Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ओवेसिंचा गळा

स
साहना
गुरुवार, 03/17/2016 - 10:54
🗣 251 प्रतिसाद
ओवेसी ह्यांची भाषणे मी पहिली आहेत आणि हि व्यक्ती अतिशय अभ्यासू आहे ह्यांत शंकाच नाही. जेव्हा नक्षलवादी हल्ला करतांत तेंव्हा सगळे म्हणतात कि "we must encoruage naxalites to join mainstream and solve problem democratically ". माझ्या मते ओवेसी सारखा कट्टर मुसलमान संसदेत असणे हि चांगली गोष्ट असून त्याला योग्य तो मान इतरांनी दिला पाहिजे, मन व्यक्तीला असून त्याच्या विचारणा किमत देण्याची गरज नाही. जर संसदेत त्याला बोलायला दिले नाही किंवा जेल मध्ये डांबले तर त्याच्या सारख्या कट्टर लोकांपुढे कायद्याच्या बाहेर जावून आपल्या भावना लोकंवर लादणे हा एकाच पर्याय बाकी राहतो. माझ्या मते ओवेसी म्हणजे एक नक्सल type माणूस आहे ह्याने शस्त्र घेण्याच्या नादात न पडता लोकशाही मार्गाने आपले विचार आणि धोरण प्रकट करण्याचा मार्ग अवलंबला आहे. आणि तो स्तुत्य आहे. कोन्ग्रेस पार्टी मध्ये हिंदुना जेंव्हा दुय्यम वागणूक मिळत होती तेंव्हा संघा कडे दोन पर्याय होते, लोकशाही मार्गाने पार्टी उभी करून निवडणूक जिंकणे आणि किंवा कायद्याच्या बाहेरून काही तरी भानगडी करणे (उद रामसेना). जे लोक संघाला कट्टर वगैरे समजतात खरे तर त्यांनी संघाच्या निर्णयाचे स्वागत करायला पाहिजे कारण त्यांनी खडतर पण अ-हिंसक मार्ग स्वीकारला. संघाला खरे तर शांततेचा नोबेल मिळायला पाहिजे. त्याच प्रमाणे मराठी माणसाच्या मनात कोन्ग्रेस विषयी द्वेष आणि स्वता विषई अन्यायाची भावना निर्माण झाली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पक्ष उभारून कोन्ग्रेस ला माती चारली. कायद्याच्या बाहेर जावून ठोकशाही करत त्याना स्वताचे साम्राज्य निर्माण करता आले असते पण त्यांनी सुद्धा खडतर मार्ग पत्करला. शिवसेनेने भलेही अनेक वेळा कायदा तोडला असेल पण तरी सुद्धा काही बेसिक तारतम्य त्यांनी सांभाळले होतेच. माझ्या मते कट्टरपंथी लोकांनी निवडून येवून संसदेत, वर्तमान पत्रांत इत्यादी आपले कट्टर विचार प्रकट करणे हि चांगली गोष्ट असून त्यात वायीत काहीच नाही उलट संसंद हि त्याच साठी बनवली गेली आहे. उद्धव ठाकरे ह्यांचे "गळा कापावा" वगैरे बोल केवळ अलंकारिक स्वरूपाचे असावेत असे मला वाटते.

प्रतिक्रिया द्या
43245 वाचन

💬 प्रतिसाद (251)
अ
अभ्या.. Fri, 03/18/2016 - 09:35 नवीन
ठाणे व मुंबईतील काही ठराविक भाग सोडले तर सेनेला महाराष्ट्रात कोणीही ओळखत नव्हते. भाजपमुळेच महाराष्ट्रात शिवसेनेची वाढ झाली आहे.
चुकीची समजूत आहे. मुंबई पुण्यात बसून केलेला हा विचार आहे. मी तुम्हाइतकी डिटेल्ड आकडेवारी नाही देऊ शकणार, वादविवादही करु शकणार नाही पण मराठवाडा अन त्याला लगत असलेला प. महाराष्ट्र व इतर भागात लहानपणापासून गावोगावी शिवसेनचे बोर्ड पाहतोय. भाजपाचा एखाद दुक्का कार्यकर्ता असायचा. शिवसेनेच्या बर्‍याच कट्टर शिवसैनिकांमुळे काँन्ग्रेसला/राश्ट्रवादीला अरेला कारे करणारा पर्याय मिळाला. अशी साथ युतीला मिळाल्याने सर्व महाराष्ट्रात भाजप पाय रोवू शकला. नाहीतर नुसत्या तत्वांवर राष्ट्रवादी/काँ शी निवडणुकी लढत घेण्याची एकट्या भाजपाची ताकतच नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
त
तर्राट जोकर Fri, 03/18/2016 - 09:38 नवीन
सहमत. पुण्यामुंबईतली शिवसेना आणि गावाखेड्यातली शिवसेना ह्यात खूप फरक आहे. भाजप शिवसेनेच्या खांद्यावर बसून आयत्या बिळावर नागोबा झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
श
श्रीगुरुजी Fri, 03/18/2016 - 10:47 नवीन
वस्तुस्थिती बरोब्बर उलट आहे. भाजप हा जन्मापासूनच सेनेपेक्षा जास्त जनाधार असलेला पक्ष होता. २०१४ मध्ये हे पुन्हा एकदा सिद्ध झालं इतकंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
न
नाना स्कॉच Fri, 03/18/2016 - 11:13 नवीन
दगडाचा जनाधार!! मधे ते खुळ काढले होते मिसकॉल द्या अन भाजप मेंबर व्हा! कश्यात काय नाय तर आमच्या नाक्यावर बसणाऱ्या राष्ट्रवादी अन काँग्रेस च्या टग्याना सुद्धा "congratulations" चे मॅसेज आले होते ऑटोमेटेड बीजेपी कडून मेंबर झाल्याबद्दल! अन जनाधार जनाधार कसला सांगताय, किती टक्के मते आली लोकसभेत, बरं ते ही सोडा, जितकी मते मिळाली आहेत ती फ़क्त अन फ़क्त नमो नामक एका सशक्त पर्यायाला मिळाली आहेत! जनाधार होता तर 13 दिवसात सरकार का पडले होते? अन 99 मधेही स्वबळावर का नाही येता आले!? पुर्ण बहुमत यायला 2014 का उजाडावे लागले?? शिवसेना वॉज सेना!! जोवर साहेब होते! नंतर असोच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बोका-ए-आझम Fri, 03/18/2016 - 11:27 नवीन
शिवसेना ही गुंडांनी, गुंडांची आणि गुंडांसाठी चालवलेली संघटना होती आणि आहे. तिला भाजपबरोबर आल्यावर जरा संभावित चेहरा मिळाला. बाकी युती तुटल्यावर शिवसेनेने रंग दाखवलेच की. एवढा जर जनाधार होता शिवसेनेचा तर जेमतेम ६० जण कसे काय निवडून आले? मुंबई महानगरपालिका या एका गोष्टीच्या जोरावर सेनेची मिजास आहे. एकही महत्त्वाचा portfolio नाही, ना राज्यात ना देशात. खिशात नाही आणा तरी बाबुराव म्हणा अशी सेनेची गत आहे. एकदा मुंबई महानगरपालिका हातून गेली की मग सेना किती पाण्यात आहे ते कळेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
श
श्रीगुरुजी Fri, 03/18/2016 - 12:44 नवीन
+ १ मुंबई महापालिका देखील निव्वळ भाजपच्या मदतीने सेनेच्या ताब्यात आहे. महापालिकेच्या २२८ जागांपैकी २००२ मध्ये शिवसेनेने १००, २००७ मध्ये ८४ आणि २०१२ मध्ये ७५ जागा मिळविल्या. म्हणजे एकदाही पूर्ण बहुमत नाही. भाजपने अनुक्रमे ३२, २८ व २९ जागा मिळविल्याने सेनेचा महापौर होऊ शकला. भाजपने खांद्यावर घेतले नसते तर सेना मुंबईत सत्तेवर येऊ शकली नसती. अगदी १९८५ मध्ये सुद्धा सेनेला १७५ पैकी ७४ जागाच होत्या. २०१७ मध्ये भाजप व सेना एकमेकांविरूद्ध लढले तर सेना नक्कीच ५० च्या खाली उतरेल. कल्याण-डोंबिवली, ठाणे इ. महापालिकेत देखील सेनेला स्वतःला पूर्ण बहुमत नाही. सर्व ठिकाणी भाजपच्या मदतीने महापौर निवडून आणलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
क
कपिलमुनी Sat, 03/19/2016 - 10:40 नवीन
सध्या राज्याला लागू होतो का ?
भाजपने खांद्यावर घेतले नसते तर सेना मुंबईत सत्तेवर येऊ शकली नसती
शिवसेनेने खांद्यावर घेतले नसते तर भाजप राज्यात सत्तेवर येऊ शकले नसता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बोका-ए-आझम Sat, 03/19/2016 - 11:25 नवीन
भाजपने सरकार आधी स्थापन केलं. विश्वासदर्शक ठरावही सहमत झाला. तेव्हा सेना विरोधी पक्षात होती. राष्ट्रवादीने न मागता पाठिंबा दिला होता. नंतर सेना अलगद सरकारमध्ये आली कारण ५ किंवा जी काही असतील तेवढी वर्षे विरोधात बसायची सेनेची तयारी नव्हती. त्यामुळेच सेना भले तडजोड करुन का होईना पण सरकारमध्ये आली. सरकारमध्ये राहण्याची गरज सेनेला जास्त आहे म्हणूनच तर केंद्रात फक्त एक मंत्रिपद आणि राज्यात बिनमहत्त्वाची मंत्रिपदं असूनसुद्धा सेना आज सरकारमध्ये का आहे? आणि तरी तुम्ही म्हणताय सेनेने खांद्यावर घेतलं नसतं तर भाजप सत्तेवर येऊ शकला नसता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
त
तर्राट जोकर Sat, 03/19/2016 - 11:35 नवीन
मुंबैत सेना-भाजपच्या जागा अशा १०० | ३२ ८४ | २८ ७५ | २९ असे असतांना भाजपाने सेनेला खांद्यावर घेतले अशी भाषा जर गुरुजी वापरतात तर तेव्हा तीच भाषा सेनेसाठी वापरली तर बिघडले कुठे. मुळात सेनेशिवाय भाजप सरकार आले असते काय हा प्रश्न आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
श
श्रीगुरुजी Sat, 03/19/2016 - 13:13 नवीन
मुंबईत महापालिका निवडणुकीत भाजपचा पाठिंबा नसता तर शिवसेनेचा महापौर होऊच शकला नसता. याउलट २०१४ मध्ये शिवसेना विरोधात असूनही भाजपने सरकार स्थापन केले होते. सेनेशिवाय भाजपचे सरकार आलेलेच होते. सेनेतील अंतर्गत दबावामुळे व सत्तेसाठी अत्यंत कासावीस झाल्याने सेनेला शेवटी मिळेल ती बिनमहत्त्वाची मंत्रिपदे स्वीकारून सत्तेत यावे लागले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 03/19/2016 - 14:26 नवीन
विश्वास प्रस्तावाला सामोरे जायची काय तयारी होती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बोका-ए-आझम Sat, 03/19/2016 - 15:07 नवीन
यावरून कळतंच ना की तयारी होती. कसं आहे - विरोधच करायचा आणि वस्तुस्थितीकडे पूर्ण दुर्लक्ष करणं हे आता तुमच्या अंगवळणी पडलेलं आहे. त्यामुळे असले प्रश्न अपेक्षित आहेत. त्याने वस्तुस्थिती बदलत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 03/19/2016 - 15:38 नवीन
इथे विरोध काय केलाय ते सांगाल काय जरा? ऐकुन घेतोय म्हणुन आता तुम्ही वाट्टेल ते बोलणार आहात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
श
श्रीगुरुजी Sat, 03/19/2016 - 15:23 नवीन
विश्वास प्रस्ताव जिंकलेला होता. याविषयी सविस्तर चर्चा एका धाग्यात झालेली आहे. त्यावेळी तुम्ही मिपावर नव्हता. समजा भाजपकडे बहुमत नाही/नव्हते असा शिवसेनेसकट सर्व विरोधी पक्षांचा विश्वास होता/आहे, तर आजतगायत अविश्वास ठराव का मांडलेला नाही? शिवसेना एक-दीड महिना विरोधी पक्षनेतेपद उपभोगत होती. त्या काळात तरी अविश्वास ठराव मांडता आला असता. त्या काळात जेव्हा सुरवातीच्या काळात सभापतींची निवड होणार होती, तेव्हा राणा भीमदेवी थाटात घोषणा करून शिवसेनेने सभापतीपदासाठी आपला उमेदवार दिला होता. जर भाजपकडे बहुमत नसते तर शिवसेनेचा उमेदवार सभापतीपदी निवडून आला असता. ते न करता शिवसेनेने आयत्यावेळी आपला उमेदवार मागे घेतला. त्यामागे सभापतींची निवड बिनविरोध करण्याचा उद्देश होता का सभापतीपदाच्या निवडणुकीच्या मतदानात आपल्याच पक्षाची मते फुटतील याची भीति होती हे ज्याने त्याने शोधून काढावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 03/19/2016 - 15:21 नवीन
गुरुजी, भाजपा सोडुन तुमच्या लेखी सगळ्या पार्ट्या कःपदार्थ, सत्तेला चटावलेले, सत्तेसाठी कासावीस होणारे, शय्यासोबत वैगरे करणारे असेच आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 03/19/2016 - 15:24 नवीन
सगळ्या पार्ट्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
अ
अभ्या.. Sat, 03/19/2016 - 15:27 नवीन
राजकीय पक्ष असे असावे ते. प्रश्न माझा नसला तरी प्रश्नाचे उत्तर मलाही हवेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
त
तर्राट जोकर Sat, 03/19/2016 - 15:41 नवीन
हो राजकिय पक्षच. सरळ प्रश्नावर फाटे फोडणारा क्षुल्लक प्रश्न विचारुन गुरुजींनी उत्तर टाळले असं दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
श
श्रीगुरुजी Sat, 03/19/2016 - 15:52 नवीन
फार व्यापक प्रश्न आहे. एकतर सगळ्या पक्षांचा विचार करायचा (भारतात ७०० हून अधिक नोंदणी झालेले राजकीय पक्ष आहेत) आणि तो पक्ष भाजपच्या तुलनेत कःपदार्थ आहे का, सत्तेला चटावलेला आहे का, सत्तेसाठी कासावीस झालेला आहे का, सत्तेसाठी कोणासोबतही शय्यासोबत करतो का ई. निकषांवर त्या पक्षाचा अभ्यास करून प्रतिसाद लिहायचा. फार मोठे काम आहे. जमलं तर लिहितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 03/19/2016 - 16:04 नवीन
सगळ्या सोडा हो, ज्यांच्या बद्दल आजवर तुमच्या प्रतिसादांमधून लिहलंय त्यांच्याबद्दल अभ्यास करुनच असले शब्द वापरत असाल ना? तेवढ्यांचंच सांगितलं आता तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 03/20/2016 - 08:06 नवीन
आधी म्हणालात सगळ्या पार्ट्या आणि आणि आता म्हणताहात सगळ्या सोडा हो. एकदा नक्की काय ते ठरवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 03/20/2016 - 08:36 नवीन
गोल गोल फिरणे सोडा. विचारलेला प्रश्न काय आहे ते तुम्हाला कळलाय, उत्तर तर स्पष्ट आहे. कबूल करायला फक्त आढेवेढे घेणं चाललंय. ठिक आहे. तुम्हाला हौसच आहे तर घ्या हा सुधारित प्रश्न. तुमच्या प्रतिसादांतून भाजप सोडून दुसर्‍या राजकिय पक्षांच्या सत्ताकारणाबद्दल तुम्ही उल्लेख करता तेव्हा सत्तेसाठी कासावलेले, शय्यासोबत करणारे, उतावीळ झालेले, असले तुच्छतादर्शक शब्द वापरता, तेव्हा तुम्ही उल्लेख करता ते सर्व पक्ष सत्तेसाठी हपापलेले, कासावीस झालेले, शय्यासोबत करणारे आहेत पण भाजप तसा नाही असे तुम्हाला म्हणायचे असते का? तसे असेल तर मग केवळ भाजप जनतेवर उपकार केल्यासारखे राजकारण करतो, केवळ भाजपच जनतेच्या भल्यासाठी सत्ताकारण, सत्ता स्थापना करतो असे आहे काय? ह्या प्रश्नाचे उत्तरावर बरंच अवलंबून असणार आहे. त्यामुळे उत्तर द्याल अशी आशा करतो. अनावश्यक प्रतिप्रश्न टाळाल तर खरंच उपकार होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 03/20/2016 - 08:47 नवीन
मूळ धाग्याचा आणि या प्रश्नाचा सुतराम संबंध नाही. इथे उत्तर देत बसलो तर मूळ विषय पूर्णपणे भलतीकडेच भरकटेल. तसे होऊ नये म्हणून या विशिष्ट विषयावर एक वेगळा धागा काढा. तिथे सविस्तर उत्तर देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 03/20/2016 - 08:51 नवीन
हो अथवा नाही एवढंच उत्तर अपेक्षित आहे. तेवढं द्या. त्यावर पुढे एकही प्रश्न या धाग्यावर यानंतर तुम्हाला विचारणार नाही. बाकी दिलेल्या उत्तराच्या स्पष्टीकर्णासाठी तुम्हाला धागा काढायचं स्वातंत्र्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 03/20/2016 - 09:09 नवीन
उत्तर तयार आहे. पण ते याच धाग्यावर द्यावे का याविषयी साशंक आहे. कारण त्या उत्तरावरून पुढे अनेक प्रतिसादांची मालिका सुरू होईल व त्यामुळे मूळ विषय भरकटेल. आणि पुढील प्रतिसादांना उत्तर देण्याचे टाळले तर मला कसे गप्प केले किंवा मी या धाग्यावरून काढता पाय घेतला असे प्रतिसाद यायला लागतील. म्हणजे उत्तर दिले तर धागा भरकटतो आणि नाही दिले तर मी पळून गेलो असे गैरसमज होतील. त्यापेक्षा एक वेगळा धागा काढा. तिथे सविस्तर उत्तर देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 03/20/2016 - 09:51 नवीन
भरकटला तर काय फरक पडतो गुरुजी, तसेही ओवेसीच्या वक्तव्यावरच्या धाग्यावर शिवसेना-भाजपच्या ताकदीबद्दल बरेच भरकटणं झालंच आहे. त्यात अजुन थोडी भर. जर इथे नसेलच द्यायचे उत्तर तर, तुम्हाला कोणी उत्तर देण्यापासून पळाले, गप्प बसले असे म्हणू नये असे वाटत असेल तर, तुम्हीच हा प्रश्न आणि त्यावर तुमचे उत्तर असा धागा काढा, मिपाला काही नविन नाही हा प्रकार. उत्तर द्यावे की नको, कुठे द्यावे, कसे द्यावे ह्याचे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा नाही जितके उत्तर देणे न देणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी धागा काढण्यापेक्षा तुम्हीच काढलेला संयुक्तिक व उचित ठरेल. शेवटी उत्तर महत्त्वाचे, इथे काय अन् कुठे काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 03/20/2016 - 13:28 नवीन
मूळ लेखातच शिवसेनेचा उल्लेख होता. त्यावर एक प्रतिसाद आल्यावर प्रतिसादांची मालिका सुरू झाली. तुमच्या प्रश्नांचा आणि मूळ लेखाच्या विषयाचा संबंध नाही. त्यामुळे त्यावर इथे उत्तर देणे प्रशस्त वाटत नाही. अर्थात तुम्हाला माझ्या उत्तराची उत्सुकता आहे असं दिसतंय. माझ्याकडे उत्तर तयार आहे. त्यामुळे या धाग्याऐवजी वेगळ्या ठिकाणी उत्तर देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 03/20/2016 - 13:57 नवीन
उत्तर तयार आहे हे उत्तर नाही. त्यामुळे हा धागा काय किंवा न्वीन धागा काय, उत्तर द्यायची गरज तुम्हाला आहे. अन्य्था तुम्ही उत्तर देण्यापासून पळताय असाच अर्थ निघेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 03/20/2016 - 15:04 नवीन
तुम्ही कसाही अर्थ काढा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायची ही जागा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 03/20/2016 - 15:18 नवीन
तुम्ही उत्तर देत नाही आहात हे सत्य आहे. दिले तर ते (श्रीगुरुजींनी उत्तर दिले) सत्य असेल. नाही दिले तर ते (श्रीगुरुजींनी पलायन केले) सत्य असेल. तीनपैकी कोणते सत्य कायम ठेवायचे ह्याचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. मी काय अर्थ काढतो ह्याच्याशी काय घेणे-देणे मूळ प्रश्नाचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 03/20/2016 - 18:02 नवीन
मी उत्तर देणार आहे, पण ते या धाग्यावर नाही. मुळात मूळ प्रश्नाचाच धाग्याशी काहीही संबंध नाही, त्यामुळे तुम्ही काय अर्थ काढत आहात याने मला फरक पडत नाही.
उत्तर तयार आहे हे उत्तर नाही. त्यामुळे हा धागा काय किंवा न्वीन धागा काय, उत्तर द्यायची गरज तुम्हाला आहे. अन्य्था तुम्ही उत्तर देण्यापासून पळताय असाच अर्थ निघेल.
तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. धाग्याशी संबंध नसलेला प्रश्न तुम्ही मला विचारलात आणि वारंवार उत्तर द्या, उत्तर द्या असे मागे लागला आहात. उत्तर ऐकण्याची गरज तुम्हाला आहे, उत्तर देण्याची मला गरज नाही. काय उत्तर द्यायचे, कधी उत्तर द्यायचे, कोणत्या धाग्यावर उत्तर द्यायचे, उत्तर द्यायचे का नाही हे मी ठरविणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
अ
अभ्या.. Sun, 03/20/2016 - 18:27 नवीन
अग घे ना नाव नको बाई अग घे ना लाज वाटते बाई अग घे ना सगळ्या जणीत नको ना अग घे ना तू घे बाई आधी इश्श लाज वाटते बाई अग घे ना आता नको गं बाई मगाशी मला आग्रह करत होतीस की अग ते वेगळे ग बाई मग घे बरे आधी तू घे बघ हं हो हो बघ हं. परत म्हणायचं नाही अग घे गं नीट एकायचं हं हो ग बाई. घे तर. कसंय? काय? उखाणा? कधी घेतला? तू एकला नाही? नाही? शी बाई. परत परत नाही आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
त
तर्राट जोकर Sun, 03/20/2016 - 18:32 नवीन
असं कसा संबंध नाही? मुळ धाग्यात तर भाजपचा भ सुद्धा नाही तरी आपण इथे भाजपची आरती वोवाळायला प्रतिसादामागे प्रतिसाद टंकत गेले. सेनेपेक्षा भाजप कसा भारी हेच ह्या धाग्यावर तुम्ही सांगत आहात. भाजप ह्या पक्षाची ह्या धाग्यावर भलामण करत आहात. कोणी भाजपविरूद्ध बोलले तर त्याला आकडेवारी निशी उत्तर देत आहात. तुमचे ह्या धाग्यावरचे सगळे प्रतिसाद फक्त भाजपशीच संबंधित आहेत, फक्त भाजपबद्दलच आहेत. मूळ धाग्यातल्या मूळ विषयाबद्दल एक अक्षरही आपण ह्या धाग्यावरच्या कुठल्याच प्रतिसादात टंकलेले नाही. परत एकदा आठवण करुन देतो, चेक करा. मूळ धाग्यात भाजपबद्दल काहीच नव्हते. तरी आपण इथल्या चर्चेत भाग घेऊन भाजपचे गुणगान केले. तुम्ही ह्या धाग्याचा वापर भाजपचा प्रचार करण्यासाठी करत आहात. भाजपला मोठं दाखवण्यासाठी तुम्ही शिवसेनेसाठी सत्तेसाठी कासावीस झाले असा तुच्छतादर्शक शब्दसमुच्चय वापरला. आता माझा प्रश्न त्या तुमच्या ह्याच धाग्यावरल्या प्रतिसादावर आहे. इतर अनेक ठिकाणी तुम्ही अशाच प्रकारची टिप्पणी करत आहात ह्याचा संदर्भ दिलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 03/20/2016 - 18:53 नवीन
मुळ धाग्यात तर भाजपचा भ सुद्धा नाही तरी आपण इथे भाजपची आरती वोवाळायला प्रतिसादामागे प्रतिसाद टंकत गेले.
परत एकदा आठवण करुन देतो, चेक करा. मूळ धाग्यात भाजपबद्दल काहीच नव्हते.
तुम्ही मूळ लेख वाचलेला दिसत नाही म्हणूनच हे लिहिलेले दिसते. खालील परिच्छेद वाचा. या परिच्छेदात भाजपच्या पूर्वावताराचा म्हणजेच जनसंघाचा अप्रत्यक्ष उल्लेख आहे. कोन्ग्रेस पार्टी मध्ये हिंदुना जेंव्हा दुय्यम वागणूक मिळत होती तेंव्हा संघा कडे दोन पर्याय होते, लोकशाही मार्गाने पार्टी उभी करून निवडणूक जिंकणे आणि किंवा कायद्याच्या बाहेरून काही तरी भानगडी करणे (उद रामसेना). जे लोक संघाला कट्टर वगैरे समजतात खरे तर त्यांनी संघाच्या निर्णयाचे स्वागत करायला पाहिजे कारण त्यांनी खडतर पण अ-हिंसक मार्ग स्वीकारला. संघाला खरे तर शांततेचा नोबेल मिळायला पाहिजे. हाही परिच्छेद वाचा. इथे तर शिवसेनेचा स्पष्ट उल्लेख आहे. त्याच प्रमाणे मराठी माणसाच्या मनात कोन्ग्रेस विषयी द्वेष आणि स्वता विषई अन्यायाची भावना निर्माण झाली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पक्ष उभारून कोन्ग्रेस ला माती चारली. कायद्याच्या बाहेर जावून ठोकशाही करत त्याना स्वताचे साम्राज्य निर्माण करता आले असते पण त्यांनी सुद्धा खडतर मार्ग पत्करला. शिवसेनेने भलेही अनेक वेळा कायदा तोडला असेल पण तरी सुद्धा काही बेसिक तारतम्य त्यांनी सांभाळले होतेच. नंतर या प्रतिसादात प्रथमच शिवसेनेच्या उल्लेखासंदर्भात सर्वसाक्षी यांनी उत्तर दिले व त्यानंतर शिवसेना-भाजपचा संदर्भ असलेल्या प्रतिसादांची मालिका सुरू झाली. शिवसेना-भाजप संबंधित प्रतिसादाची सुरूवात मी केलेली नाही. ज्यांनी केली त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागावे ही नम्र विनंती.
कोणी भाजपविरूद्ध बोलले तर त्याला आकडेवारी निशी उत्तर देत आहात.
मी आकडेवारी देऊनच बोलतो. दुसर्‍यांच्या नावाने खोटे खपवित नाही.
भाजपला मोठं दाखवण्यासाठी तुम्ही शिवसेनेसाठी सत्तेसाठी कासावीस झाले असा तुच्छतादर्शक शब्दसमुच्चय वापरला. आता माझा प्रश्न त्या तुमच्या ह्याच धाग्यावरल्या प्रतिसादावर आहे. इतर अनेक ठिकाणी तुम्ही अशाच प्रकारची टिप्पणी करत आहात ह्याचा संदर्भ दिलाय.
कासावीस होणे हा अत्यंत योग्य व संसदीय शब्द आहे. त्यात तुच्छतापूर्ण काहीही नाही. मराठी वृत्तपतातून, नियतकालिकातून, लेखनातून हा शब्द अगदी सहज वापरला जातो. त्याबद्दल कोणीही कधीही आक्षेप घेतलेला नाही. बादवे, शिवसेनेपेक्षा भाजप मोठा आहेच हे वेगळे सांगायला नकोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ब
बोका-ए-आझम Sat, 03/19/2016 - 16:09 नवीन
जशी कुठलीही कंपनी ही फायद्याकरता काम करते तसंच कुठलाही राजकीय पक्ष हा सत्तेकरता काम करतो. लोकांची कामं निरपेक्ष हेतूने करणं हे समाजकारण आहे. राजकीय सत्तेसाठी ते करणं हे राजकारण आहे. सगळेच पक्ष ते करतात. याचा अर्थ सगळेच सत्तेसाठी हपापलेले (तुमचा शब्द) किंवा उत्सुक (माझा शब्द) असतात. तसे जर नसतील तर ते राजकीय पक्षच नव्हेत. त्यामुळे भाजप किंवा इतर कुठलाही पक्ष हा सत्तेसाठी हपापलेला असतोच. त्यात चुकीचं काहीही नाही. जसा देव भावाचा भुकेला तसा पक्ष सत्तेचा भुकेला. आता ही सत्ता कुठला पक्ष कशा पद्धतीने राबवतोय त्यात फरक असणारच. ती पद्धत आवडणारे आणि नावडणारेही असणारच. सत्तेसाठी राजकीय पक्ष कोलांट्याउड्या मारतात, कारण सत्तेमध्ये असल्यामुळे जे फायदे मिळतात त्याची भुरळ प्रत्येकाला पडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 03/19/2016 - 16:56 नवीन
हा प्रश्नच काय हो, समग्र तर्राट जोकरच चुकीचा आहे व नेहमीच असतो. असो. सत्तेसाठी हपापलेले हा शब्द मी कुठेही वापरलेला नाही त्यामुळे तुमचा शब्द असे म्हणुन माझ्या तोंडी कोंबण्याची पत्रकारी कोलांटीउडीची गरज नाही. मी विचारलेल्या प्रश्नात गुरुजी इतर पक्षाम्साठी जे शब्द वापरतात ते आहेत. गुरुजींच्या प्रतिसादांमधे भाजप सोडुन दुसर्‍या पक्षांच्या सत्ताकारणासाठी असले शब्द वापरलेले बघितले आहेत. जर सगळे पक्ष सत्ताकारणासाठी झटतात तर सर्वांना समान न्याय व आदर दिला पाहिजे. शय्यासोबत, कासावीस होणे, इत्यादी शब्द इतर पक्षांबद्दल वापरतांना मात्र भाजप जणू जनतेवर उपकार केल्यासारखे सत्ताकारण करतोय असा आविर्भाव असणे दुटप्पीपणा आहे. गुरुजींना भाजप प्रिय असेल तो असो, पण असे तुच्छता दर्शवणारे शब्द इतर राजकिय पक्षांबद्दल वापरण्याबद्दल इथे फार विरोध होतांना दिसला नाही. ज्याने विरोध केला त्यालाच कॉर्नर करणे मात्र बघितले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Sun, 03/20/2016 - 08:23 नवीन
गुरुजी, भाजपा सोडुन तुमच्या तर्राट जोकर - Sat, 19/03/2016 - 19:51 गुरुजी, भाजपा सोडुन तुमच्या लेखी सगळ्या पार्ट्या कःपदार्थ, सत्तेला चटावलेले, सत्तेसाठी कासावीस होणारे, शय्यासोबत वैगरे करणारे असेच आहेत का?
तुमचे शब्द हे आहेत. मी तुमच्या तोंडी हपापलेला असा पुष्कळ चांगला शब्द टाकला होता. ज्याचा अर्थ साधारणपणे तुम्ही जे इथे म्हणाला आहात तोच होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
श
श्रीगुरुजी Sun, 03/20/2016 - 08:34 नवीन
यातला कःपदार्थ शब्द मी एखाद्या पक्षाच्या बाबतीत वापरलेला नाही. सत्तेला चटावलेले असा शब्द देखील वापरल्याचे माझ्या स्मरणात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
त
तर्राट जोकर Sun, 03/20/2016 - 08:44 नवीन
जे शब्द वापरले, वापरता त्याबद्दल बोला मग. रडीचे डाव बंद करा. वेड पांघरुन पेडगावला जाताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
त
तर्राट जोकर Sun, 03/20/2016 - 08:43 नवीन
प्रश्नाचा मतितार्थ कळतोय ना? त्याबद्दल बोला. विचारलेल्या प्रश्नाचं गांभिर्य अनावश्यक फाटे फोडुन कमी होणार नाही हे लक्षात असु द्या. थेट प्रश्नाला थेट उत्तर द्यायचे सोडून असे रडीचे डाव खेळणे योग्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Sun, 03/20/2016 - 19:48 नवीन
समग्र तर्राट जोकरच चुकीचा आहे व नेहमीच असतो
हे तुम्हीच कबूल केल्यामुळे आता तुम्हाला उत्तरं द्यायला कोणीही बांधील नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 03/20/2016 - 20:01 नवीन
इतके बालीश व हास्यास्पद प्रतिसाद देण्यातून तुमची कबुली मिळाली. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Mon, 04/04/2016 - 21:41 नवीन
त्यामुळे लहान बाळांना आमचा प्रतिसाद बालिश वाटू शकतो. तो दोष त्यांच्या बालबुद्धीचा आहे, आमचा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ग
गॅरी ट्रुमन Fri, 03/18/2016 - 12:17 नवीन
शिवसेना वॉज सेना!! जोवर साहेब होते! नंतर असोच!!
कमाल आहे. केंद्रात पूर्ण बहुमत यायला भाजपला २०१४ साल का उजाडले असे एकीकडे म्हणायचे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात शिवसेनेला २०% पेक्षा जास्त मते आणि ७३ पेक्षा जास्त जागा कधीच मिळाल्या नव्हत्या याकडे दुर्लक्ष करून परत शिवसेना वॉज सेना म्हणायचे.. कमाल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Mon, 03/21/2016 - 02:37 नवीन
गॅरी साहेब, आपणही सेलेक्टिव रीडिंग करू लागलात की काय! नसता आपणही "जोवर साहेब होते" हे वाक्य सोडले नसते!! बाकी असोच्!!! तांत्रिक डिटेल्स मान्य करायला आम्हालाही हरकत नाही! कारण आम्ही तर्ककर्कश्य नाही! नीट मांडल्यास मुद्दे आत्मसात करतो. :) फ़क्त ते सेलेक्टिव रीडिंग सोडा तुम्ही गुर्जी नाही गॅरी आहात! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
श
श्रीगुरुजी Fri, 03/18/2016 - 12:38 नवीन
दगडाचा जनाधार!! मधे ते खुळ काढले होते मिसकॉल द्या अन भाजप मेंबर व्हा! कश्यात काय नाय तर आमच्या नाक्यावर बसणाऱ्या राष्ट्रवादी अन काँग्रेस च्या टग्याना सुद्धा "congratulations" चे मॅसेज आले होते ऑटोमेटेड बीजेपी कडून मेंबर झाल्याबद्दल! अन जनाधार जनाधार कसला सांगताय, किती टक्के मते आली लोकसभेत, बरं ते ही सोडा, जितकी मते मिळाली आहेत ती फ़क्त अन फ़क्त नमो नामक एका सशक्त पर्यायाला मिळाली आहेत! जनाधार होता तर 13 दिवसात सरकार का पडले होते? अन 99 मधेही स्वबळावर का नाही येता आले!? पुर्ण बहुमत यायला 2014 का उजाडावे लागले?? शिवसेना वॉज सेना!! जोवर साहेब होते! नंतर असोच!!
तुम्ही बर्‍याच मुद्द्यांची सरमिसळ करीत आहात. मूळ मुद्दा असा होता की शिवसेनेमुळे महाराष्ट्रात भाजप वाढला असा एक समज आहे. मी आकडेवारी देऊन हे दाखवून दिले आहे की वस्तुस्थिती याच्या बरोब्बर उलट आहे. मिसकॉल देऊन मेंबरशिप, देशात किती मते मिळाली, पहिले सरकार १३ दिवसात का पडले, ९९ मध्ये स्वबळावर का नाही आले इ. गोष्टींचा मूळ मुद्द्याशी कणभरही संबंध नाही. शिवसेनेने स्वतःबद्दल हा गोड गैरसमज जाणीवपूर्वक/अजाणता जोपासलेला आहे की शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपला मोठे केले. काही माध्यमांनीही याच गैरसमजाला खतपाणी घातले आणि मिपावरील काही जणांचे तेच मत आहे. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. भाजपमुळे शिवसेना ठाणे/मुंबईच्या बाहेर पोहोचली ही वस्तुस्थिती आहे. गावोगाव बोर्ड लावले म्हणजे मते मिळतातच असे नाही किंवा पक्ष तळागाळात पोहोचला असेही नाही. महाराष्ट्रात कोणाचा जनाधार जास्त आहे (अगदी मुंबईत सुद्धा) हे ऑक्टोबर २०१४ मध्ये पुन्हा एकदा सिद्ध झाले इतकंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
श
श्रीगुरुजी Fri, 03/18/2016 - 10:45 नवीन
शिवसेनेचे तसे बोर्ड अनेक ठिकाणी होते. पण एक पक्ष म्हणून शिवसेनेला मुंबई/ठाण्यातील काही भाग सोडले तर उर्वरीत महाराष्ट्रात जनाधार नव्हता. शिवसेनेने काँग्रेसच्या अरेला कारे करायला सुरूवात केली ती भाजपने सेनेबरोबर १९८९ पासून युती केल्यानंतरच. त्यापूर्वी सेना काँग्रेसच्या फारशी विरोधात नव्हती. १९७९ च्या निवडणुकीत तर शिवसेनेने चक्क काँग्रेसशी युती करून निवडणुक लढविली होती. १९७९ च्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी घोषणा केली होती, "इंदिराजींच्या हाताला साथ आणि इतर पक्षांना मारा सणसणीत लाथ". काँग्रेसची प्रचंड लाट असूनसुद्धा व काँग्रेसबरोबर युती असूनसुद्धा शिवसेनेला एकही खासदार निवडून आणला नव्हता. आधी लिहिल्याप्रमाणे सेनेला आपल्या स्थापनेपासून पहिल्या २३ वर्षात फक्त २ आमदार निवडून आणता आले होते व एकही खासदार निवडून आणता आला नव्हता. याउलट एप्रिल १९८० मध्ये स्थापना झाल्यावर केवळ दीड महिन्यात स्वबळावर निवडणुक लढवून भाजपने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून १२ आमदार निवडून आणले होते. सेना फक्त मुंबई/ठाण्यात होती, भाजप थोड्या प्रमाणात का होईना पण महाराष्ट्राच्या जवळपास सर्व भागात होता. संघाच्या शाखा महाराष्ट्रात सर्वत्र होत्या व भाजप संघाचेच अपत्य असल्याने भाजपला आपले अस्तित्व दाखविण्याची वेगळी गरज पडली नाही. सेना मात्र मुंबई/ठाण्याबाहेर नव्हती. भाजपमुळेच मुंबईपुरत्या मर्यादीत असलेल्या सेनेची उर्वरीत महाराष्ट्राला ओळख झाली ही वस्तुस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अर्धवटराव Fri, 03/18/2016 - 18:58 नवीन
संघाच्या शाखा महाराष्ट्रात सर्वत्र होत्या व भाजप संघाचेच अपत्य असल्याने भाजपला आपले अस्तित्व दाखविण्याची वेगळी गरज पडली नाही.
छ्या.... संघ आणि भाजपाचा संबंध नाहि या माझ्या थेअरीची वाट लागली. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कपिलमुनी Sat, 03/19/2016 - 10:46 नवीन
स्थापनेनंतर वर्षातच राकॉं चे बरेच (७०+?) आमदार निवडून आले होते, काका भाजपपेक्षा पॉवरफुल होते तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 03/19/2016 - 13:09 नवीन
चुकीची माहिती. जून १९९९ मध्ये स्थापना झाल्यावर ऑक्टोबर १९९९ मधील निवडणुकीत राकाँचे ५८ आमदार निवडून आले होते. नंतर २००४ च्या निवडणुकीत ७१, २००९ च्या निवडणुकीत ६२ व २०१४ च्या निवडणुकीत ४१ आमदार निवडून आले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा