Skip to main content

मातृत्व

लेखक शिरीष फडके यांनी शुक्रवार, 14/11/2014 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
मातृत्व मातृत्वाचा एवढा उदो उदो करू नये ज्यामुळे एक दिवस मातृत्वच मातृत्वाला मारक ठरेल. अनेकदा हे वाक्य अनेक लेखकांच्या लिखाणातून किंवा कवींच्या काव्यसंग्रहातून आपल्यासमोर येतं. परंतु आजही या २१व्या शतकात या वाक्याचं गांभीर्य समाजाने लक्षात घेतलं आहे असं आढळून येत नाही. मातृत्व म्हणजे केवळ आई होणं का? आई होणं आणि मूल होणं या दोन्ही गोष्टी एकच आहेत का? मातृत्वाचं आणि पितृत्वाचं समाजातील स्थान, महत्त्व समान आहे का? मातृत्व म्हणजे नक्की काय? मातृत्वाचा उदो उदो म्हणजे नेमकं काय? मातृत्वाबद्दलचे समज आणि गैरसमज कोणते?

ती... भाग ३

लेखक सविता००१ यांनी गुरुवार, 13/11/2014 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
ती... भाग २:http://misalpav.com/node/29423 या सगळ्यावरून जर असं वाटत असेल की मला तिचा कधीच राग आला नाही, अगदीच गुडी गुडी होत सगळं तर तसंही नाही. ती अगदी सत्ता गाजवायची माझ्यावर. ! मी मोठी होत असताना माझं अस मित्रमैत्रिणीच एक जग होत. त्यावर ती आक्रमण करू पहायला लागली. आमचं कुठे जायचं ठरलं की म्हणायची ‘ सवी आणि मी बाहेर जाणार आहोत. ती येणार नाही.’ .. आईशप्पत!! हे काहीतरी भलतं व्हायला लागलं. मी आईपाशी चिडचिड करायला लागले. तिची सगळी परिस्थिती समजत असून. ती मला तिचाच ठेवा समजत होती आणि माझा विश्व बहरू पाहत होतं.

केंद्रसरकारच्या पैशाने निंदनीय जाहिराती

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 13/11/2014 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
आंदमानातील काही आदीवासी समाज आहेत, त्याच प्रमाणे पार्सी समाजाची लोकसंख्या देशात आणि विदेशातही वेगाने खालावते आहे. चांगल्या राहणीमानासाठी उशीरा अथवा आंतरधर्मीय विवाह हे त्याचे मुख्य कारण आहे असे म्हटले जाते. पार्सी लोकांना जन्मदर वाढवण्याच्या दृष्टीने केंद्रसरकारच्या अल्पसंख्यांक खात्याने दहाकोटीच्या जाहीराती काढल्या आहेत इथ पर्यंतही ठिक आहे. पण या जाहीरातीतील काही विधान निश्चितपणे विवाद्य स्वरुपाची आहेत असे वाटते.

दहा रूपयांची सत्ता

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 13/11/2014 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
पैशांना किती किंमत असते? हा प्रश्न तसं पाहायला गेल तर चमत्कारिक वाटतो. त्या त्या नाण्यावर किंवा नोटेवर जी काही किंमत लिहिली असेल ती - हे तर चिमुरडी मुलं- मुलीसुद्धा हसत हसत सांगतील. आपल्याच शहरात आपण वावरत असतो तेव्हा हे बरोबर असतं, पण जरा वेगळ्या जगात भटकायला गेल की सगळ चित्र बदलून जात. मी अर्थातच अमेरिका किंवा युरोपच्या सहलीविषयी बोलत नाही. विनिमयाच माध्यम बदललं म्हणून केवळ तिथे आपल्या पैशांची किंमत कमी होते अशातला भाग नाही. तो एक वरवरचा व्यावहारिक मुद्दा झाला. पण त्याच्या खोलात आत्ता नको जायला.

वाल्मिकीचा वाल्या कोळी होतो तेव्हा ….

लेखक चिन्मय श्री जोशी यांनी गुरुवार, 13/11/2014 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
फडणवीस नानांना सोशल मिडिया वरून पडणारे शिव्या शाप बघून खरच वाईट वाटलं … गेली ५ वर्ष स्वतःचे ईमान न विकता सत्ताधार्यांचे वाभाडे काढणारे फडणवीस अक्षरशः केविलवाण्या चेहऱ्याने स्वताचा बचाव करत होते … त्यांच्या चेहऱ्यावरची अगतिकता लपत नव्हती …पण हे सारे असे का घडले ? भाजपला मिळालेल्या यशाचा इतका माज चढला का ? का सेनेचा मूर्खपणा सगळ्यांना नडला ? शरद पवारांचे मुरब्बी राजकारण सगळ्यांना भारी पडले म्हणावे ? का आपमतलबी आणि अप्पलपोटेपणाचा नमुना म्हणायचा ? या सगळ्या प्रश्नांची माझ्या परीने केलेली हि उकल … भाजप ला यश पचवत आले नाही हे तर खरेच आहे… लोकसभेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होणारे मोदी कुठे आणि बहुज

वॉरेन अँडरसनचा मृत्यू आणि आमेरीकेची रासायनीक गोपनीयता

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 13/11/2014 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
भोपाळ गॅस दुर्घटनेची (कदाचित) जबाबदारी असू शकणार्‍या वॉरेन अँडरसनला भारतीय आणि आमेरिकी राजकीय वरदहस्तामुळे न्यायालयापुढे उभे टाकावे लागले नाही. अखेर २९ सप्टे २०१४ ला त्याला काळानेच वर नेले. त्याच्या मृत्यूची बातमीही काही आठवडे लपवून मग दिली गेली. आम्ही आजकालचे पांढरपेशे भौतीक प्रगतीच्या मीठाला एवढे जागतो की कशाचेच काही वाटत नाही. न्यायालयापुढे त्या माणसाने उभ टाकण्याची गरज नाही हे आमेरीकन लोकांपेक्षा भारतीय लोकांनाच अधीक पटलेल असतं. अर्थात अमेरीकन लोक फक्त परकीयांशीच असे वागतो समजून वागतात पण इतरांसाठी खोदलेले स्वतःसाठीच कामाला येते असे काहीसे आमेरीकेचे झाले.

स्वप्नांचे पान मुंबई

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 13/11/2014 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : आमचे परम मित्र गडप्रेमी वल्ली यांचा कवितेस आग्रह आहे, पण काय करणार कविता करणे २-३ वर्षे झाले सोडले आहे, आणि आता खरेच कविता लिहिण्यासच आवडत नाहिये.. तरीही गेल्या महिन्यात ७ वर्षांनंतर मुंबई सोडली.. आणि जिवनाची एक खरीखुरी मज्जा.. एक अप्रतिम लज्जत.. याला आपण यापुढे मुकनार असे वाटत आहे. लोकांची माणुसकी .. मदत करण्याची तत्परता.. एक आपुलकी. असे बरेच काही मुंबई देवुन गेली. मुबई .. आय मीस यु. म्हणुन माझी ही जूनी कविता येथे देत आहे. जी की मी मंबईत गेल्या गेल्या केली होती. तो काळ वेगळा होता. आज काल दुसर्यांच्या कविता आणि लेख वाचण्यातच जास्त मजा येते.
काव्यरस

ती.... भाग २

लेखक सविता००१ यांनी गुरुवार, 13/11/2014 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
ती...भाग १ आता मी पण मोठी होत होते. आमचे बोलायचे विषय बदलले. आता सतत तिच्या बोलण्यात येऊ लागलं... ‘ मलाही माझा आयुष्य जगण्याचा हक्क आहे हो ना सवी?’ मी ठासून हो म्हणायची. तिसरीत काय कळतंय? पण जेव्हा हे मी आईला सांगितला तेव्हा ती गंभीर झाली. बाबा-आजी-आजोबांशी बोलून तिने मावशीच्या आईला बोलावून घेतलं. मालू मावशीच दुसरं लग्न करून देण्याबद्दल विषय काढला आणि तिच्या आईचं बोलणं ऐकून आमच्या घरातल्या सगळ्यांच्या डोक्यात धोंडा पडला. काय म्हणावं तिच्या आईने? ‘हे बघ पद्मजा,’ – म्हणजे माझी आई, ‘तिच्या नशिबात नाही हे सुख. पाहिलं ना आपण?