Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डेविड हेडलीची साक्ष,JNU, आणि ढोंगी फेक्युलर

च
चेक आणि मेट
गुरुवार, 02/11/2016 - 06:31
🗣 331 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, (पहिल्यांदाच लिहतोय त्यामुळे बारीकसारीक त्रुटींकडे दुर्लक्ष करा.) तर मुद्दा असा कि, डेविड हेडलीची साक्ष वगैरे घेण्याचं काम सुरू आहे,आणि त्याने एक मोठा खुलासा केला आहे कि इशरत जहां ही सुसाईड बाॅम्बरच होती.ती लष्कराची महिला आतंकवादी होती. तर इशरत प्रकरणावरून पूर्वी बराच वाद झाला होता,त्यामध्ये गुजरात पोलिस आणि मोदी,शहांच्या नावाने बरेच स्वयंघोषित सेक्युलर खडे फोडत होते.तथाकथित ढोंगी सेक्युलर म्हणत होते कि ती निर्दोष होती म्हणे!!! दुसरा मुद्दा असा कि JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीमध्ये ते वामपंथी का काय ते विद्यार्थ्यांनी म्हणे काश्मिरच्या स्वातंत्र्याबद्दल कार्यक्रम घेतला आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. तर मला असे म्हणायचे कि जे राष्ट्रीय संवेदनशील मुद्दे आहेत त्या मुद्यांना हात घालायची खाज या अति लिबरल विद्यार्थांना का सुटते म्हणे?? आता हे सगळं लिहल्यावर काहीजण मला मोदीभक्त म्हणतील.पण असो दुर्लक्ष करणे. तर हे दोन महत्वाचे मुद्दे मी मांडले आहेत,अजून अशा बर्याच गोष्टी सांगता येतील कि जिथे तथाकथित सेक्युलरांचा ढोंगीपणा उघडा पडतो. तिकडे हाफिज सईदने ट्वीट करून त्या JNU च्या पाकप्रेमींना पांठिबा दर्शविला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का?? (सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??)
वर्गीकरण
राष्ट्रीय राजकारण

प्रतिक्रिया द्या
59550 वाचन

💬 प्रतिसाद (331)
श
श्रीगुरुजी Sat, 02/13/2016 - 16:28 नवीन
Rahul Gandhi added his voice to the debate saying that while 'anti-India sentiment is unacceptable, debate is part of a democracy. He said: "While Anti-India sentiment is unquestionably unacceptable, the right to dissent & debate is an essential ingredient of democracy.
पप्पू अजून बरेच काही बोलला. त्याची खालील वाक्ये पहा. A youngster expressed himself and the government says he is an anti-national. The most anti-national people are the people who are suppressing the voice of this institution," Gandhi told students. म्हणजे पप्पूच्या मतानुसार "तो कन्हैय्या कुमार किंवा तो खलिद नावाचा विद्यार्थी आपले विचार प्रकट करीत होता व सरकारने त्याबद्दल त्याला देशद्रोही ठरविले आहे. खरे देशद्रोही ते आहेत जे या संस्थेतील विद्यार्थ्यांचा आवाज दडपून टाकत आहेत." याचा सरळ अर्थ असा होतो की ते घोषणा देणारे विद्यार्थी देशद्रोही नसून त्यांना अटक करणारे देशद्रोही आहेत. "They do not understand that by crushing you they are making you stronger," he added. ABVP workers showed black flags and raised slogans against Gandhi when he visited the campus. म्हणजे पप्पूच्या मतानुसार त्यांना दडपून टाकणे हे त्यांना अधिक बळकट करणारे आहेत. काही दिवसांपूर्वी हैद्राबाद विद्यापीठात रोहीत वेमुला व त्याच्या काही मित्रांनी अशी घोषणाबाजी केली होती की "तुम्ही जितके याकूब मेमन माराल, प्रत्येक घरातून याकूब मेमन पैदा होतील." रोहीत वेमुलाची ही वाक्ये आणि पप्पूची वरील वाक्ये एकसारखीचा आहेत. http://timesofindia.indiatimes.com/india/Rahul-Gandhi-visits-JNU-says-those-suppressing-institutions-voice-are-anti-national/articleshow/50976332.cms पप्पूची अजून काही मुक्ताफळे - When we fought the British, we fought them for our land and we fought them for our voice I came here to tell you, there are more than billion people in country who believe what you believe in & standing right behind you. The most important thing we have is the voice of our people." हा तर उघडउघड देशद्रोही विद्यार्थ्यांना पाठिंबा आहे. http://www.dnaindia.com/india/report-afzal-guru-row-rahul-gandhi-set-to-visit-jnu-campus-2177409
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Sun, 02/14/2016 - 10:31 नवीन
जरा घटनाक्रम पाहूया. (१) ९ फेब्रुवारीला जेएनयू मध्ये विद्यार्थ्यांच्या एका गटाने आंदोलन व घोषणाबाजी केली. फाशी झालेला अतिरेकी अफझल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. काश्मिरच्या स्वातंत्र्याच्या बाजूने घोषणा देण्यात आल्या. केरळ व बंगालमधील कोणाचीही मागणी नसताना 'केरळ मांगे आझादी', 'बंगाल मांगे आझादी' असल्या घोषणा देण्यात आल्या. अफझल गुरूच्या फाशीचा उल्लेख न्यायव्यवस्थेने केलेला खून असा करण्यात आला. भारताच्या बरबादीच्या घोषणा देण्यात आल्या. यांच्यात उजव्या कम्युनिस्ट पक्षाचे डी राजा यांच्या मुलीचाही समावेश होता असे बोलले जाते. केरळ, बंगाल, काश्मिर इ. चा उल्लेख असल्याने हे विद्यार्थी काश्मिरमधील फुटिरतावादी व कम्युनिस्ट यांच्याशी संबंधित असावे. (२) देशद्रोही घोषणा दिल्याबद्दल २-३ दिवसांनी विद्यार्थी संघटनेचा प्रमुख कन्हैया कुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. नंतर अजून ७ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. (३) कम्युनिस्ट पक्ष व काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीचा अजिबात विरोध वा निषेध न करता त्यांना अटक करण्याचा निषेध केला. विद्याथ्यांऐवजी पोलिसांना व केंद्र सरकारलाच शिव्या घातल्या. (४) केजरीवाल व राहुल यांनी वरील विद्यार्थ्यांचा अगदी गुळमुळीत शब्दात सुद्धा निषेध केला नाही. नंतर गुळमुळीत शब्दात "भारतविरोधी भूमिका चालणार नाही", परंतु वैचारिक वादविवाद हा मूलभूत हक्क आहे" असे म्हणून विद्यार्थ्यांच्या अटकेचा निषेध केला. (५) हे स्पष्ट दिसत आहे की, (अ) केजरीवाल व राहुल यांना विद्यार्थ्यांनी काही चुकीचे केले आहे हे मान्यच नाही. अन्यथा त्यांनी विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीचा निसंदिग्ध शब्दात निषेध व विरोध केला असता. त्याबद्दल त्यांनी मौन पाळले आहे. (ब) देशद्रोही घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या अटकेला त्यांच्या विरोध आहे. या विद्यार्थ्यांच्या देशद्रोह त्यांना देशद्रोह न वाटता the right to dissent & debate वाटतोय. या देशद्रोही विद्यार्थ्यांवर कारवाई करणारेच त्यांना देशद्रोही वाटत आहेत. (क) 'अ' व 'ब' वरून स्पष्ट दिसते की देशद्रोह्यांना या दोघांचा पाठिंबा आहे व देशद्रोह्यांविरूद्ध कोणतीही कायदेशीर करण्यास त्यांचा विरोध आहे. कॉंग्रेस हा सुरवातीपासून दहशतवादी, देशद्रोही यांचा भक्कम पाठिराखा आहे. आता त्यात केजरीवालही सामील झाले आहेत. असले नेते भारतात आहेत हेच भारताचं दुर्दैव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विवेकपटाईत Sat, 02/13/2016 - 17:31 नवीन
प्रत्येक राजनेता आपल्या संपविण्याचा प्रयत्न करतो, त्यात काही गैर नाही. प्रयत्न अयशस्वी झाल्यास गादी हातातून जाते. बाकी इशरत आतंकवादी होती हे १००% सत्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
भ
भंकस बाबा Sun, 02/14/2016 - 04:54 नवीन
मी काही मोदीभक्त नाही, पण जर राहुल गांधीवर टीका केलि तर त्या व्यक्तीला भाजपाच्या टोळीतील लांडगा मानला जाते,पर्यायाने मोदीभक्त! असतील मोदी फेकू,पण त्यांच्या बोलण्यात कुठेही भारतद्वेष दिसत नाही. पण पप्पुचि भाषणे बघितली की त्याच्या व् कॉंग्रेसवाल्यांच्या अकलेची कीव कराविशि वाटते. पप्पू आज सरळसरळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी जेएनयू मधील देशद्रोहयाचे समर्थन करत आहे. खरोकर हां माणूस जर पन्तप्रधान म्हणुन जर समोर आला तर जगासमोर एक मोठा विनोद म्हणुन भारताची प्रतिमा तयार होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
न
नाना स्कॉच Sun, 02/14/2016 - 05:06 नवीन
अजुन एक जोड़तो पुस्ती, हे सगळे करुन म्हणजे जेएनयु मधील विद्यार्थ्यांना (?) पाठिंबा देऊन तो छोटा भीम स्वतःची कबर खोदतोय. त्याला शिव्या दिल्यास लोक भाजपाई समजतात तर समजू दे बापडा! लोकांची लेवलच तितकी!! आपण आपल्या मनात नीरक्षीर (आमच्या बाबतीत नीरस्कॉच) असणे बरे! (स्कॉच भक्त) नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
प
प्रदीप साळुंखे Sat, 02/13/2016 - 07:01 नवीन
असो, पण देशात जे राष्ट्रविरोधी वातावरण आहे त्यामुळे लोकांचा उद्रेक बाहेर येऊ नये म्हणजे मिळवलं,लोक रस्त्यावर उतरले तर काय होईल? ISI चे एजंट काय सापडतात आणि ते इसिस चे नेटवर्क चालवाणारे काय सापडतात!! आता फक्त ABVP वाले उतरलेत. आणि लोक जेव्हा रस्त्यावर उतरतील त्यावेळीही मोदीविरोधक मोदींनाच जबाबदार धरतील. नालायकपणाला पण एक लिमिट असतं,मी स्वतः मोदींच्या धोरणांचा कधीकधी विरोध करतो,तोरसेकरांच्या ब्लाॅगखाली प्रतिसाद देतो पण माझे प्रतिसाद ते प्रकाशित करत नाहीत. म्हणून दांभिक सेक्युलरांनी थोडं आत्मपरिक्षण करणं गरजेचं आहे. या अशा वातावरणामुळे माझ्यासारख्या मोदीभक्त नसणार्यांना मोदीभक्त व्हावे का असे वाटत आहे. आणि यामध्ये मोंदींचा काय संबंध म्हणाल तर संबंध आहे. 282 जागा येवून पूर्ण बहुमत असणे आणि जागतिक राजकारणात त्यांची सुधारलेली प्रतिमा हे अजून काहींना पचत नाहीये. धन्यवाद (नाईलजाने झालेला मोदीभक्त)
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sat, 02/13/2016 - 07:25 नवीन
याविषयावर शेखर गुप्ता यांचा हा लेख वाचनीय आहे. http://www.business-standard.com/article/opinion/shekhar-gupta-the-great-indian-hypocrisy-116021201208_1.html इशरत जहान अतिरेकी होती यात काही संशय नसावा. मुख्य मुद्दा तिला मारण्याचा आहे. त्याला गुप्ता एन्काऊंटर न म्हणता कंट्रोल्ड किलिंग म्हणतात. भारताचं हे धोरण पंजाब, कश्मिरसकट अनेक ठिकाणी खूप वर्षापूर्वीपासून आहे. त्यांचा मुख्य मुद्दा हा की २००४साली, कॉंग्रेसचं सरकार आणि आयबी-चीफ असताना झालेली. ती अनेक वर्षांनंतर का बाहेर आली. याबाबत ते म्हणतात की जेव्हा मोदी हा कॉंग्रेसच्या सत्तेला धोका म्हणून पुढे आले तेव्हा याचं पद्धतशीरपणे राजकारण करण्यात आलं. हेडलीच्या पार्डन बद्दल त्याने सरकारशी केलेलं हे डील आहे असं काही लोक म्हणतायत. त्याला उत्तर ते असं देतात की अमेरिकेच्या कायद्यानुसार त्याने अमेरिकेतली शिक्षा (३५ वर्ष) भोगून झाल्याशिवाय त्याला एक्सट्रडाइट करता येतच नाही. सो भारताने ३५वर्ष थांबून त्याला इथे आणायचं का आत्ता त्याला माफी देऊन त्याच्याकडून २६/११बद्द्ल साक्ष देऊन घ्यायची असे पर्याय होते.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sat, 02/13/2016 - 07:30 नवीन
अवांतर: एका बाजूला एफ्टीआयाय/सेंसर बोर्ड/बीफ बॅन वगैरे असहिष्णुता आणि दुसर्‍याबाजूला राजकीय फायद्यासाठी अतिरेक्याला हिरो बनवणे, गुप्तहेर यंत्रणेला राजकारणात आणणे, अमाप भ्रष्टाचार, उद्योगप्तींना बोगस लोन्स देऊन सरकारी बँकांची वाट लावणे. माय चॉइस इज क्लीअर.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Sat, 02/13/2016 - 09:51 नवीन
अ मा प भ्र ष्टा चा र........ खरच की कॉय्य ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
म
मृत्युन्जय Sat, 02/13/2016 - 09:55 नवीन
ते कॉम्ग्रेसच्या भ्र्ष्टाचाराबद्दल बोलत आहेत. त्याबद्दल संभ्रम असण्याचे काही कारण दिसत नाही. युपीए २ वर खोर्‍याने भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
इ
इरसाल Sat, 02/13/2016 - 12:37 नवीन
मला वाटलं सद्द्याच्या. सॉरी हं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ल
लिओ Sat, 02/13/2016 - 11:09 नवीन
भाऊ तोरसेकरांचा ब्लोग इशरत जहान अतिरेकी होती तर झालेले एन्काऊंटर हे योग्यच म्हणावे भलेहि बळजबरीने म्हणालो तरी चालेल, कसाबने बिर्याणी खाल्ली, इशरत जहानेपण खाल्ली असती. पण त्यावरुन सध्याचे पन्तप्रधान/गृहमंत्री यशस्वी / भले / निष्कलन्कित व तत्कालिन पन्तप्रधान/गृहमंत्री कलन्कित / बावळट / अयशस्वी असे म्हणणे चुकिचे. मुद्दा थोडा भरकटेल एक गोष्ट नमुद करावीशी वाट्ते. आरुशी तलवार हत्याकान्ड घटनेवर आधारित चित्र्पट "तलवार" पाहिला. एके ठिकानी तलवार यांच्या निकटच्या व्यक्तिने लिहिले कि ज्याना आरुशी तलवार हत्याकान्ड सम्बधीत कागदपत्रे वाचली नाहित त्यानी हा चित्र्पट नक्कि पहावा. "तलवार" चित्र्पट बनवताना या केसची कागदपत्रे संदर्भ पटकथेत वापरला असे वाचले. "तलवार" चित्र्पटात पाहिले स्वत:च्या फायदयासाठी सी बी आय अधिकारी खुनाचे कारण काय यावर पहिल्या अधिकार्याने केलेला तपास गुंडाळुन दुसर्या अधिकार्याने केलेला तपास पुढे रेटला जातो. या चित्र्पटात पाहिले कि अधिकारी स्वत:च्या फायद्यासाठी काय करु शकतात. कसे दुसर्या अधिकारयाला अडकवु शकतात. छ्ळु शकतात. इशरत जहान केसमध्ये तत्कालिन "पन्तप्रधान/गृहमंत्री" यांची भुमिका तपाविशी असे ज्यांना वाटते त्यांनी सांगावे कि तत्कालिन युती "राज्य" सरकारने शस्त्र बाळगणाऱ्या अभिनेत्याला "टाडा" न्यायालयातुन कसा जामीन मिळवुन दिला, हे सांगावे. जर सर्व आरोपी जेलमध्ये सड्त ठेवले असते तर एक चांगले उदाहरण झाले असते. देशविघातक काम तेव्हा झाले आणि आजही झाले आहे. सध्या " न्यायप्रविष्ट " हा शब्द अधिकारी / राजकारणी लोकाना उसन्ती घेण्यासाठी / मुखवटा बदलण्यासाठी केलेले "कवच" आहे. ++++++++++++++++++++++++++++ नेहरु विद्यापीठ "लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का" कार्यक्रम घेतले असते का हे महत्वाचे नाही. नेहरु विद्यापीठात जे झाले त्यावरुन पाकिस्तान्यांची कशी जिरवता येइल असे काही तरी करावे, आयते निमित्त मिळाले आहे
  • Log in or register to post comments
म
मोगा Sun, 02/14/2016 - 05:04 नवीन
तो अभिनेता निरागस बाळ होता असा टाहो एका वाघोबाने फोडला होता , म्हणुनच तो निर्दोष सुटला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिओ
भ
भंकस बाबा Sun, 02/14/2016 - 08:16 नवीन
गल्लीतली कुत्री स्वतःला सिंह समजायला लागली आहेत. या जेएनयूच्या गद्दाराना धड़ा शिकवायला वाघोबाच् पाहिजे होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
म
मोगा Sun, 02/14/2016 - 11:47 नवीन
स्वतःच्या स्वर्थासाठी कधी कुणाचे पोट फाडणे , तर कधी संजय निरागस हो ! असे सूर आळवणे ..... तुमच्या इतिहासातील सगळ्याच वाघोबानी हेच केले आहे... ते पोट फाडायला गेले की तुम्हाला ते शूर वाटतात व तह करायला गेले की तुम्हाला ते मुत्सद्दी वाटतात. तुमचे वाघोबा तुम्हाला लखलाभ ! ( लखोबा लाभ ! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
म
माहितगार Mon, 02/15/2016 - 19:04 नवीन
स्वतःच्या स्वर्थासाठी कधी कुणाचे पोट फाडणे
@मोगा, हा उल्लेख नेमका कुणाबद्दल आहे ? शिवाजी महाराजांबद्दल नसावा अशी अपेक्षा करतो पण त्यांचेच आपल्या रिकाम्या जागेत असेल तर शिवाजी महाराज स्वार्थी कसे होते हे दहा वाक्ये लिहून संदर्भासहीत स्पष्ट करु शकाल ? आपण शिवाजी महाराजांची रयतेप्रती निष्ठा व्यवस्थीत अभ्यासली आहे का ? आपल्या प्रत्येक कृतीतून रयतेप्रति निष्ठा ठेवणार्‍या एका राष्ट्रपुरुषास आपण स्वार्थी नमेके कोणत्या आधारावर ठरवू इच्छिता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
त
तर्राट जोकर Sun, 02/14/2016 - 10:40 नवीन
ह्याबद्दल काय? http://www.thehindu.com/news/national/other-states/hindu-group-observes-republic-day-as-black-day/article8154921.ece http://timesofindia.indiatimes.com/city/meerut/Hindu-outfit-observes-Black-Day-on-R-Day-eve/articleshow/50721546.cms
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 02/14/2016 - 14:00 नवीन
तजो, गणराज्य दिन म्हणून २६ जानेवारी निवडण्यामागे बराच गोलमाल आहे. २६ जानेवारी १९३० रोजी काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा ठराव पारित केला. म्हणून स्वातंत्र्योत्तर काळी २६ जानेवारी हा दिवस गणतंत्र दिवस म्हणून जाहीर झाला. आता भारतीय प्रजासत्ताकाचा ब्रिटीशांच्या उच्चाटनाशी काहीही संबंध नाही. मग दोहोंची मोळी कशाला बांधायची? ब्रिटीशांनंतर काँग्रेसच्या हातात सत्ता आली म्हणून काँग्रेसच्या तारखेला किती महत्त्व द्यायचं? २६ जानेवारीला विरोध म्हणजे प्रजासत्ताकास विरोध नव्हे. नेमका हाच दिवस ऑस्ट्रेलियामधल्या १७८८ सालच्या ब्रिटीश आगमनाचा दिवस म्हणून ऑस्ट्रेलिया दिन असा साजरा केला जातो. काय भानगड आहे? ब्रिटनच्या दोन्ही वसाहतींचा राष्ट्रीय दिन एकंच कसा काय? हा योगायोग खचितच नाही. यावरून जपान्यांनी ब्रिटिशांपुढे शरणागती पत्करल्याचा १५ ऑगस्ट १९४५ हा ब्रिटीशांचा विजयदिन भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून नक्की केला गेल्याची आठवण होणे अपरिहार्य आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 02/14/2016 - 14:19 नवीन
Mr. Sharma, who was quite categorical in declaring that he didn't believe in Constitution of India, told The Hindu: "The purpose of my life and that of millions of people like me who are present in this country, is to make this country a Hindu Rashtra. Nobody can stop this country from becoming a Hindu Rashtra". ह्याबद्दल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 02/14/2016 - 16:38 नवीन
तजो, >> ह्याबद्दल काय? ह्यात काय सांगण्यासारखं आहे? ज्यांचा घटनेवर विश्वास नाही त्यांनी घटना सनदशीर मार्गाने बदलण्याचा प्रयत्न चालू ठेवलाय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
च
चेक आणि मेट Mon, 02/15/2016 - 09:03 नवीन
"भारत कि बर्बादी तक जंग रहेगी" "पाकिस्तान झिंदाबाद" अफजल गुरू हुतात्मा होता वगैरे वगैरे ह्याबद्दल आपले म्हणणे काय सांगा? मग त्यावर बोलू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 02/15/2016 - 09:42 नवीन
अडचणीच्या प्रश्नाला बगल देणारा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
च
चेक आणि मेट Mon, 02/15/2016 - 09:50 नवीन
same to you.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
च
चेक आणि मेट Mon, 02/15/2016 - 09:58 नवीन
अडचणीच्या प्रश्नाला बगल देणारा प्रतिसाद
मलाही असचं काही म्हणायचंय! हिंदूराष्ट्र वगैरे कूचकामी मुद्दे आहेत,त्यांची मजल संविधानाच्या/संसदेच्या वर जाणार नाही. पण संसदेवर हल्ला करणार्यांवर प्रेम करणारे आणि देशविरोधी घोषणा देणारे यांच्याबद्दल तुम्ही मत मांडले नाही याचे आश्चर्य वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 02/14/2016 - 14:21 नवीन
Bharat Rajput, district president, Hindu Mahasabha, Meerut, said, "We do not believe in the Constitution of India and have been protesting against it for the past 50 years. Secularism doesn't exist in India and that is why we mourn the Constitution. When India was divided, Pakistan was given the title of Islamic state then why was India not given the title of a Hindu Rashtra? It is this Constitution, which has failed to recognize India as a Hindu state that all of us are against."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
त
तर्राट जोकर Sun, 02/14/2016 - 14:25 नवीन
बातमीतले लोक देशाच्या घटनेच्या विरोधात घोषणा निदर्शने करतात. काळे झेंडे दाखवतात. काय भानगड आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मोगा Sun, 02/14/2016 - 14:38 नवीन
भारतीय स्वातंत्र्याचा अन संघाचाही संबंध नाही. मग मंत्रीमंडळ त्यांचे लेक्चर ऐकुन का हलते ? काँग्रेसमुक्त लंडनात आता सुखात रहा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मोगा Sun, 02/14/2016 - 11:54 नवीन
आम्ही भारत पाक युद्ध / देशद्रोह वगैरे काय मानत नै . हस्तिनापुरनं इंद्रप्रस्थाला गिळायचं की यानी त्याना , हे त्यांचं त्यानी ठरवावं. अखंड हिंदुस्तान , अखंड पाकिस्तान , अखंड बुद्धस्थान ..... अखंड रिपब्लिकस्तान इ इ .... सोक्षमोक्ष लावा एकदाचा..... जनतेला त्रास कशापै ? हनुमंतप्पा काय नि कसाब काय नि मेमन काय ..... सगळे फुक्कट मेले.... आमची सर्वानाच सहानुभूती आहे.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sun, 02/14/2016 - 12:33 नवीन
हनुमंतप्पा काय नि कसाब काय नि मेमन काय ..... सगळे फुक्कट मेले.... आमची सर्वानाच सहानुभूती आहे.
हे प्रचंड खटकलं हनुमंतप्पा आणी कसाबला एकाच पारड्यात तोलनं . काय चाल्लय काय ? एक व्यक्ती जी की भारतीय सैन्यात जायची अवघड परीक्षा पास करून , त्याहीपेक्षा अवघड ट्रेनिंग घेऊन तुमच्या माझ्यासारख्या लोकांची रक्षा करण्यासाठी इतक्या प्रतिकूल परिस्थितीत तैनातीत होते ती व्यक्ती . अन् ज्या व्यक्तीने दुसऱ्या देशात जाऊन शेकडो निरपराध लोकांना काहीही कारण नसताना मारून टाकलं ज्याची ती व्यक्ती दुसरीकडे . अहो काय तुलना तरी होऊ शकते काय ? एका व्यक्तीचे निधन झाले. त्या व्यक्तीला मेल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात अन् एका व्यक्तीला शिस्तबद्ध रीतीने खटला चालवून फाशी दिली जाते , त्या व्यक्तीचा मृतदेह पण त्या देशाची सरकार घेत नाही . अशा दोन व्यक्तींची तुलना कशी काय करू शकता तुम्ही ? खरंच आता सांगणार तरी काय ? मोगासाहेब, तुम्हाला नेमकं अपेक्षित तरी काय आहे? भारतातच रहात असता का आपण ? जाऊद्या सभ्यतेच्या पडद्याआडून यापेक्षा जास्त नाही लिहीता येणार मला ! भारतात असे पण लोक आपले विचार पण मांडू शकतात यातच भारत किती सहिष्णु आहे ते दिसून येतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
ब
बेकार तरुण Mon, 02/15/2016 - 03:42 नवीन
मोगाजी, तुम्ही हा प्रतिसाद देताना रागाचीच पातळी गाठलीत ते पण मोदी विरोध करायचा हे ठरवुन पुढच सगळ बोलतात (जे बोलतात ते बरोबर का चूक हे ही भान नसते, भान असते ते फक्त आपण बोलत आहोत ते मोदी विरोधी आहे का नाही याचे) तसाच निर्बुद्ध आणी अतिशय विकृत प्रतिसाद आहे हा तुम्ही कोणाचीही बाजु घ्या, कितीहि विचार करा पण निरागस लोकांवर क्रुरपणे गोळ्या चालवणारा आणी तुमच्या आमच्या सारख्या लोकांची सुरक्षेसाठी आणि देशासाठी अशक्य अवघड परिस्थीतीत लढणार्‍या जवानाची तुलना करणेहि अतिशय कोत्या मनोवृत्तीचे द्योतक आहे. भयंकर वाईट वाटले आपला प्रतिसाद वाचुन. तुम्हास तुमचे मत आहे, त्याचा आदरहि आहे, पण म्हणुन ईतरांचा विषेशतः जवानांच्या बलिदानाचा अनादर करु नये हि विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 02/14/2016 - 13:44 नवीन
मोगा शहिदाची विटंबना करु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 02/14/2016 - 14:05 नवीन
हनुमंतप्पा काय नि कसाब काय नि मेमन काय ..... सगळे फुक्कट मेले.... आमची सर्वानाच सहानुभूती आहे. या एका वाक्यातच विचारसरणीची प्रत कळून येते ! "पहिल्या शूर वीराने तुमच्या-आमच्या संरक्षणाचे काम करताना आपले बलिदान दिले आणि इतर दोन्हीं भेकडांच्या कारवायांत कर्मधर्मसंयोगाने तेथे हजर असतो तर तुम्ही-आम्ही कोणीही बळी पडू शकलो असतो"... इतकेही भान (सु?)शिक्षित म्हणवणार्‍याने ठेवले नाही तर अवस्था शोचनिय आहे आणि शुभेच्छांची नक्कीच गरज आहे ! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
म
मोगा Sun, 02/14/2016 - 14:35 नवीन
अफगाण ते शीलंका सर्व लोक एकाच प्रदेशाचेच आहेत. कुणीही युद्धात मरु नये. कोणच्ञाच देशाचा. आनंदात सर्व १०० वर्षे जगोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
उ
उगा काहितरीच Sun, 02/14/2016 - 15:02 नवीन
तुम्ही म्हणताल हो , "हे विश्वची माझे घर " वगैरे . आम्ही नाहीत ना तेवढे थोर. "आमच्या" (मानत असले तरच "आपल्या") देशात येऊन शेकडो लोकांचा बळी घेणाऱ्या व्यक्तीची तुलना आमच्या देशातल्या शहिदासोबत तुलना नाही चालत ना आम्हाला . हवे तर म्हणा आम्हाला संकुचित !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
भ
भंकस बाबा Sun, 02/14/2016 - 19:05 नवीन
पाजी माणूस आहात. ज्याला शहीद आणि अतिरेकी यातील फरक कळत नसेल तर थू त्याच्या जिंदगानिवर, आयडिला पंख लागले तरी चालेल पण या माणसाचा निषेध करताना मी यापुढे तारतम्य बाळगणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
ह
होबासराव Mon, 02/15/2016 - 10:08 नवीन
आम्हि एक दोन वेळा तसा प्रयत्न केला आहे पण्..असो...इग्नोर मारो..घाणित दगड माराल तर ति आपल्यावरच उडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
स
सुबोध खरे Mon, 02/15/2016 - 10:17 नवीन
एक इंग्रजीत म्हण आहे डूकराबरोबर चिखलात कुस्ती खेळू नये. थोड्या वेळाने आपल्या लक्षात येते कि आपले कपडे घाण होतात आणि डुकराला तर मजा येते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
न
नाना स्कॉच Mon, 02/15/2016 - 10:24 नवीन
पोकळ बांबुचे वगैरे वगैरे वगैरे ! लै काय काय डोक्यात आले होते पण ह्यांची तितकीही लायकी नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
स
सुबोध खरे Mon, 02/15/2016 - 10:44 नवीन
हनुमंतप्पा काय नि कसाब काय नि मेमन काय ..... सगळे फुक्कट मेले.... आमची सर्वानाच सहानुभूती आहे. मोगा जी १८००० फुटावर -५० से तापमानाला "दोन" तास राहून पहा. आणि मग अशी मुक्ता फळे उधळायचा विचार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
म
माहितगार Mon, 02/15/2016 - 19:30 नवीन
आम्ही भारत पाक युद्ध / देशद्रोह वगैरे काय मानत नै ....जनतेला त्रास कशापै ?...आमची सर्वानाच सहानुभूती आहे.
@ मोगा, राजकारण कदाचित विरोधीपक्षावर टिकाही करावी, तुम्हाला मोदी किंवा भाजपा आवडत नसेल तर तुम्ही त्यांच्यावर टिका करण्यास स्वतंत्र आहात. जनतेला होणार्‍या त्रासाची आपल्याला खरेच चिंता असेल तर आपण जनतेच्या सुरक्षिततेची काळजी घेऊ इच्छित देश या संकल्पनेच्या विरोधी असणार नाही. वसुधैव कुटूंबम सर्वांनाच हवे आहे, समानतेच्या तत्वावर सगळे विश्व एकत्र येण्यास तयार असेल, भारतीयांच्या लेजिटीमेट हितांची न्याय्य काळजी घेतली जाणार याची व्यवस्थित खात्री झाल्यास भारतीय नक्कीच एक पाऊल इतरांच्या पुढे टाकतील पण जो पर्यंत तशी खात्रि नाही तो पर्यंत भारतीयांच्या हिताची काळजी घेण्यास देश हि संकल्पना महत्वाची राहते, भारतीयांच्या लेजिटीमेट न्याय्य हिताची काळजी घेण्याच्या मध्ये जे अडथळे असतील ते देश विरोधी असू शकतील, त्यामुळे जनतेला त्रास देशविरोधी गतीविधींमधून होतो. २६/११ ला आपण व्हिटी स्टेशन वर कसाबच्या समोर असता तर ? आपण आपल्या विचारांचे असे प्रदर्शन करू शकला असता काय ? किंवा २६/११ला तुमच्या कुटुंबातील एखादी प्रिय व्यक्ती कसाबच्या गोळीचा शिकार झाली असती तरीही तुम्हि हेच लिहिले असते का ? या प्रश्नांचे उत्तर इथे कुणालाही आजीबात देऊ नका उत्तरे देण्याच्या फंदात पडू नका हे प्रश्न स्वतःच्या मनाला शांतपणे विचारा तेवढे पुरेसे असेल. देशवासीयांना सुखाची झोप मिळावी म्हणून देशाच्या सिमेवर स्वतःचा प्राण लावणारा हनुमंतप्पा आणि बाकी भारतीय सैनिक आणि कसाब यांची आपण केलेली तुलना अत्यंत बेजबाबदारपणाची नाही का हे एकदा स्वतःच्या विचारांमधील द्वेषभावना बाजूला ठेऊन रिव्हिजीट करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
स
सुबोध खरे Mon, 02/15/2016 - 19:36 नवीन
माहितगार साहेब, कशाला आपली उर्जा फुकट घालवताय ? मराठीत म्हण आहे शहाण्याला शब्दाचा मार आणि …। असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
स
सतीश कुडतरकर Tue, 02/16/2016 - 11:27 नवीन
मोगा, निर्बुद्धीची हद्द केली आहे तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
आ
आरोह Sun, 02/14/2016 - 14:58 नवीन
अशा फुटकळ आणि फालतू प्रतिसादांना प्रतिवाद करून काय उपयोग. नसता शक्तिपात.. पप्पू च्या बौद्धिक दिवाळखोरी बद्दल नवीन काय बोलणार... आणि डावे ..त्यांचे तर सगळे तत्वज्ञानच वेगळे... आपल्या देशात लोकशाहीचा डोस जरा जास्तच झालाय असे खेदाने म्हणावेसे वाटते. आणि उरलेली कसर मीडिया भरून काढते.
  • Log in or register to post comments
ओ
ओल्ड मोन्क Mon, 02/15/2016 - 06:25 नवीन
या सर्व प्रकरणाची अजून एक बाजू आजच्या लोकसत्ता तील अग्रलेखात मांडली आहे. त्यातील खालील मुद्दा महत्वाचा वाटतो … http://www.loksatta.com/aghralekh-news/police-arrest-jnu-students-union-president-kanhaiya-kumar-3-1202472/ भारतविरोधी घोषणा दिल्या म्हणून या सर्व विद्यार्थ्यांवर सरकारने राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला. परंतु त्यातून केंद्रीय गृहमंत्र्यांचे अज्ञानच प्रगट झाले. याचे कारण १९६२ साली सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वाच्या निकालात राष्ट्रद्रोह म्हणजे राष्ट्रविरोधी कृती, केवळ शब्द नव्हेत असे नि:संदिग्धपणे स्पष्ट केले आहे. याचा अर्थ एखाद्याने देशाविरोधात भाषण केले, घोषणा दिल्या वा सरकारवर टोकाची टीका केली तर तो राष्ट्रद्रोह होत नाही. असे करणाऱ्याची कृतीदेखील तशी असावी लागते. पुढे २०११ साली एप्रिल महिन्यात विनायक सेन प्रकरणात ही बाब सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा स्पष्ट केली. नक्षलवादी तत्त्वज्ञान आणि नक्षलवादी यांच्याविषयी सहानुभूती बाळगली म्हणून सेन यांच्यावर सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. तो सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही आणि सेन यांना मुक्त करावे लागले. ‘आपण लोकशाही व्यवस्थेत राहतो. सेन हे नक्षलवादी तत्त्वज्ञानाचे समर्थक असतीलही, परंतु म्हणून ते देशद्रोही ठरत नाहीत’, असे सर्वोच्च न्यायालयाने त्या वेळी सरकारला सुनावले. त्याचमुळे याही वेळी विधिज्ञांनी सरकारला धोक्याचा इशारा दिला असून जेएनयूतील विद्यार्थ्यांची कृती देशद्रोह ठरत नाही, असे स्पष्ट केले आहे. सरकारने त्यांचे तरी ऐकावे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 02/15/2016 - 08:26 नवीन
ओल्ड मोन्क, भारतविरोधी घोषणा देणे हे प्रक्षोभक भाषण करण्यासम आहे. त्या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा आरोप लावता येत नसला तरी प्रक्षोभक भाषणासाठी अटक करता येईल. किंबहुना तशीच झालेली दिसतेय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ओल्ड मोन्क
न
नाना स्कॉच Tue, 02/16/2016 - 03:52 नवीन
कलम १५३-A लागले आहे की नाही ते कन्फर्म करायला लागेल पण मुख्य कलम बहुतांशी कलम १२४-A आहे असे प्रथमदर्शनी वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
न
नाना स्कॉच Mon, 02/15/2016 - 09:15 नवीन
मित्रपक्ष पीडीपीचे म्हणणे एकंदरित असे आहे ह्या बाबतीत तेव्हा अफज़ल गुरुची फाशी म्हणजे विडंबना (travesty) आहे असे मानणाऱ्या पक्षा सोबत सरकार ने राहु नये असे एक भारतीय म्हणून मला वाटते, अन असेच झाले तर बीजेपी च्या जम्मू मधील हक्काच्या सीट्स सुद्धा जातील हे नमूद करावे वाटते. शिवाय आजचा गिरीश कुबेर ह्यांचा अग्रलेख वाचता, पीडीपी ला एक न्याय अन जेएनयु च्या पोरांना एक न्याय जर सरकार लावणार असेल तर ह्या कुबेरी हलकट वृत्तीला जाब विचारायचा नैतिक अधिकार मी गमावून बसेल ही भीती वाटते असो!
  • Log in or register to post comments
च
चेक आणि मेट Mon, 02/15/2016 - 09:31 नवीन
स्वतःला भारताचा भाग न माणणारे तथाकथित काश्मिरवासीयांना/पक्षांना अफजल गुरूची फाशी ही विडंबना आहे हे वाटणे स्वाभिवकच आहे. आणि राहिला प्रश्न अशा पक्षाबरोबर सरकारने राहण्याचा,तर तो काश्मिरमध्ये पाय पसरण्याचा भाजपचा कूटनितीक डाव आहे.
पीडीपी ला एक न्याय अन जेएनयु च्या पोरांना एक न्याय जर सरकार लावणार असेल तर ह्या कुबेरी हलकट वृत्तीला जाब विचारायचा नैतिक अधिकार मी गमावून बसेल ही भीती वाटते
कलम 370 बद्दल आपले काय म्हणणे आहे? ते उठवण्याचा प्रयत्न याच सरकारने केला.पण तो होऊ दिला नाही.कोणी होऊ दिला नाही बरे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
क
कपिलमुनी Mon, 02/15/2016 - 09:46 नवीन
इतरांची ती शय्यासोबत आणि भाजपची कूटनिती ! पीडीपीचे धोरण आणि अफझलला सपोर्ट सर्वांना माहिती आहे. त्याबद्दल चकार शब्द न काढता इकडे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे दुटप्पी आहे. या विद्यार्थांना अटक झाली हे योग्य ! आणि शिक्षाही व्हायलाच हवी. फक्त भाजपाने नैतिकतेचे ढोंग बंद करावे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
च
चेक आणि मेट Mon, 02/15/2016 - 10:22 नवीन
या विद्यार्थांना अटक झाली हे योग्य ! आणि शिक्षाही व्हायलाच हवी.
याबद्दल धन्यवाद.
इतरांची ती शय्यासोबत आणि भाजपची कूटनिती ! फक्त भाजपाने नैतिकतेचे ढोंग बंद करावे .
सहमत.
त्याबद्दल चकार शब्द न काढता इकडे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे दुटप्पी आहे.
काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा आणि JNU या दोन प्रकरणांची तुलना योग्य नाही. त्यासाठी काश्मिरच्या मुद्द्याचा अभ्यास हवा.तो पूर्ण विषय संवेदनशील आहे.नकाशामध्ये दाखवण्यापुरताच काश्मिर भारताचा अविभाज्य भाग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा