तीनही मुख्य उद्देश तोंडावर आपटले आहेत...
किती सोयीस्कर निष्कर्ष हो. तुमच्या बुद्धीमत्तेचे कौतुक वाटत आहे. किमान राहुल गांधीला तरी टक्कर द्याल तुम्ही. :=))
विषय बदलू नका. आधी एखाद्याला केजरीवाल म्हणणे हा व्यक्तिगत प्रतिसाद आहे की नाही ते स्पष्ट करा. तसं नसेल तर एखाद्याला राहुल गांधी म्हणणे हे कसं व्यक्तिगत होईल?
प्रश्न रिसबुड साहेबांना आहे तरीपण मी उत्तर देतो.
डुआयडीमुळे जास्त त्रागा होत असेल तर दुर्लक्ष करा आणि ज्या खर्या आयडींमुळे (कमी प्रमाणात) त्रागा होत आहे त्यांना योग्य उत्तरे देवून गप्प करा.
उत्तरे नसतील तर... तर काही नाही. उत्तरे नसताना काय करायचे ते तुम्हाला व्यवस्थीत माहिती आहेच. ;)
(हलके घ्या वो..)
एकदा एक माणूस डॉक्टर कडे जातो,उजव्या हाताचं अंगठ्याशेजारचं बोट सगळया अंगावर .... हातांवर पायावर पोटावर ठेऊन म्हणतो माझे सगळे अंग दुखतंय.डॉक्टर बारकाईने निरीक्षण करून म्हणतात प्रॉब्लेम अंगात/शरीरात नाही त्या बोटात आहे.
ते बोट म्हणजे आपण स्वतः आणि अंग म्हणजे भोवताल (सिस्टिम) असे समजतात ती सुज्ञ माणसे. डॉक्टर म्हणजे सद्सतविवेक बुद्धी.
आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीत मोडता ते तुम्ही ठरवा.
निर्णय चांगलाच आहे. या निष्कर्षासाठी ३१ डिसेंबर पर्यंत थांबण्याची गरज नाही. निर्णय चुकला आहे का याचा निष्कर्ष काही काळानंतरच कळू शकेल. तोपर्यंत जरा धीर धरा. उतावळेपणा सोडा. या निर्णयाविरूद्ध ज्या तर्हेने काही विशिष्ट व्यक्तींचा थयथयाट सुरू आहे, त्यावरून यामागचा मुख्य उद्देश सफल होत आहे हे स्पष्ट आहे. चष्मा काढल्यास तुम्हालाही ते दिसून येईल.
<<तसेही तीनही मुख्य उद्देश तोंडावर आपटले आहेत...
असं झ्हाल का ? वा वा वा ! असे झटक्यात अचूक नीष्कर्ष काढणे हे सोपे काम नाही ! आपण अभिनंदनास पात्र आहात !!चला एक सत्कार करून टाकू
पण योजना राबवणं त्यासाठी आवश्यक तरतूद करणं हे निश्चित चुकलेलं आहे .हे जर कोणी मान्य करणार असेल तर चर्चा करू ग्राउंड रिऍलिटी वर .. आकड्यांवर नाही . मी सांगतो उदाहरणं
साहेब इतके धागे झ्हाले आणि अनेकांनी तटस्थ पणे विचारले देखील आहे कि कशी तरतूद करायला हवी होती किंवा अजून काय नियोजन पाहिजे ? यावर अनेक ज्ञानी लोक वेगळा धागा देखील काढणार होते परंतु 'नियोजनात चूक झ्हाली' एवढे म्हणण्याखेरीज कोणीही काहीही केले नाही . ग्राउंड रियालिटी वर येऊन आपण आता आपले विचार मांडा
मोहिते साहेब.. कळकळीची विनंती.. असा एक धागा प्लीज काढा. मला अंमलबजावणी मधले काहीही माहिती नाही किमान पैसे फॅक्टरीतून निघून बँकेत आणि ATM मध्ये कसे पोचतात ते तरी कळेल.
इतका मी हुशार नाही :) बाकी ३००-५०० प्रतिसादावर काय मत देणार .
असो ग्राउंड रिऍलिटी माझ्या कंपनीत ३५ लोक कामाला आहेत .ज्या व्यवसायात घरच्या मी नाही हे पहिलेच नमूद करतो . त्यातले १०-१२ भैय्ये आहेत त्यांना ना सुट्टे मिळत होते ना बँकेतून पाठवता येत होते कारण बँकेत गेले की २ तास गेले .हे म्हणतोय ते रबाळे नवी मुंबई चं उदाहरण आहे. भिवंडी मध्ये हॅन्डलूम बिसिनेस बंद आहे जवळ जवळ १७ दिवस माझ्या मित्राची कंपनी आहे ..ट्रान्सपोर्ट वाल्यांचे हाल आहेत . अशी अनेक उदाहरणं आहेत . करायचं होता ना मग पहिले तरतूद करायची . ज्यांना त्रास झाला ती प्रामाणिक लोक आहेत . त्यांना देशभक्तीचे गोडवे सांगायचे . अजूनपर्यंत अप्रामाणिक लोकांना काही त्रास झाला नाहीये .आजही ५०० च्या नोटा द्या बदलून मिळत आहेत कमिशन घेऊन . जगात कुठली बँक नसेल जिने २० दिवसात इतके नियम बदल केले. आजही आपल्याला त्रास होणार नाही आहे कारण हे आपण कार्ड पेमेंट वैग्रे कित्येक वर्षांपासून करत आहोत . पण ज्यांना त्रास होतोय त्यांचं काय ???
मालक "कशी करायला हवी तरतूद" या टायटल खाली आपण कुणाला काहि होत असलेले काही त्रास सांगितले परत. वरील प्रतिसादात आपण म्हणत आहात " पण योजना राबवणं त्यासाठी आवश्यक तरतूद करणं हे निश्चित चुकलेलं आहे" तर आम्ही विचारतो कि नक्की कशी तरतूद / नियोजन करायला हवे होते सरकार ने किंवा अजूनही करू शकतो ? यावर आपले विचार सांगा. निव्वळ नियोजन चुकले इतके बोलून थांबू नका
तृणमूल कॉन्ग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मु़ख्यमंत्री यांनी लष्कराच्या नियमित सरावावरुन राजकारण करुन आपल्या बालीशपणाचा पुन्हा एकदा परिचय दिला. टोल नाक्यांवर येणारी-जाणारी वाहने मोजण्याचे नेहमीच्या कामासाठी कायदेशीर प्रक्रियेतून पोलिसांना सूचना करुन लष्कराने आपले काम सुरु केले. पण हा केंद्राकडून लोकशाहीवर घाला घालण्यात येत आहे असा आक्रोश करुन ममतादिदींनी नौटंकीबाजी करत रात्रभर मुख्यमंत्री कार्यालयात थांबण्याचा निर्णय घेतला.
लष्कराने आपली कागदपत्रे प्रसिद्ध करुन ममता बॅनर्जी यांची नौटंकी उघडकीस आणली. पश्चिम बंगालची जनता यातून लवकर काय तो बोध घेवो.
खरंच काहींच्या काही तमाशा या बाईंचा! कमीतकमी सैन्याने कागदपत्रे पाठवली आहेत याचं भान ठेवलं असतं तरी असा सेल्फगोल करावा लागला नसता! बाकी खालील विडिओ हसूच आले.
https://www.youtube.com/watch?v=6CiXDmlc65A
ही बाई अत्यंत छपरी बाई आहे. ती केजरीवालांप्रमाणेच कायम कांगावा आणि नाटके करत असते. तिला म्हणे पंतप्रधान व्हायचंय म्हणून आता हिंदी शिकते आहे म्हणे. कदाचित मोदी अत्यंत वाईट असतील, ते लोकांना आवडत नसतील . . . परंतु त्यांना पर्याय म्हणून जे स्वतःला पुढे करताहेत (ममता, केजरीवाल, राहुल, मुलायम, मायावती इ. गणंग) त्यांच्याकडे पाहिलं की मोदी या सर्वांपेक्षा शतपटीने चांगले आहेत हे लक्षात येतं.
या बाईंकडे लक्ष देऊच नये . वाजपेयींच्या काळापासून ते आतापर्यंत हे असच वागणं आहे . मोठ्या महत्वाकांक्षा जागृत झाल्या आहेत त्यांच्या . पण बंगाल पुढे कोण विचारणार नाही . बंगाल ला कळेल तो सुदिन .
पूर्वी असले कोणीतरी काहीतरी बरळले की राग यायचा. पण आता तसे काही होत नाही तर हे लोक असे काहीतरी बरळू लागले की बरेच वाटते. आपल्या एकाहून एक मर्कटलीलांमुळे विरोधकांनी आपला खरा चेहरा आपण होऊन जनतेपुढे आणला आहे.अशा लोकांमुळे २०१९ मध्ये मोदींना निवडणुक अन्यथा गेली असती त्यापेक्षा अधिक सोपी जाणार ही शक्यता जास्त. त्यामुळे केजरीवाल, ममता, राहुल गांधी इत्यादींनो किप इट अप. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत :)
विधान : योजना राबवणं त्यासाठी आवश्यक तरतूद करणं हे निश्चित चुकलेलं आहे. लोकांना प्रचंड त्रास होत आहे . लोक मरत आहेत वगैरे .
साधा प्रश्न : कशी तरतूद करायला हवी होती किंवा अजून काय नियोजन पाहिजे ?
उत्तर : आमाला ठावं नाय
तर लोकहो असा आणि एवढाच नोटबंदी विरोधाचा प्रवास आहे . फक्त विरोध करत राहणे
अवांतर : बोटं दाखवणं खूप सोपं असतं इतकं समजल्यास हा हि नोटबंदी चा एक फायदा म्हणावा काय ?
मीनाक्षी लेखीना विचारायला पाहिजे होतं तुम्ही हे, त्यांचाही नोटबंदीला विरोध होता, हेच मुद्दे होते,
त्यांच्या पार्टीने 'बोट दाखवणं सोपं असतं, आपण करायला गेलो की काय करायला पाहिजे' हा विचार नोटबंदीआधी केला असावा.
अवांतर: तक्रारकर्त्याने उपाय सांगता आले नाहीत तर तक्रारच करू नये हे नोटबंदीनिमित्त समजले हा फायदा(?)
मीनाक्षी लेखीना विचारायला पाहिजे होतं तुम्ही हे, त्यांचाही नोटबंदीला विरोध होता, हेच मुद्दे होते,
२०१४ चा निर्णय काय होता व त्याला लेखींनी का विरोध केला होता याविषयी जरा सविस्तर सांगता का? तसेच २०१४ चा निर्णय २ २०१६ चा निर्णय यातील साम्य देखील सांगता का?
मीनाक्षी लेखी? असो .
अवांतरातील : तक्रारकर्त्याने तक्रार जरूर मांडावी आणि त्या तक्रारी दूर करण्यासाठीच उपाय योजले जात आहेत . तक्रारदाऱ्याना वाऱ्यावर सोडलेलं नाही.
आपण आता भाजपविरोधी आहेत हा चष्मा मान्य केल्यामुळे सगळेच आपल्याला आपल्या चष्म्यातून दिसेल तसेच आहे या गोड समजुतीवर खुश रहा :)
मी भाजपविरोधी असल्याचं मान्य केलंय ह्या आपल्या गॉड समजुतीत खुश राहा!!! कित्ती घाई... :)
लेखी म्याडम म्हैत नै? गुगल करा आणि प्रेस कॉन्फरन्स बघा नोटबंदीवरची, 2014. अजून कोणीही नोटबंदी/भाजप समर्थकांनी त्या मुद्द्याचा प्रतिवाद केलेला नाही, चार वेळा टाकूनही. अवघड जागेचं दुखणं असावं... टाळाटाळ केलीय फक्त. तुम्हाला जमतंय का पहा.
तक्रादारांना वाऱ्यावर सोडलं नाही???? असो. वरातीमागून घोडे येत असतील.
त्यावेळच्या नोटाबंदीची आणि आताच्या नोटाबंदीची तुलना करणे म्हणजे सफरचंदे आणि संत्र्यांची तुलना करण्यासारखे आहे. ज्या मोदींनी जीएसटीला विरोध केला होता तेच मोदी आता जीएसटीला पाठिंबा देत आहेत या फुसक्या आरोपात जितका दम आहे तितकाच दम या दोन वेगवेगळ्या नोटाबंदी निर्णयांच्या तुलनेमध्ये आहे.
जर २०१४ चा निर्णय सफरचंद असेल तर २०१६ चा निर्णय संत्रे आहे. जर २०१४ चा निर्णय संत्रे असेल तर २०१६ चा निर्णय सफरचंद आहे. तुम्हाला २०१४ मध्ये लेखी यांनी काय म्हटले आहे याची पुरेपूर माहिती दिसते. २०१६ चा निर्णयही ताजा आहे. दोन्ही निर्णयांची तुलना केल्यास ती तुलना चुकीची आहे हे लक्षात येईल.
कधी येतोय धागा ? असे झ्हाले असते उत्तम व अत्त्युत्कृष्ट नोटबंदी चे नियोजन . या टायटल खाली ? हो जर धागा लिहीत असाल तर एकच फक्त काळजी घ्या. हा निर्णय या आधी कुणालाही समजू नये अशा दृष्टीने नियोजन हवे हो . नाहीतर लिहाल " सर्व मशीन मध्ये २००० च्या नोटा आधीच भरायला हव्या होत्या आणि ब्रांच मॅनेजर ना तसे कळवायला हवे होते वगैरे "
जस्ट विचार करा की मी 2000 व 500 च्या नवीन नोटा भरल्यात एटीएम मध्ये 30 सप्टेंबर ला, आणि मिळू लागल्या आहेत.
ह्यामुळे मी 8 नोव्हेंबर ला 1000, 500 अचानक बंद करणार हे कसे कळेल?
संदीप डांगे,
माझ्या मते जुन्या आणि नव्या नोटांचं मिश्रण न केलेलं बरं पडेल. जुन्या व नव्या एकाच वेळेस भरल्या गेल्या तर बँकेची डोकेदुखी आणि म्हणूनंच चुकांचं प्रमाण बरंच वाढेल. गोंधळ नियंत्रणात ठेवण्यासाठी जुन्या नोटा रद्द केल्यानंतर मगंच नव्या चलनात आणाव्यात.
आ.न.,
-गा.पै.
कोणत्या प्रकारच्या चुका? बँकांना नव्या जुन्याचं काय करायचं, त्यांना तर 8 तारखेला कळेल कि जुन्या जाणारेत ते.
500 नको तर फक्त 2 हजाराची नोट कालिब्रेट करू. पुढे लागणारा महिनाभराचा वेळ व लोकांची डोकेदुखी थांबेल.
कि २००० ची नोट व्हाट्सप वर इतकी गुप्तता बाळगून पण फिरत आहे .. नोटबंदी आधी १० दिवस त्यात चिप आहे वगैरे बातम्या .. त्यावेळेस सर्वाना खरंच खोटी वाटलेली हो डांगे .. चिप ची बातमी खोटीच वाटत होती पण असली नोट येणार हे ही वाटत न्हवते .. पण तशीच नोट आली . चीप वगैरे व्हाट्सअप कलाकारांची कमाल .. पण पण . ..
आता ही बातमी त्या नोट छपाई कंत्राटदाराने व्हाट्सअँप वर पसरवली का आरबीआय गव्हर्नर नी ( जुना केजरीवाली रोग :कोण गुजराती आहेत शोधा आणि त्यांचे मोदींशी कनेक्शन बांधा . त्याआधी गुजराती मारवाडी वगैरे भामटेच असतात आणि त्यांचा धंदा लोकांना फ़सवूनच होतो हा ठाकरीय न्यूनगंड मनाशी बाळगा .. तर ते एक असो . ::) याचा शोध घ्या पण
मग आता इतकी गुप्तता बाळगून जर व्हाट्सपप वर त्या नोटेचे स्पेसिमेन आले तर तुम्हीच जस्ट विचार करा .. ३० सप्टेंबर ला २००० आणि ५०० च्या नवीन नोटा ( २ महिने आधी ??? ) भरल्या असत्या तर काय झ्हाले असते ?
तीनही मुख्य उद्देश तोंडावर आपटले आहेत...किती सोयीस्कर निष्कर्ष हो. तुमच्या बुद्धीमत्तेचे कौतुक वाटत आहे. किमान राहुल गांधीला तरी टक्कर द्याल तुम्ही. :=))