खजुराहो-बनारस सोलो ट्रिप
तसा मी अप्रवासी फार कुठे गेलो नाही.पण नुकताच खजुराहो- वाराणसी अशी दहा दिवसांची स्वैर व सोलो टूर करुन आलो. अंशत: नियोजित पण बरीच स्वैर. IRCTC वरुन trial and error बेसीस वर तात्काळ ट्रेन बुकिंग केले. 25 नोव्हे ला सकाळी सोलो बॅग पाठीवर घेउन ट्रेन PUNE GCT SPECIAL ने भोपाळ ला गेलो. तिथे रात्री 12 ला पोचलो. रात्री IRCTC च्या एका दुर्लक्शित ठिकाणी फलाटा बाहेर असलेल्या एका रिटायरिंग रुम इमारतीत अनेकांना विचारत पोचलो. तिथे सामसूम होती. ऒफिस नाही. मग तिथे एका ठिकाणी एका बाईने एक जळमट व धूळीने माखलेली खोली दिली. तोपर्यंत चौकशी करण्यात माझे सर्व भोपाळ स्टेशन फिरुन झाले होते.
मिसळपाव
परवाच मी धिरडी केली होती. भन्नाट झाली होती. बायकोने तर मिटक्या मारत खाल्ली, मग लेक म्हणाली -"बाबा, या विकेंडला माझ्यासाठी परत करा."
लेकीचा हट्ट पुरवायला काल परत साहित्य जमवायला गेलो तर हवी ती पिठं सापडेनात. म्हणून पर्यायाचा विचार करत असताना हरभरा डाळ आणि पोन्नी तांदूळ शिल्लक असल्याचे लक्षात आले.
मग एखाद्या मुक्तकाव्या प्रमाणे पुढील पाकृ जन्माला आली-
२ वाटी हरभरा डाळ+ १ वाटी पोन्नी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले.
१९ वर्षाच्या एका युवकाने एक नवा इतिहास रचला आहे. बरेच डावे-पुरोगामी त्याच्यावर तुटून पडले आहेत. देवव्रत रेखेने जे मिळवले आहे, त्याचे महत्त्व कमी करण्याचा आटापिटा करताना ते आपला अडाणीपणा आणि ब्राह्मण-द्वेष उघडा पाडत आहेत. उजव्यांच्या अंधप्रेमाबद्दल तर बोलायलाच नको.
’ब्राह्मणांच्या बौद्धिक वर्चस्वाची जीवशास्त्रीय कारणे’ असा एक लेख मी काही वर्षांपूर्वी लिहीला. तो वाचून अनेकांनी नाके मुरडली होती.