Skip to main content

लेख

अथ काकापुराण.

लेखक रामदास यांनी रविवार, 31/08/2008 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न झालं आणि मी राव झालो.बायकोच्या धाकट्या बहिणीचं लग्न झालं आणि मी पंत झालो. काही वर्षापूर्वी काका पण झालो.नैसर्गीक क्रमानी माझी उत्क्रांती होतेआहे असं म्हणता म्हणता काकापण अचानक खुपायला लागलं.पन्नासाव्वा वाढदिवस झाला त्या दिवशी माझा पुतण्या आला होता. माझ्या हातात एक गुळगुळीत कागदात गुंडाळलेलं पुस्तक देत म्हणाला काका, आता रिटायरमेंट प्लॅनींग कर. ह्या पुस्तकात बघ सगळी माहिती दिलीय. माझी बायको नाक फेंदारत म्हणाली "हे आणि रीटायर?" "करेला और निमचढा. " "बाई बाई आताच घरी असतात तेव्हा हा धुडगुस घालतात ." बोलता बोलता जीभ चावली खरी .... पण पुतण्या टिर्‍या बडवत तासभर हसत होता.

कर्णपर्व!

लेखक सौरभ वैशंपायन यांनी गुरुवार, 28/08/2008 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
कर्णानं अलगद मान वळवण्याचा प्रतत्न केला, पण वेदनेची एक असह्य कळ शरीरात उठली. अर्जुनानं सोडलेल्या बाणनं आपलं काम चोख बजावलं होतं. रथाच रुतलेलं चाक वर काढण्यात गुंतलेल्या कर्णाच्या डाव्या खांद्यातुन घुसुन तो बाण मानेतुन बाहेर आला होता. अर्जुनाला थांबायला सांगितल्या नंतर सुध्दा श्रीकृष्णाच्या सांगण्यावरुन त्याने बाण मारला होता. "तेंव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?" हा एकच प्रश्न कर्णाला त्याही अवस्थेत सतावत होता. "धर्म?मी खरच चुकलो धर्म?" पुन्हा कर्णानं मान हलवली मात्र संपूर्ण शरीरच वेदनांच मोहोळ बनल. कर्णाच्या मांडी पासुन ते कानच्या पाळी पर्यंत कर्णाला अनेक जखमा झाल्या होत्या.

"भेजा म्हणजे रे काय?.... भाऊ"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 28/08/2008 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी मी सहज म्हणून टी.आय.एफ.आर मधे ( टाटा इनस्टीट्युट ऑफ फंडामेन्टल रिसर्च मधे) सकाळीच गेलो होतो.जुने मित्र भेटतील गप्पा सप्पा होतील आणि वेळ थोडा मजेत जाईल ही एक ईच्छा ठेवून गेलो होतो. तसे बरेच लोक भेटले म्हणा."हाय,हलो" बऱ्याच लोकांशी झालं आणि सह्ज म्हणून लायब्ररीत डोकावून पाहिलं.

राष्ट्राय स्वाहा: इदं न मम!!!!

लेखक सौरभ वैशंपायन यांनी बुधवार, 27/08/2008 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात अनेक अश्या व्यक्ती झाल्या कि ज्यांचे कर्तृत्व असामान्य आहे. त्या ज्या क्षेत्रात काम केले ते मैलाचा दगड ठरले. आजही त्या हजारो व्यक्तींना १०० करोड व्यक्ती आदर्श मानत आहेत आणि राहतील. थोडक्यात भारतभूचे सुपूत्र या सदरात ते येतात. मात्र भारतभूचे सुपूत्र होणे इतके सोपे आहे का? प्रचंड उलथापालथी नंतर भारताच्या सुपूत्रांपैकी ४ जण माझ्या डोळ्यांसमोर रात्रं-दिवस येत आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतर भारतात किंवा भारता बाहेर हजारो आदरणीय व्यक्ती झाल्या वा होतील पण या चौघांचे स्थान एकमेवाद्वितीय आहे. या चौघांचाहि कालखंड भिन्न आहे.

जो भी बिछडें है, कब मिले है फराज़....

लेखक मनिष यांनी बुधवार, 27/08/2008 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळ मधे वाचलेल्या बातमीनुसार जेष्ठ शायर अहमद फराज़ उर्फ 'सईद अहमद शाह' ह्यांचे २५ ऑगस्टला निधन झाले (सकाळ ची तारीख चुकली आहे - पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांमधे २५ ऑगस्टला निधन झाले असे म्हटले आहे). त्यांनी पाकिस्तानातील लष्करशाहीला खुलेआम विरोध केला होता.

"खेळ खेळूया सारे आपण"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 27/08/2008 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
आज खूप दिवसानी प्रो.देसाई तळ्यावर भेटले.बरेच दिवस मी एकटाच तळ्यावर फिरायला जायचो.भाऊसाहेब आपल्या मुलाकडे काही दिवस राहयाला गेले होते ते मला त्यांच्या मुलीकडून कळलं होतं. मला म्हणाले, "संध्याकाळची मी तुमची खूप आठवण काढायचो.मुलाच्या घरी सुद्धा फिरायला खूप जागा आहे,पार्क्स आहेत पण असं तळं नाही." मी म्हणालो, "भाऊसाहेब,तुमच्या गैरहजेरीत मी काही कविता केल्या आहेत.पुढल्या खेपेला मी तुम्हाला वाचून दाखवीन." भाऊसाहेब म्हणाले, "आज मला तुम्हाला माझ्या लहानपणाची एक गमतीदार गोष्ट सांगायची आहे. ज्याची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे तो गृहस्थ अलिकडेच मला एका दुकानात भेटला होता.प्रथम मी त्याला ओळखलं नाही.सहाजी

प्रश्नांत खरोखर जग जगते

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 25/08/2008 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा अघटीत घडले. देवाच्या असंख्य न उमगणार्‍या लीलांपैकी एक लीला. माणसांना प्रश्न पडायचेच थांबले. कोणी कुणाला काहीच विचारेना. आपणा स्वतःला नाही. आई वडिल मुलांना नाही. मुले शिक्षकंना नाही. मालक नोकराला नाही. जनता राजकारण्याला नाही. कोणाच्या मनांत काहीच प्रश्न उरले नाहीत. मग विचारणार काय? सगळे कसे स्वच्छ माहीत आहे. प्रत्येक जण माहीत असलेल्या ज्ञानाच्या आधारे काम करू लागला. नवीन आलेला कोणी, प्रश्न विचारत न बसता, इतरांचे पाहून तसेच करू लागला. नवीन जन्माला आलेल्या बाळासारखा. जर अनुकरण करून, किंवा पाहणी करून काय करायचे ते कळले नाही, तर फारच सोपे. काहीच करायचे नाही.

जाने तु या जाने ना....

लेखक सौरभ वैशंपायन यांनी रविवार, 24/08/2008 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल मध्ये हा लेख मला सुचला होता. तसं याला काय नाव द्यावं ते सुचत नव्हतं, आधी याचं नाव "दिल हि दिल मै!" असं होतं. मात्र सध्या "जाने तू..." गाजतोय, आणि त्याची थीम दे़खिल याला साजेशीच निघाली हा योगायोग आहे. हि २ जणांची पत्र आहेत. दुसरं पत्र उत्तर म्हणुन लिहिलय. काय आहे ते वाचुनच बघा आवडतं का ते! कदाचित एखाद्याच्या आयुष्यात असं झालहि असेल.....किंवा होईल हि. ---------------------------------------------------------------------------------------------- १. Hi Dear!!!!!! कशी आहेस? काय चालु आहे सध्या? अभ्यास कसा चालंलाय? नीट अभ्यास कर! सहा महिन्यांनी M.B.A. ची परीक्षा असेल ना?

नाहि चिरा...नाहि पणती....

लेखक सौरभ वैशंपायन यांनी शनिवार, 23/08/2008 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
सैनिक स्वत: स्वतंत्र विचार करत नाहि. त्याने तो करावा अशी अपेक्षाहि नसते. तो शिस्त पाळतो, सज्ज राहतो. काहि ठराविक शब्दांचा उच्चार झाला कि तो यंत्रवत काम करतो. पण त्याचे मन सुद्धा यंत्राप्रमाणेच निर्विकार असेल का? नक्किच नाहि! युद्धाच्यावेळी त्याचा विचारांवर ताबा नसतो, शत्रुला मारायचे या एकाच विचाराने तो पिसाट झाला असतो. पण शीतयुद्धासारख्या परीस्थितीत वर्षानुवर्षे सतत दक्ष अवस्थेत त्याला ’तिष्ठत’ रहावे लागते. कधी आसामच्या किर्र जंगलात, कधी चटके लावणार्‍या थर किंवा कच्छच्या वाळवंटात आणि कधी-कधी सियाचीनसारख्या जगातल्या सर्वात उंच रणभूमीवर हाडं गोठवणार्‍या बर्फाळ थंडीत, तो सज्ज असतो.