एक उनाड भटकंती (सुरुवात)
आई झाल्यानंतर स्त्रीच्या आयुष्यात अनेक बदल होतात. सर्वात महत्वाचा बदल म्हणजे आलेल्या बाळानुसार आपण आपले सर्व आयुष्य जुळवून घेतो. झोपणे,उठणे, खाणे , पिणे या सर्वांबरोबरच अजुन एक बंधन येते ते फिरण्यावर. कुठेही जायचे म्हणले की, बाळाचा जामानिमा सोबत घेऊन जायचा कंटाळा येतो. शिवाय त्याला अंगावर घेऊन फिरायला लागते त्यामुळे हात दुखतात ते वेगळेच.
मिसळपाव