Skip to main content

असेलही वा नसेलही...

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 16/10/2018 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
असेलही वा नसेलही... दोनच या शब्दांवर सारे जगणे अपुले वसेलही... धर्मच गेला देऊन उत्तर शाश्वत वैश्विक प्रश्नाचे. परी न विसरू शकला डोळे कधीच नंतर द्रोणाचे. मनात त्याच्या खंत तयाची रुतून बसली असेलही.... असेलही वा नसेलही दोनच या शब्दांवर सारे जगणे अपुले वसेलही... डोळ्यांमध्ये प्राण आणुनी कुणी विचारी आज तिला, पहा बदललो पुरा राणि मी आवडेन का अता तुला? हसून उत्तर टाळू जाता नयनी पाणी नसेलही... असेलही वा नसेलही दोनच या शब्दांवर सारे जगणे त्यांचे वसेलही...
काव्यरस

बाजार – बजारना याळ

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 15/10/2018 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे ग्रामीण भागात आठवडी बाजार भरतो. मात्र प्रत्येक गावात बाजार भरत नाही. आजूबाजूच्या दहा पंधरा खेड्यांच्या मध्यभागी असलेल्या थोड्या मोठ्या खेड्यात बाजार भरत असतो. आजूबाजूच्या गावांचे हे बाजार भरणारं गाव केंद्रच समजलं जातं. बाजाराभोवती देण्याघेण्याचे अनेक व्यवहार होत आले आहेत. ‍विशिष्ट बाजाराच्या गटातल्या गावांत मजूर लोकांची मजूरी प्रत्येक आठ दिवसांनी बाजाराच्या दिवशी चुकती करायची असते. बाजाराच्या दिवशी शेतमजूर दुपारपर्यंत एक पारग शेतात काम करतात. बाजारासाठी दुपारून सुट्टी घेतात.

च वै तु हि

लेखक पुष्कर यांनी सोमवार, 15/10/2018 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सार्वजनिक बोली भाषेमध्ये काही जणांना आपण काही विशेष शब्द वापरत आहोत ह्याचं खूप विशेष वाटत असतं. त्यामुळे ते असे विशेष शब्द इतक्या विशेषत्वाने वापरतात की त्यांचे वैशिष्ट्य कमी होऊन ते सामान्य होऊन जातात. आता, उदाहरणार्थ 'कुठेतरी' हा शब्द घ्या. सामान्यपणे हा शब्द स्थलवाचक आहे. पण सार्वजनिकपणे बोलणाऱ्यांना इतक्या साधेपणे हा शब्द वापरणं अजिबात मंजूरच नाहीये. एखादा वक्ता तावातावाने आपले विचार मांडताना श्रोत्यांच्या भावनांना हात घालतो आणि म्हणतो, 'मग हे सगळं असं चालू असताना आपलंही काही कर्तव्य आहे हा विचार आपण कुठेतरी करायला हवा'...

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 15/10/2018 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे कथानक: मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३ https://www.misalpav.com/node/43228 लोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी : किल्ल्याच्या दिशेने मी निघालो खरा, परंतु मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याला तोंड देत अंधारातील अनोळखी, निसरड्या पायवाटांवरून चालणे शक्य नव्हते.

पराजय नव्हे, विजय!

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 14/10/2018 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीच्या एका उंच कड्याच्या पायथ्याशी वसलेलं कोकणातलं एक टुमदार गाव... हा कडा असा उभा, सरळसोट उभा, की त्याच्या पायाशी उभे राहिल्यावर आपल्याला या निसर्गचक्रातील आपल्या क्षुद्रपणाची आपोआप जाणीव व्हावी, मनावर साचलेली अहंपणाची सारी जळमटे साफ झाल्याचा साक्षात्कार व्हावा... तर, त्या गावात त्या दिवशी हा अनुभव घेऊन मी तिथल्या शाळेत पोहोचलो. निमित्त खासच होतं. लांजा राजापूर संगमेश्वर तालुका विकास मंडळ नावाची एक संस्था गेल्या सुमारे पाव शतकापासून मुंबईत काम करते.

भक्त आणि त्याचा देव!

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 14/10/2018 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
शाळकरी वयात असतानाच कधीतरी तो एका देवळात गेला. शांत, सुंदर संध्याकाळ... झांजांची किंकिण, मृदंगाचा मंजुळ नाद आणि भक्तीने भारावलेले सूर... त्या क्षणाची त्याच्या मनावर जादू झाली, आणि तो कृष्णमय झाला. त्याची कृष्णावर भक्ती जडली, आणि त्याने आपले सारे जगणे कृष्णार्पण करावयाचे ठरविले. आता आपण आपले उरलो नाही, आपल्या हातून जे काही घडेल त्याचा करविता तो कृष्णच असल्याने, आपला सांभाळही तोच करेल अशी त्याची भावना झाली आणि तो आपल्या देवाच्या भक्तीत बुडून गेला. त्याचा समर्पणभाव पाहून लोक अचंबित होऊ लागले. धन्य तो भक्त आणि धन्य तो त्याचा देव...

इतिहास नावाची ऐतिहासिक समस्या

लेखक आकाश खोत यांनी रविवार, 14/10/2018 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी इतिहास शिकायला सुरुवात झाली तेव्हा इतिहास असतो काय आणि का शिकावा हे हि सांगितलं गेलं होतं. हा तर परीक्षेतला प्रश्नसुद्धा होता. आणि त्यांचं रटलेलं उत्तर काहीसं असं होतं कि..
इतिहास म्हणजे आजवर घडलेल्या घटनांची नोंद. ज्यातुन आपल्याला मानवजातीने आजवर केलेल्या प्रगतीची आणि चुकांची माहिती मिळते. पूर्वजांच्या पराक्रमाने आणि यशाने प्रेरणा मिळते. आणि त्यांच्या चुकांतुन शिकण्याची संधी मिळते.
उत्तरावर हल्ली घडत राहणाऱ्या घटनांमुळे पुन्हा विचार मनात येत होते. आणि जाणवत होतं कि हे उत्तर साफ चुकीचं आहे, किंवा अपूर्ण आहे. अर्थात लहानपणी असलेल्या आकलनापुरतं ठीक आहे.

रदीफ नाही कधी जुळला ...

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 13/10/2018 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
रदीफ नाही कधी जुळला न कधीही काफिया सुचला गजल जगण्यातला तरिही कैफ भरपूर अनुभवला जिव्हारी लागतिल ऐसे कितीतरी वार परतविले तरी एल्गार युध्दाचा जखम ओली असुन केला सदैवच लागले होते ध्यान हे ऐहिकापार इकडच्या ऊनछायेचा कधी अफसोस ना केला
काव्यरस

बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) १: प्रस्तावना

लेखक मार्गी यांनी शनिवार, 13/10/2018 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
बघता मानस होते दंग १: प्रस्तावना नमस्कार! कोंकणात सायकलीवर फिरणं माझं अनेक वर्षांचं स्वप्न होतं. एकदा त्याचा अयशस्वी प्रयत्नही केला होता. हे स्वप्न नुकतंच पूर्ण झालं. सायकलीवर कोंकणात फिरू शकलो- सोलो सायकलिंग करू शकलो. त्यासंदर्भात आता सविस्तर लिहिणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे ही मोहीम माझ्या नवीन हायब्रिड सायकलवर- मेरीडा स्पीडर 100 वर केलेली पहिली मोहीम आहे. ह्या सायकलीवर दोन शतकही केले होते. पण प्रत्येक वेळी पंक्चर झालं. माझी जुनी एमटीबी सायकल व ही हायब्रिड सायकल ह्यांच्यातला फरक जुन्या काळातील नोकिया शुद्ध फोन- 3315 आणि आत्ताच्या जनरेशनमधला आय फोन सेव्हन सारखा वाटत होता!