Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर भारताचा हल्ला

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 09/29/2016 - 11:46
🗣 290 प्रतिसाद
वेगवेगळ्या वाहिन्यांवरील वृत्तानुसार व वेगवेगळ्या संकेतस्थळांवरील बातमीनुसार भारतीय सैन्याच्या तुकड्यांनी आज पहाटे भारत व पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील काही अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला करून काही अतिरेकी व सैनिकांना मारून भारतीय सैनिक सुखरूप भारतीय प्रदेशात परतले. काही वाहिन्यांवरून ५ अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ले केले असे सांगण्यात येत आहे. काही वाहिन्या हीच संख्या ६ व ७ असे सांगत आहेत. आपले २ सैनिक मारले गेले व काही जखमी झाले असे पाकिस्तानने जाहिररित्या मान्य केले आहे. परंतु भारताने सीमारेषा ओलांडलेली नाही असा त्यांचा दावा आहे. या हल्ल्यात भारतीय सैनिकांनी ३०-३५ अतिरेकी मारले असेही आकडे वाहिन्यांवरून सांगण्यात येत आहे. एकंदरीत प्रत्येक वृत्तसंस्था वेगवेगळे आकडे सांगत आहे. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, (http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-conducted-surgical-strikes-last-night-in-pok-to-safeguard-our-nation-defence-ministry-3055715/) ndia conducted surgical strikes last night along the LoC to safeguard our nation, the Defence Ministry said on Thursday. “Significant casualties have been caused to terrorists and those trying to shield them. We don’t have a plan to further conduct such strikes. India has spoken to Pakistan,” DGMO Lt Gen Ranbir Singh said. “… Now, based on very specific and credible information we received yesterday, that some terrorist teams had positioned themeselves at launch pads along the LoC with an aim to carry out infiltration and terrorist strikes in J&K and various other metros in our country. There were launch pads at the LoC where terrorists were present waiting to infiltrate the nation and attack areas in Kashmir and metros across the country,” the DGMO said. No Indian casualties occurred during the surgical strikes that were carried out last night by the Indian Army. Meanwhile, Pakistan, in a statement issued has said: At least two Army men were killed as Indian and Pakistani troops exchanged fire over the Line of Control in “Azad Jammu and Kashmir”. The exchange of fire began at 2:30am, ISPR said, and continued till 8:00am. “Pakistani troops befittingly responded to Indian unprovoked firing on the LoC in Bhimber, Hotspring Kel and Lipa sectors,” the statement said. दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेचे मंत्री जॉन केरी यांनी सुषमा स्वराजांची २ वेळा भेट घेऊन "पाकिस्तानबरोबरील वाद चिघळवू नका" असा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर दोनच दिवसात हा हल्ला झाल्यामुळे भारत या हल्ल्याची तयारी करीत आहे असा अमेरिकेला अंदाज आलेला असावा. या हल्ल्याची व्याप्ती वाढली तर त्याचे छोट्या युद्धात रुपांतर होऊ शकते व त्यामुळे अमेरिकेच्या भारतीय उपखंडातील हितसंबंधावर परीणाम होऊ शकतो. म्हणूनच केरी यांनी जाहीररित्या हा सल्ला दिला असावा. http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-pakistan-situation-relations-saarc-cancel-indus-water-kerry-sushma-swaraj-uri-3055405/ _________________________________________________________________________ असे हल्ले करण्याशिवाय भारताकडे पर्यायच शिल्लक नव्हता. आपली वाट लागली तरी चालेल, पण भारताला सुखाने जगू द्यायचे नाही हा विडा उचललेल्या पाकिस्तानला इतर कोणत्याही मार्गाने थोपविण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी, संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानवर टीका, ट्रॅक २ डिप्लोमसी, पीपल-टू-पीपल कॉंटॅक्ट, बस-ट्रेन सेवा, मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा, भूतकाळातील सर्व युद्धात झालेले पराभव . . . अतिरेक्यांना प्रशिक्षण देऊन व शस्त्रे व इतर सर्व तर्‍हेची मदत देऊन भारतात पाठवून दहशतवादी कारवाया घडवून आणणे व अतिरेक्यांना आपल्या देशात आश्रय देण्याचे धोरण पाकिस्तान बदलायला तयार नाही. त्यामुळे जशास तसे उत्तर देणे हा एकमेव पर्याय शिल्लक होता. आधी पठाणकोट हल्ला आणि आता झालेला उरी हल्ला यामुळे मोदींना जोरदार टीकेचा सामना करावा लागला. आपल्यात व आधीच्या सरकारमध्ये काहीच फरक नाही, आपण नुसते बोलघेवडे आहोत इ. स्वरूपाच्या टीकेमुळे मलीन झालेली आपली प्रतिमा बदलण्यासाठी हा हल्ला करणे आवश्यकच होते. परंतु असे हल्ले करून शत्रूला जरब बसविण्यामागे जी प्रगल्भता लागते ती अजूनही भारताकडे आलेली दिसत नाही. मागील वर्षी आणि परत यावर्षी सुद्धा भारतीय सैन्याने म्यानमारमध्ये प्रवेश करून फुटीरतावाद्यांना मारले होते. सिंधू पाणीवाटप करार रद्द करावा यासाठी चर्चा सुरू आहे. आणि आता आज पहाटे हा हल्ला झाला. या प्रत्येक घटनेनंतर प्रकर्षाने दिसतोय तो प्रसिद्धीचा उतावीळपणा. असे हल्ले गुपचूप करून हल्ले केल्यावरसुद्धा त्याची जाहिरात किंवा गाजावाजा केला नाही तर ते योग्य ठरेल. गतवर्षी म्यानमारमधील कारवाईनंतर लगेच लष्कराने पत्रकार परीषद घेऊन हल्ल्याची माहिती दिल्यावर लगेच म्यानमारने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अतिरेकी किंवा शत्रूच्या सैनिकांवर ज्या कारवाया केल्या जातात त्याची वाच्यता करण्याची गरज नाही. जुलैमध्ये सुरक्षा दलांनी काश्मिरमध्ये अतिरेकी बुर्‍हान वाणीला मारल्यानंतर लगेच ते जाहीर केले होते. त्यामुळे काश्मिरमध्ये जनतेला भडकावण्यात येऊन आजही तिथली परिस्थिती अशांत आहे. बुर्‍हान वाणी ७-८ महिने फरारी होता. त्याला मारल्यानंतर ते जाहीर न करता त्याचा अंत्यविधी गुपचुप उरकला असता तर तो मेल्याचे बाहेर समजले नसते व त्यामुळे पुढील समस्याही निर्माण झाल्या नसत्या. निदान भविष्यात तरी अशा कारवाया शेवटपर्यंत गुपचूप ठेवल्या तर नवीन समस्या निर्माण होणार नाहीत. आजच्या कारवाईची जाहीर माहिती देऊन मोदी सरकारला आपली प्रतिमा उजळून घेण्यास मदत झाली असेल. परंतु त्यातून जिन्गोइझम निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आता पुढील काही दिवसात अत्यंत बेजबाबदार वाहिन्यांवरून वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी व माजी लष्करी अधिकारी एकत्र बोलावून चर्चांचा कीस पाडला जाईल. भाजपचे प्रवक्ते स्वतःची पाठ थोपटून घेतील व काँग्रेसमध्ये असे करायची हिम्मतच नव्हती असे टोमणे मारतील. काँग्रेसवाले बांगलादेश मुक्तीचे उदाहरण देऊन आम्हीचे कसे ग्रेट होता व आमच्या काळातसुद्धा अशा कारवाया होत होत्या, पण आम्ही जाहिरातबाजी करीत नव्हतो असे प्रत्त्युत्तर देतील. यातून युद्ध होऊन दोन्ही देशातील नागरिकांना त्रास होईल व म्हणून अशा हल्ल्यांऐवजी चर्चा करावी असा सल्ला पाकिस्तानप्रेमी निधर्मांध देतील (मराठी वाहिन्यांवर प्रकाश बाळ, जतीन देसाई, हेमंत देसाई इ. मंडळी यात आघाडीवर असतील). भारताने काय करायला हवे याबाबत अनेकांचे सल्ले सुरू होतील. एकंदरीत पुढील काही दिवसात वाहिन्यांवरून प्रचंड धुरळा उडणार आहे. आज झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान वठणीवर येईल व भारतावर हल्ले थांबवेल असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. भारताने अशा कारवाया सुरूच ठेवाव्यात, परंतु त्याचा गाजावाजा करू नये.

प्रतिक्रिया द्या
72104 वाचन

💬 प्रतिसाद (290)
ग
गामा पैलवान Sun, 10/02/2016 - 20:52 नवीन
सोन्याबापु, काय भयंकर प्रशिक्षण आहे ह्यांचं. हे शेवटी जिवंत कसे राहतात! असं वाटतं की कुठल्याश्या फालतू दहशतवाद्यांना पाणी पाजणं काहीच नाही, पण या प्रशिक्षणात यशस्वी होणं म्हणजे अनेकअग्निदिव्ये पार करणं आहे. शेवटची १०० किमीची म्यारेथॉन म्हणजे भेजा कवटीतनं गळून तोंडात उतरण्याची खात्री. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
प्रीत-मोहर Mon, 10/03/2016 - 18:47 नवीन
कारतुस सर, अरुणिमा मॅम आणि आता हा विडियो कधीच हार मानु देणार नाही मला. धन्यवाद बापुसाहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
अ
अनिरुद्ध.वैद्य Sun, 10/02/2016 - 19:22 नवीन
बघावा लागेल. सध्या बूकमार्क करुन ठेवतोय. धन्यवाद देवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 10/02/2016 - 21:07 नवीन
या दिव्यातून तावूनसुलाखून बाहेर पडणार्‍या कमांडोंना कडक सॅल्युट !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ख
खटपट्या Tue, 10/04/2016 - 00:09 नवीन
बाबौ, काय लोक हैत. एक माणूस १०० च्या बरोबरीचा झालाय. या लोकांचे ट्रेनींग फुकट नाही गेले पाहीजे. जबरदस्त लोक हैत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
अ
अर्धवटराव Tue, 10/04/2016 - 02:39 नवीन
भोवळ आली हे सगळं बघुन :) हे ट्रेनींग तर काहि महिने चालेल. पण हि कमावलेली शारीरीक क्षमता त्यानंतर किती महिने टिकेल? कि वरचेवर परत ट्रेनींग घ्यायला लागतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 10/04/2016 - 03:50 नवीन
ट्रेनिंग संपले कि लगेच काउंटर इंसर्जन्सी ऑप्स मध्ये काम सुरु होते काश्मीरात नाही तर नॉर्थ ईस्ट मध्ये, तिकडे ट्रेनिंग कायमच फ्रेश राहते, नाहीतर काही काही वर्षांनी आठवड्याचा किंवा महिन्याचा रिफ्रेशर कोर्स वगैरे असतातच कायम सुरु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
व
विशुमित Tue, 10/04/2016 - 07:35 नवीन
त्रैमासिक बी पी इ टी(Battle Physical Efficiency Test) पास झाल्या शिवाय सुट्टीला जात येत नाही सैनिकांना...!! त्यामुळे "Sharpen the Saw " हे सतत चालतच असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
अ
अर्धवटराव Tue, 10/04/2016 - 20:32 नवीन
आणि त्यांना मॉनिटरी कंपन्सेशन किती मिळतं ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
सुबोध खरे Wed, 10/05/2016 - 09:14 नवीन
माझ्या मर्यादित माहितीप्रमाणे पॅराट्रूपरला ६०००/- रुपये महिना (पगाराच्या व्यतिरिक्त) भत्ता मिळतो आणि स्पेशल फोर्स चा भत्ता ९०००/- रुपये महिना मिळतो. त्यातुन हे लोक बहुतांश वेळा फिल्ड म्हणजे सीमावर्ती किंवा कठीण ठिकाणी कार्यरत असतात तेथे मिळणारा फिल्ड अलाउन्स ५०००/- महिना असे जास्तीत जास्त रुपये २०,०००/- महिना पगारा व्यतिरिक्त मिळतात. त्यांच्या खतरनाक कामासाठी मिळणारी ही आर्थिक भरपाई अत्यंत तुटपुंजी असते. माझा एक वर्गमित्र आर्मीत सर्जन असून त्याने एम एस नंतर टाटा मेमोरियल मधून कर्करोगाच्या शल्यक्रियेचे प्रगत असे प्रशिक्षण घेतलेले आहे. त्याच्या शल्यक्रियेच्या एवढ्या प्रगत प्रशिक्षणामुळे त्याने जरबाहेर व्यवसाय केला तर त्याला एक शल्यक्रियेचे जितके पैसे मिळतात तेवढे पैसे त्याला एक महिन्याला (स्वतःच्या) जीवावर उदार होऊन लढण्यासाठी सरकारकडून मानधन म्हणून मिळतात. हा लष्कराचा पॅराट्रूपर असून त्याने स्पेशल फोर्सचे प्रशिक्षण घेतलेले आहे. यानंतर त्याने नौदलाच्या IMSF कमांडोबरोबर नाविक कमांडोचेही प्रशिक्षण घेतलेले आहे. त्याला हे ( भावनेच्या भरात न जाता कोरड्या वस्तुस्थितीबद्दल) स्पष्ट विचारले असताना तो म्हणाला कमांडो कधीच पैशाकडे पाहून येथे येत नाहीत. एक तर आयुष्यात देशासाठी काहीतरी वेगळे करण्याची आग "आतून" असल्याशिवाय माणूस कमांडो बनू शकत नाही. अर्ध आयुष्य जंगलात आणि बर्फाळलेल्या प्रदेशात घालवायची नाही तर कुणाला हौस असते? मुंबईच्या चित्रपटसृष्टीच्या लोकांना माणसे पैसे सोडून इतर कुठल्यातरी प्रेरणेने काम करतात हे समजतच नाही. अरिहंत किंवा अरिदमन या अणुपाणबुड्यांवर लार्सन अँड टुब्रोचे अभियंते नौदलाकडून एक पैसा जास्त मिळत नसताना रात्र रात्र का काम करतात किंवा इसरो तील शास्त्रज्ञ सरकार कोणताही अधिक पैसे देणार नसताना तहान भूक बाजूला ठेवून काम का करतात? हे या लोकांना समजणारच नाही कारण एवढ्या पातळीवर विचार करण्याची त्यांची कुवतच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 10/05/2016 - 09:45 नवीन
हे या लोकांना समजणारच नाही कारण एवढ्या पातळीवर विचार करण्याची त्यांची कुवतच नाही. +१,००,००० स्वयंकेंद्रित लोकांचे जग "मी, माझा पैसा, माझे हितसंबंध व माझी सोय" या पलिकडे जात नाही. लोकशाहीत अश्या लोकांना यापेक्षा जास्त विचार करण्याची सक्ती अथवा गरज असू शकत नाही... किंबहुना लोकशाहीच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन व्यक्ती/विचार/उच्चार-स्वातंत्र्याच्या नावाखाली कांगावा करून लोकशाहीवर बेमुर्वत टीका करायचीही परवानगी त्यांना लोकशाहीत असते. लोकशाही ही "सद्यस्थतीत सर्वोत्तम व्यवस्था" असली तरी ती "आदर्श व्यवस्था" नाही असे म्हटले जाते, याचे हे एक महत्वाचे कारण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मदनबाण Wed, 10/05/2016 - 10:04 नवीन
लोकशाही ही "सद्यस्थतीत सर्वोत्तम व्यवस्था" असली तरी ती "आदर्श व्यवस्था" नाही असे म्हटले जाते, याचे हे एक महत्वाचे कारण आहे. यामुळेच काही लोकांना वाटेल ते बरळण्याचे धाडस करता येते आणि स्वातंत्र्य देखील मिळते ! वरती मी एका प्रतिसादात एका कंमांडो ट्रेनरचा व्हिडियो दिला आहे, त्यांची माहिती त्यांच्याच संकेत स्थळावर वाचली होती त्याचा दुवा इथे देतो :- http://www.shifuji.in/about-grandmaster-shifuji.php बाकी देशात मोकाट सुटलेल्या निर्बुद्ध वाचाळ मंडळींचा सगळ्यात जास्त राग या कंमांडो ट्रेनरला सुद्धा येतो. यांचा तू-नळीवर प्रचंड शिवराळ आणि खुन्नसने भरलेला व्हिडियो ऑलरेडी व्हायरल आहे. मला सुद्धा पहिल्यांदा ती क्लिप झेपली नव्हती,पण आर्मीच्या कारवाईवर अविश्वास दाखवणारी आणि पर्यायाने जवानांचे मानसिक खच्चीकरण करणारी वक्तव्ये पाहिल्यावर कंमाडो ट्रेनरच्या शिवराळपणाचे खरे कारण परत एकदा नव्याने समजुन आले आणि वाचाळ मंडळींसाठी अशीच भाषा योग्य आहे हे देखील पटले. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Petition to White House seeking to declare Pakistan 'a state sponsor of terrorism' makes new record
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
व
विकास Wed, 10/05/2016 - 18:05 नवीन
मुंबईच्या चित्रपटसृष्टीच्या लोकांना माणसे पैसे सोडून इतर कुठल्यातरी प्रेरणेने काम करतात हे समजतच नाही. अरिहंत किंवा अरिदमन या अणुपाणबुड्यांवर लार्सन अँड टुब्रोचे अभियंते नौदलाकडून एक पैसा जास्त मिळत नसताना रात्र रात्र का काम करतात किंवा इसरो तील शास्त्रज्ञ सरकार कोणताही अधिक पैसे देणार नसताना तहान भूक बाजूला ठेवून काम का करतात? हे या लोकांना समजणारच नाही कारण एवढ्या पातळीवर विचार करण्याची त्यांची कुवतच नाही. १००% सहमत! (डोळ्यांवरचे झापड बाजूला करणार्‍या) माहीतीबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ध
धर्मराजमुटके Wed, 10/05/2016 - 19:06 नवीन
अवांतर आहे या धाग्यावर पण :
लार्सन अँड टुब्रोचे अभियंते नौदलाकडून एक पैसा जास्त मिळत नसताना रात्र रात्र का काम करतात
माझ्यामते हे देशप्रेम संसर्गजन्य आहे (चांगल्या अर्थाने). तुमचा प्रतिसाद वाचून मला माझ्या करीयरच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण झाली. आमच्या कंपनीचा एक हार्डवेअर इंजिनिअर लग्नानिमित्त सुट्टीवर जाणार असल्याने मला विशाखापट्टणच्या नौदलाच्या डॉकयार्डवर एक महिना काम करण्याची संधी मिळाली होती. नौदलाची साईट असल्यामुळे मला अगोदरच कंपनीतल्या लोकांनी घाबरवून सोडले होते. तिथली शिस्त, कडक अधिकारी आणि चुकीला माफी नाही या ब्रीदामुळे मी तेथे काम करु शकेल की नाही याबद्द्ल मला शंकाच होती. मात्र मी नुकताच कंपनीत रुजु झाल्यामुळे नाही म्हणण्याचा पर्याय माझ्याकडे नव्हता. पहिल्या दिवशीच साईटवर पोहोचताच मला बघून तिथला साहेब अगोदरच्या इंजिनिअर वर ओरडला. माझ्याकडे बघून मी इथे काम करु शकणार नाही अशी शंका त्याला आली. मात्र दोन तीन दिवसातच मी त्यांच्या अविश्वासाचे रुपांतर माझ्यावरील विश्वासात करुन घेतले. नंतर ऑफीसमधील अधिकार्‍यांची इतकी मर्जी बसली की एक महिन्यानंतर जुना इंजिनिअर आला तरी मला दोन-तीन दिवस जास्त थांबवून घेतले. काम करत असताना कधी कधी संगणकाची रॅम, सिपीयु, कॅबीनेटचे स्क्रु इ. कधी कधी खिशात राहत ते संध्याकाळी घरी जाताना व्यवस्थित काढून ठेवावे लागत. कधी चुकून विसरलो तर चोरीचा कलंक लागायची शक्यता. सरकारी ठिकाणी चोरीचा आळ आला की मग लंबी छुट्टी. त्यामुळे फारच काळजी घ्यावी लागायची. ऑफीसात वेळेनंतर थांबायला बंदी होती. क्लासीफाईड एरीयाकडे फिरकायची बंदी होती. तर त्या वातावरणात मला देखील शिस्तपालनाची सवय लागली. नौदलाचे शुभ्र गणवेशातील अधिकार्‍यांकडे पाहून एकदम ग्रेट वाटायचे. आपण असे बनू शकलो नाही याची खंत देखील कधी कधी वाटायची. दिवसभर काम आणि सुट्टीच्या दिवशी विशाखापट्टणमच्या समुद्रकिनारी जुन्या पाणबुडीचे संग्रहाल्य बनविले आहे तिला भेट देणे हा माझा महिनाभराचा कार्यक्रम होता. त्या एक महिन्याने मला आयुष्यभर पुरणार्‍या चांगल्या आठवणी दिल्या. देशाची सेवा करणार्‍यांची पैसे घेऊन का होईना पण सेवा करायचा मला संधी मिळाली याबद्द्ल मी एल अँड टी चा कायम आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 10/06/2016 - 06:55 नवीन
देशाची सेवा करणार्‍यांची पैसे घेऊन का होईना पण सेवा करायचा मला संधी मिळाली. मुटके साहेब आपला देश इतका गरीब नाही. कोणीही विनावेतन काम करावे अशीही गरज नाही. नागरिकांनी आपल्या श्रमाचा उत्तम मोबदला घेऊन आपले काम व्यवस्थित केले "तरच" ती एक उत्तम देशसेवा होईल. केवळ लष्करात गेले म्हणजेच देशसेवा असे मुळीसुद्धा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
अ
अर्धवटराव Wed, 10/05/2016 - 20:08 नवीन
और कुछ कहनेकि जरुरत नहि अब.
हे या लोकांना समजणारच नाही कारण एवढ्या पातळीवर विचार करण्याची त्यांची कुवतच नाही.
मला स्वतःला देखील हे कधि कळेल असं वाटत नाहि :( म्हणुनच फक्त _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 10/06/2016 - 10:11 नवीन
बाकी मुंबईच्या चित्रपटसृष्टीच्या लोकांना माणसे पैसे सोडून इतर कुठल्यातरी प्रेरणेने काम करतात हे समजतच नाही. ही जमात खुप वाढायला लागलीय आज काल. आमच्या हापिसातपण असलं काही बरळणारी डोकी दिसलीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बांवरे Tue, 10/04/2016 - 07:02 नवीन
अबबबब !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
स्पार्टाकस Wed, 10/05/2016 - 20:42 नवीन
बापू, ह्या व्हिडीओबद्दल शतशः आभार! सैनिकांच्या शारिरीक क्षमतेला सलाम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ध
धर्मराजमुटके Sun, 10/02/2016 - 09:45 नवीन
बाई, भारताने अहिंसक मार्गानेच उत्तर दिलेय. उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकीस्तान प्रायोजित अतिरेक्यांचे बौद्धीक घ्यावे ह्या उदात्त हेतुने एका ध्यान शिबिराचे आयोजन केले होते. वेळ मुद्दाम रात्र ते पहाटेच्या दरम्यानची निवडली होती. कारण ह्या वेळेत जगातील सर्व कोलाहल थांबलेला असतो. ध्यानधारणा, वैचारिक मंथनास हाच कालावधी योग्य असतो. भारतीय अधिकार्‍यांनी पाकीस्तानात जाऊन हे शिबिर घ्यायचे ठरविले होते कारण शांततेला कोणताही धर्म नसतो. तसेच हे विश्वची आपुले घर अशी धारणा असणार्‍यांनी मानवनिर्मित सीमा लक्षात घ्यायचे काय कारण ? ठरलेल्या कार्यक्रमाअंतर्गत भारतीय ध्यानविद्येच्या शिल्पकारांनी पवित्र देशात जाऊन मार्ग भटकलेल्या जीवांना धर्मोपदेश केला. तुमचा मार्ग कसा चुकीचा आहे हे समजावून सांगताच पतीत झालेल्या देवाच्या लेकरांच्या लक्षात त्यांच्या चुका आल्या आणि त्यानी आपण केलेल्या पापांचे प्रायशित्त म्हणून देहत्याग करायचे ठरविले. आत्मा हा अजर अमर आहे, त्याला शस्त्र मारु शकत नाही, अग्नी जाळु शकत नाही, वारा सुकवू शकत नाही. ह्या वचनास जागून त्यांनी फक्त आपली नश्वर शरीरे त्यागली आणि 'अखेरचा हा तुला दंडवत", "आता कैसे येणे जाणे", "आम्ही जातो आपल्या गावा, अमुचा रामराम घ्यावा" असे अभंग म्हणत ते पददलित निजधामास निघून गेले. तेव्हा पाटकर मॅडम, विथ ड्यु रिस्पेक्ट फॉर ऑल युवर वर्क, आम्ही आपणांस विनंती करतो की माध्यमांतून आलेल्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. आज गांधी जयंतीच्या निमित्ताने अहिंसेचे पालन करुया. अहिंसो परमो धर्म.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 10/02/2016 - 09:53 नवीन
"आता कैसे येणे जाणे" महाप्रचंड लोल वारल्या गेलो आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
प
प्रीत-मोहर Sun, 10/02/2016 - 11:29 नवीन
हा हा हा +११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
च
चौकटराजा Sun, 10/02/2016 - 10:02 नवीन
आपला एकही सैनिक न मारता निष्पापाना मारणार्या धर्मांधाना उधवस्त करणे ही अहिंसाच आहे. जय गांधी जयंति !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 10/02/2016 - 12:00 नवीन
नेहमी पाकिस्तानी बाजू समजावून घेणार्‍या पीसनिक्सनी आताही "सर्जिकल स्ट्राईक्स झालेच नाहीत" हे पाकिस्तानचे म्हणणे खरे मानून भारतिय सरकारला उगाचच दोष देऊ नये... ...नाहीतर "पाकिस्तान खोटे बोलत आहे" असे म्हटल्याचे पाप त्यांच्या माथी लागेल. बघा बुवा ! ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
L
lakhu risbud Sun, 10/02/2016 - 12:12 नवीन
आजच्या गांधीजयंतीचा मिपा वरील "प्रतिसाद ऑफ द डे" असा पुरस्कार या प्रतिसादाला देण्यात यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ट
टवाळ कार्टा Tue, 10/04/2016 - 04:18 नवीन
मिपा इतिहासातला एक अजरामर प्रतिसाद आहे हा, जियो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
स
सही रे सई गुरुवार, 10/06/2016 - 17:15 नवीन
हजार दंडवत घ्या राजे या प्रतिसादासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
स
संदीप डांगे Sun, 10/02/2016 - 12:33 नवीन
कोण पाटकर बाई?
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Sun, 10/02/2016 - 13:25 नवीन
http://www.loksatta.com/mumbai-news/social-activist-medha-patkar-comment-on-surgical-strike-1311755/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
द
दिगोचि Tue, 10/04/2016 - 12:45 नवीन
मेधा पाटकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मदनबाण Sun, 10/02/2016 - 19:03 नवीन
चीन ची नापाक मैत्री... As India mulls scrapping of Indus Water Treaty with Pakistan, China blocks tributary of Brahmaputra in Tibet to build dam China snubs India again, blocks move to ban Masood Azhar at UN China blocks Brahmaputra tributary, impact on water flow in India not clear मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- After Karachi, flight curbs over Lahore too
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Sun, 10/02/2016 - 19:29 नवीन
आपण जरी सिंधु करार मोडला नाही तरी ब्रह्मपुत्रेच पाणी चीन वळवणारच. ड्रॅगनची भुक जबरदस्त आहे अन ब्रह्मपुत्रा नदीचं खोर जलविद्युतनिर्मीतीसाठी प्रचंड अनुकुल आहे. पाकिस्तानचा अँगलतर असणारच. पुर्व पश्चीम आपण मस्त अडकलोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
श
श्रीगुरुजी Mon, 10/03/2016 - 11:19 नवीन
तिसरे महायुद्ध चीन विरूद्ध इतर सर्व असे होईल असे वाटते व ते भारताच्या भूमीवर व भारतीय उपखंडात होईल. चीनची भूक जबरदस्त आहे. चीन अत्यंत विस्तारवादी व साम्राज्यवादी आहे. तैवान हा आपलाच भाग आहे हा चीनचा दावा आहे. भारतातील अरूणाचल प्रदेशावरही चीन हक्क सांगत आहे. चीनचे तिबेट यापूर्वीच गिळंकृत केलेला आहे. चीन इतर देशांच्या तुलनेत अत्यंत बलाढ्य आहे. अमेरिका सुद्धा चीनला दडपून वागत असावी. पाकिस्तानने मूर्खपणा करून काश्मिरचा आपल्या ताब्यात घेतलेला काही भूभाग परस्पर चीनला देऊन टाकलेला आहे. भविष्यात चीन संपुर्ण पाकिस्तान गिळंकृत करू शकेल. दक्षिण चीन समुद्रावर चीनने आधीच हक्क सांगितला असून तिथे एक कृत्रिम बेट बांधले आहे. त्यामुळे जपान, तैवान, फिलिपिन्स इ. देश अस्वस्थ आहेत. चीनच्या तुलनेत हे देश अत्यंत दुर्बळ असल्याने ते निषेध नोंदविण्यापलिकडे फार काही करू शकत नाहीत. व्हिएटनाम व चीनचे संबंध बरे नाहीत. १९७८ मध्ये दोन्ही देशात युद्ध झाले होते व त्यावेळी शूर व्हिएटनामी सैनिकांनी प्राणपणाने चीनला प्रतिकार केला होता. भारताला अधूनमधून थपडा मारून चीन भारताला कायम नर्व्हस ठेवत असतो. भविष्यात चीनला रोखण्यासाठी अमेरिकेला चीनबरोबर युद्धात उतरावेच लागेल. त्यासाठी अमेरिकेला भारत, जपान, फिलिपिन्स, तैवान, व्हिएटनाम इ. देशांची मदत घ्यावी लागेल. चीन अत्यंत तुल्यबळ असल्याने या युद्धात सर्वांचेच जबर नुकसान होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 10/03/2016 - 15:30 नवीन
नोस्रडमस सुद्धा असंच म्हणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 10/03/2016 - 16:45 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
श
श्रीगुरुजी Mon, 10/03/2016 - 16:45 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
श
श्रीगुरुजी Mon, 10/03/2016 - 16:45 नवीन
काय सांगताय! मग चहा द्या बुवा. ::)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 10/04/2016 - 14:04 नवीन
..???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
पुंबा Mon, 10/03/2016 - 15:48 नवीन
पाकिस्तान चीनचे पुढचे भक्ष्य आहे हे सुर्यप्रकाशाइतके सत्य आहे. भारत आणि चीन संबंधांची यापुढील काळात कसोटी लागणार आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सचु कुळकर्णी Mon, 10/03/2016 - 20:59 नवीन
सांगीतल्या जाणारा आकडा ३८ ते ४० . वास्तवात तीथे आपल्या Para SF ने जे मारलय ना घरात घुसुन...कल्पने पलीकडचा आकडा आहे बॉस..ब्रेव्हो ब्रेव्हो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 10/04/2016 - 11:18 नवीन
काँग्रेसच्या वाचाळ संजय निरूपमने सर्जिकल स्ट्राईक झालाच नसून केंद्र सरकार राजकीय लाभासाठी सर्जिकल स्ट्राईकची अफवा पसरवित असल्याचे सांगितले आहे. केजरीवाल व निरूपम या दोघांनीही सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले आहेत. दुसरीकडे काँग्रेसच्या इतर सर्व नेत्यांनी सर्जिकल स्ट्राईकबद्दल शंका उपस्थित न करता सैन्याचे व केंद्राचे अभिनंदन केले आहे. एकंदरीत ही काँग्रेसची दुहेरी स्ट्रॅटेजी दिसते. एकीकडे सैन्याचे अभिनंदन करायचे, केंद्राला पाठिंबा द्यायचा व दुसरीकडे निरूपमसारख्या वाचाळांकडून सर्जिकल स्ट्राईल झालाच नव्हता असे पसरवून केंद्र सरकार व सैन्याबद्दल शंका उपस्थित करून केंद्राला त्याचा राजकीय लाभ न मिळता सरकारबद्दल संशय निर्माण करायचा. सर्जिकल स्ट्राईकची माहिती सर्वात प्रथम सरकारने न देता सैन्याधिकारींनी दिली होती. केंद्र सरकारच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कोणत्याही स्वरूपाचा जिंगोइझम व युफोरिया न दाखविता संयमित प्रतिक्रिया दिली आहे. मागील सरकारला देखील हिणविण्याचे टाळले आहे. म्हणजे राजकीय लाभ उठविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने फारसे काही केलेले नाही. निरूपमच्या म्हणण्यानुसार सैन्य खोटे बोलत आहे. परंतु आपले २ सैनिक मारले गेले व ९ जखमी झाले असे पाकिस्तानने अधिकृतरित्या मान्य केले आहे. म्हणजे ५० अतिरेकी मारल्याचा भारताचा दावा कदाचित अवास्तव मानला तरी काही स्वरूपाचा हल्ला झाला असणार हे नक्की. पाकिस्तान फक्त २ सैनिक मारले गेल्याचे कबूल करतो त्याअर्थी २ पेक्षा बरेच जास्त सैनिक मारले गेले असावेत. म्हणजे कोणत्या तरी स्वरूपाचा हल्ला भारताने केला व त्यात २ ते ५० च्या दरम्यान पाकडे सैनिक/अतिरेकी मारले गेले हे पण नक्की. असो. पुढील सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी सैन्याने निरूपम व केजरीवालांना प्रत्यक्ष साक्षीदार या नात्याने बरोबर न्यावे. या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारतातील काही जणांच्या बुडाला आग लागली आहे हे मात्र नक्की.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 10/04/2016 - 13:59 नवीन
भारतीय सैन्याने कधीही राजकारणात लुडबूड केल्याचे पुरावे केजरीवाल व संजय निरूपम यांचे कडे असतील तर ते त्यानी द्यावे नाहीतर....... देशद्द्रोही असल्याचा खटला या दोघांवर भरता येइइल काय याचा पाठपुरावा सर्व निवृत्त सरन्यायाधीशानी करावा॑.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मदनबाण Tue, 10/04/2016 - 14:08 नवीन
केजरीवाल व संजय निरूपम या दोघांनाही सर्जिकल ऑपरेशन बद्धल फार शंका आणि उत्सुकता निर्माण झालेली दिसत आहे. लष्कराने गुपचुप १- १ कंमांडो एका रात्री यांच्या घरी पाठवुन ध्यावा { १च बास यांना } दुसर्‍या दिवशी हे स्वतःहुन पाकिस्तानला सांगतील... अरे गलती से भी बॉर्डर क्रॉस करके इधर किसिको मत भेजना ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
L
lakhu risbud गुरुवार, 10/06/2016 - 08:45 नवीन
Aam Admi Party lead by Arvind Kejwariwal & Indian National Congress lead by R.R.Gandhi are working very hard to give NDA lead by BJP a 400+ mandate in 2019 Loksabha elections.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
र
राघव Tue, 10/04/2016 - 19:30 नवीन
सगळ्या तथाकथित शांतीप्रीय आणि [लघु/दीर्घ]शंकावाद्यांना हे एक मस्त उत्तर आहे - http://zeenews.india.com/news/india/major-gaurav-arya-writes-open-letter-blasts-karan-johar-mahesh-bhatt-and-people-batting-for-pakistani-artists-must-read_1936575.html हे वाचून व्हॉट्सअ‍ॅप वरचा एक मॅसेज आठवतो - "कधी कधी केवळ सांगून काही फरक पडत नाही.. कानफट्टात सुद्धा द्यावीच लागते."
  • Log in or register to post comments
र
रॉजरमूर Tue, 10/04/2016 - 23:10 नवीन
काल एका कार्यक्रमात ओम पुरी ने जे अकलेचे तारे तोडले आहेत ते अतिशय संताप आणणारे होते . काही चिल्लर पाकिस्तानी रुपड्यांकरता हा आपल्या सैन्याला शिव्या घालत आहे . कारण का तर हा एका पाकी चित्रपटात काम करत आहे . हे असले लोकं जर भारतात असतील तर भारताला शत्रूची गरजच काय ? Image removed. https://youtu.be/03M__i9Tbqo?t=1s ही त्या कार्यक्रमाची लिंक
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल रेडकर गुरुवार, 10/06/2016 - 07:42 नवीन
मला समजत नाहीय कि आता काँग्रेसचे प्रतिनिधी सांगताहेत कि त्यांच्या कारकिर्दीत पण असे सर्जिकल स्ट्राईक्स झाले ते पण जास्त इंटेंसिटी चे झाले होते.तेव्हा तर त्यांनी कसलेही प्रूफस दिले नाहीत आणि आता तोंड वर करून पुरावे कसले मागताहेत ? म्हणजे आता पहिल्यांदा त्यांच्याकडून पुरावे मागितले पाहिजेत मग आम्ही देऊ असं भाजप गव्हर्नमेंट ने सांगायला हरकत नाही. ;)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/06/2016 - 09:32 नवीन
हे घ्या सर्जिकल स्ट्राईक्सचे पाकिस्तानने दिलेले पुरावे... १. पाकिस्तानी पोलिस अधिकार्‍यावर केलेल्या स्टिंग ऑपरेशनने उघड केलेले सर्जिकल स्ट्राईक्सचे तपशील... Pakistan army caught by surprise, lost 5 men: PoK cop reveals in sting operation २. पाकिस्तानी "डॉन" वर्तमानपत्राने जाहीर केलेले पकिस्तान शासन आणि सैन्यदलातले बदललेले नाते व त्यांच्या संयुक्त सभांमधिल चर्चेचे तपशिल... In extraordinary development, Pak's Nawaz Sharif govt orders Army to act against terrorists, Dawn reports सर्वच बातमी माहितीने भरलेली आहे. पण, त्यातले खालचे वाक्य आंतरराष्ट्रिय राजकारणच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे... In addition, Chaudhry said that Chinese authorities have conveyed their willingness to keep putting on technical hold a UN ban on Jaish-e-Mohammad leader Masood Azhar, but they have questioned the logic of doing so repeatedly.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 10/06/2016 - 11:50 नवीन
इतके दिवस फिलिपाईन्स अमेरिकेची आय माय काढत होता आणि चीन आणि रशियाकडुन शस्त्रे घेउ असे आता म्हणु लागला आहे. यात आता पाकड्यांची भर पडली ! संदर्भ :- 'Pakistan would move towards China, Russia as US is declining power' मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- India asks Pakistan to 'abandon futile quest' of Kashmir at the United Nations
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/06/2016 - 12:04 नवीन
हे पण "पोश्चरिंग" आहे ! पाकिस्तानमधले लुंटरसुंटर कर्नल्सही वाघाच्या आवेशात अणूबॉंबच्या धमक्या देत होते, आता त्यातला अणूबॉंबमधला अ सुद्धा अस्पष्ट झाला आहे ;) आताही सर्जिकल स्ट्राईक झाल्यावर दोन्ही शरिफांनी अंकल सॅमची बाही पकडली होती. चीन अमेरिकेपेक्षा मोठा "पाऊंड ऑफ फ्लेश" वसूल केल्याशिवाय मदत करणार नाही हे न ओळखण्याइतके पाकिस्तानी शासक व जनरल्स खुळे नाहीत. याशिवाय, पाकिस्तानी शासक व जनरल्सच्या करोडो डॉलर्सच्या गुंतवणूका अमेरिकेत आहेत... त्या "फ्रिझ करू अशी अफवा" उडाली तरी त्यांना दे माय धरणी ठाय होईल ! :) नुकताच पाकिस्तानबरोबर सराव (तो ही भारताच्या अमेरिकेकडे झुकावाविरुद्ध पोश्चरिंग होता) केला असला तरी सर्जिकल स्ट्राईकच्या संदर्भात रशियाचे निवेदन भारताच्या बाजूने झुकणारे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा