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर २०१९ मध्ये घातक बदल केले आणि वाॅरंटशिवाय ईडी कोणालाही कधीही अटक करू शकते अशी तरतूद केली. ती तरतूद विरोधकांचा छळ करण्यासाठी होती हे गेली पाच वर्ष दररोज दिसत होतं. याच आधारे भ्रजपानं पाच वर्ष देशात अनैतिक आणि घृणास्पद धुमाकूळ घातला, विरोधी पक्षात दहशत माजवली.

परवा न्या. ओक यांनी नि:संदिग्धपणे सांगितलं की अटकेचे आदेश देण्याचे अधिकार फक्त कोर्टाकडे आहेत, ईडीकडे नाहीत. हा फार महत्वाचा निर्णय आहे. ईडीच्या दहशतीचं जे मुख्य कारण होतं- कधीही अटक करणं आणि जमानत मिळू न देणं- त्यालाच सर्वोच्च न्यायालयानं सुरूंग लावला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे.
- विश्वंभर चौधरी ह्यांच्या चेपू भिंती वरुन.
आता खुनशी जोडगोळीचं कसं होणार?? सेटलमेंट, तोड्यापाण्या, भाजपभरती, पक्षफोडी, गद्दार तयार करणे ह्या गोष्टी कश्या करणार?? :)

सुबोध खरे

भुजबळ बुवा

त्या विश्वभार चौधरीचा काय ऐकताय ?

अटक करणे हा पोलिसांचा मूलभूत अधिकार आहे. त्यानी नाहीतर कुणी अटक करायची?

Supreme Court on Thursday ruled that Enforcement Directorate officials have no power to arrest an accused if he had not been arrested before the special court took cognisance of the complaint.

Once cognisance is taken ED officials cannot exercise the power of arrest of the accuused

Read more at:
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/110187365.cms?utm_source…

एकदा मामला न्यायालयात गेला कि त्यानंतर इ डी ला संशयिताला अटक करण्याचा अधिकार नाही.

एक तर त्या विश्वभार चौधरीने काही तरी खोडसाळ पणे लिहिलेले असेल.

किंवा आपण नीट न वाचताच (किंवा आपली कायद्याची समाज तितपतच आहे) कळफलक बडवलाय -जे आपण कायमच करत आला आहात.

किंवा आपली कायद्याची समाज तितपतच आहे हो. कायद्याची समज कमी आहे माझी, मी काही कायद्याचा विद्यार्थी नाही. पण आली ऑर्डर की सूट करा तोड्यापण्या हे ईडीच बंद होईल ना? जर केस कोर्टात गेली तर?? तास झाल तर मग खुनशी जोडगोळी तोड्यापाण्या, भाजपभरती, सेटलमेंट कशी करणार अशी चिंता मला लागून आहे.

सुबोध खरे

अशी चिंता मला लागून आहे.

हायला

भाजप ची चिंता तुम्हाला लागली आहे?

प्रकृती तपासुन घ्या बरं

काही तरी गंभीर आजार झाला कि काय?

भाजपची नाय हो. खुनशी जोडगोळीची, कारण सत्तापिपासू आहेत दोघे, पुलवामा खर्च घडला की घडवला हेच कळत नाहीये.

पुलवामा खर्च घडला की घडवला हेच कळत नाहीये.

ज्या अर्थी, काँग्रेसचा ह्या गोष्टी वर विश्वास नाही, त्याअर्थी, ही गोष्ट नक्कीच पाकिस्तानने घडवलेली असावी ...

काँग्रेस पक्ष, नेहमीच, चीन आणि पाकिस्तानची तळी उचलत असतो...

भाजपला आर येस येस ची गरज नाही. :)
https://indianexpress.com/article/political-pulse/nadda-on-bjp-rss-ties…
संघाच्या लोकानी आता सतरंज्य उचलायला नी फुकट जेवायला भाजपच्या कार्यालयात जाऊ नये नाहीतर थोबाडावर चप्पल हाणतील :)

भाजपा आयटी सेल च्या माध्यामातुन येणारी अनागोंदी आणि उठ म्हटलं की उठ आणि बस म्हटलं की बस अशा ताब्यात असलेल्या मीडियाच्या पुढे जाऊन 'ध्रुव राठी' एकटा सरकारला पुरला बघा.

जय-पराजय निवडणुकीत होत राहतील. पण या निवडणुकीत विरोधी पक्षाला माध्यमांचा वापर करुन जे जमले नाही ते ध्रुव राठीने सरकारचे भांडाफोड़ करणारे व्हीडीयो टाकून केले आणि विरोधी पक्षाला ताकद दिली असे वाटते.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे

बाकी ठीक आहे

पण एका बुणग्याच्या शक्तीवर विरोधी पक्ष उभा असेल तर त्यांचा पाया किती भुसभुशीत आहे हे समजून येते.

हाच ध्रुव राठी "रुस्तुमेजमान" हा शिवाजीमहाराजांच्या सैन्यात सैनीक होता म्हणून म्हणतो त्याचा इतिहास किती पक्का असावा?

“जर मोदींना स्पष्ट बहुमत मिळालं नाही, तर ते…”, शरद पवारांचं मोठं विधान; निवडणूक निकालांबाबत केलं भाष्य!

https://www.loksatta.com/elections/sharad-pawar-claims-narendra-modi-wi…

-------
“महाराष्ट्र नेहमीच प्रगती करणाऱ्या अग्रगण्य राज्यांपैकी एक राहिला आहे. जर पुन्हा महाराष्ट्राला तिथे न्यायचं असेल, तर काही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करावं लागेल. एकतर इथलं गुंतवणुकीसंदर्भातलं सकारात्मक वातावरण पुन्हा निर्माण करावं लागेल. जर कुणाला भारतात गुंतवणूक करायची असेल, तर पूर्वी त्यांची पहिली पसंती महाराष्ट्रासाठी होती. पण आता ते घडताना दिसत नाहीये. हे राज्यातल्या नेतृत्वामुळे घडत आहे. सरकार नियंत्रित करणाऱ्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल असं मला वाटत नाही”, असं शरद पवार म्हणाले.
------

एन्रॉन प्रकरण, कोकणातील रिफायनरी प्रकरण, मेट्रो प्रकल्पाला झालेला विलंब, बुलेट ट्रेनला झालेला विलंब, बघीतला तर , कशाला कोण उगाच गाजरे हुंगत बसेल?

“महाराष्ट्र नेहमीच प्रगती करणाऱ्या अग्रगण्य राज्यांपैकी एक राहिला आहे. जर पुन्हा महाराष्ट्राला तिथे न्यायचं असेल, तर काही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करावं लागेल. +१
महाराष्ट्रतील प्रकल्प गुणरातला पाठवणाऱ्या नी महाराष्ट्र बकाल करण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या भाजप पक्षाला महाराष्ट्रातून हद्दपार करायला हवे. पवार साहेबांमागे महाराष्ट्रातील तरुण नी महाराष्ट्रप्रेमी नागरिक उभे आहेत.

सुबोध खरे

पवार साहेब काहीतरी संदिग्ध विधान करतात. ज्याला शेंडा किंवा बुडखा नसतो

आणि "चहा बिस्कीट" पत्रकार त्यांचा उदो उदो करताना साहेब किती हुशार म्हणून गुणगान गात असतात

पवार साहेबांमागे महाराष्ट्रातील तरुण नी महाराष्ट्रप्रेमी नागरिक उभे आहेत.

असं होतं तर साहेबाना आजतागायत मुख्यमंत्री पदाची ५ वर्षे पूर्ण करता आली नाहीत कि कधी ७५ च्या वर आमदार आणि ५-६ च्या वर खासदार निवडून आणता आले नाहीत. आता तर काय, पक्ष आणि पक्ष चिन्ह (घड्याळ) सुद्धा हातात राहिलं नाही.

आयुष्यभर विद्वेषाचे राजकारण करणाऱ्या पवारांना आयुष्याच्या संध्याकाळी आपलय कुटुंबाची आणि पक्षाची वाताहत होताना पाहायची वेळ आली.

काळ सूड उगवतो तो असा.

आयुष्यभर विद्वेषाचे राजकारण करणाऱ्या ते तर सनातन्यना पुरून उरून पुरोगामी विचार महाराष्ट्रात रुजवते झाले. मग विद्वेषाचे राजकारण आले कुठून?? संघात तर ते कधीच गेले नाहीत.

आयुष्याच्या संध्याकाळी आपलय कुटुंबाची आणि पक्षाची वाताहत होताना पाहायची वेळ आली. वाताहत कुणाची झाली ते कळेलच काही दिवसांनी. शिवाजी महारजानीही संभाजी महाराजना दिलेरखानाकडे पाठवले होते. काही वर्षांनी औरंग्या महाराष्ट्रातच खपला. तसा हा औरंग्याही खपेल.

वेडा बेडूक

आवरा!

डॉ. साहेब, आपल्या इतका जालावर कोणत्याच विषयाचा कोणाचाच आपल्या इतका जगात अभ्यास कोणाचाच नाही, हे मला जवळ जवळ मान्य झालं आहे. शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्राचं चार-पाच वेळा मुख्यमंत्रीपद भुषवलं, केंद्रात संरक्षण मंत्री राहीले, कृषीमंत्री राहीले, महाराष्ट्राच्या राजकारणात याही वयात दबदबा राहिला. भले आपल्या दृष्टीने त्यांचं राजकारण द्वेषाचं राहीलं असेल पण महाराष्ट्रभर शरद पवारांची आजही वय वर्ष ८५ असतांना ते बोलले की त्यांचं बोलणं एक राष्ट्रीय बातमी असते, राजकारणातली एक महत्वाची घडामोड असते, याचं नेमकं काय कारण असेल हे आपल्याकडून जाणून घेऊ इच्छितो. उत्तर विषयानुरुप दिलेच पाहिजे अशी अपेक्षा नाही.

-दिलीप बिरुटे

तीन उदाहरणे देतो...

१. पुलोद स्थापन केली आणि शेकाप संपला.. हा योगायोग..

२. मागच्या निवडणुकीत, मनसेला पाठिंबा दिला आणि मनसे जवळपास संपुष्टात आली...

३. उद्धव ठाकरे यांच्या बरोबर युती केली आणि शिवसेना फुटली...

-----

बाय द वे,

मी तर, जेमतेम दहावी पास शेतकरी आहे. मला तरी, इतकेच समजले की, माननीय शरद पवार यांच्या हातात जोर आहे. ज्या, पक्षाच्या खांद्यावर किंवा व्यक्तीवर हा हात पडतो, त्या व्यक्तीला कुणीच विसरू शकत नाही....

सुबोध खरे

शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्राचं चार-पाच वेळा मुख्यमंत्रीपद भुषवलं

एकदाही ५ वर्षे कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.
याचे उत्तर देता येईल का?

केंद्रात संरक्षण मंत्री राहीले,

तेंव्हा लष्कराचे कॅन्टोन्मेंट खाजगी करण्याचा आणि भूखंडाचे श्रीखंड खाण्याचा कुटील डाव रचला होता. सुदैवाने केंद्रातील नोकरशाही आणि लष्करी अधिकाऱ्यांनी हा हेतू हाणून पाडला अन्यथा आज पुण्यातील लष्कर भाग हा एकमेव हिरवा असलेला पट्टा काँक्रीट जंगल झाले असते.

कृषीमंत्री राहीले

शेतकऱ्यांचा एक तरी प्रश्न तडीस लावला का? सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यांच्याच काळात झाल्या आहेत

आणि

पुण्याच्या इतर भागातील पाणी त्यांनी बारामतीला वळवून घेतले. सत्तेचा गैरवापर करून आपल्याच पोळीवर तूप ओढून घेण्याचा हा प्रकार अत्यंत निम्न दर्जाचा आहे.

https://timesofindia.indiatimes.com/city/kolhapur/maharashtra-bid-to-en…

त्यांचं बोलणं एक राष्ट्रीय बातमी असते. याच्या इतका ताजा विनोद मी बऱ्याच दिवसात ऐकलं नव्हता.

बिरुटे सर

चहा बिस्कीट पत्रकारांच्या रांगेत तुम्ही सुद्धा उभे असावे यासारखी नामुष्कीची गोष्ट दुसरी नसावी.

साहेबाना आजतागायत मुख्यमंत्री पदाची ५ वर्षे पूर्ण करता आली नाहीत कि कधी ७५ च्या वर आमदार आणि ५-६ च्या वर खासदार निवडून आणता आले नाहीत. आता तर काय, पक्ष आणि पक्ष चिन्ह (घड्याळ) सुद्धा हातात राहिलं नाही.

आयुष्यभर विद्वेषाचे राजकारण करणाऱ्या पवारांना आयुष्याच्या संध्याकाळी आपलय कुटुंबाची आणि पक्षाची वाताहत होताना पाहायची वेळ आली.

यातील एक तरी मुद्दा खोडून काढता येतो आहे का हे विषयाला फाटे न फोडता सांगा बरं.

डॉ.साहेब, आपल्या इतका जाणकार अभ्यासु माणूस जगात नाही अशी पहिलीच ओळ लिहिली आहे. त्यामुळे सगळी उत्तरं तुम्हालाच माहिती आहेत. आम्ही येरे गबाळ्यांनी आपल्या समोर काय लिहावे ?

महाराष्ट्राचे राजकारण आणि घड़ामोडीच अशा घडत होत्या की ते चार वेळा मुख्यमंत्री राहुनही कार्यकाळ पूर्ण करु शकले नाही, त्यामुळे त्यांच्या राजकीय कर्तुत्वाला नाकारायचं काहीही कारण नाही. बाकी, कृषिमंत्री असतांना स्वामिनाथन आयोग नेमला, शेतक-यांची कर्ज माफी केली, शेतमालाला भाव दिला, नव्या योजना दिल्या. अधिक इथे वाचावे. सरंक्षण मंत्री असतांना काय केलं. थोडंसं गुगलं असतं तरी बरीच माहिती मिळेल. आपण संरक्षण विभागात होता तर अधिकची माहिती आपणच सांगितली पाहिजे.

पण, काय आहे, आपल्या विचारात अंधभक्तीमुळे आपले विचार इतके संकुचित होत चालले आहे की रातांधळेपणासारखं तुम्हाला दुसरं काहीही दिसत नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. काळजी घ्या.

-दिलीप बिरुटे

आग्या१९९०

क्वांटीटीपेक्षा क्वालिटी बघायची असते. नाहीतर विश्वगुरू दहावर्ष राहून गटारातून गॅस काढत बसले. गॅस निघाला नाही पण फुगे उत्साहाने उडवले.

लेख वाचले. आवडले. पवारांसारख्या द्रष्ट्या पुरोगामी विचारांच्या नेत्याकडे महाराष्ट्र होता म्हणूनच आज आपण प्रगत होऊ शकलो नाहितर शेणपट्टा असता महाराष्ट्र. भाजप्यांनी वाट लावलीय शेणपट्ट्याची.

पवारांसारख्या द्रष्ट्या पुरोगामी विचारांच्या नेत्याकडे महाराष्ट्र होता म्हणूनच आज आपण प्रगत होऊ शकलो ....

------
मग, बुलेट ट्रेन बाबतीत आणि मेट्रो कार शेड बाबतीतली दिरंगाई, का रोखली नाही?

ते पण सोडा, राजन नायर आणि टेल्को मधील संपा बाबतीत, संप लांबू नये, म्हणुन का प्रयत्न केले नाहीत?

ते पण सोडा, गिरणी कामगारांच्या संपाच्या वेळी, गिरणी कामगारांच्या बाजूने मैदानात का उतरले नाहीत?
-----