Skip to main content

कताई शास्त्र ७

लेखक बापू मामा यांनी गुरुवार, 27/09/2012 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
प्राचीन व मध्ययुगीन काळात कताई हा एक कुटिरोद्योग होता. कापूस उत्पादक शेतकरी, लोकर उत्पादक धनगर, स्वतः सूत कातत्,व विणकर कोष्ट्यांना देत. विणकर त्यांचे कापड विणून परत देत. हा सर्व व्यवहार बलुत्यावर चाले.त्या काळी कताई तकली वर चाले,व सायंकाळी घरोघरी हा उद्योग चाले. महात्मा गांधींना अशा प्रकारची स्वयंपूर्ण खेडी अभिप्रेत होती. त्या मुळे, एकाच यांत्रिक कारखान्यात कापड बनवून विकणे त्यांच्या कल्पनेत बसत नव्हते.

पीत वसन, कमल नयन

लेखक स्पा यांनी गुरुवार, 27/09/2012 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
गणपतीचा उत्सव सुरु आहे.. घरी नसला तरी काकाकडे गणपती होता.. आपल्या हातून गणरायाची काहीतरी सेवा व्हावी असा उद्देश होता.. आज योग आला, घरी तसा लवकरच आल्याने एक गणपतीचं भजन म्हटलं गणपती तसा कलेचा भोक्ता ,त्यामुळे माझे जे काही वेडे वाकडे स्वर असतील ते नक्की त्याने मनापासून ऐकले असतील.. मनापासून गायलं कि तो मनापासून ऐकणारच.. शेवटी भाव महत्वाचा :) गणेश लेखमाला सुरु आहे मिपावर , हा लेख नाहीये..

कानसेन २०१२ भाग क्र. १०

लेखक मस्त कलंदर यांनी गुरुवार, 27/09/2012 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
चला मंडळी गणपाच्या 'एक ही फिल्मसे' नंतर आज सगळी सोप्पी-सदाबहार गाणी घेऊन येत आहे..
गाणे क्रमांक विजेता
मराठे
मराठे
मराठे
चतुरंग, मराठे, स्नेहांकिता

स्वर साम्राज्ञी !

लेखक तर्री यांनी गुरुवार, 27/09/2012 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
स्वर सम्राज्ञी चा उद्या वाढ दिवस आहे. मला आठवते तेंव्हा पासून राणी गाते आहे. माझा एक काका “बाईंचा” मोठ्ठा पंखा होता. जाता जाता त्याने मला कोकिळेचा पंखा करून टांगले. रेडिओ मॉस्को वर “हवा में उडता जाये मेरा लाल दुपट्टा मलमल का” हे गाणे ऐकले आणि मी पुरता बिघडलो. पुढे जावून त्यामागच्या काळातील गाणी ऐकली आणि अनुशेष भरून काढला. शिरीष कणेकर वाचता झालो आणि हिरो वर्षीप सुरु झाली. भक्ती इतकी की कोणी मल्लिकेच्या गाण्याविषयी प्रतिकूल बोलले तर तो आयुष्यातून कटाप होत असे. पुढे वय वाढले आणि भक्ती कमी झाली आणि दिव्यत्वाची प्रचीती आली.

फेसाळबुक

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 27/09/2012 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या बायकोचं फेसबुक खातं नाहीये. मी तिला एक-दोनवेळा म्हटलं की फेसबुकावर खातं उघड पण तिला अजिबात रस नाही. तिचा प्रश्नः "काय करू मी फेसबुकावर येऊन?" "आपल्या शाळा-कॉलेजमधल्या मैत्रीणींशी आणि मित्रांशी कनेक्ट हो; फोटो शेअर कर...अजून काय? सगळेच करतात. आपण सगळ्यांच्या संपर्कात राहतो." "तुझे २०० मित्र आहेत फेसबुकावर, कुणा-कुणाशी तू वरचेवर संपर्कात असतोस? नुसतीच यादी मोठी असते, असा यादी करून ठेवलेला संपर्क खरे म्हणजे हृद्य नसतोच; तो नुसताच आभास असतो. तुमचा कॉलेजचा गृप पुण्यातच आहे. तुम्ही महिन्याला एकदा तरी भेटता, सहलीला जाता.

आई.....

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 27/09/2012 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
आई..... थोडा वेळ बस अशी शेजारी... थोडं बोलायचय तुझ्याशी... कित्ती दिवस झाले न तुझ्या कुशीत नाही झोपलो... ना तुझ्या मांडीवर डोकं ठेवलं कित्ती दिवस झाले तुझी बोटं नाही फिरली केसातून... आणि कित्ती दिवस झाले तुझ्या पदराला जेवल्यानंतर हात पुसून... बरेच वर्ष मला हे सार कधीच जाणवलं नाही आणि जाणवल्यावर मात्र अस कधी सांगताच आलं नाही... म्हणून आई आज थोडा वेळ बस अशी शेजारी... थोडं बोलायचय तुझ्याशी... आई... आज तुला रडताना पाहिलं आणि... आणि जाणवलं.... सगळ्यांच्या अपेक्षांचे ओझं वागवणं एवढं सुद्धा सोप्पं नसतं...
काव्यरस