Skip to main content

(राहिले रे अजून देश किती)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 13/07/2015 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
राहिले रे अजून देश किती? ट्वीटरावर तुझाच मेस किती! आजची रात्र ब्रिक्स देशांची आज टोप्या किती नि ड्रेस किती ? मी कसे शब्द थोपवू त्यांचे? भाविका! लपवशील फेस किती? ट्वीट माझे विरंगुळा त्यांचा ट्रॉल्सना मी करेन फेस किती? बोलताना कुणीतरी हसले पेटले भक्त ते विशेष किती! हे असे गेम? ही अशी भाषा? मी धरावे अजून वेश किती? रोज त्यांना करून ब्लॉक, सख्या! मी करू पोलिसांत केस किती? -- स्वामी संकेतानंद ९ जुलै, २०१५ ( पळतो आता................)
काव्यरस

"द्वारकेचा राणा"

लेखक शैलेन्द्र यांनी सोमवार, 13/07/2015 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
मुखी नाम विठ्ठल, गळा तुळशीमाळा, वाहतो प्रवाह ओलांडून काळा, चाले रीघ आता, सुखाच्या शोधात , रूढीचे आवर्तन की भाव भोळा , उसळती अंतरी, कैक सलतात व्यथा , मनातून पाहती पंढरीच्या नाथा असे रान तान्हे परी फुटे जीवा पान्हा, समूहाची धुंदी नादावते माथा, लाख शंका मनी, परी पाहता या जना पेशीतून वाजे मृदुंग नी वीणा मन माझे डोले, पडती तालात पाउले रक्तातून वाहे द्वारकेचा राणा - शैलेंद्र
काव्यरस

रिकामी घंटा, लोलक गायब

लेखक तिमा यांनी सोमवार, 13/07/2015 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
वरील शीर्षक माझे नसून एका कल्पक नाटककाराच्या डोक्यातून निघालेले हे घोषवाक्य आहे. नाटकाचे नांव आहे 'शेवग्याच्या शेंगा'. नाटकात विस्तार केलेली मध्यवर्ती कल्पना, 'एकटेपणा', खूपच चांगली आहे. स्वाती टिपणीस, संजय मोने सारखे गुणी कलाकार आहेत. पण.... रविवारी दुपारी आम्ही पार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहात स्थानापन्न झालो आणि थोड्याच वेळांत, आमच्या मागे एक ग्रुप येऊन बसला. बसल्या क्षणापासून त्यांचा कलकलाट चालू झाला. त्यांत ते सहा जणांची सेल्फी काढत होते. आम्ही आपले, नाटक सुरु झाल्यावर तरी ही बडबड संपणार की नाही, या विवंचनेत होतो. नाटक सुरु झाले, कादंबरी कदमने स्टेजचा ताबा घेतला.

राधाबाई

लेखक प्रशु यांनी सोमवार, 13/07/2015 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
राधाबाई, तुझं काही खरं नाही!! गोकुळ त्यागीले, वृंदावनहि, मथुरेत ही नाही ! नेल्या माता, दादा ताता, भद्रा आणि गाई ! अठरा पद्म गोपहि नेले; तुज पुसले देखील नाही !! राधाबाई, तुझं काही खरं नाही!! कालिंदिच्या त्या तटा वर होता जेव्हा रावा ! पुनवेच्या त्या रासेला वटातळी वाजवीत होता पावा ! गोपिकांच्या गराड्यातं; तव विस्मरण झाले पाही !! राधाबाई, तुझं काही खरं नाही!! साता समुद्रा पार वसे ती सोन्याची द्वारिका ! वसतो तेथे कृष्ण मुरारी सवे आठ बायका ! आता कैचा, परत यायचा, फिरकायाचा नाही !! राधाबाई, तुझं काही खरं नाही!! गावहि उठला, आप्तही फिरले, गाळी मारे सास ! अनयानेहि दिली त्यागुनी उरली सुरली आस ! मरणासन्न ह
काव्यरस

कांदे-पोहे.

लेखक Sanjay Uwach यांनी सोमवार, 13/07/2015 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील कुठ्ल्याही शहरातील उपहार गृहात गेला, तर महाराष्ट्रीयन कोणताही पदार्थ कमी प्रमाणात मिळेल.त्या मानाने उत्तरे कडून आलेले सामोसे,छोले भटोरे,कचोरी किंव्हा दक्षिणे कडील इडली,डोसा,उताप्पा वगैरे हे पदार्थ सहज उपलब्ध होतील. थोडक्यात आटके पार झेंडा लावलेल्या, महाराष्ट्रातील पराक्रमी पुरुषांची अनेक किस्से, आपणाला नावा सहित सांगता येतील, मात्र महाराष्ट्राचे इतर वेळी खाण्याचे स्पेशल पदार्थ म्हणावे तितके सांगता येणार नाहीत कींव्हा सहज उपलब्ध होणार नाहित.इतर वेळी खाण्यासाठी आसणारे महाराष्ट्रीयन पदार्थ फ़ारच कमी आहेत क़िव्हा काळाच्या ओघात ते आपण सोडून दिले असणार .

वादळ

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 13/07/2015 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
वादळ उठत.. एक मनात... एक दर्यात पड-झड़ होतेच न दोघात मोठी कुठली? सांग माझ्या कानात मनात... भावना उध्वस्त; दर्यात जीव अस्वस्थ! मनातल्या नात्यात द-या बनतात; सागरातल्या द-या भरून निघतात! दर्याच्या वादळात आधार मनाचा मनाच्या वादळात आधार कोणाचा? सारंगाची नजर किनारा शोधते उध्वस्त मन मात्र कायमचे हरते

आठवणीतला श्रावण

लेखक सह्यमित्र यांनी रविवार, 12/07/2015 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण! मराठी सारस्वतात आजवर अनेकांनी हाताळलेला विषय. श्रावण आहेही तसाच. ह्या विषयावर आधीच एवढी उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती झालेली असताना, मला त्यात भर घालण्याचे कारण नाही. पण तरीही काळाच्या ओघात हा आठवणीतला श्रावण निसटून जाऊ नये म्हणून हा प्रयत्न. श्रावण म्हणजे रिमझिमणारा पाऊस, ऊन-पावसाचा खेळ. एकूणच श्रावण म्हणजे पावसाच लोभसवाणे रूप. तसं बघायला गेलं तर पाऊस मला आवडतोही आणि नाहीही. पावसाचं आणि माझं जन्मापासूनचे नातं आहे. म्हणजे माझा जन्म ७ जूनचा असल्याने पावसाचं आणि माझं आगमन अगदी हातात हात घालून झालेलं आहे. माझ्या जन्माच्या दिवशी पुण्यात गारांचा पाऊस झाला होता म्हणे.

द स्केअरक्रो - भाग ‍१०

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 12/07/2015 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग ९ द स्केअरक्रो भाग १० (मूळ लेखक मायकेल कॉनेली) बुधवारी सकाळी नऊ वाजता मी स्किफिनो अँड असोसिएट्सच्या ऑफिसबाहेर उभा होतो. ऑफिसचा दरवाजा बंद होता. लास वेगासच्या जवळ असलेल्या चार्ल्स्टन नावाच्या छोट्या उपनगरात ही चार मजली इमारत होती. मी आत्ताच मानसिकदृष्ट्या थकलो होतो. इथे कुठेही साधी बसायलाही जागा नव्हती. जे शहर नशीब उजळण्याशी इतकं निगडीत आहे, तिथे मला मात्र मी कमनशिबी असल्याचा अनुभव येत होता. दिवसाची सुरुवात तर चांगली झाली होती.

आईनस्टाईनने माझा स्टोव्ह पळवला

लेखक खटासि खट यांनी रविवार, 12/07/2015 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
आईनस्टाईनने माझा स्टोव्ह पळवला तेव्हां चर्चिल घासलेटच्या साठ्यावर फणा काढून उभा होता मी मार्क्सला म्हटलं पेटवायचं कसं ? त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला सगळंच विझलंय अगदी माओचीही राख झाली आता इंद्रायणीतून भिजलेली गारगोटी काढून त्यावर अभंगांची शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न करतोय मात्र उजवीकडून येणारा मुसळधार भगवा पाऊस म्हणाला रांडेच्या, बघतोच तुला एव्हढ्य़ाचसाठी रोखून धरलेलं कधीचं एका चकमकीसाठी प्राण डोळ्यात आले असताना पुरूष कानात कुजबुजला माणसं पेटवतोस का ? गॅस सिलिंडर्स देईन, फुकटात लागतील तेव्हढे !

संजीव खांडेकरांना नक्की अपेक्षित काय आहे?

लेखक अन्या दातार यांनी रविवार, 12/07/2015 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
यांना नक्की काय हवे?? गेल्या रविवारच्या ’लोकसत्ता’त श्री. संजीव खांडेकर यांचा “मूत्राशयातील शुक्राचार्य” हा लेख वाचनात आला. लेखाची सुरुवात, लै मोठ्या स्कालर लोकांशी असलेली वळख त्यात दिलेले दाखले, याने झाली आणि आपसूकच पुढे काहीतरी चांगले वाचायला मिळेल असं वाटलं. “राईट टू पी/पू” अशी चळवळ सुरु करावी लागणे हे निश्चितच लांछनास्पद आहे. याबाबत खांडेकर अगदी १००% सत्य बोलतात.