अनामिक
भटक्यांना जसं
गाव नसतं
प्रत्येक नात्याला
नाव नसतं
ओळखदेख नसताना
आपण कुणाशीतरी हसतो
तीच तर पहिली पायरी
आपण तिथेच तर फसतो
कधीकधी एकमेकांशी
रंगतात गप्पा
हळूहळू व्यापू लागतो
मनातील कप्पा
बंधु, सखा, प्रियकर
नक्की कोण ते ठरत नसतं
आपल्याच भावनांचं आकलन
आपल्याला होत नसतं
समाजमान्य चौकटीत
ते बसणारं नसतं
म्हणूनच ते जास्त
फुलवायचंही नसतं
अचानक जुळून येतं
आणि अचानकच संपतं
एक आठवण बनून
फक्त मनामध्ये उरतं
त्याची स्पष्ट व्याख्या
किंवा ठिकाणठाव नसतं
अशा प्रत्येक नात्याला
काही नाव नसतं
- सौ. रोहिणी विक्रम मनसुख
काव्यरस
एकदा तरी माती व्हावे
एकदा तरी माती व्हावे
कधीतरी इतरांच्या पायी जावे
एकदा तरी माती व्हावे
नको राग लोभ कशाचा
मी माझाच नाही आहे सर्वांचा
नको व्यर्थ माझे माझे करावे
एकदा तरी माती व्हावे
दैन्य इतरांचे पाहून
मग कळते मी किती सुखी ते
आपलेच सुख आपल्याला टोचावे
एकदा तरी माती व्हावे
चारी ठाव घरी खातसे
ताटात गरम पक्वाने
कागदावर अन्न केव्हातरी चाखावे
एकदा तरी माती व्हावे
वापरसी अंघोळीस पाणी मुबलक
फासशी साबण अंगास सुवासीक
शरीर सार्वजनीक स्नानास अनुकूल असावे
एकदा तरी माती व्हावे
सेवा करवून घेई स्वत:ची
हातात सार्या वस्तू येती
कधीतरी झाडू मारूनी उष्टे उचलावे
एकदा तरी माती व्हावे
आत्मकेंद्री स्वभाव होई
म
काव्यरस
भाग १२अंधारछाया प्रकरण ११ - ‘चूळ भरली तर तोंड पोळलं. इतकं तिखट लागलं पाणी मी काय करू बरं? दादांना सांगा, मला पोचवा पुण्याला. तुम्हाला कशाला त्रास माझ्यामुळे उगीच’?
अंधारछाया
अकरा दादा शेठचा फोन आला म्हणून ऑफिसमधून गेस्ट हाऊसवर गेलो. परत येता येता आठ वाजले रात्रीचे. मंगलाला म्हणालो, ‘शेठ हरिपाठाच्या अभंगाचे पारायण करणार आहेत. वासुदेवराव जोश्यांना बोलावलय प्रवचन करायला. विठोबाच्या देवळात पुढच्या महिन्यात सुरवात करणार आहेत’. जेवणं झाली तशी मंगला म्हणाली, ‘आम्ही जाऊन आलो गुरूजींकडे. त्यांना सांगितले हे स्वप्नांचे’. तसे म्हणाले, ‘ही चांगली गोष्ट आहे. आपल्या जपाने बरीच प्रगती झाली आहे असे समजा. कारण ह्या अवस्थेत जी स्वप्ने, जे विचार, बेबीला येत होते, याचे भान तिला आधी नसे. आता तिला तिच्या स्वप्नांची कल्पना आलीय.सनकी भाग ८
कायाच्या फॅशन हाऊस मध्ये कामाला सुरुवात करायचे ठरले. ठरल्या प्रमाणे शिवीन व रिचा 11 वाजता कायाच्या ऑफिस मध्ये हजर होते. काया अजून आली नव्हती पण सुधीरने त्यांचे स्वागत केले व काया पोहचतच आहे असे तो म्हणत होता. तोच काया ऑफिसमध्ये आली.
ते चौघे ही कॉफर्न्स हॉलमध्ये गेले कारण कायाने प्रोजेक्टच्या कामासाठी तिच्या ऑफिस मधील ही प्रशस्त जागा निवडली होती. प्रोजेक्ट विषयी सुरवातीची चर्चा झाली. त्यात वेस्टर्न कंपनीला कशा डिजाईन अपेक्षित आहेत तसेच इंडोवेस्टर्न या कॅटेगरीत काय- काय येऊ शकत व सुरवात उमन्स वेअर पासून करावी. अशी अनेक मुद्यांवर चर्चा झाली.
हिंदू अंत्यसंस्कार
नुकतेच एका आप्तांचे अंत्यसंस्कार होताना हजर होतो आणि काही मुद्दे मांडावेसे वाटले. ह्यावर काही उहापोह व्हावा आणि ह्या विषयातील अभ्यासकांनी / जाणकारांनी/ माहितगारांनी काही चर्चा करावी हा उद्देश.
अंत्यसंस्कार आयोजकांना जर फार माहिती नसेल तर ज्याला जे सुचेल ते तो करत सुटतो आणि एकूण प्रसंगाचे गांभीर्य जपताना त्रास होऊ शकतो
१ ) त्यामुळे सर्व साधारण हिंदू अंत्यसंस्कार करताना काय काय अभिप्रेत आहे ? त्यातील कोणते विधी किमान आवश्यक/ वैकल्पिक आहेत?
२) मूळ शोकग्रस्त कुटुंबियांना मृतदेहाच्या सजावटीचा त्रास होत असावा का?
लवकर शहाणे व्हा!
लवकर शहाणे व्हा!
============
निर्भयाच्या बलात्का-यांना फाशी लवकरच होईल, पण बलात्कार थांबणार नाहीत. ते चालूच राहतील. जोपर्यंत "किडक्या प्रजे"ची निर्मिती थांबत नाही, तोपर्यंत बलात्कार चालूच राहणार...
माणसाचा विवेक जगण्याच्या ताणातून संपतो, शरीराला (पर्यायाने मेंदूला) सडवणा-या पर्यावरणातून तो संपवला जातो. धान्याला किड लागली की धान्य निवडून किड संपत नाही. धान्याला उन दाखवावे लागते, धान्य साठवायची (पर्यावरण) जागा बदलावी लागतो.
सप्रेम निमंत्रण
नांदेड सिटी सिंहगड रस्ता , पुणे, येथे आयोजित वरील कार्क्रमास उपस्थित राहावे ही विनंती.
सौ. नेहा पराग प्रधान
मिसळपाव