Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मेंटलेक्चुअलांचे उसासे आणि उमाळे

श
श्रीगुरुजी
Wed, 10/14/2015 - 20:16
🗣 286 प्रतिसाद
४ जुलै २०१० या दिवशी केरळमधील टी जे जोसेफ या प्राध्यापकावर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून त्यांचा उजवा हात मनगटापासून कापून टाकला कारण एका प्रश्नपत्रिकेत त्यांनी इस्लामसंबंधी एक प्रश्न विचारला होता व त्या प्रश्नामुळे इस्लामचा अपमान झाला अशी या गटाची समजूत झाली होती. - तेव्हा हे सर्वजण गप्प राहिले. हा धार्मिक हिंसाचार आहे असे त्यांना वाटले नव्हते. २००६ मध्ये खैरलांजी येथे भोतमांगे या दलित कुटुंबातील चौघांची गावातील जमावाने क्रूर पद्धतीने हत्या केली. - तेव्हा यांच्यापैकी कोणीही आपले पुरस्कार परत केले नव्हते. एप्रिल २०१४ मध्ये नगर जिल्ह्यात नितीन आगे नावाच्या दलित तरूणाची आंतरजातीय प्रेमप्रकरणातून हत्या झाली. नंतर नगर जिल्ह्यात अशा २-३ घटना घडल्या. - तेव्हासुद्धा यांनी आपले पुरस्कार परत केले नव्हते. हा जातीय हिंसाचार आहे व त्यासाठी सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून पुरस्कार परत करावे असे त्यांना वाटले नव्हते. केरळमध्ये गेल्या काही वर्षात जातीय/धार्मिक हिंसाचारातून अनेक हत्या झाल्या आहेत. - तेव्हा यांनी मौन पाळले. आणि आता . . . गेल्या काही दिवसात काही जणांनी साहित्य अकादमीने दिलेले पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांचे गेल्या २ वर्षात झालेले खून आणि काही दिवसांपूर्वी जातीय हिंसाचारातून उत्तर प्रदेशातील दादरी येथे झालेल्या हत्येचा निषेध म्हणून हे "साहित्यिक विचारवंत" अस्वस्थ झाले आहेत व त्यामुळे सरकारचा निषेध म्हणून ही मंडळी पुरस्कार परत करणार आहेत. यातल्या बहुतेकांची नावे आजतगायत ऐकण्यात आलेली नाहीत यात महाराष्ट्रातील काही साहित्यिक आहेत. त्यात प्रज्ञा पवार या एक साहित्यिका आहेत. खैरलांजी व नगर जिल्ह्यातली दलित हत्यांकांडे घडली तेव्हा त्यांनी पुरस्कार परत केला नव्हता. यात नयना सहगल नावाच्या एक लेखिका आहेत. पंडीत नेहरूंची भाची ही त्यांची ओळख. त्यांना १९८६ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार ज्या सरकारच्या काळात मिळाला त्याच सरकारच्या काळात ३००० शिखांची हत्या झाली होती व त्याच काळात शहाबानो प्रकरण घडले होते. परंतु त्यावेळी निषेध म्हणून पुरस्कार नाकारावासा त्यांना वाटला नाही. १९८६ नंतर आजतगायत अनेकवेळा जातीय हिंसाचार झाला. तेव्हाही त्या गप्प होत्या. आज अचानक त्यांना संपूर्ण देशात जातीय वातावरण निर्माण झाले असून साहित्यिकांची गळचेपी होत आहे असा शोध लागला. मग आता नक्की असे काय घडले की त्यांना अचानक स्वातंत्र्याचे आणि जातीयवादविरोधी विचारांचे उसासे आणि उमाळे येऊ लागले आहेत? यांचे खरे दु:ख या हत्या नसून जे कधीही सत्तेवर येऊ नयेत असे वाटत होते ते मोदी सत्तेवर आले आहेत हे यांचे खरे दु:ख आहे. मोदींच्या प्रत्येक कृतीला हे लोकशाहीविरोधी, संघविचार लादणारी कृती इ. ठरवून मोकळे होतात. अमर्त्य सेनना वयाच्या ७८ व्या वर्षी नालंदा विद्यापीठाचे कुलगुरूपद मिळाले आणि ३ वर्षानंतर २०१५ मध्ये मुदत संपल्यावर वयाच्या ८१ व्या वर्षी यांना नव्याने मुदतवाढ न मिळाल्यावर लगेच मोदी विद्यापीठावर हिंदुत्व लादणारे ठरतात. आपले वय किती आणि आपल्याला एक टर्म मिळाल्यावर दुसर्‍या टर्मचा मोह का असे प्रश्न कधी यांच्या मनात येतच नाहीत. एफटीआयआय मध्ये गजेंद्र चौहानची नेमणूक राजकीय नेमणूक असते पण सईद मिर्झा (यांनी वाजपेयींविरूद्ध निवडणुक लढविलेली होती आणि नंतर मोदी पंतप्रधान होऊ नयेत यासाठी सह्यांची मोहीमही चालविली होती), अनंतमूर्ती (मोदी पंतप्रधान झाले तर भारतात रहावेसे वाटणार नाही असे यांनी सांगितले होते) इ. नेमणुका राजकीय आहेत असे कधी यांच्या मनात सुद्धा येत नाही. एकंदरीत या मेंटलेक्चुअलांचा निषेध आणि विरोध सेलेक्टिव्ह असतो. फक्त ठराविक प्रसंगात यांना उसासे आणि उमाळे येतात आणि इतर प्रसंगात हे सोयिस्कर मौन पाळतात. या विषयावर खालील लेख खूपच मार्मिक आहे. http://www.loksatta.com/aghralekh-news/as-compare-to-dadri-more-dangerous-murders-happens-1149432/
वर्गीकरण
राजकारण
साहित्यिक
निषेध

प्रतिक्रिया द्या
54637 वाचन

💬 प्रतिसाद (286)
अ
अस्वस्थामा Fri, 10/16/2015 - 12:19 नवीन
बाकी ठरावीक हेतू समोर ठेऊन केलेला विरोध नक्कीच निषेधार्ह आहे आणि राहिलही !!!!!!!
हे तर मान्यच परंतु इतर लोक्स ही ज्या पद्धतीने रिअ‍ॅक्ट करत आहेत ते ही तितकेच चूक वाटतेय. सगळाच सावळा गोंधळ.!! भाजप डिप्लोमसी आणि पॉलिटिकली करेक्ट वागणूक ठेवण्यात चाचपडतोय असं वाटतं हे पाहून तरी.
↩ प्रतिसाद: नाखु
आ
आनन्दा Sat, 10/17/2015 - 07:22 नवीन
त्यांना पण निषेधाचा हक्क आहेच की. की हक्क फक्त विचारवंतांनाच असतात?
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
श
श्रीगुरुजी Fri, 10/16/2015 - 10:55 नवीन
त्यांचा विरोध चुकीच्या कारणांना असला तरी त्यांच्या विरोध करायच्या 'हक्काला' पाठिंबा असेल.
त्यांच्या विरोध करण्याच्या हक्काला विरोध नसून सिलेक्टिव्ह विरोध करण्याला विरोध आहे. उदा. एम एफ हुसेनना पाठिंबा आणि तस्लिमा नसरीन यांच्या बाबतीत सोयिस्कर मौन या प्रकाराला विरोध आहे.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 10/16/2015 - 11:39 नवीन
पुरस्कार परत केलेले लेखक संजय भास्कर जोशी ह्यांचे एक पत्र फेसबुक वर वाचनात आले आहे, त्यात ते पुरस्काराचे (दोन) ८०,००० रूपये + स्वतःकड़ील २०,००० अशी एकुण १००,००० रुपये फ़क्त सरकार ला परत करीत आहेट, आता काहींच्या म्हणण्या प्रमाणे लेखक (मी इथे सं भा जोशी ह्यांचे उदाहरण घेतले आहे फ़क्त) हे 'सेलेक्टिव विरोध' करीत आहेत, असे असता त्यांनी पत्रांत देवेंद्र फडणवीस ह्यांचे शेतकरी लोकांसाठी अन दुष्काळी परिस्थिती वर ते करीत असलेले काम उत्तम आहे व सबब ते स्वतः कड़ील २०,००० त्यात मिसळून ती एक लाखांची स्वल्प रक्कम शेतकरी कल्याण करायला वापरा असे माननीय मुख्यमंत्री महोदयांस सांगत आहेत. लेखकांचा अतिशय शेलक्या विशेषणाने संभावना करणार किती लोकांनी 'पुरस्कार परत करतानाच्या पत्रांत काय मजकूर आहे?' इतके वाचायची तसदी घेतली आहे? जर तसे नसले तर सेलेक्टिव विरोधकर्ते सुद्धा नाहीत काय? कोणी कोणाला कश्याबद्दल बोलायचे मग? उपमुद्दा हा की , ज्या लेखकांनी पुरस्कार परत केलेत ते त्यांनी पूर्णपणे संसदीय भाषेत पत्रे लिहून कायदेशीर रीत्या केले आहे, ह्यात जर मोदीभक्तांना कायदेशीर काही करता येत नसल्यास ते शिवराळ विरोध करुन मोदींचेच प्रॉब्लम कश्याला वाढवत आहेत ! ? अतिरेकी प्रेम सुद्धा घातक असते ते असे!
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 10/16/2015 - 11:52 नवीन
हाहाहा! एकदम पर्फेक्ट! :)
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
च
चैतन्य ईन्या Fri, 10/16/2015 - 11:58 नवीन
सगळेच लेखक वाईट आहेत असे मी म्हणणार नाही. पण हेच कॉंग्रेसच्या राज्यात बरे चालत नाही. आत्ताच का? आणि खरा पोटशूळ मोदी सत्तेत आहेत असा आहे. तो तसा नसता तर इतके कोणी टोकाला गेलेच नसते. मुळात झालेली घटना अखिलेश राज्यावर असताना झाली. मग त्याला किंवा मुलायम सिंगांना बरे कोणी दोषी धरत नाही. मोडीला २००२ साठी अजूनही जबाबदार धरले जाते तर मग सगळे लेखक मोदींवर बरे रोष धरून आहेत? हे दुटप्पी वागणे नसेल तर अजून काय आहे? बंगाल आणि केरळ मध्ये अनेक लोकांच्या हत्त्या झाल्या एक शब्द बाहेर नाहीये.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 10/17/2015 - 02:57 नवीन
संजय भास्कर जोशी , ह्यांनी पुरस्काराचे २०,००० (अक्षरी रुपये वीस हजार फ़क्त) हे सरकार ला परत केले असुन त्यात ८०,०००(अक्षरी रुपये ऐंशी हजार फ़क्त) हे वैयक्तिक पैसे घातले आहेत बाकी ते मेँटलेकच्युअल वगैरे वगैरे (दादुमियां ते गुरूजी सगळ्यांनी आपापले रंग भरून घ्यावे) (काळ) बाप्या
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ब
बोका-ए-आझम Fri, 10/16/2015 - 16:39 नवीन
Selective विरोध करणाऱ्या लोकांवर टीका करुन आम्हीही आमचा या देशाच्या घटनेने दिलेला अधिकारच बजावत आहोत याचीही नोंद असू द्या. रच्याकने मोदी पंतप्रधान झाल्यावर देश सोडून जाऊ असं काहीजण म्हणाले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्यातला फक्त कमाल रशीद खान उर्फ के.आर.के. हाच देश सोडून गेला. ;)
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 10/16/2015 - 16:48 नवीन
दादूस, एकदा फेसबुक वर नजर माराच! असली असली शब्द योजना सापडेल अन असली विशेषणे सापड़तील की ती साक्षात् नमोंनी पाहिली तर "नमामी गंगे" च्या दुप्पट एलोकेशन "नमामी शब्दगंगे" स्कीम ला करतील :D माझा विरोध हा शेलक्या बोलण्याला होता अन राहील सो बोक्या भाऊ लेटस अग्री टु डिसग्री इन आवर सेन्सस एंड गुडविल :)
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 10/16/2015 - 13:02 नवीन
असताना झाली. मग त्याला किंवा मुलायम सिंगांना बरे कोणी दोषी धरत नाही.
यूपी मधले कनिष्ठ वगैरे जेव्हा लोकल पॉलिटिक्स बद्दल बोलतात तेव्हा तरी असे जाणवले नाही, उरता उरला लेखकांचा प्रश्न तर लेखक अखिलेश वर अगदीच बोलले नाहीत हे आपण कसे ठाम सांगु शकता आहात? (माझे ह्या प्रश्ना संबंधी ज्ञान कमी अन निरिक्षण जास्त आहे)
मोडीला २००२ साठी अजूनही जबाबदार धरले जाते तर मग सगळे लेखक मोदींवर बरे रोष धरून आहेत? हे दुटप्पी वागणे नसेल तर अजून काय आहे?
एक मिनट, लेखकांपैकी किती लोकांनी मोदींस नाव घेऊन वैयक्तिक विरोध केला आहे? माझ्या माहिती प्रमाणे सगळ्यांनी हे पुरस्कार "देशात पसरलेले एकंदरित असहिष्णु वातावरण अन व्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी" ह्याचा निषेध म्हणून परत केले आहेत, त्यात मोदींना का पाहता आहात तुम्ही? का ह्या आरोपाला मोदी कारणीभूत आहेत असे कबूल आहे म्हणताय स्वतः? आता ज़रा बोलतोच, 'सगळे कसे बिचार्या मोदींस बोलतात हो" करत त्यांच्यासाठी विक्टिम कार्ड घेणारे लोक आजकाल सहज सपड़तात, ह्यात काही काही मुद्दे कोणीच लक्षात (बहुतेक सोइस्कररीत्या) घेत नाहीये ते खालील प्रमाणे १.बीजेपी न स्वतः मोदी ह्याना एक व्यक्ति असूनही पार्टी पेक्षा मोठे नाही तरी पार्टी बरोबरीत आणले (नाही कोणीच म्हणू नका कारण लोकसभा निवडणुकी मधे "अबकी बार मोदी सरकार" हेच सतत ऐकले आहे ज्याच्या पुढे "अबकी बार भाजपा सरकार" फारच कमी ऐकले आहे) २.त्यामुळे झालंय कसं की मोदी=बीजेपी हे स्वतः बनवलेले समीकरण आहे पार्टी चे, तस्मात् आता मोदी ह्यांच्यावर होणारे आरोप अन बीजेपी वर होणारे आरोप वेगळे उरलेले नाहियेत, 'जया अंगी मोठेपण' विसरून चालणार नाही, अन विसरले असतील तर 'घी देखा लेकिन बड़गा नहीं देखा' लागु होईल बघा काय ते. ३.मते मागताना कमळ भगव्याचे पांढरे केले गेले होते, माननीय प्रधानमंत्री हे सुद्धा "सबका साथ सबका विकास" स्पष्ट बोलले आहेत पण त्यांच्या मंत्रीमंडळाची तशी इच्छा दिसत नाही नापेक्षा रामजादे-हरामजादे किंवा हिंदुन्नी ५ पोरे निपजली पाहिजेत इतकेच काय तर मुस्लिम स्त्रियांच्या कबरी खोदून त्यांच्यावर अत्याचार करा असे संगणाऱ्या साक्षी महाराज अन योगी आदित्यनाथ साध्वी निरंजन ज्योति वगैरे मंडळी ला इतके खमके प्रधानमंत्री "विखारी अन विद्वेषपूर्ण बोलु नका सहन करणार नाही" असली फ़क्त पोकळ धमकी देऊन बसले आहेत करवाई काहीच दिसत नाही त्यावर सगळेच गुळमुळीत , राज्याचे मुख्यमंत्री असलेले मनोहरलाल खट्टर जेव्हा "मुस्लिम देशात चालतील पण त्यानी बीफ सोडायला हवे" असले हलके विधान करतात तेव्हा पक्षश्रेष्ठी ते पंतप्रधान सगळे कसल्या गुळण्या धरून बसले आहेत कळेना, खट्टर ह्यांचे वाक्य तद्दन असंवैधानिक आहे हे प्रथमदिनी लोकसभेच्या पाया पडणार प्रधानमंत्री साहेबांस दिसले नाही का? संगीत सोम ह्यांनी आरंभलेल्या उद्योगात "संगीत ने तिथे जायला नको होते" इतके मोघम बोलणारे अमित शहा नक्की काय आहेत? राष्ट्रिय अध्यक्ष का सामान्य कार्यकर्ते? मग अश्यवेळी जर टिका मोदींवर झाली तर त्यात कश्याला विक्टिम कार्ड खेळावे?
बंगाल आणि केरळ मध्ये अनेक लोकांच्या हत्त्या झाल्या एक शब्द बाहेर नाहीये.
अच्छा म्हणजे तुम्ही त्यांना शेण खाताना काही म्हणाला नाहीत तस्मात् आम्हाला काही म्हणायचे नाही इतके सुलभीकरण होते आहे का इथे? एक लक्षात घ्या की तुम्हीच बंगाल अन केरळ मधल्या हत्या अन सद्धयाचे प्रकार एकाच पातळी ला असल्याचे कबुल करताय इंडिरेक्टली!
D
Dhananjay Borgaonkar Fri, 10/16/2015 - 13:50 नवीन
माझ्या माहिती प्रमाणे सगळ्यांनी हे पुरस्कार "देशात पसरलेले एकंदरित असहिष्णु वातावरण अन व्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी" ह्याचा निषेध म्हणून परत केले आहेत, त्यात मोदींना का पाहता आहात तुम्ही? का ह्या आरोपाला मोदी कारणीभूत आहेत असे कबूल आहे म्हणताय स्वतः?
माझा विरोध त्यालाच आहे. आत पर्यत काय देशात सगळ खेळीमेळीच वातावरण होतं का? अचानक देश असहिष्णू झाला का? पुरस्कार करा परत, निषेध नोंदवा पण या आधी यांच्यापैके कुठल्याच साहित्यिकाने आधी कुठल्याच अशा आधी घडलेल्या घटनेवर साधी प्रतिर्किया पण नाही दिली, निषेध लांबच राहिला. तुम्हाला त्यांची ही व्रुत्ती पटते आहे का? बरं एवढ करुन अखिलेश सरकार केंद्राला कस काय जवाबदार ठरवतं? सगळ्यांनी महित आहे की युपी मधे कायदा सुव्यवस्थेचे काय हाल आहेत?
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ग
गॅरी ट्रुमन Fri, 10/16/2015 - 14:18 नवीन
+१००००० काश्मीरी लेखक गुलाम नबी खयाल यांना १९७५ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार आणीबाणी लादायच्या आधी मिळाला होता की नंतर हे माहित नाही. जरी तो पुरस्कार त्यांना आणीबाणीपूर्वी मिळाला असला तरी आणीबाणीदरम्यान व्यक्तिस्वातंत्र्याची होत असलेली मुस्कटदाबी त्यांना दिसली नाही, १९९० च्या जानेवारी महिन्यात ३ लाख काश्मीरी पंडितांना नेसत्या वस्त्रानिशी काश्मीर खोर्‍यातून हाकलले गेलेले दिसले नाही, त्यांच्याच काश्मीरात हजारो लोकांना ठार मारलेले दिसले नाही. हजारो पटींनी अधिक गंभीर घटना घडत असताना कधी पुरस्कार परत करावेसे त्यांना वाटले नाही आणि या दोन गोष्टींच्या ०.१% ही गंभीर घटना घडत नसताना आता मात्र व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात असल्याचे स्वप्न त्यांना पडत आहे. डिजगस्टींग. अशा ढोंगी लेखकांना आणि त्यांचे पुरस्कार परत करायचे समर्थन करणार्‍यांना अजिबात धूप घालू नये.
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar
अ
अनुप ढेरे Fri, 10/16/2015 - 14:38 नवीन
नयनतारांचं सहगलांच हे वक्तव्य बोलकं आहे.

When I ask Nayantara Sahgal why she didn't return award during previous attacks/riots, she says: this is diff, now we have a Hindutva govt.

— Rajdeep Sardesai (@sardesairajdeep) October 6, 2015
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ग
गॅरी ट्रुमन Fri, 10/16/2015 - 14:49 नवीन
हे इथे टाकल्याबद्दल धन्यवाद अनुपराव. यातून हेच सिध्द होते. यांना न आवडणारा मनुष्य यांच्या नाकावर टिच्चून पंतप्रधान झालेला आहे आणि अर्थातच यांना ते सहन झालेले नाही. म्हणून कुठलातरी राग कुठेतरी काढायला म्हणून (आणि बहुदा त्यांचे एकमेकांची पाठ खाजवायच्या साम्राज्याला मोदी सरकारने सुरूंग लावला म्हणून) ते पुरस्कार परत करत आहेत. उगीच व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला वगैरे तात्विक मुलामे द्यायचा ते प्रयत्न करत आहेत ती बकवास आहे.
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
श
श्रीगुरुजी Fri, 10/16/2015 - 17:11 नवीन
नयनतारांचं सहगलांच हे वक्तव्य बोलकं आहे.
+१ हे पुरस्कार परत करण्यामागचे मूळ कारण देशातील वाढती असहिष्णुता, वाढता जातीय हिंसाचार, लोकशाही स्वातंत्र्यावर आलेला घाला, विचारस्वातंत्र्याचा कोंडमारा इ. इ. नसून त्यामागचे एकमेव कारण म्हणजे मोदी बहुमताने निवडून येऊन पंतप्रधान झाले हे या मंडळींना अजूनही पचविता आलेलं नाही. मोदींवर टीका केली की प्रसिद्धी मिळते हे या चतुर मंडळींनी केव्हाच ओळखलं आहे. यातली बहुसंख्य नावे लोकांना माहितीच नव्हती (उदा. महाराष्ट्रात गणेश विसपुते या नावाचे पुरस्कार विजेते कवी/लेखक आहेत हे त्यांनी पुरस्कार परत केल्यावरच समजलं. त्यापूर्वी हे नाव कधीही ऐकलेले नव्हते.). नेहा धुपिया नावाची एका अडगळीत पडलेली नटी काही महिन्यांपूर्वी मोदींविरूद्ध ट्विट करून अशीच अचानक पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली होती. दिव्या स्पंदना उर्फ रम्या, श्रुती सेठ यांनी झटपट प्रसिद्धीसाठी मोदींविरूद्ध ट्विट करण्याचा मार्ग चोखाळला होता. ज्याला/जिला झटपट प्रसिद्धी हवी आहे आणि एका रात्रीत प्रकाशझोतात यायचे आहे त्याने/तिने मोदींविरूद्ध ट्विट करावे.
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
व
विकास Fri, 10/16/2015 - 17:13 नवीन
आत्ताच कोणीतरी पाठवलेले वाक्य एकदम भावले... ;) "If there is unrest among Intellectuals as well as criminals, then assume that King is doing right"........ Chanakya
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 10/16/2015 - 17:38 नवीन
+ १
↩ प्रतिसाद: विकास
त
तर्राट जोकर Fri, 10/16/2015 - 20:35 नवीन
मग ते ईंग्रजांच्या मुस्कटदाबीस, इंदिरा गांधींच्या आणिबाणी प्रकरणासही लागू होत असेल... नाही?
↩ प्रतिसाद: विकास
व
विनोद१८ Mon, 10/19/2015 - 14:25 नवीन
मग ते ईंग्रजांच्या मुस्कटदाबीस, इंदिरा गांधींच्या आणिबाणी प्रकरणासही लागू होत असेल... नाही ?
हा आपल्या सोयीचा आपल्या मगदूराप्रमाणे काढलेला अर्थ होतो. ईंग्रज हे परकिय राज्यकर्ते होते त्यांच्याकडुन तशा वर्तणूकीची अपेक्षाही करता येत नाही त्यामुळे हे उदाहरण येथे गैरलागू आहे. राहता राहीला इंदिरा गांधींनीं लागू केलेल्या आणीबाणीचा प्रश्ण, ती त्यांनी एका विशिष्ट राजकीय परीस्थितीत स्वार्थबुध्धीने लागू केली कारण कोर्टाचा निर्णय त्यांच्या विरुध्ध गेल्यामुळे त्यांना पायऊतार व्हावे लागणार होते हे माहित असेलच, नंतर आणिबाणीला भारतीय जनतेने पूर्णपणे झिडकारले / नाकारले असा इतिहास आहे. यथावकाश ईदीराबाईंना त्याचे योग्य ते फळ त्यापूढच्या निवडणुकीत मिळालेच. आज देशात इतकी वाईट परिस्थीती नक्कीच नाहीये, ( अर्थात काही फूकटखाऊ उपटसुंभांचे म्हणजेच तथाकथीत विचारवंत वगैररेंचे हलाखीचे दिवस येताहेत असे दिसते ) त्यामुळे हाही मुद्दा गैरलागू आहे व अस्थानी आहे.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 10/19/2015 - 15:09 नवीन
थोरामोठ्यांची वाक्ये आपल्या मगदुराप्रमाणे आपल्या सोयीने अर्थ लावून घ्यायची हे तुम्ही म्हणायचे म्हणजे बल्ले बल्ले! मुळात हे वाक्य चाणक्याचे आहे याचा काय पुरावा नाही. कुणातरी भाजपीय चाणक्याच्या डोक्यातून निघालेले वाक्य दिसते. त्यावर ऑथेंटीक वाटावे म्हणून आर्य चाणक्याचे नाव दिले ठोकून. याची सत्यता कळवलीत तर काही बोलणे पुढे बरे होईल....
↩ प्रतिसाद: विनोद१८
व
विनोद१८ Mon, 10/19/2015 - 15:34 नवीन
वाट्ल्यास सहा ईंची भिंगातुन वाचा माझ्या प्रतिसादात कोठे उल्लेख आहे चाणक्याचा ?? तो फक्त तुमच्या दिव्यच़क्षूंनाच दिसतोय ?? मुद्द्यांवर बोला, अवांतर नको.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 10/16/2015 - 21:52 नवीन
नयनतारा सेहगल यांनी हे उत्तर अनावधाने दिलेले दिसते (मनातले खरे विचार असे स्पष्टपणाने म्हणायची पद्धत नाहीय ना ?) आणि राजदीप सरदेसाईंनी ते सरळ तसेच प्रसिद्ध केले हे पण आश्चर्यच आहे (त्यांचा नेहमीचा कल पाहता हे पण अनवधानानेच झाले असावे) ! कधी कधी अनावधानाने सत्य बाहेर येते हेच खरे ! आणि ही तर डबल व्हॅम्मीच झाली की !!! बाकी चालू द्या.
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 10/18/2015 - 18:58 नवीन
सहज म्हणून ह्या ढोंगी लेखिकेच्या बूकलिस्ट वर नजर फिरवली, त्यात एक पुस्तक सापडले "इंदिरा गांधी, ट्रिस्ट विथ पॉवर" म्हणले बुआ हूँ!! बाई ने चुलत बहिणी चे चरित्र लिहिले आहे त्यात काय नवल असणार! तरी एकदा वर वर चाळले तर अहो आश्चर्यम बाई ने इंदिरा ला वेडी वाकड़ी धुतली आहे म्हणजे आज "असहिष्णुता पसरल्या विरुद्ध" सरकार ला (इंडिरेक्टली मोदींस) जितके बोलली नसेल त्याच्याहुन जास्त! उदा. १ १९७३ च्या निवडणुकांवर डायरेक्ट प्रश्नचिन्ह इतके मोठे का थेट त्यांस अवैध म्हणणे २ इंदिरा गांधींस भारतीय राजकारणाचे केंद्रीकरण अन गुन्हेगारीकरण केल्याबद्दल दोष देणे ३ इंदिरा गांधी ही अतिशय सत्तापीपासू बाई आहे जिने भारतातल्या महत्वाच्या संस्था फ़क्त शिक्का मात्र करून ठेवल्या आहेत अश्या ह्या "लार्जली क्रिटिकल" पुस्तकाला इंदिरा सरकार ने १९८२ मधे बॅन केले होते बघा, आता प्रश्न हा आहे की १. कोण कोणाबद्दल हाफ informed आहे? २. नेमके सेलेक्टिव होण्याबद्दल कोणी कोणाला बोलायचे?? *नयनतारा सहगल ही आदर्श लिबरल बाई एकार्थाने भारताची पहिली महिला राजकीय स्तंभलेखक होती/आहे
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ब
बोका-ए-आझम Sun, 10/18/2015 - 21:23 नवीन
इंदिरा गांधी आणि त्यांची आत्या विजयालक्ष्मी पंडित यांच्यात दुरावा इंदिरा लहान असल्यापासूनच होता. कदाचित लहानपणी आत्याकडून काही अनुभव इंदिरांना आले असतील. नेहरू पंतप्रधान असताना विजयालक्ष्मी पंडित यांना यु.एन. जनरल असेंब्लीचे अध्यक्षपद, भारताचे लंडन आणि वॉशिंग्टनमधील राजदूत अशी पदे भूषवायला मिळाली होती.पण इंदिरा पंतप्रधान झाल्यानंतर मात्र त्यांना फारसे महत्व मिळत नव्हते. इंदिरा गांधी प्रसंगी प्रचंड vindictive होऊ शकत. जनता सरकारने विजयालक्ष्मी पंडित यांची मुलगी नयनतारा सहगल यांना रोममध्ये भारताचे राजदूत म्हणून पाठवले.पण १९८० मध्ये इंदिरांचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर इंदिरांनी ती नियुक्ती रद्द केली. सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर इंदिरांनी घेतलेल्या पहिल्या निर्णयांमध्ये हा निर्णय होता. नयनतारांचे त्यांचे पती गौतम सहगल यांच्याशी पटत नसे.त्या काळात त्या मंगत राय या अत्यंत कार्यक्षम आणि कर्तबगार अशा आय.सी.एस ऑफिसरबरोबर राहत असत. नंतर त्यांचे मंगत रायांबरोबर लग्नही झाले. मंगत राय कॅबिनेट सेक्रेटरी होऊ शकले असते पण त्यांना इंदिरांनी डावलले आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला.
हा गॅरी ट्रूमन यांचा एका लेखावरचा प्रतिसाद आहे. नयनतारा सहगल यांनी (मुंबईच्या भाषेत बोलायचं तर) राशनपानी घेऊन इंदिरा गांधींच्या मागे लागण्यामागे हे महत्वाचं कारण आहे. त्यांनी इंदिरा गांधींविरुद्ध घेतलेले आक्षेप खरे असतीलही, पण एक प्रकारे तो dirty laundry सर्वांसमक्ष धुण्याचाच प्रकार आहे.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ग
गामा पैलवान Sun, 10/18/2015 - 20:07 नवीन
या माहितीबद्दल धन्यवाद, अनुप ढेरे. अवांतर : यावरून राजदीप सरदेसाई हा मोदींचा छुपा हस्तक आहे हे दिसून येतं. त्याला झालेली न्यूयॉर्क मधली मोदीचाहत्यांची मारहाण वगैरे नाटक आहे. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
श
श्रीगुरुजी Sat, 10/17/2015 - 13:47 नवीन
माझ्या माहिती प्रमाणे सगळ्यांनी हे पुरस्कार "देशात पसरलेले एकंदरित असहिष्णु वातावरण अन व्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी" ह्याचा निषेध म्हणून परत केले आहेत, त्यात मोदींना का पाहता आहात तुम्ही?
आम्हाला तर काही दिसले नाही बुवा "देशात पसरलेले एकंदरित असहिष्णु वातावरण अन व्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी". १ वर्षांपूर्वी, २ वर्षांपूर्वी, ५ वर्षांपूर्वी, १५ वर्षांपूर्वी किंवा मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी देशात जेवढे सहिष्णु/असहिष्णु वातावरण होते, तेवढेच आताही आहे. आणि व्यक्तीस्वातंत्र्य म्हणाल तर साक्षी महाराज, साध्वी प्राची, गिरीराज सिंह, पप्पू, काटजू, नेमाडे, लालू हे व यांसारखे अनेक जण अतिशय बिनधास्त वाटेल ती मुक्ताफळे उधळत आहेत. बाबासाहेब पुरंदर्‍यांना महाराष्ट्र भूषण पारितोषिक देताना अनेकांनी मुक्तपणे विरोध केला. तेव्हा त्यांची कोणीही मुस्कटदाबी केली नव्हती. याकूब मेमनला फाशी देताना अनेकांनी मुक्तपणे फाशीला विरोध केला होता. तेव्हाही त्यांची कोणीही मुस्कटदाबी केली नव्हती. ब्लॉगमधून, मिपासारख्या संकेतस्थळावरून, वृत्तपत्रातून, दूरदर्शनवरील अनेक वाहिन्यांमधून अशा सर्व ठिकाणी नागरिक आपली सरकारच्या बाजूने किंवा विरोधी मते उघडपणे व्यक्त करीत आहेत. तेव्हा त्यांची कोणीही मुस्कटदाबी केली नव्हती. मग कोठे आहे मुस्कटदाबी? या लोकांनी आणिबाणीविषयी माहिती नसावी. त्यामुळेच मुस्कटदाबी हा शब्द इतक्या सहजतेने वापरीत आहेत.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 10/17/2015 - 14:04 नवीन
हे त्यांना सांगा गुर्जी! मी फ़क्त ते काय म्हणाले अन काय नाही (वाचीव ज्ञानावर) सांगतोय! ते बरोबर आहेत असे ही नाही! सालं ह्या देशाचं रडणं हेच तर आहे! त्यांच्यासरख्यास गरज नसताना दिसते अन अंधभक्तांना गरज असताना दिसत नाही!
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
च
चैतन्य ईन्या Fri, 10/16/2015 - 13:28 नवीन
"देशात पसरलेले एकंदरित असहिष्णु वातावरण अन व्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी" >> हे खरच आहे का? ह्याच्या आधी हे होत नव्हते काय? पेडगावाची ट्रीप आहे बाकी काही नाही. बाकीच्या प्रतिसादाशी सहमत आहे. फक्त असहमती ह्यावर आहे कि सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी फक्त मोदी मुलेच होतात. अच्छा म्हणजे तुम्ही त्यांना शेण खाताना काही म्हणाला नाहीत तस्मात् आम्हाला काही म्हणायचे नाही इतके सुलभीकरण होते आहे का इथे? एक लक्षात घ्या की तुम्हीच बंगाल अन केरळ मधल्या हत्या अन सद्धयाचे प्रकार एकाच पातळी ला असल्याचे कबुल करताय इंडिरेक्टली!>> इथेही तुम्हाला मान्य नाहीये कि तेंव्हा आवाज उठवायला हवा होता. प्रोब्लेम तिथेच आहे. जेंव्हा केंद्र कोन्ग्रेस कडे होते तेंव्हा हे साम्य/समाज वाडी जे काही सगळे करत होते ते चालत होते. आत्ताही बातम्या कश्या दिल्या जातात आणि त्याला रंग कसा दिला जातो ह्याचा आहे. हेच सूत्र सगळ्यांना लावले तर मोडीचा इतका प्रतिवाद करायला कोणीच येणार नाही.
ब
बोका-ए-आझम Fri, 10/16/2015 - 14:00 नवीन
हा नक्की काय प्रकार असतो आणि किती भयावह असू शकतो याबद्दल या पुरस्कार परत करणाऱ्या लोकांपैकी कोणाला first hand माहिती आहे? नयनतारा सहगल आणि अशोक वाजपेयी हे खानदानी काँग्रेसी आणि काँग्रेसमुळे फायदा झालेले असल्यामुळे त्यांचं मत ग्राह्य धरणं हे कितपत बरोबर आहे? कारण आता त्यांचा आवडता पक्ष सत्तेवर नाहीये, ज्या पक्षाने आणीबाणी आणून स्वातंत्र्योत्तर इतिहासातला व्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीचा आणि मुस्कटदाबीचा प्रयोग केला होता. बाकी कामगारांची 'हुकूमशाही ' आणणं हे अंतिम उद्दिष्ट असणारं साम्यवादी तत्वज्ञान मानणारे डावे जेव्हा व्यक्तिस्वातंत्र्य वगैरेच्या गप्पा मारतात तेव्हा ड्वाले पानावतातच.
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 10/16/2015 - 14:19 नवीन
नयनतारा अन बाजपेयी मग शिव्यांस पात्र आहेतच! वाद त्यों नाहीचे बोकोबा दादा, जसे तुम्ही नयनतारा अन बाजपेयी ह्यांचे बैकग्राउंड वर्कआउट केले तसेच इतरांचे ची झाले पाहिजे नव्हे झालेच पाहिजे! सरसकटीकरण नको, इतका मुद्दा आहे म्हणूनच मी "कोणी पत्रे तरी पुर्ण वाचली आहेत का?" हा प्रश्न विचारला आहे (लक्षात घ्या it defines a logical prerequisite and its not उपरोधिक) परवा एका अश्याच अज्ञ बांधवाने मला "लेखकच कोणाला माहिती नाही तर पुरस्कार अन ती अकादमी काय लायकी ची असेल लक्षात घ्या" असे दिव्य मत दिले! आता बोला! हे ट्रेंड एक समाज म्हणून आपल्याला घातक नाही हे क्रिएटिव मीडिया मधे काम केलेला तुमच्या सारखा मनुष्य म्हणेल का हे तुम्हीच सांगा!?
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 10/16/2015 - 14:34 नवीन
अज्ञ बांधवाने मला "लेखकच कोणाला माहिती नाही तर पुरस्कार अन ती अकादमी काय लायकी ची असेल लक्षात घ्या
हे येथे मिपावरही दिसते. "ही लेखिका आजपर्यंत कोणालाही माहित नव्हती.सगळे प्रसिद्धीसाठी...कोण कुठला कवी.." असे प्रश्न येत आहेत.म्हणजे उद्या नावाजलेल्या २/४ लेखकांनी,कवींनी पुरस्कार परत केले तर ह्या लोकांची बोलती बंद होंणार.असो. पुरस्कार परत करणे अयोग्य वाटते.कायदा-सुव्यवथेबद्दल आ़क्षेप असेल तर तसे बोलून दाखवले पाहिजे. कायदा-सुव्यवथेला साहित्य अकादमी जबाबदार नसते.तेव्हा त्यांना पुरस्कार परत करून काय मिळणार? असा ह्यांचा प्रश्न.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ब
बोका-ए-आझम Fri, 10/16/2015 - 16:01 नवीन
विरोध या लोकांनी पुरस्कार परत करणं किंवा सरकारच्या एखाद्या कृतीचा मुस्कटदाबी म्हणून निषेध करणं याला नाहीच आहे. विरोध हा दुटप्पी वृत्तीला आहे. एका पक्षाच्या सरकारने जी कृती केली किंवा त्याच्या राजवटीत एखादी कृती झाली तर निषेधाचा ब्रदेखील न उच्चारणारे लोक जेव्हा दुस-या पक्षाच्या राजवटीत ती गोष्ट होत असते तेव्हा तावातावानं भांडतात याचा अर्थ काय होतो? जर यांची सद्सद्विवेकबुद्धी ही कोणत्या पक्षाचं सरकार आहे यावर अवलंबून राहणार असेल तर तिला सद्सद्विवेकबुद्धी म्हणणं हा त्या गोष्टीचा अपमान आहे.
परवा एका अश्याच अज्ञ बांधवाने मला "लेखकच कोणाला माहिती नाही तर पुरस्कार अन ती अकादमी काय लायकी ची असेल लक्षात घ्या" असे दिव्य मत दिले! आता बोला! हे ट्रेंड एक समाज म्हणून आपल्याला घातक नाही हे क्रिएटिव मीडिया मधे काम केलेला तुमच्या सारखा मनुष्य म्हणेल का हे तुम्हीच सांगा!?
याच्याशी सहमत. ही टोकाचीच भूमिका आहे. मला एखादा लेखक माहित नाही म्हणजे तो चांगला नाहीच असं जर कोणी म्हणत असेल तर ते धोक्याचं आहेच आणि अशी बंद झापडं लवून आजच्या काळात जगणं हा मूर्खपणा आहे.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
सुबोध खरे Sat, 10/17/2015 - 09:01 नवीन
@बोका-ए-आझम विरोध हा दुटप्पी वृत्तीला आहे. जर यांची सद्सद्विवेकबुद्धी ही कोणत्या पक्षाचं सरकार आहे यावर अवलंबून राहणार असेल तर तिला सद्सद्विवेकबुद्धी म्हणणं हा त्या गोष्टीचा अपमान आहे. + १००
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
न
नाखु Mon, 10/19/2015 - 09:29 नवीन
अवतरण अश्या धाग्यांसाठी, आणि तमाम आप्तेष्ट समान धाग्यांसाठी आपोआप (वैधानीक इशार्यासमान छापले जावे हि (

मिपा सा सं कडे

) कळकळीची मागणी.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
न
नया है वह Tue, 10/20/2015 - 11:29 नवीन
+ १००
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गॅरी ट्रुमन Fri, 10/16/2015 - 14:19 नवीन
डावे जेव्हा व्यक्तिस्वातंत्र्य वगैरेच्या गप्पा मारतात तेव्हा ड्वाले पानावतातच.
+१००००० (डाव्यांचे नाव ऐकताच तळपायाची आग अस्मानात जाणारा) गॅरी ट्रुमन
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 10/16/2015 - 15:26 नवीन
तुमच्या त्या अनेक एन.जी.ओ.ज च्या फंडिंगची चौकशी सरकारने चालू केली आहे.कॉन्ग्रेसला पाठिंबा देणार्या एन.जी.ओ.जची जरा जास्तच चौकशी चालू आहे. त्यामुळे लब्धप्रतिष्ठिंतातला एक वर्ग जरा रागावला आहे असा ह्यांचा अंदाज.
अ
अजया Fri, 10/16/2015 - 16:39 नवीन
अत्यंत रोचक चर्चा.गॅरी यांचा प्रतिसाद आवडला.धाग्यातल्या आशयाशी सहमत.
व
विकास Fri, 10/16/2015 - 16:40 नवीन
म्हणूनच शेषराव मोरे यांनी या सगळ्या तथाकथीत विचारवंतांना "पुरोगामी दहशतवादी" म्हणले आहे. अर्थात शेषराव मोरे बहुदा eminent author नसावेत. कारण यांना साहीत्य अकादमीचे पारीतोषिक मिळालेले नाही. ;)
क
कपिलमुनी Fri, 10/16/2015 - 20:52 नवीन
1 Uday Prakash Hindi writer 2 Nayantara Sahgal Indian English writer 3 Ashok Vajpeyi Hindi poet 4 Sarah Joseph Malayalam novelist 5 Ghulam Nabi Khayal Kashmiri writer 6 Rahman Abbas Urdu novelist 7 Waryam Sandhu Punjabi writer 8 Gurbachan Singh Bhullar Punjabi writer 9 Ajmer Singh Aulakh Punjabi writer 10 Atamjit Singh Punjabi writer 11 GN Ranganatha Rao Kannada translator 12 Mangalesh Dabral Hindi writer 13 Rajesh Joshi Hindi writer 14 Ganesh Devy Gujarati writer 15 Srinath DN Kannada translator 16 Kumbar Veerabhadrappa Kannada novelist 17 Rahmat Tarikere Kannada writer 18 Baldev Singh Sadaknama Punjabi novelist 19 Jaswinder Punjabi poet 20 Darshan Battar Punjabi poet 21 Surjit Patar Punjabi poet 22 Chaman Lal Punjabi translator 23 Homen Borgohain Assamese journalist 24 Mandakranta Sen Bengali poet 25 Keki N Daruwalla Indian English poet 26 Nand Bhardwaj Rajasthani Hindi writer *The list does not include six Kannada writers who returned the State literary award on 3 October. Theatre artist Maya Krishna Rao has also returned her Sangeet Natak Akademi award on 12 October, while Shiromani Lekhak award winner Megh Raj Mitter has also announced to return his award. List of litterateurs who resigned from Sahitya Akademi posts No Litterateur Language 1 Shashi Deshpande Kannada author 2 K Satchidanandan Malayalam poet 3 PK Parakkadvu Malayalam writer 4 Aravind Malagatti Kannada poet
ट
ट्रेड मार्क Mon, 10/19/2015 - 14:46 नवीन
केवळ मनोरंजनासाठी. डाकिया डाकिया हांफता है धूल झाड़ता है चाय के लिए मना करता है डाकिया अपनी चप्पल फिर अंगूठे में संभालकर फँसाता है और, मनीआर्डर के रुपये गिनता है. --------------------------------------------------- कुतुबमीनार की ऊँचाई कुतबुद्दीन ऎबक को अब ऊपर से नीचे देख पाने के लिए चश्मे की ज़रूरत पड़ती इतनी ऊँचाई से गिर कर चश्मा टूट जाता. --------------------------------------------------- रंगा-बिल्ला एक था रंगा एक था बिल्ला दोनों भाई-भाई नहीं थे लेकिन दोनों को फाँसी हो गयी । एक थे टाटा एक है बिरला दोनों भाई-भाई हैं लेकिन दोनों को फाँसी नहीं हुई । --------------------------------------------------- छींक ज़िल्लेइलाही शहंशाह-ए-हिंदुस्तान आफ़ताब-ए-वक़्त हुज़ूर-ए-आला ! परवरदिगार जहाँपनाह ! क्षमा कर दें मेरे पाप । मगर ये सच है मेरी क़िस्मत के आक़ा, मेरे ख़ून और पसीने के क़तरे-क़तरे के हक़दार, ये बिल्कुल सच है कि अभी-अभी आपको बिल्कुल इंसानों जैसी छींक आयी । ---------------------------------------------------- करीमन और अशर्फ़ी शाहनवाज़ खाँ तुम अपनी अंटी से तूतनखामेन की अशर्फ़ी निकालना । उधर हाट के सबसे आख़िरी छोर पर नीम के नीचे टाट पर कई साल से अपनी झुर्रियों समेत बैठी करीमन किरानची होगी । तुम उससे अशर्फ़ी के बदले लहसुन माँगना । यह शर्त रही कि वह नहीं देगी । अजुन काही कविता - http://kavitakosh.org/kk/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
प्रसाद गोडबोले Fri, 10/16/2015 - 21:29 नवीन
आमच्या देशीवादी नेमाडे सरांनी अ‍ॅवॉर्ड परत केला की आम्ही ह्या वादात पडु , तोवर पव्हेलियन मधे बसुन मजा घेत आहोत =))
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 10/17/2015 - 03:09 नवीन
कधीही काही न बोलणारे अन आता उसासे सोडणारे हे http://www.dnaindia.com/india/report-dadri-killing-looking-at-possibility-of-moving-victim-s-family-iaf-chief-arup-raha-2131256 भारतीय वायुसेनेचे प्रमुख सुद्धा मेँटलेकच्युअल म्हणावतील नाही का हो भद्रजनहो!
स
सुबोध खरे Sat, 10/17/2015 - 08:59 नवीन
बापूसाहेब जर वायुदल प्रमुखांनी राजीनामा दिला असता तर त्यांना "मेँटलेकच्युअल" म्हणावे लागले असते. त्यांनी दिलेली प्रतिक्रिया हि कोणताही सुजाण नागरिक देईल अशीच आहे. आपल्या माणसांची काळजी घेणे हे कोणत्याही लष्करी अधिकार्याचे कर्तव्य असते त्याप्रमाणेच वायू दल प्रमुख वागत आहेत. कोणत्याही राजकीय वादात न पडता त्यांनी दिलेली प्रतिक्रिया एखाद्या परिपक्व अधिकार्याचीच आहे. १९८४ च्या शीख कत्तलीत किंवा काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या वेळेस त्यावेळच्या लष्कर प्रमुखांनी अशीच सुजाण प्रतिक्रिया दिली होती असे आठवते.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 10/17/2015 - 09:04 नवीन
जल्म ८५ चा म्हणून माहिती नव्हते! धन्स डॉक साब, बाकी लष्करेतर सुजाण नागरिक बोलले तर त्यांच्यावर लगेच "मेंटलकच्युअल" "काविळ पेशेंट" "विकास विरोधी" असे रबर स्टैम्प का मारले जात असावेत असे वाटते?
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 10/17/2015 - 09:32 नवीन
विरोध हा दुटप्पी वृत्तीला आहे. जर यांची सद्सद्विवेकबुद्धी ही कोणत्या पक्षाचं सरकार आहे यावर अवलंबून राहणार असेल तर तिला सद्सद्विवेकबुद्धी म्हणणं हा त्या गोष्टीचा अपमान आहे. माझे म्हणणे एवढेच आहे.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
म
मृत्युन्जय Sat, 10/17/2015 - 13:27 नवीन
सोन्याबाप्पू यु टु? बातमी वाचा तर खरे. त्यांनी दादरी घटनेचा निषेध केला आहे. डोके ताळ्यावर असलेला कुठलाही माणूस करेल. दादरी घटनेचा निषेध करणार्‍या लोकांना धागाकर्ता मेंटलेक्च्युअल म्हणतच नाही आहे. त्याचा निषेध म्हणुन २५ -३० वर्षांपुर्वी मिळालेला पुरस्कार परत करणार्‍या आणि ते करतना विनाकारण सद्य सरकारवर टीका करणार्‍या अज्ञात लेखकांना ते तसे म्हणत आहेत. बाकी बातमीतील खालील वक्तव्याने माझे लक्ष वेधुन घेतले: "Whatever protection is required, we are giving it to him. We are trying to move (them) to some Air Force area. We are with him and our people are there to assist the family," यातुन २ गोष्टी: १. पै इकलाख यांच्या कुटुंबियांना मदत करणारी एक यंत्रणा सरकारीच आहे. २. अश्याच प्रकारची मदत सेनादलांनी काश्मीर मधुन परागंदा व्हायला लागलेल्या आणि परिजनांचे प्राण गमावलेल्या काश्मिरी पंडित सैनिकांचीही केली असेल आणि त्याचेही योग्य ते पुरावे शोधुन हितेष भाई आणि त्यांचे सर्व आजी माजी अवतार आणि चुलत सख्खी भावंडे मिळुन देतील अशी अपेक्षा अहे.
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
पैसा Sat, 10/17/2015 - 07:45 नवीन
दमले १३५४७९ शब्द वाचून! जाउद्या हो. सगळे साहित्यिक दुर्गाबाई भागवत नसतात. "ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी" हा साधा नियम आहे. माइंचे हे वेगळे विचार करायला लागलेले दिसतात सध्या. आणि आमचे फुजि नि दादूस कुठे दिसले नाहीत ते? त्यांच्याबदली नवे लोक पेट्रोलचे टॅंकर घेऊन आले वाटतं!! =))
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 10/17/2015 - 07:52 नवीन
कोण रे त्यों पेट्रोल ओत्या!! (फायर ब्रिगेड अधिकारी) बाप्या
↩ प्रतिसाद: पैसा
D
dadadarekar Sat, 10/17/2015 - 08:33 नवीन
विरोधी विचार वा कृती केली की हल्ली मुडदा पडतो व ' यात केंद्राचा काय संबंध ? ' असे म्हणून श्रीविष्णूंचे ११ वे अवतार मोकळे होतात. म्हणून माइइंचे ' हे ' जरा मवाळ झालेत.
↩ प्रतिसाद: पैसा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा