Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हात दाखवून अवलक्षण

न
नाखु
Mon, 10/24/2016 - 06:56
🗣 306 प्रतिसाद
करण जोहरच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने उठलेल्या वादामुळे झालेली परिस्थीती आणि त्याच्या प्रदर्शनाला होणारा मनसेचा तीव्र विरोध याच्यावर तोडगा काढण्यात आला. पण या सगळ्या प्रकाराने खालील प्र्श्न उदभवले आणि त्यावरच मिपाकरांची नक्की काय मते आहेत म्हणून हा काथ्याकुट.
  • सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
  • निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
  • महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी?
  • मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय?
  • आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे?
  • या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.
विधायक कामाबाबत चर्चा/विरोध याची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वानवा असताना हा विनाकारण शेपटीला आग लावून फिरण्याचा प्रकार आणि बळजुबरीने सैनीकांना यात ओढण्याचा प्रयत्न पाहून मला व्य्क्तीशः राज ठाकरे यांच्याबद्दल कीव +घृणा च वाटली. (एके काळी मनसे स्थापनेवेळी मी खंदा समर्थक होतो त्या पार्श्वभूमीवर जास्तीच राग आला) कुणी काहीही करावे आणि सैनिक कल्याण निधीस पसे दिले तर त्यांचे अपराध/ चुका माफ केल्या जातील हे गृहितकच मोठे लाजिरवाणे आहे. काही माजी सैनीक अधिकार्यांनी याचा धिक्कार आणि निषेधही केला आहे. मिपाकरांना काय वाटते?
वर्गीकरण
घडामोडी

प्रतिक्रिया द्या
65050 वाचन

💬 प्रतिसाद (306)
श
श्रीगुरुजी Mon, 10/24/2016 - 19:51 नवीन
यात काहीच नवीन नाही. माझ्या प्रतिसादाचा प्रतिवाद न करता आल्याने समोरच्याने चिरडीला येउन संदर्भहीन व व्यक्तिगत टिप्पणी करणे हे नेहमीचेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
साहना Tue, 10/25/2016 - 03:18 नवीन
फालतू टिवटिव आणि दलाल ह्या शब्दांत सौजन्यहीन असे काही आहे असे वाटत नाही. "श्री गुरुजी" असे सोज्वळ नाव धारण करणारी व्यक्ती खंडणीखोर वृत्तीची आणि अपली पदाची शपथ मोडणाऱ्या मुख्यमंत्र्याची बाजू मांडत आहे अन नेत्यासाठी "दलाल" हा शब्द १००% योग्य वाटतो. खुद्द मुख्यमंत्र्यानी जे काही केलं आहे त्याची बातमी इंग्रजी वर्तमान पत्रांनी "brokered" अशी दिली आहे. गुरुजींचा युक्तिवाद "फालतू टिवटिव" ह्याच सदरांत मोडतो. प्रत्यक्षांत श्री गुरुजी हे फार चांगले व्यक्ती असतील ह्यांची शंका नाही पण पक्ष भक्तीने त्यांना आंधळे बनवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
व
विशुमित Tue, 10/25/2016 - 06:36 नवीन
<<<<< राष्ट्रवादीच्या समर्थकांना पण सहन करतो>>>> -- उपकारच झाले मायबाप आमच्यावर. कुठे ऋण फेडू हे. या जन्मात तर शक्यच नाही. (हलके घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
अ
अभिदेश Mon, 10/24/2016 - 20:26 नवीन
आणि सौजन्यहीन प्रतिसाद .... हे अनेकवेळा झालेले आहे. तुमच्या इतर धाग्यावरच्या प्रतिसादावरून आम्ही तुम्हाला पवार साहेबांचे दलाल असे म्हटले तर चालेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक Mon, 10/24/2016 - 20:36 नवीन
डांगेण्णा.. प्रतिसाद पटला नाही. तुमचा वाद घालण्याचा स्टॅमिना संपला असेल तर गुरूजींकडे दुर्लक्ष करा. सरकारचे चुकले आहे आणि गुरूजी लंगडी बाजू सावरत आहेत हे स्पष्टपणे दिसत आहे. बादवे.. "आपण अशी भाषा वापरणे = आपल्या बाबतीत दुसर्‍याला अशीच भाषा वापरण्याची परवानगी देणे"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ब
बोका-ए-आझम Mon, 10/24/2016 - 20:39 नवीन
भाजपचे दलाल नकोत इथे मिपावर,
१. बाकी पक्षांचे दलाल चालतील का? २. मिपावर काय चालेल आणि काय नाही हे नीलकांत आणि संपादक यांना ठरवू द्या की. तुम्ही नक्की कुठल्या अधिकाराने हे बोलताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अर्धवटराव Mon, 10/24/2016 - 18:54 नवीन
सरकारने दोन विरोधी पार्टींना आमने-सामने बसवुन वाद मिटवावे, आंदोलनं टाळावी यात काहिच वावगं नाहि, नवखं देखील नाहि. बाँबे पासुन ते झेंड्यापर्यंत, आणि क्रिकेट सामन्यांपासुन ते अमुक तमुक लवादापर्यंत हेच धोरण अनेकदा नौभवलं आहे महाराष्ट्राने. यंदा फरक हाच, कि मनसेला एकदम सीएम लेव्हलची मध्यस्थी मिळायला नको होती. त्यामागे कदाचीत आगामी मुंबई इलेक्शनचे आराखडे असतील. दुसरी बाब म्हणजे ५ करोडच्या देणागीला खंडणीचा वास येणे. करण जोहर वगैरे मंडळींना काहिच तोशीक न लागता प्रकरण मिटु नये, व सैनीक कल्याणा फंडाला चार पैसे मिळवुन देऊन आपलं उदात्तीकरण करावं हा त्यातला स्वार्थ-परमार्थ असु शकेल. अदरवाईज जे झालं त्यात काहि खटकण्यासारखं काहि नाहि. या प्रकरणाची भारत-पाक व्यापारी संबंधांशी याचि तुलना करणे फारच हास्यास्पद आहे. मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा, इतर व्यापार हे सर्व वाणिज्य, अर्थ, गृह, अगदी मिलट्री इंटलीजन्स आणि गुप्तहेर संघटनांच्या कॉर्डीनेशनचे उद्योग आहेत. आणि ते काय योग्य ते करतीलच. एखाद्या चित्रपटाच्या रिलीजशी त्याचा संबंध जोडणे म्हणजे फारच झालं.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 10/24/2016 - 19:01 नवीन
सैनीक कल्याणा फंडाला चार पैसे मिळवुन देऊन आपलं उदात्तीकरण करावं हा त्यातला स्वार्थ-परमार्थ असु शकेल. अदरवाईज जे झालं त्यात काहि खटकण्यासारखं काहि नाहि. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते माहित नाही पण त्यातून आयजीच्या जीवावर बायजी उदारचा वहीम येतोय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Mon, 10/24/2016 - 19:09 नवीन
तसा तो आहेच. नुसतच इशारे वगैरे देऊन प्रकरण मिटवलं असतं तर ठाकरेंच्या हाति काहि लागलं नसतं. पक्षाला खंडणी मिळाली असती ( ति तशीही मिळाली असेल टेबलाखालुन) तर उरली-सुरली इज्जत गेली असती. नैसर्गीक आपत्ती, खेळ, पुतळे वगैरे करता पैसे घेऊन काहिच फायदा झाला नसता. सैन्याकरता पैसे घेऊन ठाकरे गंगेत बुडी मारायला गेले, पण ते प्रकरण अंगावर शेकलं दिसतय. खास करुन सैन्याधिकार्‍यांनी कानउघडणी केल्यामुळे काहि उत्तर पण देत येणार नाहि मनसेला. हे थोडं हात दाखवुन अवलक्षण झालेलं आहे मात्रं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 10/24/2016 - 19:12 नवीन
=)) आयजीच्या जीवावर चे हे इंटरप्रिटेशन उच्चं वाटले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
ग
गामा पैलवान Mon, 10/24/2016 - 18:58 नवीन
श्रीगुरुजी,
क्षणभर असं गृहित धरू की त्यांनी राज व करणला एकत्र बोलवून त्यांच्याशी वाटाघाटी करून गंभीर घोडचूक केली. पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं?
मलाही नेमका हाच प्रश्न पडला आहे. फडणविसांनी नक्की काय करायला पाहिजे? लांडे कारभार करायला सांगितलं होतं कोणी करण जोहरला? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 10/24/2016 - 19:02 नवीन
मांडवली घटनात्मक अन कायदेशीर कशी ती सांगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी Mon, 10/24/2016 - 19:46 नवीन
मांडवली या शब्दाची घटनात्मक व कायदेशीर व्याख्या सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
संदीप डांगे Mon, 10/24/2016 - 21:02 नवीन
मोगाखान ला सर्रास शिव्या पडताना गप्प एन्जॉय करणारे, गुरुजींची पडेल बाजू सांभाळायला, (पर्यायाने भाजपची ) सरसावून मैदानात येतायत, कभी ख़ुशी कभी गम! 'माझी भाषा' याविषयी चाललेले विचारमंथन म्हणजे गुरुजींच्या उघड्या पडलेल्या पितळाला झाकण्याची, मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याची केविलवाणी धडपड, ऐ दिल है मुश्किल! माझे प्रतिसाद आक्षेपार्ह असतील तर संपादक मालक कार्यवाहीसाठी समर्थ आहेत, मालकांची द्वाही देणाऱ्यांना इतके समजले तरी पुरे! कभी अलविदा ना कहना! कुणाचेही नाव घेऊन कुणाला अपशब्द वापरला नाही ही नेहमीची अलिबाय, माझ्याच बाबतीत नेहमी विसरतात कसे, याचेही आश्चर्य नाही! कल हो ना हो! मनोरंजनाची हि पहिलीच वेळ नाही व शेवटचीही नसणार :) =))
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Mon, 10/24/2016 - 21:18 नवीन
मोगाखानशी बरोबरी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
र
रुपी Mon, 10/24/2016 - 21:20 नवीन
कुछ कुछ होता है राहुल.. तुम नही समझोगे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक Mon, 10/24/2016 - 21:29 नवीन
लैच करमणूक करायला लागलात की. भाजप = गुरूजी..? मोगाखान ला सर्रास शिव्या पडताना गप्प एन्जॉय करणारे, गुरुजींची पडेल बाजू सांभाळायला, (पर्यायाने भाजपची ) सरसावून मैदानात येतायत, कभी ख़ुशी कभी गम! गुरूजींची पडेल बाजू कोण सांभाळत आहे..? इथे तुमच्या प्रतिसादाला विरोध नोंदवणार्‍या किती जणांनी गुरूजींना पाठिंबा दर्शवला आहे? नीट बघा जरा. 'माझी भाषा' याविषयी चाललेले विचारमंथन म्हणजे गुरुजींच्या उघड्या पडलेल्या पितळाला झाकण्याची, मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याची केविलवाणी धडपड, ऐ दिल है मुश्किल! हा हा.. खूपच विनोदी प्रतिवाद. यावर शब्द खुंटले. मुद्द्यावरून लक्ष हटवणे...??? - गिव्ह अ ब्रेक..!!!!! माझे प्रतिसाद आक्षेपार्ह असतील तर संपादक मालक कार्यवाहीसाठी समर्थ आहेत, मालकांची द्वाही देणाऱ्यांना इतके समजले तरी पुरे! कभी अलविदा ना कहना! असो. यावर पास. कुणाचेही नाव घेऊन कुणाला अपशब्द वापरला नाही ही नेहमीची अलिबाय, माझ्याच बाबतीत नेहमी विसरतात कसे, याचेही आश्चर्य नाही! कल हो ना हो! यासाठी आपण स्वतः शब्द जपून वापरायचे असतात. कोण कुणाच्या सहाय्याने कोणत्या विचारधारेची भलामण करत असते आणि कोण सरसकटीकरणाचे पिवळे चष्मे घालून प्रतिसादांचा रतीब पाडत असते हे न कळण्याइतके पब्लीक खुळे नसते. असो, तुमच्या प्रतिसादाला विरोध केला तर लगेचच सरसकट वैयक्तीक लेबले लाऊन आलेला प्रतिसाद पाहून आश्चर्य वाटले नसले तरी याही प्रतिसादाचा टोन पटला नाही हे खेदपूर्वक नमूद करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ब
बोका-ए-आझम Mon, 10/24/2016 - 22:03 नवीन
माझी भाषा' याविषयी चाललेले विचारमंथन म्हणजे गुरुजींच्या उघड्या पडलेल्या पितळाला झाकण्याची, मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याची केविलवाणी धडपड, ऐ दिल है मुश्किल!
Joke of the day! इथं तुमच्या प्रतिसादांना अाक्षेप घेणाऱ्या किती जणांनी गुरुजींच्या युक्तिवादाला समर्थन दिलंय ते एकदा बघून घ्या आणि मग काय ते बोला. नेहमी भाजपच्या बाजूने लिहिणाऱ्या किती जणांनी इथे सरकारची बाजू घेतलीय ते नीट बघा. अगदी धागा काढणाऱ्या नाखुकाकांपासून सुरूवात करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मृत्युन्जय Wed, 10/26/2016 - 13:22 नवीन
तुमच्या भाषेबद्दल सर्वप्रथम आक्षेप मीच घेतला आहे. तरी वरील सर्व आक्षेप माझ्याबद्दल असतील तर ते आधी स्पष्ट करावे तर मी पुढील प्रतिसाद देतो. अन्यथा उगाच तुमच्याबद्द्दल गैरसमज करुन घेउन प्रतिसाद देण्यात हशील नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कपिलमुनी Mon, 10/24/2016 - 21:22 नवीन
श्रीगुरुजींना आदर्श गुरुजी पुरस्कार , भगवी शाल आणि कमलपुष्प देउन सत्कार करण्यात येत आहे .
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 10/24/2016 - 21:24 नवीन
इथे ५० जणांनी ५०० प्रतिसाद लिहीे तरी गुर्जीं काय ऐकणार नाहीत, फक्त लिहीणारांची चिकाटी या मुद्दयांवर टिकते का हे पहायचा आहे !
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 10/24/2016 - 23:47 नवीन
पैसाताई,
गुंडगिरीचा समाचार घ्यायला महाराष्ट्र पोलीस समर्थ आहेत.
हाहाहा ! ज्योक ऑफ द डेकेड !! ऑगस्ट २०१२ चे आझाद मैदानातले दंगे विसरलात की काय? त्यानंतर पोलिसांचा मोर्चा निघाला होता. त्यातलं हे चित्रं खास तुमच्यासाठी डकवतोय : Image removed. पोलीस मनसेवर का हात उचलणार नाहीत हे वरील चित्रातून कळतं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 10/25/2016 - 07:29 नवीन
राजकीय इच्छाशक्ती दाखवावी. गोव्यासारख्या लहान राज्याचे पोलीस टोल बूथ मोडणाऱ्या नारायण राणेंच्या सुपुत्राला झोडून काढून आत टाकू शकतात तर महाराष्ट्र पोलिसात नुसत्या लाठीने सशस्त्र अतिरेक्यांचा सामना करायची हिम्मत आहे. थोडा विश्वास दाखवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
साहना Tue, 10/25/2016 - 02:26 नवीन
१. सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी. देश स्वतंत्र असेल तर कायद्याने ज्या गोष्टीची मुभा दिली आहे ते करण्याची १००% मुभा सर्वानाच असून त्यांत बंदी इत्यादींची भाषा करणारे गुंड आहेत. मुलीची छेड कडणाऱ्याला काय करतात तेच त्यांचे करावे. २. निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत. न्यायालयाला क्रिकेट नियामक मंडळ चालवण्याचे फार महत्वाचे काम असताना कायद्याचे रक्षण वगैरे करण्याचे फुटकळ काम करण्यासाठी काम नसावा. त्या शिवाय ह्यावर कायदेशीर निर्णय येई पर्यंत फवाद खान ला नातवंडे होतील. ह्या शिवाय न्यायालयाच्या निवडायचे पालन होईल ह्याची काय शाश्वती ? गुंड गिरीची भीती असेल तर तुम्ही आपल्या मुलांना चित्रपट गृहांत पाठवाल का ? इतर ५६ विषय सोडून राज ठाकरेंनी "चित्रपट" हेच क्षेत्र गुंडगिरी दाखविण्यासाठी का वापरले ? कारण इथे "वेळेला" महत्व आहे. ३. महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी? इथे फक्त चित्रपटाच्या गल्ल्याचा आणि निर्मात्यांच्या फायद्याचा प्रश्न नाही. चित्रपटाच्या डिस्ट्रिब्युशन मार्केटिंग साठी आधीपासूनच पैसे खर्च केलेला असतो. बहुतेक करून चित्रपटगृहांनी ऍडव्हान्स मध्ये प्रिंट्स आणि स्क्रिन्स बुक केलेल्या असतात. अनेक लोकांचे भवितव्याचा इथे प्रश्न आहे. करण जोहर चा चित्रपट लागला नाही तर पुढच्या वेळी त्याला ऍडव्हान्स डील्स बुक करणे मुश्किल होईल. ४. मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय? १००%. मुख्यमंत्र्यांचा निर्णय मूर्खपणाचा होता. २०% आमदार असणाऱ्या पक्षाने धमकी दिली असती तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः लाख घालून कायद्याचे रक्षण चित्रपटाला द्यायला पाहिजे होते. मनसेचे आमदार आहेत १. अश्या पक्षाची धमकी फार तर पोलीस अधीक्षकांच्या पातळीवर हाताळली गेली पाहिजे होती. ५. आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे? खंडणीचा पैसे कुठे जातो ह्यावर काहीही अवलंबून राहत नाही. खंडणी ती खंडणी. ६. या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे. ह्या वादांत राज ठाकरे ह्यांच्या फायदा झाला आहे. फक्त १ आमदार असून सुद्धा आपण कोणी तरी मोठे नेते आहोत हे त्यांना दाखविण्याची संधी फडणवीसांनी विनाकारण उपलब्ध करून दिली आहे. आत रिपब्लिकन पक्ष, शेकाप, शिवसेना, AIIMB इत्यादी मंडळी सुद्धा त्यांच्या छाताडावर चढतील ह्यांत काहीही शंका नाही. कायदा हि सोयीस्कर आहे तेव्हांच अंबलबजावणी करण्याची गोष्ट नाही. उलट जेव्हा कायदा बजावण्यात धोका असतो तेव्हांच देशाच्या कायद्याची खरी कसोटी लागते. देवेंद्र ह्याच्या वागणुकीतून महाराष्ट्रांत कायदा बजावण्याची धमक नाही हेच स्पष्ट झाले आहे. इथे काँग्रेस वाला मुख्यमंत्री असता तर त्याने करण जोहर कडून १० कोटी घेतले असते १ राजला दिला असता ९ आपण ठेवले असते आणि चित्रपट शांत पाने लावू दिला असता आणि सार्वजनिक रित्या लोकांचा प्रक्षोभ टाळला असता. हे १० कोटी नंतर कारण जोहर ने तिकिटांचे दार वाढवून वसूल केले असते.
  • Log in or register to post comments
र
राही Tue, 10/25/2016 - 07:08 नवीन
"इथे काँग्रेस वाला मुख्यमंत्री असता तर त्याने करण जोहर कडून १० कोटी घेतले असते १ राजला दिला असता ९ आपण ठेवले असते आणि चित्रपट शांत पाने लावू दिला असता आणि सार्वजनिक रित्या लोकांचा प्रक्षोभ टाळला असता. हे १० कोटी नंतर कारण जोहर ने तिकिटांचे दर वाढवून वसूल केले असते." इथे असे काही झालेले नाही असे छातीठोकपणे सांगता येईल? सैनिक फण्डला काही रक्कम उघडपणे देऊन उरलेले निम्मे निम्मे वाटून घेतलेले नाहीत असे छातीठोकपणे सांगता येईल? अशा बातम्या विकीवर किंवा पेपरमध्ये येत नसतात. लोकांना दाट संशय आहे हे खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
म
मोदक Tue, 10/25/2016 - 07:15 नवीन
या ठिकाणी भाजपाने पैसे खाल्ले आहेत आहे असे छातीठोकपणे सांगत असाल तर पुरावे आणा. आपणच आरोप करायचे आणि पुरावे नसल्याने समोरच्यालाच निर्दोषत्व सिद्ध करायला सांगायचे ही केजरीवाली पद्धत जुनी झाली. पत्रकारांना, सत्तेत नसलेल्यांना किंवा अगदी मराठी संस्थळावर आपल्या पक्षाचा अजेंडा रेटवणार्‍या खर्‍या खोट्या आयडींना हे सगळे करण्याबाबत काय काय मिळत असावेत याबाबत अनेकांना अनेक संशय आहेत. हे ही खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Tue, 10/25/2016 - 07:30 नवीन
एक तर संशय म्हणजे आरोप नव्हे. आणि असे संशय व्यक्त करण्यासाठीच तर माध्यमे असतात. तुम्ही आमच्यावर संशय घ्यायचे, आम्ही तुमच्यावर हे चालतेच. आणि पक्षाचा अजेंडा संतप्त भक्तिभावाने कोण रेटते ते वेगळे लिहायला नको. आणि भाजपसुद्धा काही धुतल्या तांदळासारखा नाही. डाळ घोटाळे, व्यापम (हा तर अनेक खून पडलेला न भूतो न भविष्यति असा घोटाळा, यात एकटा भाजप नव्हता, तरीसुद्धा) वगैरे.. आरोप केलेला नाही याबद्दल ठाम. त्यामुळे तुमची आव्हानेबिव्हाने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 10/25/2016 - 10:11 नवीन
एक तर संशय म्हणजे आरोप नव्हे. आरोपाच्या पूर्वीची पायरी किंवा आरोप करण्याइतके पुरावे नाहीत पण धुरळा उडवायचा आहे म्हणून काढलेली पळवाट असे काही आहे का..? आणि असे संशय व्यक्त करण्यासाठीच तर माध्यमे असतात पैशांच्या मोहाने माध्यमांची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे हे माहिती होते पण असे सार्वजनिकरीत्या कबूल होईल असे वाटले नव्हते. असो. माध्यमे संशय व्यक्त करण्यासाठी नसतात तर माध्यमांचे काम "निरपेक्षपणे विचार मांडणे आणि कोणत्याही घडामोडींवर संतुलीत भुमीकेने व्यक्त होणे" असे असावे. अर्थात हे मी माझ्या अत्यल्प अनुभवावरून आणि कोणत्याही विचारधारेच्या दावणीला बुद्धी न बांधता बोलत आहे. तुमचे विचार वेगळे असतील तर मान्यच आहे. तुम्ही आमच्यावर संशय घ्यायचे, आम्ही तुमच्यावर हे चालतेच तुम्ही / आम्ही..?? मी कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता नाहीये हो, तसेच कोणत्याही प्रकरणाचे पुरावे माझ्यापर्यंत गुप्तपणे पोहोचण्याची सुतराम शक्यता नसल्याने मी कधीही कोणताही संशय व्यक्त करत नाही. आणि भाजपसुद्धा काही धुतल्या तांदळासारखा नाही. डाळ घोटाळे, व्यापम (हा तर अनेक खून पडलेला न भूतो न भविष्यति असा घोटाळा, यात एकटा भाजप नव्हता, तरीसुद्धा) वगैरे.. या वाक्याचा संदर्भ कळाला नाही. आरोप केलेला नाही याबद्दल ठाम. त्यामुळे तुमची आव्हानेबिव्हाने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. मी आव्हान दिले आहे हे शोधून दाखवा बरं. तुम्ही खुलेपणाने संशय व्यक्त करत आहात म्हणजे तुमच्याकडे काहीतरी खास पुरावे असावेत म्हणून मी म्हटले आहे की "भाजपाने पैसे खाल्ले आहेत आहे असे छातीठोकपणे सांगत असाल तर पुरावे आणा" सांगोवांगीच्या गप्पा असतील तर तसे सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ब
बोका-ए-आझम Tue, 10/25/2016 - 10:16 नवीन
डाव्या लोकांचे जगातल्या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप असतात, माहित आहे ना तुम्हाला? एकदा डावी विचारसरणी म्हटल्यावर दुर्लक्ष करावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
म
मोदक Tue, 10/25/2016 - 10:28 नवीन
सल्ल्याबद्दल धन्यवाद बोकाशेठ. याबाबत मी क्लिंटन ला आदर्श मानतो, डावे दिसले की त्यांच्या विचारांमधील दांभीकता उघड पाडण्याचा प्रयत्न करायचा. त्यांच्याकडे पळवाटा तयार असतातच पण "इथे विरोध होतो आहे" इतकी साधी गोष्टही त्यांना पळ काढायला पुरेशी असते. दुर्लक्ष केले की "समोरच्याने उत्तर दिले नाही म्हणजे माझेच बरोबर" आणि उत्तर दिले की "बघा बघा किती असहिष्णुता वाढली आहे किंवा "अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी" वगैरे अपेक्षित रूळावरून गाडी जाईलच त्यामुळे आजिबात दुर्लक्ष करू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
र
राही Tue, 10/25/2016 - 14:10 नवीन
पळ वगैरे काढण्याचा प्रश्नच नाही. पण तेच तेच मुद्दे उगाळले जाऊ लागले आणि तर्कहीन आर्ग्युमेंट होऊ लागले की प्रतिसाद लिहिण्याचाही कंटाळा येतो. मग गप्प राहावेसे वाटते इतकेच. मला इथे काही युद्धबिद्ध खेळण्यासाठी यायचे नसते. म्हणून तर कमीत कमी वावर असतो. पैशाच्या लोभाने माध्यमांची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे हे (तुम्हाला/सगळ्यांना) माहीत होते पण इथे (माझ्या प्रतिसादात) सार्वजनिकरीत्या कबूल होईल असे (तुम्हाला) वाटले नव्हते, हा तुम्ही काढलेला अर्थ वा तुम्ही व्यक्त केलेले मत माझ्या प्रतिसादातल्या कोणत्या वाक्यावरून होऊ शकते? आणि या माझ्या प्रतिसादात तुम्हाला दांभिकता कुठे दिसली? 'बघा बघा किती असहिष्णुता....' वगैरे टाइपचे प्रतिसाद मी कधी दिले? आणि 'डावे दिसले की त्यांच्या विचारातली दांभिकता उघड पाडण्याचा प्रयत्न करायचा' हा तुमचा अजेंडा असेल तर (असू शकतो, माझे त्याबाबत काहीही मत नाही) तुमचा वरील प्रतिसाद त्यानुसार नाही कारण त्यातून कोणतीही दांभिकता उघड झालेली नाही. म्हणून टंकाळा येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 10/25/2016 - 14:33 नवीन
सर्वप्रथम - तुम्हाला डावी विचारसरणी पटते का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 10/25/2016 - 06:47 नवीन
इतर ५६ विषय सोडून राज ठाकरेंनी "चित्रपट" हेच क्षेत्र गुंडगिरी दाखविण्यासाठी का वापरले ? कारण इथे "वेळेला" महत्व आहे.
मुद्दा समजून घ्या. हे आंदोलन राज ठाकरे यांच्याशी संबंधित असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने केले आहे. मला वाटतं ते त्यांच्याशी संबंधितच क्षेत्र असावं.
मनसेचे आमदार आहेत १. अश्या पक्षाची धमकी फार तर पोलीस अधीक्षकांच्या पातळीवर हाताळली गेली पाहिजे होती
आमदार असणे हेच एखाद्या पक्षाच्या ताकदीचं मोजमाप असू शकतं काय? आता या घडीला तरी रस्त्यावर सगळ्यात जास्त पाठिंबा असलेले नेते राज ठाकरे नाहीयेत का? मला असं वाटतंय कि तथाकथित खंडणीचा पैसा सैनिक कल्याण निधीला नको हे मुळी दुखणंच नसून मनसे हे दुखणं आहे. अवांतर : सध्या सैनिक कल्याण निधीला जात असलेला सगळा पैसा खातरजमा करून घेतला जात असेल का (म्हणजे तो भ्रष्टाचारातून आलेला वगैरे नाही असा)? तो पैसा सैनिक कल्याण निधीत जातोय यापेक्षा खरंतर दुसरा आनंद नाही.
इथे काँग्रेस वाला मुख्यमंत्री असता तर त्याने करण जोहर कडून १० कोटी घेतले असते १ राजला दिला असता ९ आपण ठेवले असते आणि चित्रपट शांत पाने लावू दिला असता आणि सार्वजनिक रित्या लोकांचा प्रक्षोभ टाळला असता. हे १० कोटी नंतर कारण जोहर ने तिकिटांचे दार वाढवून वसूल केले असते.
व्वा! हे लॉजिक कशावरून बुआ? कि उगाच काहींच्या काही! म्हणून म्हणतो, दुखणं हे खंडणी नाही, दुखणं हे मनसे आहे!
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 10/25/2016 - 08:13 नवीन
> मुद्दा समजून घ्या. हे आंदोलन राज ठाकरे यांच्याशी संबंधित असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने केले आहे. मला वाटतं ते त्यांच्याशी संबंधितच क्षेत्र असावं. 1 पक्ष असलेल्या पक्षाची कसली चित्रपट सेना ? आणि हिंसा सोडून इतर कुठली नीती ह्यांची होती ? होती हिम्मत तर बहिष्कार टाकायचा. > आमदार असणे हेच एखाद्या पक्षाच्या ताकदीचं मोजमाप असू शकतं काय? १००% होय. आणखीन काय माप आहे ? गुंडगिरीची प्रवृत्ती ? > सध्या सैनिक कल्याण निधीला जात असलेला सगळा पैसा खातरजमा करून घेतला जात असेल का (म्हणजे तो भ्रष्टाचारातून आलेला वगैरे नाही असा)? तो पैसा सैनिक कल्याण निधीत जातोय यापेक्षा खरंतर दुसरा आनंद नाही. खंडणीचा पैसा सैनिकांना द्या नाहीतर आणखीन कोणाला द्या. चोरी ती चोरी आहे. तुमची मुले किडनॅप करून मिळणार पैसे सैनिक निधीला दिला तर चालेल काय ? > व्वा! हे लॉजिक कशावरून बुआ? कि उगाच काहींच्या काही! म्हणून म्हणतो, दुखणं हे खंडणी नाही, दुखणं हे मनसे आहे! १ आमदार असलेल्या पक्षाचे काहीही दुखणे नाही. देवेंद्र फडणवीस सारख्या मुख्यमंत्र्याने ज्याच्या कडून अनेक अपेक्षा होत्या त्यानी फुटकळ गुंडा पुढे सपशेल शरणागती पत्करून दलाली करावी हे पटले नाही. मूळ दुखणे हेच आहे. मनसे किंवा राज ठाकरे माझ्या खिजगणतीत सुद्धा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 10/25/2016 - 12:15 नवीन
>>1 पक्ष असलेल्या पक्षाची कसली चित्रपट सेना ? आणि हिंसा सोडून इतर कुठली नीती ह्यांची होती ? होती हिम्मत तर बहिष्कार टाकायचा. परत तेच, फक्त द्वेष. माझ्या माहितीनुसार मनसे चित्रपट सेना हि सभासदांच्या संख्येनुसार सर्वात मोठी चित्रपट संघटना आहे! >>१००% होय. आणखीन काय माप आहे ? गुंडगिरीची प्रवृत्ती ? फक्त तुम्ही म्हणाल म्हणून सगळे खरे असे नसते! गुंडगिरीची प्रवृत्ती म्हणजे नेमकं काय? >>खंडणीचा पैसा सैनिकांना द्या नाहीतर आणखीन कोणाला द्या. चोरी ती चोरी आहे. तुमची मुले किडनॅप करून मिळणार पैसे सैनिक निधीला दिला तर चालेल काय ? हि तुलना योग्य वाटते तुम्हाला? मनसे ने तसे केले तर तो नक्कीच गुन्हा आहे आणि कोर्ट आहे त्यासाठी! तुमचा द्वेष व्यक्त करण्यासाठीचा हा कपोलकल्पित मुद्दा लागू होत नाही इथे. >>मनसे किंवा राज ठाकरे माझ्या खिजगणतीत सुद्धा नाही. हाहाहा! परत परत फुटकळ गुंड म्हणालात तरी तुम्ही परिस्थिती जाणतच असाल असे गृहीत धरतो! तुम्ही हा राग व्यक्त करत आहात कारण फक्त तुमचं मनसे बद्दलचं फुटकळ असं मत आणि मुख्यमंत्रांचं परिस्थितीचा आढावा घेऊन महत्व देण्याचं मत जुळत नाही. खरंतर तुमच्या या वाक्यावरूनच कळतंय कि तुमच्या खिजगणतीत कोण आहे आणि कोण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
स
सुबोध खरे Tue, 10/25/2016 - 07:18 नवीन
पाकिस्तानी कलाकारांना येथे काम करू द्यावे हे तात्विक दृष्ट्या बरोबर असले तरीही पाकिस्तानी कलाकारांच्या वाचून यांचे का आणि काय अडते? इतर परदेशी कलाकारांबाबत भारतीय नागरिकांची आत्यंतिक भूमिका नाही तर "फक्त पाकिस्तानी" कलाकारांबाबत आहे याचे कारण प्रत्येकाला माहीत आहे. हे "बाहेरून" येणारा पैसे बोलतो आणि "फिल्मी" लोकांचा पैसा हाच देव आहे. जसे जिहादी धर्मासाठी काहीही करायला तयार असतात तसेच हे फिल्मी लोक पैशासाठी काहीही करायला तयार होतात. मुळात मी सिनेमे कमीच पाहतो परंतु सलमान खान आणि शाहरुख खान यांचे "कर्तृत्व" पाहिल्यावर मी आणि माझे कुटुंब यांनी त्यांच्या सिनेमावर पूर्ण बहिष्कार टाकलेला आहे. पाकिस्तानी कलाकारांबाबत प्रश्नच येत नाही. मी याच कारणासाठी "हिना" सुद्धा पहिला नाही. यांचे सिनेमे किंवा पाकिस्तानी कलाकार असलेले सिनेमे पाहिले नाही तर काही जीव जात नाही. प्रत्येक गोष्ट कायदेशीर असली तरीही नैतिक दृष्ट्या बरोबर असतेच असे नाही. सरकार कायद्यावर बोट ठेवून चालते त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना प्रवेश नाही हे म्हणणे त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यामुळे कठीण जात असावे. ( मला नक्की माहिती नाही हे मी आत्ताच नमूद करू इच्छितो). अगोदर झाले ते झाले. परंतु आपले इतके सैनिक( आणि आपले सीमेलगतच्या नागरिक आणि त्यांची गुरे/ पाळीव प्राणी) पाकिस्तान कडून मारले गेल्यावर जर श्री शाम बेनेगल याना बेशरम पणे परत पाकिस्तानी कलाकारांना घ्यावेसे वाटत असेल तर देशद्रोही म्हणून त्यांच्या तोंडाला काळे फासण्यासाठी मी पाठिंबाच देईन. माझी देशभक्तीची व्याख्या चूक असेल एकांगी असेल तरीही ती कायद्याच्या आणि नैतिकतेच्या चौकटीत आहे.
  • Log in or register to post comments
स
सुज्ञ Tue, 10/25/2016 - 08:21 नवीन
मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हणेपर्यंत इथे संडास झ्हाली आहे . त्यामानाने टीवटीव हा सौम्यच शब्द म्हणावा लागेल . असेच आवांतर : आपण कुठल्या पार्टी ला समर्थन करतो त्यावरून आपली वैचारिक पात्रता कळते काय ?
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 10/25/2016 - 08:27 नवीन
@मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, @मृत्युंजय भाऊ, इथे कोणाच्यातरी नावाचा श्लेष अतिशय हीन पद्धतीने होतोय, इथे तुमचा निरक्षीर विवेक दिसलेला नाही असे सखेद आश्चर्याने नमूद करावे वाटते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
ग
गणामास्तर Tue, 10/25/2016 - 08:56 नवीन
बापू थोडा वेळ तरी द्यायचा कि. पाच सात मिनिटांत लगेचं सगळे प्रतिक्रिया देतील असे कसे होईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
म
मोदक Tue, 10/25/2016 - 09:04 नवीन
+१११ थोडा वेळ देत जावा बापू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 10/25/2016 - 09:57 नवीन
अरेच्या! असा वेळ देतात होय! पूर्वानुभवावरून तरी तसे वाटले नव्हते, डांगेंच्याच एका प्रतिसादाला आम्ही ५ मिनिटात रिप्लाय दिला नाही म्हणून आम्हाला मानसिक क्लेश होऊस्तोवर शेलकी विशेषणे बहाल केली गेली होती, ह्याच मिपावर, खास त्या कामाकरता एक डू आयडी डेप्युट करून, त्यावरून आमचा ग्रह झाला की बोवा हीच जनरीत असेल, असो तशी जनरीत नसल्यास आम्ही समस्तांची जाहीर माफी मागतो अन "सम इक्वल्स आर मोर इक्वल्स" इतकेच म्हणतो, वरती आमचे लेखन दैवत बोक्याभाऊ , किंवा इतर भद्रजन "आम्ही इतर पक्षीय भक्त सहन करतो वगैरे" बोलले आहेत तेव्हा "तुम्ही सरळ ऐसी अक्षरेवर जा" वगैरे कोण कोणाला बोलले होते त्याचा गोंधळ उडतो बघा बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 10/25/2016 - 10:21 नवीन
बापू, नक्की मुद्दा काय आहे..? मी माझ्यापुरते बोलतो. मी जसा डांगेंचा विरोध केला आहे तसाच गुरूजींचाही विरोध केला आहे. आणि असा प्रत्येक चुकीच्या गोष्टीचा विरोध करावा अशी अपेक्षा असेल तर ते प्रॅक्टिकली शक्य नाही. त्यासाठी "डुआयडींची पिलावळ किंवा नैतीकतेचा कंपास हरवून खुशाल आरोप करणारे" आणि "डांगे व श्रीगुरूजी" यांना एकाच रांगेत बसवावे लागेल. बाकी प्रतिसादाबद्दल "सम इक्वल्स आर मोर इक्वल्स" हे इथे कसे लागू आहे सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
म
मोदक Tue, 10/25/2016 - 09:48 नवीन
@मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, @मृत्युंजय भाऊ, इथे कोणाच्यातरी नावाचा श्लेष अतिशय हीन पद्धतीने होतोय बापू - वरती संडास अशा शब्द वापरला आहे ते संदीप डांगेना उद्देशून आहे असे तुमचे म्हणणे आहे का? नीरक्षीरविवेकाबद्दल - श्रीगुरूजींना या धाग्यावरच नव्हे तर अनेक ठिकाणी त्यांचे प्रतिसाद चुकत आहेत, त्यांच्या प्रतिसादांनी भाजपाचे नुकसानच होत आहे असे सांगून झाले आहे. त्यामुळे येथेही त्यांच्या विचारांना दोन वेळा विरोध दर्शवून नवीन मुद्द्याची वाट बघत आहे. आणखी काय नीरक्षीरविवेक अपेक्षित आहे..? सुज्ञ यांच्या कमेंटबद्दल - मुळात या धाग्यावर मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हटलेले मला आढळलेले नाहीये. त्यामुळे त्यांना नक्की काय अभिप्रेत आहे माहिती नाही. जर त्यांना मिपावर कुठेतरी म्हटले गेलेले अपेक्षित असेल तर त्याबद्दल इतकेच म्हणू शकतो की इथे साक्षात शिवाजी महाराजांना शिव्या दिल्या गेल्या आहेत त्यांच्या कामगिरीवर त्यांनी अफझलखानाला मारलेच नाही असेही सर्टिफिकेट देवून खोटे ठरवले गेले आहे (हे प्रतिसाद आता उडाले आहेत) मग मुख्यमंत्री किस झाड की पत्ती..? मी जसे डांगेंच्या प्रतिसादाला विरोध दर्शवला तसा गुरूजींच्या अनेक प्रतिसादाला विरोध दर्शवला आहे. अर्थात गुरूजींनी स्वत:च्या प्रतिसादांना नेहमी स्वतः प्रतिवाद केला आहे, चुकीचा असला तरी. माझ्या मते डांगे या मुद्द्यापासून कोसो दूर आहेत कारण त्यांच्यावर शेकलेल्या कांही प्रकरणामध्ये ते स्वत: कमी आणि त्यांच्या वतीने तुम्हीच लगेच प्रतिवाद करता असेही दिसून आले आहे. आता हे सगळे सांगावयाचे काम जर संपादक मंडळाचे असेल आणि त्याबाबत आमच्यासारख्या सामान्य सदस्याने बोलू नये असे कोणाचे मत असले तर तसे सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 10/25/2016 - 10:47 नवीन
डिस्क्लेमर :- डांगेंची माझी मैत्री जुळणे, किंवा मी त्यांच्यावतीने प्रतिवाद करणे, आम्ही एकाच गावचे (नियतीच्या कृपेने) असणे ह्याचा कोणी अर्थाअर्थी संबंध जोडत असल्यास खाली लिहिलेले सगळेच तुम्हाला आवडेल असे नाही, आपापल्या जबाबदारीवर वाचा बापू - वरती संडास अशा शब्द वापरला आहे ते संदीप डांगेना उद्देशून आहे असे तुमचे म्हणणे आहे का? हे सुस्पष्ट नाहीये का? असला घाण श्लेष केल्याबद्दलच मागे एक डु आयडी बॅन झाल्याचे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो नीरक्षीरविवेकाबद्दल - श्रीगुरूजींना या धाग्यावरच नव्हे तर अनेक ठिकाणी त्यांचे प्रतिसाद चुकत आहेत, त्यांच्या प्रतिसादांनी भाजपाचे नुकसानच होत आहे असे सांगून झाले आहे. त्यामुळे येथेही त्यांच्या विचारांना दोन वेळा विरोध दर्शवून नवीन मुद्द्याची वाट बघत आहे. आणखी काय नीरक्षीरविवेक अपेक्षित आहे..? तुम्ही खास मित्र म्हणून ही एक अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करतोय असे समजा, बोक्याभाऊला करत नाही कारण त्यांनी आधीच निसंदिग्धपणे ते "काय लिहिले पेक्षा कोण लिहितो आहे" हे पाहत असल्याचे जाहीर केले आहेच. तर निरक्षीर म्हणजे फक्त गुर्जीच्या मुद्द्याला विरोध करणे होते का? माझ्यामते नाही, थेट मुद्द्याला हात घालतो, मोगा काय चीज आहे हे सगळ्यांना माहिती आहे,मोगाच्या प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देत बसले तर आपले मानसिक स्वास्थ्य हरपायची भीतीच जास्त, 90% मोगांचे रिप्लाय हे टाकाऊ असतात, पण उरलेल्या 10%चे काय ?? त्यावर किमान विचार करणे म्हणजे माझ्यालेखी निरक्षीरविवेक, मोगाने एकदातरी कोणाची पत्नी, भाऊ, जीवशास्त्रीय संबंध ह्यावर थिल्लर कॉमेंट केली आहे का ?? असल्यास सांगा आजच नीलकांतभाऊंना सांगून माझा आयडी सरंडर करतो, तेच गुर्जी काय करतात??, मागे एका प्रतिसादावर चक्क "ज्याची बायको त्याला सोडून गेली आहे अश्या विक्षिप्त माणसाच्या बोलण्याला काय किंमत द्यावी" वगैरे ते बोलले आहेत, अरे तुमच्यात इतका दम आहे तर मुद्द्याला मुद्द्याने प्रतिवाद करा की राव, का म्हणून आपली पातळी सोडावी??, आता मी थोडे माझे सांगतो, मोगाच्या प्रत्येक कॉमेंटवर म्हणजे आगाऊ कॉमेंटवर मी का व्यक्त होत नाही?? कारण मोगाला मूर्ख बडबड केली की सुज्ञ मिपाकर ताबडतोब झोडपतातच !, गुरुजींचे भाजप भलामण करणारे प्रतिसाद आजकाल कैच्याकै असतात, अन तुम्ही त्यांचा विरोध करताच हे तुम्हीच वर बोलला आहात, अशात जर मोगाने काही राजकीय प्रश्न विचारले तर त्याला कोण लक्षात घेतो का? किमान त्या प्रश्नांची उत्तरे तरी मागतो का? मी किंवा डांगेंसारख्या कोणी जर फक्त त्या प्रश्नांची उत्तरे मागितली तर आम्हाला सरसकट मोगा समर्थक अन यझ वगैरे म्हणणाऱ्या लब्धप्रतिष्ठित भद्रजनांनाही कधी जाब विचारा, की दादा, मग मान्य करता येईल निरक्षीर तुमचाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
सुज्ञ Tue, 10/25/2016 - 11:07 नवीन
मोदक भाऊ, बोक्याभाऊ, मृत्युंजय भाऊ ना का त्रास देता . श्लेष करणे चुकीचे असे मलाच म्हणा की . होय ते चुकीचेच आहे . मुख्यमंत्र्यांना हरामखोर म्हणेपर्यंत इथे मजल गेली आहे असे वाचा आणि मुद्यावर विचार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
म
मोदक Tue, 10/25/2016 - 13:12 नवीन
सुज्ञ यांनी मान्य केले असेल तर ठीक अन्यथा "संडास" हा शब्द संदीप डांगेंच्य नावावरचा श्लेष आहे हे पटणे थोडे अवघड आहे. नीरक्षीरविवेकाची गाडी जर विखारी डुआयडी या स्टेशनाला लागत असेल तर माझा पास. कितीही लॉजीकल लिहून वाद घातला तरी एका क्षणानंतर ती पिलावळ मूळपदावर येते असा स्वानुभव असल्याने अशा प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करणे योग्य. असे मी माझ्यापुरते ठरवले आहे. मोगाखान आणि डांगे ही तुलना पटली नाही. डांगे बहुतेकदा लॉजीकल लिहिण्यचा प्रयत्न करतात असे मी येथेच एक दोन ठिकाणी लिहिलेले सापडेल. मोगाने एकदातरी कोणाची पत्नी, भाऊ, जीवशास्त्रीय संबंध ह्यावर थिल्लर कॉमेंट केली आहे का ?? अनेकदा केली आहे. दाखवून देऊ का..? अर्थात नक्की कोणत्या आयडीने केली आहे आणि तो आयडी मोगाखानचा आहे का? हा वादाचा मुद्दा आहे आणि रोज आयडी बदलण्याची वेळ आल्याने असे होणारच. तरीही त्याचे मोदींबद्दलचे विचार शोधून बघा, तुम्हाला अपेक्षित असलेल्या कमेंट्स पेक्षाही विखारी कमेंट्स मिळतील. मी किंवा डांगेंसारख्या कोणी जर फक्त त्या प्रश्नांची उत्तरे मागितली तर आम्हाला सरसकट मोगा समर्थक अन यझ वगैरे म्हणणाऱ्या लब्धप्रतिष्ठित भद्रजनांनाही कधी जाब विचारा बापू, या प्रकरणाची मला कल्पना नाही. रोज नवीन नवीन कपडे घालून इतके आयडी अवतरतात. किती जणांचा ट्रॅक ठेवणार..? आणि असा किती जणांना विरोध दर्शवणार..? जेथे शक्य आहे तेथे विरोध दर्शवला आहे आणि जेथे विरोध दाखवला नाही तेथे मी (विरोध दाखवला नाही म्हणून) त्या विचारांशी सपशेल सहमत आहे असेही नक्कीच नाही. मी विरोध असेल तर स्पष्ट आणि सहमती असेल तर तीही सुस्पष्टरीत्या दाखवतो. प्रत्येक धाग्यावर प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद देणे शक्य होत नाही ही माझी मर्यादा समजा. माझ्यापुरते बोलायचे झाले तर मी तुम्हाला मोगा समर्थक म्हटलेले मला आठवत नाही आणि तसे घडेल याची शक्यता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
श
श्रीगुरुजी Tue, 10/25/2016 - 20:19 नवीन
तुम्ही खास मित्र म्हणून ही एक अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करतोय असे समजा, बोक्याभाऊला करत नाही कारण त्यांनी आधीच निसंदिग्धपणे ते "काय लिहिले पेक्षा कोण लिहितो आहे" हे पाहत असल्याचे जाहीर केले आहेच. तर निरक्षीर म्हणजे फक्त गुर्जीच्या मुद्द्याला विरोध करणे होते का? माझ्यामते नाही, थेट मुद्द्याला हात घालतो, मोगा काय चीज आहे हे सगळ्यांना माहिती आहे,मोगाच्या प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देत बसले तर आपले मानसिक स्वास्थ्य हरपायची भीतीच जास्त, 90% मोगांचे रिप्लाय हे टाकाऊ असतात, पण उरलेल्या 10%चे काय ?? त्यावर किमान विचार करणे म्हणजे माझ्यालेखी निरक्षीरविवेक, मोगाने एकदातरी कोणाची पत्नी, भाऊ, जीवशास्त्रीय संबंध ह्यावर थिल्लर कॉमेंट केली आहे का ?? असल्यास सांगा आजच नीलकांतभाऊंना सांगून माझा आयडी सरंडर करतो, तेच गुर्जी काय करतात??, मागे एका प्रतिसादावर चक्क "ज्याची बायको त्याला सोडून गेली आहे अश्या विक्षिप्त माणसाच्या बोलण्याला काय किंमत द्यावी" वगैरे ते बोलले आहेत, अरे तुमच्यात इतका दम आहे तर मुद्द्याला मुद्द्याने प्रतिवाद करा की राव, का म्हणून आपली पातळी सोडावी??, आता मी थोडे माझे सांगतो, मोगाच्या प्रत्येक कॉमेंटवर म्हणजे आगाऊ कॉमेंटवर मी का व्यक्त होत नाही?? कारण मोगाला मूर्ख बडबड केली की सुज्ञ मिपाकर ताबडतोब झोडपतातच !, गुरुजींचे भाजप भलामण करणारे प्रतिसाद आजकाल कैच्याकै असतात, अन तुम्ही त्यांचा विरोध करताच हे तुम्हीच वर बोलला आहात, अशात जर मोगाने काही राजकीय प्रश्न विचारले तर त्याला कोण लक्षात घेतो का? किमान त्या प्रश्नांची उत्तरे तरी मागतो का? मी किंवा डांगेंसारख्या कोणी जर फक्त त्या प्रश्नांची उत्तरे मागितली तर आम्हाला सरसकट मोगा समर्थक अन यझ वगैरे म्हणणाऱ्या लब्धप्रतिष्ठित भद्रजनांनाही कधी जाब विचारा, की दादा, मग मान्य करता येईल निरक्षीर तुमचाही
मुद्द्याला मुद्द्द्याने प्रतिवाद करावा असे आपले वरील वाक्य वाचून अंमळ आश्चर्य वाटले. मला भाजपकडून पैसे मिळतात अशा अर्थाचे आरोप तुम्हीच माझ्यावर दोन वेळा केले आहेत. पहिल्या आरोपाला मी काहीच उत्तर न देता फक्त "अवघड आहे" एवढाच प्रतिसाद दिल्यानंतर, "सॉरी. गंमत केली." अशा अर्थाचे लिहून तुम्ही तो विषय संपविला होता. या धाग्यात पुन्हा एकदा तोच आरोप आहे. मुद्द्याला मुद्द्याने प्रतिवाद करण्याचे हे उदाहरण समजावे का? याच मोगाच्या चंपाबाई नामक अवतारात तुम्ही चंपाबाई या आयडीबद्दलही असेच असभ्य, वैयक्तिक लिहिले होते. त्यावर एकाने आक्षेप घेतल्यावर, "मला माझ्यावर नियंत्रण ठेवायला हवे. काही वैयक्तिक कारणाने माझा ताबा जातो." असा तुमचा प्रतिसाद होता. वरील उदाहरणात आपण पातळी सोडली नाही का? याच मोगाने आपल्या एका पूर्वातरात स्वतःच एक धागा काढून आपली बायको अनेक वर्षे आपल्याला सोडून माहेरी रहात होती असे लिहिले होते. आपले सासूसासरे, मेव्ह्णे, मेव्हणी यांच्याविषयी त्याने अत्यंत गलिच्छ भाषा वापरली होती. "आपले स्वतःचे स्पर्म संपले म्हणून सासरा मला पोरं काढायला सांगतोय" अशा अर्थाची वाक्ये त्यात होती. इतका गलिच्छ धागा संपादकांनी लगेच उडवून टाकला होता. याच मोगाने आपल्या असंख्य अवतारांपैकी अनेक अवतारांमध्ये मोदी व त्यांची बायको, वाजपेयींचे ब्रह्मचर्य यावर अत्यंत असभ्य प्रतिसाद दिले आहेत. "मोगाने एकदातरी कोणाची पत्नी, भाऊ, जीवशास्त्रीय संबंध ह्यावर थिल्लर कॉमेंट केली आहे का ?? असल्यास सांगा आजच नीलकांतभाऊंना सांगून माझा आयडी सरंडर करतो," असे आपण आज तावातावाने सांगत आहात. परंतु मोगाचे मागील असंख्य असभ्य प्रतिसाद आपण सोयिस्कररित्या विसरलेला दिसता. आता नीलकांतभाऊंना सांगून आपण आपला आयडी सरेंडर करणार का? मी मोगाच्या जवळपास सर्व प्रतिसादांकडे दुर्लक्ष करतो. अगदी क्वचितच त्याच्या प्रतिसादाला मला उत्तर द्यावे लागते. मी मोगावर जी काँमेट केली ती नक्की कोणत्या धाग्यात केली हे आता आठवत नाही. परंतु त्या काँमेंटमागे काहीतरी असभ्य संदर्भ होता व तो कोणता होता ते आठवत नाही. मोगाच्या १०% प्रतिसादांवर विचार करणे म्हणजे तुमच्या लेखी नीरक्षीरविवेक असेल. तुम्हाला त्याच्या १०% प्रतिसादांचे कौतुक असेल, पण मोगाकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे हा माझ्या लेखी नीरक्षीरविवेक आहे. असो. असभ्य, वैयक्तिक प्रतिसादांचं म्हणाल तर माझ्याबाबतीत अनेकांनी, अनेकवेळा वैयक्तिक हल्ले केलेले आहेत (तुमच्यासहीत). एका ऋषीतुल्य सदस्याने लागोपाठ १०-१२ प्रतिसादात माझा "खोटारडे" असा उल्लेख करून मला मूळव्याध झाली आहे, मला कावीळ झाली आहे असे शोध लावले होते. एका उंदीरमामांनी तर मी ऑफिसमधील नेट फुकट वापरतो व मिपावर मी लिहिलेल्या प्रत्येक प्रतिसादाला, प्रतिसादातील प्रत्येक परिच्छेदाला, परिच्छेदातील प्रत्येक वाक्याला व वाक्यातील प्रत्येक शब्दाला मला भाजपकडून पैसे मिळतात असे बिनदिक्क्त ठोकून दिले होते. ऑफिसमधील नेट फुकट वापरून मी भाजपची भलामण करून पैसे कमावतो असा त्यांचा शोध होता. मी कोण आहे, मी काय करतो इ. ची कणभरदेखील माहिती नसताना बिनदिक्कतपणे असा शोध लावणे कौतुकास्पद होते. अजून एका भटजीबुवांनी तर अनेक प्रतिसादातून माझा एकेरी उल्लेख करून माझी भ्याड, कपटी, पाताळयंत्री, खोटारडा, टनाटनी असे शब्द वापरून माझी संभावना केली होती. एका अभ्यासू समजल्या जाणार्‍या सदस्याने एका प्रतिसादात "मला भरपूर रिकामा वेळ असतो, म्हणून मी वेगवेगळ्या लिंका देतो" असा शोध लावला होता. एनीवे, सवयीने मी अशा वैयक्तिक हल्ल्यांना फार गांभिर्याने न घेता त्याकडे बर्‍याच प्रमाणात दुर्लक्ष करण्यास शिकलो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 10/26/2016 - 05:11 नवीन
सर्वप्रथम , प्रतिसाद तुम्हाला नाही मोदकभाऊला होता, तरी तुमचा उल्लेख असल्यामुळे तुम्ही बोललात हे रास्तच आहे. याच मोगाच्या चंपाबाई नामक अवतारात तुम्ही चंपाबाई या आयडीबद्दलही असेच असभ्य, वैयक्तिक लिहिले होते. त्यावर एकाने आक्षेप घेतल्यावर, "मला माझ्यावर नियंत्रण ठेवायला हवे. काही वैयक्तिक कारणाने माझा ताबा जातो." असा तुमचा प्रतिसाद होता. होय, चूक केली तरी ती कबुल करायचा दम असावा लागतो गुर्जी, सुदैवाने तो माझ्यात आजही शाबूत आहे :), शिवाय ती एक चूक "एक्सप्लॉइट" करायचा चुकूनही प्रयत्न करू नका, कारण स्वतःचा मुद्दा चूक असला तरी कबूल करायची दानत तुमच्यात नाहीये, हे स्पष्ट आहे दुसरे म्हणजे, वरती तुम्ही म्हणता आहात की मी दोन वेळा तुम्हाला पेड प्रचारक म्हणालो, खाली तुम्ही इतर आयडीजने सुद्धा तेच म्हणलेले सांगताय, मी एकटा बोललो असतो तर कदाचित मलाच भ्रम झाला असे म्हणता आले असते, पण ज्या नेटाने तुम्ही भाजपचे मुद्दे तर्कहीनपणे अक्षरशः रेटत असता ते इतर सदस्यांना ही जाणवले आहे हे मी म्हणत नाहीये तर तुमच्या प्रतिसादातून स्पष्ट होतंय तिसरे म्हणजे, आता बुआ बाप्या आयडी सोडणार हा आनंद तुम्हाला झाला असल्यास तो जरा कह्यात ठेवा अन माझे शब्द परत एकदा वाचा, मी म्हणले आहे मोगाने जीवशास्त्रीय कॉमेंट वगैरे.... त्यावर तुम्ही अटलजी वगैरे बोलताय! सिरियसली? मोगाने "तुमच्या" वैयक्तिक आयुष्याबद्दल काय बोललंय ते सांगा, कारण मोगा विरुद्ध तुम्हीही एकदा नाही तर दोनचारदा वैयक्तिक बोलले आहात, त्याच्या बायकोवर टिप्पणी केली तेव्हा "असे काहीतरी कारण असावे/होते" वगैरे गुळमुळीत बोलताय तुम्ही,म्हणजे तुम्ही बोललात त्याला पार्श्वभूमी होती असं आम्ही समजायचं ? अन आम्ही एकदा तोल जाऊन बोललो तर तुम्ही त्याचा वापर करून घेणार ? कुठल्या कायद्याने हो महाराज? बाकी मोगा अटलजी ते शिवाजी महाराज सगळ्यांवर बोलला आहे, त्या करता त्याला लागेल तितके झोडा, किंबहुना तुम्ही जे चवीचवीने "तुम्ही सुद्धा मोगाला बोलला होतात" म्हणताय न तिथे सुद्धा त्याला मी त्याने आर्मी वर काही बोलला म्हणूनच झोडले होते अन मला ती कॉमेंट नीट आठवते, मी मोगाला "तुम्ही मेलात तरी फरक पडत नाही" म्हणले होते, वैयक्तिक आयुष्य काढून पर्यायाने त्याच्या घरच्यांना मध्ये ओढले नव्हते, कोण कोण सोईस्कर दृष्ट्या काय काय विसरले आहे हे स्पष्ट आहेच म्हणा आता मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 10/26/2016 - 06:44 नवीन
वरील तीनचार प्रतिसाद अतिशय अवांतर आणि विषयाला सोडून/वैयक्तिक आहेत असं वाटत नाहीये का? संदिपजी, सोन्याबापू, श्रीगुरुजी, मोदकभाऊ घ्या सांभाळून झालं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
श
श्रीगुरुजी Wed, 10/26/2016 - 10:08 नवीन
होय, चूक केली तरी ती कबुल करायचा दम असावा लागतो गुर्जी, सुदैवाने तो माझ्यात आजही शाबूत आहे :), शिवाय ती एक चूक "एक्सप्लॉइट" करायचा चुकूनही प्रयत्न करू नका, कारण स्वतःचा मुद्दा चूक असला तरी कबूल करायची दानत तुमच्यात नाहीये, हे स्पष्ट आहे
तुमची दानत, तुमचा दम तुम्हालाच लखलाभ होवो. मला तुमची दानत, दम दाखविण्याची गरज नाही.
दुसरे म्हणजे, वरती तुम्ही म्हणता आहात की मी दोन वेळा तुम्हाला पेड प्रचारक म्हणालो, खाली तुम्ही इतर आयडीजने सुद्धा तेच म्हणलेले सांगताय, मी एकटा बोललो असतो तर कदाचित मलाच भ्रम झाला असे म्हणता आले असते, पण ज्या नेटाने तुम्ही भाजपचे मुद्दे तर्कहीनपणे अक्षरशः रेटत असता ते इतर सदस्यांना ही जाणवले आहे हे मी म्हणत नाहीये तर तुमच्या प्रतिसादातून स्पष्ट होतंय
म्हणजे तुम्हाला भ्रम झालेला नसून तुमची माझ्याबद्दल खात्री झालेली दिसतेय. माझ्याबद्दल कणभरही माहिती नसताना आपले भ्रम हेच अंतिम सत्य आहे अशा समजूत करून घेण्यात व त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्यात नक्कीच "दम" असावा लागतो.
तिसरे म्हणजे, आता बुआ बाप्या आयडी सोडणार हा आनंद तुम्हाला झाला असल्यास तो जरा कह्यात ठेवा अन माझे शब्द परत एकदा वाचा,
तुम्ही राहिलात किंवा गेलात मला शष्प फरक पडत नाही. तुम्ही असल्याचे आनंद किंवा दु:ख मला नसल्याने तुम्ही गेल्याने मला दु:ख किंवा आनंद होण्याची सुतराम शक्यता नाही. मी नीलकांतभाऊंना सांगून आयडी सरेंडर करेन हे तुमचेच शब्द होते.
मी म्हणले आहे मोगाने जीवशास्त्रीय कॉमेंट वगैरे.... त्यावर तुम्ही अटलजी वगैरे बोलताय! सिरियसली? मोगाने "तुमच्या" वैयक्तिक आयुष्याबद्दल काय बोललंय ते सांगा, कारण मोगा विरुद्ध तुम्हीही एकदा नाही तर दोनचारदा वैयक्तिक बोलले आहात, त्याच्या बायकोवर टिप्पणी केली तेव्हा "असे काहीतरी कारण असावे/होते" वगैरे गुळमुळीत बोलताय तुम्ही,म्हणजे तुम्ही बोललात त्याला पार्श्वभूमी होती असं आम्ही समजायचं ? अन आम्ही एकदा तोल जाऊन बोललो तर तुम्ही त्याचा वापर करून घेणार ? कुठल्या कायद्याने हो महाराज? बाकी मोगा अटलजी ते शिवाजी महाराज सगळ्यांवर बोलला आहे, त्या करता त्याला लागेल तितके झोडा, किंबहुना तुम्ही जे चवीचवीने "तुम्ही सुद्धा मोगाला बोलला होतात" म्हणताय न तिथे सुद्धा त्याला मी त्याने आर्मी वर काही बोलला म्हणूनच झोडले होते अन मला ती कॉमेंट नीट आठवते, मी मोगाला "तुम्ही मेलात तरी फरक पडत नाही" म्हणले होते, वैयक्तिक आयुष्य काढून पर्यायाने त्याच्या घरच्यांना मध्ये ओढले नव्हते, कोण कोण सोईस्कर दृष्ट्या काय काय विसरले आहे हे स्पष्ट आहेच म्हणा आता मला.
म्हणजे मोगाने माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलले तरच मी लिहायचे, पण इतर सार्वजनिक व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही लिहिले किंवा माझ्या धर्मातील माझ्या श्रद्धास्थानांवर किंवा इतरांवर वाईटसाईट लिहिले तरी ते वैध अशी तुमची मोजपट्टी दिसते. आपण एकदा तोल जाऊन बोललो असे काहीतरी स्वतःचे समर्थन करताय. दुसर्‍या एकाने लिहिलेल्या "संडास" या शब्दाचा संबंध तुम्ही संदीप डांगेंशी जोडून राग व्यक्त केला तो कशासाठी? तो आयडी काही तुमच्याबद्दल बोलत नव्हता. आणि आपण स्वतःच चंपाबाई या आयडीचा "चंपी" असा एकेरी उल्लेख केला होता याचे सोयिस्कर विस्मरण झालेलं दिसतंय. माझ्याविरूद्ध एकदा सोडून दोन वेळा वैयक्तिक कामेंट केलीत. काही दिवसांपूर्वीच अजून एका सदस्याला आपण धमकीवजा इशारा दिलेला आहे. तुमचा तोल गेल्याची बघताबघता ४ उदाहरणे सापडली. थोडी खोदाखोद केली अजून बरीच उदाहरणे निघतील. आणि याला तुम्ही फक्त एकदा तोल जाऊन बोललो असे म्हणून समर्थन करता! बाकी कायद्याचं म्हणाल तर तुम्ही ज्या कायद्याने मोगाला किंवा मला किंवा इतरांना झोडपता तोच कायदा मी वापरतो असे म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा