Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय??????

ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Tue, 05/16/2017 - 10:44
🗣 253 प्रतिसाद
लग्न ही संस्था कशी अस्तित्वात आली यावर समाजशास्त्रज्ञांनचं एकमत आहे.पुर्वापार पुरुष हे अपत्याला पोसत असल्याने होणारे अपत्य आपलेच असले पाहीजे हा रोख होता ,त्यातून स्त्रीला स्वतःशी बांधुन ठेवले तर तिच्यापासून होणारे अपत्य आपलेच असेल याची बर्यापैकी खात्री असते.यातूनच विवाहसंस्था अस्तित्वात आली.भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या वि का राजवाडे यांच्या पुस्तकानुसार पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले.मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते. तर ही मुक्त व्यवस्था बंद पडल्याने पुरुषांची पंचाईत झाली .मग ते बिचारे लग्न या एकाच गोष्टीकडे " लैंगिक भावनेचा निचरा म्हणून पाहू लागले.भारतातलं लैंगिकतेला अनैसर्गीक समजण्याचं हिंदूंचं धोरण विवाहसंस्थेला बळकट करु लागले .यात मग स्त्री चे वस्तुकरण होणे अपरिहार्य होते. आजकाल विवाहाचा उद्देश काय हे जेव्हा माझ्या मित्रांना मी विचारतो तेव्हा सेक्सची सोय असे उत्तर मिळते.कुणी फार पुढे जाऊन दोन जिवांचे मिलन,सृजनशिलता,साहचर्य(companionship) अशी मखलाशी करत असतात.प्रत्यक्षात बायकोशिवाय इतरही स्त्रीयांकडे वखवखलेल्या नजरेने हे कल्पितानंदही बघत असतात. प्रत्यक्षात लग्न हा माझ्यामते पुरुषाच्या अनावर कामेच्छेला मोकळी वाट करुन देण्याचा एक करार आहे ,बाकी काही नाही. दो बदन एक जान,अर्धांगिनी,बेटर हाफ,सृजन वगैरे कविकल्पना म्हणून ठीक असतील पण प्रत्यकषात निसर्गाचे नियम फार वेगळे असतात.हा माझा दृष्टीकोण असेल कदाचित पण त्याला वास्तवाची किनार निश्चित आहे. तर,मिपाकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल. १ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही? २.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्? ३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे? चर्चेदरम्यान येणारे मुद्दे धाग्यात समाविष्ट केले जातील ,धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
73332 वाचन

💬 प्रतिसाद (253)
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Mon, 05/29/2017 - 08:57 नवीन
लोकांना कमीटमेंटची धास्ती वाटते म्हणून तर लीव-इनकडे कल आहे >>>> त्यात गैर काय आहे.मी चाळीशीत असताना माझ्या रंगरुपाकडं,पैश्याकडे आकर्षीत होऊन जर एखादी पंचवीशीची तरुणी मला तिच्याशी संग करु देत असेल तर चाळीशीत अंगाचं पोतं झालेली माझी बायको फक्त लग्नाचं कमीटमेंट म्हणून मी सांभाळत बसावी का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सुबोध खरे Mon, 05/29/2017 - 10:19 नवीन
वैयक्तिक होत असेल पण दुसऱ्या अंगाने विचार करून पहा. एखाद्या माणसाची पंचविशीतील बायको दुसऱ्या माणसाकडे त्याचा पैसे आणि प्रतिष्ठा पाहून आकर्षित झाली आणि त्याच्याशी संग करू लागली तर किती पुरुषांना हे झेपेल. जनावरांसारखे वासनेच्या आहारी जाऊन "कुणाशीही कसेही रत" होणे हे आपल्याला मुक्ततेत अध्यारुथ आहे काय? अधिकार ये जबसे साजनका हर धडकन पर माना मैने मै जबसे उनके साथ बंधी, ये भेद तभी जाना मैने कितना सुख है बंधनमे या बंधनाची "खोली" (गहराई) आपल्याला कळेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
स
संजय क्षीरसागर Mon, 05/29/2017 - 10:33 नवीन
किंवा तुमचा निर्णय आधीच झाला आहे पण तुम्ही त्याबद्दल साशंक आहात म्हणून जनमत चाचपणीसाठी हा धागा काढलायं. मी चाळीशीत असताना माझ्या रंगरुपाकडं,पैश्याकडे आकर्षीत होऊन जर एखादी पंचवीशीची तरुणी मला तिच्याशी संग करु देत असेल तर चाळीशीत अंगाचं पोतं झालेली माझी बायको फक्त लग्नाचं कमीटमेंट म्हणून मी सांभाळत बसावी का? उलट विचारही करुन पाहा म्हणजे खाडकन जाग येईल. आता तुम्हाला सायकॉलॉजिकल कारणमिमांसा देतो. ज्याला स्वतःच्या निर्णयाची खात्री नाही त्यानं लग्न न करणं उत्तम कारण तो काही रोज उठून बघायचा डोपामाईन टेस्टींगचा विषय नाही. त्यातून ज्यांना लग्न म्हणजे दोन बिएचकेच्या बदल्यात रोज ओढवून घेतलेला बलात्कार वाटतो त्यांच्यासाठी तर नक्कीच नाही. लग्न हा एकमेकांच्या सहवासाचा आणि परस्पराप्रती विश्वासाचा आनंद सोहळा आहे. वयपरत्वे रुपात फरक पडत जाणार इतकी सुद्धा मॅच्युरिटी नसेल त्यांना कमीटमेंट शक्य नाही. आणि ज्यांना स्त्री-पुरुष सहजीवन म्हणजे निव्वळ संभोगासाठी जवळीक इतकंच दिसतं ते कितीही संभोग केला तरी अतृप्तच राहाणार कारण संभोगाची खुमारी प्रितीत आहे. दोघात मिळून एक आयुष्य म्हणजे तीचं ते सर्व आपलं आणि आपलं ते सगळं तीचं ही खूणगाठ आहे. तीनं आपल्यासाठी आणि आपण तिच्यासाठी कायकाय केलं याप्रती एकमेकांना कृतज्ञता आहे. अपत्य जन्म आणि संगोपन हे दोघांचं बालपण परत येणं आणि दोघांनी मिळून ते एंजॉय करणं आहे. इतके पैसे आधी ठेव तरच मी मूल जन्माला घालीन असला भंपकपणा सुजाण विवाहितांच्या कल्पनेत सुद्धा येत नाही. एनी वे, मी स्वतः एक यशस्वी आणि आनंदाचं वैवाहिक आयुष्य जगतो त्यावरनं सर्व मतं मांडली आहेत. लिव-इन म्हणजे दोघांनी रेनकोट घालून झेपेल तेवढी अंघोळ करणं आहे, त्यात कुणालाच सुख नाही. शेवटी निर्णय तुमचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
ज
जयंत कुलकर्णी Tue, 05/30/2017 - 13:54 नवीन
आपण कोण आहात हे मला माहीत नाही....पण जिच्याबरोबर काही काळ तरी सुखाचा काढला आहे अशा स्त्री बद्दल ( तसे म्हटले तर कुठल्याच स्त्रीबद्दल अशी भावना बाळगणे हे चुकीचे आहे) एक रद्दी वस्तू म्हणून आपण पहात आहात हे वाचून मलाच शरम वाटते आहे. संपादक महाशय जरा इकडे लक्ष द्याल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
स
संजय क्षीरसागर Tue, 05/30/2017 - 14:49 नवीन
त्यांचं अजून लग्न झालेलं दिसत नाही. लग्न करावं की नाही हा पेच सोडवण्यासाठी त्यांनी हा धागा काढला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 05/29/2017 - 10:02 नवीन
धाग्याची वाटचाल खालील उद्येशाच्या दिशेने जावी असा काही जणांचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे... "अचाट कल्पनाशक्तीचा वापर करून, अतीटोकाचे विचार पुढे मांडून, वाचकांचे मनोरंजन करणे." लेखकाचा इतिहास पाहता, त्याच्याही मनात असेच काहीसे असावे असे वाटायला बराच वाव आहे ;) आणि हा उद्येश बर्‍याच अंशी सफल होत आहे हे दिसतेच आहे ! :) और आंदो !
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 05/29/2017 - 10:36 नवीन
उद्देश असं लिहावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 05/29/2017 - 13:20 नवीन
वा, वा ! या वेळेला तुम्हाला आमचे "मत" पूर्णपणे पटले, त्यात काहीएक कुसळ सापडले नाही का ? वॉव, अत्यानंद का काय म्हणतात ना तो झाला आहे ! :D मात्र, "अशी उपाय योजना कुणी करुन पाहिलीये का ?"; व तत्सम अंतीम -ईये असलेले शद्बप्रयोग कौतुकाने वारंवार करणार्‍याकडून असा "वैय्याकरणीय" प्रतिसाद ! काय हे ?! स्वभावाला औषध नाही, दुसरे काय ? ;) असा फुकट सल्ला देण्यात काय फायदा नाही बघा. अध्यात्माबरोबर व्याकरणाचे क्लासेस घेणारे संस्थळ काढा आणि सल्ला देण्याचा दर दिवस / महिना / वर्ष / सल्ला चार्ज लावा. (टीप : हा सल्ला फुकट आहे.) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 05/29/2017 - 21:39 नवीन
त्याला व्याकरण नाही म्हणत हो ! तो साधा मराठी शब्द आहे आणि तो उद्येश असा नसून उद्देश असा आहे. अध्यात्म वगैरे तर त्यात अजिबात नाही. किरकोळ गोष्टीसाठी ओढाताण नका करु जीवाची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 05/30/2017 - 11:33 नवीन
"पाहिलीये" तरी कुठे प्रमाण शब्द आहे ? स्वतः "पाहिले आहे" हे आणि तत्सम चुकांसंबंधी बरोबर असलेले शब्द शंभर वेळा लिहून काढा आणि परत तशी चूक करणार नाही असे कबूल करा. नाहीतर, "लोका सांगे ब्रम्हज्ञान... " अशी किर्ती झाली आहेच तिच्यात अजून वाढच होईल. :D संबंध नसताना, नको तिथे, नको ते खुसपट काढण्याची सुरसुरी तुम्हाला आली यातच काय ते सगळे सिद्ध होत आहे. इथे तुम्हाला कोणी "कॉपी एडिटर" म्हणुन नेमले आहे का ? नाही. तेव्हा "अशी सुरसुरी स्वतःच्या खाजगी संस्थळावर भागवून घेणेच योग्य होईल" असा विनाशुल्क पण योग्य सल्ला आहे. लोकांचे जबरदस्तीने मनोरंजन करण्याची तुमची खोड जाणे कठीणच्च आहे म्हणा ! =)) =)) =)) *************** अवांतर : वैद्यकीय महाविद्यालयातले आमचे एक सर्जरीचे शिक्षक असे म्हणत असत, "कोणत्याही सर्जनमध्ये सर्जरी करण्याचे कौशल्य अत्यावश्यक आहेच, पण 'केव्हा सर्जरी करू नये' हे ज्याला नीट माहीत आहे व ते तो अमलात आणतो, केवळ तोच उत्तम सर्जन असतो." अधिक शिक्षण आणि अनुभवानंतर तो सल्ला सर्व विषयांमध्ये उपयोगी असल्याचे कळून चुकले. म्हणून, आता आम्ही खालील तत्व कटाक्षाने ध्यानात ठेवतो आणि अमलातही आणतो... एखाद्या विषयात प्राविण्य असणे हे त्या विषयातल्या तज्ञासाठी आवश्यक असतेच, पण, त्या विषयातही, आपले मत केव्हा देऊ नये हे ज्याला माहीत असते, तो उत्तम तज्ञ असतो. प्राविण्य असलेले नसलेले बाकी सगळे, "उथळ पाण्याला खळखळाट फार", या म्हणीची उदाहरणे असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 05/30/2017 - 12:42 नवीन
चवथीच्या मराठी शिक्षकाला विचारलं तरी हरकत नाही. `उद्देश' असंच लिहीतात `उद्येश' असं कदापी लिहीत नाहीत. इतकी छोटीशी सुधारणा मनातल्या मनात करुन घेतली तरी काम होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 05/30/2017 - 13:28 नवीन
संक्षी, तुमची इयत्ता सांगून अजून किती हसवणार तुम्ही आता ? पोट दुखायला लागलं =)) =)) =)) अजून एक म्हण आठवली, "स्वतःचे ठेवी झाकून, दुसर्‍याचं पाही वाकून !" :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 05/30/2017 - 13:36 नवीन
इतकी छोटीशी सुधारणा मनातल्या मनात करुन घेतली तरी काम होईल. मन ? हे मन तर लै खट्याळ असतं आणि त्या मनाचा लब्बाड कंप्युटर बंद करून मगच त्याच्यातून उत्तरे बाहेर (कशी ? काय ? कोण जाणे :D ) काढायची असतात ना, तुमच्याच पूर्वीच्या एका उपदेशानुसार ???!!! मग आता त्या लब्बाड मनातल्या मनात काही तरी करायचा सल्ला कसा काय देताय, आँ ?! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 05/30/2017 - 13:43 नवीन
उद्देश हा शब्द चवथीपर्यंत जायला हरकत नाही असा प्रतिसादाचा अर्थ होतो. एनी वे, मनातल्या मनात निदान हा प्रतिसाद तरी वाचता येतोयं का ? तसाच तो शब्द मनातल्या मनात म्हणा. इतक्या दीर्घ प्रतिसादांची आवश्यकता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 05/30/2017 - 14:01 नवीन
ठीक आहे, थोडक्यात... संतुइसांअकिहतुआ ? पोदुला =)) बस ? खूष ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 05/30/2017 - 14:45 नवीन
तुमच्या कशातही विनोद वाटून हसण्यावर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 05/30/2017 - 17:07 नवीन
पोदुला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सतिश गावडे Mon, 05/29/2017 - 11:01 नवीन
अचाट कल्पनाशक्तीचा वापर करून, अतीटोकाचे विचार पुढे मांडून, वाचकांचे मनोरंजन करणे
अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संजय क्षीरसागर Mon, 05/29/2017 - 11:29 नवीन
धाग्यावर मांडले गेलेले चांगले विचार वाचताच येत नाहीत असं दिसतं.
  • Log in or register to post comments
अ
अरूण गंगाधर कोर्डे Mon, 05/29/2017 - 16:27 नवीन
एकटं जगणे कठीण आहे . म्हणून सहजीवनासाठी लग्न आवश्यक आहे. वय कोणतेही असो , एकटं जगणं कठीण जातं . एकड्या लोकांना विचारून पाहा.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 05/29/2017 - 16:50 नवीन
संजय क्षीरसागर,
लिव-इन म्हणजे दोघांनी रेनकोट घालून झेपेल तेवढी अंघोळ करणं आहे,
शंभर टक्के सहमत. रेनकोटाची कुठलीही आवृत्ती घ्या, सत्य काही बदलंत नाही! :हसून हसून गडबडा लोळण: आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 05/30/2017 - 06:01 नवीन
है शाबास २०० झाले कि
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 05/30/2017 - 06:54 नवीन
200 झाले ? मग हा 201 =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
वेशीवरचा म्हसोबा Tue, 05/30/2017 - 08:31 नवीन
या लेखावरील काही रिप्लाईज हे विवाहसंस्थेचे समर्थन कमी आणि I am living great married life अशी स्वतःची लाल करणारे अधिक वाटतात.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 05/30/2017 - 09:09 नवीन
ज्यांना व्यक्त होण्याची हिंमत आहे ते व्यक्त होतात. ज्यांना आधीच वैवाहिक जीवनात पाचर बसली आहे ते गप राहातात. ज्यांच्याकडे काहीच सांगण्यासरखं नाही किंवा करण्याची हिंमत नाही त्यांना कुठेच काही विधायक दिसत नाही. असे लोक सर्कास्टिक कमेंटस करण्यापलिकडे विशेष काही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेशीवरचा म्हसोबा
व
वेशीवरचा म्हसोबा Tue, 05/30/2017 - 17:45 नवीन
तुम्ही ज्याला हिंमत करुन व्यक्त होणं म्हणता त्याला आम्ही कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणे म्हणतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 05/30/2017 - 17:59 नवीन
आमचाकडे अशी म्हण आहे की जो उघडाच आहे तो सोडणार काय आणि गुंडाळणार काय ? फक्त फालतू कमेंटस करण्यापलिकडे त्याच्याकडे काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेशीवरचा म्हसोबा
ग
गामा पैलवान Fri, 06/02/2017 - 08:22 नवीन
अॅमी, सगळ्या विकसित देशात marital rape कायद्याने गुन्हा झालेला आहे. भारतीय लोकांच्यात नवराबायकोमधली भांडणं नवरा आणि बायकोनेच सोडवायची पद्धत आहे. ही पद्धत परिपूर्ण आहे असा दावा नाही. मात्र हिच्यामुळे भारतात दरडोई घटस्फोट अत्यल्प आहेत. तुम्ही म्हणता त्या विकसित देशांत जोडप्यांत स्वत:ची धुणी दाराआड धुण्याची प्रगल्भता नाही. सरकारी चव्हाठ्यावर धुतल्याने काही विशेष साफ होतात असंही नाही. नवरा सांभाळायची अक्कल नसेल तर लग्नंच करू नये, अशी भारतीय धारणा आहे. कशाला पाहिज मग वैवाहिक बलात्कार! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 06/02/2017 - 09:30 नवीन
१) जमलं तर marital rape ची wiki वाचून काढा. ज्यांची धारणा लग्न म्हणजे एकाच पुरुषाकडून होणारा रोजचा बलात्कार अशी आहे त्यांना सहजीवन कळण्याची शक्यता शून्य ! तस्मात, असले फालतू विचार वाचायचं तुम्ही सुद्धा थांबवाल तर प्रतिसादातून दिसणारा उद्वेग कमी होण्याची शक्यता जास्त . २) ठीक. बाईचं तळ्यात मळ्यात चालू आहे वाटत. इतक्या वेळानं का होईना तुम्हाला मुद्दा समजला हे काय कमीये ! ३) तुमची मतं कळली काय लायकीची आहेत. अनुबंध कृतज्ञता वगैरेच्या आवरणाखाली केवळ आपल फोबियां आणि इन्सेक्युरिटी लपवताय. नेमकी उलटी परिस्थिती आहे ! ज्यांना इन्सिक्योरिटी वाटते ते दुसर्‍यावर विश्वास टाकूच शकत नाहीत. साध्यासाध्या आनंदाच्या गोष्टीत, जिथे दोघांनी एकत्र एंजॉय करायचं, तिथे त्यांना दुसरा बळजबरी करतोयं असं वाटू शकतं. अशा लोकाच्या जीवनात लग्न अशक्य आहे कारण तो पारस्पारिक विश्वासाचा मामला आहे. इन फॅक्ट, ज्याला आपल्या निर्णयाची खात्री नाही अशी व्यक्ती कुणाबरोबरही कायम साशंक राहाणार आणि जोडीदाराच्या कधीही प्रेमात पडू शकणार नाही. कारण प्रेम विश्वासातून निर्माण होतं. प्रेम हा तुम्ही म्हणत असलेल्या `फोबियां आणि इन्सेक्युरिटी ' वर एकमेव उपाय आहे. ४) असो तुम्हाला शेवटचा प्रतिसाद. हा मात्र तुमच्यादृष्टीनं योग्य निर्णय असू शकतो. माझ्याशी वाद घालणारे चुकीच्या धारणातून मुक्त होतात कारण वादात त्यांचे मुद्दे बाद होतात !
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल Fri, 06/02/2017 - 10:07 नवीन
माझ्याशी वाद घालणारे चुकीच्या धारणातून मुक्त होतात कारण वादात त्यांचे मुद्दे बाद होतात ! व्हय द्येवा म्हाराजा, शिरी शिरी शिरी स्वामीम्हाराजा ! तुम्च द्येवुळ कुटंसं हाय म्हनाव ? =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) हायला काय काय म्हुन डिल्युजन आसतात येकेकाची *yahoo* लईच कटिन हाय कि रे खर्र्या द्येवा म्हाराजा *fool* *dash1*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 06/02/2017 - 10:24 नवीन
Image removed. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल
च
चिनार Fri, 06/02/2017 - 12:09 नवीन
गब्रिएल भाऊ .. जवळपासच्या एखाद्या कृष्ण मंदिरात डोकं टेकवून या...हे साहेब आसपासचं असतील कारण असंच काहीसं वाक्य भगवंतानं गीतेमध्ये सांगितलं आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल
प
पैसा Fri, 06/02/2017 - 09:58 नवीन
तुमचं पुरेसं मणोरंजन झालं असेल तर आता दुसरा एखादा विषय घ्या च्युइंगमसारखा चघळायला.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 06/05/2017 - 18:14 नवीन
मग काय ठरलं शेवटी?
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Mon, 06/05/2017 - 18:39 नवीन
ज्यांना अजूनही निष्कर्ष कळला नाही त्यांच्यासाठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 06/06/2017 - 06:45 नवीन
तू आहेस का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Tue, 06/06/2017 - 07:27 नवीन
फक्त विकडेला मी रात्री सव्वा दहाला घरी पोचतो. आलात की फोनवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
स
संजय क्षीरसागर Tue, 06/06/2017 - 07:49 नवीन
बंद पडली वाटतं ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
म
मुक्त विहारि Tue, 06/06/2017 - 08:31 नवीन
तसे नाही..... एखाद्या गोष्टीचा उपयोग तुम्ही कसे करता त्यावर त्या गोष्टीची योग्यता किंवा अयोग्यता ठरत असते. (आणि ती बर्‍याचदा व्यक्ती सापेक्ष असते.सामाजिक भान हा वेगळा मुद्दा आहे आणि तो ह्या धाग्यात नाही.) जादूची छडी हॅरी पॉटरच्या हातात आली की समाजोपयोगी ठरते आणि टॉम रीडलच्या हाती आली की समाजविघातक वागते (मग भले त्या छडींचे केंन्द्र एक असले तरी.) असो, ह्या धाग्यावर चर्चा करण्यात जास्त अर्थ नाही. बादवे, आपला एक कट्टा बॅलन्स आहे. डोंबोलीला कधी येताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 06/06/2017 - 10:01 नवीन
एखाद्या गोष्टीचा उपयोग तुम्ही कसे करता त्यावर त्या गोष्टीची योग्यता किंवा अयोग्यता ठरत असते. एकदम बरोब्बर ! या पोस्टचा उपयोग लग्न या एका महत्वाच्या पर्यायाची विधायकता मांडण्यासाठी केला गेला. अर्थात, ज्यांना लग्न करुन मजा येत नाही ते करवादले आहेत, कदाचित त्यामुळे ते धागा भरकटवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याला माझा इलाज नाही. जे लग्नाला घाबरलेले आहेत त्यांना लिव-इनची निष्फलता सांगण्याचा प्रयत्न केला. अशा लोकांना इथे प्रतिवाद जमला नाही, हे कदाचित या पोस्टचं यश आहे. ज्यांना कशातच काही मजा येत नाही ते केवळ फ्रस्ट्रेशन काढायला इथे येतात असा अनुभव आहे. ते एकसंध पोस्ट टाकू शकत नाहीत की एका ओरियंटेशननी विचार करु शकत नाहीत. अशा लोकांना किमान प्रतिसाद वाचून एक- विचार- दिशा मिळावी अशी आशा आहे. तुम्ही म्हणता तसा संकेतस्थळाच्या सुविधेचा उपयोग कोण कसा करतो यावर सगळं अवलंबून आहे, धागा कुणाचा आहे यानं फारसा फरक पडत नाही. आणि कट्टा म्हणाल तर मिपा हाच माझा ऑन-लाईन कट्टा आहे :) ज्याच्याकडे व्यक्त करण्यासारखं काही आहे त्याला बोललं काय आणि लिहीलं काय, काही फरक पडत नाही. इन फॅक्ट, धिस इज फास्टेस्ट अँड ऑलवेज टू द पॉइंट. आता काही लोक चर्चेचा खफ करतात, तेवढीच त्यांची प्रगल्भता ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 06/06/2017 - 10:29 नवीन
असे नसते हो, मी तरी जाणून बुजुन एखाद्या धाग्याचा खफ करतो. (काही धागे त्या साठी(च) असतात, असे माझे मत.) एखाद्या धाग्याचा खफ का होतो? किंवा ह्या धाग्याचा खफ का झाला? हे चर्चेचे विषय नाहीत.... टाईमपासचेच विषय आहेत. आणि कट्याचे म्हणाल तर...... मी तरी कट्याचा उपयोग एकत्र खाणे-पिणे (अगदी चिंचेची चटणी आणि बटाटे-वडे असले तरी पण त्यावेळी चालते) आणि गप्पा-टप्पा ह्या साठीच करतो. असो, जमल्यास कधीतरी एकत्र भेटू आणि निवांत पणे गप्पा मारू. (कुणास ठावूक कदाचित तुम्ही पण आमच्यासारखे कट्टा प्रेमी व्हाल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 06/06/2017 - 11:10 नवीन
चर्चेत अनेकांनी मनापासून सहभाग घेतला आणि मी तर घेतलाच घेतला. कारण विवाह हा माझ्या अनेक प्रिय विषयांपैकी एक आहे. शिवाय इथलं माझं स्टेटस `नोन टू ऑल बट मिसींग फ्रॉम ऑल' मला फार आवडतं. लोक्स माझी तमा न बाळगता माझ्या पोस्टसवर काहीही ठोकू शकतात आणि मी तर अर्थात, ....ठोकतोच ! एकदा ओळख झाली की सगळी निर्वैयक्तिकता हरवते. फोकस मुद्यावर न राहाता, संबंध जपणं आणि पुढे कंपूगिरीवर जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
व
विशुमित Tue, 06/06/2017 - 11:23 नवीन
एकदा ओळख झाली की सगळी निर्वैयक्तिकता हरवते. फोकस मुद्यावर न राहाता, संबंध जपणं आणि पुढे कंपूगिरीवर जातो. +1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
म
मुक्त विहारि Tue, 06/06/2017 - 12:17 नवीन
"एकदा ओळख झाली की सगळी निर्वैयक्तिकता हरवते. फोकस मुद्यावर न राहाता, संबंध जपणं आणि पुढे कंपूगिरीवर जातो." असे म्हणणे एकांगी आहे. मी आणि बरेच मिपाकर (उदा. सुबोध खरे, डॉ. म्हात्रे, स्पा, औरंगजेब...सूड (ह्याचे शाब्दिक आसूड बर्‍याचदा खाल्ले आहेत....)पण आज जर काही मदत लागली तर हीच मंडळी मदत पण करतात.) इथेही बर्‍याच मुद्द्यांवर एकमतात नसतो. पण एकत्र गप्पा मारतांना "मिपा"चा उपयोग फक्त एक बहाणाच असतो. मतभेद असणे उत्तमच...पण एकमेकांच्या मताचा आदर करून इतर अनेक गोष्टींचा एकत्र उपभोग तर घेवू शकतोच की. मला चेस खेळायला येत नाही...पण इथे जेंव्हा-जेंव्हा चेसचे धागे निघतात तेंव्हा तेंव्हा हजेरी लावतोच. चित्रकला अजिबात येत नाही आणि फोटोग्राफी पण येत नाही...पण म्हणून एसचे किंवा अभ्याचे किंवा चित्रगुप्त ह्यांचे धागे बघतोच की....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
संजय क्षीरसागर Tue, 06/06/2017 - 12:55 नवीन
हाच धागा बघा. समजा माझी लेखकाशी ओळख आहे. आता पोस्टमधली सगळी मजाच गेली ! याला अनेक कारणं असू शकतात : १) लेखक विवाहित आहे (आता काय लिहीणार मी ?) २) लेखक बेंगरुळ असल्यानं त्याच्या विवाहाचा मुहूर्त निघत नाही ( कसं बोलणार या धाग्यावर?) ३) त्याच्या वैवाहिक जीवनाचा बाजा वाजला आहे. (ओळखे म्हटल्यावर झक मारत गप बसायला लागेल!) ४) लेखकाला विवाहातही यश नाही आणि खेड्यात कसली आलीये घंटा लिव-इन ? तस्मात, तो उगीच खयाली धागे टाकतोयं (पण हे उघड कसं लिहीणार?) ५) लेखकानं लिव-इनमधे माती खाल्ली आहे. आता लग्नचं वय ही उलटून गेलं आहे पण पहिल्या लफड्यांमुळे लग्न ही नाही आणि लिव-इन ही नाही अशी गोची झाली आहे ! ( काय बोलणार दोस्तीत?) _____________________________ आता वास्तविक पोजिशन बघा : माझी लेखकाशी ओळख नाही ! आता लेखनाचा सगळा फोकस विवाह वर्सेस लिव-इन या एका मुद्यावर आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 06/06/2017 - 13:05 नवीन
लेखात काय आहे? हे बघून प्रतिसाद देणे (मेक द थिंकिंग स्वीच ऑन) कुणी लेख लिहिला आहे, हे बघायचे नाही... (मेक द रेकनायझेशन स्वीच ऑफ) तुम्हाला हे असे वागणे जमत नसेल तर...... एक साधी टिप.... चहा कसा झाला आहे? हे बघा... कुणी केला आहे? हे बघत बसू नका...(बायकोच्या हातच्या चहापेक्षा काही ठराविक मेहूणीच्या हातचा चहा उत्तम लागतोच.त्याला आमचा नाईलाज.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
म
मुक्त विहारि Tue, 06/06/2017 - 13:17 नवीन
http://www.misalpav.com/comment/reply/39914/942451 तुम्ही जर कायम वर्तमानातच राहणार असाल तर, तुम्हाला वैयक्तिक ओळखीचा आणि प्रतिसादांचा बाऊ करण्यात अर्थ नाही. तुम्ही उगाच भीत आहात, अशी शंका आहे. शिवाय मला तरी तुम्ही कधी वैयक्तिक प्रतिसाद (चिखलफेक) दिलेला नाही. आपले जे काही वाद-प्रतिवाद झाले ते विषयानुरुपच झाले... (जे आपण दोघांनीही सांभाळले.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 06/06/2017 - 19:01 नवीन
संदर्भ तुमच्या लक्षात आला नाही ! व्यक्तिगत ओळख झाली की मुद्दा सोडून व्यक्तीला काय वाटेल याची फिकीर केली जाते. मी तर जसा लेखनात आहे तसाच प्रत्यक्षात आहे. तुम्ही न सांगता कोणत्याही वेळी माझ्या घरी आलात तरी जे लिहीतो तसाच जगतो असं दिसेल. सो, मला कोणत्याच गोष्टीची काहीच काळजी नाही. मला माझ्या लेखन स्वातंत्र्याची बूज राखण्यात रस आहे. कदाचित तुम्ही या भूमिकेतून कधी लेखन केलं नाही त्यामुळे तुम्हाला लक्षात येणार नाही. मित्र दोन-चार कमी असल्यानं काही फरक पडत नाही. हा जो माझ्या मर्जीनं, कधीही आणि केव्हाही ऑन-लाईन कट्टा चालतो, ती मजा फार वेगळी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 06/08/2017 - 05:41 नवीन
एकदा ओळख झाली की सगळी निर्वैयक्तिकता हरवते. फोकस मुद्यावर न राहाता, संबंध जपणं आणि पुढे कंपूगिरीवर जातो. --- असे होऊ शकते पण होईलच असे नाही. एकमेकांशी तात्त्विक मतभेद असले तर ते बिनधास्त मांडता आलेच पाहिजेत (वैयक्तिक उणीदुणी न काढता). जर तसे करता येत नसेल आणि कंपुगिरी करून संबंध जपण्याची गरज पडत असेल तर असे संबंध म्हणजे एक ओझे आहे असे मी समजतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 06/08/2017 - 06:02 नवीन
पण जिथे व्यक्तिगत ओळख आहे तिथे सदस्याची सर्व बॅकग्राऊंड माहिती असते. मग सदस्य फ्रस्ट्रेशनमधून जरी लिहीत असला तरी तसं उघड बोलता येत नाही. शिवाय इथे सदस्यांना काहीही संबंध नसतांना सर्वज्ञ, अध्यात्म अशा कोणत्याही विषयावर घसरण्याची सवय आहे (इथलेच प्रतिसाद पाहा) अशा वेळी ओळखीत त्यांना ही ती सवय सोडावी लागण्याची शक्यता आहे आणि मग दोस्तीखातर मला ही निर्वैयक्तिक होता येणार नाही. कविता किंवा इतर ललित साहित्यात तर कंपुबाजी मोठ्याप्रमाणावर चालते तिथे पोस्टचं योग्य मूल्यमापन करायला दोस्ती कायम आड येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा