Skip to main content

सारण की पुरण??

लेखक धनाधीश यांनी रविवार, 09/03/2008 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
करंज्यांमध्ये जे भरतात, त्याला आम्ही सारण म्हणतो. पण आमच्या शेजारी-पाजारी राहणा-या बहुजन समाजातील कुटुंबांमध्ये यालाच पुरण म्हणतात. माझ्या माहितीनुसार पुरणपोळीत जे असते, त्याला पुरण म्हणतात. मिपावरील खवय्ये याबाबतीत अधिक मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा.
Taxonomy upgrade extras

गोळी

लेखक केशवसुमार यांनी रविवार, 09/03/2008 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
आमच प्रेरणा सारंग यांची सुरेख कविता खुळी उगाच चरले काल रातरी काहीबाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही तसा वेंधळा जरा माझा स्वभाव आहे चपळाई या शब्दाचाही अभाव आहे भरीस आला प्रसंग आहे बाका हाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... हसून त्याने प्रश्नचिन्हसे मला पाहता हातानेच मी त्यास इशारा 'तो' करता कळून येतो भाव मनातील मग त्यालाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... अंतरातली उलथापालथ मी बावरते बंद पाहूनी दार जराशी मी घाबरते तो थांबून देतो धक्का तेव्हा दारालाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... ............ अन मी निघून जाता तोही

वाट फुटेल तिथे ४

लेखक सुधीर कांदळकर यांनी रविवार, 09/03/2008 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्य केरळी उच्चार आणि ती रहदारी ४ ऑक्टोबर २०००. मडिकेरीच्या रम्य आठवणी घेऊन निघालो. मॅसाचे आभार मानले. त्यांनी सकाळी वेळेवर बिल दिले. तेल्लीचेरीला जाणार रस्ता कोठून जातो त्याचे अगत्याने मार्गदर्शन केले. सारथ्यांनी व्यवस्थित समजून घेतले. त्यांचे आम्ही सर्वांनी पुन्हा आभार मानले. सातसाडेसातला निघालो. आता आम्ही वेगळ्या दिशेने जात होतो. रस्त्याला लागून डेरेदार वृक्ष. त्यापलीकडे दुतर्फ़ा चहाचे मळे. आल्हाददायक दृश्य. मी लहान मुलासारखा सीटवर गुढगे टेकून मागे तोंड करुन निसर्ग डोळ्यात साठवत होतो.

मला मराठी कविता लिहिणेही आवडते... पण

लेखक वडापाव यांनी रविवार, 09/03/2008 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
मी मराठीतही कविता लिहितो. विशेषतः मिपावर असताना माझ्या कल्पकशक्तीला प्रोत्साहन मिळते. पण यावेळी नकळतच इंग्रजीत प्रोत्साहन मिळाल्याने ही कविता सादर करतो.

विदर्भातला शेतकरी..

लेखक सृष्टीलावण्या यांनी रविवार, 09/03/2008 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
शेतकर्‍यांना कर्जमाफ झाल्यापासून गेल्या विदर्भात ८ दिवसांत २२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. ही बातमी खरोखरच चटका लावणारी आहे. बळीराजा हे आपला अन्नदाता, त्याच्या आत्महत्यांनी महाराष्ट्र ढवळून निघायला हवा पण दुर्दैवाने तसे झाल्याचे दिसत नाही ह्याचे मुख्य कारण ह्या सततच्या आत्महत्या केवळ विदर्भापुरत्याच मर्यादित आहेत. तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रात शेतकर्‍यांचे प्रामुख्याने ४ प्रकार १) कोकणातला २) खानदेशातला ३) विदर्भातला ४) मावळ प्रांतातला. कोकण प्रांतात पाऊस भरपुर पण पाणी साठवण्याची तंत्रे कमी त्यामुळे बहुतांश पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाते. नगदी पीके (ऊस, कापूस) नाहीत.

इक जरा छींक ही दो तुम - गुलजार ह्यांची अंतर्मुख करणारी एक कविता

लेखक व्यंकट यांनी रविवार, 09/03/2008 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
चिपचिपे दूध से नहलाते हैं आंगन में खड़ा कर के तुम्हें । शहद भी, तेल भी, हल्दी भी, ना जाने क्या क्या घोल के सर पे लुंढाते हैं गिलसियां भर के औरतें गाती हैं जब तीव्र सुरों में मिल कर पांव पर पांव लगाये खड़े रहते हो इक पथरायी सी मुस्कान लिये बुत नहीं हो तो परेशानी तो होती होगी । जब धुआं देता, लगातार पुजारी घी जलाता है कई तरह के छौंके देकर इक जरा छींक ही दो तुम, तो यकीं आए कि सब देख रहे हो । देवाच्या अस्तित्वावर, धार्मिक रुढींवर आणि सभोवतालच्या दांभिकतेवर एकाच वेळी सौम्य शब्दात प

पुन्हा पुन्हा..........काहि चमत्कारिक अनुभव.

लेखक अभिज्ञ यांनी रविवार, 09/03/2008 03:02 या दिवशी प्रकाशित केले.
मि काहि वयाने फ़ार मोठा नाही,परन्तु अत्तापर्यन्त बरेचसे गमतिदार अनुभव माझ्या वाटेला आले आहेत. पण हेच अनुभव जर पुन्हा पुन्हा य़ायला लागतात तेन्व्हा मात्र हे काहितरि वेगळॆच घडते आहे असे लक्शात येते. मिच मुर्ख का बनतो असा मला नेहमिच प्रश्ना पडतो. त्यातलेच हे काहि चमत्कारिक अनुभव............ (अनुभव १) एखाद्याने होटेलात जावे आणि लगेच वेटरने येउन सम्पुर्ना होटेल झाडायला घ्यावे,असा अनुभव प्रत्येकास कधि ना कधि तरि नक्किच आला असेल. परन्तु हा असा अनुभव मला किति वेळा यावा? गेले १० वर्षे हा प्रकार मि सातत्यने अनुभवतोय.जवळपास ९०% वेळा मला हा अनुभव येतो. आपण चहा प्यायला एखाद्या अमृततुल्या मध्ये जावे,आणि लगिच

मी आणि माझा "संत ज्ञानेश्वर"

लेखक प्राजु यांनी रविवार, 09/03/2008 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मला इप्रसारणवर स्वरसंध्या या कार्यक्रमात "संत ज्ञानेश्वर" या विषयावर कार्यक्रम करायचा होता. तसं पाहिलं तर आम्ही(आदरार्थी एकवचन) पुणे आकशवाणीवर अक्कल पाजळत होतो आणि शब्दांचे कारंजे उधळ होतो. पण तिथे होणारे कार्यक्रम हे केवळ बाल बुद्धिशी निगडीत असत. त्यामुळे "संत ज्ञानेश्वर" या सारख्या गंभिर विषयावर कधी बोलण्याची वेळ आली नाही. तसे इप्रसारणवर इतके दिवस मी केलेले कार्यक्रम म्हणजे गीतकार, संगितकार किंवा गायक , एखादा अभिनेता यांच्याशी संबंधित होते. पण अध्यात्माची जोड असेल असा कार्यक्रम मी केलेला नव्हता.

आलबेल

लेखक सचिन यांनी रविवार, 09/03/2008 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
कोणाच्या तरी पुतळ्याची कुठेतरी विटम्बना झाली म्हणून परवा आमच्याही गावामध्ये दङगल झाली ज्यान्चे नाव माहीत नाही कार्याबद्दल कल्पना नाही त्यान्च्या नावे मण्डळान्ची दगडफेकही खच्चून झाली बन्दोबस्त झाले, अश्रुधूर झाला आता सारे आलबेल आहे गोळीबारातल्या जखमी - मृतान्ची यादी देखील पुसट झाली