Skip to main content

समाज

भारतीय लोकशाही आणि जातजमातींच्या अस्तित्वाचा गुंता

लेखक मन यांनी मंगळवार, 01/05/2018 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
काल वसंत व्याख्यानमालेत सुहास पळशिकरांच्या भाषणाला गेलो होतो. छोटेखानी भाषण होतं. तासभराचं असेल. विषयही घिसापिटा वाटेल असा होता. "जातजमातींच्या अस्तित्वाचा गुंता आणि भारतीय लोकशाही ". पण मला भाषण आवडलं. भाषणातला जो cosmetic भाग होता, तोसुद्धा आवडला. पळशीकरांचा आवाज, बोलण्याची लय, स्वच्छ,स्पष्ट शब्दोच्चार आणि अचूक शब्द निवड. इंग्लिश पुस्तकांच्या तुलनेत मराठी पुस्तकांमध्ये खूपदा हा दोष आढळतो की त्यांची छपाई तितकीशी भारी नसते. कागद सुमार/सर्वसाधारण असतो. फॉण्टकडे नीट लक्ष दिलेलं नसतं. भाषणाच्या बाबतीत ह्याचे समांतर मुद्दे म्हणजे आवाज, शब्दोच्चार वगैरे.

सत्वर

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 26/04/2018 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
सत्वर ये तू निघोनी आता निबीड अरण्यी कंटक वाटा हे अंतर आता पाश म्हणू कि नाश जीवाचा करिल ऐसा तुझ्या रुपाचा तीर्थघटाचा जन्मजान्हवी, श्वास मिटावा नकोच आता वियोग असा कि दो तीरांचे वा हिमालयाचे बंध तोडूनी पाश टाकूनी माझे उरले संचित आता तुझ्या रुपाशी मिळून जावे जिथून आले हासत खेळत तिथेच माझे असणे नसणे... इतकेच होवो पुण्यसलीले, तुझ्या तटाशी भंजन व्हावे भस्मचिता अन् बंधमोक्षही उरू नये ते काही काही.... सत्वर ये तू निघोनी आता निबीड अरण्यी कंटक वाटा.... शिवकन्या

बाई पलंगावर बसून होती

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 26/04/2018 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
बाई पलंगावर बसून होती गुलाबराव मस्त मळत होते मळता मळता बघत होते बाईकडं गिधाडावानी बाई टाकत व्हती ऊसाश्यावर उसासे कधी येतायत गुलाबराव आणि काढतायत एकदाची पिसे मळता मळता थाप मारली राळ उडालेली नाकात बसली शिंकेवरती शिंक आली शिंकण्यातच सारी रात गेली आवाजाने गावाला जाग आली बाई जाम उखडली वाहून शिव्यांची लाखोली चरफडत चोरपावलांनी निघून गेली रात बी गेली अन बाई बी थापा मारण्यातच वेळ गेली {{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}}

सावधान ! आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा ..

लेखक Jayant Naik यांनी गुरुवार, 26/04/2018 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
सावधान ! आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा .. प्रसंग पहिला. एका तरूण मुलीच्या मागे चार ते पाच जण शाळेची बस घेऊन लागतात. ती मुलगी दुचाकी वरून कॉलेज मधून घरी येत असताना, तिचा पाठलाग करतात आणि बस आडवी घालून तिच्या दुचाकीचा अपघात घडवून आणतात. ती मुलगी जखमी होते . अगदी चित्रपटात घडते तसे दृश्य ...पण इथे खरे घडणारे ….त्या मुलीच्या जीवाचे काही बरे वाईट झाले नाही हे तिचे भाग्य. पण झाले असते तर ? प्रसंग दुसरा. एक दत्तक घेतलेली मुलगी . काळी सावळी. गोरी अजिबात नाही . तिच्या आईला ती गोरी व्हायला हवी आहे. कोण काय सल्ला देते तर कोण काय ? एक सल्ला.

आत्मताडनाची कविता.....

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 21/04/2018 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
आत्मताडनाची कविता लिहू नये... यात होते असे, कि आत्मा सोडून बाकी सगळे दुखावतात यात काय हशील आहे, सांग! काय कामाची असली कविता? माणूस जोडत नाही, ती कविता नाही ही घे चिकन बिर्याणी, तुला सांगतो, कविता म्हणजे बिर्याणी मसालेदार, स्वादिष्ट! बोन प्लेट तयार ठेवायची होय, होय... तसेच होते.. आत्मताडनाच्या कविता शेवटी बोनप्लेट मध्येच पडतात... मी म्हणतो, मुळात कशाला करून घ्यायचे आत्मताडन? कशाला? तुझे आज काय, तर स्वतःच स्वतःचे अपहरण उद्या काय तर स्वतः च स्वतः चा तुरुंग बांधायचा... कशासाठी म्हणतो मी?

प्रदूषण (२7)- एक मुलाकात धुळीच्या आंधी सोबत

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 19/04/2018 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
अप्रैल महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यात दिल्लीत उन्हाची प्रखरता जाणवू लागते. दिवसाचे तापमान ४० अंशाच्या वर जाते. त्या सोबत दक्षिण पश्चिम दिशेहून येणारे उष्ण वारे हि दिल्लीत येऊन धडकतात. उष्ण वार्यांसोबत राजस्थानची रेत हि दिल्लीत पोहचते. पूर्वी हि धूळ लाल-पिवळी दिसायची. पण आता काळपट दिसते. दिल्लीत लाखो वाहने आणि फैक्ट्र्या रोज आकाशात धूर सोडतात. धुरावाटे नायट्रोजन, सल्फर, कार्बन यांसह घातक रासायनिक पदार्थ हवेत मिसळतात. प्रदूषित पदार्थांचे हि बारीक कण हि या धुरासोबत आकाशात पोहचतात. धुळीच्या आंधी सोबत हे सर्व प्रदूषण घरा-घरात पोहचते.

निनावी कल्लोळ

लेखक नाखु यांनी बुधवार, 18/04/2018 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
जेटयुगाचे बडवा ढोल,बडवा ढोल !! निषेधाचाच डब्बा गोल ,डब्बा गोल!! कर्म अंधारी, वासना विखारी !! (अ)धर्म तुतारी ,क्लांत शिसारी !!! टाळाटाळ सरळसोट , टाळाटाळ सरळसोट!! आपलेच दात आपलेच ओठ !!! जालपिपाणी टिवटिव गाणी !! विदेशी विद्वेषी वणवण,तर्कशुध्दि सदैव चणचण !!! भुक्कड दक्षक भणंग रक्षक !! दुर्बलांची ऐशीतैशी !! मुजोरांप्रती प्रीतखाशी!! विफल अरण्यरुदन ,विदीर्ण मूक पीडन !! गाये हरफनमौला ,गाये हरफनमौला !! तन सुंदर धवल ,पर मन (रहे) सदा मैला!! आडवाटेला थांबलेला वाचक नाखु

वैशाख वणवा

लेखक हेमंत ववले यांनी बुधवार, 18/04/2018 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्ग नावाचे काहीतरी आहे, याचे भान आम्हाला फक्त फेसबुकवर फोटो पोस्ट करताना, शनिवार रविवारी फिरायला जाताना, फोटो लाईक करतानाच होत असते.

मित्र नव्हे, परिचित !

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 18/04/2018 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वैद्यकीय कारकिर्दीच्या सुरवातीच्या टप्प्यातील हा प्रसंग आहे. एम.डी. ही पदवी प्राप्त करून मी एका हॉस्पिटलमध्ये सल्लागार म्हणून रुजू झालो. ते हॉस्पिटल नव्यानेच सुरू झाले होते. त्यामुळे माझ्यासह इतर सहकारीही पायाभूत उभारणीची कामे मन लावून करीत होते. हळूहळू हॉस्पिटलचा विस्तार होत गेला. मग तेथील डॉक्टरांची संख्याही वाढवण्यात आली. अशाच एका नवीन भरतीच्या वेळी माझ्या विभागात डॉ. सतीश हा माझा कनिष्ठ सहकारी म्हणून रुजू झाला. महिनाभरातच मी त्याच्याविषयी एक अंदाज बांधू शकलो. तो जरी फारसा हुशार नसला तरी तो नेमून दिलेली कामे व्यवस्थित करीत असे. रोज जेवणाच्या सुटीत आम्ही दोघे एकत्र डबा खाऊ लागलो.

उन्माद

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 15/04/2018 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे देशात काय चाललंय? काय झालंय या देशाला? बलात्कार (घरात, शेतात, ऑफिसात, रस्त्यावर चालत्या वाहनात आणि आता मंदिरातही), भ्रष्टाचार, हिंसक आंदोलने, अस्हिष्णुता (घासून गुळगुळीत झालेला शब्द), शिस्तीने नव्हे, झुंडींनी- कळपांनी हत्यारबंद लोक रस्त्यावर उतरतात. बलात्कारी लोकांच्या (संत- महात्मे- बाबा- बुवांच्याही) समर्थनासाठी लोक आपला जीव ओवाळून टाकतात आणि कायद्याच्या रक्षणासाठी निवडून आलेले लोक हिंसक कळपाचे नेतृत्व करतात! जाळपोळ, तोडफोड, हत्त्या, फसवणूक, कटकारस्थान करणारे सत्तेतले पाताळयंत्री मोरखे भुमिगत सूत्रे हलवतात. जात, धर्माचा टिळा लाऊन लोक अस्मितेने घराबाहेर पडतात.