शिवसेना..... ???
शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष.
छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही.
सेनेने महारष्ट्रातील लोकाम्साठी नक्की काय केले ते खरेच अभ्यासायला हवे. एके काळी मराठी चा जयघोष करणारी सेना घुमजाव करत एकाएकी हिंदुत्ववादी कशी झाली याची कारणे कधीच बाहेर आली नाहीत. तरीही लोकाना खास करुन तरुणाना; सेनेचे आकर्षण होते कारण बाळासाहेबांची भाषण करण्याची हातोटी.
मुंबईत एकेकाळी गिरणी कामगारांच्या बळावर वाढलेल्या सेनेने दत्ता सामंतांच्या संपाच्या वेळेस काय भुमीका घेतली होती हे कोणाला आठवणार नाही.
पुण्यात गाजलेल्या टेल्को सम्पाच्या वेळेस देखील सेना कुठेही चर्चेतही नव्हती.
सेना खरी चर्चेत आली ती सेनेकडे मुंबईचे महपौर पद आल्या नंतर.
बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले.
त्यातूनच सेना विधानसभेत सत्ताधारी झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक अपेक्षीत पण वेगळा प्रवाह सुरू झाला.
सेने बद्दल बरीच चर्चा होते. त्यानी ग्रामीण भागात शाळा, पतसंस्था , कॉलेज , रोजगार या साठी काहीच केले नाही.
याबद्दलही काही विचारायचे नाही.
लखोबा लोखंडे , नारोबा , खंडोजी खोपडा वगैरे घणाघाती दुषणांवर जनता त्यातील मनोरंजकतेमुळे खुष असायची.
सध्याच्या फडणवीस सरकारात सेनेची काय भुमीका आहे ते जगजाहीर आहे.
शिवसेनेबद्दल समर्थनार्थ एक गोष्ट मात्र वारंवार सांगितली जाते की १९९२ च्या मुंबई दंगलीच्या वेळेस सेना नसती तर मुंबई वाचली नसती.
शिवसेना होती म्हणून आपण आज मुंबईत आहोत.
हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो की त्या वेळेस मुंबईत मुंबै पोलीस , निमलश्करी दले, काही भागात लक्शर तैनात केले होते. हे सगळे असतानाही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती आणि शिवसेना या सर्वांपेक्शा प्रबळ होती,
राज्य राखीव पोलीस दल ही त्यावेळेस तैनात होते. मग त्यांचे जवान हे त्यावेळेस काय केळी खात बसले होती की काय अशी शंका येते.
या वेळेस शिवसेने ने नक्की असे काय केले की जे पोलीस दल , निमलष्करी दले आणि भारतीय सेना याना जमत नव्हते?
एखादा राजकीय पक्ष हा राज्य पोलीसदल , सैन्य दल यांच्या पेक्षाही प्रबळ ठरतो याला कोणते लक्षण मानायचे.
मला यात कोणत्याही राजकीय पक्षाची भलामण करायची नाही मात्र केवळ जाणून घ्यायचे आहे.
१९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले
( हे उघडपणे मुंबईत कोणाला विचारायचे माझे धाडस नाही. म्हणुन इथे विचारतोय )
मला मुळात हे "शिवसेनेने काय काम केले ते सांगा" वगैरे पूर्वग्रहदूषित प्रश्नामागचं प्रयोजनच कळत नाही. जर असे काही प्रश्न खरंच पडत असतील तर गुगल करून पहिले तरी त्यांनी काय काम केले साधारणपणे समजू शकते. गेलाबाजार त्यांची स्वतःची वेबसाईट तरी नक्की धुंडाळता येते. तिथे त्यांनी त्यांची कामे खोटी टाकली असतील तर त्यांना पुराव्यानिशी उघडे पडत येते.शोधून काहीच सापडलं नाही म्हणूनच विचारलं. विचारून २ दोन दिवस लोटले तरी गेल्या ५१ वर्षात १९९३ मध्ये कोणाला तरी बडवून काढलं याशिवाय दुसरं काम सांगता आलेलं नाही. शिवजलक्रांती वगैरे जलयुक्त शिवारचंच काम आहे. वेबसाईटवर तर संपूर्ण थापा असणार. 'सामना'तून जिथे रोज गरळ ओकण्याशिवाय दुसरं काही नसतं, तसंच वेबसाईटवर पण असणार.हे सर्व न करता त्यांचे सध्याचे आमदार/खासदार काहीतरी मनगटात दम वगैरे भाषणं करून निवडून येतात आणि मग पाच वर्षे भाषणे करतात आणि परत निवडणूक आल्या कि अशीच भाषणे करतात आणि निवडून येतात अशा अर्थाची सरसकट विधाने करणे तार्किक वाटते का? हि अशी सरसकट विधाने तर काँग्रेस/राष्ट्रवादीला देखील लागू होत नाहीत. मग शिवसेनेवर आसूड का? म्हणजे भाजप ची चांगली कामे पुढे करून भाजप मला आवडते हे म्हणताना मला शिवसेनेची अडचण अजिबात होत नाही. त्यांच्या फुकाच्या धमक्या आणि आजकाल सरकारच्या आतून विरोधी भूमिका बजावणं मलाही नाही पटत पण त्यांची ती स्ट्रॅटेजी आहे. भाजपच्या विरोधात प्रचार करून त्यांचे उमेदवार निवडून येतात हे विसरून चालता येत नाही.प्रत्येक निवडणुकीच्या वेळी सेना एखादा भावनिक बागुलबुवा निर्माण करून मते मिळवितात. तो बागुलबुवा कधी दाक्षिणात्यांच्या स्वरूपात असतो तर कधी मुस्लिमांच्या स्वरूपात तर कधी उत्तर भारतीय, बिहारींच्या स्वरूपात तर कधी गुजरात्यांच्या स्वरूपात असतो. याव्यतिरिक्त, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, महाराष्ट्र तोडण्याचा डाव आहे, महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर नेण्याचा डाव आहे असा प्रत्येक निवडणुकीत प्रोपागंडा असतोच. हा धागा सेनेवर आहे,भाजपवर नाही. त्यामुळे भाजपच्या कामांची चर्चा इथे करण्याची गरज नाही. सेनेची कामे दाखवा म्हटले की आधी भाजपची दाखवा असे म्हणणे हीच सेनेने काहीही न केल्याची कबुली आहे. भाजपच्या कामावर इतर अनेक धागे निघाले आहेत. अजूनही निघतील. त्यात भाजपबद्दल लिहिता येईल. ९५-९९ या काळात मंत्रीमंडळात भाजप कनिष्ठ भागीदार होता. खरं तर भाजपच्या जन्मापासून भाजपचा जनाधार महाराष्ट्रात सेनेच्या तुलनेत खूप जास्त होता. त्याविषयी इतर ३-४ धाग्यांवर भरपूर आकडेवारी देऊन सविस्तर लिहिले आहे. इथे परत लिहिण्याचा कंटाळा आला आहे. जनाधार जास्त असूनसुद्धा भाजपने कनिष्ठ भूमिका का स्वीकारली हे एक गूढ आहे. सेनेच्या तुलनेत खूप जास्त जनाधार असूनसुद्धा मंत्रीमंडळात कनिष्ठ भूमिका घ्यावी लागली तरी भाजपचे त्याबद्दल चडफडाट न करता, न कुरकुरता मिळालेल्या संधीचा फायदा करून घेतला. नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना अतिशय धडाडीने काम करून त्यांनी मेळघाटात प्रथमच डांबरी रस्ते बांधले. मुंबईत ५५ उड्डाणपूल, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग असे अनेक मोठे प्रकल्प यशस्वीपणे राबविले. पंढरपूर यात्रेच्या मार्गावर अनेक वर्षे मागणी होत असलेला एका नदीवरील पूल त्यांच्या खात्याने ३८ दिवसांत बांधून पूर्ण केला होता. आपल्या कामाचे श्रेय कोणाला जाईल याचा विचार न करता त्यांनी इतके धडाडीने काम केले की हे खाते त्यांच्या नावाने ओळखले जाऊ लागले. आज परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. मंत्रीमंडळात दुय्यम भूमिका स्वीकारावी लागल्याचे सेनेला सहन झालेले नाही. त्यामुळे पहिल्या दिवसापासून चडफडाट, असहकार, सरकारच्या प्रत्येक निर्णयावर मंत्रीमंडळाच्या बैठकीत संमती व बाहेर आल्यावर सडकून टीका, प्रत्येक कामात अडथळे, अत्यंत अर्वाच्य भाषेत भाजप नेत्यांचा उद्धार, पोकळ बढाया यापलिकडे त्यांनी काहीही केलेले नाही. केजरीवाल मागील दोनअडीच वर्षे जे करीत आहेत, तेच सेना इथे करीत आहे. हातात जी खाती आहेत, त्यात चांगले काम करून आपल्या कामाचा ठसा उमटविण्याऐवजी सातत्याने नकारात्मक भूमिका घेत राहिल्याने सेनेबद्दल संताप व तिरस्कार वाढत आहे.आम्ही हे केले ते केले आमच्या मनगटात ताकद व अंगात रग आहे वगैरे बाष्कळ बाता न मारता यांनी व यांच्या समर्थकांनी आधी जमिनीवर यावे व आपण आता सोळाव्या नासुन एकविसाव्या शतकात आहोत हे ध्यानात घ्यावें. ते होणे मुश्किल दिसतेरस्त्याने एखादा वेड लागलेला माणूस हातवारे करीत, तोंडाने मोठ्याने बडबडत जात असताना काही जण त्याच्याकडे वेडा समजून दुर्लक्ष करतात तर काही जण त्याचा सदरा ओढ, त्याच्या मागून जाऊन त्याला टप्पल मारून पळून जा, त्याच्यासमोर त्याला वेडावून दाखविणे अशी खिल्ली उडवून त्याला काव आणत असतात. सध्या उधोजी, राऊत, कदम अशा सेना नेत्यांची अवस्था रस्त्याने हातवारे करीत, बडबडत जाणार्या वेड्यासारखी झाली आहे. बहुतेक पक्ष त्यांच्या बरळण्याकडे, धमक्यांकडे व फुशारक्यांकडे दुर्लक्ष करतात. आशिष शेलार, सोमय्या इ. नेते मात्र त्यांची टिंगल उडवितात. विशेषतः सामाजिक माध्यमांवर सेना नेत्यांच्या टिंगलीचा महापूर आला आहे. आपल्याला मूर्ख समजले जात आहे व आपल्याला कोणीही जमेस धरत नाही हे यांच्या लक्षात आलेले नाही. आम्ही भूकंप करू, आम्ही राजीनामे खिशात ठेवून हिंडत आहोत, यांच्या कंबरड्यात आम्ही लाथा घालत राहिल्यामुळे यांना शेतकर्यांना कर्जमाफी द्यावी लागली, सर्जिकल स्ट्राईक करा असे आम्हीच सांगत होतो, जलयुक्त शिवार योजना आमचीच आहे अशा हास्यास्पद बढाया वाचून आता यांची कीवही येत नाही.भाजप सेनेच्या खांद्यावर वाढलेला नसून सेनाच भाजपच्या खांद्यावर बसून महाराष्ट्रात वाढली.खम्प्लीट असहमत. सेना महाराष्ट्रात मोठा भाऊ होता. मात्र २०१४ ला भाजपाचे पारडे जड झाले जे उधोजीरावांना समजले नसावे किंवा इतके दिवस आपल्या हातात असलेले नेतेपद भाजपाकडे कसे सोपवायचे अशा विचाराने त्यावेळी सुरू झालेली आदळापट अजूनही सुरू आहे.इतके असूनही भाजपनेच शिवसेनेला विनाकारण मोठ्या भावाचा दर्जा दिला.हेच म्हणायचे आहे. विनाकारण का असेना पण दर्जा होता जो २०१४ ला सेनेकडून भाजपाकडे गेला.१९८० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला राज्यात ९.४% मते होती तर २८८ पैकी १४ जागा मिळाल्या होत्या.त्यावेळी शिवसेना कुठे होती? १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्येही शिवसेनेच्या तथाकथित बालेकिल्ल्यात-- गिरणगावात शिवसेनेचे वामनराव महाडिक तिसर्या क्रमांकावर फेकले गेले होते.शिवसेनेचा तथाकथित दुसरा बालेकिल्ला म्हणजे ठाणे.तिथे निवडून कोण आले? तर पूर्वाश्रमीचे जनसंघाचे (आणि जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढविणारे) रामभाऊ म्हाळगी आणि शिवसेनेचे सतीश प्रधान ८% मते मिळवून आपले डिपॉझिट गमावून बसले. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे राज्यातून ८ उमेदवार विजयी झाले. त्यापैकी रामभाऊ म्हाळगींव्यतिरिक्त राम जेठमलानी आणि सुब्रमण्यम स्वामी हे जनसंघाची पार्श्वभूमी असलेले होते. या सगळ्यात शिवसेना कुठे होती?शिवसेनेने १९७८ च्या विधानसभा निवडणुकीतही ३५ उमेदवार उभे केले होते. त्यातील एकही निवडून आला नव्हता. वास्तविक पाहता १९७८ मध्ये जनता पक्ष, समाजवादी काँग्रेस व इंदिरा काँग्रेस या ३ प्रमुख पक्षात मते विभागली गेली होती. अशावेळी सेनेला निदान आपल्या तथाकथित बालेकिल्ल्यात (म्हणजे मुंबई-ठाण्यात) तरी काही जागा मिळायला हव्या होत्या कारण सेनाविरोधी मते ३ पक्षात विभागली गेली होती. परंतु सेनेला भोपळाच मिळाला होता. १९८० च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात व महाराष्ट्रात इंदिरा कॉंग्रेसची प्रचंड लाट होती. इंदिरा कॉंग्रेसला देशात एकूण ३५५ व महाराष्ट्रात ४६ पैकी (२ जागा त्यांनी सेनेला सोडल्या होत्या) ३९ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत सेनेने इंदिरा काँग्रेसशी युती करून आपल्या तथाकथित बालेकिल्ल्यात २ जागा लढविल्या होत्या. एकतर हा भाग म्हणजे यांचा बालेकिल्ला (असा यांचा गैरसमज) व त्यातून सर्वत्र प्रचंड लाट असलेल्या इंदिरा काँग्रेसबरोबर युती यामुळे खरं तर या दोन्ही जागा सेनेसाठी केकवॉक ठरायला हव्या होत्या. प्रत्यक्षात दोन्ही ठिकाणी यांचा पराभव झाला. मुंबई-ठाणे हा भाग सेनेचा बालेकिल्ला आहे हा भ्रम खरं तर तेव्हाच उघडकीला आला होता. मुंबई-ठाण्यातील काही प्रभाग वगळले तर इतरत्र सेनेला स्थान नाही हे तेव्हाच सिद्ध झाले होते.१९८४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युती होती.पण त्यावेळी इंदिरा हत्येनंतरच्या सहानुभूतीच्या लाटेत सगळेच वाहून गेले. १९८५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.त्यावेळी भाजपला ७.३% मते आणि १६ जागा तर शिवसेनेला छगन भुजबळांची माझगाव ही एकमेव जागा मिळाली होती.या काळात भाजपकडे राम नाईक यांची बोरीवली, राम कापसे यांची कल्याण, कोकणात श्रीधर नातूंची गुहागर, अप्पासाहेब गोगट्यांची देवगड इत्यादी हक्काच्या जागा होत्या.शिवसेनेकडे हक्काच्या अशा नक्की कोणत्या जागा होत्या आणि किती?वर लिहिलेल्या भाजपच्या हक्काच्या जागा सेनेने घशात घातल्याच, पण त्याबरोबरीने पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघही सेनेने जबरदस्तीने बळकावला. शिवाजीनगरमधून याआधी भाजपने सलग दोन वेळा विजय मिळविला होता. भाजपने बांधलेला हा मतदारसंघ सेनेने आयत्या बिळावर नागोबाप्रमाणे हिसकावून घेतला. सेनेकडे स्वतःचा बांधलेला एकही मतदारसंघ नसताना त्यांना २८८ मधील १८३ जागा देणे व स्वतःकडे फक्त १०५ जागा ठेवणे हा मूर्खपणा होता.असला बेजबाबदार मित्रपक्ष दूर झाला हे चांगलेच झाले. असे म्हणतात की पाठीत खंजीर खुपसणार्या मित्रापेक्षा दिलदार शत्रू परवडला.शिवसेनेविषयी नेमके हेच मलाही वाटत आहे. ही गोष्ट बरीच आधी व्हायला हवी होती ती आता झाली आहे. अपेक्षा एकच की शिवसेना बाहेर पडल्यावर त्याजागेवर राष्ट्रवादी काँग्रेस नको. तसे झाले तर विधानसभा निवडणुकांमध्ये तरी माझे मत भाजपला नक्कीच नाही.गरज पडल्यास सत्ता गेली तरी हरकत नाही पण शिवसेना नको आणि राष्ट्रवादीही नको.+१जर तेव्हाचे काम गडकरींचे होते तर मग इतर मंत्र्यांची कामे शिवसेनेची नसतील का? किंवा मग आजची सामाजिक बांधकामाची कामे, परिवहनची कामे, उद्योगाची कामे इ. शिवसेनेची नसतील का?हे सर्व सब्जेक्टिव्ह आहे. नक्की टँगिबल कामे आहेत का? सामाजिक बांधकामाचं कोणतं काम सेनेने केले आहे? परिवहन, उद्योग या क्षेत्रात सेनेने नक्की कोणती कामे केली आहेत?आधीची तुमची यादी जलयुक्त शिवार आणि एक दोन लोकांवर कारवाई सुरू करणे (कारवाई करणे नव्हे) यापुढे गेलेली नाही ते एक असोच!हा धागा शिवसेनेवर आहे, भाजपवर नाही. त्यामुळे मी भाजपने केलेली फक्त एकदोन उदाहरणे दिली. भाजपची कामे पहायची असतील तर भाजपवर काढलेले धागे वाचा.सुरुवात शिवसेनेच्या वेबसाईटवर त्यांनी टाकलेल्या कामांपासून होऊ शकते. बाकी ९५-९९ च्या सरकारमधील शिवसेनेचे झुणका भाकरी योजना, ५ जीवनावश्यक वस्तूंच्या भाव स्थिर ठेवणे, स्वस्त धान्य दुकानांचे उत्तम व्यवस्थापन, महागाईवर नियंत्रण, कामधेनू योजना, महाराष्ट्र छात्र सेना, सैनिकी शाळा (मुलींसाठीही), सेतू योजना, क्रीडापीठ, आदिवासींसाठी पाडासेवक (बहुतेक हेच नाव असावं), निवृत्ती वय कमी करून काही अंशी का होईना नौकऱ्या उपलब्ध करणे इ. कामे थोडावेळ बाजूला ठेवू!झुणकाभाकर केंद्र म्हणजे लोकांना कोपर्याकोपर्यावर बेकायदेशीर टपर्या टाकून दिल्या. माझ्या घराजवळही अशी एक टपरी कोपर्यावर होती. या टपर्यात झुणकाभाकरी ऐवजी पेप्सी, बिसलेरी, गुटख्याच्या पुड्या असल्या गोष्टी विकायला असायच्या. यथावकाश यातील बरीचशी केंद्रे बंद पडली. बाकी हे ५ जीवनावश्यक वस्तूंच्या भाव स्थिर ठेवणे, स्वस्त धान्य दुकानांचे उत्तम व्यवस्थापन, महागाईवर नियंत्रण, कामधेनू योजना, महाराष्ट्र छात्र सेना, सैनिकी शाळा (मुलींसाठीही), सेतू योजना, क्रीडापीठ, आदिवासींसाठी पाडासेवक (बहुतेक हेच नाव असावं) हे नक्की काय आहे, हे कधी सुरू झालं, त्याचा जनतेला काय फायदा झाला याविषयी जरा सविस्तर सांगा. मुख्य म्हणजे शिवसेनेच्या वेबसाईटवरून कॉपीपेस्ट करू नका. कोणत्याही पक्षाच्या मुखपत्रात व वेबसाईटवर फक्त स्वतःचेच ढोल बडविलेले असतात. त्यामुळे कोणत्यातरी दुसर्या स्त्रोतातून माहिती सांगा.