Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शेतकर्‍यांचा संप

म
मार्मिक गोडसे
गुरुवार, 06/01/2017 - 13:53
🗣 349 प्रतिसाद
आजपासून (१ जून) राज्यातले शेतकरी संपावर जात आहेत.कदाचित राज्यातील शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ असावी काय आहेत संपावर जाणार्‍या शेतकर्‍यांच्या प्रमुख मागण्या ? १) शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा. २) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी. ३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा. ४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा. ५) शेतकर्‍यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी. ६) दुधाला प्रतिलिटर ५० रु. भाव मिळावा. ७) शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा. ८) ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान मिळावे. का केल्या शेतकर्‍यांनी ह्या मागण्या? शेतकरी सरकारकडे ह्या मागण्या अनेक वर्षांपासून करीत आहे. राज्यातील पूर्वीच्या सरकारने एखादवेळी कृषीकर्ज , कृषीवीजबील माफ करून वेळ मारून नेली होती. परंतू शेतकर्‍यांच्या शेतीमाल संबंधीत समस्या न सोडवल्यामुळे शेतकर्‍याची आर्थिक बाजू कायम कमकुवत राहीली. मग आताच का उचल खाल्ली ह्या मागण्यांनी? राज्याच्या सत्तारुढ महायुतीतील सर्व घटक पक्षांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. विद्यमान पंतप्रधानांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या भाषणात शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या ५०% अधिक भाव देण्याचे आश्वासान दिले होते. शेतकर्‍यांनी त्यावर विश्वास ठेवून सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या. सत्तेत येउन बराच काळ लोटला परंतू ना केन्द्र सरकारने ना राज्य सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावनी केली. शेवटी हताश झालेल्या शेतकर्‍यांना सरकारला आठवण करुन देण्यासाठी संपाचे हत्यार उगारावे लागले. सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे गंभीरतेने बघत आहे का? दररोज शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असताना राज्यसरकार ढिम्म आहे. राज्यातील शेतकरी संपावर जाणार हे माहीत असतानाही मुख्यमंत्रांनी शेतकर्‍यांशी बोलणी केली नाही. 'ह्या संपाचा काहीही परिणाम होणार नाही, आम्ही माल बाहेरुन मागवू', अशी बेताल वक्तव्य सत्ताधारी पक्षातील काही जण करू लागले आहेत. त्यातच खरिबाचा हंगाम सुरू झाला तरी शेतकर्‍यांना पिककर्ज मिळालेले नाही. सगळीकडून शेतकर्‍यांन्ची कोंडी केली आहे. शेतकर्‍यांच्या सगळ्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे का? अल्पदरात पिककर्ज, शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी अखंडीत वीजपुरवठा आणि ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान , ह्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे. संप यशस्वी होईल की नाही ह्यापेक्षा शेतकर्‍याने एकजूट दाखवून आपली ताकद दाखवली आहे हे महत्वाचे. हा संप यशस्वी होण्यासाठी आपल्यासारख्या शहरवासीयांनीही ह्या संपाला पाठींबा द्यायला हवा. सरकारने शेतमाल बाहेरुन आणल्यास त्यावर बहिष्कार टाका. जमल्यास सोशल मिडियातून अधिकाधीक लोकांपर्यंत शेतकर्‍याची समस्या पोहचवा व ह्या संपाला पाठींबा देण्याचे आवाहन करा.

प्रतिक्रिया द्या
73407 वाचन

💬 प्रतिसाद (349)
व
विशुमित गुरुवार, 06/01/2017 - 14:28 नवीन
दोन्ही सेना (शिसे/मनसे), शेट्टी संघटना, काँग्रेस/राका च्या आततायी पदाधिकारी आणि काही अतिउत्साही गावगुंडांच्या शिरकावामुळे या संपाला पहिल्याच दिवशी हिंसक वळण घेऊन गालबोट लागले आहे. सामान्य शेतकऱ्याला जे अभिप्रेत नव्हते तेच पहिल्या दिवशी घडले. संप सफल होऊ नये म्हणून हिंसक वळणाला सत्ताधारी पक्षाचा ही हातभार असण्याची शक्यता आहे. कारण माननीय मुख्यमंत्री काँग्रेस/राका वरती बिल फाडून मोकळे झाले आहेत. त्यामुळे समस्त मिपाकर आणि मिपावचक याना विनंती शक्य तेवढे आपल्या अज्ञानी/दिशाभूल झालेल्या शेतकरी बांधवाना संपाबाबत मार्गदर्शन करा जेणे करून हा संप शांततेत पार पडून शेतकऱ्यांच्या शक्य तेवढ्या मागण्या मान्य करण्यात यश मिळेल.
  • Log in or register to post comments
ज
जानु गुरुवार, 06/01/2017 - 14:59 नवीन
शेतकऱ्याच्या या संपाला पाठिंबा द्यावा की नाही याबाबत द्विधा मानसिकता आहे. शेतकऱ्याची आर्थिक स्थिती मजबुत व्हावी असे मलाही वाटते. पण आजचे राजकीय, सामाजिक लागेबांधे पाहता या संपाचा परिणाम उलटा व्हायची शक्यता जास्त आहे. समाजात जातीभेद पाडण्याचा प्रयत्न फसल्यावर शहरी आणि ग्रामीण अशी फाळणी करण्याचा प्रयत्न दिसतो. या जगात कोणी कोणावर उपकार करीत नाही, की कोणी कोणामुळे उपाशी मरणार नाही हे नक्की आहे.
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 06/01/2017 - 15:22 नवीन
समाजात जातीभेद पाडण्याचा प्रयत्न फसल्यावर शहरी आणि ग्रामीण अशी फाळणी करण्याचा प्रयत्न दिसतो. या कारणामुळे संपाला पाठिंबा द्यावासा वाटत नाही. शेतकर्‍यांची समाजाला असलेली गरज आणि समाजाला असलेकी शेतकर्‍यांना गरज या वादात पडण्यापेक्षा, मुक मोर्चा; शेतकर्‍यांचे संप वगैरे सगळे का घडत आहे याचे कारण उघड आहे. शेतकर्‍यांचा संपातून गरजू आणि गरीब शेतकर्‍यांचेच नुकसान होणार याचे जास्त वाईट वाटत आहे. नक्की कोणत्या जिल्ह्यात किती कर्जे आहेत आणि त्या जिल्ह्याचे शेतीतून आलेले उत्पन्न असा काही विदा उपलब्ध असल्यास अनेकांचे डोळे उघडणारी माहिती समोर येईल याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जानु
प
पुंबा Fri, 06/02/2017 - 07:00 नवीन
शेतकर्‍यांची समाजाला असलेली गरज आणि समाजाला असलेकी शेतकर्‍यांना गरज या वादात पडण्यापेक्षा, मुक मोर्चा; शेतकर्‍यांचे संप वगैरे सगळे का घडत आहे याचे कारण उघड आहे. शेतकर्‍यांचा संपातून गरजू आणि गरीब शेतकर्‍यांचेच नुकसान होणार याचे जास्त वाईट वाटत आहे.
+++११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
स्वामी संकेतानंद गुरुवार, 06/08/2017 - 09:35 नवीन
2016-17 वर्षात कृषी कर्ज घेणारे पहिले 5 जिल्हे:- 1. सोलापूर:- 8000 कोटी ₹ 2.पुणे:- 6126 कोटी ₹ 3. नगर:- 5489 कोटी ₹ 4. नाशिक:- 5119 कोटी ₹ 5. मुंबई शहर:- 4100 कोटी ₹ 2016-17 वर्षात कृषी कर्ज घेणारे शेवटचे 5 जिल्हे:- 1. पालघर:- 360 कोटी ₹ 2. रायगड:- 347 कोटी ₹ 3. ठाणे:- 273 कोटी ₹ 3. गडचिरोली:- 270 कोटी₹ 5. मुंबई उपनगर:- 251 कोटी₹ पैकी पीक कर्ज घेणारे पहिले पाच:- 1. सोलापूर:- 5000 कोटी रुपये 2. नगर:- 3843 कोटी रुपये 3. नाशिक:- 3501 कोटी रुपये 4. पुणे:- 3322 कोटी रुपये 5. जळगाव:- 3063 कोटी रुपये शेवटचे पाच जिल्हे:- 1 गोंदिया:- 275 कोटी ₹ 2 गडचिरोली:- 210 कोटी ₹ 3 ठाणे:- 185 कोटी₹ 4 रायगड:- 180 कोटी ₹ 5 पालघर:- 175 कोटी ₹ मुंबई शहर आणि मुंबई उपनगरे:- शून्य पीक कर्ज ( संदर्भ:- महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
अ
अत्रे गुरुवार, 06/08/2017 - 10:03 नवीन
यातल्या कोणत्या पानावर आहे माहिती? https://mahades.maharashtra.gov.in/files/publication/ESM_Mar2016_17.pdf https://mahades.maharashtra.gov.in/files/publication/ESM_Eng2016_17.pdf
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
स
स्वामी संकेतानंद गुरुवार, 06/08/2017 - 10:13 नवीन
पान क्रं १०७ , परिशिष्ट ६.२ खाली तक्ता दिलाय तो बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
म
मोदक गुरुवार, 06/08/2017 - 10:42 नवीन
सध्या सरसकट कर्जमाफीची मागणी असताना, कोणत्या जिल्ह्याचे किती कर्ज आहे ही आकडेवारी कुठे मिळेल..? ****** वेगळा विदर्भ या धाग्यावर मी दिलेली एक प्रतिक्रिया इथे चिकटवत आहे... माझ्या अंदाजे जिल्हानिहाय कर्जाची आकडेवारी मिळाली तर अशी कांहीतरी वस्तुस्थिती असेल. (अंदाज चुकीचा ठरावा ही अपेक्षा आहे) १९९६ साली सेना भाजपचे सरकार बर्‍यापैकी स्थिरावल्यानंतर (वेगळा विदर्भ) हा मुद्दा काँग्रेसने पुन्हा चर्चेत आणला होता. या अनुषंगाने अनेक बैठका आणि पत्रकार परिषदांनंतर दत्ता मेघेंनी यावर एक अहवाल तयार करण्यास सुरूवात केली. दरडोई उत्पन्न, शालेय शिक्षण, स्त्री साक्षरता, रस्ते, रेल्वे, (दळणवळण), वैद्यकीय सुविधा, पिकाखालील जमीन, शेतकामगार, सिंचन अशा २४ "विकासनिकषांवर" मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ यांचा तुलनात्मक अहवाल. असे सर्वसाधारण स्वरूप होते. या २४ निकषांपैकी जवळजवळ सर्व निकषांवर मराठवाडा विदर्भापेक्षा मागासलेला होता. २४ पैकी ८ निकषांवर विदर्भ पहिल्या / दुसर्‍या, ६ निकषांवर तिसर्‍या आणि २ निकषांवर चौथ्या स्थानावर होता. मराठवाडा कोठेही पहिल्या स्थानावर नव्हता. धक्कादायक म्हणजे कोकण २४ पैकी १४ निकषांवर चौथ्या स्थानावर होता. हा अहवाल कधीही प्रकाशीत झाला नाही. अचानकपणे एकदा पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांच्या हाती हा अहवाल पडला व त्याचा गोषवारा प्रसिद्ध झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
म
मोदक गुरुवार, 06/08/2017 - 11:09 नवीन
माझी वाक्यरचना थोडी चुकली. कोणत्या जिल्ह्याचे किती "थकीत" कर्ज आहे... माफ करावयाचे कर्ज कोणत्या जिल्ह्याचे किती आहे? किंवा शेतकरी आत्महत्या आणि जिल्ह्याचा कर्जाचा बोजा असा काही ताळमेळ मिळू शकतो का..? यातून लगेच कांही गुणोत्तरे काढता येणार नाहीत याची कल्पना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
स्वामी संकेतानंद गुरुवार, 06/08/2017 - 16:43 नवीन
'थकित' कर्जाची जिल्हावार आकडेवारी माझ्यापाशी नाही, पण ती तुम्ही आरटीआय दाखल करून मिळवू शकाल असे वाटते.(कोणत्या बँकेपाशी किती थकित कर्ज आहे याची आकडेवारी उपलब्ध आहे, पण ती संपूर्ण राज्याची आहे, जिल्हावार नाही.) शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्यावर बँकेचे कर्ज कमी असते, सावकारी कर्जच जास्त असते. त्यांचे सरासरी कर्ज जेमतेम ३५ हजार असते अशी बातमी मागे वाचल्याचे आठवते. पण वरील आकडेवारी पाहून एवढे लक्षात येईल की ज्या जिल्ह्यात एकूण पीक कर्जच पाच हजार कोटी रुपये असेल तिथे अगदी १० टक्के थकित कर्ज असले तरी ते ५०० कोटी होईल जे पालघर किंवा रायगड किंवा गडचिरोली किंवा गोंदिया या जिल्ह्याने घेतलेले १०० टक्के कर्ज थकित राहील असे गृहीत धरले तरी त्यापेक्षा मोठेच ठरेल!!
माफ करावयाचे कर्ज कोणत्या जिल्ह्याचे किती आहे? किंवा शेतकरी आत्महत्या आणि जिल्ह्याचा कर्जाचा बोजा असा काही ताळमेळ मिळू शकतो का..?
माफीच्या अटी निश्चित झालेल्या नसल्याने तो आकडा मिळणार नाही. जिल्ह्याचा कर्जाचा बोजा आणि शेतकरी आत्महत्या असा काही ताळमेळ असता तर सर्वाधिक आत्महत्या सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यात व्हायला पाहिजे, पण तसेही होताना दिसत नाही. 'थकित' कर्जाचा बोजा गृहित धरले तरी ताळमेळ दिसणार नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 06/08/2017 - 17:17 नवीन
शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्यावर बँकेचे कर्ज कमी असते, सावकारी कर्जच जास्त असते. त्यांचे सरासरी कर्ज जेमतेम ३५ हजार असते अशी बातमी मागे वाचल्याचे आठवते. एक शंका - असे असेल तर सरकारने कर्जमाफी करूनही शेतकरी आत्महत्यांवर कसा फरक पडेल..? सातबारा बँक कर्जाच्या बाबतीत कोरा होईल, सावकारी कर्जामुळे शेतकर्‍याचे नुकसान होत राहीलच. बरोबर..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
स
स्वामी संकेतानंद Fri, 06/09/2017 - 06:42 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
स्वामी संकेतानंद Fri, 06/09/2017 - 06:44 नवीन
तोच मुद्दा आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ज
जेम्स वांड गुरुवार, 06/01/2017 - 15:36 नवीन
५) शेतकर्‍यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी. ========== ज्यांना खरेच पेन्शन हवी आहे त्यांनी स्वतः/बचत गटाच्या माध्यमातून/ सहकारातून/ गावातील बँक प्रतिनिधीच्या मदतीने 'अटल पेन्शन योजनेचा' लाभ घेता येऊ शकेल, जनसुरक्षा (सोशल सिक्युरिटी) संबंधित ही योजना उत्तम वाटली होती. फक्त त्यातही कोणाला जर राजकीय विचाराने स्कीम त्याज्य वाटत असेल तर त्याने स्वतःच्या कर्माने जगावे/मरावे, राजकीय संप वगैरे प्रकारांवर बोलायची इच्छा नाही.
  • Log in or register to post comments
R
ray Fri, 06/02/2017 - 12:56 नवीन
Eligibility • APY is applicable to all citizen of India aged between 18-40 years.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 06/01/2017 - 16:02 नवीन
शहरी आणि ग्रामीण अशी फाळणी करण्याचा प्रयत्न सरकारच करत आहे. एक समाज जो आपले नुकसान सोसून संपात सहभागी होतोय त्याला मदत करायची सोडून सत्ताधारी पक्षातील काही लोक शेतमाल बाहेरून मागवायची भाषा करत आहेत. शहरातील लोकांनी तशी मागणी केली आहे का? वाहतुकदार जेव्हा संप करतात तेव्हा सरकार का नाही शेतकर्‍याच्या मालाचा विचार करत? मुंबईत जेव्हा सफाई कामगार संपावर जातात त्यावेळी शहरी माणूस नक्की कोणाच्या बाजूने असतो? प्रशासनाच्या कि सफाई कामगारांच्या?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 06/01/2017 - 16:14 नवीन
शहरी आणि ग्रामीण अशी फाळणी करण्याचा प्रयत्न सरकारच करत आहे.
जणूकाही ह्या संपाआधी किंवा शेतकर्‍यांचे प्रश्न उद्भवण्यापूर्वी सर्व एकसंध समाज होता फक्त काहीजणचे निवासस्थान शहरात आणि काहीजणांचे खेड्यात एवढाच फरक होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
र
राघवेंद्र गुरुवार, 06/01/2017 - 16:16 नवीन
पानी फौंडेशन ची मालिका बघितली आणि आता हा संप. खरे काय आहे हे कळायलाच मार्ग नाही.
  • Log in or register to post comments
क
कुंदन गुरुवार, 06/01/2017 - 19:09 नवीन
आचरणात आणायची गरज नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र
स
सुबोध खरे गुरुवार, 06/01/2017 - 17:09 नवीन
१) शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा. "सरसकट" कर्जमाफी --पैसे कुणी आणि कुठून आणायचे? २) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी. ३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा. उत्पादन खर्च कुणी आणि कसा ठरवायचा? वीज फुकट, बिनव्याजी कर्ज, वय ६० नंतर पेन्शन आणि फुकट तुषार आणि ठिबक सिंचन दिल्यावर उत्पादन खर्च फक्त बियाणं, खत आणि मजुरी राहते. मग तर आहे त्यापेक्षा ५० टक्केच आधार भाव मिळेल. चालेल काय? ४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा. या पत पुरवठ्याचा भार कुणी उचलायचा? सरकारने? सरकार पैसे कुठून आणणार. नवीन कर लावूनच मग महागाई झाली म्हणून बोम्ब मारायला मोकळेच ५) शेतकर्‍यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी. तिथे सरकारने निवृत्ती वेतनाचा भार पेलत नाही म्हणून २००४ नंतर भरती झालेल्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाचा भार स्वतः उचलायला लावला आहे. आणि इथे शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन द्यायचे. ६) दुधाला प्रतिलिटर ५० रु. भाव मिळावा. १०० रुपये लिटरने किती लोक दूध विकत घेतील? ७) शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा. म्हणजे आम्ही रात्रभर उसाला पम्प लावून थंड झोपायला मोकळे. ८) ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान मिळावे. शेत तुमचे आणि त्याला लागणारी औजारे सरकारने फुकट पुरवायची. उत्तम आहे अजून मागण्या मुलीच्या लग्नासाठी सरसकट १० लाख रुपये अनुदान मुलाच्या शिक्षणासाठी १० लाख रुपये गावात पक्के घर बांधण्यासाठी १० लाख रुपये या हि मागून घ्या सरकार आहे घरचंच. नाही तरी आम्ही कागदोपत्री शेतकरी आहोतच. मग अनुदान, फुकट कर्ज, वीज, पाणी मिळत असेल आणि परत ६० नंतर निवृत्ती वेतन तर काय ठेवलाय कष्ट करण्यात. जाऊ गावालाच तेथे घर आहे वडिलोपार्जित आणि राहू थंडपणे काय म्हणताय?
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 06/01/2017 - 18:09 नवीन
ए डाक्टर.. कोर्पिओला पैशे कोन देनार..? ऑ..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मार्मिक गोडसे Fri, 06/02/2017 - 13:35 नवीन
शेत तुमचे आणि त्याला लागणारी औजारे सरकारने फुकट पुरवायची. सिंचन उपकरणे सरसकट सर्वांना फुकट द्यायची की शेतकर्‍याच्या जमीनधारणेप्रमाणे अनुदान द्यायचे हे सरकारने ठरवायचे आहे. ह्यात सरकाचाही फायदा आहे. ठिबक सिंचनामुळे बोअर, विहिरी , नदीतील पाण्याचा उपसा कमी होतो, ठिबकसिंचनाद्वारे पिकाला पोषक घटक दिल्यास ते कमी प्रमाणात द्यावे लागतात. कमी प्रमाणात देउनही उत्पनात लक्षणीय वाढ होते. खतं कमी लागल्यामुळे त्यावर देण्यात येणार्‍या सबसिडीचीही बचत होईल. पाण्याचे योग्य नियोजन केल्यास उन्हाळ्यातही पाणी मुबलक मिळू शकते.अनेक गावे टँकरमुक्त होउ शकतील. एखाद वर्षी पाऊस कमी पडला तरी ठिबकमुळे निदान पिकपाणी जळून जाण्याचे प्रमाण नक्कीच कमी होतील, दुष्काळी पॅकेज द्यावे लागणार नाही. हे सगळं युद्धपातळीवर झालं तर ह्याचे रिझल्ट १-२ वर्षात बघायला मिळतील, ह्याचा राजकीय फायदाही सताधारी पक्षाला मिळेल.
म्हणजे आम्ही रात्रभर उसाला पम्प लावून थंड झोपायला मोकळे.
अखंडीत विजपुरवठा असल्यास शेतकरी दिवसा पाणी का भरणार नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
औ
औरंगजेब Sat, 06/03/2017 - 14:29 नवीन
सरसकट कर्ज माफीचा बोजा मध्यमवर्गावरच पडणार आहे कारण सर्वात जास्त कर आपणच भरतो. त्याहून परिस्थिती अशी आहे की राज्याच्या तिजोरीत पैसेच नाही आहेत. ३००० कोटींच कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे ते माफ कोण करणार?? १००% कर्जमाफी दिली तर पुन्हा कर्ज बाजारी हौण्याची उरतेच ना? म्हणुन आत्ता शेतकर्यांना ५०-६०% कर्जमाफी द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मार्मिक गोडसे Sat, 06/03/2017 - 15:08 नवीन
त्याहून परिस्थिती अशी आहे की राज्याच्या तिजोरीत पैसेच नाही आहेत. राज्याची तिजोरी भरण्याची व रोजगार देण्याची क्षमता फक्त आणि फक्त कृषी व्यवसायातच आहे. सरकारने कृषी क्षेत्राला केलेली मदत हे ओझे न समजता गुंतवणूक समजल्यास राज्यात एकही तरुण बेकार राहाणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: औरंगजेब
त
तेजस आठवले गुरुवार, 06/01/2017 - 18:00 नवीन
१) शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा. सरसकट सगळ्या शेतकऱ्यांची कर्जे माफ का करावीत? त्या साठीचे पैसे सरकार कुठून आणणार ? एखादया शेतकऱ्याची कर्ज फेडण्याची क्षमता असेल पण त्याने कर्ज थकवलेले असेल तर काय करायचे ? नोटाबंदी नंतर जिल्हा बँकांमध्ये कोट्यवधी रुपये जमा झाले ते कोणी भरले असतील ह्याची काही तपासणी झाली आहे का? ४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा. वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज, तसेच कर्जाच्या इतर प्रकारांसाठी कर्ज घेणारा सामान्य माणूस कमीत कमी १०% व्याजाच्या दराने कर्ज घेतो. त्यासाठी त्याला मालमत्ता गहाण ठेवावी लागते आणि जर का तो कर्ज फेडू शकला नाही तर बँक ते ताब्यात घेऊ शकते. बिनव्याजी कर्ज देणे योग्य होणार नाही. शेतकरी नाडला जातो आहे हे खरे आहे पण त्याला कोण नाडते ते शोधून त्यांची अरेरावी बंद केली पाहिजे. आणि बिनव्याजी कर्ज दिले तरी मूळ मुद्दल फेडले जाईल ह्याची खात्री शेतकरी देणार का ? ५) शेतकर्‍यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी. ज्यांना पेन्शन नाही त्यांच्या साठी PPF योजनेची माहिती घेऊन त्यात गुंतवणूक करावी. खाजगी नोकरी मध्ये पेन्शन ही सुविधा नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना पण ही आता बंद करण्यात आली आहे. मुळात ही सूचनाच व्यवहार्य नाहीये. ७) शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा. अखंडित वीजपुरवठा पाहिजेच. मोफत कशासाठी ? ८) ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान मिळावे. म्हणजे उदाहरणार्थ मला सिंचनासाठी एकरी २ लाख रुपये खर्च येणार असेल तर तो पूर्ण खर्च सरकारने उचलला पाहिजे ? शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न, आणि शेतकऱ्यांचे नाव पुढे करून आपापली पोळी भाजून घेण्याची मानसिकता ह्यावर मिपावर बरीच चर्चा झाली आहे, सरसकट फुकट मागण्याची मानसिकता कोणाचेही भले करत नाही. शेतकऱ्यांचा संप आणि सामान्य जनतेची अन्नधान्याची गरज हे दोन स्वतंत्र विषय आहेत. कल्याणकारी राज्यव्यवस्थेत सरकारने शेतकऱ्यांची चर्चा करून तोडगा काढायचा प्रयत्न केलाच पाहिजे, पण सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडता येणार नाही. दुर्दैवाने ह्या संपामुळे बाजारात अन्नधान्य विकत घेण्यास उपलब्धच राहिले नाही तर सरकारने खरंच आयात करून देशातील लोकांची(ह्यात शेतकरी पण आले) गरज भागवावी. ह्यात माझ्या मते चुकीचे काहीही नाही. समजा ह्या संपामुळे बाजारात भाज्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला, आणि लोकांनी सरसकट डाळ, कडधान्ये खायचे प्रमाण वाढवले, त्यामुळे मागणी वाढून बाजारातील तूरडाळ प्रचंड प्रमाणात खरेदी केली जाऊ लागली, त्यामुळे भाव वाढले तर तूर उत्पादक शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय असेल ? शेवटी प्रत्येकाला एकमेकांची गरज आहेच.मार्केट शेवटी स्वतःच स्थिरस्थावर होतेच (equilibrium). कुठलीही गोष्ट अनंतकाळापर्यंत टिकत नाही. पेपरातले टोमॅटो रस्त्यावर फेकणारे, तसेच दूध रस्त्यावर ओतून देणारी छायाचित्रे बघून सामान्य माणसाच्या मनातील शेतकर्यांबद्दलची सहानुभूती कमी होते. एखाद्या माणसाच्या मनात शेतीतल्या नवीन कल्पना आणि धडाडी असेल ,हातात रग असेल, शेतीत काहीतरी करून दाखवायची जिद्द असेल; पण त्याचा शेतीशी/शेतजमिनीशी दुरान्वयेही संबंध नसेल तर त्याने काय करावे? कारण माझ्या माहिती प्रमाणे शेतकरी असंच कुणालाही बनता येत नाही, बरोबर ? एखादा शेतकऱ्याचा मुलगा चांगले शिक्षण घेऊन नोकरी करू शकतो पण एखादा नोकरी करणारा माणूस शेती व्यवसायामध्ये जाऊ शकत नाही. मला ह्याबाबत नक्की माहिती नाही. गांभीर्याने विचारतो आहे.
  • Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या Sat, 06/03/2017 - 05:15 नवीन
४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा. म्हणजे परत काही वर्षाने गरीब शेत करी पुन्हा त्या कर्ज माफी सठी आंदोलन करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
अ
अनुप ढेरे गुरुवार, 06/01/2017 - 18:03 नवीन
एक उपाय आहे. शेतजमीन सर्व सरकारजमा करा. लोकांच्या नावावर सातबारे नकोच. शेतकर्‍याला रितसर पगार द्यावा सरकारने. हे चालेल काय शेतकर्‍यांना.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/03/2017 - 08:03 नवीन
प्रतिसाद पटला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अद्द्या गुरुवार, 06/01/2017 - 18:03 नवीन
छोटे शेतकरी अडकत असतील सावकारीच्या आणि पावसाच्या खेळात .. पण मग मोठ्या शेतकऱ्यांना टॅक्स लावणार का ? ते भरायला तयार आहेत का ? आपल्याच कमीत शेती आणि त्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या शेतकरी लोकांना मदत व्हावी म्हणून इज्जतीत वीज बिल , कर्जाची परतफेड आणि टॅक्स भरायला तयार आहेत का शेतकरी ? बाकी.. स्वतःला शेतकऱ्यांचे तारणहार वगैरे म्हणवून घेणाऱ्या नेत्यांची वाक्ये ऐकली तर वाटते.. कराच बंद शेती वर्षभर .. एक रुपयाही हि उगवू नका शेतात.. मग बघूच बाकीचे किती मदत करायला येतात आणि लोकांच्या रोजच्या आयुष्यावर आणि सरकारवर किती फरक पडतो ते :)
  • Log in or register to post comments
व
वेशीवरचा म्हसोबा गुरुवार, 06/01/2017 - 18:34 नवीन
एव्हढं सगळं सरकारकडून मिळणार असेल तर मी ही गावी जाऊन शेती करेन म्हणतो. आजच म्हाताऱ्याला फोन करून बैलजोडी पाहायला सांगतो. आपण बारा बारा तास काम करुन, नोकरीतले ताण तणाव सहन करुन मिळणारे पगारावर सरकार पगार हाती यायच्या आधीच कर लावणार, कर भरून उरलेला स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून खरेदी करताना त्यावर कर लागणार, थोडा फार पैसा भविष्याची तरतूद म्हणून ब्यांकेत ठेवला तर तिथेही मिळणारे व्याजाच्या चार पैशावर कर. कुणी शिकवलेत असले धंदे. त्यापेक्षाही मी ही आता कीबोर्ड आणि माऊस सोडून नांगर आणि बैलांचे कासरे धरीन म्हणतो. शेतकरी झालो की सगळंच तर सरकारकडून फुकट मिळणार आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 06/02/2017 - 08:26 नवीन
जिथे आहात तिथेच सुखी राहा साहेबा. आम्हीच शेतीवरचा भार कमी करून शहरात नोकरीला आलोय. व्हंडीची (ओला चारा) ओजी उचलून खांद्याची कातडी सालटतील भाऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेशीवरचा म्हसोबा
व
वेशीवरचा म्हसोबा Sat, 06/03/2017 - 05:41 नवीन
व्हंडीची (ओला चारा) ओजी उचलून खांद्याची कातडी सालटतील भाऊ.
मी शेतकरी नाही असं तुम्ही गृहीत धरलेलं दिसतंय. ज्या वयात बाकीची पोरं "जंगल बुक" पाहत होती त्या वयात मी रानात अनवाणी पायांनी गुरं राखली आहेत. थोडं मोठे झाल्यावर कंबरडे मोडेपर्यंत भात कापणी केली आहे आणि मान मोडेपर्यंत चार चार किलोमीटर भाताचे भारे वाहीले आहेत. माझ्या इंजिनियरिंगची फीचे पैसे बाबांनी लोकांपुढे हात पसरुन जमा केले आहेत. (आई बाप दोघेही सरकारी नोकरीत असूनही केवळ मागासवर्गीय असल्याने वर्गमित्राना शिष्यवृत्ती मिळताना पाहून मनावर ओरखडे उमटत होते) शेतीतील आपल्यालाच कळते या भ्रमातून बाहेर या राजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/03/2017 - 08:21 नवीन
आई बाप दोघेही सरकारी नोकरीत असूनही केवळ मागासवर्गीय असल्याने वर्गमित्राना शिष्यवृत्ती मिळताना पाहून मनावर ओरखडे उमटत होते
साले लै माजले आहेत. जाऊ द्या. सोडून द्या. आपण भिकारी तर बाकीचेही भिकारीच राहीले पाहिजेत. तरच जनरली आपल्याला बरं वाटतं. - एक ऑब्जर्वेशन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेशीवरचा म्हसोबा
क
कापूसकोन्ड्या Sat, 06/03/2017 - 05:18 नवीन
कुणी शिकवलेत असले धंदे. त्यापेक्षाही मी ही आता कीबोर्ड आणि माऊस सोडून नांगर आणि बैलांचे कासरे धरीन म्हणतो. शेतकरी झालो की सगळंच तर सरकारकडून फुकट मिळणार आहे.
कोणताही माणूस कितीही पैसे असले तरी शेती करू शकत नाही. १००% राखीव कुरण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेशीवरचा म्हसोबा
र
रामपुरी गुरुवार, 06/01/2017 - 19:03 नवीन
अशीच एक IT हमाल संघटना काढावी आणि खालील मागण्या कराव्यात अशी फार्फार इच्छा आहे. १) IT हमालांना सरसकट कर्जमाफी देऊन सर्व मालमत्ता कर्जमुक्त करावी. २) कामाचे तास निश्चित करावेत. ३) IT हमालांना त्यांच्या खर्चाच्या दीडपट पगार मिळावा. ४) घरासाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा. ५) वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी. ६) किमान पगाराचे आणि पगारवाढीचे निकष संघटनेशी चर्चा करून ठरवावेत. ७) अखंडित व मोफत WiFi पुरवठा करावा. ८) खाजगी प्रवासासाठी आणि सहलींसाठी १००% अनुदान मिळावे. ९) कितीही आणि कधीही भरपगारी सुट्ट्या मिळाव्यात. १०) कामाच्या वेळात मोफत जेवण मिळावे. ११) ठराविक दिवस काम केल्यावर परदेशवारीची हमी मिळावी आणि बरोबर कितीही लोकांना घेऊन जायचा खर्च कंपनीने द्यावा. इत्यादी इत्यादी महत्वाचे म्हणजे या मागण्या पुरविण्यासाठी कंपन्यांना निधी कमी पडत असल्यास सरकारने भरपाई करावी.
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Fri, 06/02/2017 - 09:08 नवीन
१२) ज्या प्रमाणे शेतकर्‍याच्या घरात एक तरी माणूस दुसरीकडे काम करत असतो त्याप्रमाणे IT हमालाच्या घरटी एका माणसाला तरी शेतजमीन कसायला द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी
स
सुखीमाणूस Fri, 06/02/2017 - 03:46 नवीन
सम्पातल्या बरयाच मागण्या अवास्तव आहेत पण तरीही शेती या व्यवसायाकडे किवा छोटया शेतकरयाकडे सहानुभुतीने पहायला हवे. शेती करणे अपार कष्टाचे आहे. हा सम्प पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहे असे दिसते
  • Log in or register to post comments
ल
लिओ Fri, 06/02/2017 - 03:54 नवीन
१) शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा. किंगफिशरच्या कर्जाचा भार सामान्य जनता उचलत नाहि, तो भार सरकार उचलते तो पण समर्थपणे, किंगफिशरला सरकारने बेलआऊट पेकेज दिले नाहि हे लंडनमध्ये बोलले जाते. ( सध्या किती मल्ल्या भारतात आहेत व पळुन जाण्याच्या तयारित आहेत. ??? ) २) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी. एखाद्या तज्ञ वक्तिकडुन स्वामिनाथन आयोग कसा खोटा आहे ते सिध्द करावे. ३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा. सध्याचा हमीभाव योग्यच आहे हे सरकारने सप्रमाण सिध्द करावे, ४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा. नैसर्गिक खराब परिस्थित सुध्दा कर्ज / बिल वसुली होते, शेतकरी सावकाराकडे शेतीसाठी कर्ज मागायलाच जात नाहि सिध्द करावे ५) शेतकर्‍यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी. ६) दुधाला प्रतिलिटर ५० रु. भाव मिळावा. एका वर्षात सर्व दुध प्रक्रीया आस्थापनांचे ऑडिट करुन दुध उद्योगाची परिस्थिती जनतेला सांगावी ७) शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा. सर्व उद्योगधंद्याना फक्त न फक्त फायद्यात वीज विकली जाते. आनि सर्व उद्योगधंद्याकडुन वेळेवर वीजबिले भागवली जातात. ८) ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान मिळावे. १००% अनुदान देवुन उरलेले पाणी सरकार सामान्य जनतेला देनार कि उद्योगांना ??
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 06/02/2017 - 04:23 नवीन
१ ) शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा. हातो हात सर्व जनतेची गृह कर्जे माफ करावीत. २) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी. ३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा. ५ पट का नाही ? ४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा. राज्यांतील सर्वच कर्जे बिनव्याजी करावी म्हणजे लगोलग इस्लामिक ५) शेतकर्‍यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी. शेतकऱ्यांनाच का ? आम्हा सर्वानाच पेन्शन द्यावे. ६) दुधाला प्रतिलिटर ५० रु. भाव मिळावा. २०० रुपये का नाही ? ७) शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा. शाबास ! पेट्रोल पम्प वर पेट्रोल सुद्धा फ्री करावे. ८) ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान मिळावे. इथे श्रीमान अजितदादा पवार ह्यांना बोलावे ते आपले ठिबक सिंचन करून धरण सुद्धा भरू शकतात.
  • Log in or register to post comments
अ
अत्रे Fri, 06/02/2017 - 04:28 नवीन
शेतकऱ्यांच्या मागण्या फक्त महाराष्ट्रा पुरत्या आहेत का? फक्त महाराष्ट्रातील शेतकरी संपावर का जात आहेत? इतर राज्यातल्या शेतकऱ्यांना तेच प्रश्न भेडसावत नाहीत का?
  • Log in or register to post comments
अ
अत्रे Fri, 06/02/2017 - 10:17 नवीन
या प्रश्नांची उत्तरे मिळतील का? धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अनन्त्_यात्री Fri, 06/02/2017 - 11:38 नवीन
शेतकऱ्यांची निदर्शने चालू झाली आहेत (पहा म.टा. लाइव्ह)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
म
मराठी_माणूस Fri, 06/02/2017 - 06:57 नवीन
शेतकर्‍यांचे उत्पादन ग्राहाका पर्यंत पोहचण्या साठी बर्‍याच लोकांचा सहभाग असतो. ज्यात अडते/दलाल/ बाजार समीती , वहातुक वगैरे आणि शेवटी ग्राहक स्वतः. ह्या साखळीच्या सुरवातीची कडी म्हणजे शेतकरी आत्महत्या करतो आणि बाकीचे ह्या साखळीतले सदस्य मात्र असे करताना दिसत नाहीत. ह्याचे कारण काय ? दुसरे असे की, जो लाचारीने / दुसर्‍यांच्या दान धर्मावर जगतो त्याला भिकारी म्हटले जाते. स्वाभीमानाने जगणार्‍याला अशी वेळ येण्यापेक्षा मरण बरे असे वाटते.आपल्या नंतर आपल्या कुटुंबाची काय वाताहत होणार आहे हे त्या शेतकर्‍याला माहीत नसते काय ? तरीही तो अशी टोकाची भुमीका घेतो याचे काय कारण ?
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 06/02/2017 - 07:29 नवीन
वरच्या बऱ्याचशा प्रतिक्रिया ज्यांचे पोट भरल्या नंतर ढेकर दिलेल्या लोकांच्या आहेत.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Fri, 06/02/2017 - 07:37 नवीन
विशुमित माझा काल पण उपास होता आणी आज देखिल अजून तो मी सोडलेला नाही. माझं पोट रिकामं आहे, त्यामुळे मला ढेकर पण आलेली नाही. त्यामुळे मी प्रश्न विचारण्यास पात्र ठरतो. कृपया ह्यापैकी कुठल्या मागण्या ५ दिवस संप करून मान्य होण्यासारख्या आहेत ते सांगता का? कुठल्या मागण्या व्यवहारिक आहेत? कुठल्या देशात अश्या प्रकारे शेतीसाठी व्यवस्था केली गेली आहे? फिस्कली हे पॉसिबल आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 06/02/2017 - 08:18 नवीन
सौरा जी... विषय गंभीर आहे, याचे कृपया भान ठेवा. सगळ्या मागण्या व्यावहारिक आहेत. फक्त या सरकार मध्ये ती दानत (द्यायची इच्छा), कुवत आणि हिम्मत नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
क
कुंदन Fri, 06/02/2017 - 10:29 नवीन
मागे काही सरकारे स्वतः च्या खिशातुन अशी कर्ज माफी देत होते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/03/2017 - 08:26 नवीन
आत्महत्त्या, कर्ज, शेतमालाला कमी भाव हे सर्व प्रश्न या तीनच वर्षात उभे राहीले आहेत. दिलीप पवार :) (आपला नम्र)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
अ
अद्द्या Fri, 06/02/2017 - 07:44 नवीन
उद्या मी आयटी मधली / किंवा फौंड्री इंडस्ट्री मधली रडगाणी गेली आणि त्यावर संपाला जाऊन इथे धागे काढले . आणि कोणी विरुद्ध तरीही योग्य उपाय सुचवले . किंवा खरे प्रश्न विचारले. तरीही हीच प्रतिक्रिया दद्याल का तुम्ही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
द
दशानन Fri, 06/02/2017 - 07:50 नवीन
सहमत! आणि ढेकर ही स्वाभाविक प्रतिक्रिया असते, मला तर पोट रिकामे असले तरी ढेकर येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा