Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

याकुब मेमनच्या फाशीच्या निमित्ताने

व
विद्यार्थी
Sat, 07/25/2015 - 16:49
🗣 277 प्रतिसाद
१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकुब मेमनचे फाशी वाचवण्याचे सर्व पर्याय संपत आल्यामुळे त्याला लवकरच फाशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिरेक्यांना फाशी देण्याची वेळ आली की होणाऱ्या राजकारणाची भूतकाळातील अनेक उदाहरणे असूनसुद्धा महाराष्ट्र सरकारने किंवा सरकारमधील काही अतिउत्साही व्यक्तींनी फाशीची तारीख आणि वेळ देखील जाहीर करून टाकली. फाशी प्रकरणाचा गाजावाजा होणे ही आजकालचीच गोष्ट वाटते कारण भारतात स्वातंत्र्यापासून अनेक लोकांना फाशीची शिक्षा झाली आहे परंतु त्याची एवढ्या प्रमाणात चर्चा झाल्याचे आठवत नाही. समाजातील काही उदार मतवादी लोकांना अतिरेकी, नक्षलवादि, अट्टल गुन्हेगार यांच्या मानवाधिकाराच्या चर्चा करून आणि त्यांच्याबद्दल समाजात नाहक सहानुभूती निर्माण करण्याची घाणेरडी सवय लागली आहे. आणि असे करून ते स्वतःची दुकाने चालवत असतात. फाशी झालेल्या गुन्हेगाराची जात, धर्म याबद्दल वक्तव्ये करून राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रकार तर फारच घृणास्पद आहेत. बॉम्बस्फोटामध्ये मारले गेलेले सर्व भारतीय नागरिक होते. त्यांची जात किंवा धर्म पाहून त्यांना मारले नव्हते तर मग फाशी झालेल्या या अतिरेक्याच्या धर्माची चर्चा का? भारतात फाशीची किंवा देहदंडाची शिक्षा असावी किंवा नाही यावर वेगळी चर्चा होऊ शकते पण याकुब मेमनने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी केलेली मदत आणि या स्फोटांमध्ये २५७ निष्पाप लोकांचे गेलेले बळी, हे भारतीय कायद्यानुसार त्याला फाशीची शिक्षा देण्यासाठी पुरेसे आहेत. याशिवाय याकुब मेमनला कायद्यानुसार स्वतःला वाचवण्याचे मिळणारे सारे पर्याय मिळाले आणि त्याने ते वापरालेसुद्धा. गुन्हेगार आणि अतिरेकी यांना निष्कारण सहानुभूती देणाऱ्या किंवा देण्याचा प्रयत्न करण्याऱ्या या सर्व राजकारणी लोकांना आणि तथाकथिक उदारमतवाद्यांना समाजाने अंतर्मुख होण्यास भाग पाडण्याची वेळ आली आहे असे आपणास वाटते का?

प्रतिक्रिया द्या
50188 वाचन

💬 प्रतिसाद (277)
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 07/31/2015 - 12:30 नवीन
फक्त दोन महत्वाच्या गोष्टी... १. आंतरराष्ट्रिय स्तरावर पोलिसांना हवे असलेले सराईत गुन्हेगार त्यांच्या खर्‍या नावांनी आणि खर्‍या पासपोर्टवर हिंडत असते तर किती छान झाले असते... त्यांना पकडायला पोलिसांना काहीच त्रास झाला नसता. त्यांची ओळख पटविण्याचे काम तर इमिग्रेशनच्या काँप्युटरनेच केले असते ! आणि अश्या गुन्हेगारांना अनेक खोटे पासपोर्ट बाळगायची गरज पडली नसती. सत्य हे आहे ही गुन्हेगारी जगत छुपी कामे, फसवेगिरी आणि इतरांच्या डोळ्यात धूळफेक करणे यावरच चालू शकते... चालते. २. बी. रमण यांचे रॉ मधले आणि शासनातले स्थान इतके मोठे नव्हते की ते आंतरराष्ट्रिय गुन्हेगाराला फाशी पासून संरक्षण देण्याचे वच॑न देवू शकतील. असा निर्णय केवळ (अ) अत्युच्च दर्जाचा शासकीय अधिकारी (पंतप्रधान अथवा कमीतकमी मध्यवर्ती मंत्रीमंडळातला संबंधीत कॅबिनेट मंत्री) अथवा (आ) लोकसभा, घेवू शकते. उदा. अबू सालेम प्रकरण. ३. अगदी कोणी जबाबदारीच्या बाहेर जाऊन खाजगी / शाब्दिक वचन दिले असले तरी ते सरकार आणि न्यायव्यवस्थेवर बंधनकारक असू शकत नाही. अनितीच्या चिखलात लोळणार्‍या गुन्हेगारांना असे अमिष दाखवून उंदरासारखे त्यांच्या बिळाबाहेर काढून सापळ्यात पकडले आणि न्यायपूर्ण निवाड्यानंतर देहांत शासन दिले तर त्यात फार अनितीकारक आहे असे वाटू नये... कारण अश्या एका गुन्हेगाराला पकडून शिक्षा केल्याने भविष्यात शेकडो निरपराध नागरिकांचा जीव वाचू शकतो. उदाहरणार्थ, मसूद अझर (लोकसभेवरचा हल्लेखोर), अहमद ओमर सईद आणि मुश्ताक अहमद झरगर यांच्या सारखे दहशतवादी भारताच्या ताब्यात असताना त्यांना खटले चालवून देहांताची शिक्षा झाली असती तर त्यांची सुटका होऊ शकली नसती आणि त्यांच्या पुढच्या अतिरेकी कारवाया न झाल्यामुळे किती तरी निष्पाप जीव वाचले असते. तसे न झाल्याने आजही भारतातील आणि विशेषतः काश्मीरमधील कित्येक निरपराध मरत आहेत... मरत राहतील. बाकी चालू द्या.
↩ प्रतिसाद: चिरोटा
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 07/31/2015 - 14:02 नवीन
असा निर्णय केवळ (अ) अत्युच्च दर्जाचा शासकीय अधिकारी (पंतप्रधान अथवा कमीतकमी मध्यवर्ती मंत्रीमंडळातला संबंधीत कॅबिनेट मंत्री) अथवा (आ) लोकसभा, घेवू शकते. ईए काका, एक तांत्रिक मुद्दा सांगतो, विथ योर परमिशन अझ्युम्ड , रॉ चा फूल फॉर्म आहे "रिसर्च एंड एनालिसिस विंग" अर्थात हे खाते पुर्णपणे स्वतंत्र असे "खाते" नसते अन्यथा त्याचे सगळे प्रोसीडिंग्स अन एक्टिविटी ह्या पार्लियामेंट मधे डिस्कस कराव्या लागल्या असत्या, हे बाह्यगुप्तचर खाते प्राइम मिनिस्टर्स ऑफिस उर्फ़ पीएमओ च एक "विंग" म्हणुन काम करते अर्थात त्याला संवैधानिक अस्तित्व नाही , इंटेलिजेंस ब्यूरो सुद्धा असाच एक कांस्टिटूशनलिटी नसलेला विभाग आहे, इंटेलिजेंस ब्यूरो ची सर्वोच्च अथॉरिटी म्हणजे गृहमंत्री/ प्रधानमंत्री असतात पण रॉ ही फ़क्त न फ़क्त प्रधानमंत्री साहेबांसच रिपोर्ट करते त्यामुळे रामन ह्यांनी त्याला ओढायला हा वादा केला असेल ही गृहीत शक्यता अतिशय रास्त ठरते
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
च
चिरोटा Fri, 07/31/2015 - 14:11 नवीन
रामन हे तेव्हा रॉ मध्ये पाकिस्तान डेस्क प्रमुख होते. याकुबची १९९४ मध्ये मधु त्रिहानने दीर्घ मुलाखत घेतली आहे जी यु.ट्युबवर आहे.सहसा तपास यंत्रणा गुन्हेगाराला तपास पूर्ण झाल्याशिवाय मुलाखती द्यायला परवानगी कधीही देत नाहीत.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 07/31/2015 - 17:16 नवीन
सहमत. माझा मुद्दा हाच होता की न्यायसंस्थेवरचे एखाद्या शिक्षेच्या प्रकाराबद्दलचे बंधन हा अत्युच्च स्तराचा "राजकिय" "निर्णय" असतो, तो दोन राष्ट्रांत घेतला जातो, तो डिआयबी/सेक्रेटरी स्तराचा अधिकारी घेऊ शकत नाही. (तेन्ला पावर नस्ते ;) ) म्हणून कोणत्याही गुप्तचर संस्थेच्या, कोणत्याही अधिकार्‍याला, कोणत्याही गुन्हेगाराच्या शिक्षेच्या स्वरुपाबद्दल कोणतीही खात्री देता येत नाही. फारतर प्रशासनातर्फे तुझ्या बाजूने कमी शिक्षेसाठी रदबदली करण्याचा प्रयत्न करेन इतके मोघम आणि "अंतीम निर्णयासंबंधी कोणतीही जबाबदारी नसलेले आश्वासन" देता येते, खात्री (प्रॉमिस) नाही. रामन यांच्या दाव्यामागे... (अ) तुम्ही म्हणता तसा राजकीय डाव असू शकतो, किंवा (आ) आपण दिलेल्या शब्द प्रत्यक्षात येणार नाही यामुळे लागलेली रुखरुख / अहंकाराला (इगो) बसलेला धक्का असावा आणि पुस्तकातील विधाने म्हणजे संबंधिताना "मी माझा शब्द पाळण्यासाठी माझ्या परीने शक्य ते सगळे केले" असा पडद्याआडून दिलेला संदेश असावा.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
फ
फुलथ्रॉटल जिनियस Fri, 07/31/2015 - 11:24 नवीन
बाबरी पाडल्यानंतर या देशात दहशतवादी कारवाया सुरु झाल्या हे सत्य नाकारन्यामागे हिंदुत्ववाद्यांचा स्वार्थ लपला आहे.भारतातले हिंदू मुस्लिम सौख्य अस्थिर करुन लोकसभेतला आपला चार टाळक्यांचा पक्ष कसा वाढेल याच्या खटपटीत संघ परिवार होता.त्यासाठी पद्धतशीरपणे रथयात्र काढल्या गेल्या,लोकांची माथी भडकवण्यात आली व नव्वदच्या दशकात हे लोक झटपट सत्तेपर्यंत पोचले. सत्तालालसेपोटी स्वजनांना(हिंदूना) दहशतीच्या आणी अस्थिरेच्या खाईत लोटणारे हिंदुत्ववादी हे याकुब मेमन जास्त गुन्हेगार आहेत.
प
प्यारे१ Fri, 07/31/2015 - 11:33 नवीन
खिक्क्क्!
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
श
श्रीगुरुजी Fri, 07/31/2015 - 11:39 नवीन
>>> बाबरी पाडल्यानंतर या देशात दहशतवादी कारवाया सुरु झाल्या हे सत्य नाकारन्यामागे हिंदुत्ववाद्यांचा स्वार्थ लपला आहे. बाबरी पडण्यापूर्वी या देशात दहशतवादी कारवाया सुरू नव्हत्या हा जावईशोध लावल्याबद्दल फुलबॉटल डबियस यांचे अभिनंदन! माईंना असले संशोधक 'हे' मिळाल्याबद्दल माईंचे देखील अभिनंदन!
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
D
dadadarekar Fri, 07/31/2015 - 12:00 नवीन
बाबरी पाडायला चिथावणी देणारे लोक आज ती जबाबदारी नाकारतात . कारण ते फाशीला घाबरतात. आणि गंमत म्हणजे भाजपाप्रेमी लोक , जिहादासाठी मरायला तयार असणारा याकूब दयेचा अर्ज का करतो ? असा प्रश्नही विचारतात ! फाशीची भीती फक्त भाजपाच्या नेत्यानाच वाटते का ? स्फोटात करोडोची संपत्ती गेली म्हणे. मंदिराच्या नावाने १४०० कोट रु गोळा करुन काखा वर करण्यासमोर हे नुकसान किरकोळच !
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
न
निनाद मुक्काम … Fri, 07/31/2015 - 13:11 नवीन
लोकसत्ता च्या अग्र लेखावर लोकसत्ता फेसबुक पेजवर आलेली प्रतिक्रिया - प्रात: स्मरणीय, आदरणीय, विवेक वादी श्री. रा.रा. कुबेरजींच्या चरणांस सर्वप्रथम वंदन! खुपच सुंदर अग्रलेख आहे. मेमनच्या वडीलांनी त्यांना मुलांनी काय केलय हे कळल्यावर कानाखाली मारल वगैरे वर्णन वाचुन थेट 'शामची आई' या धर्तीवर 'टायगरचे बाबा' अस काही प्रकरण वाचत आहोत असच वाटलं! ........याकुब हा कुटुंबाचा 'केवळ सनदी लेखापाल होता' अस म्हणत आपण दाखविलेले शब्द भांडाराच ऐश्वर्य पाहता आपणास शंकरशेठ का काय कसलीशी सगळ्यात भारी शिष्यवृत्ती द्यावी वाटते.... संजय दत्त च्या केसचा ऊल्लेख करत आपण काय साधु इच्छिता हे सुद्न्यांना समजलेच आहे..... आपण २२ वर्षे न्याय व्यवस्थेने काथ्याकुट करुन निकाल दिल्यावरही त्याची समीक्षा करता हा आपला अधिकार पाहता 'लोकसत्तास' भारतीय लोकशाहीचा पाचवा स्तंभ भविष्यात मानले जाईलसा भरवसा वाटतो..... असो. एक शेवटची विनंती. उद्या गुरू पौर्णिमेच्या मुहूर्तावर आपणाकडून विवेकाची दीक्षा हवी आहे. आपले चरण पुजण्यासाठी कोठे येवुन भेटावे? सोयीस्कर वेळ सांगावी ही प्रार्थना.
ग
गॅरी ट्रुमन Fri, 07/31/2015 - 13:18 नवीन
हे वाचून गेली ४-५ मिनिटे पोट धरधरून हसत आहे. अगदीच एपिक प्रतिक्रिया म्हणायची ही.
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
ज
जडभरत Fri, 07/31/2015 - 15:31 नवीन
मस्तच ओ निनाद साहेब.
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
न
निनाद मुक्काम … Fri, 07/31/2015 - 14:11 नवीन
छोटा शकील चे आज तक ला याकुब वरून दिलेली मुलाखत ह्या माणसाला पाकिस्तान मध्ये घुसून मारलेच पाहिजे.
अ
अत्रन्गि पाउस Fri, 07/31/2015 - 18:35 नवीन
कायदा न्याय सिस्टीम ह्यावर कोण बोलोतोय आणि काय चाललय ??
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
फ
फुलथ्रॉटल जिनियस Fri, 07/31/2015 - 14:24 नवीन
एम आय एमचे खासदार जनाब असौद्दीन ओविसी यांचे म्हणने मला अतिशय योग्य वाटते,जर याकुब मेमनला फाशी दिली आहे तर तोच न्याय गुजरात दंगलीतील आरोपि कोदनानी व ईतरांनाही लावला पाहिजे.त्याच बरोबर मालेगावात बॉम्बस्फोट घडवून निष्पाप मुस्लिमांचा जिव घेणार्या क्रुरकर्मा जनरल पुरोहीत ,साध्वी(?)प्रज्ञा सिंग यांच्या वरील केस त्वरीत संपवावी व त्यांना फासावर द्यावे.
प
प्यारे१ Fri, 07/31/2015 - 14:38 नवीन
1.आकड़ा किती वाढवायचा आहे? साधारण Q2 चं टारगेट काय आहे? 2.किती वेळ दांडिया खेळायचा? नवरात्र कधी आहे?
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
श
श्रीगुरुजी Fri, 07/31/2015 - 15:19 नवीन
>>> एम आय एमचे खासदार जनाब असौद्दीन ओविसी यांचे म्हणने मला अतिशय योग्य वाटते, अभिनंदन नानासाहेब! >>> जर याकुब मेमनला फाशी दिली आहे तर तोच न्याय गुजरात दंगलीतील आरोपि कोदनानी व ईतरांनाही लावला पाहिजे. बरोब्बर! नानासाहेब तुम्ही या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करा. प्रशांत भूषण, काटजू, इंदिरा जयसिंग इ. नामवंत वकील तुमच्या याचिकेसाठी लढतील. तुम्ही निधर्मांधांचे नीलाक्षतनय व्हाल हा अजून एक फायदा! >>> त्याच बरोबर मालेगावात बॉम्बस्फोट घडवून निष्पाप मुस्लिमांचा जिव घेणार्या क्रुरकर्मा जनरल पुरोहीत ,साध्वी(?)प्रज्ञा सिंग यांच्या वरील केस त्वरीत संपवावी व त्यांना फासावर द्यावे. सैन्यात 'जनरल' हे फार मोठे पद आहे (उदा. जनरल वैद्य). पुरोहित हे जनरल नसून कर्नल आहेत. तस्मात, वाचन आणि ज्ञान वाढवा. तो खटला अजून सुरू झालेला नाही आणि त्यांना जवळपास ७ वर्षे विनाजामीन तुरूंगात डांबूनसुद्धा अजून आरोपपत्र सुद्धा दाखल झालेले नाही. तरी सुद्धा कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह इ. मंडळींनीच मालेगावात बॉम्बस्फोट घडविले अशी तुमची खात्री दिसते. ही खात्री असेल तर खटला सुरूच तरी कशाला करायचा? त्यांना खटला न चालविताच थेट फाशी द्यावे यासाठी तुम्ही अजून एक जनहित याचिका दाखल करा. एकंदरीत नानासाहेबांची 'टॉपगिअर'मध्ये वेगात जात असलेली 'फिलॉसॉफी' आणि 'ग्रेट थुंकिंग' पाहून आम्ही धन्य झालो
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
व
विकास Fri, 07/31/2015 - 15:48 नवीन
तो खटला अजून सुरू झालेला नाही आणि त्यांना जवळपास ७ वर्षे विनाजामीन तुरूंगात डांबूनसुद्धा अजून आरोपपत्र सुद्धा दाखल झालेले नाही. खरं की काय? असे विनाजामीन, विना खटला (आणि आरोप सिद्ध न करता) डांबल्याबद्दल मग ते स्वाक्षरीवाले ४० जण आणि अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल आता आपल्या सरकारला धारेवर धरणार तर! ;) मोदी सरकारचे आता काही खरे नाही!
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 07/31/2015 - 17:48 नवीन
ऑक्टोबर २००८ मध्ये या सर्वांना अटक करून मोक्का लावण्यात आला. मोक्का (हे टाडा/पोटा कायद्याचे महाराष्ट्रीय रूप) कायद्यान्वये अटक केलेल्यांना जामीन मिळत नाही. काही महिने महाराष्ट्र पोलिसांनी तपास केला. जेव्हा जेव्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याचा विषय येण्याची शक्यता होती तेव्हा तेव्हा हा तपास विविध तपाससंस्थांकडे पाठवून 'अजून तपास सुरू आहे आणि काही नवीन माहिती बाहेर येण्याची शक्यता असल्याने तपास पूर्ण झालेला नाही व त्यामुळे तपास पूर्ण झाल्यावरच आरोपपत्र दाखल करता येईल" असा युक्तीवाद करून आरोपपत्र दाखल केले गेले नाही. सुरवातीला महाराष्ट्र पोलिस खाते, काही महिन्यांनी महाराष्ट्र एटीएस, नंतर एक एसआयटी, नंतर सीबीआय, नंतर अजून एक एसआयटी, नंतर एनआयए अशा विविध संस्थांकडे तपास वर्ग करण्यात आला. आजतगायत कोणताही पुरावा मिळाल्याचे ऐकिवात नाही. दरम्यान आरोपी तुरूंगात सडत होते. साध्वी, पुरोहित व इतरांचा कबुलीजबाबासाठी तुरूंगात प्रचंड छ्ळ करण्यात आला, साध्वीला जेवणात मांसाहार देणे, अश्लील चित्रे/मासिके देणे, तिला कर्करोग झाला असतानासुद्धा उपचारासाठी जामिनाला विरोध करणे अशा कृत्यांमधून युपीएने आपली हिंदूविरोधी मानसिकता दाखवून दिली. काही वर्षांपूर्वी साध्वीच्या वडिलांचे निधन झाल्यावर अंतिम दर्शनासाठी फक्त २ तास तुरूंगाबाहेर काढायला सुद्धा सरकारी वकीलाने विरोध करून तिला वडीलांचे अंतिम दर्शन घेऊन दिले नाही. ऑक्टोबर २००८ पासून हे सर्वजण तुरूंगात आहेत. आजवर कणभरही पुरावा मिळालेला नाही. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर जाहीर खोटे आरोप केले गेले. एका पत्रकार परीषदेत सीबीआय ने सांगितले की लष्कराने कर्नल पुरोहितांना ६ टन आरडीएक्स पुण्याहून काश्मिरला पोहोचविण्यासाठी दिले होते. ते आरडीक्स पुरोहितांनी काश्मिरला न पोचविता त्याचा वापर मालेगाव बॉम्बस्फोटात केला. हे ऐकल्यावर दुसर्‍याच दिवशी लष्करातील प्रमुख अधिकार्‍यांनी पत्रकार परीषद घेऊन हे खोटे असल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार लष्करात आरडीक्स सारखा स्फोटक पदार्थ एकट्यादुकट्या व्यक्तीच्या हवाली केला जात नाही. तसेच लष्करात प्रत्येक गोळीचा देखील हिशेब ठेवलेला असतो. अशा परिस्थितीत कर्नल पुरोहितांना लष्कर आरडीक्स देणे अशक्य आहे आणि समजा दिले असले तर ते बेपत्ता झाल्याचे लष्कराला न समजणे अशक्य आहे. हे ऐकल्यावर सीबीआयने आपले आरोप मागे घेतले. सर्व आरोपींची आतापर्यंत कमीतकमी ४ वेळा नार्को टेस्ट घेतलेली आहे. एकापेक्षा जास्त वेळा नार्को टेस्ट घेतलेले हे पहिलेच प्रकरण असावे. नार्को टेस्टमधूनही काही मिळाले नाही. एका नार्को टेस्ट नंतर स्वामी दयानंद नावाचा आरोपी १२ तासांहून अधिक काळ बेशुद्ध होता तेव्हा तपासयंत्रणांचे धाबे दणाणले होते. नंतर एनआयने असे उठविले की स्वामी असीमानंदांना तुरूंगात सेवेसाठी एक मुस्लिम सेवेकरी दिला होता. हा मुस्लिम आरोपी याच बाम्बस्फोटात आधी पकडलेल्या १०-१२ मुस्लिमांपैकी होता. त्याच्या सेवेने स्वामी असीमानंदांचे मन विरघळले आणि आपल्यामुळे या मुस्लिमावर खोटा आरोप झाला आहे असे वाटून ते व्यथित झाले आणि त्यांनी बॉम्बस्फोटातील आपल्या सहभागाची कबुली दिली. हे प्रसिद्ध झाल्यावर दुसर्‍या दिवशी असीमानंदांनी सांगितले की असा कोणताही सेवेकरी तुरूंगात आपल्याला दिलेला नव्हता आणि आपण अशी कोणतीही कबुली आपण दिलेली नाही. तुरूंगात असलेल्या कोणत्याही आरोपीला दुसरा आरोपी सेवेसाठी दिलेला नसतो. त्यामुळे तपास यंत्रणांची ही थापही लगेच उघडकीला आली. या सर्वांवर मोक्का लागू होतो का नाही याची सुनावणी गेली साडेचार वर्षे सुरू आहे. युपीएने अर्थातच ही सुनावणी जास्तीत जास्त लांबविण्याचा प्रयत्न केला. २०१४ मध्ये सरकार बदलल्यावर काहीसा वेग आला. २-३ महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की उच्च न्यायालयाने मोक्काचा विचार न करता नवीन न्यायाधीश नेमून जामिनावर विचार करावा. त्यावर विचार सुरू झाला आहे. सध्या प्रकरण इथपर्यंत आले आहे. युपीएच्या काळात या सर्वांना समझोता एक्स्प्रेस, हैदराबादेतील मक्का मशिदीबाहेरील बॉम्बस्फोट, अजमेर येथील बॉम्बस्फोट इ. प्रकरणातही अडकविण्याचा प्रयत्न झाला. युपीएच्या काळात या सर्वांना इतक्या खोलवर आणि घट्ट अडकविलेले आहे की त्यातून सुटण्यास खूप कालावधी लागणार आहे. तोपर्यंत यांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले असेल.
↩ प्रतिसाद: विकास
D
dadadarekar Fri, 07/31/2015 - 18:58 नवीन
अटक तरी का झाली ?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
D
dadadarekar Fri, 07/31/2015 - 19:11 नवीन
साध्वीच्या स्कूटरचा वापर करुन स्फोट झाला होता ना ?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
निनाद मुक्काम … Fri, 07/31/2015 - 15:15 नवीन
कधी नव्हे ते कधी जिओ बद्दल म्हणवेसे वाटते जियो मेरे जियो कुठलेही तिखट मीठ न लावता पाकिस्तान मध्ये याकुब बद्दल दिलेली बातमी पाहून आपल्या डेली सोप प्रेरित मिडिया ची भणंगगिरी पाहून डोके फिरते.
D
dadadarekar Sat, 08/01/2015 - 06:17 नवीन
बाबरी , अदवानी , सध्वीची स्कूटर , मंदिराचे चौदाशे कोटी .... यावर चर्चा येताच देशभक्त लोक गायब झाले.
अ
अर्धवटराव Sat, 08/01/2015 - 06:42 नवीन
केवळ गायब नाहि झाले... जन्नतला गेलेल्या मसिहाच्या बिदाईनिमीत्त आयोजीत प्रसाद भोजनाला गेलेत.
↩ प्रतिसाद: dadadarekar
P
Piyush Sat, 08/01/2015 - 07:41 नवीन
देशभक्त लोक गायब ? आणि तुम्ही कोण देशद्रोही ?
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar Sat, 08/01/2015 - 07:50 नवीन
.
↩ प्रतिसाद: Piyush
स
संदीप डांगे Sat, 08/01/2015 - 09:29 नवीन
अरे काढा ना तुम्ही धागा. हिंदू दहशतवादावर. मजा येईल बघा. मुखवटे आणि चेहरे ही दिसतील.
↩ प्रतिसाद: dadadarekar
अ
अर्धवटराव Sat, 08/01/2015 - 06:47 नवीन
प्रशांत भूषणला चोपलं श्रीरामसेनेच्या माणसाने. अशा घटनेचा निव्वळ निषेध करुन भागणार नाहि. जन्माची अद्दल घडावी अशी शिक्षा झाली पाहिजे. आज हे वकिलांवर हात उगारणार. उद्या कोर्टाचा घास घ्यायला बघणार. यांना वेळीच आवरायला हवं.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा