Skip to main content

कविता

बायका

लेखक नाहिद नालबंद यांनी शनिवार, 29/01/2011 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
नसत्या चौकशा कशाला, लागतात या बायकांना ? एकमेकींना येता - जाता, शिकवत असतात शहाणपणा "पहिल्यापासूनंच शांताबाई वचक ठेवा सुनेवर नाहीतर एक दिवस,मिर्‍या वाटील डोक्यावर" दिवसभर तोंडाची अखंड चालू असते टकळी हिची सून गोरी अन् तिची सून काळी हिच्या मुलीला गेलेत 'दिवस' तिच्या मुलीला संपलाय 'आठवा' हिचा जावई काळा अन् तिचा नवरा बावळा "सांगू नका कुणाला बरं!" असं बजावून चारचारदा बातम्या देतात एकमेकींना, काय म्हणावे आता या बायकांना नसत्या चौकशा कशाला, लागतात या बायकांना ? एकमेकींना येता - जाता, शिकवत असतात शहाणपणा -नाहिद नालबंद
काव्यरस

शाळेतले झुरळ

लेखक अमित करकरे यांनी शनिवार, 29/01/2011 04:35 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एका झुरळाने घेतला, शाळेमध्ये प्रवेश; सर्वात पुढच्या बाकावर बसले, घालून कोरा गणवेश. बाई येताच उडी मारुन, ते चाळू लागले मस्टर; घाबरुन जाऊन, फेकून मारले, बाईंनी त्याला डस्टर. झुरळाच्या पाठीत धपकन बसला, भलताच जोरात दणका; तुटला बहुदा कमरेचा त्याच्या, दुसरा – तिसरा मणका. सुसाट त्याने गाठली, समोरच्या भिंतीमधली भेग; शिक्षण राहू दे बाजूला, आपली लांबूनच बरी भेट!!
काव्यरस

ढेकणांचा अड्डा

लेखक अमित करकरे यांनी शनिवार, 29/01/2011 04:33 या दिवशी प्रकाशित केले.
ढब्बूनानांच्या बिछान्यातले, एकूण एक ढेकूण भरल्या पोटी, जरा पहुडले, सतरंजीला टेकून पडल्या पडल्या ढेकूण करती, सुखदु:खाच्या गप्पा फारच वाईट रात्री आल्या, आपल्यावरती यंदा झोपत नाहीत पूर्वीसारखे, ढब्बूनाना सध्या अर्ध्या-सोंडी उठती ढेकूण, भलताच झाला वांदा आधीच घोरणे, ऎकुन त्यांचे, दडपून जाई छाती त्यातून हर्बल पेस्ट-कंट्रोलची, सदैव राही भीती तरिही नाना बरे, कितीही आली संकटे जरी दिवसागणती त्यांची वाढे, जाडी-ढब्बी ढेरी भरल्या वजनी कुशी बदलणे, नाही राहिले सोपे नानांना मुळी कळतच नाही, आम्ही चावलो कोठे पुरेत गप्पा, झोपा आता, ढेकणोबा भरती रागे गोंधळ तुमचा ऎकून नाना, खाडकन झाले जागे
काव्यरस

डासाचे गाणे

लेखक अमित करकरे यांनी शनिवार, 29/01/2011 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
डासाची आई काळजीने विचारी, का रे माझ्या बाळा? माणसांच्या कानाशी गुणगुणण्याचा, तुला का बरं कंटाळा? डास म्हणाला, मी जेव्हा-जेव्हा, कानाशी गुणगुणतो जो-तो फटके मारुन मला लांब लांब घालवतो फुकट असूनही ऎकत नाही कोणीच माझं गाणं लागेल ना अशाने माझ्या करियरला कायमचंच टाळं ठरलं आता, डायरेक्ट गाठायचा सारेगमप चा सेट सादर करायचं गाणं घेऊन मान्यवरांची भेट भेट वगैरे ठीक आहे, पण जपायला सांगे आई पल्लवीमुळे प्रेक्षक वाजवती सदानकदा टाळी
काव्यरस

कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस ...

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 28/01/2011 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
दोन कविता देत आहे, एक आईच्या भुमीकेमधुन आणि दुसरी मुळ कविता अविनाश काकांनी लिहिलेली बाबांच्या भुमिकेतुन ... अविनाश काकांची कविता वाचताना अजुनही मन भरुन येते.. ... (कविता पुन:प्रकाशित) ----------- १. मी.. तू अन तुझा पपा आपल छोटस नटलेल जग.. सासरी तू गेल्या पासुन बैचेन झाले आहे अगदी, हे घरट .. तुझी ती रुम, तुझी पुस्तके , तुझा कॉम्प, सारं तसच अगदी शांत ... आता तुझ्या बाबांची लुडबुड नाही की तुझा किलबिलाट तेथे अगदी निरस वाटते आहे ग पोरी आठवतं मला अता ते तुझा पसारा पाहुन माझं ओरडणं जास्त काम पडयचं मला पण ह्यानी तुझी बाजू घेतली तरी रागारागातच सारं आवरणं रोज सकाळची तुमची ती मस्ती आणि ते भांडन ..

कसे उदास नि बेचव वाटते हे आयुष्य ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 28/01/2011 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
कसे उदास नि बेचव वाटते हे आयुष्य हे क्षण ..! उत्साह संपून सारे गोठून जातात आनंदाचे क्षण नि ... कशे आठवत राहतात प्रेम तुटल्याचे क्षण सरळ नकार त्याच्या मर्दपणाची बेदम हार ..!! हातात हात घेऊन ते बसलेले ते निवांत क्षण कुठे गहाळ होतात ...? आणि त्या आणा भाका प्रेमाच्या क्षणभर मिठीत विरघळून गेलेले ते हळुवार क्षण तो स्पर्श ती बेहोष नजर मोहित होऊन स्वताला विसरून गेलेले क्षण कितीतरी काळ लोटला हरवून गेला आठवण आली की भळभळते जखम .... एक ओली तिची आठवण .... कालच ती स्वप्नात आली जशीच्या तशी नि मग तो विसरून गेला ते उदासपण क्षणभर.......
काव्यरस

स्वप्नांचे पान मुंबई

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 27/01/2011 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांचे पुर्णत्व येथे स्वप्नांचे पान मुंबई तरुणाईची सळसळ येथे तारुण्याची जान मुंबई वृत्तीतली धगधग येथे जिवाचे रान मुंबई मनामनाची ओढ येथे मनातली जाण मुंबई प्रीतीतला गोडवा येथे प्रीतीचे गान मुंबई लावण्य रुप्-सौंदर्य येथे लावण्याची खाण मुंबई नजर घायाळ होती येथे नजरेचा बाण मुंबई लखलखता श्रुंगार येथे नटलेली छान मुंबई क्षणाक्षणांस महत्त्व येथे वेळेचे भान मुंबई भविष्याची उज्वलता येथे भविष्याचे ध्यान मुंबई व्यवहारातली कुशलता येथे व्यवहाराचे ज्ञान मुंबई ध्येयाचे शिखर येथे प्रगतीचे यान मुंबई कष्टकरी हात येथे हाताचे त्राण मुंबई जीवनातले अनुभव येथे अनुभवाचे दान मुंबई मराठीचे अस्तित्व येथे
काव्यरस

चंद्रावरती बांधलाय बंगला ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 26/01/2011 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रावर मी बांधलाय एक बंगला फार जुनी झालीय हकीगत जाहिरात आली होती [आठवतंय का ..?] चंद्रावर जमीन मिळतेय तेव्हाच घेऊन ठेवलीय दहा रुपये एकरने चक्क वीस एकर घेऊन ठेवलीय माझ्याकडे कागद पत्र आहे कालच चंद्राचा सेल आला बंगला बांधून तयार आहे कधी येताय राहायला ..? हुरळून गेलो कसा असेल बंगला चंद्राने "ई"मेल केलाय . मस्त बंगला..!
काव्यरस

नेते नरमले

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 26/01/2011 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
नेते नरमले मोठे गरजले छोटे बरसले रेती वाहतच गोटे अडकले मते पाहताच नेते नरमले ललना पाहून कपडे शरमले चकवेही आज रस्ता भटकले शिपाई मजेत कैदी सटकले बिल्डर म्हणताच मंत्री दचकले काजवे रात्री अभय चकाकले गंगाधर मुटे =============

रावणाला कोणी मारला ?

लेखक नाहिद नालबंद यांनी मंगळवार, 25/01/2011 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
एक शिक्षण अधिकारी एकदा एका शाळेत गेला सहजच एका वर्गात शिरला, एक साथ नमस्ते - सारा वर्ग बोलला. बसा, मुलांनो बसा - अधिकारी म्हणाला. "रावणाला कोणी मारला ?" - ऐसा प्रश्न् विचारला सारा वर्ग शांत शांत जाहला प्रश्न् पुन्हा एकदा विचारला "मी नाही मारला, मी नाही मारला - प्रत्येकजण बोलला अधिकारी खूप वैतागला, मास्तरांना म्हणाला - "रावणाला कोणी मारला, का येत नाही मुलांना ?" मास्तरांनी खुलासा केला - आमचा विद्यार्थी साधा भोळा गांधी अहिंसा ठाऊक त्याला कशाला कोण मारेल रावणाला ? अधिकारी आणखी वैतागला, मुख्याध्यापकांकडे गेला, झाला प्रकार सांगितला, "रावणाला कोणी मारला ? विद्यार्थी सांगत नाहीत" - म
काव्यरस