गेल्या दहा वर्षांपासून होणारी कौटुंबिक हिवाळी सहल यावेळी रद्द झाली. त्याला कारण मे महिन्यात ग्रुपने एका यात्रा कंपनीतर्फे केलेली हिमालयीन चारधाम यात्रा. कंपनीचे मूळचे पॅकेज स्वस्त दिसत असले तरी थोड्या चांगल्या रूम , ग्रुपसाठी स्वतंत्र वाहन असे करत किंमत वाढत गेली . त्याचबरोबर पिट्ठू , घोडा, पालखी, मधल्या वेळातले जेवण यावर बराच खर्च झाल्याने सगळ्यांनी दुसरी मोठी सहल करण्याचे टाळले .
यात्रेसाठी आमच्या नावाचीही नोंदणी झाली होती पण मुंबईहून जळगांव जाणारी रेल्वे सोळा तास उशिराने सुटणार असल्याने आम्हाला जळगावपासूनची कनेक्टेड गाडी मिळणे शक्य नव्हते .