अरे समस्त गुणी जनांनो...
अरे समस्त गुणी जनांनो, आता तरी जागे व्हा
देश विकायची वेळ देशद्रोह्यांनी आणली आहे.
लुळ्या पांगळ्या झालेल्या देशावर
भिक मागायची वेळ आणली आहे.
आता नाही तर कधीच नाही अस म्हणत
देश वाचायची वेळ आली आहे.
फुटीरपणाच्या निराशेचा विषप्याला रिचवत रिचवत
मरणासन्न झालेल्या देशाला,
एकसंध आशेचा जीवनप्याला पाजुन
नवसंजीवनी द्यायची वेळ आली आहे.
लाचलुचपत, सत्तांद्यपणा, जातियवाद, गरीबी,
ह्यामुळे पोखरलेल्या देशाला,
प्रामाणिकपणा, बंधुभाव, ईश्वरवाद, उदारपणा,
ह्यांचा चव्यन प्राश द्यायची वेळ आली आहे.
देशबुडव्या, दांभिक देशद्रोह्यांना हाकलुन लावत
देशप्रेमाची हाक द्यायची वेळ आली आहे.
अरे समस्त गुणी जनांनो, आता तर
नियती
कुणी पाहिली भोर उद्याची अवचित होइल भेट
किती भांडणे तंडुन घेशी अखेर अंत समेट
कोण्या नशिबी असे न संचित धुके हरवली वाट
नसे दूर; अंधारी उमले रोज नवीन पहाट
भंगुर हे क्षण भोगाचे उपभोगाचे वा दाट
नियतीचे चिरअनंत फिरते आशा एक रहाट
......................अज्ञात
काव्यरस
देव नाही देवळात
देव आहे, का देव नाहीच !
एक शंका घुटमळणारी,
सदैव मनाला पोखरत आहे -
देवळाबाहेर लंगडा माणूस
एका आंधळ्याच्या ताटलीत
आदबीने जवळचे नाणे टाकत आहे -
हे असे का, ते तसे का
अपंग नसतांना माझे मन
पंगु बनायला सरावत आहे -
देव जवळून गेला तरीही
रांगेतल्या लोकांसोबत
आस्तिक-नास्तिक चर्चा रंगत आहे !
.
काव्यरस
शिवरायांची शस्त्रे व संभाजी महाराजांचे साहित्य
छत्रपती शिवरायांच्या शस्त्रांपैकी ढाल,अंगरखा,बिचवा अशी अनेक शस्त्रे आज उपलब्ध नाहीत.परंतु त्यांच्या काही तलवारींपैकी तीन तलवारी जगदंबा,भवानी आणि तुळजा या आजही अस्तित्वात आहेत.वाघनखे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात आहेत. तलवारींपैकी जगदंबा हि तलवार लंडन मध्ये आहे.ती स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी पाहिल्याचे नमूद केले आहे.दुसरी भवानी तलवार सध्याचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे,तर तुळजा तलवार हि सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आहे.
कॉन्स्पिरसी थिअरीज
.आत्ताच फेसबुकवर एक कॉन्स्पिरसी थिअरी वाचली.
गणपती झाले...
दसरा दिवाळी येत आहे.
मिष्टान व मिठाईचे दिवस..
विदेशी चॉकलेट्स चा खप वाढावा म्हणून आता खव्या वर धाडीचे सत्र सुरु होणार..
बनावटी खवा,.भेसळ युक्त खवा जप्त अश्या बातम्या झळकणार..
उद्देश हाच की चोकलेट्स भेट म्हणून द्या ..
पारंपारिक मिठाई नको...............................
म्हटलं आपल्याला अशा कॉन्स्पिरसी थिअर्या बनवता येतात का पाहू.
मी पण बनवल्या आहेत काही थिअर्या.
१. स्त्रीमुक्तीचा प्रचार सुरू झाला.
देवस्थानांची संपत्ती
दररोज वृत्तपत्रे, वाहिन्यांवर पाह्तो, आज साईबाबांना ५ किलो सोन्याचा हार अर्पण केला, तिरुपतीच्या हुंडीत अज्ञात इसमाने करोडो रुपये दान केले, लालबागच्या राजाला सोन्याचा पंजा लावला इ.इ.
वस्तुतः हे धन त्या दानकर्त्याने कोणाकडून तरी लुबाडलेले असते, ती बोच जावी म्हणून ही देवाला लाच दिली असते.खरे तर या धनावर नारायणा पेक्षा दरिद्री नारायणाचा हक्क जास्त पोहोचतो. देवस्थानांनीही ह्या धनाचा विश्वस्त म्हणून सुयोग्य वापर करावा असे वाटते.
आज पश्चिम महराष्ट्रातील सोलापूर , सांगली, सातारा, नगर, व उभा मराठवाडा दुष्काळाच्या खाईत लोटला आहे. माणसांपेक्षा गुरांचे काय करावे हे शेतकर्यांना समजेनासे झाले आहे.
वेडी मीरा
तुझ्या प्रीतीत रंग भरावे मी
तुझी वेडी मीरा ठरावे मी
खेळ आयुष्याचा जिंकता जिंकता
तुझ्यासोबत एकदा हरावे मी
परतून येशील ना रे आता
किती आठवणीत झुरावे मी
निसटुनी जाती रेशीमबंध सारे
हृदयाशी त्यांना घट्ट धरावे मी
पुरे झाले आता दु:खाचे निखारे
तुझ्यासाठीच ह्या जगी उरावे मी.........
यशवंत
http://dhyanimani.blogspot.ca/
मिसळपाव