Welcome to misalpav.com

पुनर्जन्म

लेखक: kurlekaar | प्रसिद्ध:
आमच्या कोकणातल्या आजीच्या आयुष्यात दोन वैयक्तिक भूकंप आले, पहिला जेंव्हा आमच्या आईचे वडील गेले व दुसरा जेन्व्हा माझा मामा तरुण वयांत गेला तेंव्हा. तुमच्यापैकी कांहीना 'सारांश' या हिंदी चित्रपटातील रोहिणी हट्टंगडी ची भूमिका आठवत असेल; तिचाहि एकुलता एक मुलगा विदेशी असतांना एका अपघातात गेलेला असतो व तिला सारखं वाटत असतं कि तो पुनर्जन्माने परत येईल. आमच्या आजीचं थोडंफार तसंच होतं. मामाच्या मृत्त्यू नंतर ज्यांचा जन्म त्या घरांत (घराण्यात या अर्थाने) झाला त्यांना, किंव्हा त्या घराच्या माहेरवाशिणिच्या घरी ती त्याला शोधत असे.


अजंठा ...........भाग-४

लेखक: जयंत कुलकर्णी | प्रसिद्ध:
Simple, Free Image and File Hosting at MediaFire अजंठा ...........भाग-१ अजंठा ...........भाग-२ अजंठा ...........भाग-३ रंगवलेले छत....... कसे रंगविले असेल हे....?


'बाळाची शर्यत-' (बालकविता)

लेखक: विदेश | प्रसिद्ध:
' एक दोन एक दोन बाळाची पावलं मोजणार कोण . . तीन चार तीन चार बाळाच्या पैंजणाचा नादच फार . . पाच सहा पाच सहा बाळाची दुडुदुडु ऐट किती पहा . . सात आठ सात आठ बाळाने धरली ताईची पाठ . . नऊ दहा नऊ दहा बाळाने शर्यत जिंकली पहा . . .


लिहाव म्हणतो काहीबाही ...

लेखक: फुंटी | प्रसिद्ध:
काहीतरी लिहाव अस्माबंध डोळे मिटून उमटेल तस.आठवेल तो शब्द लिहावा .कोंबडी अंड .धागे जुळवावेत सूक्ष्म.खोट लिहतो तसं .भेंडी .मुला उचल ती पाती ,वाचणार कुणी नाही तरी...बर्फ एम् आर आय काढून मेंदूचा .लिहाव ...विचार सापडतील रिपोर्ट मध्ये......किडा मेंदूचा ...भुंगा ,उवा,लिखा,खाजाव्तोय भुवई डावी..लावावा मलम खाजेवर...शांत ..ताडी..छोटा हत्ती ..रेंज..कड घेईन जत्रेत नवीन....कबुतर फडफडल....भडवा फोनेवर बोलतोय .फोन कशाला पायजे ...ओरड तसाच....पोपडे निघालेली खोली...मळलेली चादर ...बिछाना ...जंगल ..फुटीर उमेदवाराला चोपला....रिक्षातील बाईच पोस्टर...चाकोरी.ग्लानी...डुलकी...टीप ...शाळा सुटली...टपकला शब्द मनात की उचल.


<काही शंका......>

लेखक: प्यारे१ | प्रसिद्ध:
गेली कित्येक वर्षे काही शंका मनांत आहेत. १. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का? २. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत) ३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे? ४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती? ५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले? ६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली? ७.


घर खरेदी विषयक माहिती / सल्ला हवा आहे ......

लेखक: jaydip.kulkarni | प्रसिद्ध:
काही महिन्यापूर्वी आम्ही पुण्यात फ्ल्याट बुक केला आहे, सदर ची वस्तू धायरी येथे आहे , सदर ची वास्तू बुक करण्यापूर्वी जागेविषयी आवश्यक ती माहिती घेतली होती तसेच बिल्डर खात्रीलायक आहे याची देखील शहानिशा केली होती.


Sense of Humour

लेखक: kurlekaar | प्रसिद्ध:
‘विनोद’ सगळ्यांनाच आवडतो. मलादेखील तो माझ्या लहानपणापासून आवडत आलाय. सुरुवातीस चिं वि जोशी(चिमणराव आणि गुंड्याभाऊ), नंतर पु. ल. व त्यानंतर गंगाधर गाडगीळ (बंडू आणि स्नेहलता), वि. आ. बुवा(मालन मोहिले), द. मा. मिरासदारांहवाच्या ग्रामिण पार्श्वभूमीवरच्या कथा, व इंग्रजी वाचायला सुरुवात केल्यानंतर P G Wodehouse. मोठेपणी वाटायला लागलं की आवडणं वगैरे ठीक आहे पण विनोद मला का आवडतो याचं विश्लेषण करावयास हवं. विनोदासाठी बुद्धी व शब्दकौशल्य आवश्यक आहे; एक पारदर्शक, स्वच्छ स्वभाव देखिल लागतो नाहीं तर विनोदाचा दर्जा व पातळी घसरायला लागते.


१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ३

लेखक: स्पार्टाकस | प्रसिद्ध:
२२ एप्रिलच्या दुपारी स्कॉट फिशरच्या तुकडीतील शेर्पा नवांग तोपचे याला 'हाय अल्टीट्यूड पल्मनरी एडेमा' ने ग्रासलं. फिशरच्या तुकडीतील गिर्यारोहक सराव आणि अ‍ॅक्लमटायझेशन मध्ये मग्न होते. तीन दिवसांपासून नवांग वरच्या कँपवर सामान वाहून नेण्याचं काम करत होता. फिशर कँप २ वरून बेस कँपला परत येताना त्याला एका दगडावर बसलेला नवांग दिसला होता. दोन दिवसांपासून आपल्याला श्वसनाचा त्रास होत असल्याचं त्याने फिशरपाशी कबूल केलं. फिशरने त्याला ताबडतोब बेस कँपला परतण्याची आज्ञा केली. नवांगची मात्र त्या गोष्टीला बिलकूल तयारी नव्हती.


काही प्रश्र्न......

लेखक: मुक्त विहारि | प्रसिद्ध:
गेली कित्येक वर्षे काही प्रश्र्न मनांत आहेत. १. गुजरात मधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर आग गाडी जाळलीच नसती तर दंगल झाली असती का? २. मुझफ्फर नगर दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे जाट मुलीची छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? ३. आज काल हिंदी सिनेमांतील हिंदू नायकांचे प्रमाण कमी का झाले आहे? ४. अफगणीस्तान मधील मुर्तींचा नाश केला गेला तेंव्हा, भारताची नक्की भुमिका काय होती? ५. काश्मीर मधील हिंदूंचे प्रमाण अचानक कमी का झाले? ६. जागेचे भाव अचानक कसे काय वाढले? ७. भिवंडी, मुंब्रा ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत? ८.