Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

याकुब मेमनच्या फाशीच्या निमित्ताने

व
विद्यार्थी
Sat, 07/25/2015 - 16:49
🗣 277 प्रतिसाद
१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकुब मेमनचे फाशी वाचवण्याचे सर्व पर्याय संपत आल्यामुळे त्याला लवकरच फाशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिरेक्यांना फाशी देण्याची वेळ आली की होणाऱ्या राजकारणाची भूतकाळातील अनेक उदाहरणे असूनसुद्धा महाराष्ट्र सरकारने किंवा सरकारमधील काही अतिउत्साही व्यक्तींनी फाशीची तारीख आणि वेळ देखील जाहीर करून टाकली. फाशी प्रकरणाचा गाजावाजा होणे ही आजकालचीच गोष्ट वाटते कारण भारतात स्वातंत्र्यापासून अनेक लोकांना फाशीची शिक्षा झाली आहे परंतु त्याची एवढ्या प्रमाणात चर्चा झाल्याचे आठवत नाही. समाजातील काही उदार मतवादी लोकांना अतिरेकी, नक्षलवादि, अट्टल गुन्हेगार यांच्या मानवाधिकाराच्या चर्चा करून आणि त्यांच्याबद्दल समाजात नाहक सहानुभूती निर्माण करण्याची घाणेरडी सवय लागली आहे. आणि असे करून ते स्वतःची दुकाने चालवत असतात. फाशी झालेल्या गुन्हेगाराची जात, धर्म याबद्दल वक्तव्ये करून राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रकार तर फारच घृणास्पद आहेत. बॉम्बस्फोटामध्ये मारले गेलेले सर्व भारतीय नागरिक होते. त्यांची जात किंवा धर्म पाहून त्यांना मारले नव्हते तर मग फाशी झालेल्या या अतिरेक्याच्या धर्माची चर्चा का? भारतात फाशीची किंवा देहदंडाची शिक्षा असावी किंवा नाही यावर वेगळी चर्चा होऊ शकते पण याकुब मेमनने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी केलेली मदत आणि या स्फोटांमध्ये २५७ निष्पाप लोकांचे गेलेले बळी, हे भारतीय कायद्यानुसार त्याला फाशीची शिक्षा देण्यासाठी पुरेसे आहेत. याशिवाय याकुब मेमनला कायद्यानुसार स्वतःला वाचवण्याचे मिळणारे सारे पर्याय मिळाले आणि त्याने ते वापरालेसुद्धा. गुन्हेगार आणि अतिरेकी यांना निष्कारण सहानुभूती देणाऱ्या किंवा देण्याचा प्रयत्न करण्याऱ्या या सर्व राजकारणी लोकांना आणि तथाकथिक उदारमतवाद्यांना समाजाने अंतर्मुख होण्यास भाग पाडण्याची वेळ आली आहे असे आपणास वाटते का?

प्रतिक्रिया द्या
50188 वाचन

💬 प्रतिसाद (277)
व
विकास Tue, 07/28/2015 - 22:41 नवीन
आज व्टिटरवर पाहीलेले एक चित्र... Image removed.
म
मदनबाण Wed, 07/29/2015 - 08:47 नवीन
याकुबसाठी ज्या लोकांना मानवता आठवते त्या लोकांना बॉब्मस्फोटात ठार झालेल्यां बद्धल काहीच वाटत नाही हे विशेष ! सर्वोच्च न्यायलयाने जो निर्यण दिला तो विचार करुनच दिला ना ? मग ह्या मंडळींना याकुबच्या बाबतीत इतके प्रेमाचे उमाळे का ? याकूबच्या फाशीविरोधात मुस्लिम लोकप्रतिनिधी एकवटले, राष्ट्रपतींना पत्र LIVE: याकूब मेमनच्या याचिकेवर सुनावणी सुरु मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks in
स
सुबोध खरे Wed, 07/29/2015 - 09:08 नवीन
सत्य काय आहे? एक पैलू http://www.dailyo.in/politics/yakub-memon-1993-mumbai-blasts-tiger-memon-dawood-ibrahim-b-raman-research-and-analysis-wing/story/1/5261.html
त
तुडतुडी Wed, 07/29/2015 - 09:25 नवीन
याकूबच्या फाशीविरोधात मुस्लिम लोकप्रतिनिधी एकवटले, राष्ट्रपतींना पत्र>> तुम्हाला कधीही कुठलाही मुसलमान दुसर्या मुसलमानाच्या विरोधात बोलताना आढळणार नाही .कधीही कुठलाही मुसलमान इतर धर्मियाची बाजू घेवून आपल्याच मुस्लिम बांधवाशी भांडताना आढळणार नहि. हा हरामिपणा फक्त हिन्दुन्मधेच आढळतो . म्हणून तर ते मुसलमान कुठल्याकुठून येवून भरत खंडावर ६०० वर्षे राज्य करू शकले .देशाचे तुकडे पाडू शकले . संपत्ती, अब्रू लुटून नेवून हिंदूंना भिकारी बनवू शकले . हिंदूंना मात्र कधीच अक्कल आली नाही . फाळणीच्या वेळी मुस्लिम लोकांची इथे घरं होती , बिसनेस होता , नोकर्या होत्या . पाकिस्तानमध्ये गेल्यावर ह्या सगळ्याला मुकावं लागेल . म्हणून काही मुस्लिम भारतातच राहिले . त्यांना ह्या देशाबद्दल प्रेम बीम आहे म्हणून नाही राहिले कै
D
dadadarekar Wed, 07/29/2015 - 10:43 नवीन
:)
↩ प्रतिसाद: तुडतुडी
ज
जडभरत Wed, 07/29/2015 - 12:39 नवीन
आपण नक्की कोण आहात, दादा दरेकर? हर हर न हिंदुर्नयवनः!!! :) :) :) गंमतीत घ्या!!!
↩ प्रतिसाद: dadadarekar
ट
ट्रेड मार्क Wed, 07/29/2015 - 15:15 नवीन
स्वतःला सच्चे आणि चांगले म्हणवणारे मुसलमान पण आतंकवादी मुसलमानांचा विरोध करताना दिसत नाहीत. वरवर दाखवण्यापुरत म्हणायच आम्ही आतंकवादाचा निषेध करतो पण असं सगळे चांगले मुसलमान एकत्र येवून आतंकवाद्यांना सांगत नाहीत कि जे निरपराधांना मारतात ते धर्मभ्रष्ट आहेत आणि मुस्लिम धर्मात त्यांच्यासाठी जागा नाही.
↩ प्रतिसाद: तुडतुडी
स
सुबोध खरे Wed, 07/29/2015 - 16:34 नवीन
तुडतुडी ताई भांडणे आणि मारामारी करणे हा मुसलमानांचा स्वभाव आहे. जेंव्हा बाहेरचा कोणी मिळत नाही तेंव्हा ते आपापसातच भांडतात आणि एकमेकांचा जीव घेतात. इराण आणि इराक देश यांचे ८ वर्षे युद्ध चालले आणि त्यात १० लाख लोक मेले हे सर्व मुसलमानच होते ना?https://en.wikipedia.org/wiki/Iran%E2%80%93Iraq_War पाकिस्तानात दहशतवादाने दहा वर्षात ३५, ००० बळी घेतले( हा अधिकृत आकडा आहे, आणि बेपत्ता झालेले ( मारले गेले आणि सापडले नाहीत असे कितीतरी असतील. आणि हा आकडा वाढतच चालला आहे. जो धर्म हिंसाचारला प्रोत्साहन देतो त्याचे पहिले बळी स्वतःचेच अनुयायी असतात. https://en.wikipedia.org/wiki/Terrorism_in_Pakistan https://en.wikipedia.org/wiki/List_of_terrorist_incidents_in_Pakistan_since_2001
↩ प्रतिसाद: तुडतुडी
ट
ट्रेड मार्क Wed, 07/29/2015 - 17:00 नवीन
ते युद्ध होते आणि आता चालू आहे तो दशहतवाद. भ्याड हल्ले आणि निरपराधांना मारणे हेच सर्व मुसलमान पूर्वापार करत आलेले आहेत. धर्माच्या खोट्या कल्पना, कट्टरवाद आणि मनुष्य धर्माला काळिमा फासणारी कृत्ये करणे या पलीकडे या लोकांनी काहीही केलेले नाही. त्यामुळे महाभारताची तुलना इथे अस्थायी आहे.
↩ प्रतिसाद: dadadarekar
म
मृत्युन्जय Wed, 07/29/2015 - 17:05 नवीन
१२० कोटी लोक मेले होते
↩ प्रतिसाद: dadadarekar
स
सुबोध खरे Wed, 07/29/2015 - 17:13 नवीन
काय पुरावा आहे? मी म्हणतो महाभारत झालेच नाही.
↩ प्रतिसाद: dadadarekar
अ
अर्धवटराव Wed, 07/29/2015 - 17:18 नवीन
राज्य/राजकारणासाठी होणारी साठमारी आणि आपली ( अत्यंत उदात्त, शुद्ध तार्कीक ) मतं न मानणार्‍याला जीवनातुन उठवायची धर्माज्ञा यात काहिच फरक नाहि.
↩ प्रतिसाद: dadadarekar
र
रॉजरमूर Wed, 07/29/2015 - 19:46 नवीन
तुम्हाला कधीही कुठलाही मुसलमान दुसर्या मुसलमानाच्या विरोधात बोलताना आढळणार नाही .कधीही कुठलाही मुसलमान इतर धर्मियाची बाजू घेवून आपल्याच मुस्लिम बांधवाशी भांडताना आढळणार नहि. हा हरामिपणा फक्त हिन्दुन्मधेच आढळतो .
यातलेच काही महाभाग मिपावर पण आहेत .
↩ प्रतिसाद: तुडतुडी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/30/2015 - 08:56 नवीन
>>> तुम्हाला कधीही कुठलाही मुसलमान दुसर्या मुसलमानाच्या विरोधात बोलताना आढळणार नाही .कधीही कुठलाही मुसलमान इतर धर्मियाची बाजू घेवून आपल्याच मुस्लिम बांधवाशी भांडताना आढळणार नहि. हा हरामिपणा फक्त हिन्दुन्मधेच आढळतो . वरील वाक्यांवरून खालील आठवले. गांधीजींना एक नामवंत मुस्लिम (त्याचे नाव लक्षात नाही) असे म्हणाला होता की, "चांगल्यातला चांगला हिंदू सुद्धा वाईटातल्या वाईट मुस्लिमापेक्षा वाईट असतो.". दुसर्‍या शब्दात ... "वाईटातला वाईट मुस्लिम सुद्धा चांगल्यातल्या चांगल्या हिंदूपेक्षा चांगला असतो."
↩ प्रतिसाद: रॉजरमूर
स
संदीप डांगे गुरुवार, 07/30/2015 - 09:42 नवीन
गांधीजींना एक नामवंत मुस्लिम (त्याचे नाव लक्षात नाही) असे म्हणाला होता की, "चांगल्यातला चांगला हिंदू सुद्धा वाईटातल्या वाईट मुस्लिमापेक्षा वाईट असतो.". >>> संदर्भ???
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/30/2015 - 18:50 नवीन
असे विधान करणार्‍याचे नाव मौलाना मोहम्मद अलि जौहर असे आहे. https://books.google.co.in/books?id=Dz-5B8_jMpEC&pg=PA116&lpg=PA116&dq=who+said+a+worst+muslim+is+better+than+a+best+Hindu?&source=bl&ots=0EyHi-v-na&sig=OznZpB2DeoG_NP4w1ZORh-YZcd8&hl=en&sa=X&ved=0CCcQ6AEwAWoVChMImbGr3aGDxwIVQpCOCh2vYQEG#v=onepage&q=who%20said%20a%20worst%20muslim%20is%20better%20than%20a%20best%20Hindu%3F&f=false During the freedom struggle our leaders tried to win over Muslims even when Maulana Mohammed Ali said that the worst Muslim was better than the best Hindu, including Mahatma Gandhi. http://rethinkingislam-withnewageislam.blogspot.com/2014/09/faith-heredity-and-conversion.html Even a scholar of Maulana Mohammad Ali Jauhar's standing is credited with the celebrated remark that even the worst Muslim is better than a Mahatma Gandhi, for the former would eventually go to Heaven and the latter won't. http://www.faithfreedom.org/oped/HinduWoman40718.htm In 1924, Mohammed Ali to whom Gandhi showed such affection said, : "However pure Mr. Gandhi's character may be, he must appear to me, from the point of religion, inferior to any Mussalman even though he be without character." In 1925 he emphasized: "Yes, according to my religion and creed, I do hold an adulterous and a fallen Mussalman to be better than Mr. Gandhi".
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
वेल्लाभट Wed, 07/29/2015 - 13:16 नवीन
रच्याकने, फाशी अटळ आहे. ताज्या वृत्तानुसार दया याचिका फेटाळलेली आहे.
स
संदीप डांगे Wed, 07/29/2015 - 15:24 नवीन
सब सियापा है... बाकी सगळं ठिक आहे. पण याकूबला तो मुस्लिम आहे म्हणून फाशी नको म्हणणारे आणि फाशी द्याच म्हणणारे दिसत आहेत. मस्त आहे हे सगळं.
प
प्यारे१ Wed, 07/29/2015 - 15:28 नवीन
सियापा म्हणजे काय रे भौ? हैदर मधला कुठला तो शब्द?
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 07/29/2015 - 15:36 नवीन
सियापा म्हणजे रुदन, शोक... मृत्यूगान...
↩ प्रतिसाद: प्यारे१
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/30/2015 - 10:14 नवीन
सियापा = *तियापा.
↩ प्रतिसाद: प्यारे१
स
संदीप डांगे गुरुवार, 07/30/2015 - 16:07 नवीन
हो हाही अर्थ आहेच.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पांथस्थ गुरुवार, 07/30/2015 - 14:55 नवीन
हैदर मधला कुठला तो शब्द?
Chutzpah: (Yiddish) unbelievable gall; insolence; audacity
↩ प्रतिसाद: प्यारे१
र
राघवेंद्र Wed, 07/29/2015 - 16:42 नवीन
झाले १०० घडा भरला.
म
मदनबाण Wed, 07/29/2015 - 18:05 नवीन
असुद्दिनी ओविसी यांचे विधान :- राजकिय पाठिंबा नसल्याने याकुबला फाशी ! हा न्यायालयाचा निकालाचा अपमान आहे ! तसेच हिंदूस्थानी न्याय व्यवस्थेवर एक प्रकारे अविश्वास आणि प्रश्न चिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न आहे ! आसुद्दिन विरुद्ध आता खटला दाखल होण्यास हरकत नसावी ! याकुबच्या निमित्त्याने इतके किळसवाणे राजकारण केले जाइल यावर विश्वास बसत नाही ! अबु आझमी काय, सलमान खान काय, कॉग्रेसचे आमदार काय आणि ओवेसी काय सगळेच एका देशद्रोही व्यक्तीच्या बाजुने उभे राहिलेले दिसले ! हे सर्व एका बॉम्बस्फोटातील अपराध्याच्या बाजुने उभे ठाकले हे या देशाचे मोठे दुर्दैवच ! २२ वर्ष लागली या खटल्याच्या एका आरोपीस फाशी देण्यास ! बॉम्बस्फोटात ठार झालेल्या लोकांबद्धल आणि त्याचे दुखः सहन करणार्‍या नातेवाईकांबाबत कोणतीही सहानभुती व्यक्त न-करता त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याच हा घॄणास्पद प्रकार झाला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks in
न
नाव आडनाव Wed, 07/29/2015 - 18:12 नवीन
असुद्दिनी ओविसी यांचे विधान मी चुकून असुद्दिनी ओविसी यांचे निधन असं वाचलं.
↩ प्रतिसाद: मदनबाण
स
स्पार्टाकस Wed, 07/29/2015 - 18:29 नवीन
असं खरंच झालं असतं तर तो सुदीनच....
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
म
मदनबाण Wed, 07/29/2015 - 18:20 नवीन
अपडेट :- याकूबची पाठराखण महागात, सलमान आणि ओवेसीविरोधात तक्रार Case filed against Salman Khan for defending Yakub Memon

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks in
म
मदनबाण Wed, 07/29/2015 - 18:29 नवीन
पुरोगामीत्वाचा बळी याकुब मेमन आजच्या जमान्यातले जयचंद आणि पृथ्वीराज

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks in
व
वॉल्टर व्हाईट Wed, 07/29/2015 - 20:46 नवीन
तेंडुलक्रांच्या 'हे सारे कुठुन येते' या पुस्तकातला 'मरेपर्यंत फाशी' हा लेख एबीपी माझाने आज प्रकाशित केला आहे. याकुबला फाशी देऊ नये असे मत अजिबात नाही, किंबहुना त्यावर मतप्रदर्शन करावयाची आवश्यकताही नाही, परंतु मृत्युदंडकी शिक्षा लवकरात लवकर जगातून हद्दपार होवो अशी प्रार्थना करतो.
अ
अर्धवटराव Wed, 07/29/2015 - 21:16 नवीन
परंतु मृत्युदंडकी शिक्षा लवकरात लवकर जगातून हद्दपार होवो अशी प्रार्थना करतो.
आमेन
↩ प्रतिसाद: वॉल्टर व्हाईट
व
विकास Wed, 07/29/2015 - 21:59 नवीन
तेंडुलकरांच्या लेखाचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. लेख पूर्णपणे वाचला. मला वाटते ते स्वतः फाशीच्या शिक्षेच्या विरोधात होते. पण लेख हा केवळ निरीक्षक म्हणून लिहीलेला वाटला आणि वाचकाला विचार करायला लावणारा वाटला. लेख तेंडुलकरी अर्थात चांगलाचा आहे. पण विषय भिषण असल्याने "आवडला" असे म्हणवत नाही. फाशीची शिक्षा ही भारतीय घटनेप्रमाणे "रेअरेस्ट ऑफ दी रेअर" अशीच आहे. आणि एकंदरीत ती तशीच दिली जात असल्याने न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. फाशीची शिक्षा पूर्णपणे रद्द केल्यास स्वतःच्या मराणाची भिती खुन्यास आणि दहशतवाद्यास वाटणार नाही. त्यामुळे ती रद्द न करता दुर्मिळच ठेवावी असे वाटते. मुंबई स्फोटासंदर्भात देखील ती एकालाच झाली. इतरांची फाशी (जन्मठेप कायम करत) सुप्रिम कोर्टाने वेगवेगळ्या कारणाने रद्द केली. या संदर्भात याकूबला देखील भरपूर वेळ देण्यात आलेला आहे आणि त्याच्या साठी विचार केला गेला आहे. हे लिहीत असाताना देखील वाचले त्याप्रमाणे सुप्रिम कोर्ट न्यायाधिश शेवटचे निवेदन हे परत एकदा पहाटे २ वाजता ऐकणार आहेत. कदाचीत त्यात त्याला सात दिवस अधिक मिळतील. पण त्याहून वेगळा निर्णय मिळण्याची शक्यता नाही. जो न्याय दिला गेला आहे, अथवा दिला जातो, तो ज्यांच्यावर अन्याय केला आहे अशांना दिला जातो. या संदर्भात २५७ लोकं ज्यांचा हकनाक बळी गेला आणि ज्यांचे कुटूंबिय कायमचे त्यांच्या जवळच्यांना मुकले त्यांना हा न्याय आहे. तसेच कोणीही यावं आणि दहशत पसरवावी या दहशतवादी वॄत्तीस दिली गेलेली एक शिक्षा आहे. त्यामुळे दहशतवाद थांबेल का नाही हा मुद्दा नाही, पण या भुमीमधे न्याय दिला जातो हे दिसणे महत्वाचे आहे असे वाटते. असो.
↩ प्रतिसाद: वॉल्टर व्हाईट
व
वॉल्टर व्हाईट Wed, 07/29/2015 - 23:41 नवीन
शिक्षेबद्दलचे तुमचे विचार वाचले. मी अजून शिक्षा आणि न्याय याविषयांवर स्वता:ची ठाम अशी मते बनवू शकलेलो नाही. त्यामुळे या प्रतिसादाला विचारमंथन म्हणुन विचारात घ्यावे. शिक्षा- मृत्युदंड दिल्याने 'शिक्षा' या व्यवस्थेचा उद्द्येश कसा सफल होईल? ज्याला शिक्षा दिली जाणार आहे तो व्यक्तीच हयात रहाणार नाही या अर्थाने. न्याय- २५७ लोक जे अस्तित्वातच नाहीत, त्यांना न्याय देऊन काय साध्य होणार. याही पुढे जाउन असेही म्हणता येईल की २५७ लोकांच्या नातेवाईकांना न्याय मिळाला, पण सपोज २५७ पैकी २०० जणांच्या नातेवाईकांना असा मध्ययुगीन न्याय नकोच असेल तर त्यांना आपण तो बळजबरी देणार का?
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास गुरुवार, 07/30/2015 - 02:31 नवीन
चांगले मुद्दे... शिक्षा- मृत्युदंड दिल्याने 'शिक्षा' या व्यवस्थेचा उद्द्येश कसा सफल होईल? ज्याला शिक्षा दिली जाणार आहे तो व्यक्तीच हयात रहाणार नाही या अर्थाने. म्हणूनच तर ती अपवादात्मक परीस्थितीत आणि सर्व पुरावे/शक्यता पडताळून झाल्यावर द्यावी आणि त्यानंतर देखील कायद्याने सर्व मार्ग गुन्हेगारास वापरायची मुभा देऊन झाल्यावर आमलात आणावी अशी व्यवस्था घटनेने केली आहे. आणि हे सर्व अपवादात्मक परीस्थिती, "रेअरेस्ट ऑफ दी रेअर" मधे जर फाशीची शिक्षा दिल्यास... जेंव्हा अशी शिक्षा दिली जाते अथवा दिली जाऊ शकते तेंव्हा इतर होऊ पाहणार्‍या गुन्हेगारांना संदेश मिळतो. याकूबच्या संदर्भात देखील हे लक्षात घेयला हवे, की सुप्रिम कोर्टापर्यंत आजच्या पहाटे पाच पर्यंत वेळ दिला गेला. एरवी उठसूठ सुप्रिम कोर्टाने सरकारला चपराक मारली म्हणत कोर्टाची विधाने (निर्णय नाही) ओरडून सांगणारे या वेळेस मात्र सुप्रिम कोर्टाला चुकीचे समजताना पाहून आश्चर्ययुक्त खेद वाटतो. या शिक्षेच्या अंमलबजावणीमुळे किमान काही सामान्य माणसे जी अतिरेक्यांना मदत करू शकतात ते तसे करण्या आधी दहा वेळेस विचार करतील. हे ही नसे थोडके. हे त्याचे महत्व. बाकी याकूबला फाशी दिली म्हणून पेढे वाटणे अथवा फटाके उडवणे अथवा आनंद व्यक्त करणे हे "मरणांतानी वैराणी" म्हणणार्‍या संस्कृतीच्या विरोधात असल्याने, अर्थातच चुकीचे आहे.
↩ प्रतिसाद: वॉल्टर व्हाईट
व
वॉल्टर व्हाईट गुरुवार, 07/30/2015 - 05:32 नवीन
रेअरेस्ट ऑफ दी रेअर" या बद्दल तक्रार नाहीच उलटे आपल्या कायद्याबद्दल ती अत्यंअत कौतुकास्पद गोष्ट आहे. उर्वरीत प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.
↩ प्रतिसाद: विकास
प
पिलीयन रायडर गुरुवार, 07/30/2015 - 05:01 नवीन
२५७ लोक जे अस्तित्वातच नाहीत, त्यांना न्याय देऊन काय साध्य होणार.
??? म्हणजे? एखादा मनुष्य मेला की त्याला न्याय मिळण्याची आवश्यकता नसते की काय? न्याय मिळतो तेव्हा व्यक्ति जिवंत असते तेव्हाच काहीतरी साध्य होत असतं का? त्या न्यायाचे काही सामाजिक परिणाम असतात की नाही?
पण सपोज २५७ पैकी २०० जणांच्या नातेवाईकांना असा मध्ययुगीन न्याय नकोच असेल तर त्यांना आपण तो बळजबरी देणार का?
न्याय ह्या शब्दाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. आपल्याला हवा तो न्याय मिळण्याची सिस्टीम नाहीये भारतात. सुप्रीम कोर्ट देईल तो न्याय. त्यासाठी कायदे आहेत. तशीच शिक्षा का दिली गेली ह्याचे विवेचनही न्यायालय देते. आता त्या २५७ दुर्दैवी लोकांच्या नातेवाईकांचेच काय तर १२० करोड लोकांचे काहीही मत असो, सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतिम असतो. असा प्रत्येकाला काय वाटतं ह्याचा विचार कसा करता येईल? शिवाय ह्या घटनेत न्याय हा individual व्यक्तिला दिलेला नाहीये. बाकी याकुब मेमनला फाशी झाली ह्याचा अपार आनंद झाला.
↩ प्रतिसाद: वॉल्टर व्हाईट
व
वॉल्टर व्हाईट गुरुवार, 07/30/2015 - 05:38 नवीन
प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.
एखादा मनुष्य मेला की त्याला न्याय मिळण्याची आवश्यकता नसते की काय?
नसते.
न्याय मिळतो तेव्हा व्यक्ति जिवंत असते तेव्हाच काहीतरी साध्य होत असतं का?
होय जिवंत असतांना न्याय मिळाल तर ते न्यायव्यवस्थेचे यश म्हणुन गणले जाईल.
त्या न्यायाचे काही सामाजिक परिणाम असतात की नाही?
असतात, आणि त्यासाठीच न्यायव्यवस्था 'शिक्षा' ही संकल्पना वापरते. पण त्यासाठी मृत्युदंड देणे हाच फक्त ऑप्शन नाही, असा मुद्दा आहे.
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
सुबोध खरे गुरुवार, 07/30/2015 - 06:34 नवीन
काय भंपक प्रतिसाद आहे. आपल्या म्हणण्याप्रमाणे जर एखाद्याचा खून झाला तर त्याच्या मारेकर्याला सोडूनच द्यायला पहिजे. कारण मेलेल्याला न्याय द्यायची गरजच उरलेली नाही. ती व्यक्ती मेली तरच तो गुन्हा ठरतो मग तिला जिवंतपणी कसा न्याय देणार ? न्यायचे सामाजिक परिणाम नसते तर लोकांनी दाबून खाल्ला असता भ्रष्टाचार केला असता आत्ता निदान न्यायाची तरी भीती आहे. जनाची आणि मनाची लाज त्यांनी कधीच सोडलेली आहे.
↩ प्रतिसाद: वॉल्टर व्हाईट
व
वॉल्टर व्हाईट गुरुवार, 07/30/2015 - 16:44 नवीन
आपल्या म्हणण्याप्रमाणे जर एखाद्याचा खून झाला तर त्याच्या मारेकर्याला सोडूनच द्यायला पहिजे.
अर्थात तुम्ही माझे प्रतिसाद नीट वाचलेले नाहीत आणि तुम्हाला सोयीस्कर असा अर्थ तुम्ही अझ्युम करून तुम्ही तुमचा प्रतिसाद टंकलेला आहे, त्यामुळे प्रतिवाद करत नाही.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/30/2015 - 07:15 नवीन
न्यायव्यवस्था शिक्षा हा प्रकार कशासाठी वापरतात ते तरी सांगा ? गुन्हेगारांवर वचक बसला पाहिजे यासाठी तडफडून प्राण जातील अशीच शिक्षा दिली पाहिजे असे वाटते, भले ते क्रूर वाटत असेल, मानवतेला धरुन नसेल, पण गुन्हा करणा-यांना मनात शिक्षेची भीती निर्माण झालीच पाहिजे. फाशी, शिरच्छेद, विद्युत खुर्चीत हाय होल्टेज विद्युत पुरवठा करून झटके देणे, हाता पायांवर गोळीबार करणे, विषारी वायूत जीव गुदमरावा यासाठी जीव जाईपर्यन्त अनेकदा तसा प्रयोग करणे, अशा मृत्युदंडाचे विविध प्रकार कायद्यात अंतर्भुत करावे लागतील त्या शिवाय गुन्हेगारांवर वचक बसणार नाही. सिग्नल तोड़ल्यामुळे अपघात होतो पेक्षा पाचशे रूपयाच दंड भरावा लागतो ही लोकांना भीती वाटते, म्हणून शिक्षेची कायद्यात तरतूद आहे नाही का ? -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: वॉल्टर व्हाईट
व
वॉल्टर व्हाईट गुरुवार, 07/30/2015 - 16:50 नवीन
फाशी, शिरच्छेद, विद्युत खुर्चीत हाय होल्टेज विद्युत पुरवठा करून झटके देणे, हाता पायांवर गोळीबार करणे, विषारी वायूत जीव गुदमरावा यासाठी जीव जाईपर्यन्त अनेकदा तसा प्रयोग करणे, अशा मृत्युदंडाचे विविध प्रकार कायद्यात अंतर्भुत करावे लागतील त्या शिवाय गुन्हेगारांवर वचक बसणार नाही.
अजून कल्पना हव्या असतील तर अफगाणिस्तानात लावलेला इस्लामिक लों वाचा.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
पिलीयन रायडर गुरुवार, 07/30/2015 - 16:22 नवीन
मेलेल्या माणसाला न्यायाची गरज नसते??? हे बघा.. तुमचे विचार साफ गंडलेले आहेत हे खेदपुर्वक नमुद करते. वर खरे आणि बिरुटे काकांनी लिहीलं आहेच. मुद्दा अजुन समजावुन सांगण्याची गरज नसावी. तुम्हाला सहन होत नाही किंवा तुम्ही खुप सेन्सिटीव्ह आहात म्हणुन नको बाबा कुणाला फाशी.. असं नसतं. आज एकानी भारतात घुसुन असे स्फोट घडवुन आणले, तुम्ही त्याला जन्मठेप देवुन आयुष्यभर पोसणार. कशासाठी? शिवाय हे बरंय ना, की या भारतात, करा स्फोट, मरु देत च्यामायला लोक किड्या मुंग्या सारखे, होऊ देत जन्मासाठी अपंग.. एकदा का तुरुंगात जाऊन बसलो की उरलेलं आयुष्य मस्तपैकी आयतं खाऊन पिऊन काढायचं, फाशी म्हणलं की इथलेच लोक येड्यासारखे आपल्याच बाजुने पत्र लिहुन भांडत बसतील.. आपण तंगडे हलवत जन्नत मधल्या पर्‍यांची स्वप्नं बघत बसायचं! वा काय शिक्षा आहे!! आणि हो तशा अर्थानी फाशीला माझाही विरोध आहे.. फार सोप्पी शिक्षा आहे. बिरुटे काका म्हणतात तसल्या शिक्षा हव्यात.
↩ प्रतिसाद: वॉल्टर व्हाईट
व
वॉल्टर व्हाईट गुरुवार, 07/30/2015 - 16:54 नवीन
आज एकानी भारतात घुसुन असे स्फोट घडवुन आणले, तुम्ही त्याला जन्मठेप देवुन आयुष्यभर पोसणार. कशासाठी?
हे पहा माझे मत नीट समजाउन न घेता तुम्हाला bashing करायला सोयीस्कर असा अर्थ तुम्ही काढताय. मी प्रथमत:च स्पष्ट केले आहे की याकुबला फाशी देऊ नये असे माझे मत अजिबात नाही.
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
आ
आनन्दा Mon, 08/03/2015 - 12:49 नवीन
मुळात न्याय आणि शिक्षा हे शब्द व्यक्तीसापेक्ष का वापरावेत? शिक्षा या शब्दाचा अर्थ शिक्षण, किंवा वळण असा होतो. कायदे करताना ते केवळ "एक व्यक्ती" अशी एंटिटी समोर ठेवून केलेले नसतात, न्याय आणि शिक्षा हे समाजाला मिळतात. एखाद्याला जेव्हा फाशी होते, तेव्हा न्यायालये अश्या निष्कर्षापर्यंत आलेली असतात की ही व्यक्ती कोणत्याही प्रकारे जिवंत राहिली तरी सुधारण्याची शक्यता शून्य. किंबहुना अशी व्यक्ती नुसती जिवंत ठेवली तरीदेखील समाजाला अधिक उपद्रव व्हायचीच शक्यता. अन्यथा ती शिक्षा जन्मठेपेत परावर्तित होते. जशी याकूबबरोबरच्या इतर लोकांची झाली. आता राहिला प्रश्न शिक्षा आणि न्यायाचा - शिक्षेचे म्हणाल तर समाजाला अशी शिक्षा मिळते की अश्या प्रकारचे राष्ट्रविघातक कृत्य केल्यास मृत्यू येऊ शकतो. (आत्मघाती अतिरेकयांचे सोडा, तो विषय वेगळा आहे) आणि न्याय म्हणाल तर केवळ मेलेल्या व्यक्तीवरच अन्याय झालेला असतो हे म्हणणेच चुकीचे आहे. उद्या जर देशाच्या पंप्रचा खून झाला, तर तो काय पंप्रवर केलेला अन्याय आहे का? पंप्र हे केवळ उदाहरण आहे. देशाच्या कोणत्याही आजी/ माजी/ भावी नागरिकाचा मृत्यू देशाला, समाजाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे हानी पोचवतच असतो. त्यामुळे मिळालेला न्याय हा देशाने केलेला देशासाठीचा न्याय असतो. आणि म्हणूनच त्या न्यायासाठी संविधान लिहावे लागले आहे. नाहीतर न्याय काय कुठेही चावडीवर पण होतो. न्याय आणि शिक्षेची तत्वे "व्यक्ती"शी निगडीत असू शकतात. पण न्याय आणि शिक्षा या संज्ञा मात्र देश किंवा समाजाशीच निगडीत आहेत. समजले असेल अशी अपेक्षा करतो.
↩ प्रतिसाद: वॉल्टर व्हाईट
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/30/2015 - 19:08 नवीन
>>> शिक्षा- मृत्युदंड दिल्याने 'शिक्षा' या व्यवस्थेचा उद्द्येश कसा सफल होईल? ज्याला शिक्षा दिली जाणार आहे तो व्यक्तीच हयात रहाणार नाही या अर्थाने. मृत्युदंड दिल्याने शिक्षेचा उद्देश सफल होतोच. मृत्युदंड नाही दिला तर नक्कीच शिक्षेचा उद्देश सफल होत नाही, कारण आपण अनेकांचा प्राण घेऊन सुद्धा गुन्हेगार जिवंत असतो. जगात इतर कोणत्याही भीतिपेक्षा मृत्युची भीति सर्वात जास्त असते. अनपेक्षित मरण आलेल्यांपेक्षा ज्यांना दिवस, वेळ ठरवून मृत्युदंड दिलेला आहे त्यांची मृत्युची वेळ जशी नक्की होते त्या क्षणापासून ते अक्षरशः मरण जगत राहतात. >>> न्याय- २५७ लोक जे अस्तित्वातच नाहीत, त्यांना न्याय देऊन काय साध्य होणार. हाच नियम ज्यांच्याकडे चोरी झालेली आहे, ज्यांच्यावर बलात्कार झालेला आहे, ज्यांची फसवणूक झालेली आहे ... अशा इतरांना सुद्धा लावला तर योग्य होईल का? ज्याप्रमाणे खुन्याला फाशी देऊन गेलेली व्यक्ती परत जिवंत होणार नाही त्याचप्रमाणे एखाद्या बलात्कार्‍याला शिक्षा देऊन पिडीतेची अब्रू परत येणार नाही. मग कशाला बलात्कार्‍याला शिक्षा द्यायची? >>> याही पुढे जाउन असेही म्हणता येईल की २५७ लोकांच्या नातेवाईकांना न्याय मिळाला, पण सपोज २५७ पैकी २०० जणांच्या नातेवाईकांना असा मध्ययुगीन न्याय नकोच असेल तर त्यांना आपण तो बळजबरी देणार का? भारतात किंवा जगात कोठेही (काही अपवादात्मक देश वगळता) न्याय व शिक्षा हा कायद्यांवर विसंबून दिला जातो. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्या मागणीनुसार न्याय व शिक्षा दिली जात नाही. त्यामुळे २५७ पैकी २०० जणांना ही शिक्षा हवी किंवा नको यावर न्याय व शिक्षा दिली जाऊ शकत नाही. आणि समजा उर्वरीत ५७ जणांच्या नातेवाईकांना फाशी हीच शिक्षा द्यावी असे वाटत असेल तर ती द्यायला नको का? किंवा एखाद्या मृताच्या नातेवाईकाला असी वाटत असेल की खुन्याचा रोज एक अवयव तोडावा व त्याला सावकाश ७-८ दिवसात मारावा, तर अशी शिक्षा देता येईल का?
↩ प्रतिसाद: वॉल्टर व्हाईट
D
dadadarekar गुरुवार, 07/30/2015 - 20:07 नवीन
.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/30/2015 - 21:30 नवीन
दादासाहेब श्रीगुरुजींबरोबर इतर एकही शब्द न लिहिता सहमत !!! मी जागा आहे की स्वप्नात हे पाहण्यासाठी स्वतःला चिमटा काढून पाहिला ;) मी तर जागा आहे. दादासाहेब तुम्ही हे जागेपणी लिहिले आहे की स्वप्नात हे पाहण्यासाठी स्वतःला ताबडतोप चिमटा काढून पहा बरे =))
↩ प्रतिसाद: dadadarekar
अ
अजया Fri, 07/31/2015 - 03:33 नवीन
एकदा सहमत झालेत ते झालेत.डोन्ट मेक इट अ हॅबिट हं!!आम्ही कोणाकडे बघायचं मग =))
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ट
टवाळ कार्टा Fri, 07/31/2015 - 07:46 नवीन
खिक्क
↩ प्रतिसाद: अजया
ज
जडभरत Fri, 07/31/2015 - 06:54 नवीन
दादासाहेब श्रीगुरुजींबरोबर इतर एकही शब्द न लिहिता सहमत !!! अजि म्या ब्रह्म पाहिले!!!
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा