Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय??????

ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Tue, 05/16/2017 - 10:44
🗣 253 प्रतिसाद
लग्न ही संस्था कशी अस्तित्वात आली यावर समाजशास्त्रज्ञांनचं एकमत आहे.पुर्वापार पुरुष हे अपत्याला पोसत असल्याने होणारे अपत्य आपलेच असले पाहीजे हा रोख होता ,त्यातून स्त्रीला स्वतःशी बांधुन ठेवले तर तिच्यापासून होणारे अपत्य आपलेच असेल याची बर्यापैकी खात्री असते.यातूनच विवाहसंस्था अस्तित्वात आली.भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या वि का राजवाडे यांच्या पुस्तकानुसार पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले.मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते. तर ही मुक्त व्यवस्था बंद पडल्याने पुरुषांची पंचाईत झाली .मग ते बिचारे लग्न या एकाच गोष्टीकडे " लैंगिक भावनेचा निचरा म्हणून पाहू लागले.भारतातलं लैंगिकतेला अनैसर्गीक समजण्याचं हिंदूंचं धोरण विवाहसंस्थेला बळकट करु लागले .यात मग स्त्री चे वस्तुकरण होणे अपरिहार्य होते. आजकाल विवाहाचा उद्देश काय हे जेव्हा माझ्या मित्रांना मी विचारतो तेव्हा सेक्सची सोय असे उत्तर मिळते.कुणी फार पुढे जाऊन दोन जिवांचे मिलन,सृजनशिलता,साहचर्य(companionship) अशी मखलाशी करत असतात.प्रत्यक्षात बायकोशिवाय इतरही स्त्रीयांकडे वखवखलेल्या नजरेने हे कल्पितानंदही बघत असतात. प्रत्यक्षात लग्न हा माझ्यामते पुरुषाच्या अनावर कामेच्छेला मोकळी वाट करुन देण्याचा एक करार आहे ,बाकी काही नाही. दो बदन एक जान,अर्धांगिनी,बेटर हाफ,सृजन वगैरे कविकल्पना म्हणून ठीक असतील पण प्रत्यकषात निसर्गाचे नियम फार वेगळे असतात.हा माझा दृष्टीकोण असेल कदाचित पण त्याला वास्तवाची किनार निश्चित आहे. तर,मिपाकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल. १ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही? २.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्? ३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे? चर्चेदरम्यान येणारे मुद्दे धाग्यात समाविष्ट केले जातील ,धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
73332 वाचन

💬 प्रतिसाद (253)
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर गुरुवार, 05/18/2017 - 16:55 नवीन
अहो साहेब, पोरी बारा तेरा वर्षाच्या असताना वयात येतात ,बुबुक्षीत नजरेच्या पुरुषांची तेव्हापासुनच त्यांना न्याहळण्याची सुरवात होते. मग काय म्हणता????? बाराव्या वर्षी बार उडवायचा??????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 05/18/2017 - 17:27 नवीन
त्या बारा-तेरा वर्षात मुलांवर समानतेचे संस्कार करा की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
स
सुबोध खरे Fri, 05/19/2017 - 07:38 नवीन
ट फि साहेब बुभुक्षित माणसांची नजर तर ७० वर्षाच्या बाईकडे पण असते. पण मुलीचे वडील आणि विशेषतः आई अशा कोवळ्या मुलीकडे तिची वाढ होईपर्यंत लक्ष ठेवून असतात. शिवाय मुलगी पण कुणाला फशी पडू शकते. आणि याच कारणासाठी गरिबांकडे लवकर लग्न करण्याकडे कल असतो. लग्नातुन सुरक्षितता दोन्ही तर्हेची असते. एक म्हणजे शरीरसुख सहज मिळू लागल्याने मुलगी तारुण्याच्या उन्मादात वाहावण्याची शक्यता नाहीशी होते.आणि भावनिक दृष्ट्या मुलगी गुंतल्याने तिचं पण "लक्ष" बाहेर जाण्याची शक्यता कमी होते. मुलीचे लग्न झाले आहे हे समजले कि तिच्यावर " लक्ष" ठेवणाऱ्या तरुणांची संख्या पण लक्षणीय रित्या कमी होते. शिवाय छेडछाड केल्यास गरम डोक्याच्या नवऱ्याशी भांडण होण्याची शक्यता असल्यामुळे बुभुक्षित लोकहि जरा मर्यादेत राहतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 05/18/2017 - 13:56 नवीन
अभी असली पिच्चर शुरु हुआ भाय Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 05/18/2017 - 14:06 नवीन
गावठी हा शब्द वापरणे हासुद्धा तथाकथित 'गावठी' पणा आहे. गावाकडचे म्हणजे फालतू अशी काहीशी मानसिकता यातून दिसते. त्यापेक्षा मागास हा शब्द वापरावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
ग
गामा पैलवान गुरुवार, 05/18/2017 - 19:51 नवीन
टफि,
मंगळसुत्र असेल तर स्त्रीला सुरक्षीतता मिळते हा गावठी विचार झाला .याचा अर्थ तुमच्या देशात कायद्याचं राज्य नसून लफंग्यांचं राज्य आहे.
असहमत. स्त्रीस भावनिक सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी शासनाची नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 05/19/2017 - 09:12 नवीन
साधी गोष्ट आहे. परस्परात दीर्घकाल शारीरिक संबंध ठेवण्याचे फक्त दोनच मार्ग आहेत, लग्न किंवा लिव-इन. खरा प्रश्न, संबंधित व्यक्तींचा फोकस केवळ शरीरसंबंधावर आहे की कुटुंब निर्माण करण्यावर आहे, असा आहे. ज्यांना केवळ विविधता उपभोगायची आहे ते लिव-इनसारखा पर्याय निवडणार आणि त्या प्रकारच्या संबंधातून लग्न केलं तरी त्यांना कायम वैविध्याच आकर्षण राहाणारच. याची दोन कारणं आहेत. स्त्रीला विवाहपूर्व अनुभव कमालीचा आणि पुरुषाला त्यानं खटपट केली तेवढा असणार, त्यामुळे दोघंही एकमेकांबद्दल कायम साशंक (पण बोलायची चोरी :) )! शिवाय एकदा नाद लागला की तो सुटायची मुश्कील त्यामुळे शक्यतो अपत्यप्राप्ती नकोच वाटणार. तस्मात, लिव-इनवाले कितीही ठरवू देत त्यांचा एकमेकांप्रती अनुबंध निर्माण होऊ शकत नाही आणि त्यामुळे लिव-इनमधून एक सुखासिन घर निर्माण होण्याची शक्यता दुर्लभ. लग्न करणारे कुटुंब निर्माण करायला तयार असतात पण ही मानसिकता दोन्हीकडून हवी. थोडक्यात, दोघात मिळून एकच आयुष्य जगायची मॅच्युरिटी हवी. एकदा हा ठराव पास झाला की करीयर, पैसा, अपत्य जन्म, संगोपन, स्वयंपाक, इतर प्रापंचिक कामं, तिचं माहेर, तुमचे नातेवाईक, अधेमधे हॉस्पिटलायजेशन्स, झाल्यास इकडचे किंवा तिकडचे मृत्यू ........आणि कायकाय, असा भेद उरत नाही. दोघं मिळून जो काय प्रसंग आहे तो एकमेकांच्या साथीनं निभावतात किंवा साजरा करतात. दोघात मिळून जगायला एक वाइड स्पेक्ट्रम उपलब्ध होतो आणि संभोग हा अर्थात महत्त्वाचा असला तरी तो एकमेकांशी आनंदाचं शेअरींग होतो. लग्न हा जगण्याचा सर्वस्वी वेगळा पर्याय आहे. एकमेकांच्या साथीनं, जे काय आहे ते शेअर करत, दोघांनी मिळून जगायचं एक अयुष्य असा तो गेम प्लान आहे. यामधे एकमेकांप्रती अनुबंध आणि कृतज्ञता निर्माण झाली की संभोग ही आनंद (घेण्यापेक्षा) देण्याची प्रोसेस होते, मग सर्व दृष्टीकोनच बदलतो. जसं दोघं मिळून एकच आयुष्य जगतात तसा दोघं मिळून संभोगाचा आनंद शेअर करतात. अर्थात, जेवढा एकमेकांप्रती खुलेपणा जास्त तेवढा आनंद जास्त. याला तीन कारणं आहेत : १) अपराध शून्य चित्तदशा (नो गिल्ट फिलींग), २) कमालीचा निवांतपणा आणि ३) एकमेकातला अनुबंध ! यात दोघातली कंपॅटिबिलीटी इतकी कमालीची वाढते की दुसरी संधी आली तरी तो माहौल जमून येण्याची शक्यता नसते. तस्मात, वैविध्याचं आकर्षण केवळ फँटसी म्हणून असू शकतं पण पुरेशी मॅच्युरिटी असली की ज्या तीन गोष्टी विवाहित जोडप्यात जमून येतात त्याची खुमारी हिट-अँड-रनमधे कधीही मिळू शकणार नाही हे सहज लक्षात येतं. शिवाय लग्नानंतर जी कुटुंबव्यवस्था निर्माण होते ती दांपत्य, अपत्य आणि दोन्ही कडच्या फॅमिलीज या सर्वांना अनेक दृष्टीनं हिताची ठरु शकते.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 05/19/2017 - 11:12 नवीन
यात दोघातली कंपॅटिबिलीटी इतकी कमालीची वाढते की दुसरी संधी आली तरी तो माहौल जमून येण्याची शक्यता नसते. ==> वाह क्या बात है संक्षी जी..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अनुप ढेरे Fri, 05/19/2017 - 12:38 नवीन
संक्षिंशी मिपाच्या इतिहासात इतकं सहमत झालं नसेल कोणी. तुम्ही संक्षींचे डुआयडी आहात असा संशय येईल लोकांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
संजय क्षीरसागर Fri, 05/19/2017 - 13:28 नवीन
तुम्ही सुद्धा अधनमधनं सहमत होताच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
व
विशुमित Wed, 05/24/2017 - 07:52 नवीन
अच्छा म्हणजे सहमत असले की डू आयडी असते हे माहित नव्हते मला. कंपू गिरी का काय तरी म्हणतात ते. बाप जन्मी आपल्याला असली कंपू गिरी जमली नाही आणि जमणार नाही. चालू द्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
प
पैसा Fri, 05/19/2017 - 10:21 नवीन
ही लग्नसंस्था साली माजली आहे! =))
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 05/19/2017 - 10:41 नवीन
कश्याच्या जीवावर ? आणि काय लॉजिक आहे त्या विधानामागे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
संजय क्षीरसागर Fri, 05/19/2017 - 10:58 नवीन
हा माज उतरवायला त्या विद्वानांनी नक्की काय उपाय योजना सुचवली आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अनुप ढेरे Fri, 05/19/2017 - 12:41 नवीन
काय लॉजिक आहे त्या विधानामागे
घासुगुर्जींना विचारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
पैसा Fri, 05/19/2017 - 12:44 नवीन
ही बघा ती चर्चा. अशा काहीतरी गंभीर चर्चा करा. हवाबाणांचा आता लै कट्टाळा आलाय. लग्न करायचं तर करा, नायतर नका करू. पण चर्चा आवरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
स
संजय क्षीरसागर Fri, 05/19/2017 - 13:25 नवीन
आणि राघांचा त्यावर सल्ला ! तुम्ही, तुमची बायको, तिच्या मैत्रिणी व त्यांचे नवरे यांना प्रेफरन्स लिस्ट करून जोड्यांची अदलाबदल का करत नाहीत? देर से आये पर दुरुस्त आये होईल. आणि अशीच अदलाबदल दर वर्षभराने करण्याची व्यवस्था केली तर सगळेच सुखी होतील. क्या कहेने ! तो धागा ७ वर्षांपूर्वीचा आहे, अशी उपाय योजना कुणी करुन पाहिलीये का ? इतक्या टुकार चर्चेला गंभीर म्हणणारे सांप्रत चर्चेला कंटाळणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
च
चित्रगुप्त Fri, 05/19/2017 - 18:32 नवीन
लग्न हे फक्त दोन व्यक्तिंमधील संबंध जुळवणे नसून दोन कुटुंबे आणि तदानुषंगिक अनेक कुटुंबे यांचा संबंध जुळून येणे असते, याचा आपल्या संस्कृतीतही विसर पडत चालला आहे की काय ? वृद्ध पालकांची/आजी-आजोबांची काळजी घेणे या अत्यंत महत्वाच्या कार्यासाठीही प्रेम/लग्न टिकून रहाणे आणि संततीचे औरसत्व महत्वाचे आहे.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 05/19/2017 - 21:06 नवीन
१) लग्नाला पर्याय म्हणून तुम्ही जे १० पर्याय सुचवलेत त्यातला पहिला पर्याय बाद आहे कारण मुद्दा शारीरिक संबंधाचा आहे. पर्याय क्रमांक ३,५ आणि ७ समलिंगींसाठी आहेत ते चर्चाविषयाशी संबधित नाहीत. पर्याय क्रमांक ६, ९ आणि १० केवळ काल्पनिक आहेत. सो वी आर लेफ्ट विथ २ अँड ४ (कारण ८ आणि ४ एकच आहेत), आणि ते असे आहेत : (२) लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये रहाणे (४) एकीशी लग्न करणे थोडक्यात, तुमच्याकडे कोणतही सुसंगत उत्तर नाही. २) बाकी औरसत्व एक अत्यंत वाईट संकल्पना आहे कधी अनाथालयाला भेट देऊन पाहिली आहे का ? ज्यांचं संगोपनच होऊ शकत नाही अशा मुलांच्या आयुष्याची काय वाताहत होते याची तुम्हाला कल्पना सुद्धा करता येत नसेल तर वैचारिक बैठक फारच उथळ आहे असं नाईलाजानं म्हणावं लागेल. स्वतःला कधी अशा परिस्थितीत कल्पून बघा, इट इज ड्रेडफुल ! ज्यांना आई-वडीलांचं प्रेमच मिळू शकलं नाही, ज्यांना घराचा आधारच नाही, अशी मुलं आयुष्यात उभी राहाणंच अवघड. अनौरसत्त्वाचं शल्य मानवी मुलाच्या सायकीत इतकं खोलवर जाऊन बसतं की ते मूल आयुष्यात कधी कोसळेल सांगता येत नाही. ३) माझ्या स्पर्मने जन्म झालेले प्रत्येक मुल माझेच असेल. माझेच ! औरस / अनौरस असला फरक नाही ! हा तुम्हाला ज्योक वाटत नाही काय ? `तुमचं मुल' म्हणजेच त्या मुलाचं `औरसत्व' आहे याची तुम्हाला कल्पना नाही का ? ४) आनंदाचा आणि डोपामाईनचा फारसा संबंध नाही ! तुम्ही थोडं फार अध्यात्म वाचलं जरी असेल (कळायची गोष्ट सध्या बाजूला ठेवू) तरी आनंद ही स्थिती आहे, ती उचंबळून येणारी भावना नाही. तस्मात, डोपामाईन (किंवा काय असेल ते) हा `कॉन्सिक्वन्स' आहे 'कॉज' नाही. आनंद ही कायम स्वतःशी कनेक्टिविटी आहे आणि डोपामाईन हा त्याचा रिझल्ट आहे. तुम्ही शरीरशास्त्राच्या आधारावर घोडा गाडीच्या मागे जोडतायं :) !
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 05/19/2017 - 21:43 नवीन
१) डोपामाईन च्या ऐवजी क्ष्य्झ नावाची १७६० केमिकल्स असतील प्रेमाला कारण ! ती असतील तेव्हा त्याला प्रेम म्हणु , नसतील तेव्हा प्रेम संपले असे म्हणु !! तोच तर माझा मुद्दा तुम्ही टाळलायं ! ही संप्रेरकं तुम्हाला सिक्रीट होतायंत आणि तिला होत नाहीत तर आता किती दिवस वाट पाहायची ? बरं या बेसिसवर एक स्थिर रिलेशनशिप तयार होणंच शक्य नाही कारण संप्रेरकांचा काय भरवसा ? आणि मग अपत्य झाली असली तर त्यांच्या संप्रेरकांचं काय ? ती म्हणायला लागली की तुम्हाला एकत्र बघितलं तरच आमची संप्रेरकं सिक्रीट होतात (आणि तीच वस्तुस्थिती आहे !), तर तो लफडा कसा सोडवणार ? २) औरस अनौरस ही संकल्पना फार फार ऊशीरा आलीये , आणि त्याने निश्प्पाप लोकाचे नुकसानच केले आहे ! अगदी शिवकालातही अनौरस मुलांना राजांनी टाकुन दिल्याचे दिसत नाही पण केवळ अनुरस आहेत ह्या एका उल्लेखाने त्यांचे जन्मसिध्द अधिकार हिरावल्याचे दिसुन येते ! ....माझ्या १० अब्ज शुक्राणूंनी १० अब्ज अपत्य जन्माला आली तरी ती सर्वच्या सर्व माझीच असतील अस्से मी म्हणत आहे ! त्यातीक कोणीही अनौरस नसेल इतकेच मी म्हणले आहे ! उल्लेखाचं एकवेळ जाऊं द्या. वास्तविकात मुल स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत त्याचा सांभाळ कोण करणार ? तुम्ही ऐतिहासिक दाखले देऊन वास्तव कसं हाताळणार ? उद्या तुमच्या उदात्त कल्पनेप्रमाणे विवाह संकल्पना लयाला गेली, कुणीही कुणाशीही रत होतंय अशी कल्पना करा (अर्थात, ज्याच्या त्याच्या डोपोमाईनप्रमाणे :) ! ) मग भसाभसा मुलं व्हायला लागली, तीही तुमच्या औदार्यशिल विचाराप्रमाणे सगळी औरसच आहेत..... आता ती सांभाळायला कोण घेणार ? इथे तुमची डोपोमाईन थिअरी लावायची तर पब्लिक म्हणणार या मुलांकडे बघून आमचं नाही सिक्रीट होत ! मग ते सर्व प्रचंड लफडं कोण निस्तरणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
प्रसाद गोडबोले Sat, 05/20/2017 - 09:07 नवीन
तुमचं चाललय संक्षी की तुम्ही म्हणताय हापुस आंब्याला पर्यायच नाही , मी म्हणतोय की बाबा हे बघ पायरी आहे , रायवळ आहे , लंगराआहे , केसरिया आहे , दशहरी आहे , तर तुम्ही म्हण्ताय की हे आंबेच नाहीत आणि आंबा म्हणजे फक्त हापुसच ! आणि वर म्हणताय की माझ्याकडे सुसंगत उत्तर नाही !! आता बाकीचेही आंबेच आहेत हे तुम्हाला कोण पटवुन देनार ? असो तुम्ही समलिंगी लग्नांना , मुक्त लग्नांना लग्न मानत नसाल तर ती तुमची विचारसरणी झाली , खुश राव्हा . मी सर्वांनाच साहचर्याचे पर्याय म्हणुन समान समजतो आणि सर्वांना समान मानतो ! आणि अनाथालय वगैरे मुद्दा चर्चेत येचुच कसा शकतो देव जाणे कारण मी तर स्प्ष्ट म्हणालोय कि अपत्याची जबाबदारी पित्याची असते , ज्याला पिता आहे तो अनाथ कसा ? उगाच्च काहीतरी तुम्हचं ! `तुमचं मुल' म्हणजेच त्या मुलाचं `औरसत्व' आहे हेच मी वारंव्वर म्हणतोय की मुल बापाचेच असते आणि औरसच असते , मग त्याची आई विधीवत लग्न झालेली असो की नसो. लग्नाचा औरसत्वाशी संबंध नाही !! आणि आता हे महत्वाचे : वैचारिक बैठक फारच उथळ आहे असं नाईलाजानं म्हणावं लागेल. संक्षी , यु टू ! तुम्हीही वैयक्तिक टिप्पणीवर उतरलात ? ! माझी वैचारिक किंव्वा अध्यात्मिक बैठक किती खोल किंव्वा किती उथळ आहे ह्याचे मला सर्टिफिकेट घ्यायची गरज नाही , तुमच्याकडुन किंव्वा मिपाकडुन तर मुळ्ळीच नाही ! तुम्ही , तुमचे खोल विचार आणि अतिखोल आध्यात्मिक बैठक वगैरे सुखी राव्हा . तुमच्या विचारांचा आदर आहेच , पट्त नसले जुळत नसले तरीही एक वेगळा विचार म्हणुन मी त्यांचा आदर करु शकतोच ! मी माझ्या जागी , माझ्या खोल की उथळ अध्यात्मिक बैठकीत सुखी रहातो . माझे विचार तुम्हाला कळावेत किंव्वा पटावेत असा माझा मुळ्ळीच हट्ट नाही . सुखी रहा :)

(संपादित)

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सुबोध खरे Sat, 05/20/2017 - 09:46 नवीन
तसेच खरे डॉक्टर ' मी बोटीवर होतो तेव्हा' ही पालुपद लावत स्वःची लाल करुन घेण्याबाबत प्रसिध्द आहेत , वाटलंच मला. अजून पर प्रगो यावर घसरले कसे नाहीत. बेफाट वक्तव्य करायची. मग मुद्दे संपले कि "वैयक्तिक टिप्पणी केली म्हणून रडारड करायची अजून ते "स्वमतांध दांभिकता" कसं काय बुवा आलं नाही. वादात हारायला लागलं कि असे सारे फाटे फुटतात. मी, ओशो आणि प्रवचन हेच सत्य, बाकी सर्व भंपक असू द्या असू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Sat, 05/20/2017 - 18:25 नवीन
व्हा उछशृंखल वृत्तीला आधार देण्यासाठी चुकीचे संदर्भ देऊ नका. उगाच सवंग लोकप्रियता किना सनसनाटी साठी बेफाट विधाने करता आहात असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे http://www.misalpav.com/comment/939909#comment-939909 ही विधाने तुमची आहेत . वैयक्तित टिप्पण्णीला स्युरुवात तुम्ही केली आहे खरे मी नाही . आणि मुद्दे संपायचा प्रश्नच नाही , मी पहिल्यापासुन एकच मुद्दा मांडतोय की लग्न ही निरर्थक संस्था आहे , ती तुम्हाला पटत नाही म्हणुन तुम्ही पहिल्यांदा वैयक्तिक टिप्प्णीला सुरुवात केली आही मी नाही . मी वादात जिंकणे हरणे असले काही मानत नाही तुमची मते तुम्हाला लखलाभ माझी मला ! कळ्ळं ??? आणि हो आता संपादकांना विचारतो अशी एकांगी कारवाई का ? आणि त्यांचे उत्तर येत नाही तो वर तुम्ही तुमच्या बोटीवर खुष् रहा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संजय क्षीरसागर Sat, 05/20/2017 - 11:28 नवीन
तुम्हाला चर्चेमधे रस आहे की विषयाला फाटे मारण्यात हे नक्की करा. आणि मुद्याला धरुन लिहा म्हणजे चर्चा लाईनवर राहील. आता चर्चाविषय पुन्हा एकदा वाचा : लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय?????? १) आंबे, बाजीराव वगैरे उदाहरणं सोडा. समलिंगी, ब्रह्मचारी तुमच्या दृष्टीनं कितीही थोर असोत, ते या चर्चेचा विषय नाहीत. एकानी अनेकींशी किंवा एकीनं अनेकांशी लग्न बेकायदा आहे. ओके ? आता सरळ प्रश्नाकडे या : नॉर्मल स्त्री आणि पुरुषांना एकत्र जगण्याचा विवाह किंवा लिव-इन सोडून तिसरा पर्याय कोणता ? २) मी वारंव्वर म्हणतोय की मुल बापाचेच असते आणि औरसच असते , मग त्याची आई विधीवत लग्न झालेली असो की नसो. लग्नाचा औरसत्वाशी संबंध नाही !! तुम्ही माझे प्रतिसाद न वाचताच उत्तरं देतायं ! पुन्हा नीट वाचा : (औरसत्त्वाच्या) उल्लेखाचं एकवेळ जाऊं द्या.मुल स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत त्याचा सांभाळ कोण करणार ? तुम्ही ऐतिहासिक दाखले देऊन वास्तव कसं हाताळणार ? उद्या तुमच्या उदात्त कल्पनेप्रमाणे विवाह संकल्पना लयाला गेली, कुणीही कुणाशीही रत होतंय अशी कल्पना करा (अर्थात, ज्याच्या त्याच्या डोपोमाईनप्रमाणे Smile ! ) मग भसाभसा मुलं व्हायला लागली, तीही तुमच्या औदार्यशिल विचाराप्रमाणे सगळी औरसच आहेत..... आता ती सांभाळायला कोण घेणार ? इथे तुमची डोपोमाईन थिअरी लावायची तर पब्लिक म्हणणार या मुलांकडे बघून आमचं नाही सिक्रीट होत ! मग ते सर्व प्रचंड लफडं कोण निस्तरणार ? ३) वैचारिक बैठक फारच उथळ आहे असं नाईलाजानं म्हणावं लागेल. पुन्हा तुम्ही प्रतिसाद नीट न वाचताच सुटला आहात ! आता तरी नीट वाचा : "कधी अनाथालयाला भेट देऊन पाहिली आहे का ? ज्यांचं संगोपनच होऊ शकत नाही अशा मुलांच्या आयुष्याची काय वाताहत होते याची तुम्हाला कल्पना सुद्धा करता येत नसेल तर वैचारिक बैठक फारच उथळ आहे असं नाईलाजानं म्हणावं लागेल. स्वतःला कधी अशा परिस्थितीत कल्पून बघा, इट इज ड्रेडफुल ! ज्यांना आई-वडीलांचं प्रेमच मिळू शकलं नाही, ज्यांना घराचा आधारच नाही, अशी मुलं आयुष्यात उभी राहाणंच अवघड. अनौरसत्त्वाचं शल्य मानवी मुलाच्या सायकीत इतकं खोलवर जाऊन बसतं की ते मूल आयुष्यात कधी कोसळेल सांगता येत नाही." आणि आता तुमची विचारसरणी किती पक्की आहे ते या प्रश्नाला नेमकं उत्तर देऊन दाखवून द्या : ज्या मुलांची जवाबदारी घ्यायला पालक तयार नाहीत त्यांना अनौरस म्हणतात. याचा अनौरस मुलांना बाप नसतो असा अर्थ तुम्ही कुठून काढला ? जर आई-बाप जवाबदारी घ्यायला तयार नसतील तर ती मुलं अनाथालयात जातात इतकी किमान गोष्ट तुम्हाला माहिती असायला हरकत नाही. तर प्रश्न असा आहे : तुमच्या दृष्टीनं आदर्श असलेल्या `विवाहशून्य समाजात' अपत्य संगोपनाची जवाबदारी कोण घेणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Sat, 05/20/2017 - 18:29 नवीन
आणि मीही वारंवार हेच सांगतोय की ---- आंबे, बाजीराव वगैरे उदाहरणं सोडा. समलिंगी, ब्रह्मचारी तुमच्या दृष्टीनं कितीही थोर असोत, ते या चर्चेचा विषय नाहीत. एकानी अनेकींशी किंवा एकीनं अनेकांशी लग्न बेकायदा आहे. ओके ? नो . नॉट ओके . चर्चेचा विषय लग्नाचा हेतु काय ? आणि मी स्पष्टपणे म्हाणालोय की सध्य स्थितीतील लग्न संस्था निरर्थक आहे , मी दुसरा कोणताच मुद्दा मांडलेला नाही. साहचर्याचे अनेक पर्याय आहेत जे की तुम्हाला पटत नसले तरीही पर्याय आहेतच आणि अल्पप्रमाणात का होईना जगात अस्तित्वात आहेतच !
तुमच्या दृष्टीनं आदर्श असलेल्या `विवाहशून्य समाजात' अपत्य संगोपनाची जवाबदारी कोण घेणार ?
मुलाचा नैसर्गिक बाप ! ज्याच्या स्पर्म ने मुलाचा जन्म झाला तो ! विषय संपला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sat, 05/20/2017 - 21:05 नवीन
१७ तारखेला तुमचं विधान आहे : "ह्यावर सोप्पा उपाय म्हणजे प्रजोत्पादनाच्या आधीच स्त्री पुरुषांनी ठरवावे की मुलांची जबाब्दारी आणि ओनरशिप कोण घेनार ते ! मुलगा झाल्यास वडीलांनी जबाबदारी घ्यावी आणि मुलगी झाल्यास आईने ( किंव्वा व्हाईसव्हर्सा) हा सोप्पा थंबरुल असु शकतो !" आणि आज तुम्ही म्हणतायः `विवाहशून्य समाजात' अपत्य संगोपनाची जवाबदारी कोण घेणार ? मुलाचा नैसर्गिक बाप ! ज्याच्या स्पर्म ने मुलाचा जन्म झाला तो ! म्हणजे एकतर तुमचे विचार ठाम नाहीत. दुसरी गोष्ट, तुमच्या दृष्टीनं जोडप्यातल्या सहचर्याचा सगळा खेळ संप्रेरकांवर अवलंबून आहे. म्हणजे विचारातली दुफळी हळूहळू स्पष्ट होते आहे. आता स्वतःच्या विचारांशी पक्के राहून या प्रश्नांचं उत्तर देऊ शकाल काय ? अ) जन्मदातीनं मुलावर हक्क सांगितला आणि तीनं बापाकडे बघून तिची संप्रेरकं सिक्रीट होत नाहीत म्हटलं तर बाप काय करणार ? ब) शिवाय अपत्याच्या सुयोग्य संगोपनासाठी दोघांची आवश्यकता असते, जर बापाला मुलाच्या आईकडे बघून डोपामाईन निघत नाहीत असं लक्षात आलं तर तो मुलावरचा हक्क सोडणार की मुलाच्या आईला सोडणार ? क) कायद्यानं मुलाच्या पाचव्या वर्षापर्यंत जन्मदाती हीच योग्य पालक आहे असा नियम आहे. पाच वर्षानंतर अपत्यानं बापाकडे जायला नकार दिला तर बाप काय करणार ? ड) तुमच्या मुक्त संभोग व्यवस्थेत एक बाप हा दहा मुलांच्या जन्माचा नरपुंगव आहे असं निष्पन्न झालं आणि ती सर्व मुलं तथाकथित स्त्रीयांनी त्या थोर बापाच्या दारात आणून ठेवली तर ओशोंच्या ज्या `स्वातंत्र्याच्या सर्वोच्चतेचा' तुम्ही पाठपुरावा करतायंत ते महत्त्वाचं ठरवणार की मुलांचं संगोपन ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 05/22/2017 - 08:59 नवीन
लोल. तुम्हाला थंबरुल ह्या शब्दाचा अर्थ कळतो का ? आणि व्हाईस व्हर्सा ह्या शब्दाचा ? किंव्वा तुम्हाला म्युचुअल अ‍ॅग्रीमेन्ट ही गोष्ट माहीत आहे ? किव्वा सिंगल पॅरेंट ही संकल्पना ? किंव्वा वेगवेगळ्या देशात कायदा वेगवेगळा असु शकतो ही संकल्पना माहीत आहे का ? किंव्वा डायवोर्स नंतरही अनेक मुलांचे संगोपन करणारे बाप तुम्हाला माहीत नाही का ? तुम्हाला एलॉन मस्क माहीत आहे का जो त्याच्या डायव्होर्स नंतर त्याचा सहा मुलांचा सांभाळ करत आहे ? तुमचं कसं झालय की तुम्ही लग्नाला दुसरा पर्याय असुच शकत नाही असे गृहीत धरुन चाललाय . ते मी वर आंब्याचे उदाहरण दिले तसे काहीसे चालल्य तुमचं . हापुस एक्के हापुस ! बाकीचे आंबेच नाहेत ! आता पायरी, रायवळ , केसरीया , लंगरा हे आंबेच असतात हे मी तुम्हाला पटवुन नाही देवु शकत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ग
गामा पैलवान Fri, 05/19/2017 - 21:32 नवीन
मार्कस ऑरेलियस, १.
प्रेम फक्त एकदाच होते / एकदा तरी होतेच. असे कोठे तरी गृहीतक आहे . ते तसे का आहे हे माहीत नाही .
प्रेम म्हणजे काय हा मोठा गहन प्रश्न आहे. तुमच्या उपरोक्त विधानातलं जे प्रेम आहे ते स्त्रीपुरुषांमधील प्रेम आहे. प्रत्यक्षात आपण फक्त स्वत:वरंच प्रेम करीत असतो. तेही डोपामाईनशिवाय! पुरुषास त्याच्या स्वत:वरच्या प्रेमात जी स्त्री साथ देईल तिच्यावर त्याचं प्रेम बसतं. त्याचप्रमाणे जिला तिच्या स्वत:वरच्या प्रेमाची आश्वस्ती ज्या पुरूषाकडून मिळेत त्याच्यावर तिचं प्रेम बसेल. डोपामाईनास फारतर प्रेमाचं प्रतिबिंब म्हणता येईल. २.
तसेच प्रेम संपलं म्हणुन विवाहबंधनातुन बाहेर पडलेले काही मित्र मैत्रीणी आहेत, केवळ लग्न नावाचा काहीतरी कृत्रीम संस्कार झालाय म्हणुन उगाचच कुढत कुढत एकत्र रहायचं ह्याला काही अर्थ नाही !
एकदम बरोबर. हिंदू समाजात पूर्वापार सर्रास घटस्फोट होत असंत. मात्र त्यांना घटस्फोट अशी संज्ञा नसे. त्यास वानप्रस्थ म्हणायचे. एकदा का स्वत:वरच्या प्रेमात जोडीदाराची साथ मिळेनाशी झाली की प्रेम आटलं असं आपण समजतो. मग दुसरा जोडीदार शोधावा का? की स्वप्रेमचिंतनार्थ सरळ वानप्रस्थ स्वीकारावा? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 05/20/2017 - 08:47 नवीन
मार्कस ऑरेलियस, तुम्ही विचारी आहात म्हणून एक उलेख करतो. समाजात मुक्त लैंगिक संबंध फैलावले तर काय होतं याचा शास्त्रशुद्ध अभ्यास जोसेफ ड्यानियल अन्विन या संशोधकाने केला आहे. दुवा : https://en.wikipedia.org/wiki/J._D._Unwin वरील दुव्यावर जाऊन चार छोटे परिच्छेद आहेत ते वाचाच म्हणून सुचवेन. थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या समाजात मुक्त लैंगिक संबंध फोफावतात तो शेवटी मानवसमूह न राहता पशूंचा कळप होतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 05/20/2017 - 09:18 नवीन
बास प्रदीर्घ प्रतिसाद टंकायचा कंटाळा आलाय ... एकच विचारतो: असेच मी कुठुन तरी शोधुन पॉली-अ‍ॅमोरे , LGBT च्या समर्थनातले, समर्थनातले चार दुवे शोधुन दिले , तर तुम्ही वाचणार का ? की फक्त जोसेफ ड्यानियल अन्विन ह्यांनाच कवटाळुन बसणार ? तुम्ही हिंदुधर्माचे बर्‍याचदा समथन करताना दिसता म्हणुन एक प्रश्न विचारतो की : की तुम्ही तुसर्‍याच्या विचारांचा एक स्वतंत्र विचार म्हणुन आदर करणार की मध्यपुर्वेतल्या धर्मांच्या प्रमाणे 'स्वतःचाच विचार अंतिम सत्य , आणि बाकीचांचा असत्य. बाकीचा विचार धारण करणारे काफीर' अशी भुमिका घेणार ??? आ.न. मा.ऑ.अ‍ॅ.ऑ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 05/20/2017 - 10:32 नवीन
मार्कस ऑरेलियस, १.
असेच मी कुठुन तरी शोधुन पॉली-अ‍ॅमोरे , LGBT च्या समर्थनातले, समर्थनातले चार दुवे शोधुन दिले , तर तुम्ही वाचणार का ? की फक्त जोसेफ ड्यानियल अन्विन ह्यांनाच कवटाळुन बसणार ?
दुवे वाचून बघेन. मात्र LGBT हे समाजातले अपवाद आहेत आणि ते रोग म्हणून धरण्यात यावेत. या नैसर्गिक स्थिती नव्हेत. यांचं स्पष्टीकरण ग्राह्य असलं तरी समर्थन मात्र मला ठार अमान्य आहे. २.
की तुम्ही तुसर्‍याच्या विचारांचा एक स्वतंत्र विचार म्हणुन आदर करणार की मध्यपुर्वेतल्या धर्मांच्या प्रमाणे 'स्वतःचाच विचार अंतिम सत्य , आणि बाकीचांचा असत्य. बाकीचा विचार धारण करणारे काफीर' अशी भुमिका घेणार ???
दुसऱ्यांच्या विचारांचा आदर करायला हरकत कसली. फक्त ते विचार वास्तवाशी संबंधित असावेत इतकीच (माफक) अपेक्षा आहे. तसं पाहायला गेलं तर वाळवंटी पंथांशी सदर चर्चेचा काडीमात्र संबंध नाही. किंबहुना विवाह आणि साहचर्याचा उपासनापंथाशी कसलाच थेट संबंध नाही. भले धर्मग्रंथांत विवाहाविषयी आदेश वा सुचवणी असोत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 05/20/2017 - 19:08 नवीन
दुसऱ्यांच्या विचारांचा आदर करायला हरकत कसली. फक्त ते विचार वास्तवाशी संबंधित असावेत इतकीच (माफक) अपेक्षा आहे.
reality is a matter of perception ! तुम्ही भारतात जन्माला आलात म्हणुन तुमच्यासाठी जे आसपास दिसले ते वास्त्व झाले . हेच सौदी किंव्वा अन्य इस्लामिक देशात जन्मला असता तर बहुपत्नीत्व तुम्हाला वास्तव वाटले असते , कॅलिफोर्नियात असता तर समलैंगिक लोकांचे साहचर्य तुम्हाला नॉर्मल वाटले असते :) भिन्नलिंगी आणि एकपत्नित्व ही जी सध्याच्या जगातील लग्नाची पध्दती आहे ती साहचर्याचा केवळ एक पर्याय आहे त्याला अनेक पर्याय उपलब्ध्द आहे . त्या सगळ्यांविषयी , पटत नसले तरीही , आपण आदर ठेवुन लोकांचे विचार स्वातंत्र्य मान्य करायला हरकत नसावी इतकेच मी म्हणत आहे !! ( बाकी : मी मध्यपुर्वेतील विचारसरणीचा संदर्भ दिलेला , त्या वृत्तीचा संबंध दिलेला . ह्या विचारसरणीची लोकं केवळ स्वतःच्या एकाच मताला कवटाळुन बसतात , अन्य पर्याय उपलब्ध असु शकतात हे ते मान्यच करत नाहीत . )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 05/20/2017 - 19:55 नवीन
मार्कस ऑरेलियस,
reality is a matter of perception !
असं तुमचं मत असेल तर आपण सुस्थापित तथ्यांच्या आधारे चर्चा करू. म्हणजे दृष्टीकोन आड यायला नको. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अभ्या.. Sat, 05/20/2017 - 20:16 नवीन
अजुन चर्चा? बापरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
संजय क्षीरसागर Sun, 05/21/2017 - 06:39 नवीन
अजुन चर्चा? बापरे प्रगो रितसर लग्न करायचा विचार करत नाहीत तोपर्यंत चर्चा जारी राहील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्रसाद गोडबोले Mon, 05/22/2017 - 09:17 नवीन
`बाकी काहीही असो पण
प्रगो रितसर लग्न करायचा विचार करत नाहीत तोपर्यंत चर्चा जारी राहील
आपण माझे रीतसर लग्न लाऊन द्यायचा इतका गंभीरपणे विचार करता हे पाहुन डोळे पाणावले ! म्हणुनच म्हणतो , कितीही मतभेद असले तरीही मतभेद मतभेदांच्या जागी , इरव्ही आपल्याला तुमच्या विषयी जाम आदर आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
प्रसाद गोडबोले Sat, 05/20/2017 - 20:39 नवीन
असं तुमचं मत असेल तर आपण सुस्थापित तथ्यांच्या आधारे चर्चा करू. म्हणजे दृष्टीकोन आड यायला नको.
एक गणित हा विषय सोडला तर सुस्थापित तथ्य असे काही नसते हो , आणि ईथे तर चर्चा चाललीय ती फिलॉसॉफी , मॉरल्स , इथिक्स वगैरे विषयांवर , त्यात तर सुस्थापित तथ्य कालही नव्हते आजही नाही आणि भविष्यात असे काही असण्याचा संभवही नाही . प्रत्येक गोष्ट ही दृष्टीकोनावरच थरते . तुम्ही भारतात काळ घालवल्याने तुम्हाला इथली मॉरल्स , इथली लग्न संकल्पना योग्य वाटत असेल , मी भारत सौदी अमेरिका अशा अनेक ठिकाणी काळ घालवल्याने प्रत्येक ठिकाणी लोकांच्या संकल्पना धारणा भिन्न भिन्न असु शकतात , असतातच हे मला कळुन चुकले आहे . भविष्यात पुर्व युरोप , जपान कोरिया चायना , अफ्रिकेत फिरण्याच्या मानस साहे , तिथले मॉरल्स आणि लग्न विषयक संकल्पना ह्या आपल्या भारतीय धारणां पेक्षा भिन्न असणार हे मला कळुन चुकले आहे . आणि म्हणुनच मी सर्वांच्या मताचा आदर करायला शिकलो आहे :) असो. आता चर्चा होणे नाही , वर जे वैयक्तिक टिप्पण्णीवर एकांगी संपादन झाले आहे त्या विषयी संपादक मंडळाला विचारपुस केली आहे , आणि आयडी संपादित करण्या विषयी विनंती केली आहे . असो. :) इत्यलम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
उ
उपेक्षित Sat, 05/20/2017 - 14:21 नवीन
प्रतिसाद वाचत वाचत इथे येईस्तोवर धागा काय विषयावरचा आहे तेच इसरून गेलो... ;)
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 05/20/2017 - 23:25 नवीन
मी काय म्हणतो, काही देऊन घेऊन संपवू या का विषय??? उगाच शंभर फाटे झाले आहेत, तेवढेच धागे झाले असते तर किमान लेखकाला टीआरपी भेटला असता, काय म्हणता?
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Sun, 05/21/2017 - 08:22 नवीन
देणारे लाख देतील हो पण घेणार्याने घेतले पायजे न ? कारण इथे बरेच जण मान्जीच इस्टमन कलरची (ईशाल भौचे आवडते वाक्य :) ) असा धोशा लावत बसलेत. साला टंकाळा कसा येत न्हाय लोकास्नी काय म्हाईत गेला बाजार इतका येळ कुठून येतो खरडत बसायला ते पण समजत नाही :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
स
संजय क्षीरसागर Sun, 05/21/2017 - 11:58 नवीन
साला टंकाळा कसा येत न्हाय लोकास्नी काय म्हाईत गेला बाजार इतका येळ कुठून येतो खरडत बसायला ते पण समजत नाही त्याचं असं आहे की ज्यांना वैचारिक क्लॅरिटी आहे त्यांना आपल्या प्रतिसादांच मूल्य माहिती असतं आणि त्यांचे विचार त्यांच्या लेखनातून सहज प्रकट होतात. त्यांना आपला वेळ चाललायं असं वाटत नाही तर आपण मांडलेले विचार कित्येकांचे गैरसमज दूर करु शकतात याची कल्पना असते आणि संकेतस्थळाचा एक महत्त्वाचा उद्देश विचारांचं आदान-प्रदान आहे हे देखिल त्यांना माहिती असतं. याउलट काही नुसता टिपी करणारे सदस्य असतात ज्यांना वैचारिक बैठकच नसते, ते अशा चर्चेत भागच घेऊ शकत नाहीत. मग त्यांचे दोन विभाग होतात. एका टाईपचे सदस्य इतके खंतावतात की धागा भरकटवून ते स्वतःची सुटका करवून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून त्यांचा वैचारिक कोतेपणा आणखीनच उघडा पडतो. दुसरा टाईप काहीही वेडगळ प्रतिसाद देऊन चर्चा कशी थांबेल हे पाहतो कारण आपल्याला काहीही कंट्रीब्यूट करता येत नाही ही अस्वास्थ्याची भावना त्यांना व्यथित करत असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित
उ
उपेक्षित Sun, 05/21/2017 - 13:44 नवीन
देवा ते पर्तिसाद जरा समजल अश्या म्हराटीतून देता काय ? ता काय असा आमी दुसर्या टायपात मोड्तुया (तुमच्या भासेत वेडगळ) so येड्यांना निट समजल असे ज्ञानामृत पाजळल (आपल पाजलत ;P ) तर बर वाटल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sun, 05/21/2017 - 20:36 नवीन
तुम्हाला प्रतिसाद कळला असा होतो :) ! तुम्ही स्वतःच्या बॅटनं स्वतःचे स्टंप उडवले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित
उ
उपेक्षित Mon, 05/22/2017 - 15:07 नवीन
जल्ला मेला एक वाक्य समजल्यावर पूर्ण प्यारा समजला असा डंका पिटायला आम्ही काय महाज्ञानी आहोत का तुमच्या सारखे;? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 05/21/2017 - 02:33 नवीन
आमची मि.पा वर अव्यभिचारी निष्ठा आहे.. इतर संकेत स्थळावर चोचा मारायला आम्हाला आवडत नाहि.. असो..चोच्या अकुकाका
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 05/21/2017 - 06:28 नवीन
अकूकाकांचे असले धगधगते बानेदार उद्गार वाचायलाच तर मी अजुन इथे राह्यलौ. अकूकाका, तुम्ही मिपाचे ब्रांड फॉर्च्यूनर आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
च
चित्रगुप्त Sun, 05/21/2017 - 07:08 नवीन
फ्रान्समधे आम्ही मुलाच्या मित्राच्या लग्नाला गेलो होतो, त्यात त्या जोडप्याचा चार-पाच वर्षे वयाचा मुलगाही होता. तिकडे कायदेशीर लग्न सुद्धा पाच का सहा प्रकारचे असते म्हणे. इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी खून करणे/होणे, मुलांना सांभाळणे, पोटगी देणे, प्रॉपर्टीत समावेश, अन्य व्यक्तींशी संबंध ठेवण्यातील मोकळीक, वेगळे होण्यातील सुलभता, टॅक्सची बचत, लग्नाचा खर्च... असे अनेक मुद्दे कोणत्या प्रकारचे लग्न करावे हे ठरवताना विचारात घेतले जातात म्हणे. कुणाला याबद्दल माहितीअसल्यास द्यावी. Types of Marriages या नावाने विकीवर लेख आहे, त्यात तर खूपच प्रकार दिलेले आहेत. https://en.wikipedia.org/wiki/Types_of_marriages
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sun, 05/21/2017 - 07:47 नवीन
तुम्ही डॉक्टर असुन असे विधान करत आहात हे पाहुन आश्चर्य वाटले . साधी सिंपल जेनेटिक टेस्ट करुन मुलाचा बाप कोण ओळखता येते हे बहुतेक तुम्ही जाणत असाल. तसेच खरे डॉक्टर ' मी बोटीवर होतो तेव्हा' ही पालुपद लावत स्वःची लाल करुन घेण्याबाबत प्रसिध्द आहेत हि वाक्ये वैयक्तिक टीका नाहीत असे तुमचे म्हणणे आहे का? पहिल्या वाक्यात तर तुम्ही माझ्या व्यावसायिक क्षमतेवर घसरला आहात. सिम्पल जेनेटिक टेस्ट म्हणेज काय हे आपण लक्षात न घेता अशी विधाने करता म्हणून मला "बेफाट वक्तव्ये" लिहावे लागले. आज या जेनेटिक टेस्ट ( खरं तर हि जीन्स ची नसून डी एन ए किंवा गुणसूत्रांची चाचणी आहे) पण आपण डॉक्टर नाही म्हणून हे सोडून देऊ. डी एन ए टेस्ट मध्ये मुलाची आणि बापाची गुणसूत्रे जुळवून पाहण्यासाठी एका चाचणीला आज ( स्वस्त झाल्यामुळे ) १३ हजार रुपये पडतात. हि काही रक्तातील साखर तपासणी नव्हे कि १०० रुपये दिले आणि ऑटो ऍनालायझर वर तपासणी झाली. जर एक स्त्री पाच माणसांबरोबर रत झाली असेल. तर प्रत्येक मूल जन्माला आल्यावर ६५ हजार रुपये खर्च होतील. उदाहरणार्थ --साध्या ओशो कम्युन मध्येच ५०,००० संन्यासिनी होत्या. त्यातील फक्त १ हजार जरी स्त्रियांनी मुलांना जन्म दिला तरी हा खर्च साडे सहा कोटी होतो. यात शक्यता गृहीत अशी आहे कि हे सगळे ५००० पुरुष डी एन ए चाचणीला तयार होतील. जो पुरुष डी एन ए चाचणीलाच तयार होणार नाही तो मुलाच्या २१ वर्षे संगोपनाला काय तयार होणार? श्री नारायण दत्त तिवारी यांची समग्र केस पहिली जेथे सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन हुकूम मिळवायला लागला तर एखाद्या माणसाला डी एन ए चाचणीला तयार करण्यासाठी किती कटकटी करायला लागतील हे आपल्याला लक्षात येईल. डोपामाईन्चे अर्ग्युमेन्ट वीक होत नाही . उल्ट स्ट्राँगच होते . डोपामाईन च्या ऐवजी क्ष्य्झ नावाची १७६० केमिकल्स असतील प्रेमाला कारण ! ती असतील तेव्हा त्याला प्रेम म्हणु , नसतील तेव्हा प्रेम संपले असे म्हणु असे १७६० केमिकल्स आपल्या मेंदूतून नाहीसे होत नाहीत. त्यामुळे एकदाही ना पहिल्या मुलाबद्दल परदेशी असणाऱ्या माणसाला आपल्या अपत्याबद्दल प्रेम वाटू शकते.किंवा वृद्धाश्रमात ठेवलेल्या आईला आपल्याला लाथाडणाऱ्या मुलाबद्दल प्रेमच वाटत राहत असते. म्हणूनच मी म्हणालो कि तुमचे मूळ गृहीतच चूक आहे कि डोपामाईन नष्ट झाले कि प्रेम संपले. बाकि जीवशास्त्र गणिती अचूकतेने चालत नाही हे आपल्याला लक्षात आले असावे अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
द
दशानन Sun, 05/21/2017 - 08:20 नवीन
+1 प्रतिसाद खूपच आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
द
दीपक११७७ Sun, 05/21/2017 - 11:48 नवीन
एकदम योग्य. नंबर एक. विवाह संस्था योग्य की अयोग्य या साठी फार मोठ्या गणिताची आवश्यकता नाही. एवढा विचार केला तरी पुरे आहे. सुरुवातीला मनुष्या झुंडीनेच रहात होता तेंव्हा विवाह हा प्रकार नव्हता. पुढे तो ज्ञानाने प्रगल्भ होत गेला, मग त्याने स्वत:त भरपुर बदल केले त्यातील एक बदल म्हणजे विवाह करणे. जगाच्या पाठीवर भाषेचे, जाती-जमातीचे किती ही प्रकार असले तरीही विवाह हा प्रकार थोड्या फार फरकाने सगळी कडेच आढळतो. म्हणजे विवाह हा प्रकार हजारो वर्ष जुना असुन, त्याचा मुळ गभा अजुनही तसाच आहे. म्हणजेच कित्येक लोकांनी विचार पुर्वक घेतलेला तो निर्णय आहे. त्यामूळे @मार्कस ऑरेलियस यांचे खालील वक्तव्य निर्थक, भंपक आणि अतिशय संकुचीत विचारा अंती बनलेले मत आहे असे वाटते.
मी पहिल्यापासुन एकच मुद्दा मांडतोय की लग्न ही निरर्थक संस्था आहे @मार्कस ऑरेलियस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा