इतिहासाचे पुनर्लेखन
💬 प्रतिसाद
(352)
अ
अवलिया
Fri, 09/03/2010 - 14:37
नवीन
तद्दन बिनडोक आणि बिनबुडाचा धागा.
लवकरच विस्तृत प्रतिसाद देत आहे. चुकीचे मत आहेत या कारणांनी संपादकांनी कृपया धागा अप्रकाशित करु नये.
मधल्या काळात बर्याच प्रश्नांचे यथायोग्य खंडन झाल्याने प्रतिसाद देवुन पुन्हा खंडन करायची गरज नाही.
पूढिल संशोधनास (!) हार्दिक शुभेच्छा !!
(मटेरीयल हवे असल्यास पुरवले जाईल. नमुना म्हणुन हे घ्या - ब्राह्मण गुढिपाडवा का साजरा करतात? उत्तरासाठी जिज्ञासुंनी व्यनी करावा)
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 09/03/2010 - 15:52
नवीन
हा १००वा प्रतिसाद. :)
- Log in or register to post comments
म
मी_ओंकार
Fri, 09/03/2010 - 15:56
नवीन
फास्टेस्ट सेंचूरी बद्दल !!
- ओंकार.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 09/04/2010 - 09:30
नवीन
***द्वेष्ट्या पर्याचा साफ निषेध!
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sat, 09/04/2010 - 09:32
नवीन
तुमच्या निषेधाला योग्या त्या ठिकाणी मारण्यात आले आहे. शेवटी आजवर तुम्ही आमचा निषेध आणि आमच्यावर अन्याय करण्या व्यतिरीक्त अजुन काय केले आहेत म्हणा.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 09/04/2010 - 09:40
नवीन
हे पहा तुम्ही उगाच तुमची भांडणं व्यक्तीगत पातळीवर आणू नका. तुम्ही ***द्वेष्टे आहात हे स्पष्ट आहेच, पण आता तुम्ही उगाच माझ्या आयडीचा द्वेषही करता आहात.
*** आपल्याला जे लोकं आवडत असतील किंवा नसतील त्यांची कॅटॅगरी भरून टाका. मी ***च्या जागी मनुष्य असं वाचते.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 09/04/2010 - 16:33
नवीन
पण ते पुनर्लेखन सुरू कधी होणार आहे? त्यासाठी स्वतंत्र धागा (किंवा धाग्याचं बंडल) येणार आहे का?
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Sat, 09/04/2010 - 16:41
नवीन
त्यासाठी इतिहासपुनर्लेखण मंडळाचे अध्यक्ष परा यांच्याशी संपर्क साधावा.
कार्यालयाचा पत्ता
परा राजवाडे
इतिहासपुनर्लेखण मंडळ
मस्ताणी दर्वाज्याजवळची उजवीकडून ३री ओसरी,
बुधवार पेठ (बरोबर दरवाज्याबाहेर बुधवार पेठच येते)
पुणे २
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 09/04/2010 - 17:07
नवीन
पत्ता पण एकदम "ऐतिहासिक" आहे.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Sun, 09/05/2010 - 04:27
नवीन
हे मी चुकून परा जवाडे वाचलं आणि नको ते विचार मनात आले.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Sun, 09/05/2010 - 04:30
नवीन
नेहेमीप्रमाणे गल्ली चुकलात इतकंच म्हणेन.
- Log in or register to post comments
न
नरेश धाल
Sun, 09/05/2010 - 05:30
नवीन
>>परा जवाडे

मनि वसे ते स्वप्नि दिसे.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 09/10/2012 - 19:14
नवीन
>>परा जवाडे
SmileyCentral.com
मनि वसे ते स्वप्नि दिसे.
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
Tue, 09/07/2010 - 18:37
नवीन
साआळाआ ।आआ ड्।आआङाआ वाआच्।आणांआआटृआ ़आर्आआ र्अॅ !
(साला, हा धागा वाचनमात्र करा रे ! कॅप्स लॉक ऑन राहिले. धन्यवाद.)
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 09/06/2010 - 17:59
नवीन
३०० होणार की नाय?
- Log in or register to post comments
N
Nile
Fri, 09/03/2010 - 17:38
नवीन
मध्ये पहिल्यापानावर येण्याचा अगदी हीन प्रयत्न.
पर्यांसारख्यांनी इतिहासाचा आपल्या फायद्यासाठी उपयोग केल्यानेच ही स्थिती आली आहे. असो.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Sat, 09/04/2010 - 05:50
नवीन
जमलेच तर पुनर्लेखनासाठी मदत करावी. गांभीर्याने चर्चा करणार्यांचा हिरमोड त्यांची चेष्टा करु नये.
पर्यांसारख्यांनी इतिहासाचा आपल्या फायद्यासाठी उपयोग केल्यानेच ही स्थिती आली आहे. असो.
याचा काही पुरावा आहे का बोला? त्याआधी पुरावा म्हणून काय देणार ते बोला नाहीतर द्याल तुमच्याच डायरीची पाने.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Sat, 09/04/2010 - 08:19
नवीन
सहमत आहे.
- Log in or register to post comments
N
Nile
Sat, 09/04/2010 - 10:53
नवीन
लै पुरावे आहेत, हे इथे समोर आहे ते ही दिसत नसेल तर काय करणार? घोड्याला पाण्याजवळ नेता येते, झोपलेल्याला उठवता येते.. वगैरे वगैरे.
बाकी आमच्या वक्तव्यावर धागा लेखकाचे मौन सर्वकाही सांगुन जाते.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Sat, 09/04/2010 - 10:57
नवीन
सहमत तुम्हाला पाण्याजवळ आणले आहे. :)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sat, 09/04/2010 - 11:05
नवीन
डुकराशी मारामारी केल्याने डुकरालाच मजा येते अशा काहीशा अर्थाचे एक वाक्य परवा कोणीसे इंग्रजीत लिहिले होते. त्यामुळे तुम्हाला मजा येउ नये ह्यासाठी आम्ही मौन बाळगुन आहोत ;)
- Log in or register to post comments
N
Nile
Sat, 09/04/2010 - 11:18
नवीन
स्वानुभव अश्या वाक्यांवर विश्वास ठेवायला मदत करतात असे ऐकले होते, तुमच्या उदाहरणावरुन त्याची खात्री पटु लागली आहे. खेदाने, सद्द्यस्थितीत आम्हाला मजा येणारच नाही, पण तुम्ही पुरेसे शोधलेले दिसतात. ;)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 06/09/2011 - 11:48
नवीन
प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो..
असे का होते याचा कधी विचार केला आहे का?
विचार करणाराला जे दिसते ते इतराना दिसत नाही
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 06/09/2011 - 11:51
नवीन
'त्या' विचारवंत ह्या उल्लेखाचा संदर्भ 'विचारजंत' ह्या मुळ शब्दाशी आहे असे अंधूकसे स्मरते.
- Log in or register to post comments
आ
आनंदयात्री
गुरुवार, 06/09/2011 - 12:09
नवीन
हा हा हा करेक्ट ..
नीलकांताने काय जंतांचे डीडीटी फवारलेकी काय मिपावर ? बरेच दिवसात जंताळ अॅक्टीव्हिटी दिसली नाही .. किंवा कोणी जंतग्रस्त झाले नाही ;)
- Log in or register to post comments
न
नाना चेंगट
Mon, 09/10/2012 - 14:44
नवीन
कुठवर आले लेखनाचे काम?
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 09/03/2010 - 12:02
नवीन
रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का?
दाखवले नाही म्हणजे घालत नव्हते किंवा तसे नव्हते असे नाही. रावंण ब्राम्हण होता व दुष्ट होता. रावणाने निर्माण केलेली वेदगायनाची एक पद्धत ज्याला जटापाठ म्हणतात ती अजूनही अस्तित्वात आहे. अजूनही वापरली जाते. मूळ संहिता पाठ झाली की प्रत्येक श्लोकाची पदं म्हणायची, मग क्रम म्हणायचं, मग जटा आणि मग घनं. अजूनही घनपाठी हा अनवट उल्लेख पेपरांमधल्या बातम्यांत दिसतो.
राज्याभिषेकाआधी शिवरायांची मुंज लावली होती असे उल्लेख सापडतात. बाकी देवदवतांनी सगळ्या कुळांत अवतार घेतले आहेत. जास्तीकरून ब्राम्हण आणि क्षत्रिय. त्यातही दशावतारांपैकी २ ब्राम्हण (परशुराम, वामन) ४ क्षत्रिय (राम, कृष्ण, बुद्धं, पृथू(अंशावतार)), ४ पशू /अर्धपशू(मत्स्य,कूर्म,वराह,नरसिंह) असे माझ्या माहीतीप्रमाणे आहेत. कली अवतार म्हणजे प्रत्यक्ष आम्हीच आहोत.
अजूनही अनेक मराठा मित्र आमच्याबरोबर श्रावण शु. पंचमीच्या (ऋग्वेदी श्रावणीला) दिवशी श्रावणीला असतात. त्यांचीही रितसर मुंज झाली आहे. वैश्यवाणी असलेली विचारे, हेगीष्टे इ मंडळीही मी ऋग्वेदी श्रावणिला पाहीली आहेत.
बाकी चालूद्या.
(ओसरीचा योग्य उपयोग होतो आहे हे पाहून आनंदीत होत आहे) :)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 09/03/2010 - 12:04
नवीन
>> कली अवतार म्हणजे प्रत्यक्ष आम्हीच आहोत.
अरेच्या! इतक्यातच सांगून टाकलेत! आता काय उरले चर्चा करण्यासारखे!
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 09/03/2010 - 12:06
नवीन
कलीदेखील ब्राह्मणच असणार आहे. त्याला अश्वत्थामा सहाय करणार म्हणजे परत एकदा ब्राह्मण. त्याला वेद व्यास धर्म शिकवणार म्हणजे परत ब्राह्मणच. आणि युद्धकला परशुराम शिकवणार म्हणजे ब्राह्मणच.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 09/03/2010 - 12:08
नवीन
हेच बोल्तो. सगळीकडे 'आम्ही लै भारी' हेच दाखवायचे प्रयत्न.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 09/03/2010 - 12:18
नवीन
हेच बोल्तो. सगळीकडे 'आम्ही लै भारी' हेच दाखवायचे प्रयत्न.
प्रयत्न ?? आहोतच आम्ही भारी. ;) असो.
अरे पण लढणारे तर क्षत्रिय होते ना. मग त्यांचे युद्धकौशल्य लिहायलाही ब्राम्हणच पुढे झाले ना! व्यास म्हणा, शिवभारत लिहीणारे कवींद्र परमानंद म्हणा, भृगू म्हणा सगळे ब्राम्हण. अरे शेवटी आपले पूर्वज आहेत ते. मग इतिहास ब्राम्हणाने लिहीला काय किंवा क्षत्रियाने, शूद्राने लिहीला काय. योग्य ते लिहीले गेले हे महत्वाचे.
बाकि मनुस्मृतीवरून ब्राम्हणांना धारेवर धरणार्यांना हे माहीत आहे का कि मनू हा ब्राम्हण नव्हे क्षत्रिय होता. मनु हा प्रजापालक राजा म्हणजेच क्षत्रिय होता.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 09/03/2010 - 12:23
नवीन
बाकि मनुस्मृतीवरून ब्राम्हणांना धारेवर धरणार्यांना हे माहीत आहे का कि मनू हा ब्राम्हण नव्हे क्षत्रिय होता. मनु हा प्रजापालक राजा म्हणजेच क्षत्रिय होता.
किंचित सुधारणा. मनुस्मृतीवरून नव्हे तर त्यातला काही श्लोकांवरुन.. (ज्यातले अनेक प्रक्षिप्त असल्याचे संशोधक मानतात) ..
बर. मनुस्मृती कधीही कुठेही संपूर्ण भारतात लागु होती याचा पुरावा द्या म्हटले तर चुप्प.
मनुस्मृती नावाच्या किती स्मृती विचारले तर चुप्प.
अहो इतकेच काय मनुस्मृतीतला श्लोक देउन अर्थ विचारला तरिही...चुप्पच !
पण रस्त्यावर उतरुन बोम्ब मारायला पुढे.
असो. ज्याची त्याची जाण समज..
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 09/03/2010 - 12:29
नवीन
अर्थाशी आम्हांला देणे घेणे नसते.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 09/03/2010 - 16:00
नवीन
>>>>मनुस्मृती कधीही कुठेही संपूर्ण भारतात लागु होती याचा पुरावा द्या म्हटले तर चुप्प.
राजे, महाराजांनी एखाद्या प्रश्नावर शास्त्रकारांना विचारले की, अशा अशा प्रसंगी धर्मशास्त्र काय म्हणते ? असे विचारल्यावर शास्त्रकार पटापट अमुक अमुक स्मृती असे असे म्हणते. धमुक-धमुक स्मृती तसे म्हणते, किंवा अशाच प्रसंगी अशाच एका राजाने अशाच एका प्रसंगी असा असा निर्णय घेतला होता. तेव्हा सदरील प्रश्न, प्रसंग पाहता अमुक-धमुक स्मृतीनुसार अशी योग्य कार्यवाही व्हावी असे शास्त्रकार म्हणत असतील ना ! जिथे जिथे असे धर्मशास्त्रावर राज्य चालत असतील तिथे तिथे हे उपद्याप होतेच तेव्हा भारतात कुठे असे होते असे पुरावे द्यायची गरज पडू नये असे वाटते.
>>>मनुस्मृती नावाच्या किती स्मृती विचारले तर चुप्प.
प्रश्न काय कळ्ळा नाय...! मनुस्मृतीची रचना करणार्याची दोन किंवा अधिक नावे आहेत आणि अशी रचना मूळ कोणाची याला काही आधार नाही. स्मृती यांची संख्या जवळपास शंभराच्यावर असावी. बाकी मनुच्या कोणकोणत्या रचना आहेत हेही सांगता येणार नाही. पण जी काही उपलब्द्ध मनुस्मृतीची म्हणून उपलब्ध रचना आहे, त्यावरुन बराच काथ्याकूट होऊ शकतो.
>>>मनुस्मृतीतला श्लोक देउन अर्थ विचारला तरिही...चुप्पच !पण रस्त्यावर उतरुन बोम्ब मारायला पुढे.
रस्त्यावर कोणी येऊ नये ही गोष्ट खरी असली तरी माणूसपण देणारे ग्रंथ देणारे ग्रंथ डोक्यावर घेऊन नक्कीच मिरवले पाहिजेत असे वाटते.
बाकी, मानवजातीचा मूळ पुरुष म्हणजे मनु असेल तर या महापुरुषाला जात असेल का हा मात्र संशोधनाचा विषय व्हावा. बाकी चालु द्या....! :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
भ
भारी समर्थ
Fri, 09/03/2010 - 19:01
नवीन
अवांतर का काय ते.... धमुक्-धमुक लई ग्वाडंय राव!
भारी समर्थ
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Sat, 09/04/2010 - 06:04
नवीन
बाकी, मानवजातीचा मूळ पुरुष म्हणजे मनु असेल तर या महापुरुषाला जात असेल का हा मात्र संशोधनाचा विषय व्हावा. बाकी चालु द्या....!
आता व्होल इंडियाचे नॅशनल फादर गांधीबाबांला पन जात होतीच ना! मग मनूमहाराजांनी काय घोडं मारलेनि?
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Sat, 09/04/2010 - 06:04
नवीन
बाकी, मानवजातीचा मूळ पुरुष म्हणजे मनु असेल तर या महापुरुषाला जात असेल का हा मात्र संशोधनाचा विषय व्हावा. बाकी चालु द्या....!
आता व्होल इंडियाचे नॅशनल फादर गांधीबाबांला पन जात होतीच ना! मग मनूमहाराजांनी काय घोडं मारलेनि?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 09/04/2010 - 06:38
नवीन
मनू महाराजाच्या बाबतीत मला असे वाटते की, मनू महाराज कोणत्याच जातीचे नसावेत त्याचे कारण असे की, या चराचर सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव यांनी आपल्या शरीराचे दोन भाग केले अर्धा भाग पुरुषाचा तर अर्धा भाग स्त्रीचा आणि मग कोणत्या तरी चमत्काराने तिथे विराट नावाचा महापुरुषाची निर्मिती झाली.पुढे विराट नावाच्या या महापुरुषाने मोठी तपश्चर्या केली आणि मग या मनूची निर्मिती झाली. तेव्हा आगा न पिछा असलेल्या या मनूला कोणत्या जातीचा-धर्माचा कसे ठरवता येईल. असो, अशी काही त्यांच्या जन्माबद्दल कथा सांगितल्या जाते. या पेक्षा अन्य कोणती कथा तुम्हाला माहित असेल, किंवा अशा काही कथांमधून त्यांच्या जातीबद्दल-धर्माबद्दल काही माहिती कळणार असेल तर अशी कथा वाचण्यास मी उत्सूक आहे.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Sat, 09/04/2010 - 08:20
नवीन
>>>राजे, महाराजांनी एखाद्या प्रश्नावर शास्त्रकारांना विचारले की, अशा अशा प्रसंगी धर्मशास्त्र काय म्हणते ? असे विचारल्यावर शास्त्रकार पटापट अमुक अमुक स्मृती असे असे म्हणते. धमुक-धमुक स्मृती तसे म्हणते, किंवा अशाच प्रसंगी अशाच एका राजाने अशाच एका प्रसंगी असा असा निर्णय घेतला होता. तेव्हा सदरील प्रश्न, प्रसंग पाहता अमुक-धमुक स्मृतीनुसार अशी योग्य कार्यवाही व्हावी असे शास्त्रकार म्हणत असतील ना ! जिथे जिथे असे धर्मशास्त्रावर राज्य चालत असतील तिथे तिथे हे उपद्याप होतेच तेव्हा भारतात कुठे असे होते असे पुरावे द्यायची गरज पडू नये असे वाटते.
माझा मुद्दा केवळ मनुस्मृती होती का इतकाच होता. तुम्ही अमुक अमुक स्मृती म्हटले म्हणजेच मनुस्मृतीपेक्षा अन्य स्मृती वेगवेगळ्या भागात प्रचलित होत्या हे तुम्हाला मान्य आहे, असावे. स्मृतींमधे महाभारताची पण गणना होते. तसेच वेदांच्या संहिता भागाव्यतिरिक्त (मंत्र आणि आरण्यक, उपनिषदे वगळुन) जो भाग आहे त्याला सुद्धा स्मृती असे नाव आहे. म्हणजे स्मृतीनुसार असे जिथे असेल तिथे ते मनुस्मृतीच आहे असे मानणे सर्वथैव चूक आहे. असो.
>>>>प्रश्न काय कळ्ळा नाय...! मनुस्मृतीची रचना करणार्याची दोन किंवा अधिक नावे आहेत आणि अशी रचना मूळ कोणाची याला काही आधार नाही. स्मृती यांची संख्या जवळपास शंभराच्यावर असावी. बाकी मनुच्या कोणकोणत्या रचना आहेत हेही सांगता येणार नाही. पण जी काही उपलब्द्ध मनुस्मृतीची म्हणून उपलब्ध रचना आहे, त्यावरुन बराच काथ्याकूट होऊ शकतो.
काथ्याकुट जरुर करा. पण जे उपलब्ध आहे त्यावर करा. मनचं काही घालु नका हेच सांगणं आहे.
बाकी चालु द्या.. इतिहासाचे पुनर्लेखन म्हणतो मी !! ;)
- Log in or register to post comments
न
नरेश धाल
Fri, 09/03/2010 - 14:55
नवीन
त्या परशुरामाचा वध अर्जुनाने केला होता, त्यासाठी त्याला एक हजार हाथ विष्णूनी प्रदान केले होते.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 09/03/2010 - 14:59
नवीन
हांग आश्शी !
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 09/03/2010 - 15:07
नवीन
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 09/03/2010 - 15:13
नवीन
पण सहस्त्रार्जुनाचा "वध" केला होता ना परशुरामाने? (पुरावा मिळणार नाही)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 09/03/2010 - 15:20
नवीन
हो तोच तो :) महिस्मती राज्याचा स्वामी सहस्त्रार्जुन उर्फ कार्तविर्य अर्जुन. त्याचाच नाही तर त्यांच्या संपुर्ण वंशाचाच परशुरामांनी विनाश केला.
- Log in or register to post comments
प
पुष्करिणी
Fri, 09/03/2010 - 15:23
नवीन
हे सगळं जुनं आणि खोटं आहे , खरा इतिहास जाणून घ्या आता.
- Log in or register to post comments
न
नरेश धाल
Fri, 09/03/2010 - 15:36
नवीन
परशुराम विनाश करायला गेला होता खरा, पण मध्ये एक देवीने येऊन त्यांना वाचविले,
मी शोधत आहे त्या देवीचे नाव, थोडा वेळ द्या मी नक्कि सांगतो.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Sat, 09/04/2010 - 07:59
नवीन
सापडली का देवी? हरकत नाही. सहस्त्रार्जुनाला मारले हा इतिहास खोटा आहे तर !
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Sat, 09/04/2010 - 08:07
नवीन
मग जमदग्नींना मारले हा इतिहासही खोटा म्हणायचा. म्हणजे २१ वेळा पृथ्वी निक्षत्रीय केली हे सुद्धा खोटे म्हणायचे. म्हणजे रक्ताची तळी सुद्धा खोटीच म्हणायची.
चला पराशेठला अपेक्षित असलेला नाहीतरी इतिहासाच्या थोड्या भागचे तरी पुनर्लेखन होणार म्हणायचे.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sat, 09/04/2010 - 08:12
नवीन
हाच लपवला गेलेला इतिहास बाहेर येणे हेच तर ह्या धाग्याचे ध्येय आहे.
श्रीमंत परादेव कोकाटे
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Sat, 09/04/2010 - 08:21
नवीन
अगदी असेच आणि हेच म्हणतो..
ना ना साळुंखे
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- ›
- »