Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डेविड हेडलीची साक्ष,JNU, आणि ढोंगी फेक्युलर

च
चेक आणि मेट
गुरुवार, 02/11/2016 - 06:31
🗣 331 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, (पहिल्यांदाच लिहतोय त्यामुळे बारीकसारीक त्रुटींकडे दुर्लक्ष करा.) तर मुद्दा असा कि, डेविड हेडलीची साक्ष वगैरे घेण्याचं काम सुरू आहे,आणि त्याने एक मोठा खुलासा केला आहे कि इशरत जहां ही सुसाईड बाॅम्बरच होती.ती लष्कराची महिला आतंकवादी होती. तर इशरत प्रकरणावरून पूर्वी बराच वाद झाला होता,त्यामध्ये गुजरात पोलिस आणि मोदी,शहांच्या नावाने बरेच स्वयंघोषित सेक्युलर खडे फोडत होते.तथाकथित ढोंगी सेक्युलर म्हणत होते कि ती निर्दोष होती म्हणे!!! दुसरा मुद्दा असा कि JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीमध्ये ते वामपंथी का काय ते विद्यार्थ्यांनी म्हणे काश्मिरच्या स्वातंत्र्याबद्दल कार्यक्रम घेतला आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. तर मला असे म्हणायचे कि जे राष्ट्रीय संवेदनशील मुद्दे आहेत त्या मुद्यांना हात घालायची खाज या अति लिबरल विद्यार्थांना का सुटते म्हणे?? आता हे सगळं लिहल्यावर काहीजण मला मोदीभक्त म्हणतील.पण असो दुर्लक्ष करणे. तर हे दोन महत्वाचे मुद्दे मी मांडले आहेत,अजून अशा बर्याच गोष्टी सांगता येतील कि जिथे तथाकथित सेक्युलरांचा ढोंगीपणा उघडा पडतो. तिकडे हाफिज सईदने ट्वीट करून त्या JNU च्या पाकप्रेमींना पांठिबा दर्शविला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का?? (सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??)
वर्गीकरण
राष्ट्रीय राजकारण

प्रतिक्रिया द्या
59550 वाचन

💬 प्रतिसाद (331)
म
मोगा Mon, 02/15/2016 - 12:07 नवीन
मी नथुराम ..... नाटक कायमचे बंद होणार ..... आजचा मटा.
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Mon, 02/15/2016 - 12:33 नवीन
ब्वार्र, पुढे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
ह
होबासराव Mon, 02/15/2016 - 12:11 नवीन
चला आता तुमचे आणि तुमच्या मांजरिचे दोघांचेहि भले होणार....दोघांनाहि जंता चा त्रास होता ना..तो बरा होणार.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 02/15/2016 - 13:46 नवीन
भाजपा आमदाराची कोर्टाच्या आवारात मारहाण ! पत्रकार, विद्यार्थी , विरोधी नेते अशा सर्व देशद्रोह्यांना धडा शिकवला आहे. कायद्यावर विश्वास नसल्याने स्वतःच कोर्टाच्या आवारात जाउन न्यायदान केले आहे ! जय हो !
  • Log in or register to post comments
च
चेक आणि मेट Mon, 02/15/2016 - 14:06 नवीन
कोणीही कायदा हातात घेऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सुनिल जोग Mon, 02/15/2016 - 16:00 नवीन
हेडली चा सारा जबाब जेव्हा अमेरिकेत साक्श दिलि तेव्हा वेब्साईट वर उप्लब्ध होता.ंमी तो वाचला आहे. त्यात त्याने इत्यंभुत माहिती दिलि होति - मुम्बईत रेकि कशि केलि, कुथे रुम्/ हॉटेल घेतलि वगैरे. आता आपन फक्त पोस्ट्मार्तेम करतोय जुन्या मढ्याचे . गिधाडाना ताजे मास चालत नसते. त्याना शिळेच आवडते कारन तेच पचते. असो तेव्ह्ढाच मेडियाचा टिआर्पी तर वाधेल. आणि निकम साहेबाना पुधच्यावर्शी एक पद्मश्री पक्कि. हा हा हा
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Mon, 02/15/2016 - 16:22 नवीन
ह्याच वर्षीचे पद्मश्री त्या साठी असेल,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनिल जोग
प
प्रदीप साळुंखे Mon, 02/15/2016 - 18:38 नवीन
"अफजलगुरू"जी म्हणे!!! . . काँग्रेस प्रवक्त्यांचं मुक्ताफळ! . देशद्रोह्यांना श्री,जी,साहब,अशी विशेषणे लावण्याचे काम काँग्रेसने घेतले आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 02/15/2016 - 18:44 नवीन
- ओसामा बिन लादेनला मारल्यानंतर दिग्विजय सिंगांनी त्याचा उल्लेख 'ओसामाजी' असा आदरपूर्वक करून ज्या पद्धतीने अमेरिकेने समुद्रात त्याच्या मृतदेहाची वासलात लावली त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. - सुशीलकुमार शिंदे यांनी संसदेत हाफिज सईदचा उल्लेख श्री. हाफिज सईद व हाफिज सईद साब असा आदरपूर्वक केला होता. - रणदीप सुरजेवालाने अफझल गुरूचा उल्लेख अफझल गुरूजी असा आदरपूर्वक केला. देशद्रोही व दहशतवादी हे नेहमीच काँग्रेस नेत्यांसाठी वंदनीय व आदरणीय राहिलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
त
तर्राट जोकर Mon, 02/15/2016 - 22:04 नवीन
कन्हैय्या कुमार (देशद्रोही) याचे संपूर्ण भाषण अटक होण्याअगोदर. अटकेचे कारण हे भाषण असेल तर भारतात अघोषित आणीबाणी लागु झाली आहे असे समजायचे का>
  • Log in or register to post comments
च
चेक आणि मेट Tue, 02/16/2016 - 04:07 नवीन
अटकेचे कारण हे भाषण असेल तर भारतात अघोषित आणीबाणी लागु झाली आहे असे समजायचे का>
तुम्हाला कोणी सांगितलं अटकेचं कारण हे भाषण आहे म्हणून? हा विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे आणि आंदोलन करताना देशविरोधी घोषणाबाजी झाली,त्यामुळे नैतिक जबाबदारी अध्यक्षाचीच येते,एवढं कारण पुरेसं आहे ताब्यात घ्यायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 02/16/2016 - 08:31 नवीन
डांगे....?????? बरे आहात ना चेकमेट? स्वतः डुआयडी असल्याने सगळेच डु आयडी आहेत असं वाटायला लागलंय काय? विशेषतः एकाच (विशिष्ट) विचारसरणीचे लोक? मुद्दे नसतात तेव्हा असल्या गप्पा सुचतात लोकांना, नवीन नाही ते. मिपा अ‍ॅडमिन-संपादक. कृपया ह्या आयडीला समज द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
क
कपिलमुनी Tue, 02/16/2016 - 08:41 नवीन
कैचा कै अपेक्षा तुमच्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
च
चेक आणि मेट Tue, 02/16/2016 - 08:55 नवीन
मुद्दे नसतात तेव्हा असल्या गप्पा सुचतात लोकांना, नवीन नाही ते.
Good Joke
काय? विशेषतः एकाच (विशिष्ट) विचारसरणीचे लोक?
Better joke
मिपा अ‍ॅडमिन-संपादक. कृपया ह्या आयडीला समज द्यावी.
Best joke उलटा चोर कोतवाल को डाटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 02/16/2016 - 08:58 नवीन
yes. I am a joker. and you are crafted nuisance.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
त
तर्राट जोकर Wed, 02/17/2016 - 20:57 नवीन
@चेकमेट, तुमचे वाक्य बदलून घेतो, लॉजिक समजायला सोपे जाईल. हा माणुस राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि दंगे घडतांना निरपराधांची कत्तल झाली,त्यामुळे नैतिक जबाबदारी मुख्यमंत्र्यांचीच येते,एवढं कारण पुरेसं आहे ताब्यात घ्यायला. पण मुख्यमंत्र्याला चौकशी समित्या बसवून आपली बाजू मांडण्याची संधी दिल्या गेली, कन्हैयाला मात्र कोर्टात जायच्या आत फटके बसले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
ग
गामा पैलवान गुरुवार, 02/18/2016 - 08:51 नवीन
तजो, कोणालाही ताब्यात घेण्यासाठी गुन्ह्यात प्रथमदर्शनी सहभाग असणे हे महत्त्वाचे असते. या निकषावर नमो आणि ककु यांची बरोबरी होऊ शकत नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
न
निनाद मुक्काम … Fri, 03/04/2016 - 22:46 नवीन
अहो अजून कोर्टात कनैह्या विरूध चार्ट शिट दाखल व्हायची आहे तेव्हा कोणत्या आधारावर दिल्ली पोलिसांनी त्याला आत टाकले आणि त्यांच्याकडे त्याच्या विरोधात काय पुरावे आहेत ह्या बाबत काहीही माहिती कुणालच नसतांना काही लोक सोयीस्कररीत्या फक्त विडीयो च्या आधारावर त्याची अटक झाली असा निष्कर्ष काढून मोकळी झाली . असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
व
विटेकर Tue, 02/16/2016 - 09:58 नवीन
अटकेचे कारण हे भाषण असेल तर भारतात अघोषित आणीबाणी लागु झाली आहे असे समजायचे का>
खिक्क ! समजा हो , खुषाल समजा ! केन्द्रात सत्ताबदल झाल्याने अनेकांचा बाजार उठला आहे , नुसत्या आणिबाणी चे काय घेऊन बसलात ? होऊन जाऊ दे , काढा एक नवीन धागा -
देशात आणिबाणी सुरु झाली आहे का ?
शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 02/17/2016 - 21:17 नवीन
तुम्ही आता हसणारच. हेच इंदिराबाईंनी केले तेव्हा छाती पिटत होते लोक. जे लोक संघविरोधी आहेत त्यांना विनाकारण जेलमधे टाका, जे खरे देशद्रोही आहेत त्यांच्याशी सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसा. अशा वातावरणात जगायचे तर शुभेच्छांची गरज आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
र
रॉजरमूर गुरुवार, 02/18/2016 - 23:03 नवीन
हा भिकारचोट कान्ह्याया महिला आरक्षण खाजगी क्षेत्रातील आरक्षण याविषयी बोलताना संघाला दोष देतोय याला मुलायमसिंग लालूप्रसाद दिसले नाही काय ज्यांनी ते बिल रखडवले .मुलायम आणि लालू तर महिलांना आरक्षण देण्याच्या विरोधातच आहे भाषा तर मायावतीची बोलतोय मनुवादी मनुवादी बोंबलतोय . ६० वर्षात कॉंग्रेस चे पाप नाही दिसले . जणू १ वर्षात या सरकारनेच व्यवस्था बदलली . जातीयवाद तर याच्यातच ठासून भरलेला आहे ब्राह्मणद्वेष सावरकरांबद्दल द्वेष तर भलताच दिसतोय या हल्कटला . १२४ (अ) हे संपूर्णपणे लागू होतेय याला त्याने उघड उघड आव्हानच दिलेय सरकारला भाषणामध्ये . वर अजून कसाब ला आणि अफजल ला स्पष्टपणे जस्टीफाय करतोय तो . कसला लाल सलामाची भाषा करत आहे . काय आहे ते रक्तरंजित क्रांती आणायचीय ? असे असेल तर सोराबजी पण तोंडघशी पडेल मग . शेवटी त्याने अंतस्थ हेतू उघड केलाच पुढच्या वर्षी निवडणुका आहेत विद्यापीठाच्या या गोष्टीचे भांडवल करून तोफांड करून त्याला प्रसिद्धी मिळवायचीय . नेतागिरी करण्यासाठीचा खटाटोप ,जो या बिहारी यु पी वाल्यांचा आवडता उद्योग आहे . दुर्दैव हे की असल्या हरामखोरांचे समर्थन इथले काही आय डी निर्लज्जपणे करत आहेत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
न
निनाद मुक्काम … Tue, 02/23/2016 - 02:01 नवीन
हीच गंमत आहे सोयीनुसार सगळ्यांनी अटकेसाठी हे भाषण आहे असे स्वताचे स्वताच वाटून घ्यायचे तसे असते तर मोदींना अभद्र शब्द बोलणारा केजू तुरुंगात असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 02/23/2016 - 06:05 नवीन
हा हा. सोयीनुसार विचार करण्याची हिच गम्मत आहे. केजरीला हात लावू नाही शकत, लहान मुलांना दमदाटी करु शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
न
नाना स्कॉच Tue, 02/16/2016 - 10:48 नवीन
आम्ही स्वतः मोदींचे तुफान फॅन आहोत!!. नोकरशाही कडून काम करवुन घेणारा तो द्रष्टा नेता आहे एक. ती तड़फ तो वेग सर्वोत्तम आहे! फ़क्त हल्ली भक्तमंडळी डोक्यात जाते खुप. त्यांची चाय से केटली गरम वृत्तीच मोदींपुढला खरा धोका असल्याचे वाटते. बरेच दिवस अगोदर मोदींनी स्वतः भक्तांना "सोशल मीडिया वर बोलताना तारतम्य बाळगा, तोल ढळू देऊ नका" असे सांगितले होते. पण उन्मादी भक्त ते ही ऐकेना झालेत. काँग्रेसची शष्प औकात नाहीये आता उभी रहायची पण टंगड्या ओढायला आता गिरिराज सिंह अन आदित्यनाथ सारखी अंतस्थ माणसे अन बाहेर उन्मादी भक्त सज्ज आहेत! विरोधक तो मोदी खुद ख़त्म कर देंगे बस प्रभु उन्हें अपने कुछ सांसद और भक्तोंसे बचाएं! असो!.
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Tue, 02/16/2016 - 10:57 नवीन
नाना तुमच्या सगळ्या प्रतिसादाशि सहमत फक्त विरोधक तो मोदी खुद ख़त्म कर देंगे हे सोडुन. एक मजबुत विरोधि पक्ष तर लागतोच अंकुश ठेवायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Tue, 02/16/2016 - 12:05 नवीन
खरे आहे तुमचे! पण असा विरोधीपक्ष कोण असणार?? माणसाचे मन बेटे फारच बेक्कार असते होबासरावजी, सत्ता सद्धया मोदी सोडुन दूसरे काहीच ऑप्शन नाहीये, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ सत्य आहे. फ़क्त ऑप्शन नाही हे त्यांना कळाल्यावर जर त्यांचे डोके फिरले (शक्यता शुन्य. एक अब्ज शुन्य एक इतकी धरता) तर देशाचे होत्याचे नव्हते होईल. सुदृढ़ जनतंत्र चालवायचे तर चेक्स एंड बॅलन्स चा तराजु हवाच, तुर्तास मात्र एक कर भरणार नागरिक ह्या रूपाने मला मात्र मोदी मोदी अन फ़क्त मोदी इष्ट वाटत आहेत हे खरे. अन त्या करा ची शपथ सांगतो, हा फेब्रुअरी महीना आहे बॉस, बजेट सत्र येते आहे, ते जेएनयु हेडली वगैरे सगळे कॅन वेट प्रथम पुर्ण लक्ष बजेट वर हवे, सामान्य माणुस आहे मी, अन घामाचा पैका कसा जाणार किंवा बचत होणार ह्याची निती जास्त महत्वाची आहे मला. बाकी सगळे चालत राहणार , हा फेब्रुअरी आहे अन बजेट महत्वाचे आहे. असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
व
विनायक पन्त Fri, 02/19/2016 - 06:31 नवीन
मी कधी कधी विचार करतो कि आपले सीमेवरचे जवान किती सहनशील आणि थंड डोक्याचे आहेत कि हे सर्व जे देशात चाललेय ते बघून त्यांना आपल्या बंदुका आतल्या दिशेने वळवाव्या वाटत नाहीत! असा विचार ते करत नाहीत कि या अशा लोकांच्या संरक्षणार्थ आपण इथे जीवाची बाजी लावून उभे आहोत! Shame on these ba****ds!!!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 02/19/2016 - 06:45 नवीन
पंत साहेब असे विचार अनेक वेळेस माझ्या मनात आले होते. एक उदाहरण देत आहे. मी विक्रांत वर असताना जहाजाच्या मागच्या भागात श्री देवीलाल उप पंतप्रधान म्हणून आले होते. त्यांनी विक्रांतच्या हँगर मध्ये ठेवलेले विमाने ओढण्याचे tractor पाहिले आणी विचारले इथे शेती होत नाही तर या tractor वर खर्च कशाला. त्यांना नम्रपणे त्याचे कारण सांगितले गेले . नंतर त्यांच्या सन्मानार्थ जहाजाच्या क्वार्टर डेक वर मेजवानी ठेवली होती.हा भाग जहाजाच्या सर्वात मागे आणि फ्लाईट डेक च्याखाली असतो आणि तीन बाजूना समुद्र असतो.नौसैनिकांनी अर्धा दिवस खपून तो भाग स्वछ करून रंगरंगोटी करून सजवला होता. याच्या मध्यभागी एक फ्लाईट डेक च्या आधारासाठी लोखंडी खांब असतो. या खांबाला सजावट म्हणून निळे आणि पांढरे सुंदर कापड गुंडाळले होते. श्री देवीलाल यांनी पान खाऊन त्या सुंदर कापडावर "कोपरा" म्हणून आपली थुंकी टाकून त्याची माती केली. तीन बाजूना उघडा समुद्र होता आणि सर्व कोपर्यात कचर्याच्या कुंड्या ठेवलेल्या असतानाहि यांना अशी बुद्धी झाली.ते पाहून मला त्या मेजवानीतून निघून जावे असेच वाटले. दुर्दैवाने जहाजाचा मी एकटाच डॉक्टर होतो त्यामुळे तसे करणे मला नियमांमुळे शक्य नव्हते. यावर अनेक नौ सैनिकांनी त्याबद्दल आपली नाराजगी खाजगीत बोलून दाखविली. हि घाण नौसैनिकांना नंतर स्वतः साफ करावी लागली. स्वच्छतेचे किमान धडे सुद्धा यांनी गिरवलेले नसावेत याचे आश्चर्य वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पन्त
व
विनायक पन्त Fri, 02/19/2016 - 07:52 नवीन
सुबोध जी, असे लोक Dy PM होतात यासारखे दुर्दैव ते कोणते! बाकी सर्व आनंदच आहे! असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गामा पैलवान Fri, 02/19/2016 - 08:06 नवीन
डॉक्टर साहेब, श्री. देवीलाल यांच्या नवलकथा वाचून मन कसं प्रसन्न झालं. अशी माणसे ही आपल्या लोकशाहीची अमूल्य देणगी आहे. याचा आपणांस अजिबात विसर पडता कामा नये. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
न
नाखु Fri, 02/19/2016 - 09:41 नवीन
प्रत्येकाला व्यक्त (त्याला हवे त्या प्रकारे) होण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. ती अभिव्यक्ती (अगदी उप पंतप्रधानांना )प्रगट न करू देणे किंवा तीला दिशा देणे ही असहिष्णुता झाली. स्वातंत्र्य मिळालेल्या भारतातला स्व तंत्र नागरीक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
माहितगार Fri, 02/19/2016 - 10:11 नवीन
प्रत्येकाला व्यक्त (त्याला हवे त्या प्रकारे) होण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. ती अभिव्यक्ती (अगदी उप पंतप्रधानांना )प्रगट न करू देणे किंवा तीला दिशा देणे ही असहिष्णुता झाली.
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
म
माहितगार Fri, 02/19/2016 - 10:10 नवीन
:(
स्वच्छतेचे किमान धडे सुद्धा यांनी गिरवलेले नसावेत याचे आश्चर्य वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ट
टवाळ कार्टा Fri, 02/19/2016 - 10:16 नवीन
नशीब खांब बघून फक्त पचकले =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विकास गुरुवार, 03/03/2016 - 17:14 नवीन
शिंद्यांची मुलाखत... तत्कालीन गृहमंत्री म्हणतात की एन आय ए काय करत होते ते मला माहीत नव्हते (हेडलीची चौकशी केली जात होती).
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/04/2016 - 16:00 नवीन
आता ते काखा वर करणारच. २००५-०६ मध्ये ते आंध्रप्रदेशचे राज्यपाल असताना खुनाबद्दल जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका कॉंग्रेस कार्यकर्त्याची त्यांनी आपला अधिकारात मुक्तता केली होती. त्याविरूद्ध खून झालेल्या व्यक्तिचे कुटुंबीय न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने शिंद्यांवर ताशेरे ओढून त्याची मुक्तता रद्द करून त्याला परत तुरूंगात पाठविले होते. त्यावर पत्रकारांनी विचारल्यावर, "न्यायालयाच्या निर्णयावर मला काही बोलायचे नाही" असे विधान करून त्यांनी काखा वर केल्या होत्या. २००१-२००२ च्या सुमारास सोलापूरमधील काही मुस्लिम कुटुंबांच्या घरात सुमारे दीडशे गावठी बॉम्बचा साठा सापडल्यावर त्यांना पोटा/रासुका खाली अटक करण्यात आली होती. २००३ मध्ये शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी लगेच त्यांच्यावरील पोटा/रासुकाचे आरोप मागे घेऊन सौम्य आरोप ठेवण्यात आले व त्यामुळे त्यांना लगेच जामीन मिळाला होता. २०१०-२०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना सनातन वर बंदी घालावी असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्रीय गृहखात्याला पाठविला होता. केंद्रीय गृहखात्याने बंदीसाठी पुरेशी सबळ कारणे नसल्याचे सांगून तो फेटाळला असे काही वृत्तपत्रात आले होते. पानसरेंच्या खुनानंतर एका सनातनच्या कार्यकर्त्याला संशयावरून अटक केल्यावर पुन्हा एकदा बंदीची चर्चा सुरू झाली. तेव्हा आपण केंद्रीय गृहमंत्री असताना असा कोणताच प्रस्ताव माझ्याकडे आला नाही असे सांगून शिंद्यांनी काखा वर केल्या होत्या. हा इतिहास लक्षात घेता वरील चित्रफितीत ते जे सांगताहेत ते अपेक्षितच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
न
नाव आडनाव Sat, 03/05/2016 - 12:39 नवीन
तुम्ही जसं दुसर्‍या परिच्छेदात लिहिलंय तसं साध्वी प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहित आणि त्यांच्या बरोबर अटक झालेल्या लोकांना सोडवता येणार नाही का? केंद्रात आणि राज्यात (जिथे मालेगावात स्फोट झाले) दोन्हीकडे भाजपा सरकार आहे आणि भाजपने या लोकांना कायमंच निर्दोष मानलेलं आहे. आणि जर तसं करता येत नसेल तर २००३ साली त्या वेळच्या विरोधी पक्षाने जामीन न मिळण्यासाठी / त्याच्या विरोधात काही केलं होतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मृत्युन्जय Sat, 03/05/2016 - 12:44 नवीन
लोकांना पकडणे आणि सोडवणे सरकारच्या हाती नसते. ते कॉर्टाचे काम काहिवेळा सूडबुद्धीने लोकांना अडकवले मात्र जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
त
तर्राट जोकर Sat, 03/05/2016 - 12:52 नवीन
लोकांना पकडणे आणि सोडवणे सरकारच्या हाती नसते. ते कॉर्टाचे काम >> तुम्ही श्रीगुरुजी जे म्हणतायत त्याला खोडताय का? काहिवेळा सूडबुद्धीने लोकांना अडकवले मात्र जाते.>> जसे कन्हय्याकुमार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Sat, 03/05/2016 - 13:20 नवीन
तुम्ही श्रीगुरुजी जे म्हणतायत त्याला खोडताय का? श्री गुर्जी काय म्हणाले ते मला माहिती नाही. वरील प्रतिसादावर मी माझे मत नोंदवले. जर त्यामुळे श्रीगुर्जींचे एखादे मत खोडले गेले असेल तर मला माहिती नाही. जसे कन्हय्याकुमार? कन्हय्याकुम्मार बद्दल असे काही वाटात नाही ब्वॉ. तो स्वतः च्या कर्मानेच अडकला आहे. पण इशरत जहा नावा च्या अतिरेक्याच्या एनकाउंटर मध्ये अनेक निर्दोष लोकांना या मार्गे अडकवायचा प्रयत्न झाला होता असे सध्या तरी निदर्शनास येते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 03/05/2016 - 13:29 नवीन
श्री गुर्जी काय म्हणाले ते मला माहिती नाही. वरील प्रतिसादावर मी माझे मत नोंदवले. >> वरिल प्रतिसाद कशासंदर्भात आहे ते तुम्हाला माहित नाही? वॉव. ज्यांची सत्ता असते ते कुणालाही अडकवु शकतात, सोडवू शकतात ह्यावर आपले मत काय>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
श
श्रीगुरुजी Sat, 03/05/2016 - 19:11 नवीन
तुम्ही जसं दुसर्‍या परिच्छेदात लिहिलंय तसं साध्वी प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहित आणि त्यांच्या बरोबर अटक झालेल्या लोकांना सोडवता येणार नाही का? केंद्रात आणि राज्यात (जिथे मालेगावात स्फोट झाले) दोन्हीकडे भाजपा सरकार आहे आणि भाजपने या लोकांना कायमंच निर्दोष मानलेलं आहे. आणि जर तसं करता येत नसेल तर २००३ साली त्या वेळच्या विरोधी पक्षाने जामीन न मिळण्यासाठी / त्याच्या विरोधात काही केलं होतं का?
(१) त्यांना २००३ मध्ये पकडले नव्हते. त्यांना ऑक्टोबर २००८ मध्ये पकडले आणि तेव्हापासून ते आजतगायत विनाजामीन तुरूंगात आहेत. (२) त्यांच्यावरील गुन्ह्याची नोंद कागदोपत्री दाखल केली असल्याने आता त्यांच्यावरील खटला काढून टाकता येणे शक्य नाही. न्यायालयात खटला चालल्यानंतरच निकाल लागेल. (३) त्यांच्यावर मकोका लावल्याने व मकोकाखालील गुन्हे अजामीनपात्र असल्याने त्यांना जामीन मिळू शकत नाही. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला असा निर्णय दिला आहे की मकोकाचा विचार न करता त्यांना जामीन मिळू शकतो का यावर निर्णय द्या. याचा निर्णय नजीकच्या भविष्यकाळात लागेल. (४) सद्यपरिस्थितीत त्यांच्यावर खटला चालून मगच निर्णय लागणे योग्य आहे. त्यांच्यावरील आरोप रद्द करून खटला रद्दबातल करून त्यांना मुक्त केले तर भाजपने तथाकथित "हिंदू अतिरेक्यांना" वाचविले अशी टीकेची झोड उठेल व भाजप तथाकथित "हिंदू अतिरेक्यांना" पाठीशी घालत आहे अशी भावना निर्माण होईल. तसेच या निर्णयाविरूद्ध अनेक कायदेपंडीत न्यायालयात दाद मागतील व न्यायालय सरकारचा निर्णय रद्द करू शकेल. त्यातून अजून गुंतागुंत निर्माण होईल. त्याऐवजी खटला चालणेच योग्य ठरेल. ते निर्दोष असतील तर सुटतील. जर गुन्हे सिद्ध झाले तर दहशतविरोधी कायद्यानुसार शिक्षा मिळायला हवी. (५) २००८ साली त्यांना मुद्दाम अडकविण्यात आले असे माझे मत आहे. २००९ च्या निवडणुकीवर डोळा ठेवून भाजप/संघ परिवाराला बॅकफूटवर नेण्यासाठी मुद्दाम जाणूनबुजून हिंदूंना यात अडकविण्यात आले. सुरवातीला महाराष्ट्र एटीएस तपास करीत होते. नंतर एक एसआयटी नेमण्यात आली. काही महिन्यांनतर तपास सीबीआय कडे देण्यात आला. नंतर पुन्हा एक एसआयटी नेमण्यात आली. काही काळाने एनआयए कडे तपास देण्यात आला. प्रत्येकवेळी एका नवीन तपासयंत्रणेकडे तपास देऊन त्यांना नवीन धागेदोरे मिळाले आहेत असे न्यायालयात सांगून त्यांच्यावर आरोपपत्र ठेवण्याचे टाळले गेले. आतापर्यंत काय पुरावे मिळाले आहेत याची कोठेही वाच्यता केलेली नाही. सुरवातीच्या काळात कर्नल प्रसाद पुरोहितांबद्दल बरेच खोटे पसरविले गेले. बॉम्बस्फोटात आरडीएक्स वापरले नव्हते असा सुरवातीचा अहवाल होता. काही महिन्यांनी त्यात आरडीएक्स होते असा नवीन अहवाल दिला गेला. नंतर पत्रकार परीषदेत असे सांगितले गेले की लष्कराने काश्मिरला पोहोचविण्यासाठी दिलेले ६०० किलो आरडीएक्स पुरोहितांनी बाँबसाठी वापरले. या आरोपानंतर दुसर्‍या दिवशी तातडीने लष्कराने या खोट्या आरोपांना उत्तर दिले. पुरोहितांना लष्कराने कणभरही आरडीएक्स दिले नव्हते. लष्करात प्रत्येक गोळीचा देखील हिशेब ठेवला जातो. ६०० किलो आरडीएक्स बेपत्ता झाले असते तर लष्कराने आकाशपाताळ एक करून ते शोधले असते असे सांगितल्यावर तपास यंत्रणांनी तो आरोप मागे घेतला. काही काळाने स्वामी असीमानंदांनी कबुलीजबाब दिला अशी अफवा पसरविण्यात आली. त्यांना म्हणे तुरूंगात सेवेसाठी एक मुस्लिम कैदी ठेवला होता ज्याला याच बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली पकडले होते. त्याच्या सेवेमुळे म्हणे असीमानंदांना पश्चाताप झाला व त्यांनी या बॉम्बस्फोटातील आपल्या सहभागाची कबुली दिली असे पसरविण्यात आले. हे प्रसिद्ध झाल्यावर आपण अशी कोणतीही कबुली दिलेली नाही असे असीमानंदांनी सांगितले. तसेच एका कैद्याच्या सेवेसाठी कधीही दुसर्‍या कैद्याला ठेवले जात नाही असे तुरूंगाधिकार्‍यांनी देखील सांगितल्यावर तपास यंत्रणांचा खोटेपणा उघडकीला आला. यातील सर्व आरोपींची प्रत्येकी ४ वेळा नार्को चाचणी करूनसुद्धा आरोपपत्र दाखल करण्याच्या दृष्टीने काहीच माहिती मिळाली नाही. यातील एक आरोपी दयानंद पांडे एका नार्को चाचणीनंतर तब्बल १२ तास बेशुद्ध होता तेव्हा तो जातो की काय या भीतिने तपास यंत्रणा घाबरल्या होत्या. यातील साध्वी प्रज्ञासिंग हिचा कबुलीसाठी खूप छळ केला गेला. तिला जेवणात मांसाहार देणे, अश्लील साहित्य देणे, तिच्या वडीलांच्या मृत्युनंतर अंतिम दर्शनासाठी सुद्धा जामीन न देणे, तिला कर्करोग झाल्यावर उपचाराकरिता जामीन न देणे अशा अनेक प्रकारे तिला त्रास दिला गेला. २०१४ मध्ये सत्तापालट झाल्यावर या प्रकरणाला वेग यायला सुरूवात झाली. काही महिन्यांपूर्वी आरोपपत्र दाखल झाले आहे. आता लवकरच निकाल लागू शकेल. या आरोपींना जामीन मिळू नये यासाठी त्यांचा तब्बल १९ बॉम्बस्फोटात सहभाग आहे असे आरोप करण्यात आले आहेत. यातील समझोता एक्सप्रेसमधील बॉम्बस्फोट आपणच केला अशी कबुली सिमीच्या अतिरेक्यांनी देऊन व पाकिस्तानातील एका दहशतवादी संघटनेने त्याची जबाबदारी घेऊन सुद्धा आमच्याच हिंदू लोकांनी तो बाँबस्फोट केला अशी मूर्खपणाची विधाने युपीएचे सरकार करीत राहिले. Narco analysis tests conducted on three key activists of the banned Students Islamic Movement of India (SIMI), including Safdar Nagori, have revealed that its activists had helped carry out the Mumbai train bombings of July 11, 2006 and the Samjhauta Express blasts of January 2007, http://indiatoday.intoday.in/story/EXCLUSIVE:+Pak+hand+in+Mumbai+train+blasts,+Samjhauta+Express+blasts,+says+Nagori/1/15655.html भाजप/संघ परिवाराला बॅकफूट्वर नेण्यासाठी युपीएने घेतलेल्या या अत्यंत चुकीच्या भूमिकेमुळे भारताची दहशतवादविरोधी भूमिका लंगडी झाली. जेव्हा जेव्हा भारत पाकिस्तानला दहशतवादाबद्दल दोषी ठरवितो तेव्हा तेव्हा पाकिस्तान समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाचा उल्लेख करून भारताने अजून "हिंदू अतिरेक्यांना" शिक्षा दिली नसल्याचे सांगून भारताला बॅकफूटवर नेतो. काँग्रेसचे दिग्विजयसिंग, अंतुले इ. नालायक नेते तर २६/११ प्रकरण संघाने घडवून आणले असे जाहीररित्या सांगून भारताच्या तपासयंत्रणेबद्दल संशय निर्माण करीत होते. युपीएच्या या देशद्रोही भूमिकेमुळे भारताचे प्रचंड नुकसान झाले आहे. युपीएने विशेषतः काँग्रेसने भारताचे अनेक क्षेत्रात प्रचंड नुकसान केले आहे. परंतु राजकीय स्वार्थासाठी दहशतवाद्यांना पाठीशी घातल्याने होणारे नुकसान सर्वाधिक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
श
श्रीगुरुजी Sat, 03/05/2016 - 19:24 नवीन
समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटातील पाकिस्तानच्या सहभागचा हा सविस्तर अहवाल. https://www.quora.com/What-is-the-current-status-of-the-perpetrators-of-Samjhota-Express-incident-Why-did-India-put-a-blame-on-Pakistan-even-though-it-was-done-by-its-own-people
In 2009, the United States Treasury and United Nations Security Council placed sanctions on Lashkar-e-Toiba, and named Arif Qasmani as having played a role in the bombing. “Qasmani Arif [..]chief coordinator of the relations of the [LeT] with other organisations [..] has worked with Lashkar-e-Tayyiba to facilitate terrorist attacks including [..] the bombing of February 2007 in the Samjhauta Express in Panipat (India).” — This is what resolution [No 1267] of the Committee on Sanctions of the United Nations Security Council dated 29.06.2009 declares. Adding that Qasmani was funded by Dawood Ibrahim and he did the fundraising for the LeT and the al-Qaida, the UNSC said, “In exchange for their support, al-Qaida provided support staff for the February 2007 bombing of the Samjhauta Express in Panipat.”
समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटावर हा एक अजून शोध अहवाल आहे. http://www.newindianexpress.com/nation/Samjhauta-Blast-Case-Counter-Investigation-To-NIA-Investigation/2013/01/23/article1432735.ece परंतु भारतातले निधर्मांध अजूनही हा बॉम्बस्फोट तथाकथित "हिंदू अतिरेक्यांनी" केला असे छाती पिटत सांगत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
शलभ Sat, 03/05/2016 - 20:52 नवीन
चांगली माहिती.. कुठे गेले टांगा पलटी घोडे फरार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नाना स्कॉच गुरुवार, 03/03/2016 - 18:28 नवीन
कन्हैयाचं भाषण सुरु आहे लाइव! उत्तम बोलतोय!
  • Log in or register to post comments
L
lakhu risbud Fri, 03/04/2016 - 06:40 नवीन
कन्हैया ज्या प्रकारे भाषनात मोदि सरकारच्या काला धन,सबका साथ सबका विकास या घोषणाबद्दल टीका करत होता, ते पाहून हा पुढचा केजरीवाल इन making असणार असा विचार येतोय. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत आआप /काँग्रेस कडून नक्की उमेदवार असणार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
श
श्रीगुरुजी Fri, 03/04/2016 - 08:33 नवीन
सहमत. बहुतेक तो आआपकडूनच उभा असेल. अर्थात २०१९ मध्ये तो २०१६ प्रमाणेच जेएनयु मध्ये शिकतच असेल. जसे एफटीआयआय मध्ये बरेच लाईफ मेंबर्स आहेत, तसेच जेएनयुमध्येही असावेत. बाकी इतर गोष्टी क्षणभर बाजूला ठेवल्या तरी ज्याचे आईवडील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहेत, वडील बेडरिडन आहेत व जो २८ वर्षांचा असून अजूनही "विद्यार्थी"च आहे, त्याच्या कुटुंबियाचा चरितार्थ, याचे शिक्षण, दिल्लीत राहण्याचा-जेवणाचा खर्च कसा चालत असेल याविषयी कुतूहल आहे. एफटीआयआयच्या तिशी पार केलेल्या "विद्यार्थ्यां"बद्दल हेच कुतुहूल होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud
त
तर्राट जोकर Fri, 03/04/2016 - 08:39 नवीन
तुमची का जळते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 03/04/2016 - 08:44 नवीन
जळतबिळत काही नाही हो. जळण्यासारखं काहीच नाहीय्ये. सुरवातीलाच लिहिलंय ना की कुतूहल वाटतंय म्हणून. का ते सुद्धा वाटू नये? आणि मला कुतूहल वाटलं म्हणून तुम्हाला का त्रास होतोय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Fri, 03/04/2016 - 09:33 नवीन
साधारणतः पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्याचं वय काय असावं तुमच्या मते? कोणी तुमच्या ओळखीत नातेसंबंधात पीएचडी झालेले असतील तर विचारुन पहा. विद्यार्थी न होता पीएचडी मिळते का ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा