Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी :भाग २

स
संदीप डांगे
Sun, 08/14/2016 - 05:27
🗣 306 प्रतिसाद
पाकव्याप्त काश्मीरही भारताचेच आहे अशी डरकाळी फोडून नरेंद्र मोदींनी आपण एक कणखर पंतप्रधान असल्याचे सूचित केले, त्याच बरोबर गिलगिट बालटीस्थानात जनभावना उसळल्याने पाकिस्तानचे जरा कठीणच झाले आहे, भारतीय यंत्रणा योग्य काम करत असल्याचे हे चिन्ह समजावे काय?

प्रतिक्रिया द्या
69645 वाचन

💬 प्रतिसाद (306)
श
श्रीगुरुजी Tue, 09/06/2016 - 12:27 नवीन
खांग्रेसने उत्तर प्रदेश व पंजाब विधानसभेची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्यावर सोपविलेली आहे. त्यांनी प्रचारासाठी एक नवीन युक्ती काढली आहे. उत्तर प्रदेशात राहुल गांधी अनेक छोट्या खाट (कॉट) सभा घेणार असून त्यात खाटेवर बसून शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत. राहुलच्या सभेसाठी खांग्रेसने शेकडो खाटांची व्यवस्था केली आहे. आज राहुलची पहिली खाट सभा झाली. सभा संपल्यासंपल्या जमलेल्या शेतकर्‍यांनी सभेसाठी आणलेल्या खाटा पळवून नेल्या. Image removed. Commotion breaks out as locals flee with wooden cots after Rahul Gandhi’s khat sabha in Deoria (Image: Twitter @ANI_news)
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 09/06/2016 - 13:35 नवीन
चाय पे चर्चा ची आयडिया बदलून वापरत आहेत किशोर, राहुल गांधींना काहीही मदत होणार नाही प्रशांत किशोरची. नोबडी कॅन हेल्प हिम! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
च
चंपाबाई Tue, 09/06/2016 - 15:27 नवीन
मोदी आवास योजनेत घर देणार. १५ लाख देणार. मग आरामात झोपायला कॉट नको का ? म्हणुन लोकानी कॉट नेली असेल. मोदीनी अटल कॉट योजना जाहिर करायला हवी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
च
चंपाबाई गुरुवार, 09/08/2016 - 21:33 नवीन
भाजपीय शहांची सभा .. http://indianexpress.com/article/india/india-news-india/amit-shah-patidar-meet-hardik-patel-furniture-chaos-gujarat/ Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
इ
इरसाल Tue, 09/06/2016 - 13:57 नवीन
चायपे चर्चा च्या चालीवर, खटियापे चर्चा और खटियापे खर्चा........जरा अश्लिल नाय वाटत !!!!!!! ज्यायला लोकं पण जाम बेक्कार, खाटाच घेवुन पळाले भेंडी. कोणीतरी कृपया मोदींच्या "चायपे चर्चा" नंतर लोकं कप घेवुन पळाल्याचा फोटो आणी डाटा टाकावा. प्लीजच प्लीज
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब Tue, 09/06/2016 - 14:10 नवीन
कोणीतरी कृपया मोदींच्या "चायपे चर्चा" नंतर लोकं कप घेवुन पळाल्याचा फोटो आणी डाटा टाकावा. प्लीजच प्लीज कसंय न , हाती सोटा घेऊन चुचकारले तर आमच्या कुत्रे जमातीत तरी अश्या ट्रॅप मध्ये न अडकायचे शहाणपण आहे, त्यामुळे आमचा दुरूनच भूभू:कार (तुम्हा मिपा वरल्या माणसांच्या भाषेत पास), बाकी मिपावर काय, आम्हीही (पंजावर निवांत डोके ठेऊन) मजा बघावी असे खुपसे इतर प्राणी आहेतच! कोणी अडकलं तर बघू मजा हाय काय अन नाय काय (मानवावर भरोसा नसलेला श्वान) ढेल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
च
चंपाबाई गुरुवार, 09/08/2016 - 05:19 नवीन
मोदी यांनी गेल्या दोन वर्षांत बडे उद्योगपती आणि धनिकांचे जवळपास १.१० लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले .. राहूल गांधी. http://www.loksatta.com/desh-videsh-news/taking-cots-is-stealing-what-about-vijay-mallya-asks-rahul-gandhi-1297892/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/08/2016 - 05:34 नवीन
ROFL at Pappu's babble and believers in his nonsense talk.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/08/2016 - 11:12 नवीन
आता फक्त हिच्याकडूनच सल्ला घेणं शिल्लक होतं. https://www.geo.tv/latest/113804-Malala-calls-on-UN-to-take-notice-of-Indian-atrocities-in-Occupied-Kashmir
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 09/10/2016 - 11:12 नवीन
Musings/Sermons from Malala who has been residing in UK since last 3+ years ___________________________________________________________________________ “I am ready to tell the world that Pakistan is a safe place and teams should go there and play cricket,” Malala told reporters at Edgbaston. “What outside world thinks about Pakistan is not true and all those terrorists are not Pakistani so teams should come and play in Pakistan and wherever I will go I will tell the world about this,” said Malala. वयाच्या १९ व्या वर्षीच ही मुलगी खूप हुशार झालेली दिसते. http://scoreline.asia/malala-to-advocate-return-of-cricket-to-pakistan/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
च
चंपाबाई गुरुवार, 09/08/2016 - 16:21 नवीन
एक फेबु पोस्ट ========================= २०१४ साली सत्तेवर आल्यापासून सत्ताधारी पक्षाने ४७ प्रकरणांत एकूण ५८ जणांवर राजद्रोहाचे खटले भरले. त्यातील एकही प्रकरण न्यायालयात टिकले नाही, इतके ते बिनबुडाचे होते. याआधीच्या सत्ताधारी पक्षाच्या तुलनेत सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे हे खटले अधिक विखारी आणि विषारी होते. याचे कारण राष्ट्रवादाचा ठेका जणू आपल्या एकट्याकडेच दिलेला आहे आणि अन्य सर्व हे देश बुडवायलाच निघाले आहेत, असे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे वर्तन असते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने या सत्ताधारी पक्षाचा चांगलाच मुखभंग होईल. त्याची नितांत गरज होती. कारण पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांइतकेच, किंबहुना त्याहूनही अधिक बेजबाबदार वर्तन करणारे सध्याचे सत्ताधारी नेते, टीकाकारांवर राजद्रोहाची कुऱ्हाड चालवण्यात मश्गूल होते. सर्वोच्च न्यायालयाने अशांना भानावर आणले असून "देशातील नागरिकांना सरकारविरोधात, त्यांना वाटेल ते, अगदी 'काहीही' बोलण्याचा अधिकार आहे" असे नमूद केले. - गिरीश कुबेर [संपादकीय - लोकसत्ता दि ७/९/२०१६ पृ ७
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/08/2016 - 16:49 नवीन
थापा. हार्दिक पटेल व JNU gang वरील देशद्रोहाचा गुन्हा न्यायालयाने कायम ठेवलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Sat, 09/10/2016 - 09:02 नवीन
जे एन यू आणि डी यू ( सेंट्रल - ३/ ४ अपवाद ) मध्ये तुमची एबीवीपी उडाली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Mon, 09/12/2016 - 08:18 नवीन
"सेंट्रल - ३/ ४ अपवाद" पण दुर्दैव असे कि मिडियावाले हेच हायलाईट करत आहेत भाजपकडून पैसे घेवून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
इ
इरसाल Fri, 09/09/2016 - 08:02 नवीन
https://www.youtube.com/watch?v=-Lvku8rwpgc ३:३० पासुन पुढे ऐकावे.
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 09/09/2016 - 22:26 नवीन
झाकीर नाईकांच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन ने राजीव गांधी फाउंडेशनला, ज्याचे संस्थापक सदस्य सोनीया, राहूल, प्रियांका आहेत आणि मनमोहन सिंग पण ट्रस्टचे सदस्य आहेत, २०११ मध्ये "रू. ५० लाख फक्त" दान केले होते.... आज ही बातमी बाहेर आल्यावर काँग्रेसला विचारल्यावर तारांबळ उडाली...
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Sat, 09/10/2016 - 05:15 नवीन
दान कुणीही कुणाला करु शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
सुबोध खरे Sun, 09/11/2016 - 17:35 नवीन
दान कुणीही कुणाला करु शकतो. नक्की ना? मग मोदी साहेबानी आपली "प्रतिमा" अंबानींना दान केलेली चालेल ना ? उगाच काव काव केलीत मागे. किंवा बिर्ला, अदानी, अंबानींनी भाजपाला निवडणूकीसाठी दान केलेले चालेल म्हणता? उत्तम आहे. लक्षात ठेवू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Sun, 09/11/2016 - 18:08 नवीन
डॉक्टरजी/सैनिकजी/प्रोफेसरजी साइड चुकली तुमची. तुम्ही वकिली करायला हवी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 09/12/2016 - 07:08 नवीन
हा सल्ला मला बरयाच लोकांनी दिला होता. वकिलीत एक वकील नेहमीच जिंकत असतो मग तो फिर्यादी असो कि आरोपी. डॉक्टरकीत तुम्ही "नियतीशी" झुंज देत असता त्यात तुमची जीत हि नेहमीच "तात्पुरती" असते. परंतु तुमचा हा तात्पुरता विजय कुणाच्या पराभवाच्या खांद्यावर उभा नसतो. तेंव्हा पुढच्या जन्मी पण मला डॉक्टरच व्हायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Sat, 09/10/2016 - 08:47 नवीन
रेल्वे तिकिट बुकिंग दर१०% तिकिटानंतर दरवाढ होणार. त्यामुळे शेवटी असलेली तिकिटे विमानापेक्षाही महाग होणार. म्हणजे शेठजी लोकानाच ते पर्वडणार !
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Sun, 09/11/2016 - 05:03 नवीन
इतकी वर्षे कपिल शर्माचे बांधकाम बेकायदेशीर होते म्हणे. पण लाचखोरीचा आरोप नव्हता, आता पाच लाखाच्या लाचखोरीचा आरोप झाल्यावर सेना मनसे म्हणतात की त्याचे बांधकाम बेकायदेशीर आहे. याची नेमकी संगती कशी लावायची ?
  • Log in or register to post comments
L
lakhu risbud Sun, 09/11/2016 - 05:58 नवीन
जामोप्या ...अत्यंत अभ्यासू विवेचन
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Sun, 09/11/2016 - 12:19 नवीन
काही दिवसापूर्वी भारत अमेरिकेत लिमोओ करार झाला त्याविषयी वाचायची इच्छा होती, पण चांगले लेख सापडले नाहीत. ह्या कराराचे समर्थन करणारे लेख इंग्रजी वर्तमानपात्रात वाचले होते पण काही उत्तम वाटले नाहीत. आज लोकसत्तात ह्या कराराची विरुद्ध बाजू मांडणारा लेख आलाय त्याची हि लिंक. विंग कमांडर अभय जोशी यांनी लिहलाय. http://epaper.loksatta.com/933542/loksatta-pune/11-09-2016#page/7/2
  • Log in or register to post comments
अ
अमित भोकरकर Mon, 09/12/2016 - 06:44 नवीन
कमांडर साहेबाच्या म्हणन्यानुसार आपण अक्साई चिन आपण चिनला द्यायला हवे होते. मग लगेच सिक्कीम व अरुनाचल प्रदेश पन देउन टाकावे उगाच आपन "महासत्तेशी" पंगा घ्या. मग लगेच काश्मीर आणी पंजाब पाकिस्तानला द्यायला काय हरकत आहे. बाकी हे देश फार सज्जन आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Mon, 09/12/2016 - 19:07 नवीन
पहिली गोष्ट, आज चीन आणि पाकिस्तान ची भारतविरोधी युती होत असताना भारताला जपान, अमेरिका, व्हिएतनाम यांच्याशी सहकार्य वाढवण्याशिवाय पर्याय नाही, असं माझं मत आहे. वर दिलेला लेख माझ्या विचाराशी समांतर नाहीये, परंतु कधी कधी विरोधी मते/लेख समजून घ्यावी लागतात कारण ती आपल्या विचारातील दोष किंवा धोके लक्षात आणून देतात. उदारणार्थ आपण अमेरिकेशी केलेल्या करारानुसार दोन्ही देश एकमेकांचे लष्करी तळ वापरू शकतो. अमेरिका भारतीय तळाचा वापर चीन विरुद्ध करू शकते पण भारत अमेरिकन तळाचा वापर कशासाठी करणार कॅनडा, आफ्रिका, कि मेक्सिको वरील निगराणी साठी? लेखकाने ह्या करारातील दाखवून दिलेला दोष नक्कीच विचारात घेण्यासारखा आहे. कोणताही करार करताना आपला स्वार्थ पहिला पाहिजे मित्र राष्ट्राचे हित नव्हे. दुसरी गोष्ट, सिक्कीम, अरुणाचल, काश्मीर द्या असं लेखक कुठं म्हणतोय हे दाखवून द्या. हे तुमचं interpretation आहे. मुळात लष्करी अधिकारी अस मत कधीच व्यक्त करणार नाही. अटलबिहारी वाजपेयी नीं तिबेट ला मान्यता देऊन सिक्कीम ची मान्यता पदरात पाडून घेतली, त्याच तत्वावर लेखक सूचित करतो की aksai chin हा भाग वरच चीन च अस्तित्व मान्य करून चीन बरोबरचा सीमा प्रश्न सोडवून घ्यावा. अर्थात हे चूक कि बरोबर ह्यावर चर्चा होऊ शकते, पण लेखकाचे हे मत काही कचारापेटीत टाकण्यासारखं नाही. भारत सरकार ला ह्याची जाणीव असल्याने आता पर्यंत कोणत्याच सरकार ने अधिकृत रित्या aksai chin चा विषय द्विपक्षीय वाटाघाटीत चर्चिला नाही (मोदींनी हि नाही). कोणताही देश सज्जन नाही, भारत हि नाही. तसेच कोणताही देश कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो हे काळाने सिद्ध केलं आहे. अवांतर जेव्हापासून भारत अमेरिका संबंध सुधारू लागले आहेत, तेंव्हापासून रशिया आणि पाकिस्तान ची जवळीक वाढू लागली आहे. मागे रशिया ने पाकिस्तान ला हेलिकॉप्टर विकण्या संदर्भात चाचपणी केली होती. आता आलेल्या बातमी नुसार रशिया आणि पाकिस्तान मध्ये पहिली जॉईंट मिलिटरी excersize होण्याची श्यक्यता आहे. भविष्यात भारत अमेरिका जपान व्हिएतनाम यांचा एक गट आणि रशिया चीन पाकिस्तान यांचा विरोधी गट तयार होतोय कि काय याची शंका येतीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित भोकरकर
प
पुंबा Fri, 09/23/2016 - 09:05 नवीन
रशिया आणि पाक यांच्यात होणारा हा संयुक्त युद्धाभ्यास रद्द करण्याचा निर्णय रशियाने उरी हल्ल्यानंतर घेतला. रशिया भारताचा एकमेव विश्वसनिय, ऑल वेदर मित्र आहे हे पुन:पुन्हा सिद्ध होते. काही काळापासून रशिया-पाक-चीन अशी तिहेरी फळी भारत-अमेरिका जवळिकीमुळे निर्माण होताना दिसत होती. आता राजनयाच्या द्रुष्टीने भारताने आपल्या रशियाशी असलेल्या मित्रत्वाचा फायदा करुन घ्यावा आणी पाकिस्तानला चीन आणि रशिया दोहोंपासून दूर करण्याचा प्रयत्न करावा. अर्थात चीन-पाकिस्तान संबंध cpec मुळे शिखरावर आहेत, तरीही चीनला पाकपासून तोडण्यासाठी आणखी कोणते राजनयिक पावले उचलता येतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
ध
धर्मराजमुटके Fri, 09/23/2016 - 12:06 नवीन
तुमची माहिती चुकीची आहे. इकडे वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
अ
अमितदादा Sat, 09/24/2016 - 17:41 नवीन
मुळात आंतराष्ट्रीय संदर्भाबाबतीत ऑल वेदर मित्राची व्याख्या वेदर पाहून मैत्री असा करायला हवा , कोण कायमचा शत्रू नाही कोण कायमचा मित्र नाही, सर्व काही काळाचा महिमा:). असो काही वर्षांपूर्वी अफगाणिस्तान मध्ये रशिया च्या नाकीनऊ आणणारा पाकिस्तान आज रशिया बरोबर चांगले संबंध हळूहळू प्रस्थापित करत आहे. चीन ला पाकिस्तान पासून तोडणे नजीकच्या काळात श्यक्य नाही कारण भारतविरोधी राजकारणात पाकिस्तान चीन च एक हुकमी पत्ता आहे. तसेच CPEC प्रोजेक्ट चीन च्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
ग
गामा पैलवान Sun, 09/11/2016 - 20:23 नवीन
श्रीगुरुजी, आता मलालाचा विषय निघालाच आहे तर थोडी माहिती झाडतो. ही अतिशय दुर्दैवी मुलगी आहे. ब्रिटनचा माजी पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन हा संयुक्त राष्ट्रसंघाचा शिक्षण दूत आहे. याला पाकिस्तानात खाजगी शाळांचं जाळं विणायचं आहे. त्याकरिता कोणतरी एक चेहरा हवा म्हणून झियाउद्दीन युसुफझाई (=मलालाचा बाप) यास गळ घातली. हाही पाकिस्तानातला एक शिक्षणसम्राट आहे. तर मलालाच्या बापाने मलालाला विकायला काढली. हे तालिबान्यांना आवडलं नाही. त्यांनी त्यांच्या परीने (= डोक्यात गोळ्या झाडून) तिला थोपवण्याचा प्रयत्न केला. न्यूयॉर्क टाईम्स मध्ये मलालाचं नाव छापून आल्यावर तिला एकटी सोडायला नको ना? मग ही अक्कल झियाउद्दीनला नव्हती का? छेछे, त्यानेच तर पोटच्या पोरीला विकायला काढली! मलाला हे लांडग्यांच्या हाती सापडलेलं कोकरू आहे. बस एव्हढीच जाणीव ठेवावी ही वाचकांना विनंती. ती जे बोलते ती सगळी पढवलेली पोपटपंची (= script) आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Mon, 09/12/2016 - 04:02 नवीन
तुमच्या ह्या प्रतिसादात मलालाच्या बापाच्या ऐवजी 'अडानी अंबानी' व मलालाच्या जागी मोदींचे नाव घालायची माझी इच्छा होत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सुबोध खरे Mon, 09/12/2016 - 07:05 नवीन
आई आई ग! लांडग्यांच्या हाती सापडलेलं कोकरू चंपाबाईना मोदी साहेब म्हणजे कोकरू वाटले हे वाचून डोळे पाणावले. गहिवरून आले, दिल भर आया आणि असे जे काही होऊ शकते ते सर्व झाले. चंपाबाई मोदी साहेब अख्ख्या काँग्रेस,समाजवादी, सुडोसेक्युलर, डावे, अति डावे या सर्वाना गुजरात मध्ये पुरून जमिनीवर ५फूट ६ इंच उंच आणि ५६ इंच रुंद असे दिल्लीत उरले आहेत. तुम्ही चिंता करणे सोडुन द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
व
विशुमित Mon, 09/12/2016 - 07:22 नवीन
गामा जी , "झियाउद्दीन युसुफझाई (=मलालाचा बाप)" हे मलालाच्या वडील आहेत म्हणून "(=मलालाचा बाप)". बाकी त्यांची पार्श्व भूमी काही का असेनात आपण आपला सुसंस्कृतपणा सोडावा का? नार्कोटेक औषध तीर्थ, चहा आणि अन्नामध्ये देऊन साधक मंडळी जमावणाऱ्या आद्य गुरूं आणि जागतिक हिंसेला खतपाणी घालणाऱ्या मौलवींपेक्षा शिक्षण सम्राट नक्कीच किती तरी पटीने चांगलेच म्हणावे लागतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Mon, 09/12/2016 - 08:00 नवीन
विशुमित, तुमचा रोख सनातन संस्थेकडे आहे हे प्रतिसादातून दिसतं. तसंही पाहता, निरपराध साधकांवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या पोलिसांशी सुसंस्कृतपणे वागून काही उपयोग नाहीच्चे मुळी. त्यामुळे मी आजिब्बात सुसंस्कृत नाही बरंका. बाकी, औषधात वा तीर्थात अंमली पदार्थ सापडल्याचा काही पुरावा वगैरे मिळाला का? की आपली बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 09/12/2016 - 08:13 नवीन
इतके दिवस "संस्थेत" राहून सुद्धा जी व्यक्ती सुसंस्कृत नाही बनू शकली तर मग इतर कथित साधकांनी आपले आयुष्य गुरु चरणी लीन करण्यात काय हासील? "नमस्कार कसा करावा" असले बौद्धिक दुसऱ्यांना पाजणाऱ्यापासून कथित अध्यात्म प्रेमींनी दूर राहिलेलेच बरं..!! विचार नाही पटले की झोडून काढा अशीच प्रतिमा असणाऱ्यांनाचा संग खरंच मोक्षाकडे घेऊन जाईल का ? गुन्हा सिद्ध झाला तरच दोषी असं असेल तर छगन बाप्पा निर्दोषच म्हणावे लागतील नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Mon, 09/12/2016 - 21:31 नवीन
विशुमित, तुमच्या प्रतिसादाचा उद्देश कळला. त्याचं काय आहे की सनातनवाले सगळं सनदशीर मार्गाने करतात. म्हणून सुहेल शर्मासारख्या काही पोलिसांना फुकटची चरबी चढली आहे. न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवण्यापर्यंत सुहेल शर्माची मजल गेली आहे. याची चरबी उतरवण्यासाठी संस्कृती कामाची नाही. आज डॉक्टर तावडे जात्यात आहेत. काल साध्वी, आणि प्रसाद पुरोहित होते. उद्या कोण असेल? संस्कृतीच्या बाता मारणाऱ्यांनी आगोदर या तिघांचा गुन्हा काय आहे ते सांगावे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 09/12/2016 - 09:03 नवीन
४० वर्षांची तपश्चर्या वाया!--- इति नाथा बाबा..!! म्हणे माध्यमांच्या बातम्यांवर विश्वास ठेवल्यामुळे सरकारची कारवाई. माध्यमांवर विश्वास नाही ठेवायचा तर मग कोणावर ठेवायचा "तावडेंवर "???? http://www.loksatta.com/maharashtra-news/eknath-khadse-5-1300387/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 09/12/2016 - 10:58 नवीन
http://www.loksatta.com/maharashtra-news/one-dead-in-malegaon-due-to-electricity-shock-1300525/ गुटखा खाऊन मारलेली पिचकारी एका तरुणाच्या जीवावर बेतली असून, विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. मालेगावमध्ये रविवारी ही घटना घडली. मोहम्मद यासिन असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद आपल्या भावाला भेटण्यासाठी रविवारी मालेगावातील रमझानपुऱ्यामध्ये आला होता. भाऊ ज्या इमारतीमध्ये राहात होता. तिथे गेल्यावर मोहम्मदने गुटखा खाल्ला. इमारतीच्या खिडकीतून खाली थुंकत असताना जवळून जाणाऱ्या वीजवाहिन्यांवर त्याची पिचकारी उडाल्याने त्याला तीव्र दाबाचा विजेचा धक्का बसला. यामुळे तो जागीच कोसळला. नातेवाईकांनी त्याला लगेचच रुग्णालयात दाखल केले. पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. गुटख्याची पिचकारी विजेच्या तारांवर पडल्याने विजेचा दाब उलटा आला आणि त्यामुळे मोहम्मदला विजेचा धक्का बसला. यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मालेगाव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केलेली आहे. हेच का ते 'अच्छे दिन'? अजून केजरीवालांचे ट्विट कसे नाही आले? मुस्लिम असल्यामुळे मोदीजींनी मुद्दामच पिचकारी मारताना तारेत हाय करंट सोडल्याचा आरोप अजून कसा केला नाही? सारांश - गुटखा खाल्ल्यावर तारांवर पिचकारी न मारता जिन्याच्या कोपर्‍यात किंवा तारा नाहीत हे बघून खिडकीतून थेट रस्त्यावर पिचकारी मारावी. म्हणजे जिवानिशी जायचा धोका टळे.
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब Mon, 09/12/2016 - 11:07 नवीन
हेच का ते 'अच्छे दिन'? अजून केजरीवालांचे ट्विट कसे नाही आले? मुस्लिम असल्यामुळे मोदीजींनी मुद्दामच पिचकारी मारताना तारेत हाय करंट सोडल्याचा आरोप अजून कसा केला नाही? छान पिचकारी मारलीय तुम्ही पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 09/12/2016 - 11:09 नवीन

Dawood Ibrahim's money was not swindled, Indian government had it seized

For months Dawood Ibrahim thought that he was being cheated by his own men, but when he realized that his hawala transactions were being blocked by Indian agencies, he was flabbergasted. http://indiatoday.intoday.in/story/dawood-ibrahim-hawala-money-india-seized-dubai/1/762238.html
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 09/12/2016 - 11:12 नवीन

याचसाठी होता केला अट्टाहास

आधीच वादात अडकलेल्या किंवा शोच्या सेटवर वाद निर्माण करु शकतील अशाच काही स्पर्धकांची निवड ‘बिग बॉस’मध्ये केली जाते. याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई बिग बॉसच्या आगामी सिझनमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. टीआरपीचे गणित साधण्याच्यादृष्टीने तृप्ती देसाई यांना ‘बिग बॉस ९’साठी विचारणा करण्यात आल्याचे वृत्त आहे. आता खरी मजा येईल. बिग बॉसमधील इतर स्पर्धक पहिल्याच दिवशी पळून जातील. तृप्ती देसाईच्या बरोबरीने बिग बॉसमध्ये केजरीवाल, कन्हैय्या कुमार व पप्पू सुद्द्धा हवेत. http://www.loksatta.com/manoranjan-news/trupti-desai-will-be-participating-in-bigg-boss-9-1300502/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 09/13/2016 - 15:11 नवीन

प्रवाशाच्या एका ट्विटमुळे रेल्वेच्या टीटीवर काही तासांत निलंबनाची कारवाई

रेल्वेमधून प्रवास करताना शुल्क आकारून त्याची पावती न दिल्याची तक्रार थेट ट्विटरच्या माध्यमातून एका प्रवाशाने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत केली आणि पुढच्या दोन तासांत संबंधित टीटीआय (ट्रॅव्हेलिंग टिकट इन्स्पेक्टर) अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाईही झाली. अगदी वेगाने झालेल्या या कारवाईमुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभाराची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. बाडमेर-कालका एक्स्प्रेसमधून गोविंद नारायण हे शनिवारी बाडमेरहून बिकानेरला निघाले होते. नियमाप्रमाणे सामान्य तिकीट काढून गाडीमध्ये टीटीआयकडे १५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क भरून या गाडीतून प्रवास करता येऊ शकतो. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या डब्यामध्ये टीटीईकडे १५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क जमा केले. पण टीटीआय श्यामलाल यांनी त्याची कोणतीही पावती गोविंद नारायण यांना दिली नाही. त्यामुळे लगेचच त्यांनी सुरेश प्रभू आणि रेल्वेच्या इतर अधिकाऱ्यांना मेन्शन करून या संदर्भातील ट्विट केले. या एका ट्विटमुळे सरकारी कार्यालयातील सूत्रे वेगाने फिरली. लगेचच गोविंद नारायण यांना रेल्वे अधिकाऱ्यांकडून फोन आला आणि त्यांच्याकडे सविस्तर माहिती विचारण्यात आली. संबंधित विभागाचे अधिकारी मुकेश गेहलोत हे लगेचच टीटीआय श्यामलाल यांच्यासोबत संबंधित डब्यामध्ये पोहोचले. तिथे त्यांनी गोविंद नारायण यांच्यासह इतरही प्रवाशांकडे चौकशी केल्यावर त्यांना समजले की अनेक प्रवाशांकडून १५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क गोळा करून त्यांना त्याबदल्यात कोणतीही पावती देण्यात आलेली नव्हती. टीटीआय यांच्याकडील रोकड तपासल्यावर अतिरिक्त रक्कम त्यांच्याकडे जमा असल्याचेही निदर्शनास आले. त्यानंतर लगेचच गेहलोत यांनी याची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार श्यामलाल यांना तातडीने सेवेतून निलंबित करण्यात आले आणि पुढील स्थानकावर त्यांना रेल्वेतून खाली उतरविण्यात आले. http://www.loksatta.com/desh-videsh-news/railway-tti-suspended-after-complaint-on-twitter-1301433/
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Tue, 09/13/2016 - 16:04 नवीन
छान
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Tue, 09/13/2016 - 16:53 नवीन
गोविंद नारायणाने मोदींच्या सांगण्यावरुन १५ (अक्षरी पंधरा- आहे ना लक्षात १५ लाख) रुपयांसाठी टीसीला आणी त्याच्या मासुम कुटुंबियांना रस्त्यावर आणण्याची कट-कारस्थाने केली. (भले सुरेश प्रभु भाजप सरकारात असेना, आमच्या पंजाब आणी गोवा येथील प्रचाराला खीळ घालण्यासाठी खास फ्रान्स मधुन डास मागवुन दिल्लीत चिकनगुनिया पसरवला)
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Tue, 09/13/2016 - 17:10 नवीन
कपिल शर्माने मोदीना ट्विट केले तर मोदीभक्त हसत होते... डायरेक्ट मोदीना ट्विट ? अआता हे चालते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
श
श्रीगुरुजी Tue, 09/13/2016 - 17:16 नवीन
लोचट प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
अ
अमितदादा Wed, 09/14/2016 - 20:27 नवीन
गेल्या काहीवर्षापासून संरक्षण आणि शस्त्रास्त्रे खरेदीसाठी अमेरिकेकडे झुकलेला भारत रशिया कडे परत एकदा वळतोय. हि भारत रशिया संबंधासाठी चांगली गोष्ट आहे. येणाऱ्या काही महिन्यात भारत रशिया बरोबर काही महत्वाचे आणि मोठे डिफेन्स करार करेल. बहुदा रशियाचं आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढलेलं महत्व, चीन आणि पाकिस्तान शी होणारी जवळीक भारताच्या लक्ष्यात आलेली दिसतेय. ह्या बातमीनुसार भारत आणि रशिया मध्ये पाचव्या पिढीतील अत्याधुनिक विमानानंच उत्पादन आणि कामोव हेलिकॉप्टर संधर्भात वाटाघाटी ऍडव्हान्स स्टेज वर आहेत . तसेच येत्या काही महिन्यात भारत रशिया कडून S-400 Triumf हि अत्याधुनिक मिसाईल संरक्षण प्रणाली विकत घेऊ शकतो, तसेच एक अणुपाणबुडी भाडेतत्वावर घेऊ शकते . आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे भारत विकसित करत असलेल्या INS विशाल ह्या अणू उर्जेवर चालणाऱ्या aircraft carrier साठी रशिया ची मदत होऊ शकते. अवांतर १. भारतीय नौदल ची नवीन आणि अत्याधुनिक विनाशकेची माहिती वाचा इथे २. रफाले बरोबर येणाऱ्या अत्याधुनिक air to air क्षेपणास्त्राची माहिती इथे
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Fri, 09/16/2016 - 05:17 नवीन
महाराजांचे आशिर्वाद घेऊ .. सेना भाजपाला निवडून देऊ ... तुरुंगातून कैदी फरार होण्यामध्ये महाराष्ट्राने बिहारला मागे टाकले. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/accused-flee-prison-maharashtra-on-second-position/articleshow/54354845.cms
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 09/16/2016 - 08:31 नवीन
हे अधिकृत आकडे आहेत. एकदा बिहारला जाऊन प्रत्यक्ष पहा. काही लोकांसाठी तुरुंग हा बाहेरपेक्षा जास्त चांगला आहे. दोन वेळच्या जेवणाची सोयही होते. आणि दुसरीकडे काही लोकांचे तुरुंगात राहूनहि राजेशाही थाट चालू असतात जे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला हि लाजवतील. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Fri, 09/16/2016 - 12:04 नवीन
महाराजांचे आशिर्वाद मोदीना मिळाले की कैद्याना ? कैदी पसार होत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा