Skip to main content

चंद्रावरती बांधलाय बंगला ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 26/01/2011 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रावर मी बांधलाय एक बंगला फार जुनी झालीय हकीगत जाहिरात आली होती [आठवतंय का ..?] चंद्रावर जमीन मिळतेय तेव्हाच घेऊन ठेवलीय दहा रुपये एकरने चक्क वीस एकर घेऊन ठेवलीय माझ्याकडे कागद पत्र आहे कालच चंद्राचा सेल आला बंगला बांधून तयार आहे कधी येताय राहायला ..? हुरळून गेलो कसा असेल बंगला चंद्राने "ई"मेल केलाय . मस्त बंगला..!
काव्यरस

शिळा घास होता

लेखक मयुरेश साने यांनी बुधवार, 26/01/2011 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
खरा कायदयाने मला फास होता कुठे न्याय ? तो फक्त आभास होता तराजू कधी पावला सांग त्यांना ? उभा जन्म ज्यांचा शिळा घास होता लुबाडून खाती सदा तूप-रोटी गुन्हेगार तेथेच हमखास होता अरे ! कायद्या काय देऊ पुरावे ? दलालीत वाटा तुझा खास होता तुझ्या चोर-वाटां मुळे न्याय मेला फरारी च आरोपि सर्रास होता अशा कायद्याला कुणी भीक घाला ? स्वतः न्याय केला ! सुरा पास होता
काव्यरस

नेते नरमले

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 26/01/2011 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
नेते नरमले मोठे गरजले छोटे बरसले रेती वाहतच गोटे अडकले मते पाहताच नेते नरमले ललना पाहून कपडे शरमले चकवेही आज रस्ता भटकले शिपाई मजेत कैदी सटकले बिल्डर म्हणताच मंत्री दचकले काजवे रात्री अभय चकाकले गंगाधर मुटे =============

मीठावरच्या कराची कहाणी...

लेखक अवलिया यांनी बुधवार, 26/01/2011 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
इंटरनेटवर भटकंती करत असतांना एक लेख वाचण्यात आला. सदर लेख आमचेच मित्र विशाल कुलकर्णी यांनी लिहीला आहे. त्यातील काही अंश..
बागडीचे खरेखुरे फ़ोटो काही आज उपलब्ध नाहीत. पण या फ़ोटोवरून ’बागड’ या शब्दाचे स्वरुप आणि ती ब्रिटीशांनी उभी केलेली २३०० किमी लांबीची बागड किती विलक्षण असेल याची कल्पना येवु शकेल. आता ही प्रचंड बागड उभे करण्याची ब्रिटीशांना का गरज भासली असेल? हे जाणुन घेण्यासाठी आपल्याला थोडा त्या काळाचा आढावा घ्यावा लागेल.

प्रजासत्ताक (?) दिन

लेखक देवदत्त यांनी बुधवार, 26/01/2011 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रजासत्ताक दिन. आज त्याचा आनंद आपण साजरा करणार. पण काल एका दिवसभरातील ह्या बातम्या वाचल्या ऐकल्या तर वाटते काय चालले आहे देशात. खरंच प्रजेची सत्ता आहे का आपल्या देशात? तसे म्हणायला प्रजेचीच सत्ता आहे पण ती सामान्य प्रजा नाही तर फक्त ’त्यां’च्या मर्जीतील प्रजा. ते कोण सांगायची गरज वाटत नाही. सर्वांनाच माहित आहे.

वनराणी ४..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 26/01/2011 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
वनराणी ३ या घटनेला एक मास लोटला असेल आता. पण अजूनही ती घटना आठवली की पाय डळमळू लागतात. पण मी हळूहळू रुळलेय इथे. इथल्या तरूवेलीत, गाई-वासरांत, हरणांमध्ये माझे सवंगडी भेटलेत मला. जे आहे .. त्यात खूप समाधान आहे मला. इथे अशीच राहिले मुनीवरांच्या छायेत, तरी माझं अयुष्य स्वर्ग होईल. ज्या दिव्यशक्तीने हे सगळं घडवून आणलय, तीच मला या सगळ्यातून तारून नेईल. ********* पुढे वाचा ... आता या सगळ्याचीच सवय झालीये मला. आयुष्यात म्हंटलं तर काहीच बाकी नाही राहिलेलं आणि म्हंटलं तर खूप काही आहे.

पनीर कढाई

लेखक अंतु बर्वा यांनी बुधवार, 26/01/2011 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स... बर्‍याच दिवसांपासुन फ्रिजमधला पनीर खुणावत होता. पनीर चिली च्या पुढे कधीही पनीर नामक पदार्थाचं काहीच बनवलं नसल्याने नेमकं काय करावं सुचत नव्हत... मिपाच्या पाकृ विभागात एक चक्कर टाकली, पण पनीर माखनवाला वगैरे पदार्थ जरा गोडसर लागत असल्याने काहीतरी तिखट बनवावंस वाटत होतं. मग काय गुगलदादा कडे याचना केली आणी पाच पन्नास रेसिपीज शोधुन काढल्या. पण यात नेमका घोळ असा झाला की इतक्या रेसिपीज पाहुन हम तो एकदम कन्फुजा गए... शेवटी दोन-तीन रेसिपीज मिक्स केल्या आणी जे काही झालं ते अस...

(सख्या चला बागामधी)

लेखक अडगळ यांनी बुधवार, 26/01/2011 02:37 या दिवशी प्रकाशित केले.
वास्तव बदललं तरी आठवणी पुसल्या जात नाहीत. कांदा उतरला म्हणतात.
काव्यरस

गुजरात दारूबंदी '' निव्वळ खुळचट पणा

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी बुधवार, 26/01/2011 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
संपूर्ण देशात दारू विकली जाते अगदी देशी म्हणून परवाना मिळतो. .मग फार पूर्वी गुजरातच्या त्यावेळच्या राज्यकर्त्यांना का म्हणून तेथील राज्यात दारूबंदी जाहीर करावीशी वाटली (म्हणजे ती राजकीय संतांची जन्म भूमी व क्रम भूमी )अरे पण ते राष्ट्र पिता म्हणजे सर्व देशच त्यांची कर्म भूमी मग काश्मीर प्रश्नासारखा ह्या राज्यात त्यावेळी वेगळा कायदा का म्हणून केला गेला . गुजरात मध्ये तेथील जनता दारू पीत नाही का ?

श्रीमद दासबोध अभ्यास : इ-मेल अथवा पत्राद्वारे

लेखक विटेकर यांनी मंगळवार, 25/01/2011 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
II श्रीराम समर्थ II श्रीमद दासबोध अभ्यासक्रम आजच्या ताण- तणावाच्या आणि धकाधकीची जीवनात आपल्याला थोडेसे मनः स्वास्थ्य ,समाधान मिळाले तर हवेच आहे. पूजा - अर्चा, व्रत-वैकल्ये करण्यास विज्ञानवादी मन धजावत नाही आणि ते शक्य ही होत नाही. अशावेळी काही व्यावहारीक विचार सांगणाऱ्या 'ग्रंथराज दासबोधाचा' खूप उपयोग होतो, असा स्वानुभव आहे. दासबोधातील कित्येक ओव्या रोजच्या जीवनात, नैराश्य प्रसंगी, मानसिक धीर देऊन नवचैतन्य निर्माण करतात. अडचणीच्या प्रसंगी मार्गदर्शक होतात. संभ्रम दूर करतात. योग्य व्यवहार लक्षात घेऊन तो आचरणात आणण्याचे बल देतात.आत्मविश्वास वाढवतात.