Skip to main content

लेख

आमचाही छोटेखानी मिपा कट्टा,:)

लेखक स्वाती दिनेश यांनी शनिवार, 06/09/2008 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
युरोपातला उन्हाळा आल्हाददायक असतो. २२ ते २५ अंश से तापमान,सूर्याचा ढगांशी लपंडाव आणि मध्येच एखादी हलकीशी सर असा 'श्रावण' उन्हाळाभर चालू असतो. साहजिकच ह्या वातावरणाचा जास्तीत जास्त उपयोग सगळे करून घेत असतात कारण त्यानंतर येणारी पानगळ दिवस लहान करते आणि तिच्यापाठोपाठची बोचरी थंडी सोबतीला करड्या संध्याकाळी आणते.त्यामुळे उन्हाळ्यात मौजमजेचे जास्तीत जास्त प्लान केले जातात्.व्हरांड्यात,गच्चीत,अंगणात केलेले बार्बेक्यू हे त्यात अग्रभागी असतात.अशा हवेत आम्हाला एकत्र काहीतरी करण्याची सुरसुरी न आली तरच नवल! त्यात आणि तात्याने अचानक छोटेखानी मिपा कट्टा!

सारोजनीक गनपती उत्सव - खारपाडा

लेखक ब्रिटिश यांनी शुक्रवार, 05/09/2008 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
मांगच्या सालची गोस्ट सांगतय कमीटीची मीटींग झाल्ती मीटींगमदी ठरला क ह्ये गनपती उत्सवान गावचा नाटक बसवाचा. पन ईशय कोन्ता ? कूनी म्हनालं सामाजीक ठीवा, त कुनी म्हनल सांस्क्रुतीक , त कुनी आनकी कसला चीक्कार भांडना झायली पन कुन्याव कई बी आयकना. तवा काश्या (माजा बा मंडली, काशिनाथ भोईर, पन तेला सगलीजना काश्या म्हनुनच वलीकतान. आवराच नाय तो सोता पन काशिनाथ म्हुन हाक दील्ली क पाच मिन्ट ईचार करुन ओ देतं) उबा राह्यला न म्हनला "यंदा आपून ऐतीहाशीक नाटकच कराचा. क र मास्तर ?" मास्तर कमीटीचा आद्यक्श. पन त्याचे डोल्यासमोर बांबू फिरलं. "व्हय व्हय ! आपून ऐतीहाशीक नाटकच कराचा.

सोन्याचं परिवर्तन

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 05/09/2008 02:29 या दिवशी प्रकाशित केले.
गावात आमच्या घराच्या बाजूला महारवडाची आळ होती.गरिब महार आणि चांभार जातीचे लोक बारिकबारिक धंदे करून आपली गुजराण करीत असत.त्यांची लहान लहान मुलं त्या आळीच्या बाहेर येवून मधल्या एका मोठ्या मैदानात खेळायला येत असत.आम्ही पण त्याच मैदानात क्रिकेट खेळत असूं.बाउंडरीवर बॉल मारला की लहान लहान मुलं बॉल परत फेकायची.अशा तर्‍हेने आमची ह्या मुलांशी दोस्ती झाली होती.सोन्या हा बाबू महाराचा मुलगा. सोन्याची आई कधीकधी बांबूच्या पट्याची काही खेळणी आणि सुपे,रवळ्या टोपल्या सारख्या गोष्टी घेवून दारो दार विकायला जायची.त्यावेळी हा सोन्या तिच्या कंबरेवर बसण्याच्या वयाचा होता.तेव्हा पासून मी त्याला पाहिला होता. त्याच्या

गणपतीचा उत्सव - टिळकांचा अग्रलेख

लेखक लिखाळ यांनी गुरुवार, 04/09/2008 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आताच लोकसत्ताची इ-आवृत्ती चाळत असताना मला टिळकांनी १८ सप्टेंबर १८९४ रोजी केसरीमध्ये लिहिलेला अग्रलेख वाचायला मिळाला. आपण सर्वांनी तो वाचावा असे वाटल्याने त्याचा इथे दुवा देत आहे. http://www.loksatta.com/daily/20080903/vishesh.htm या लेखात त्यांनी पुण्यातल्या गणपती उत्सवाचे वर्णन केले आहे. तसेच शेवटच्या दिवशीच्या मिरवणूकीचे सुद्धा वर्णन दिसेल. त्यात भक्तीरसाने म्हटलेली पदे वगैरे उल्लेख बघुन गहिवरून आले. भक्तीरस, प्रेमानंद वगैरे शब्द ते वापरतात. ते वर्णन वाचण्यासारखे आहे.

आज्याची शिकवन

लेखक ब्रिटिश यांनी बुधवार, 03/09/2008 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
मी तवा सातवीत आसन मी माजे दोन चुलतभाउ सादारन यकाच वयाच आमी तवापासुन आज्याच्या बीड्या चोरुन पीवाचो. त्याची पन यक झम्मड हाय आजा म्हन्जे गावचा सरपंच. पन लई पेताड. सकाली उटला क आंगोल धवाचे आदी भट्टी वर हजर न दुपारचा जेवला क बेड्यान (सुद मराटीत - बैलांचा गोठा) झोपाचा आनी संद्याकाली उतरली क गावचे कामाला लागाचा. म्हन्जे तेला भेटाचा आसन तर संद्याकालीच. पन गावान धाक जबरा. यकदा क आवाज टीपवला क कोनाची टाप नाय सामनी यवाची तर क झाल्त , आमाला रोज बीड्या लागाच्या आनी खीच्यान पैस कुटल ? रोज दुपारच्या टायमाला आमी सगले आज्याची वाट बगाचू.

माझं आजोळ आजगांव

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 31/08/2008 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
माझं आजोळ आजगांवचं.वेंगुर्ल्यापासून आजगांव साधारण दहा मैलांच्या आंत.आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमी आजोळी जात असू.पहाटे उठून आई वाटेत खाण्यासाठी डब्बा द्यायची.उकडलेल्या बटाट्याची भाजी,पुऱ्या,लसणीची खोबरं घालून चटणी,थोडी वेलची पिवळी केळी.आणि फिर्कीच्या तांब्यात विहीरीचं थंडगार पाणी,असा थाट असायचा. पहाटे पहाटे निघताना हवा थंड असायची.त्यामुळे सुरवातीचा प्रवास झपाट्याने व्हायचा. वेंगुर्ल्याच्या बाजारातून वाट काढत निघताना जरा अड्चण यायची,कारण इतक्या पहाटे आजूबाजूच्या गांवातून बरेचशी मंडळी विक्रीसाठी माल घेऊन येत असल्याने चांगली जागा मिळण्य़ासाठी चूरशीत असायची. बाजारातली चहाची दूकाने अगोदरच उघडले