Skip to main content

कविता

"भयग्रस्त जाहलो आहे भयमुक्त जाहलो आहे "

लेखक कैलास गायकवाड यांनी सोमवार, 25/05/2015 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
मी मुक्त जाहलो आहे उन्मुक्त जाहलो आहे हळव्या कातरवेळेला संपृक्त जाहलो आहे (धृ) ही स्थिती कोणती आहे कोणती अवस्था आहे अस्ताव्यस्तच असण्याची कोणती व्यवस्था आहे भयग्रस्त जाहलो आहे भयमुक्त जाहलो आहे हळव्या कातरवेळेला संपृक्त जाहलो आहे (1) मी स्पर्श कराया आलो की स्पर्श व्हावया आलो उत्कटता होता होता उत्कर्ष व्हावया आलो आरक्त जाहलो आहे आसक्त जाहलो आहे हळव्या कातरवेळेला संपृक्त जाहलो आहे (2) डबडबल्या डोळ्यांसाठी मी पदर कोरडा असतो खट्ट्याळ बहाण्यांसाठी हलकेच ओरडा असतो पाखंड जाहलो आहे की भक्त जाहलो आहे हळव्या कातरवेळेला संपृक्त जाहलो आहे (3) --डॉ.कैलास गायकवाड

रेल्वे पोलीस

लेखक यल्लप्पा सट्वजी कोकणे यांनी शनिवार, 23/05/2015 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
रेल्वे पोलीस महिला रेल्वे डब्यात, तो एकच पुरुष होता. तो दुसरा तिसरा कोणी नाही, बंदुक धारी रेल्वे पोलीस होता. नजर त्याची तीक्ष्ण होती, संकटाचा मनी तो अंदाज धरी. मनात कसली भीती न बाळगता, महिला बिनधास्त प्रवास करी. तासंतास रक्षणासाठी उभा. आपली तहान भूक हरवून, सलाम माझा त्या जवानाला, ते भीतीला लावतात पळवून. यल्लप्पा सटवाजी कोकणे ०१/०३/२०१५ ९८९२५६७२६४

आजारपण

लेखक यल्लप्पा सट्वजी कोकणे यांनी शनिवार, 23/05/2015 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
आजारपण रुसलेत शब्द आज माझे लाडक्या माझ्या लेखणी वर, आहे त्रस्त आजारात म्हणूनी उमटली नाही कविता कागदावर ! तयार झाल्या मनात रचना शब्दांत मांडता आल्या नाही, रूग्णालयी उपचार घेता घेता कागदावर टिपता आल्या नाही ! होते भयाण चार दिवस ते गेली थकून माझी भार्या, पैसा वेळ झाला खर्ची झाली दुबळी माझी काया ! नको रे, आजारपण देऊ कोणा ताळमेळ सारा बिघडून जातो, गेलेल्या वेळेची करता भरपाई पुन्हा येथे जीव थकुन जातो ! यल्लप्पा सटवाजी कोकणे १६ एप्रिल २०१५ ९८९२५६७२६४

किणारा अन् लाट

लेखक यल्लप्पा सट्वजी कोकणे यांनी शनिवार, 23/05/2015 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
किणारा अन् लाट अजब मैत्री आहे किणारा अन् लाटेची, काय जादू आहे निसर्गाच्या या किमयेची? स्पर्शून हळूच जाते लाट हि किणार्‍याला, विलीन होत सागरात खुणावित जाते वार्‍याला! काय उपमा द्यावी दोघांच्या या नात्याला? यात कसे विसरता येईल नटखट वेड्या वार्‍याला? यल्लप्पा सटवाजी कोकणे १८ एप्रिल २०१५ ९८९२५६७२६४

मनात माझ्या

लेखक विदेश यांनी शनिवार, 23/05/2015 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
सखे घेतला हात तुझा हाती जेव्हा माझ्या वाटुन गेले जग मी जिंकले मनात माझ्या .. फुटू लागला प्रीतीचा अंकुर हृदयामधुनी होता पहिली नजरानजर वाटे मनात माझ्या .. आकाशाचे मीलन धरतीवर होई जेथे क्षितिजावर मी रंग उधळले मनात माझ्या .. फिरू लागलो जोडीने त्या उद्यानामधुनी उमलु लागली डोलु लागली फुले मनात माझ्या .. झाडाखाली विश्व विसरलो उन्हात जेव्हा सखये किती बरसला अवचित पाऊस मनात माझ्या .. आपण दोघे चांदण्यात त्या निवांत न्हात होतो चंद्रालाही खूप खिजवले दुरुनी मनात माझ्या .. जन्म हा केवळ दोघांचा सातही जन्म असावा मिळुनी घ्यावी शपथ दोघांनी आले मनात माझ्या .. .
काव्यरस

प्रेम

लेखक परी१२३४५ यांनी शुक्रवार, 22/05/2015 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे एक आस प्रेम म्हणजे एक ध्यास प्रेम म्हणजे एक श्वास प्रेम म्हणजे तुझा हवाहवासा सहवास. प्रेम म्हणजे गर्दीतला एकटेपणा प्रेम म्हणजे एक आंतरिक वेदना प्रेम म्हणजे एक गोड संवेदना प्रेम म्हणजे हुरहूर लावणारी मनाची दशा प्रेम म्हणजे चढलेली एक नशा. प्रेम म्हणजे माझ तुझी वाट पहाण प्रेम म्हणजे तुझ न येण प्रेम म्हणजे मी तुझी वाट पाहून थकून जाण प्रेम म्हणजे तू येणार नाहीस हे माहित असूनही रोज तुझीच वाट पहाण. येशील कधी तू माहित नाही तरीही रोज वाट तुझी पाहीन अखेरच्या श्वासापर्यंत फक्त तुझीच राहीन फक्त तुझीच राहीन.

कुणी जाल का

लेखक मित्रहो यांनी बुधवार, 20/05/2015 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षापूर्वीचे गोष्ट आहे त्यावेळेला डीजीटल कॅमेरे नुकतेच आले होते. काढलेला फोटो लगेच दिसणे ह्या गोष्टीचे फार अप्रूप होते. त्यावेळेला पर्यटन स्थळी डिजीटल कॅमेरा गळ्यात घालून फिरणे हे प्रतिष्ठेचे लक्षण होते. मी काही कामानिमित्त गोव्याला गेलो होतो, एकटाच होतो. काम झाल्यावर पणजी जवळील मिरामार बीचवर बसलो होतो. सुरेख संध्याकाळ होती, सूर्य मावळत होता, तो तांबडा रंग पाण्यावर दिसत होता. गार हवा सुटली होती. अशा रम्य संध्याकाळी, अशा रम्य ठिकाणी एक नुकतेच लग्न झालेले जोडपे आले होते. हनीमुनला आले असावे. त्या बुवाला कदाचित तिचा पावलांपर्यंत पाणी असलेला फोटो घ्यायचा होता परंतु समुद्र मस्तीत होता.
काव्यरस

चिंब

लेखक अर्व यांनी बुधवार, 20/05/2015 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस झरला कितीदा माझ्या अंगणात मन चिंब ही कितीदा भिजले पावसात... पाउस बरसे वरवर पोहचत आत नाही नेईल काळजासी तो तुझा हात नाही एकटाच सोडलीस तु भरल्या संसारात... मन चिंब ही कितीदा भिजले पावसात... उबदार त्या मिठीचा आता ज्वार नाही ईथे श्रावणाला आता धार नाही किती सरी जळाल्या वणवा वादळात... मन चिंब ही कितीदा भिजले पावसात... मी एकला कुठेसा बाकावरी विसावे.. क्षण राहीले जे काही ते ईथेच उसावे... कमरेत वाकलेला वड उभा अंगणात... मन चिंब ही कितीदा भिजले पावसात... कवी : अर्व ( निशांत तेंडोलकर..)
काव्यरस

गॅलरीतला पालापाचोळा

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 17/05/2015 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
या आज्ज्यांच्या गॅलऱ्या, अशा मऊशार कशा? कष्टाने खुरमुडले हात यांचे, पाठीवरती मऊच कसे होतात? कानाखाली लगावल्या कधी दोन, आज त्यांचे गालगुच्चे कसे होतात? या आज्ज्यांच्या गॅलऱ्या, अशा मऊशार कशा? देव सारे पाण्यात बुडले, तरी यांच्या श्रद्धा, गाथेसारख्या कशा बरे तरतात? बाग सारी उजाड झाली, तरी नातीसाठी दोन फुले कुठून बरे आणतात? या आज्ज्यांच्या गॅलऱ्या, अशा मऊशार कशा? मुलेबाळेलेकीसुना सगळे परके झाले, तरी यांच्या गार पडवीत इतके झोपाळे कसे बरे झुलतात? घरदारगावदेश सगळे कसे मागे पडले, तरी यांच्याच एका गॅलरीसाठी पावले कशी माघारी वळतात? या आज्ज्यांच्या गॅलऱ्या, अशा मऊशार कशा?
काव्यरस