Skip to main content

जीवनमान

बालपण...

लेखक मानस् यांनी शुक्रवार, 28/05/2010 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
बालपण... दिवाळी चे दिवस … आम्ही सारे आजीच्या घरी सुट्टी साठी आलेले.सारे काके, आत्या वगैरे… दिवाळी म्हणजे फटाके, नवे कपडे, आणि मुख्य म्हणजे सगळ्या चुलत-आते भावंडाना भेटून खेळणे मस्ती करणे. दिवाळी ची रात्र. थंडीचे दिवस.आजीचे घर म्हणजे जुना प्रचंड मोठा वाडा होता… मोठ-मोठे तीन चौक, १५-२० पोरांना पळापळी खेळता येईल एवढे पटांगण होता एकेक चौक म्हणजे!! त्याच्या भोवती ओवर्या आणि मग खोल्या… सहा खोल्यांचे घर आजीचे होते… समोरच्या प्रचंड चौकात एका बाजूला केळीचे एक बेट असल्या सारखे… म्हातारी रखमाबाई तिथे भांडी घासत असे. दिवसभर दंगा करून आम्ही पोरे दामून जात असू.

घरगुती सावरकर

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 28/05/2010 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्‍याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज.... सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे.

घरोघरी तीच………..

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 27/05/2010 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्याच्याच घरोघरी घडणारे नेहमीचे प्रसंग ! फक्त शब्दांत व्यक्त केलेत ! अश्या लिखाणाचा पहिलाच प्रयत्न. कदाचित रटाळहि वाटेल. तरीही लिहिण्याचे धारिष्ट केले घरोघरी तीच……….. मी ऑफिसला निघालेलो. आधीच उशीर झालेला त्यामुळे मी गडबडीत. ती बाल्कनीत उभी पण माझ्या डोक्यांत फक्त ऑफिस.आणि ऑफिस.. मी गाडीला किक मारतो अन घाईने निघून पण जातो. ऑफिसांत आल्याआल्या तिचा फोन "जाताना म्याझ्याकडे पहिले पण नाही मी आपली टाटा करीत बसली वेड्यासारखी ! आजकाल तुझे प्रेम कोरडे झाले आहे माझ्यावरचे ” . ती मला लाडात विचारते " आज काय आहे ? " " कुठे काय बुवा ! दारारोजचेच रुटीन आणि काय असणार !

महानगरीय संस्कृती

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 25/05/2010 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
आपला देश सोडून दूर, अनोळखी देशात रहायला आल्यावर तिथला एकूण रागरंग, आचार विचार, राहणीमान ह्या सगळ्यांचा तक्ता समजाऊन घेताघेता, आपल्या नकळत आपण कधी त्या तक्त्यामधला एक रकाना बनून गेलो ह्याचा आपल्याला पत्ता देखील लागत नाही! बाहेर आल्यावर आपल्यापैकी बहुतांश लोक कदाचित स्वत:ला आणि इतरांना सांगत असतील कि शेवटी आपला देशच बरा. दोन चार वर्षात आपण तर माघारी जाणार भैया! हा राग आलापता आलापता वर्षांमागून वर्षे उलटून जातात.

मधूमेहाविरुद्ध लढा

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 25/05/2010 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
मधूमेहाविरुद्ध लढा अदिती ताईंच्या या प्रश्नामुळे मला लिहावेसे वाटले. मी मराठीचा उदोउदो करण्यासाठी भांडत असतांना एके ठिकाणी त्यांनी मला 'तुमच्या सहीत इंग्रजी आहे' ते बदला अन आताच्या प्रश्नात 'तुमच्या सहीतला 'ओ' आणि ते इंग्लिश वाक्य अजून तसंच आहे. आणि हो मधुमेहाशी कसं लढायचं?' असं विचारलं. त्यांचा चेष्टेचा अन मस्करीचा सूर मी समजलो अन त्यांना खालील उत्तरे तेथेच देवून आमची चेष्टा तेथेच थांबवता आली असती. पण प्रश्न हा सामाजिक जागृतीचा असल्याने नविन धागा काढून लिहीत आहे.

पाळणाघरातील आजी

लेखक शिल्पा ब यांनी मंगळवार, 25/05/2010 04:59 या दिवशी प्रकाशित केले.
कुर्ल्याला राहत होते तेव्हाची गोष्ट...आमच्या बाजूला राहत असलेल्या कुटुंबात एका चिटुकलीची भर पडली...आई बाबा दोघेही नोकरी करणारे...मोठा शाळेत ...हे पिल्लू वर्षाच होण्याच्या आतच नेहरूनगरच्या एका आजींकडे जिथे बिल्डिंगमधील अजून दोन शाळेतील मुली असत तिथेच ठेवायचे ठरले...हि चिटुकली इथे राहू लागली...ऑफिसात जाताना आई-बाबा त्या आजीकडे सोडायचे आणि येताना घेऊन यायचे...दिवसभर हि छकुली तिथेच... जरा वर्षभराची झाल्यावर इकडे तिकडे उठाठेव करणे चालू झाले...करणारच...लहान पिल्लूच ते !!

महिला कारागृहात काही तास

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 24/05/2010 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
आजची काही माझी तुरुंगातली पहिली वेळ नव्हती. ह्या आधीही दोनदा आले होते मी इथे. पण दोन्ही खेपेस जरा घाईगडबडीत होते. ह्या वेळेला मात्र ठरवले होते की निवांतपणे जायचे. गेल्या खेपांमध्ये फक्त स्त्री कैद्यांच्या बराकी, भटारखाना आणि रोजगार प्रशिक्षणाची पत्र्याची शेड एवढाच परिसर ओझरता पाहिलेला. त्या भेटीत पाहिलेल्या बराकींमध्ये भिंतीलगत गुंडाळून ठेवलेल्या वळकट्या व दोर्‍यांवर लटकणार्‍या कपड्यांखेरीज ओक्याबोक्या भिंती होत्या फक्त!

अस्तित्वाचा पुरावा!

लेखक भोचक यांनी सोमवार, 24/05/2010 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न झाल्यानंतर लगोलग बायकोने लॅबरोटरी टेक्निशियनचा (डिएमएलटी) पदवी अभ्यासक्रम केला. दुसरा क्रमांक पटकवून बायकोने आणलेले पदविकेचे प्रमाणपत्र बघितले. 'नागालॅंड' सरकारने मान्यता दिलेल्या संस्थेने 'दिल्ली विद्यापीठातर्फे' घेतलेल्या लॅब टेक्निशियनचा तो कोर्स होता. आता सरकारी नोकर्‍यांच्या बाजारात या सर्टफिकिटला काय किंमत असेल याचा अंदाज सर्टफिकीटचा हा मुखडा पाहूनच आला. फाईलीत जाऊन पडलेलं, हे सर्टफिकिट त्यानंतर उघडलं गेलंच नाही.... --------------------------------------- मध्यंतरी बायकोला एका लेखनाचा चेक आला. साडेतीनशे रूपयांचा. म्हटलं बॅंकेत भरून टाकू.

पु्स्तक परिचय - 'आशावादी अनुमान' - एक निराशा

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 23/05/2010 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकांचं पूर्ण नाव 'भारतीय लोकसंख्येचा शोध घेत केलेले माझे आशावादी अनुमान' लेखक : डॉ. वसंत गोवारीकर. अनुवाद : सुधा गोवारीकर. सत्तरीच्या दशकात लोकसंख्येच्या स्फोटाच्या प्रश्नाने भारतातल्याच नव्हे तर जगातल्या विचारवंतांना भेडसावलं होतं. माल्थसने ज्या संकटाचं भाकित केलं ते लवकरच खरं होणार की काय असं अनेकांना वाटत होतं. भारतात लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कुटुंबनियोजनाचा मोठा कार्यक्रम राबवला गेला. या पार्श्वभूमीवर डॉ. वसंत गोवारीकरांनी या समस्येचा अभ्यास करून नव्वदीच्या दशकात एक इंग्लिश पुस्तक लिहिलं, आय प्रेडिक्ट. त्या पुस्तकाचं हे संक्षिप्तीकरण. खूप आशेने वाचायला घेतलं.

ताम्रोत्सव...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 22/05/2010 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
वैशाख वणवा पेटला की गुलमोहर देखील पेटतोच. तो असा तसा पेटत नाही, दुरून नखशिखांत अग्निज्वालांनी वेढलेला भासतो. मृगजळामागगील गुलमोहराची फुले म्हणजे सक्षात ज्वालांचे ज्वलंत उदाहरणच! उन्हाळ्यामुळे त्याची हिरवी पाने झडली तरी लाल कळ्या उमलून येतात, त्यातून फुले फुलतात. अन् आख्खं झाड ताम्रोत्सव साजरा करतांना दिसतं. इतरांची पानझड झालेली असतांना हे झाड मात्र ओकंबोकं न वाटता काहीतरी भरगच्च वाटू लागतं आणि ऐन उन्हाळ्यात शीतलता, शांतता शोधणारी आपली नजर त्या भगभगीत फुलांमुळे आणखीनच गरम होण्याची शक्यता असते गुलमोहराच्या फुलांचा एक वेगळाच साचा असतो. एकूण पाकळ्या पाच.